Friday, 7 March 2025

एआई और स्पेस टेक के उपयोग से राज्य को आगे बढ़ाएंगे

 एआई और स्पेस टेक के उपयोग से राज्य को आगे बढ़ाएंगे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे, 06 मार्च (जिमाका): आने वाला समय स्पेस टेक्नोलॉजी का हैऔर एआई तथा स्पेस टेक के संयुक्त उपयोग से महाराष्ट्र को प्रगति के पथ पर आगे ले जाया जाएगाऐसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने व्यक्त किया।

"स्पेस-टेक फॉर गुड गवर्नेंस" राष्ट्रीय सम्मेलन का आयोजन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीउत्तन में किया गया। यह कार्यक्रम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी और स्पेस टेक के संयुक्त प्रयास से आयोजित किया गया था।

मुख्य बिंदु:

प्रमुख उपस्थित अतिथि: लेफ्टिनेंट जनरल विनोद खंडारे (सेवानिवृत्त)डॉ. प्रकाश चव्हाण और पूर्व राज्यसभा सांसद डॉ. विनय सहस्त्रबुद्धे।

स्पेस टेक्नोलॉजी का उपयोग रिमोट सोर्सिंगड्रोन जीपीएस निगरानी और पारदर्शी प्रशासन में किया जा रहा है।

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने स्पेस टेक्नोलॉजी की महत्ता को समझते हुए नीति निर्माण कियाजिससे निजी क्षेत्र की भागीदारी सुनिश्चित हो सके।

गतिशक्ति प्लेटफॉर्म के माध्यम से स्पेस टेक का उपयोगजिससे परियोजनाओं की समय-सीमा में कमी आई है। भविष्य मेंडिजिटल स्पेस टेक प्रणाली अपनाने से लगभग ₹2,500 करोड़ की बचत होगी।

जल संरक्षण योजना "जलयुक्त शिवार" में 20,000 गांवों में स्पेस टेक्नोलॉजी के माध्यम से जल संसाधनों की योजना बनाई गई।

भूस्खलनबाढ़ और भूकंप जैसी आपदाओं के दौरान स्पेस टेक आपदा प्रबंधन में सहायक होगी।

अगले तीन महीनों में "स्पेस टेक पॉलिसी" लागू की जाएगीजिससे स्टार्टअप और नवाचार को बढ़ावा मिलेगा।

भू-स्थानिक (Geospatial) तकनीक ग्राम पंचायत विकास योजना (GPDP) के निर्माण में प्रभावी होगी।

इस कार्यक्रम में उपग्रह चित्रण और भू-स्थानिक उपकरणों के माध्यम से ग्रामीण चुनौतियों का समाधान खोजने पर चर्चा की गई। इससे सरकारउद्योग और तकनीकी संस्थानों के बीच सहयोग बढ़ेगाजिससे नवाचार को गति मिलेगी और सार्वजनिक सेवाएं मजबूत होंगी।

इस उद्घाटन सत्र में डॉ. जयंत कुलकर्णी (कार्यकारी निदेशकरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी) ने प्रस्तावना प्रस्तुत कीजबकि डॉ. विनय सहस्त्रबुद्धे ने अपने विचार साझा किए। इस पूरी परिषद का संचालन गीता कुलकर्णी ने किया।

सुपा - पारनेर ‘एमआयडीसी’तील कंपन्यांच्या तपासण्या करून अहवाल सादर करावा

 सुपा - पारनेर एमआयडीसीतील कंपन्यांच्या

तपासण्या करून अहवाल सादर करावा

- उद्योगमंत्री उदय सांमत

 

             मुंबई, दि. ६ : सुपा - पारनेर येथील औद्योगिक  वसाहतीतील कंपन्यांच्या तपासणीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावीया समितीमध्ये महसूलप्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच कामगार विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश करून तेथील सुरू असलेल्या उद्योगांची तपासणी करून अहवाल शासनाला तातडीने सादर करावाअसे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.

उद्योजकांना संरक्षण देणे हे आमचे प्रथम कर्तव्य असून त्यांनी उद्योगक्षेत्राचा विकास करण्यासाठी सहकार्य करावे कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना अथवा तक्रारींना न घाबरता काम करावेअसे आवाहनही उद्योगमंत्री उदय सांमत यांनी केले.

            मंत्रालयातील परिषद सभागृह येथे सुपा – पारनेर व अहिल्यानगर येथील औद्योगिक  वसाहतीतील कंपन्यांच्या समस्यांसंदर्भात बैठक झाली. या बैठकीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलआमदार काशिनाथ दातेआमदार मोनिका राजळेमाजी खासदार सुजय विखे-पाटील,महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे  सदस्य सचिव अविनाश ढाकणेउद्योग सहसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवारमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे,अहिल्यानगरचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोडपुणे एमआयडीसीचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे उपस्थित होते.

             उद्योगमंत्री उदय सांमत म्हणाले कीउद्योगांसाठी शासनाचे नेहमीच सकारात्मक धोरण आहे. मात्र एमआयडीसीमध्ये उद्योगांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यामध्ये कसूर करणाऱ्या कंपन्याबाबत शासन कठोर भूमिका घेईल. महसूलप्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच कामगार विभागाच्या  नियमांचे उल्लंघन केले जावू नये याची खबरदारी घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले.

           जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले कीमहसूलप्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच कामगार विभागाच्या नियमांचे उल्लघंन कंपन्यांकडून होते. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियमांच्या पालनासंदर्भात सर्व तपासणी होणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

0000

उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे “स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स” परिषद

 उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे

स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स” परिषद

ठाणे, दि.06 (जिमाका) :- येणारा काळ हा स्पेस टेकचा असून ‘एआय’ आणि स्पेस टेकचा एकत्रित वापर करून राज्याला दोन पावले पुढे घेवून जाणारअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि स्पेस टेक यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पेस-टेक फॉर गुड गव्हर्नन्स ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलीत्यावेळी ते बोलत होते.

या परिषदेसाठी लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे (निवृत्त), डॉ.प्रकाश चव्हाणमाजी राज्यसभा सदस्य तथा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ.विनय सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीविविध क्षेत्रांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये स्पेस टेकचा वापर वाढलेला आहेविविध उद्योगांमध्ये स्पेसटेकचे योगदान महत्त्वाचे आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पेस टेकचे महत्व जाणून पॉलिसी तयार केलीखासगी क्षेत्राचा यामध्ये कसा समावेश करता येईलचांगले काम चालू राहील यासाठी स्पेस टेकचा उपयोग केला जात आहेरिमोट सोर्सिंगड्रोन जीपीएस यामध्ये स्पेस टेकचा वापर केला जातोत्यामुळे कामकाजामध्ये पारदर्शकता दिसून येते.

पंतप्रधान यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गतिशक्ती प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेकाही वर्षांमध्ये होणारे काम स्पेस टेकचा वापर केल्यामुळे कमी दिवसांमध्ये पूर्ण होतेभविष्यात मॅन्युअल प्रोसेस बंद करून स्पेस टेक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहेयामुळे अडीच हजार कोटींची बचत होईल.

जलयुक्त शिवार या योजनेमध्ये 20 हजार गावांमध्ये स्पेस टेक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचे नियोजन केलेदरड कोसळणेपूरभूस्खलनभूकंप यासारख्या आपत्तीवेळी व्यवस्थापन करणेही बाब अत्यंत महत्वाची असतेपरंतु त्याचे योग्य पद्धतीने मॉनिटरिंग करून येणाऱ्या आपत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठीहोणाऱ्या हानीचे प्रमाण कमी करण्यासाठी स्पेस टेकचा वापर केला जावू शकतोआरोग्य, शिक्षण या विभागातही स्पेस टेकचा वापर केला जातोयेत्या तीन महिन्यांमध्ये स्पेस टेक पॉलिसी तयार करण्यात येणार असून स्टार्टअप आणि यासाठीची इकोसिस्टम तयार करण्यात येणार आहेअसेही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

जिओस्पॅशल तंत्रज्ञान ग्रामपंचायत विकास आराखडा (जीपीडीपीबनविण्यात अत्यंत प्रभावी ठरू शकतेस्पेस फॉर गुड गव्हर्नन्स कॉन्क्लेव्ह” मध्ये उपग्रह प्रतिमा आणि भू-स्थानिक साधने यासारख्या अत्याधुनिक अवकाश तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण भारतातील आव्हानांना कसे तोंड देऊ शकतोयाचा शोध घेतला जातोहा कार्यक्रम सरकारउद्योग आणि तंत्रज्ञान संस्थांमधील आपापसातील समन्वय वाढ व सहकार्यासाठी उपयुक्त ठरणार असून या माध्यमातून नवोपक्रमांना चालना मिळेलसार्वजनिक सेवा मजबूत होतील आणि शाश्वत विकासाला पाठबळ मिळेल अशी माहिती यावेळी देण्यात आली.

परिषदेतील उद्घाटन सत्रात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक डॉ.जयंत कुलकर्णी यांनी प्रस्तावना केलीडॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी मनोगत व्यक्त केलेया संपूर्ण परिषदेचे सूत्रसंचालन गीता कुलकर्णी यांनी केले.

00000

लोकशाही मूल्यांशी बांधिलकी जपणे गरजेचे

 लोकशाही मूल्यांशी बांधिलकी जपणे गरजेचे

-उपराष्ट्रपती जगदीप धनखड

·         मुरली देवरा मेमोरियल डायलॉग्जचे उद्घाटन

 

मुंबईदि. ६ : कायमस्वरूपी संघर्षात्मक भूमिका ही लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना विरोधाभासी आहे. हे शाश्वत तत्व आपला शासन सिद्धांत असले पाहिजेजे सध्याच्या आणि भविष्यातील नेत्यांना मार्गदर्शन करतील. लोकशाही मूल्यांशी बांधिलकी जपल्यासभारत उच्च गौरव शिखरावर पोहोचेलअसे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

 

माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित मुरली देवरा मेमोरियल डायलॉग्ज  कार्यक्रमाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल सी.पी राधाकृष्णनउपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ.सुदेश धनखडउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेखासदार मिलिंद देवराखासदार अशोक चव्हाणअमृता फडणवीसहेमा देवराकोटक बँकेचे राघवेंद्र सिंग तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

या संवाद मालिकेचा उद्देश सार्वजनिक धोरणेसामाजिक न्याय आणि आर्थिक विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विचारमंथन घडवून आणणे हा असून यावर्षी ‘नेतृत्व आणि सुशासन’ ही मूलभूत संकल्पना घेण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

नेतृत्व आणि सुशासनाविषयी उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणालेनागरिकांनी त्यांच्या लोकप्रतिनिधींना उत्तरदायी धरले पाहिजेकारण जागरूकता ही महत्त्वाची बाब आहे. शासन हे कार्यकारी यंत्रणेचे विशेषाधिकार आहे. याचे कारण म्हणजे कार्यकारी यंत्रणा लोकांसमोर आणि विधिमंडळासमोर जबाबदार असते. नेतृत्व हे एखाद्या पदाने मिळत नाहीतर ते उद्दिष्टाने प्रेरित असते. उपनिषदामध्ये म्हटले आहे की, त्यागाच्या माध्यमातूनच खरी आनंदाची प्राप्ती होते. नेत्यांनी हे तत्त्वज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे.

