Tuesday, 4 February 2025

सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाताना खलाशांनी आधार कार्ड बाळगणे अनिवार्य

 सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाताना

खलाशांनी आधार कार्ड बाळगणे अनिवार्य

 

मुंबईदि. 31 : राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सागरी सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. सागरी सुरक्षा भक्कम करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व बंदरांवर  मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक खलाशाने क्यूआर कोडेड आधार कार्ड जवळ बाळगणे आवश्यक असल्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्त किशोर तावडे यांनी दिले आहेत.

            मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच ससून डॉकला भेट दिली होती. त्यावेळी बहुसंख्य खलाशांकडे आधार कार्ड नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती. त्यावेळी मासेमारीसाठी जाणाऱ्या खलाशांकडे आधारकार्ड असणे आवश्यक असल्याचे आदेश काढण्याच्या सूचना मंत्री श्री. राणे यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने  हा निर्णय घेण्यात आला आहे.

            या सागरी क्षेत्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक खलाशाकडे क्यूआर कोडेड आधारकार्ड जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच इंडियन मर्चंड शिपींग ॲक्ट 1958 च्या 435(एच) मधील तरतूदीनुसार व महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 (सुधारित 2021) मधील कलम 6(4) नुसार देशातील मासेमारी नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेवर कायम स्वरुपी दिसेल असे रंगविणे आवश्यक आहे. नौकेचा नोंदणी क्रमांक नौकेच्या मागील (वरच्या) भागात दोन्ही बाजूने स्पष्टपणे दिसेल तसेच नौकेच्या केबीनच्या छतावर कोरून रंगविणे बंधनकारक राहील.

            याप्रमाणे कार्यवाही केल्यानंतरच नौकांच्या मासेमारी परवान्यांचे नुतनीकरण व मासेमारी टोकन निर्गमित करण्यात येणार आहेत. तसेच या कार्यवाही न करणाऱ्या नौकांच्या मालकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981(सुधारीत 2021) अंतर्गत मासेमारी परवाना अटी – शर्ती भंग म्हणून मासेमारी परवाना रद्द करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती, आयुक्त श्री.तावडे यांनी दिली.

00000

विद्यार्थ्यांना आहारात अंडा पुलाव, गोड खिचडी, नाचणी सत्व देण्याचाही शाळांना पर्याय.

 विद्यार्थ्यांना आहारात अंडा पुलाव, गोड खिचडी, नाचणी सत्व देण्याचाही शाळांना पर्याय

शालेय शिक्षण विभागाची माहिती

 

मुंबईदि. 31 : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. केंद्र शासनाने योजनेंतर्गत लोकसहभाग वाढवून विद्यार्थ्यांना पौष्टिक व वैविध्यपूर्ण आहार पुरविण्यासाठी शाळांमध्ये स्नेहभोजन उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या उपक्रमांतर्गत शालेय व्यवस्थापन समितीस शक्य असल्यास अंडा पुलाव व गोड खिचडी, नाचणी सत्व याचा लाभ देण्याबाबतचा पर्याय शाळांना देण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पहिली ते पाचवीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. केंद्र शासनाने सद्य:स्थितीत प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी 5.45 रुपये आणि उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी 8.17 प्रतिदिन प्रति विद्यार्थी आहार खर्च मर्यादा निश्चित केली आहे.

केंद्र शासनाने या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी स्थानिक उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थांचा व तृणधान्याचा समावेश करण्याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्याअनुषंगाने आहारामध्ये स्थानिक उपलब्ध अन्नधान्यतृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करुन आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने आरोग्यआहारशिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार दि. 11  जून 2024 च्या शासन निर्णयान्वये विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविधता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार पद्धतीप्रमाणे (Three Course Meal) म्हणजेच तांदूळडाळी/ कडधान्यापासून तयार केलेला आहारमोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्व यांचा समावेश करुन नवीन पाककृती निश्चित करण्यात आली होती.

