Sunday, 9 February 2025

मुंबई उपनगर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारीला उद्घघाटन

 मुंबई उपनगर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार


यांच्या हस्ते १२ फेब्रुवारीला उद्घघाटन


 


१२ व १३ फेब्रुवारीला ग्रंथदिडी, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री,


चर्चासत्र व मार्गदर्शन भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन


 


      मुंबई, दि. ९ : मुंबई उपनगर ग्रंथोत्सव २०२४चे पालकमंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड्. आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मुलूंड पश्चीम येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात उद्धघाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तर प्रमुख उपस्थिती कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे सह-पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची असणार आहे.


उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर, समन्वय समिती व जिल्ह्यातील सर्व शासन मान्य ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने १२ व १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत ग्रंथदिडी, ग्रंथप्रदर्शन, ग्रंथ विक्री व विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.


ग्रंथदिडी


           दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ग्रंथदिंडीचा कार्यक्रम ९ ते १०.३० या वेळेत आहे. ग्रंथदिंडीचे उद्धघाटन आमदार मिहिर कोटेचा यांच्या हस्ते व मुंबई उपनगरचे जिल्हा नियोजन अधिकारी संजय कुमार शिंदे, मुंबई महापालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, प्रशासकीय अधिकारी, टी वॉर्ड, कैलास चंद्र आर्य, सहायक डॉ. विजयकुमार जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.


                                     उद्घाटन कार्यक्रम


          या ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, ग्रंथालय इमारत मुलुंड (पश्चीम) येथे उद्धघाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आहेत. कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे सह - पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, लोकसभा सदस्य वर्षा गायकवाड, संजय दीना पाटील, विधानसभा सदस्य राम कदम, सुनिल राऊत, मंगेश कुडाळकर, मिहिर कोटेचा, पराग शहा, अशोक पाटील तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई महापालिकेच्या उपायुक्त्‍ शिक्षण डॉ. प्राची जांभेकर, पोलिस उपायुक्त विजयकांत सागर, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुजाता खरे, कार्यकारी अभियंता सचिन धात्रक, प्र. ग्रंथपाल शालिनी इंगोले हे उपस्थित राहणार आहेत.


 


 


                                   चर्चासत्र व मार्गदर्शन


          १२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सत्रात 'मराठीतील पहिले ज्ञानपीठ' या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक चंद्रकांत भोंजाळ, प्रसिद्ध साहित्यिक चांगदेव काळे, प्रसिद्ध समीक्षक आणि लेखक डॉ. अनंत देशमुख यांचे दुपारी १२.३० ते १.१५ या विषयावर मार्गदर्शन. दुपारी २ ते २.३० यावेळेत कुमारी सई विकास खंडाळे यांचे 'छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र' या विषयावर व्याख्यान, तर दुपारी २.३० ते ३.१५ या वेळेत 'राज्य सेवा आयोग व लोक सेवा आयोग स्पर्धा परीक्षांविषयक मार्गदर्शन' या विषयावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव अभिजीत लेंडवे, उषा प्रविण गांधी कला व विज्ञान महाविद्यालयाचे श्रीराम देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. दुपारी ३.३० ते ४.३० 'अभिजात मराठीतील शब्द वैभव' या विषयावर दूरदर्शनच्या निवेदिका दिपाली केळकर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. तसेच लहान मुलांचा सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


 


            दि. १३ फेब्रुवारी रोजी 'कथा कवितेच्या राज्यात' या विषयावर सकाळी १० ते ११.१५ वाजेपर्यंत बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांचे सादरीकरण. 'भारतीय संविधान माझा अभिमान' या विषयावर संविधानाचे लेखक आणि अभ्यासक सुरेश सावंत यांचे सकाळी ११.३० ते १२.१५ या वेळेत व्याख्यान. तर दुपारी १२.३० ते १.१५ येथे 'लोककला समुजन घेताना' या विषयावर श्रीमती डॉ. मोनिका ठक्कर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. दुपारी २ ते २.४५ या वेळेत 'आधुनिक शेती' या विषयावर कृषीतज्ज्ञ दिलीप फुके, मालाड येथील श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालयाचे प्रवीण मालोडकर यांचे 'कोवळ्या पालेभाज्या' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २.४५ ते ४.१५ या वेळेत 'संत साहित्य गाण्यामधून' या कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ चांभई यांचा कार्यक्रम होणार आहे. तर कार्यक्रमाचा समारोप लेखक रमेश नागपुरे यांच्या उपस्थितीत दुपारी ४.१५ ते ५ या वेळेत होईल.