            "सत्यमेव जयते"हे मुंडकोपनिषदातील तत्त्व आहे. "सत्यच टिकून राहते आणि दुसरे काही नाही." वेदातील "सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे"हे तत्वज्ञान आपला मार्गदर्शक तारा असले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

 

दिवंगत नेते मुरली देवरा यांनी सेवाभावी वृत्ती जोपासली

-         उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिवंगत नेते मुरली देवरा यांनी सुसंवाद साधत नगरसेवक ते केंद्रीय मंत्री या पदापर्यंत सकारात्मक काम केले. त्यांनी सेवाभाव वृती जोपासत सर्वांना मदत केली. मुरली देवरा मेमोरियल डायलॉग्ज यांनी नेतृत्व आणि सुशासन हा विषय विचारात घेतला याबद्दल गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

नेतृत्व आणि सुशासन यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नेतृत्वच समोर येते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आम्ही काम करत आहोत. हे शासन सर्वसामान्यांचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुशासनाची सुरुवात केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा नावलौकिक वाढवलाअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार मिलींद देवरा यांनी केले.

खारदांडा, बांद्रा येथे 7 ते 9 मार्च 3 दिवसीय कोळी गीत नृत्य महोत्सव

 खारदांडाबांद्रा येथे 7 ते 9 मार्च 3 दिवसीय 

कोळी गीत नृत्य महोत्सव

 

मुंबईदि. 6 : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यातील लोककलालोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची व परंपरेची ओळख व्हावीकोकणातील प्रसिद्ध कोळी गीत नृत्य परंपरा सर्वजनास माहिती व्हावीया उद्देशाने सन 2025 चा कोळी गीत नृत्य महोत्सव दांडेश्वर शंकर मंदिर प्रांगणखारदांडाबांद्रा येथे येथे दि. 7 मार्च ते 9 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार तसेच सांस्कृतिक कार्य विभागावे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात स्थानिक व कोकणातील विविध गायक कलाकार व कोळी गीतासाठी प्रसिद्ध कलापथक आपली कला सादर करणार आहेत. शुक्रवार दि. 7 मार्च 2025 रोजी खार येथील स्थानिक कोळी गीत -नृत्य मंडळी, दांडा कोळी ब्रास बँड पथकाचे मास्तर हरेश पाटील कला सादर करणार आहेत तर दर्याचा राजा या प्रसिद्ध कलापथकाचे श्री अरुण पेदे आणि वेसावकर मंडळी सादरीकरण करतील. शनिवार दि. 8 मार्च 2025 रोजी स्थानिक कोळी गीत -नृत्य मंडळी डोंगरीकर ब्रास बँड पथक मास्तर उपकार डोंगरीकर ब्रास बँड सादर करतीलनाखवा माझा दर्याचा राजा या नावाजलेल्या मंडळाचे दत्ता भोईर आणि उरणकर मंडळी आपली कला सादर करतील.

या महोत्सवाचा समारोप रविवार 9 मार्च 2025 रोजी होणार असून स्थानिक कोळी गीत -नृत्य मंडळी -स्वरांजली ब्रास बँड पथकाचे मास्तर प्रणय पाटील आपली कला सादर करतील. तसेच सुप्रसिद्ध वेसावकर आणि मंडळीचे सचिन चिंचय आणि मंडळी आपली कला सादर करतील.

हा कोळी गीत नृत्य महोत्सव रसिक प्रेक्षकासाठी विनामूल्य आहे. श्री दांडेश्वर शंकर मंदिर प्रांगणखार दांडाबांद्रा येथे होणाऱ्या महोत्सवात सहभागी कलाकारांच्या  कलापथकाच्यासंगीत नृत्याचा मिलाफ असणाऱ्या कार्यक्रमाचा कलारसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन  सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुधारणेबाबत लोकप्रतिनिधींच्या भावनांचा सकारात्मक विचार करणार

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुधारणेबाबत

लोकप्रतिनिधींच्या भावनांचा सकारात्मक विचार करणार

- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

 

मुंबईदि. 6 :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा उद्देश अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या शाश्वत सुविधा निर्माण करणे हा आहे. लोकप्रतिनिधींनी भावनांचा सकारात्मक विचार करून या योजनेत सुधारणा करण्याबाबत विचार केला जाईलअसे कृषिमंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या  नियमांमध्ये बदल करण्यासंदर्भात सदस्य बाबासाहेब देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते. या चर्चेत सदस्य  सर्वश्री अर्जुन खोतकरसुभाष देशमुखनितीन राऊतसंजय गायकवाड यांच्यासह सदस्यांनी सहभाग घेतला.