या पाककृतीमध्ये सुधारणा करण्याकरिता लोकप्रतिनिधीकेंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे आहाराचा पुरवठा करणाऱ्या नागरी भागातील संस्था/ बचत गटयोजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनांची निवेदने प्राप्त झाली होती. ही निवेदने तसेच केंद्र शासनाने निश्चित केलेल्या प्रति दिन प्रति विद्यार्थी आहार खर्चाची मर्यादा विचारात घेतापाककृती सुधार समितीने शिफारस केलेल्या पाककृतींचा समावेश करुन तसेचसुधारित पाककृतीनुसार लाभ देण्याबाबतचा दि. 28 जानेवारी 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

या शासन निर्णयातील पाककृतींमधील अनु.क्र. 11 (अंडा पुलाव) व अनु.क्र. 12 (गोड खिचडी/ नाचणी सत्य) या पाककृती पर्यायी स्वरुपात देण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत उपलब्ध करुन दिलेल्या निधीमधून यापूर्वी विद्यार्थ्यांना अंडी/ केळी उपलब्ध करुन देण्यात आली होती. केंद्र शासनामार्फत तृणधान्यातील पौष्टिकतेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी या योजनेअंतर्गत तृणधान्याचा वापर वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पेसा क्षेत्रातील व आकांक्षित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अधिक पौष्टिक आहाराचा लाभ देण्यासाठी मिलेट बार उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही केंद्र शासनाकडून प्राप्त होते. त्यानुसार संबंधित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत नियमित आहारासोबत आठवड्यातून एक दिवस पूरक आहार देण्याची तरतूद आहे. त्याअनुषंगाने राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना अन्न शिजविणाऱ्या यंत्रणांनी आठवड्यातून किमान एक दिवस फळेसोयाबिस्कीटदूधचिक्कीराजगीरा लाडूगुळशेंगदाणेबेदाणेचुरमुरे आदी स्वरुपात पूरक आहार देण्यात येत असल्याचेही शालेय शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

राष्ट्रीय नमूना पाहणीच्या आरोग्यविषयक सर्वेक्षणात परिपूर्ण माहिती देण्याचे आवाहन

 राष्ट्रीय नमूना पाहणीच्या आरोग्यविषयक सर्वेक्षणात

परिपूर्ण माहिती देण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. ३१ : भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर 'कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्चया विषयावर राष्ट्रीय पातळीवर होणा-या पाहणीत राज्यात अर्थ व सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे. या पाहणीमध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत माहिती गोळा करण्यात येणार आहे. निवड झालेल्या कुटुंबांकडून मागील ३६५ दिवसांमध्ये कुटुंबाच्या आरोग्यविषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती संकलित करण्यात येत आहे. उपरोक्त पाहणीचे निष्कर्ष आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा तसेच केंद्र व राज्य शासनाला नियोजनासाठी व धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

नमूना तत्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटुंबाकडून प्राप्त माहितीवर आधारित निष्कर्ष हे राज्यातील लोकसंख्येकरिता अंदाजित केले जातील. सर्वेक्षणाकरीता घरी येणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून कुटुंब निवडीचं प्रक्रियासर्वेक्षणाची महत्त्वाची माहिती समजून घेण्याची आणि आरोग्यविषयक खर्चासंबंधी योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी सर्व संबंधित कुटुंबीयांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तअर्थ व सांख्यिकी व संचालकअर्थ व सांख्यिकी संचालनालयमुंबई यांनी केले आहे.

ही पाहणी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय आणि खाजगी रुग्णालय/दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्चकुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्चसर्व वयोगटातील लसीकरणगर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत कुटुंबाची निवड 'एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटुंबआणि 'मागील ३६५ दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्तीयामधून करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी होतो. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावेयासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे.

