Wednesday, 12 February 2025

कॉपीमुक्त अभियानाच्या यशस्वीतेसाठी राज्य शिक्षण मंडळामार्फत विविध उपाययोजना

 कॉपीमुक्त अभियानाच्या यशस्वीतेसाठी

राज्य शिक्षण मंडळामार्फत विविध उपाययोजना

मुंबई, दि. ११ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारावी व दहावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांची बैठक घेऊन कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी देखील या अनुषंगाने बैठक घेऊन निर्देश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

राज्य मंडळामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गांची प्रकरणे आढळून आली आहेतअशा परीक्षा केंद्रावर केंद्र संचालकपर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा / उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्यात येत आहे.

फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्ह्यात परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्ण वेळ बैठे पथक कार्यरत राहील अशी कार्यवाही करण्याबाबत सर्व विभागीय मंडळे व सर्व संबंधितांना कळविण्यात आले आहे.

जनजागृती उपक्रम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार  100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत 20 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला. यामध्ये लोकप्रतिनिधीशाळा व्यवस्थापननागरिकशिक्षकमुख्याध्यापक यांची संयुक्त सभा घेऊन अभियानाची अंमलबजावणी करण्याबाबत माहिती देणेसर्व शाळामहाविद्यालयांमध्ये कॉपीमुक्तीची शपथशिक्षासूचीचे वाचनगैरमार्ग केल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीवतणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शनजनजागृती फेरीग्रामसभा बैठकीमध्ये जनजागृती आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन आदी उपक्रम राबविण्यात आले.

बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी 10 हजार 550 कनिष्ठ महाविद्यालयांमधून 15 लाख 05 हजार 037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 

मराठीला अभिजात दर्जा : ऐतिहासिक

 भारत सरकार कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देताना पुढील महत्त्वाचे निकष विचारात घेतेत्यात

1. प्राचीनतेचा पुरावा: भाषेचा इतिहास किमान १५०० ते २००० वर्षांपर्यंत मागे जाणारा असावा.

2. स्वतंत्र व्याकरण आणि लेखन परंपरा: भाषा केवळ बोली स्वरूपात नसून शास्त्रशुद्ध व्याकरण आणि साहित्यपरंपरा असावी.

3. मौलिक साहित्य ठेवा: ज्ञानपरंपरा असलेले ग्रंथ आणि साहित्य शतकानुशतके उपलब्ध असावे.

4. सतत वापर आणि टिकाऊपणा: भाषा अद्यापही लोकांमध्ये व्यापक प्रमाणावर वापरली जात असावी.

             मराठी भाषा या सर्व निकषांमध्ये योग्य ठरली.म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.

  सातवाहन काळातील महाराणी नागनिका हिने नाणेघाटात कोरलेला शिलालेख आणि महाराष्ट्रातील लेण्यांमधील अनेक शिलालेख हे आद्य भाषेचे महत्त्वाचे ऐतिहासिक पुरावे आहेत.

मराठीला अभिजात दर्जा : ऐतिहासिक निर्णय

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. नागनाथ कोत्तापल्लेडॉ. श्रीकांत बहुलकरप्रा. मधुकर वाकोडेसतीश काळसेकरडॉ. कल्याण काळेप्रा. आनंद उबाळेपरशुराम पाटीलडॉ. मैत्रेयी देशपांडे आणि अन्य विद्वानांनी केलेल्या सखोल अभ्यासानंतर केंद्र सरकारकडे अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार २०२४ मध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल करण्यात आला.

हा सन्मान मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद आहे. यामुळे मराठीसाठी स्वतंत्र संशोधन केंद्रशैक्षणिक अनुदान आणि जागतिक स्तरावर तिची प्रतिष्ठा वाढणार आहे.

दिल्लीतील ऐतिहासिक संमेलन आणि पुढील वाटचाल

अभिजात दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याने हे संमेलन ऐतिहासिक ठरणार आहे.

          यामुळे मराठी भाषा संशोधनासाठी अधिक अनुदान आणि केंद्रे स्थापन केली जातील. मराठीचा शैक्षणिक स्तरावर अधिक व्यापक वापर होईल.डिजिटल माध्यमांत मराठीला अधिक संधी निर्माण होतील.

अभिजात मराठीचा अभिमान

         मराठी भाषेत एकूण ४२ बोलीभाषा असल्याचे भारतीय विद्वान मानतात. यामध्ये अहिराणीवऱ्हाडी, कोळीआगरीमाणदेशीतंजावर मराठीकुणबीमहाराष्ट्रीय कोकणी या प्रमुख बोलीभाषा आहेत.