कृषि मंत्री कोकाटे यांनी सांगितलेग्रामपंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत समाविष्ट घटकांचा लाभ देण्यात येतो. 1 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार  सन 2024-2025 मध्ये या योजनेतर्गत घटकांचे आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमध्ये नगरपंचायत व महानगरपालिका क्षेत्राबाहेर असणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रातील  शेतकऱ्यांसाठी कोणत्याही विशिष्ट अंतराची अट नसल्याचेही कृषिमंत्री श्री. कोकाटे यांनी सांगितले.

०००००

श्रीदत्तात्रेयांची कृपा प्राप्त झालेले काही प्रमुख शिष्य होते. या शिष्यांवर श्रीदत्तात्रेयांनी आपल्या कृपेचा वर्षाव केला

 Copy paste 

*🔱श्रीदत्तात्रेयांचे शिष्य🔱*


*श्रीदत्तात्रेयांची कृपा प्राप्त झालेले काही प्रमुख शिष्य होते. या शिष्यांवर श्रीदत्तात्रेयांनी आपल्या कृपेचा वर्षाव केला आणि त्यामुळे या शिष्यांनी असे विलक्षण कार्य केले की पुराणांना त्यांची दखल घ्यावी लागली.* 


१) *यदुराजा* - ययाती राजाची कथा प्रसिद्ध आहे. त्याला दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांची कन्या देवयानी आणि दैत्यांचा राजा वृषपर्वा याची कन्या शर्मिष्ठा अशा दोन पत्नी होत्या. ययाती हा अतिशय पराक्रमी आणि वैभवसंपन्न असा राजा होता. त्यांनी संपूर्ण पृथ्वीचे राज्य जिंकून घेतले होते. आपल्या राज्याचा आणि ऐश्वर्याचा उपभोग घेत त्याने अनेक वर्षे राज्य केले. कालांतराने तो वृद्ध झाला. मात्र तरीही त्याची भोगलालसा काहीं कमी होईना, त्याला शुक्राचार्यांनी आशिर्वाद दिला की जर तुला तुझ्या कोणत्याही मुलाने तारुण्य दिले आणि तुझे वार्धक्य स्वीकारले तर तुला पुन्हा सर्व भोग घेता येतील. त्याला देवयानीपासून यद् व तुर्वस्तु असे दोन आणि शमिष्ठेपासून अनू, द्रह्यु आणि पुरु असे तीन एकुण पाच पुत्र झाले होते. त्याने पाचहीं पुत्रांना आपले वार्धक्य स्वीकारण्याबद्दल विचारणा केली. तेव्हा पुरूने त्याचे वार्धक्य स्वीकारून आपले तारुण्य त्याला दिले. त्याचा सर्वात ज्येष्ठ पुत्र यदू याने वार्धक्य स्वीकारायला नकार देताना _जर मी माझे तारुण्य तुम्हाला दिले आणि तुम्ही देवयानीबरोबर भोग भोगलेत तर तुमच्या रूपाने मीच माझ्या आईबरोबर भोग भोगल्याचे पाप मला लागेल_ असे सांगितले. तेव्हा संतापून ययातीने त्याला हाकलून दिले आणि त्याला राज्याचा भागही दिला नाही. भविष्यात राजा बनल्यावर पुरू राजाने आपल्या ज्येष्ठ भावाला, यदूला राज्याचा वाटा दिला. हा यदू राजा अत्यंत नीतिमान आणि श्रीदत्तात्रेयांची असीम भक्त होता. वडिलांनी हाकलून दिल्यानंतर तो श्रीदत्तात्रेयांच्या शोधात भटकत होता. एकदा दक्षिण भारतामध्ये कावेरी नदीच्या परिसरात फिरत असताना त्याला श्रीदत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये दर्शन दिले. तो त्यांच्या चरणी नतमस्तक झाला, त्याच्या डोळ्यांमधून अश्रुपात सुरू झाला. त्याने श्रीदत्तात्रेयांच्या चरणी परमज्ञान देण्याची विनंती केली. त्यावेळी श्रीदत्तात्रेयांनी त्याला संपूर्ण ज्ञानाचा बोध केला आणि त्याच्यावर पूर्ण कृपा केली. यदुराजाने श्रीदत्तात्रेय यांची शेवटपर्यंत उत्कट भक्ती केली. त्याने धर्माच्या अधीन राहून प्रजेचा पुत्राप्रमाणे सांभाळ करून अत्यंत ऐश्वर्यशाली असे राज्य केले. त्याचा वंश पुढे यदुवंश म्हणून प्रख्यात झाला. याच *यशामध्ये पुढे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी जन्म घेतला.* यदू हा श्रीदत्तात्रेय यांचा लाडका शिष्य होता आणि त्यांनी त्याला सर्व प्रकारचे ज्ञान आणि ऐश्वर्य प्रदान केले.