            या कार्यक्रमाला ग्रंथप्रेमी, वाचनप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर संजय बनसोड यांच्यासह ग्रंथोत्सव समन्वय समिती व संयोजन सहाय्य समिती यांनी केले आहे.


०००

जुन्या व निरुपयोगी वाहनांच्या 'स्क्रॅपिंग'साठी राज्यात ६ केंद्रांना मान्यता

 जुन्या व निरुपयोगी वाहनांच्या 'स्क्रॅपिंग'साठी राज्यात ६ केंद्रांना मान्यता

 

मुंबईदि. ७: केंद्र शासनाच्या वाहन स्क्रॅपिंग धोरणाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. त्यानुसार जुन्या व निरुपयोगी वाहनांचे स्क्रॅपिंग 'अर्थात निष्कासन करण्यासाठी राज्यात एकुण ६ नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांना मान्यता देण्यात आलेली आहे.

 

वाहन निष्कासन (स्क्रॅप) करु इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी जुन्या तसेच निरुपयोगी वाहनांचे निष्कासन हे पर्यावरणपूरक होण्याकरिता मान्यताप्राप्त नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फतच निष्कासन (स्क्रॅप) करावे. आपले वाहन नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फत निष्कासन (स्क्रॅप) केल्यामुळे नवीन वाहन खरेदी करतांना संबंधित वाहनधारकास एकुण कराच्या १० टक्के सूट दिली जाणार आहे.

 

 वाहनांचे प्रदुषण कमी करणेरस्त्यावरील प्रवासी व वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करणेवाहनांची इंधन कार्यक्षमता सुधारणेवाहनांवरील देखभाल खर्च कमी करणेजुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने वापरात आणणे व त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये गुणात्मक सुधारणा होणे यासाठी केंद्र शासनाने मोटार वाहन (निष्कासन व नोंदणी) नियम२०२१ अंमलात आणला आहेअसे परिवहन विभागाने कळविले आहे.

००००

१ एप्रिल २०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट' बसवावी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

  

१ एप्रिल २०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटबसवावी

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

 

मुंबईदि. ७ केंद्रीय मोटार वाहन नियम१९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट' (उच्च सुरक्षित नोंदणी क्रमांक पाटी) बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणेरस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.

राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पुर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवावीअसे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसविणे अत्यावश्यक असून १ एप्रिल २०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांनाही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरिता रियल मेझॉन इंडिया लिमिटेड ही एजंसी निश्चित करण्यात आली आहे. ही नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींग पोर्टल https://hsrpmhzone2.in कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकींग करुन अपॉईंटमेंट घ्यावी आणि नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी.

 वाहन धारक प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणी धारक नसलातरी काही कामा निमित्त या कार्यक्षेत्रामध्ये वाहन वापरत असेल तरी देखील वाहनास ही नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. वाहनधारकांना त्यांच्या वाहनांवर नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधीत सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्य) कार्यालयात तक्रार दाखल करावी.

             प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहन धारकांनी त्यांच्या वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरणपत्ता बदलवित्त बोजा उतरविणे चढविणे दुय्यम आरसी विमा अद्ययावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी. हाय सिक्युरीटी नंबर प्लेट नसलेली वाहनेबनावट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर या कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईलयाची नोंद घेण्यात यावीअसेही परिवहन कार्यालयाने कळविले आहे.