त्या अनुषंगाने माहिती संकलित करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले असून हे प्रशिक्षित कर्मचारी फेब्रुवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ दरम्यान निवडलेल्या कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन विहित नमुन्यातील माहिती संकलित करतीलअसे आयुक्तअर्थ व सांख्यिकी व संचालकअर्थ व सांख्यिकी संचालनालयमुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले

प्रत्येक कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती बंधनकारक समिती गठीत न केल्यास ५० हजार दंड

 प्रत्येक कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती बंधनकारक

समिती गठीत न केल्यास ५० हजार दंड

                                                    - जिल्हाधिकारी संजय यादव

 

मुंबई दि ३१ : कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीस प्रतिबंध कायद्यानुसार सर्व शासकीयनिमशासकीयखाजगी कार्यालयआस्थापनेमध्ये अंतर्गत  तक्रार निवारण समिती गठीत करणे आवश्यक आहे. समिती गठीत न केल्यास ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल, अशी माहिती मुंबई शहराचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

दहा व त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या प्रत्येक कार्यालयात समिती गठित करणे आवश्यक आहे. या समितीमध्ये कार्यालयातील वरिष्ठ महिलेची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करावीतसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांमधून सामाजिक कार्याचा अनुभव किंवा कायद्याचे ज्ञान असलेले दोन कर्मचारी सदस्य म्हणून नियुक्त करावेत व महिलांच्या प्रश्नांशी बांधिल असलेल्या अशासकीय संघटनेचा एक सदस्य असावा.   त्याचप्रमाणे प्रत्येक कार्यालयाने अंतर्गत तक्रार समिती गठीत केल्याचा फलक दर्शनी भगात लावणे बंधनकारक आहेत. तसेच या अधिनियमानुसार दर तीन वर्षांनी या समितीची स्थापना किंवा पुनर्रचना करणे आवश्यक आहे. असे या कायद्याच्या अमलबजावणी करून घेणारे जिल्ह्याचे प्रमुख उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) तथा जिल्हा अधिकारी गणेश सांगळे यांनी सांगितले आहे.

या कार्यालयांमध्ये अंतर्गत तक्रार समिती गठित करणे अनिवार्य

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ संदर्भातील अधिनियमानुसार प्रत्येक शासकीय / निमशासकीय कार्यालयसंघटनामहामंडळेआस्थापनासंस्था शाखा ज्यांची शासनाने स्थापना केली असेल किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असेल किंवा पूर्ण किंवा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निधीशासनामार्फत किंवा स्थानिक किंवा शासकिय कंपनी किंवा नगरपरिषद किंवा सरकारी संस्था यांना दिला जातो.  अशा सर्व आस्थापनातसेच कोणतेही खाजगी क्षेत्रसंघटना किंवा खाजगी उपक्रम/संस्थाएंटरप्रायजेसअशासकिय संघटनासोसायटीट्रस्टउत्पादकप्रवठावितरण व विक्री यासह वाणिज्यव्यावसायिकशैक्षणिककरमणूकऔद्योगिकआरोग्य इ. सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादाररुग्णालयशुश्रूषालयक्रीडा संस्थाप्रेक्षागृहेक्रीडा संकुले इ. ठिकाणी किंवा अधिनियमात नमूद केलेल्या कामाच्या शासकीय व खाजगी क्षेत्रातील कार्यालयांच्या ठिकाणी अंतर्गत समिती गठित करणे अनिवार्य असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी म्हटले आहे.

0000


 


सूर्याच्या उपासनेची* *आज रथसप्तमी*

 ⚜🌹⚜🚩🕉🚩⚜🌹⚜


      🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻

                       *२/२*


            *सूर्याच्या उपासनेची*

              *आज रथसप्तमी*

              

⚜🌹☀️🚩🛕🚩☀️🌹⚜


        *ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों*

        *तेजो राशे जगत्पते,*

        *अनुकंपयेमां भक्त्या,*

        *गृहाणार्घय दिवाकर*


        *भारतीय संस्कृती पंचमहाभुताचा आदर करणारी. सर्वात प्राचीन सनातन भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सणाचा आनंद प्रदीर्घ टिकणारा असतो. मर्मबंध ठेवींचा ठरतो.*