२) *परशुराम* - ऋषिश्रेष्ठ जमदग्नी आणि रेणुका यांचा पुत्र म्हणजे परशुराम. त्यांना एकूण चार पुत्र होते. परशुराम यांना विष्णूचा अवतार मानलेले आहे. जमदग्नी ऋषि हे अत्यंत कोपिष्ट होते. एकदा त्यांची पत्नी रेणुका पाणी आणण्यासाठी नदीवर गेली असता तिला उशीर झाला म्हणून ते अतिशय रागवले, त्यांनी आश्रमात असलेल्या आपल्या पुत्रांना आपल्या आईचा वध करायला सांगितले. त्यांनी मातृवधाला नकार दिला. थोड्या वेळाने बाहेर असलेला परशुराम आश्रमात आला तेव्हा जमदग्नी ऋषींनी त्याला आपल्या मातेचा वध करायची आज्ञा केली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या परशुने आपल्या आईचे मस्तक धडावेगळे केले. ते पाहिल्यावर जमदग्नी ऋषींचा राग शांत झाला. त्यांनी परशुरामाला वर माग अशी आज्ञा केली. तेव्हा त्याने आपल्या _आईला पुन्हा जिवंत करा आणि आपला कोपिष्ट स्वभाव संपवा_ असे वर मागितले. जमदग्नी ऋषींनी रेणुका मातेला जिवंत केले, परशुराम हे बाह्यवृत्तीने ऋषी असले तरी त्यांचा स्वभाव क्षत्रियाला साजेसा असा होता. त्यांना सर्वसामान्यांबद्दल अतिशय कळकळ होती. त्यांनी सर्व विद्या, कला आणि सिद्धी आत्मसात केल्या होत्या. ते शस्त्र आणि युद्ध विद्येतही निपुण होते. ते ही आपल्या पित्याप्रमाणे थोडे रागीट स्वभावाचे होते. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचे ते गुरू होते. तसेच त्यांचे महाभारत काळात भीष्मांबरोबर युद्ध झाले होते. कर्णाला ब्रह्मास्त्र विद्या त्यांनी शिकवली होती. एके काळी संपूर्ण भारतवर्षामध्ये क्षत्रियांनी सर्वत्र अराजक माजवले होते. सर्व क्षत्रिय भोग विलासामध्ये रममाण झाले होते. कोणीही प्रजेची काळजी घेत नव्हते. सर्वत्र अनाचार आणि अनीती यांना उत आला होता. अशावेळी परशुरामाने प्रतिज्ञा केली आणि एकदा-दोनदा नव्हे तर एकवीस वेळा पृथ्वी पूर्णपणे निःक्षत्रिय करुन टाकली, त्यांच्या या अलौकिक कार्याने सर्वजण भयभीत झाले आणि त्यांना शरण गेले. त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर यज्ञ केले आणि सर्वत्र यज्ञसंस्कृती रुजविली. त्यांनी अपार दानधर्म केला. शेवटी सर्व पृथ्वी त्यांनी कश्यपऋषींना दान केली. त्यानंतर त्यांना राहण्यासाठी त्यांनी समुद्राकडे जागेची विनंती केली आणि त्यातून कोकण भूमी निर्माण झाली असे कथानक आहे. याच कोकणामध्ये महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करीत असताना त्यांनी श्रीदत्तात्रेय यांची उपासना केली. *श्रीदत्तात्रेय यांनी त्यांच्यावर पूर्ण कृपा केली आणि त्यांना ब्रह्मविद्या आणि श्रीविद्येची उपासना सांगितली.* श्रीदत्तात्रेय आणि परशुराम यांचेमधील संवाद *श्री दत्तभार्गव संवाद* म्हणून प्रसिद्ध आहे. *त्रिपुरारहस्य* नावाच्या ग्रंथामध्ये हा संवाद असून श्रीदत्तात्रय यांनी परशुराम यांना चिरंजिवित्व बहाल केले. *आजही परशुरामांचे वास्तव्य श्री दत्तप्रभूबरोबर बद्रिनाथाजवळ बद्रिकाश्रमामध्ये आहे,* अशी श्रद्धा आहे.


३) *आयुराजा* - सोमवंशातील अतिशय प्रसिद्ध असा राजा म्हणजे नहुष हा होता, त्याने अपार पराक्रम गाजविला आणि शेवटी तो इंद्रपदी आरुढ झाला अशी कथा आहे. आयुराजा हे नहुषाचे वडील होते. त्यांची पत्नी इंदुमती ही देखील अत्यंत सदाचरणी आणि सत्त्वशील होती. विवाहानंतर कितीतरी वर्षे लोटली तरी त्यांना संतती नव्हती. यासाठी काय करावे अशा चिंतेत ते असताना त्यांना त्रषिमुनींनी श्रीदत्तात्रेयांना शरण जा अशी सूचना केली. तेव्हा सह्याद्री पर्वतावर जाउन श्रीदत्तात्रेयांचा ते शोध घेऊ लागले. एके ठिकाणी त्यांना एका झऱ्याकाठी श्रीदत्तात्रेय बसलेले दिसले. त्यांच्या मांडीवर एक तरुण स्त्री बसली होती. तिच्याबरोबर त्यांचे मद्यपान सुरू होते आणि ते दोघेही धुंद झाले होते. त्यांच्या बाजूला मांसही शिजवलेले होते. अशा स्थितीत पाहूनही आयुराजाने दत्तप्रभूना विनम्रपणे प्रार्थना केली. तेव्हा हसून दत्तप्रभू म्हणाले, _'अरे, मी तर असा दुराचारी आहे, तुझी कामना मी पूर्ण करू शकणार नाही.'_ तरीही आयुराजा तेथून हालला नाही. तेव्हा श्रीदत्तात्रेय यांनी त्याचा अपमान केला, त्याची अपशब्दांमध्ये संभावना केली आणि त्याला हाकलून दिले. तरीही विचलित न होता, त्याने अंतःकरणपूर्वक श्री दत्तत्रेयांची उपासना सुरू ठेवली. अशी अनेक वर्षे गेली. शेवटी दत्तप्रभू त्याचेवर प्रसन्न होऊन त्याला वर माग अशी आज्ञा केली. तेव्हा आयुराजाने श्रद्धापूर्वक वर मागितला की, _कर्तव्यदक्ष, पराक्रमी, आध्यात्मिक, उदार, ज्ञानी, अजिंक्य आणि दीर्घायुध असा पुत्र मला द्या._ श्रीदत्तात्रेयांनी त्याला 'तथास्तु' असा आशिर्वाद दिला आणि मग चक्रवर्ती नहुषाचा जन्म झाला.