 

वृत्त क्र.552

 

राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्यविषयक सर्वेक्षणात परिपूर्ण माहिती देण्याचे आवाहन

 राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्यविषयक सर्वेक्षणात

परिपूर्ण माहिती देण्याचे आवाहन

 

मुंबईदि. 7 : भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च’ या विषयावर राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या पाहणीत राज्यात अर्थ व सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे. या पाहणीमध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत माहिती गोळा करण्यात येणार आहे. निवड झालेल्या कुटुंबांकडून मागील ३६५ दिवसांमध्ये कुटुंबाच्या आरोग्यविषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती संकलित करण्यात येत आहे. या पाहणीचे निष्कर्ष आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा तसेच केंद्र व राज्य शासनाला नियोजनासाठी व धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

नमुना तत्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटुंबाकडून प्राप्त माहितीवर आधारित निष्कर्ष हे राज्यातील लोकसंख्येकरिता अंदाजित केले जातील. सर्वेक्षणाकरिता घरी येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कुटुंब निवडीची प्रक्रियासर्वेक्षणाची महत्त्वाची माहिती समजून घेण्याची आणि आरोग्यविषयक खर्चासंबंधी योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी सर्व संबंधित कुटुंबियांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन अर्थ व सांख्यिकी आयुक्त व अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक यांनी केले आहे.

ही पाहणी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय आणि खासगी रुग्णालय/दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्चकुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्चसर्व वयोगटातील लसीकरणगर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत कुटुंबाची निवड एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटुंब’ आणि मागील ३६५ दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्ती’ यामधून करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी होतो. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावेयासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे.

त्या अनुषंगाने माहिती संकलित करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले असून हे प्रशिक्षित कर्मचारी फेब्रुवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ दरम्यान निवडलेल्या कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन विहित नमुन्यातील माहिती संकलित करतीलअसे आयुक्तअर्थ व सांख्यिकी व संचालकअर्थ व सांख्यिकी संचालनालयमुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले  आहे.

0000.

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना महापोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याबाबत आवाहन

 माजी सैनिकमाजी सैनिक विधवा यांना महापोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याबाबत आवाहन

 

मुंबई दि.8:-. मुंबई शहर जिल्ह्यातील माजी सैनिकमाजी सैनिक विधवा या सर्वांनी यापूर्वी महापोर्टलवर रजिस्ट्रेशन केले नसेल तर त्यांनी https://www.mahasainik.maharashtra.gov.in व www.ksb.gov.in या दोन्ही संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करून घेणे अनिवार्य आहे. तसेच रजिस्ट्रेशन केल्याशिवाय ओळखपत्रपाल्यांच्या स्कॉलरशिप अथवा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीची प्रकरणे स्वीकारले जाणार नाहीमुंबई शहरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

महापोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

1. ओळखपत्र,2. डिस्चार्ज बुक3. आधार कार्ड4. पी.पी.ओ.  (PPO)5. पॅन कार्ड6. पासपोर्ट साईज फोटो7. पेन्शन बँक पासबुक8. ई.सी. एच. एस. कार्ड9. ई-मेल आयडी

10. दूरध्वनी क्रमांक

अधिक माहितीसाठी क्रमांक 022- 22700404 / 8591983861 या कार्यालयीन दूरध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


तो त्या दानपेटीत दररोज पाच रुपये टाकायचा

 🦋🪴🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. *🫓नैवेद्य🫓*



तो त्या दानपेटीत दररोज पाच रुपये टाकायचा.


त्याचं ते नियमित देवळात येणं, देवाला नमस्कार करणं आणि दानपेटीत पांच रुपये टाकणं तिथल्या विश्वस्तांच्या ध्यानात आलं होतं.


त्याच्या साध्या कपड्यांवरून व सायकलच्या वापरावरून तो एक निम्नवर्गीय गरीब भक्त आहे, हे सहज लक्षात येत होतं. 

कधी कधी तो आपल्या बायकोला व एका मुलीला सोबत घेऊन यायचा, तेव्हासुद्धा कापूर, बुक्का, उदबत्ती न घेता पाच रुपये पेटीत टाकायचा. 

