स्ट्रेपसिल्स गोळी खाल्यावर ट्राफिक पोलीस ड्रिंक अँड ड्राईव्ह ची केस नक्की करणार.. कसे ते पहा..🫢😩🥹
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 20 February 2025
भगवंताचे नाम मनापासून घ्यावे.,
🌹🌹🌹🌹🌹 *चिंतन* 🌹🌹🌹🌹🌹
*भगवंताचे नाम मनापासून घ्यावे. अखंड चालणा-या नियमाने जो नाम घेतो त्यास संकटे त्रास देत नाहीत. भगवंतासाठी नाम घेणे म्हणजे मनापासून नाम घेणे. येथे एक अडचण येते ती अशी की, व्यवहारामधे आपण एखादे कर्म केले, की त्याचे फळ काय मिळते इकडे आपले लक्ष असते. किंबहुना ते फळ मिळावे म्हणूनच आपण ते कर्म करतो. भगवंताचे नाम घेताना ही सवय आड येते. पण अध्यात्मामध्ये ही सवय मोडावी. नाम घेतच रहावे असे वाटणे, हेच नाम घेण्याचे फळ समजावे. नाम घेण्याची वासना शिल्लक उतरून इतर वासना विराम पावतात म्हणजे पूर्णकाम. पूर्णकाम होऊन जो नित्यनेमाने नाम घेतो त्यावर संकटे आली तरी त्याचे नाम खंडित होत नाही. नामाला नित्याचे मोजमाप असावे. पण नामाला आरंभ केल्यावर मनाला भगवंताच्या दर्शनात, पूजनात, संभाषणात व प्रार्थनेत गुंतून ठेवावे. अंतकाळी ही सवय अतिशय उपयोगी पडते. अंतकाळी जीव भगवंताला बरोबर घेऊनच जातो.*
🌹🌹🌹🌹🌹🔥🌹🌹🌹🌹🌹
नैमित्तिक पूजा व व्रतवैकल्ये.(१)*
🔥🔥🔥🔥🔥🌐🔥🔥🔥🔥🔥
*🌹🍀🔥शास्त्र असे सांगते 🔥🍀🌹*
------------------------------------------------------
*🔸संकलन - सदानंद पाटील, रत्नागिरी.*
-----------------------------------------------------
*🏵नैमित्तिक पूजा व व्रतवैकल्ये.(१)*
*नैमित्तिक पूजा व व्रतवैकल्ये हा भारतीय संस्कृतीचा सारभूत गाभा आहे... एक वेळ आन्हिक व पूजापाठात हेळसांड होऊ शकेल, पण नैमित्तिक पूजा व व्रतवैकल्ये मोठ्या उत्साहाने संपन्न होतात असे दिसून येते. नैमित्तिक पूजेच्या बाबतीत पुरुषवर्गाचा तर व्रतवैकल्यात महिलावर्गाचा महत्वाचा भरीव सहयोग असतो.....*
*नैमित्तिक पूजेमध्ये 'सत्य' नावाने सुरू होणाऱ्या सत्यदत्त, सत्यदेवी, सत्यनारायण इत्यादी विविध पूजा, तसेच गणेशचतुर्थी, अनंतचतुर्दशी, नवरात्र महोत्सव इत्यादी नैमित्तिक पूजा काही बाबतीत वैयक्तिक तर काही बाबतीत सामाजिक स्तरावर संपन्न होतात... त्यापैकी काही पूजा वंशपरंपरा चालत असल्यामुळे त्यांना कुळधर्म अशी संज्ञा असते. सत्यनारायण, सत्यदत्त, अनंतचतुर्दशी, वरदशंकर, वरदलक्ष्मी, शनिप्रदोष इत्यादी कामनिक स्वरूपाच्या नैमित्तिक पूजांचा कालावधी पूर्ण होताच त्यांचे विधीपूर्वक उद्यापन केले जाते. वरदलक्ष्मी व अनंतचतुर्दशी या नैमित्तिक पूजा कामनिक स्वरूपाच्या असल्या, तरी एखाद्या पिढीला लाभल्यावर मग पिढ्यान् पिढ्या चालत राहिल्यामुळे त्याचे कुळधर्मात रूपांतर झालेले दिसून येते.....*
*बहुतेक सर्व नैमित्तिक पूजांसाठी पुरोहितांना पाचारण करण्यात येते... किंबहुना पुरोहितावाचून अशा पूजा संपन्न होऊच शकत नाहीत, असा एक अज्ञानमूलक दृढ गैरसमज जनमानसात खोलवर रुजलेला असल्यामुळे काही वेळा अशा पूजा टाळण्याकडे किंवा केल्याच तर कुणीतरी जबरदस्तीने लादल्याप्रमाणे तणावपूर्ण वातावरणात संपन्न होतात. काहीवेळा तर पूजा टाळल्या किंवा कमतरता झाली तर उगीच देवाचा कोप (?) नको या भीतीपोटी नैमित्तिक पूजा कशाबशा उरकण्याकडे प्रवृत्ती दिसून येते.....*
*त्यामुळे अशा पूजामागे असलेली शास्त्रीय व आध्यात्मिक बैठक, त्यामागची संस्कृती, मानवी जीवन व समाज यांना पोषक ठरणारे विज्ञान आणि पूजेमागील धार्मिक विधीविधान, या सर्वांचा विसर पडत चाललेला दिसून येतो.....*