४) *पुरुरवा* - पुरुरवा राजाचेही गोत्र अत्रि हे होते. कोणत्या तरी शापाने तो जन्मल्यापासून अतिशय कुरुप होता, तो राजपुत्र होता. परंतु त्याचे रूप अतिशय लाजिरवाणे होते. सर्वजण त्याची निर्भत्सना आणि चेष्टा करीत असत. तो युवराज झाला.  त्याचे लग्नाचे वय झाले पण त्याला कोणीही मुलगी देईना, एखादा वधुपिता त्याला मुलगी देण्याची तयारी दाखवी, पण प्रत्यक्षात मुलगी त्याचा स्वीकार करीत नसे. आपल्या रूपामुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुरुरवा अतिशय निराश झाला. शेवटी त्याने ठरविले की आपण तपश्चर्या करायची. ज्या ठिकाणी अत्रि ऋषिनी तपश्चर्या केली तेथेच आपण जायचे या निश्चयाने तो बाहेर पडला. त्याने तेथे जाऊन तपश्चर्या सुरू केली. त्याला भगवान श्रीदत्तात्रेय यांनी दर्शन दिले. ते म्हणाले की, _जीवन म्हणजे मायेचा खेळ आहे. ही योगमायाच आपल्याला जन्माला घालते आणि संसार क्षेत्रामध्ये खेळवते. संसार म्हणजे तिच्याच लिला आहेत._ श्रीदत्तात्रेय यांनी पुरुरवाला ज्ञान आणि मंत्र दीक्षा देऊन अनुग्रह दिला. त्याला त्यांनी श्रीदेवीची उपासना करायला सांगितली. पुरुरव्याने श्रीदत्तात्रेयांची आज्ञा मान्य करून देवी उपासना सुरू केली. त्याच्या प्रखर उपासनेमुळे त्याला सुंदररूप प्राप्त झाले आणि त्याने दीर्घकाळ राज्याचा आणि ऐश्वर्याचा उपभोग घेतला आणि शेवटी तो दत्तचरणी मोक्षधामी गेला.


५) *कार्तवीर्य सहस्रार्जुन* : कृतयुगामध्ये कृतवीर्य या नावाचा एक महापराक्रमी राजा होऊन गेला. त्याच्या पत्नीचे नाव शीलधारा असे होते. कृतवीर्य हा अतिशय पराक्रमी राजा होता त्याला शंभर पुत्र झाले होते. परंतु एकदा काहीतरी गैरसमजुतीमधुन च्यवनऋषींनी शाप दिला आणि सर्व पुत्र भस्मसात झाले, महाराणी शीलधारा याज्ञवल्य त्रदृषींची पत्नी मैत्रेयी हिला शरण गेली, मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी आणि ज्ञानी होती. मैत्रेयीने तिला श्रीदत्तात्रेयांची उपासना करायला सांगितली आणि पुत्रप्राप्तीचे व्रत करायला सांगितले. कृतवीर्य आणि महाराणी शीलाधरा यांनी मन:पूर्वक निष्ठेने ते व्रत केले. तेव्हा भगवान श्रीदत्तात्रेय संतुष्ट झाले. त्यांनी _पराक्रमी आणि तेजस्वी पुत्र होईल_ असा आशिर्वाद दिला. हा मुलगा म्हणजे सम्राट कार्तवीर्य सहस्रार्जुन. कृतवीर्याने आपले राज्य त्याला दिले आणि तो अरण्यात निघून गेला. कालांतराने राज्यकारभार करताना धर्मयुक्त राज्य कशा पद्धतीने करावे, राज्याचा विस्तार कसा करावा, राजधर्म आणि प्रजाधर्म यांचे संतुलन कसे राखावे, याबाबत कार्तवीर्य अर्जुन शंकित झाला. तेव्हा त्याने गर्गमुनींना सल्ला विचारला, तेव्हा गर्गमुनींनी त्याला श्रीदत्तात्रेयांना शरण जाण्यास सांगितले, _दत्तप्रभूच्या आशिर्वादाने तुला राज्यधर्माचे तर यथार्थ ज्ञान मिळेतच त्याचबरोबर अनेक सिद्धी, सामर्थ्य आणि शक्ती प्राप्त होतील, कारण श्रीदत्तात्रेय म्हणजे विष्णूचाच अवतार आहेत_ असेही गर्नमुनींनी सुचवले, हे ऐकून कार्तवीर्य अर्जुन श्रीदत्तात्रेयांच्या आश्रमामध्ये गेला. कार्तवीर्य अर्जुन अतिशय निश्चयी आणि महत्त्वाकांक्षी होता. संपूर्ण पृथ्वीचे अधिपती व्हायची त्याची इच्छा होती. त्यासाठी वाटेल तेव्हढे परिश्रम करायची त्याची तयारी होती. तो श्रीदत्तात्रेयांचे आश्रमी पोहोचला तेव्हा श्रीदत्तात्रेयांनी त्याला निरुत्साही केले. _मीच पतित आणि वाममार्गाचे आचरण करणारा आहे. मी तुझी इच्छा पूर्ण करू शकणार नाही. तू त्वरित निघून जा_ असे श्रीदत्तात्रेयांनी त्याला सुनविले. पण तरीही दृढ़ निश्चयाने तो तेथेच सेवा करीत राहिला. काही काळाने दत्तप्रभूंनी  त्याचे दोन्ही हात क्रोधाद्मीने जाळून नष्ट केले. तरीही कार्तवीर्य अर्जुन त्यांची सेवा करीत तेथेच राहिता. त्याची श्रद्धा तसूभरहीं ढळली नाही. त्याचा हा दृढ सेवाभाव पाहून श्रीदत्तात्रेय प्रसन्न झाले. त्यांनी त्याला यथार्थ ज्ञान दिले. धर्माचा उपदेश केला. याचबरोबर सर्व प्रकारचे ऐश्वर्य त्याला बहाल केले. योगज्ञान आणि ब्रह्मज्ञानही त्याला दिले. त्याला एक हजार हात प्रदान केले. म्हणूनच कार्तवीर्य अर्जुन हा सहस्रार्जुन म्हणून पुढे विख्यात झाला. याचबरोबर त्याला अनेक सिद्धी, शस्त्रे, अस्त्र प्राप्त झाली. याद्वारे त्याने मोठा पराक्रम गाजविला आणि तो महासम्राट होऊन सप्तद्विप पृथ्वीचा अधिपती झाला. कार्तवीर्यसहस्रार्जुन हा श्रीदत्तात्रेयांचा अतिशय लाड़का शिष्य होता. त्याने श्रीदत्तात्रेयांची कृपा संपादून अदभुत ऐश्वर्य प्राप्त केले आणि शेकडो वर्षे पृथ्वीवर निरंकुश राज्य उपभोगिले.