एखाद्या दिवशी नाही आला तर दुसऱ्या दिवशी दहा रुपये पेटीत न चुकता पडायचे.


त्याच्या या नित्यक्रमात कधी खंड पडल्याचं तिथल्या पुजाऱ्यानं आणि विश्वस्तांनी पाहिलं नव्हतं.

 त्यामुळं तो आदराचा विषय झालेला होता.


अशी वीस वर्षं उलटून गेली… 

महागाई किंवा उत्पन्नातील वाढ याचा त्यानं आपल्या दानपेटीतील पाच रुपयात कधी बदल केला नाही किंवा वाढ केली नाही. 

आता तर रस्त्यावर लहानमोठे सर्व स्कुटर, मोटार सायकल घेऊन दिमाखात येत व ऐटीत निघून जात…

 मात्र त्याच्या सायकलीवरून येण्याजाण्यात कधी फरक पडला नाही.


अलीकडे त्याचं आयुष्य थोडं ओढग्रस्तीचं असावं, असं जाणवत होतं; तरीही दानपेटीतला पाच रुपयांचा नित्यक्रम त्या गरीबानं चुकविला नाही… 

त्याची मुलगी मोठी झाली होती व कदाचित तिची काळजी त्याला सलत असावी. 

कधी कोणाजवळ बोलला मात्र नाही.


त्याला देवळाच्या ओट्यावर शून्यात नजर लावून बसलेला अनेक वेळा त्या विश्वस्तांनी पाहिलं देखील; मात्र हा आपणहून कुणाशी बोलत नसे किंवा आपलं दुखणं सांगत नसे. 

सध्या तो जास्तच चिंताक्रांत दिसत होता.


एके दिवशी देवळाच्या विश्वस्तांनी हिय्या केला व आपुलकीनं त्याला विचारलं,


“सध्या तुम्ही चिंताग्रस्त दिसता… 

तुमचं काम सुटलंय का? 

कसली चिंता भेडसावतेय?”


तो कसंनुसं हसला. 

म्हणाला, “काही नाही हो… 

मुलीचं लग्न ठरलंय आणि पैशाची जोडणी काही झालेली नाही. 

स्थळ चांगलं आहे. हातचं जाऊ नये असं वाटतंय. 

पण आता हात तरी कुणाकडे पसरायचे? 

मी हा असा पैशानं दुबळा. 

कामाचा मालकही फारसं कांही उचलून द्यायला तयार नाही… 

म्हणून काळजीत आहे, इतकंच. बघू, देव यातून कसा काय मार्ग काढतोय ते?”


_“अरे, पण खर्च तरी किती येणार आहे?”_

 विश्वस्त.


_“पंचवीस-तीस हजार तरी नक्की लागणार हो!”_ तो म्हणाला.


त्या दिवशी काय झालं कुणास ठाऊक, त्या विश्वस्ताच्या डोक्यातून तो विषय कांही जाईना. 

रात्री झोपतानाही त्याचाच विचार. 

रात्री वरचेवर जाग आल्यामुळं झोपदेखील नाही झाली.


पहाटे पहाटे त्याला एक स्वप्न पडलं… 

स्वप्नात पाच रुपयांची नाणी तो मोजत होता. 

जागा झाला आणि स्वप्न जसंच्या तसं त्याला आठवू लागलं , खाऊ लागलं… 

त्यानं देवाकडे पाहिलं. 

तो चोरासारखा बेरकी हसत असलेला त्याला दिसला.


तो पटकन उठला. 

वही घेतली व हिशोब करू लागला… 

एकूण वर्षे वीस, म्हणजे एकूण दिवस ७३००. 

दररोज रुपये पाच प्रमाणं झाले रू. ३६,५००/-. त्याने ३६,५०० रुपयांची एक थैली तयार केली व शांतपणे झोपी गेला.


झोपेत पुन्हा तेच स्वप्न!

 तो जागा झाला व आठवू लागला… 

पाच रुपयांची नाणी आपण मोजत होतो हे स्वच्छपणे त्याला आठवत होतं. 

