Friday, 7 March 2025

उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे “स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स” परिषद

 उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे

स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स” परिषद

ठाणे, दि.06 (जिमाका) :- येणारा काळ हा स्पेस टेकचा असून ‘एआय’ आणि स्पेस टेकचा एकत्रित वापर करून राज्याला दोन पावले पुढे घेवून जाणारअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि स्पेस टेक यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पेस-टेक फॉर गुड गव्हर्नन्स ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आलीत्यावेळी ते बोलत होते.

या परिषदेसाठी लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे (निवृत्त), डॉ.प्रकाश चव्हाणमाजी राज्यसभा सदस्य तथा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ.विनय सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीविविध क्षेत्रांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये स्पेस टेकचा वापर वाढलेला आहेविविध उद्योगांमध्ये स्पेसटेकचे योगदान महत्त्वाचे आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पेस टेकचे महत्व जाणून पॉलिसी तयार केलीखासगी क्षेत्राचा यामध्ये कसा समावेश करता येईलचांगले काम चालू राहील यासाठी स्पेस टेकचा उपयोग केला जात आहेरिमोट सोर्सिंगड्रोन जीपीएस यामध्ये स्पेस टेकचा वापर केला जातोत्यामुळे कामकाजामध्ये पारदर्शकता दिसून येते.

पंतप्रधान यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गतिशक्ती प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेकाही वर्षांमध्ये होणारे काम स्पेस टेकचा वापर केल्यामुळे कमी दिवसांमध्ये पूर्ण होतेभविष्यात मॅन्युअल प्रोसेस बंद करून स्पेस टेक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहेयामुळे अडीच हजार कोटींची बचत होईल.

जलयुक्त शिवार या योजनेमध्ये 20 हजार गावांमध्ये स्पेस टेक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचे नियोजन केलेदरड कोसळणेपूरभूस्खलनभूकंप यासारख्या आपत्तीवेळी व्यवस्थापन करणेही बाब अत्यंत महत्वाची असतेपरंतु त्याचे योग्य पद्धतीने मॉनिटरिंग करून येणाऱ्या आपत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठीहोणाऱ्या हानीचे प्रमाण कमी करण्यासाठी स्पेस टेकचा वापर केला जावू शकतोआरोग्य, शिक्षण या विभागातही स्पेस टेकचा वापर केला जातोयेत्या तीन महिन्यांमध्ये स्पेस टेक पॉलिसी तयार करण्यात येणार असून स्टार्टअप आणि यासाठीची इकोसिस्टम तयार करण्यात येणार आहेअसेही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

जिओस्पॅशल तंत्रज्ञान ग्रामपंचायत विकास आराखडा (जीपीडीपीबनविण्यात अत्यंत प्रभावी ठरू शकतेस्पेस फॉर गुड गव्हर्नन्स कॉन्क्लेव्ह” मध्ये उपग्रह प्रतिमा आणि भू-स्थानिक साधने यासारख्या अत्याधुनिक अवकाश तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण भारतातील आव्हानांना कसे तोंड देऊ शकतोयाचा शोध घेतला जातोहा कार्यक्रम सरकारउद्योग आणि तंत्रज्ञान संस्थांमधील आपापसातील समन्वय वाढ व सहकार्यासाठी उपयुक्त ठरणार असून या माध्यमातून नवोपक्रमांना चालना मिळेलसार्वजनिक सेवा मजबूत होतील आणि शाश्वत विकासाला पाठबळ मिळेल अशी माहिती यावेळी देण्यात आली.

परिषदेतील उद्घाटन सत्रात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक डॉ.जयंत कुलकर्णी यांनी प्रस्तावना केलीडॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी मनोगत व्यक्त केलेया संपूर्ण परिषदेचे सूत्रसंचालन गीता कुलकर्णी यांनी केले.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi