Friday, 14 March 2025

आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटी फिल्‍म सिटीत जागा देणार, केंद्र सरकारकडून ४००

 आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटी

फिल्‍म सिटीत जागा देणारकेंद्र सरकारकडून ४०० कोटी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

वेव्हज २०२५’ शिखर परिषदेचे यजमानपद महाराष्ट्राला

 

          नवी दिल्ली१३ देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर  इंडियन इंस्टियुट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईच्या गोरेगावात उभारण्यात येईल व यासाठी केंद्र शासन ४०० कोटी रूपयांची आर्थ‍िक मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद (World Audio-Visual & Entertainment summit-२०२५-‘ वेव्हज २०२५’ ) च्या पहिल्या सत्राचे आयोजन सुषमा स्वराज भवन येथे करण्यात आले. या सत्रात मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी ही माहिती दिली.

जागतिक स्तरावर होणा-या या पहिल्या परिषदेचे यजमान पद  महाराष्ट्र राज्याला मिळाले असूनराज्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आभार मानले. राज्याच्या आर्थिक राजधानीत १ ते ४ मे २०२५ दरम्यान मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे ही भव्य परिषद होणार आहे. शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राचे आयोजन  केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने  केले असूनया सत्रात विविध देशांच्या राजदूत आणि उच्चायुक्तांनी सहभाग घेतला.

या महत्त्वाच्या बैठकीत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकरमाहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयावर आपले विचार मांडले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय व महाराष्ट्र शासन दरम्यान वेव्हज २०२५’  निमित्त सामंजस्य करार झाला.

या सत्राचे प्रास्ताविक केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजु यांनी केले तर आभार केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी केले. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव एल.अन्बलगन  उपस्थित होते.  

हास्यास्पद काम आणि ठेवलेली नाव

 नवस करून, 

9 महीने जीवापाड जपून, 

दिवस रात्र स्वप्न बघून 

जन्माला आलेल्या मुलाचे नाव 

त्याचे आई वडिल 

'विनोद' कसे काय ठेवतात मला आजवर नाही समजलय - 

 *पु. ल. देशपांडे*  


😧😧😧


'प्रताप' नावाबद्दल पण तेच...


'हा आमचा प्रताप' अशी ओळख 

आई—वडीलांनी करुन दिली 

तर कसे वाटेल?? 

 *—पु. ल. देशपांडे* 


😧😧😧


पणशीकरांना मुलगा झाला...

मुलाचे नाव "श्रीपाद" ठेवले...


त्याचे पूर्ण नाव:

'श्री पाद पण शी कर..!!


 *इति - पु. ल. देशपांडे* 


धन्य धन्य !

😂😂😂😂

Thursday, 13 March 2025

पानीपत में ‘मराठा शौर्य स्मारक’ बनेगा - मंत्री जयकुमार रावल

 पानीपत में मराठा शौर्य स्मारक’ बनेगा - मंत्री जयकुमार रावल

मुंबई13 मार्च: राज्य सरकार की ओर से पानीपत में मराठा योद्धाओं के पराक्रम को सम्मानित करने के लिए मराठा शौर्य स्मारक’ बनाया जाएगा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मराठा शौर्य दिवस कार्यक्रम में इस संबंध में घोषणा की थी। इसके अनुसारसरकार ने शासन आदेश जारी कर दिया हैऔर सभी प्रक्रियाएं पूरी करके जल्द ही हरियाणा के पानीपत स्थित काला अंब’ क्षेत्र में यह स्मारक स्थापित किया जाएगाऐसी जानकारी प्रोटोकॉल और विपणन मंत्री जयकुमार रावल ने दी।

इस विषय में अधिक जानकारी देते हुए मंत्री रावल ने बताया कि हरियाणा राज्य के काला अंब’ क्षेत्र में इस स्मारक के लिए भूमि अधिग्रहण की प्रक्रिया जल्द शुरू की जाएगी। उस स्थान पर छत्रपति शिवाजी महाराज की भव्य प्रतिमा स्थापित की जाएगीसाथ ही मराठा शौर्य का प्रतीक संग्रहालयदृश्य-श्रव्य प्रदर्शनी और अन्य आवश्यक सुविधाएं भी विकसित की जाएंगी। इस परियोजना के लिए हरियाणा सरकार के साथ समन्वय स्थापित करने हेतु मंत्री रावल स्वयं समन्वयक की भूमिका निभाएंगे। महाराष्ट्र पर्यटन विकास विभाग इस परियोजना के लिए नोडल एजेंसी के रूप में काम करेगा। मराठा साम्राज्य के गौरवशाली इतिहास को उजागर करने के लिए विभिन्न योजनाएं चलाई जाएंगी।