दानपेटीतले जमा पैसे आपण ‘एफडी’त ठेवतो हेही त्याला आठवलं.


त्यांनं हिशोब केला. 

सरासरी जमा रुपये १८,२५०/- वर्षाचे अंदाजे व्याज २०००/-. वीस वर्षांचे झाले ४००००/- म्हणजे सरळ व्याजाने त्या गरीबाच्या दररोजच्या पाच रुपयांचे मुद्दलासह होतात रुपये ७६५००/- आणि हा चिंताक्रांत आहे पंचवीस हजारासाठी!


तो विश्वस्त आता निश्चिंत झाला होता. त्यानं देवाच्या तिजोरीतून ७६,५०० रुपयांची थैली तयार करून ठेवली. 

आता त्यास शांत झोप लागली.


नेहमीप्रमाणं दुसऱ्या दिवशी तो गरीब देवळात आला. 

त्यानं देवाला नमस्कार केला. 

तिथल्या दानपेटीत पाच रुपये टाकले व ओट्यावर जाऊन बसला.


तो विश्वस्त देवळातल्या आणखी कांही सज्जनांना घेऊन तिथं आला व त्यानं ती थैली त्या गरिबाला दिली व म्हणाला,


“बाबा रे, तू दररोज पाच रुपये प्रमाणे या वीस वर्षांत देवाला ३६,५०० रुपये वाहिलेस. 

वीस वर्षांत त्याचे ७६,५०० रुपये झालेत, जे देवाकडे सुरक्षित आहेत. 

आज तुझी नड आहे व देवाची इच्छा आहे की ते तुला उपयोगी पडू देत… 

म्हणून तुझे पैसे तू मोजून घे!”


गरीब चकीत झाला.

 त्याला दिवसाउजेडी जणू कांही मोठं स्वप्न पडलं होतं!

 तो ती थैली घेऊन देवाजवळ गेला व रडू लागला…

 सर्वजण खूप भावूक झाले.

 देव प्रसन्न हसत होता. 


गरीबाचा पाय देवळाबाहेर निघत नव्हता. 

तो मात्र थैली घेऊन तिथंच बसून राहिला. 

त्याची पत्नी व मुलगी त्याला शोधत देवळात आली. 

त्यानं घडलेले वर्तमान त्या दोघींना सांगितलं.

 त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. 

बघणारे सर्वजण देवाचा जयजयकार करू लागले.


आता पत्नी व मुलगी त्याला घरी चलण्यासाठी विनवू लागली…

 पण त्याचा पाय तिथून निघत नव्हता. 

‘माझं दान देवानं परत तर नाही ना केलं?’_ असं त्याचं मन त्याला खाऊ लागलं.


काय करावं, त्याला सुचेना. 

त्यानं विश्वस्ताला बोलावलं व विचारलं, 

_“मी जे देवाला रोज पाच रुपये वाहिले, त्याचे वीस वर्षात किती होतात?”_


_“३६,५०० रुपये होतात.”_ विश्वस्त म्हणाले.


गरीबानं थैलीतले ३६,५०० रुपये काढले व पुन्हा त्या दानपेटीत टाकले. 

आता त्याच्या चेहऱ्यावरचा ताण नाहीसा झाला.


सर्व उपस्थित चकित झाले. 

त्यांनी त्याला विचारलं, 

_“हे तू काय केलंस?”_


तो म्हणाला, _“मी देवाला जेवढे वाहिले तेवढे परत करतोय. 

तो मी माझ्यासाठी देवाला दिलेला नैवेद्य होता. 

उद्याचा माझा पाच रुपयांचा नैवेद्य आता मी निश्चिंत मनानं देवाला वाहीन. 

अन्यथा माझ्या येणाऱ्या रात्री मी तळमळत काढल्या असत्या. 

आता मला शांत झोप लागेल. 

देवानं दिलेल्या या उरलेल्या पैशात माझ्या मुलीचं लग्न थाटामाटात होईल. 