२००० वर्षांहून अधिकचा इतिहाससमृद्ध साहित्यपरंपरा आणि ऐतिहासिक संदर्भ यामुळे मराठीच्या अभिजाततेचा दर्जा अधिक दृढ झाला आहे. आता या अभिजाततेचा उपयोग करून मराठीला जागतिक स्तरावर अधिक दृढ करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या कार्यात सर्व मराठी भाषकांचाही मोठा सहभाग असणार आहे.

    संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेबद्दल अभिमानाने म्हटले आहे

"माझा मराठीची बोलू कौतुकेपरि अमृतातेहि पैजासी जिंके।"

या ओळींमधून त्यांनी मराठी भाषेची महती व्यक्त केली आहे. अमृतालाही पैजेने जिंकणारी ही अक्षरे ज्ञानदेवांच्या प्रत्येक शब्दाशब्दांतून प्रकट झाली.

अशी ही आपली मराठी भाषा वैश्विक ज्ञानभाषा होण्यासाठी आपण सर्वजण सतत प्रयत्नशील राहूया

मोरांच्या संरक्षणासाठी सकारात्मक पावले उचलणार धोकादायक वनस्पतींची वाढ रोखणार

 मोरांच्या संरक्षणासाठी सकारात्मक पावले उचलणार

धोकादायक वनस्पतींची वाढ रोखणार

- वनमंत्री गणेश नाईक

 

 मुंबईदि. 11 : बीड जिल्ह्यातील मयूर अभयारण्य येथील मयूर पक्षाचे अस्तित्व कायम राहण्यासाठी 'ग्लॅरिसिडीयावनस्पती नष्ट करण्याची मागणी आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

मंत्रालय येथे आष्टी, पाटोदा आणि शिरूर (का) येथील विविध प्रश्न व मयूर अभयारण्य येथील मयूर पक्षाच्या अस्तित्वासाठी उपाययोजनाबाबत आढावा बैठक झाली. यावेळी आष्टीचे आमदार सुरेश धसमुख्य सचिव मिलिंद म्हैसकरप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विवेक खांडेकरउपसचिव विवेक हौशिंगप्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) एम. श्रीनिवास राव व  इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

वनमंत्री गणेश नाईक म्हणाले कीआष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस व त्या गावातील नागरिकांच्या मागण्यांचा विचार करून मयूर अभयारण्य येथील ग्लॅरिसिडीया वनस्पती नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच त्या ठिकाणी मयूर पक्षासाठी उपयुक्त असलेले  वडपिंपळजांभूळउंबरकडुलिंब यासारख्या पारंपरिक वृक्षांची लागवड करण्यात येईल.

मयूर अभयारण्य  येथील प्राण्यांची, पक्षांची माहिती मिळावी यासाठी प्राणिसंग्रहालय उभारणे,   अभयारण्यातील जखमी प्राण्यांवर उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालय निर्मितीबाबत,  वन्य प्राण्यापासून अभयारण्याशेजारील शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत याकामास निधी उपलब्ध करून देणे आदी मागण्यांचा सकारात्मक विचार करून कामे मार्गी लावण्यात येतीलअसे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. बेदरवाडी गावाचा डोंगरी विभागात समावेश करून तेथील गावठाणाचा प्रश्न मार्गी लावण्याबाबतही विचार करण्यात येईलअसेही श्री. नाईक यांनी सांगितले.

वनमंत्री श्री. नाईक म्हणाले की, आष्टी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत आष्टीपाटोदा आणि शिरूर कासार) या तालुक्यांमध्ये वनविभागाचे मोठे क्षेत्र असून त्यामधील वन्यजीव विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग या विभागांमध्ये विकासयोजनांची  अंमलबजावणी  करण्यात येईल. तसेच विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी वनविभागाच्या जमिनीचे महसूल विभागाकडे आणि महसूल विभागाची जमीन वन विभागांकडे हस्तांतरित करणे या प्रश्नांवर चर्चा आणि उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांशी चर्चा करण्यात येईलअसेही श्री. नाईक यांनी यावेळी सांगितले

साताऱ्यात साकारणार वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी (जलक्रीडा))

 साताऱ्यात साकारणार वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

 

मुंबई  दि. 11 : सातारा जिल्ह्यात जलपर्यटनासाठी भरपूर वाव आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन विभागातर्फे जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी लवकरात लवकर साकारण्याचा मानस असल्याची माहिती पर्यटनखनीकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