*याहूनही खेदजनक आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कुळधर्म म्हणून संपन्न होणाऱ्या पूजेसाठी मिळणारे लाभ तर हवेतच, त्याचबरोबर त्या पूजा टाळण्यामुळे होणारा देवाचा कोप (?) नको आणि पूजा स्वतः करायला नकोत... असा त्रिकोण साधण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे आपल्यातील ज्येष्ठ भावाकडे त्या सोपवून रिकामे होणे व कुळधर्माच्या दिवशी प्रसादाचा लाभ घेण्यासाठी हमखास उपस्थित राहणे. आपल्या नाकर्तेपणाविषयी फारच टीका होऊ लागली, तर पूजेच्या खर्चाची अंशतः, भागश: किंवा पूर्णश: जबाबदारी उचलणे.....*
*हल्ली बहुसंख्य लोक हाच पर्याय स्विकारून पळवाट काढतात... हल्ली कित्येक घरे अशी आढळून येतात की, कुळधर्माचा पुसटसा लवलेशही तेथे आढळत नाही. कुणी विचारले, तर उत्तर एकच असते की, "ते सर्व आमच्या वडील भावाकडे (किंवा काकांकडे, किंवा चुलत चुलत आजोबांकडे वगैरे वगैरे). जे वाडवडिलांनी केले नाही, ते पुढील पिढीकडून होण्याची अपेक्षाच नसते..... (अपूर्ण)*
*🔸संदर्भ : वेदवाणी प्रकाशन...*
🔥🔥🔥🔥🔥🌐🔥🔥🔥🔥🔥
धूप हा बहुवर्षायू वृक्ष डिप्टेरोकोर्पेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव वॅटेरिया इंडिका आहे
❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄
*🔸धूप.🔸*
*---------------------------------------------*
*🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.*
*---------------------------------------------*
*धूप हा बहुवर्षायू वृक्ष डिप्टेरोकोर्पेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव वॅटेरिया इंडिका आहे. हा वृक्ष मूळचा भारतातील असून महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू व कर्नाटक राज्यांतील सदाहरित वनांत आढळतो.*
*महाराष्ट्रात हा वृक्ष तिल्लारीच्या वनांत आढळतो. लाकडासाठी धूप वृक्षाची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्यामुळे तो दिवसेंदिवस दुर्र्मीळ होत चालला आहे.*
*आययूसीएन (The International Union for Conservation of Nature) या आंतरराष्ट्रीय संस्थेने नष्टप्राय होणाऱ्या वनस्पतींच्या यादीत धूप वृक्षाचा समावेश केला आहे. हा सदापर्णी वृक्ष आकाराने मोठा असून ४०-६० मी. उंच वाढतो. खोड गोलसर असून साल काळसर मऊ असते. कोवळ्या फांद्या व देठांवर लव असते. पाने साधी, एकाआड एक व लंबगोल असून टोकाला रुंद असतात.*
*या वृक्षाची फुले लहान व पांढरी असून पानांच्या बेचक्यातून आलेल्या पुष्पसंभारात येतात. फळ (बोंड) फिकट तपकिरी, तीन कप्प्यांचे व लांबट असून त्यात एक बी असते. धूप वृक्षाच्या खोडातून व जून फांद्यांतून पिवळ्या रंगाची डिंकासारखी राळ बाहेर पडते, यालाच सामान्यपणे धूप म्हणतात. याचा वापर रंग व रोगण (व्हार्निश) यांकरिता करतात.*
*हा धूप औषधी असून जुनाट खोकला, सांधेदुखी, जुलाब इत्यादींवर देतात. यात नैसर्गिक सुगंधी द्रव्य असल्यामुळे धार्मिक विधींत धूप जाळतात. डासांचा उपद्रव टाळण्यासाठीही काही जण धूप जाळतात. या वृक्षाच्या लाकडापासून प्लायवुड तयार करतात. धूपाच्या झाडालाच राळधूपाचा वृक्ष म्हणतात.*
*अन्य धूप .*
*तंत्रशास्त्रासार ऊद, तगर, कुष्ठ, शैलज, शर्करा, नागरमोथा, चंदन, वेलदोडा, तमालपत्र, नखनखी, मुशीर, जटामांसी, कापूर, ताली, सदलन आणि गुग्गुळ हे सोळा प्रकारचे धूप मानले गेले आहेत. यांना षोडशांग धूप म्हणतात. मदरत्न च्या मते चंदन, कुष्ठ, नखल, राल, गूळ, शर्करा, नखगंध, जटामांसी यांच्या समभाग मिश्रणातून उत्तम धूप बनतो.*
*यांशिवाय, सहा भाग कुष्ठ, दोन भाग गूळ, तीन भाग लाख, एक पंचमांश भाग नखला, हरडा आणि राळ समभाग, एक भाग, दपै एक भाग, शिलाजित तीन कण, जिनतान, नागरमोथा चार भाग, गुग्गुळ एक भाग यांच्या मिश्रणाने अति उत्तम धूप तयार होतो. रुहिकाख्य, कण, दारुसिहृक, ऊद, सित, शंख, जातिफल, श्रीश हे धूप श्रेष्ठ समजले जातात.....*