आता मी घरी जातो…”_


आणि प्रसन्न चेहऱ्यानं ते कुटुंब घरची वाट चालू लागले.

 देवाचा प्रसन्न चेहरा मात्र आणखी उजळला होता!



थेंबाथेंबानं देवाकडे आपण साठविलेली कोणतीही गोष्ट; मग ते पैसे असोत किंवा देवाचे आशीर्वाद असोत, कालांतरानं अशी महाकाय होत असते व आयुष्यातल्या कठीण वेळा सहज दूर करते!


*आपण निस्वार्थपणे केलेलं कुठलंही सत्कार्य*

*कधीच वाया जात नाही…*

*केव्हा ना केव्हा आयुष्याच्या*

*कुठल्यातरी टप्प्यावर ते तुम्हाला*

*त्याचं फळ देऊन जातं…!*    नमस्कार good morning all 🤗

लंगडे की चौकी हनुमान मंदिर,*

 *लंगडे की चौकी हनुमान मंदिर,* 


आग्रा, उत्तर प्रदेश


संकलन - सुधीर लिमये पेण 


मथुरा आग्रा फिरोजाबाद रोडजवळ सिव्हिल लाईनमध्ये लंगडे की चौकी नावाचे हनुमानजींचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे लंगडे की चौकी मंदिर अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन आहे.


मंदिर राजा भोजच्या काळातील असल्याचे सांगितले जाते. अकबरही या मंदिराच्या वैभवापुढे नतमस्तक झाला होता. त्यावेळी सिव्हिल लाईन जवळ सुरक्षा चौकी होती. त्यावर एक शिपाई पहारा देत असे. जवळच हनुमानाचे मंदिर होते. त्याकाळी या मंदिरात रामकथा असायची, या मंदिरात चौकी वरचा पहारेकरी कथा ऐकण्यासाठी रोज येत असे. पहारेकरी चौकी सोडून मंदिरात जात असल्याची तक्रार मुघल सैनिकांनी पोलिस ठाण्यात केली.


रागाच्या भरात कोतवालने मंदिरात जाऊ नये म्हणून चौकीदाराचा पाय कापला. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा पहारेकरी मंदिरात गेल्याची बातमी त्याला समजते. त्यामुळे संतप्त झालेल्या कोतवालांनी रामकथा गाठली. जिथे लंगडा चौकीदार बसला होता. हे दृश्य पाहून तो पुन्हा चौकीवर गेला आणि तो लंगडा चौकीदारही चौकीवर बसलेला दिसला. हा चमत्कार पाहून कोतवालला धक्काच बसला. त्याने ही घटना अकबराला सांगितल्यावर अकबरलाही आश्चर्य वाटले.


या घटनेनंतर हे मंदिर लंगडे की चौकी म्हणून ओळखले जाऊ लागले, कारण त्या लंगड्या चौकीदाराच्या जागेवर हनुमानजी महाराज स्वतः पहारा देत होते. त्यानंतर चौकीदाराला महावीर हनुमानजींचे दर्शन होऊ लागले. त्यानंतर त्यांनी दान करून येथे हनुमान मंदिर बांधले. या मंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.


जवळपासच्या राज्यातून आणि भागातील लोक येथे विशेषत: दर मंगळवारी प्रार्थना करण्यासाठी येतात. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी लोकांची श्रद्धा आहे. 


विशेषत: हनुमानजी महाराजांना चोळा अर्पण करण्यासाठी अनेक लोक दर मंगळवारी येथे येतात. लंगडे की चौकी मंदिरात दर मंगळवारी फुलांचा बंगला भव्य पद्धतीने सजवला जातो. बंगला सजवण्यासाठी आजूबाजूच्या परिसराव्यतिरिक्त लोक परदेशातूनही फुले आणतात. प्रत्येक महिन्याच्या मंगळवारी फुलांचा बंगला सजवण्यासाठी बुकिंग असते. 




मुकुंदराय धारैया‌ 

भारत के प्रसिद्ध मंदिर

Featured post

Lakshvedhi