६) *अलर्क* : राजा अलर्क हाही श्रीदत्तात्रेयांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक शिष्य गणला जातो. त्याच्या आईचे नाव मदालसा आणि वडिलांचे नाव ऋतुध्वज असे होते. राणी मदालसा ही श्रीदत्तात्रेयांची अत्यंत उच्च श्रेणीची भक्त होती राज्यपद प्राप्त झाल्यावर अलर्क राजधर्माप्रमाणे आणि नीतीने राज्य करीत होता. त्याच्या आईचा उपदेश त्याला प्राप्त होत होता. कालांतराने राजा अलर्क ऐषआरामामध्ये गर्क झाला, खाणे, पिणे, नाचगाणे, चैन, विषयोपभोग यात तो इतका गर्क झाला की त्याला राज्यकारभाराचा विसर पडला. प्रजेकडे दुर्लक्ष झाले. सगळीकडे अराजक माजले. त्याला सुबाहू या नावाचा एक मोठा भाऊ होता. त्याच्या कानावर ही गोष्ट गेली. आपला बंधू अशा प्रकारे जीवन वाया घालवत आहे. हे पाहून त्याला अतिशय वाईट वाटले. यावर काहीतरी उपाय करायचा आणि अलर्काला वठणीवर आणायचे त्याने ठरविले. त्याने काशिराजाशी संपर्क साधला. त्या दोघांनी मिळून अलर्क राजावर स्वारी करायचे असे ठरविले आणि मोठ्या सैन्याची जमवाजमव करून ते अलर्क राजावर चालून गेले. इकडे अलर्क बेसावध होता. सुबाहू आणि काशिराजाने राज्याला वेढा दिल्याने अरुया राज्यातील रसद तुटून गेली आणि प्रजेची उपासमार होऊ लागली. अशा वेळी अलर्काला अतिशय दुख झाले, अत्यंत संकटाच्या वेळी उपयोगी पडावी म्हणून अलर्काची आई राणी मदालसाने त्याला एक अंगठी दिली होती. तपाला जातेवेळी तिने सांगितले होते की जीवनात अगदी कोणताही उपाय उरला नाते असे प्राणांतिक संकट आले की तू ही अंगठी उघडून पाहा. त्यामध्ये एक ताईत आहे, तो तुला संकटामधून बाहेर काढेल. अलर्काला त्या अंगठीची आठवण झाली. त्याने अंगठी उघडून तो ताईत बाहेर काढला. त्यावरील संदेश त्याने वाचला. _सर्व संकटाचे मूळ कारण कामना अहे. दुर्जनांची संगत टाळावी आणि सज्जनांची संगत धरावी. सर्वात मोठी कामना मुक्त होण्याची कामना ही आहे यासाठी भगवान श्रीदत्तात्रेय यांना शरण जावे. ते विश्वगुरू आणि सर्व संकट तारक आहेत,_ तो उपदेश वाचून राजा अलर्क श्रीदत्तात्रेयांना शरण गेला. श्रीदत्तात्रेयांनी त्याला दर्शन दिले. त्यांनी त्याला अनुग्रह देऊन संपूर्ण ज्ञान आणि विवेकबुद्धी प्रदान केली. त्यानंतर तो सुबाहूकडे गेला आणि त्याने आपले सर्व राज्य सुबाहूला अर्पण केले, _आपण दोघेही एक आहोत, तेव्हा हे राज्य तूच सांभाळ_ असे त्याने सुबाहूला विनविले, सुबाहूने ओळखले की त्याच्यावर दत्तप्रभूची कृपा झालेली आहे. त्याने अलर्काला सांगितले की _तूच तुझे आणि माझे सर्व राज्य निरपेक्ष बुद्धीने सांभाळ आणि राजधर्माचे पालन करुन प्रजेचा प्रतिपाळ कर,_ या नंतर सुबाहू हिमालयामध्ये निघून गेला. श्रीदत्तात्रेयांच्या उपदेशाप्रमाणे अलर्काने अतिशय योग्य पद्धतीने राज्य केले आणि शेवटपर्यंत तो दत्तभक्तीमध्ये निरंतर रममाण होऊन राहिला.