  मंत्रालयातील दालनात पर्यटन विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी पर्यटन विभागाचे संचालक बी. एन. पाटीलव्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशीअधीक्षक अभियंता बोरसे आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

            दूरदृश्य प्रणाली (व्हीसी) द्वारे सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटीलउपवनसंरक्षक आदिती भारद्वाजजलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे तसेच इतर विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 राज्यातील सर्वात लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. त्यासोबतच त्यांना जल पर्यटनाचाही आनंद घेता यावा म्हणून सातारा जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी साकारण्यासाठी काम सुरू करण्याच्या सूचना श्री. देसाई यांनी दिल्या. जिल्ह्यातील मुनावळेकोयना नगरहेळवाक आणि पापर्डे या ठिकाणी बोट क्लबचे काम सुरू आहे. त्यापैकी काही ठिकाणी बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. मात्र जल पर्यटन फक्त बोटिंगपुरते सीमित न राहता जलक्रीडा अकादमी झाल्यानंतर पर्यटकांना वेगळा अनुभव मिळेल. असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला. तसेच हा प्रकल्प साकारल्यानंतर स्थानिक तरुणांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध होईल या दृष्टीने काम करण्याचे सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तरुणांना प्रशिक्षणही देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. हा सर्व प्रकल्प सौरऊर्जेवर करण्याच्या विशेष सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

****

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांमध्ये समाजाच्या आणि देशाच्या विकासाची बिजे

 पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांमध्ये

समाजाच्या आणि देशाच्या विकासाची बिजे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 11 : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्मिक मानव दर्शन तत्त्वज्ञान मांडले. यांच्या या विचारांमध्ये समाजाच्या आणि देशाच्या विकासाची आणि पर्यायाने मानवजातीच्या कल्याणाची बिजे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. धर्मवीर संभाजी महाराज सागरी किनारा मार्गावरील भुलाबाई देसाई मार्ग येथील चौकाचे पंडित दीनदयाळ उपाध्याय चौक नामकरण व लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

    पंडित दीनदयाळ यांनी आपले सर्व जीवन राष्ट्रकार्यासाठी व्यतीत केल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीआज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशातील गरीब जनतेच्या विकासासाठी करत असलेल्या कामांची प्रेरणा ही पंडित दीनदयाळ यांच्या विचारांची आहे. देशातील २५ कोटी जनतेला मागील दहा वर्षात दारिद्य्र रेषेच्या वर आणले आहे. शेवटच्या घटकापर्यंत घरपाणीवीजशौचालय यासह मूलभूत सुविधा पुरवण्यात येत आहेत. हाच विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला होता. 'विकास भी और विरसात भी हा मंत्र प्रधानमंत्री मोदी यांनी दिला आहे. हा विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सर्वप्रथम मांडला होता. त्याच विचारांवर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन काम करत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

     मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीप्राचीन भारतीय जीवन पद्धतीमध्ये शाश्वत विकासाचा मार्ग असल्याचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दाखवून दिले. जगात फक्त साम्यवाद आणि भांडवलशाही असे दोनच विचार होते त्यावेळी उपाध्याय यांनी एकात्मिक मानव दर्शन सारखा शाश्वत विकासाचा विचार मांडला. प्राचीन भारतीय जीवन पद्धतीमध्ये व्यक्ती समाजाशीसमाज राष्ट्रांशी आणि राष्ट्र विश्वाशी जोडलेले आहे. यामध्ये कोणताही विवाद नाही आणि त्यातूनच मानवजातीचा सर्वांगीण विकास करता येईल हे तत्त्वज्ञान या विचारांमध्ये आहे. समाजशेतीव्यापार यांचा विकासआंतरराष्ट्रीय धोरणपरराष्ट्र कूटनीतीयांचा एकत्रित विचार म्हणजे एकात्मिक मानव दर्शन होय. त्यांच्या ५७ व्या पुण्यतिथी निमित्त या चौकास पंडित दीनदयाळ उपाध्याय चौक असे नाव देण्यात आले आहे. त्यांचे विचार याठिकाणी कोरण्याचे काम, ही त्यांच्यासाठी खरी आदरांजली आहे.

              कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले कीपंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला एकात्मिक विकासाचा विचार हा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी राज्य शासन काम करत आहे. विकासाच्या या प्रक्रियेत जनतेने आणि बुद्धिजीवी लोकांनी शासनासोबत यावे असे आवाहनही त्यांनी केले.

   मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आलेत्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनावर आणि विचारांविषयी उभारण्यात आलेल्या शिल्पांची पाहणी त्यांनी केली.

कार्यक्रमास मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणीलोढा फाउंडेशनच्या अध्यक्ष मंजू लोढादीनदयाल रिसर्च इन्स्टिट्यूटचे अतुल जैननिखिल मुंडलेमनुभाई अगरवालपंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे भाचे विनोद शुक्लाभाची मधू शर्मा यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Tuesday, 11 February 2025

मेरा भारत महान,जय श्री छत्रपती शिवाजी महाराजा

 


पूर्वीच्या काळी लोक कांदा फोडूनच का खात असत ?*

 *पूर्वीच्या काळी, लोक कांदा फोडूनच का खात असत ?* 


तुम्ही स्वतःला कधी प्रश्न केला आहे का की आमच्या वडिलधाऱ्यांकडे सर्व साधने असूनही कांदा का खात असत, ते कापून का खात नाहीत? तर तिचे उत्तर खालीलप्रमाणे आहे....

गेल्या 5000 वर्षांपासून आणि आता जगभरात कांदा पिकवला जातो आणि खाल्ला जातो. कांदा चावल्याने इतर कोणत्याही पदार्थाची रासायनिक क्रिया जितक्या वेगाने होत नाही. कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते म्हणून रासायनिक प्रक्रियेचे शेवटचे उत्पादन म्हणजे सल्फ्यूरिक ऍसिड (H2SO4), हे ऍसिड एक्वा रेजीया नंतर आढळणारे सर्वात शक्तिशाली ऍसिड आहे जे सोने आणि प्लॅटिनम वगळता कोणत्याही धातूसह कार्य करते. त्याचा नाश करू शकतो. दुसरे म्हणजे, कांद्याच्या प्रत्येक थराच्या वर आणि खालच्या बाजूला एक जॅकल असते, जे निर्दोष असते. ती चावल्याने वेगळी केली जाते, चावल्यावर ती एकत्र कापली जाते. त्यामुळे कोणत्याही धातूने कांदा कापणे योग्य नाही. स्वत:ला मॉडर्न दिसण्यासाठी ते कापून नाही तर तोडून खावे. तुम्हीही भविष्यात असेच करा. हा गंधक असलेला पदार्थ गाठीच्या (कांदा) वरच्या थरांमध्ये सर्वात जास्त असतो आणि त्याचे मुळ मध्यभागी असते. कलेच्या मध्यभागी आढळणारे क्वेर्सेटिन (कांदा) खूप प्रभावी आहे

नेदरलँड्सच्या वागेनिंगेन युनिव्हर्सिटीच्या शोधानुसार, तरुणपणा टिकवून ठेवणारे अँटिऑक्सिडंट. आणि व्हिटॅमिन ई चा मुख्य स्त्रोत आहे. तसे, हा पदार्थ चहा आणि सफरचंदात आढळतो, परंतु आतड्याच्या मध्यभागी आढळणारा पदार्थ (कांदा) चहाच्या पदार्थापेक्षा दुप्पट आणि सफरचंदात आढळणाऱ्या समान पदार्थापेक्षा तिप्पट वेगाने पचतो. . 100 ग्रॅम नॉट्समध्ये (कांदा) 22.40 ते 51.82 मिलीग्राम असते. बर्न युनिव्हर्सिटी स्वित्झर्लंडने उंदरांना दररोज एक ग्रॅम कांदा दिला आणि त्यांची हाडे 17% मजबूत झाली. कांद्याचा मधला भाग पोटातील व्रण आणि हृदयाचे सर्व प्रकारचे आजार बरे करतो. गाठी (कांदा) आणि मधला भाग यावर संपूर्ण पुस्तक लिहिता येईल पण आजसाठी एवढेच.

तेव्हा मित्रांनो, कांदा कापून कोशिंबीर बनवून कधीही खाऊ नका. त्याला ठोसा मारणे, किंवा त्याला काहीतरी तोडणे, यामुळे तुम्हाला आरोग्य लाभ होईल आणि अश्रूही येणार नाहीत.

आमचे वडील कांदे तोडून किंवा थेट शेतातून हिरव्या पानांचे कांदे खाण्यासाठी आणि थेट न फोडता खात असत, जसे तुम्ही सफरचंद आणि पेरू खाता.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.*

Featured post

Lakshvedhi