17वीं और 18वीं शताब्दी में मराठा साम्राज्य का विस्तार अफगानिस्तान तक हो गया था। मराठा योद्धाओं के अद्वितीय पराक्रम के कारण हिंदवी स्वराज्य का ध्वज अटक से कटक तक लहराया गया था। 1761 में अहमद शाह अब्दाली के विरुद्ध पानीपत की ऐतिहासिक लड़ाई में मराठा योद्धाओं ने वीरतापूर्वक संघर्ष किया। इस युद्ध में मराठा साम्राज्य को अपार क्षति हुईलेकिन इतिहास में यह लड़ाई त्यागबलिदानराष्ट्रप्रेमसंघर्षशीलता और राष्ट्र के प्रति संपूर्ण समर्पण के लिए याद की जाती है।

इसी युद्ध में मराठा वीरों के बलिदान को नमन करने के उद्देश्य से यह मराठा शौर्य स्मारक’ बनाया जा रहा हैऐसा मंत्री रावल ने कहा।

0000

रेडियो क्लब में नई जेट्टी का भूमि पूजन,

 रेडियो क्लब में नई जेट्टी का भूमि पूजन,

मंत्री नितेश राणे ने किया भूमीपूजन

 

मुंबई, 13 मार्च : महाराष्ट्र के बंदरगाह मंत्री नितेश राणे ने रेडियो क्लब में नई यात्री जेट्टी और टर्मिनल इमारत के निर्माण हेतु भूमि पूजन किया। इस अवसर पर महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड के मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपमुख्य अभियंता सुरेंद्र टोपलेवरिष्ठ प्रशासनिक अधिकारी प्रदीप बढीयेअधीक्षक अभियंता सुधीर देवरे और अन्य अधिकारी उपस्थित थे।

गेटवे ऑफ इंडिया पर स्थित वर्तमान जेट्टी यात्रियों की बढ़ती संख्या के लिए अपर्याप्त साबित हो रही हैजिससे बुजुर्गोंमहिलाओं और छोटे बच्चों को कठिनाइयों का सामना करना पड़ता है। प्रस्तावित जेट्टी के निर्माण से गेटवे ऑफ इंडिया की मौजूदा जेट्टी पर दबाव कम होगा और यात्रियों को बेहतर सुविधाएं मिलेंगी।

जेट्टी टर्मिनल इमारत की विशेषताएँ

आकार: 80 मीटर × 80 मीटर

एम्फीथिएटर: 350 लोगों की बैठने की क्षमता

बर्थिंग जेट्टी एवं अप्रोच जेट्टी

अग्नि सुरक्षा प्रणाली

सीसीटीवी निगरानी प्रणाली

उद्यान और सौंदर्यीकरण

इसके अलावापरियोजना स्थल पर भूगर्भीय परीक्षण किया गया है ताकि निर्माण की व्यवहार्यता सुनिश्चित की जा सके।

पानिपत येथे 'मराठा शौर्य स्मारक' होणार

 पानिपत येथे 'मराठा शौर्य स्मारकहोणार

- मंत्री जयकुमार रावल

 

मुंबई दि. १३ : पानिपत येथे मराठा युद्धवीरांचे शौर्य स्मारक राज्य शासनाच्या वतीने उभारले जाईलअशी घोषणा मराठा शौर्य दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. त्यानुसार शासन आदेश निर्गमित झाला आहे. शासनाच्या वतीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून हरियाणा राज्यातील पानिपत येथील 'कालाअंबपरिसरात लवकरच 'मराठा शौर्य स्मारकउभारले जाईलअशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

  

या यासंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री श्री. रावल म्हणाले कीहरियाणा राज्यातील 'कालाअंबयेथे लवकरच या स्मारकासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होईल. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजा यांचा भव्य पुतळा उभा केला जाईल. तसेच मराठा शौर्याचे प्रतीक असणारे संग्रहालयदृकश्राव्य कार्यक्रम व आवश्यक त्या सुविधा निर्माण केल्या जातील. यासाठी हरियाणा राज्य शासनाशी समन्वय साधण्यासाठी मी स्वत: समन्वयक म्हणून काम करणार आहे. या प्रकल्पाला जमीन अधिग्रहित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास विभाग नोडल यंत्रणा म्हणून काम करणार आहे. मराठा साम्राज्याचा जाज्वल्य इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक ते उपक्रम राबवण्यात येतील.