*स्रोत: विकिपीडिया...*
❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄
*विमान किती उंचावरून उडू शकतं ?* अपवाद मन, भरारी घेता येते
🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴
*विमान किती उंचावरून उडू शकतं ?*
*विमान हवेतून उडत जातं, त्यामुळे हवेचे हे गुणधर्मच ते जास्तीत जास्ती किती उंचीवरून उडू शकतं, हे निश्चित करत असतात. समुद्रसपाटीवर हवा जितकी दाट असते तितकी ती अधिक उंचीवर असत नाही. जसजसे आपण अधिक उंचीवर जाऊ तसतशी हवा विरळ होत जाते. तिचा दाब कमी होत जातो.*
*ज्या उंचीवर विमान साधारणपणे उडतं, तिथली हवा तर चांगलीच विरळ असते, आणि त्यामुळे तिचा दाब फारच कमी असतो. तो दाब त्या विमानातल्या प्रवाशांना सहन होणं शक्य नसतं. त्यामुळे सर्व नागरी विमानांमध्ये दाब नियंत्रित केलेला असतो. यालाच प्रेशराईज्ड इंटिरियर असं म्हणतात.*
*त्यामुळे प्रवाशांना प्रवास सुसह्य होत असला, तरी त्या विमानाच्या सांगाड्याला आतल्या आणि बाहेरच्या दाबातल्या फरकाला तोंड द्यावं लागतं, आतल्या हवेचा दाब जास्त असल्यामुळे बाहेरच्या दिशेनं काम करत असलेल्या बलाचा ताण त्या पत्र्याला सहन करावा लागतो. ज्या ऍल्युमिनियमच्या मिश्रघातूपासून विमानाचा सांगाडा तयार केला जातो, त्याच्या या ताण सहन करण्याच्या क्षमतेला मर्यादा असतात, त्यामुळे आतल्या आणि बाहेरच्या हवेच्या दाबातला फरक एका विशिष्ट मयदिपलीकडे जाऊन चालत नाही.*
*थोडक्यात, त्यापायी विमानाच्या उडण्याची कमाल उंची निर्धारित केली जाते. तरीही जितकी उंची अधिक, तितकी हवा विरळ असल्यामुळे तिचा विरोधही कमी होतो. त्यापायी वेग वाढवता येतो.*
*या दोन परस्परविरोधी घटकांचा विचार करून विमानाच्या आतला हवेचा दाब समुद्रसपाटी इतका न ठेवता साधारण पाच-सहा हजार फूट उंचीवर असणाऱ्या हवेच्या दाबाइतका ठेवला जातो. त्यामुळे विमानाला अधिक उंची गाठणं शक्य होतं. तरीही उंचीवर जसजशी हवा विरळ होते, तसतसं त्यातलं ऑक्सिजनचं प्रमाणही कमी होत जातं. विमानाच्या इंजिनातल्या जेट इंधनाच्या ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्यामुळे अधिक उंचीवर गेल्यास त्या इंजिनाच्या कार्यक्षमतेतही घट होते. कमाल उंची निर्धारित करणारा हा दुसरा घटक आहे.*
*या दोन्हींचा विचार करता नागरी उड्डाणं साधारण २८००० ते ३५००० फूट म्हणजेच ९००० ते १२००० मीटर उंचीवरून उड़तात. कॉन्कॉड हे आता रद्द केलं गेलेलं स्वनातीत विमान त्याहूनही जास्त म्हणजे ५०००० फूट उंचीवरून उडत असे; पण ती कमाल उंची झाली.*
*उंचीची ही मर्यादा अर्थात नागरी विमानांना लागू आहे. लष्करी विमानं प्रेशराईज्ड नसतात. त्याऐवजी त्यातले वैमानिक दाबापासून संरक्षण करणारे विशिष्ट पोशाख घालतात, त्यामुळे ती विमानं अधिक उंचीवरून उडू शकतात. त्यांच्यावर फक्त ऑक्सिजनच्या उपलब्धतेची मर्यादा पडते. ती विमानं ९०००० फूट म्हणजेच ३०००० मीटरची उंची गाठू शकतात.....*
*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातुन...*
🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴
श्री गजानन महाराज, प्रकट दिन नमन
Wednesday, 19 February 2025
राज्य शासन, व्हॉईस ऑफ मीडियाचे 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर*
राज्य शासन, व्हॉईस ऑफ मीडियाचे 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर*
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...