७) *प्रल्हाद* : भक्त प्रल्हादाची कथा सर्वांना माहीत आहे. हिरण्यकशपू या दैत्यराजाचा हा मुलगा विष्णूचा परम भक्त होता. तो सतत 'नारायण नारायण' असा जप करीत असे. प्रल्हादाला विष्णूचे नाव घेण्यापासून परावृत्त करण्याचा हिरण्यकशपूने फार प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीच परिणाम होईना, उलट त्याचे नारायण प्रेम वाढतच होते. हिरण्यकशपूने त्याला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकले, कड्यावरून खाली फेकून दिले, तलावामध्ये पाण्यात बुडविले परंतु प्रत्येक वेळी विष्णूने त्याचे रक्षण केले. शेवटी कुठे आहे तुझा नारायण, या खांबामध्ये आहे का असे म्हणून हिरण्यकशपूने एका खांबावर लाथ मारली तेव्हा त्यातून नृसिंह अवतार प्रकट झाला आणि त्याने हिरण्यकशपूचा अंत केला, विष्णूने नृसिंह अवतारामध्ये प्रल्हादाला दर्शन दिले. त्यानंतर प्रल्हाद दैत्यकुळाचा राजा अनला, त्याने नीतिनियमाने राज्य केले, त्याला विष्णूने दर्शन दिले, पण त्याला ब्रह्मज्ञान झाले नव्हते. त्यासाठी त्याने श्रीदत्तात्रेयांची उपासना केली. श्रीदत्तात्रेयांनी प्रसन्न होऊन त्याला यथार्थ उपदेश केला आणि त्याला मुक्तिपदावर अग्रेसर केले,


८) *सांस्कृती* : सांस्कृती हा सुद्धा श्रीदत्तात्रेयांचा शिष्य होता. तो ब्राह्मण असून विद्यादानाचे कार्य करीत असे, त्याने दत्तप्रभूची उपासना केली आणि त्यासाठी मोठी तपश्चर्या आरंभिली. श्रीदत्तात्रेयांनी त्याची अनेक प्रकाराने परीक्षा घेतली. शेवटी सर्व कसोट्यांना उतरल्यावर त्याला दत्तप्रभूनी दर्शन दिले. त्याने दत्तप्रभूना ब्रह्मज्ञान देष्याची प्रार्थना केली. त्यांना विचारले की _अवधूतांची स्थिती, लक्षणे आणि संचारण कसे असते ? तसेच त्याने योगमार्गाचे आणि अष्टांग योगाबाबत अनेक प्रश्न विचारले._ श्रीदत्तात्रेयांनी त्याला जी उत्तरे दिली त्याला *'अवधूतोपनिषद'* आणि *‘जाबालदर्शनोपनिषद'* असे म्हणतात. अवधूतोपनिषदामध्ये अवधूतांची लक्षणे आणि जीवनपद्धती यावर भाष्य केले आहे. जाबालदर्शनोपनिषद म्हणजे अष्टांग शास्त्राचे सार आहे. जीवनमुक्तीसाठी अष्टांग योग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. परमहंस पदाचेही वर्णन यामध्ये आले आहे. *सांस्कृतीने श्रीदत्तात्रेयांचे वर्णन चतुर्भुज, भगवान, योगसम्राट, सकल ऐश्वर्य पंडित, महाधिराज, महायोगी असे केले आहे.* 


 श्रीदत्तात्रेयांचे असंख्य शिष्य असून त्यांनी सर्वांवर त्यांच्या पात्रतेनुसार कृपा केली आहे. त्यांच्या शिष्यांमध्ये ब्राह्मण, क्षत्रियांपासून अगदी अंत्यजापर्यंत सर्व वर्गाच्या शिष्यांचा समावेश आहे. या प्रत्येक शिष्याचे जीवन म्हणजे एक स्वतंत्र अवतार कथा होईल. प्रत्येक दत्तभक्ताने त्यांच्या प्रमुख शिष्यांची माहिती करून घेतली पाहिजे. कारण *श्रीदत्तात्रेयांना त्यांनी ज्या पद्धतीने आणि निष्ठेने प्रसन्न करून घेतले त्यावरून साधकाला त्याच्या दत्तसाधनेसाठी उत्तम मार्गदर्शन मिळू शकेल.* अत्यंत भाग्यवान अशा सर्व श्रीदत्तात्रेयांच्या शिष्यांचे चरणी विनम्र अभिवादन. 


*🙏!! ॐ नमो भगवते श्रीगुरुदत्तात्रेयाय !!🙏*

Copy paste

Featured post

Lakshvedhi