 

सतराव्या आणि अठराव्या शतकात मराठा साम्राज्याचा विस्तार अफगानिस्तानापर्यंत झाला होता. मराठा शौर्य वीरांच्या अतुलनीय पराक्रमामुळे अटक पासून ते कटक पर्यंत हिंदवी स्वराज्याचा झेंडा रोवला गेला. १७६१ साली  अहमदशाह अब्दाली विरुद्ध झालेल्या पानिपत रणसंग्रामामध्ये मराठा वीरांनी झुंज दिली. या लढाईत मराठा साम्राज्याची अपरिमित अशी हानी झाली मात्र इतिहासामध्ये ही लढाई त्यागबलिदानराष्ट्रप्रेमलढाऊ वृत्तीराष्ट्राकरिता संपूर्ण समर्पण या करिता संस्मरणीय आहे. तसेच या युद्धातील मराठा वीरांच्या बलिदानाला नमन करण्याच्या उद्देशाने हे मराठा शौर्य स्मारक होत आहेअसेही मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.

रेडीओ क्लब येथील नवीन जेट्टीचे मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते भूमीपूजन




 रेडीओ क्लब येथील नवीन जेट्टीचे

मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते भूमीपूजन

मुंबईदि. 13: रेडीओ क्लब येथील प्रवासी जेट्टीटर्मिनल इमारतीचे भूमीपूजन बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपमुख्य अभियंता सुरेंद्र टोपलेवरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीयेअधीक्षक अभियंता सुधीर देवरे आदी उपस्थित होते.

            गेट वे ऑफ इंडिया येथील अस्तित्वातील जेट्टीवरील सुविधा प्रवाशांकरीता अपुरी पडत असल्याने वृद्ध व्यक्तीस्त्रीया व लहान मुले यांना अडचणी निर्माण होतात. या प्रस्तावित जेट्टीमुळे गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. 

अशी असणार जेट्टी टर्मिनल इमारत

80 मीटर बाय 80 मीटर350 लोकांची क्षमता असलेले ॲम्पीथिएटरबर्थिग जेट्टीअप्रोज जेट्टीअग्नीसुरक्षा प्रणालीसीसीटीव्ही यंत्रणागार्डनिंग व सुशोभीकरण. या कामाच्या ठिकाणी  भूगर्भ चाचणी करण्यात आली आहे

जय महाराष्ट्र' कार्यक्रमात संचालक डॉ. कैलास मोते यांची मुलाखतविषयावर फलोत्पादन विभागाचे संचालक, डॉ. कैलास

 जय महाराष्ट्रकार्यक्रमात 

संचालक डॉ. कैलास मोते यांची मुलाखत

मुंबई दि. १३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात 'फलोत्पादन विभागाच्या योजना व अंमलबजावणीया विषयावर  फलोत्पादन विभागाचे संचालकडॉ. कैलास मोतेयांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात संचालक डॉ. मोते यांची मुलाखत मंगळवार दि.१८ मार्च २०२५ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार असूनमहासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरील पुढील लिंकवर देखील ही मुलाखत पाहता येणार आहे. ज्येष्ठ निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यात कृषि क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे विविध फळपिकेभाजीपाला यांच्या उत्पादनात व उत्पादकतेत वाढ झाली आहे.  शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव तसेच ग्राहकांनाही वाजवी दरात शेतीमाल उपलब्ध करुन देण्यासाठी फलोत्पादन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. राज्याला फलोत्पादन क्षेत्रात आघाडीवर आणण्यासाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दीर्घकालीन उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना फलोत्पादन क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न याविषयी फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. मोते यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात माहिती दिली आहे.

समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे.

एक्स - https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

 

Featured post

Lakshvedhi