        *आज रथसप्तमी. हळदीकुंकू कार्यक्रमाचा शेवटचा दिवस. महिनाभर घरोघरी हळदीकुंकवाचे कार्यक्रमात नवविवाहितांचे.. बालकांचे हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक सुरु होते.*

        *हळदीकुंकू कार्यक्रम हा व्यापक समाज हिताचा. फ्लॅट संस्कृतीत तर फारच गरजेचा. सासर माहेरच जोडणारा नाही तर  समाजही जोडणारा कार्यक्रम. महिनाभर सेवन केलेला तिळगुळ आरोग्यदायी ठरलाच पण एकमेकांना दिलेल्या वाणाची आठवण वर्षभर राहणार. घरात कितीही वस्तू असल्या तरीही हे नित्योपयोगी वस्तूंचे वाण वर्षभर आठवण देणारे. अगदी पोस्टकार्ड वाणात दिले तरीही कित्येक नाती जोडली जातात.*

        *आज रथसप्तमीला पहाटेच गावोगावच्या नदीत स्नान करुन सूर्याला अर्घ्य दिले जाणार. तो आमचे जीवन तेजोमय करायला रोज येतोय. आज तुळशी वृंदावनासमोर रथ आणि सूर्य अशी रांगोळी काढून त्याचे पूजन..खीर नैवेद्य अर्पण होणार. सूर्य पूजनाचा प्रकार म्हणून देशविदेशात आरोग्यदायी सूर्य नमस्काराचे विक्रम होणार.*                    

        *सूर्य ही आमची देवता. डोळ्याने दिसणारी, कृपेचा अनुभव देणारी ही देवता. सूर्य निरपेक्षपणे अविरत कार्य कसे करावे याचा आदर्श. सूर्य कृपेवरच या चराचराचे जीवन.. भवितव्य अवलंबून आहे. चराचरात आमच्या जीवनात चैतन्य निर्माण करणारा हा सूर्य.*

        *कोवळी सूर्यकिरणे ही आरोग्य दायी, अनेक रोगापासून मुक्तता देणारी, हे आज विज्ञानाने सिद्ध झालेय. सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे. त्याच्याप्रमाणेच निस्पृह होत स्वयंप्रकाशीत होण्यासाठी प्रेरणा देतो. परप्रकाशीत म्हणजे परावलंबी, तर स्वयंप्रकाशीत.. सामर्थ्यवान.. तेजस्वी होत इतरांचेही जीवन उजळवा हा संदेश सूर्य देतो.  आहे.* 

        *आत्यंतिक सुखाच्या अट्टाहासात होणारी वाटचाल कधीकधी निसर्गचक्रात अडथळा आणते, मग वसुंधराच संकटात सापडते. या वसुंधरेला वाचवायला जावे ते सूर्य देवाकडेच.*       

        *हे गगनराज, व्योमराज.. भास्कर तुमच्या तेजाने हे भूमंडळ उजळते. तुमची कोटी कोटी किरणे म्हणजे उधळलेले अग्निबाणच. पण आमच्याकडे येताना मात्र अमृत कण होत इथल्या अणूरेणूंना प्रकाशमान करतात. त्या तेजावरच आमचे जनन मरण अवलंबून आहे, तेच नविन साज चढवतात.*

        *ज्योती प्रमाणे चमकणारी तुमची मुर्ती आहे. तुमच्या राजसभेत सगळ्या ग्रहांचे मंत्रिमंडळ हजर आहे. हे भास्करा आता तूच या वसुंधरेची लाज राख. पृथ्वीवरचे संकट दूर कर. आमच्या जीवनाचा विकास कर.*


🌹🌞🌹🔆🙏🔆🌹🌞🌹


  *तेजोनिधी लोहगोल,*

  *भास्कर हे गगनराज*

  *दिव्य तुझ्या तेजाने*

  *झगमगले भुवन आज*

  *हे दिनमणि व्योमराज,*

  *भास्कर हे गगनराज*


  *कोटी कोटी किरण तुझे*

  *अनलशरा उधळिती*

  *अमृतकण परि होउन*

  *अणुरेणु उजळिती*

  *तेजातच जनन मरण,*

  *तेजातच नविन साज*

  *हे दिनमणि व्योमराज,*

  *भास्कर हे गगनराज*


  *ज्योतिर्मय मूर्ति तुझी,*

  *ग्रहमंडळ दिव्यसभा*

  *दाहक परि संजीवक*

  *तरुणारुण किरणप्रभा*

  *होवो जीवन विकास,*

  *वसुधेची राख लाज*

  *हे दिनमणि व्योमराज,*

  *भास्कर हे गगनराज*


🌷💫🌺☀️🏵☀️🌺💫🌷


  *गीत : पुरुषोत्तम दारव्हेकर*  ✍️

  *संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी*

  *स्वर : पं. वसंतराव देशपांडे*

  *नाटक : कट्यार काळजात घुसली*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧                                       


         🚩 *ॐ सूर्याय नमः* 🚩

      

    🌹🙏 *सुमंगल प्रभात* 🙏🌹

                 *०४.०२.२०२५*


🌻☀️💫🏵🌞🏵💫☀️🌻

निष्पापांचे रक्त 'अग्रलेख एक सडेतोड उत्तर

 श्री. संपादक,

म.टा.

तुमच्या आजच्या (जानेवारी ३१,२०२५) अंकातील 'गंगेतील निष्पापांचे रक्त 'अग्रलेख वाचला. खरं म्हणजे, हे पत्र मी माझ्या पूर्वीच्या सवयीनुसार तुमच्याकडे पाठवायला पाहिजे होते, पण अशा निर्भिड पत्रांना नेहमीच कचऱ्याची टोपली दाखवली जाते, ह्या स्वानुभवाने या वेळी सोशल मीडियाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. कारण या मिडीयावर तुमची सेंन्सॉरशिप लागू होत नाही.

पूर्वी मी रोज कमीतकमी दोन मराठी वृत्तपत्रांचा नियमित वाचक होतो. पण नंतर मी टाईम्स (इंग्रजी) सोडून बाकी सगळी मराठी वृत्तपत्रे वाचणे बंद केले. पण सौ. च्या आग्रहास्तव आम्ही परत म.टा. ची वार्षिक वर्गणी भरून तो पेपर चालू केला, तो फक्त दोन कारणांस्तव- 

१). त्याच्यातील शब्दकोड्यासाठी आणि २). रविवारच्या अंकातील तंबी दुराई यांच्या उत्कृष्ट स्तंभ (कॉलम) साठी, पण हातात अंक पडला की एखादी तरी नजर इतर पानांवर पडतेच

तर अशी नजर आज तुमच्या आजच्या अग्रलेखावरही पडली. आणि तुम्हाला सांगतो की माझा अजिबात अपेक्षाभंग झाला नाही. त्याचं काय आहे, संपादक साहेब, मोदी-योगी जोडीने आयोजित केलेल्या या जगातील सर्वात मोठा मेळाव्याकडे सगळे जग अवाक् होऊन कौतुकाने पाहाते आहे. या मेळाव्यात सामील झालेल्या हजारो परदेशी पाहुण्यांनी तोंड भरून तेथील व्यवस्थेचे, स्वच्छतेचे आणि काटेकोर आयोजनाचे कौतुक करून योगींना १००/१०० मार्क दिले आहेत. हिंदुंच्या धार्मिक भावनांना ही भरभरून सन्मान दिला जातो आहे. अशावेळी 'काय करावे, काही सुचेना' अशा मानसिक अवस्थेमध्ये असणाऱ्या भारतातील पुरोगामी, बुद्धिवादी(?) लोकांना आणि त्यांच्या ताब्यात असणाऱ्या मिडियाला एक संधी या मेळाव्यात झालेल्या त्या दुर्दैवी घटनेने मिळाली आणि वेळ न घालवता त्यांनी त्या संधीचा वापर करण्याचा  प्रयत्न सुरू केला आहे. आजचा तुमचा अग्रलेख हा या प्रयत्नांचाच एक भाग आहे. 

प्रथम आपण या मेळाव्यातल्या भाविकांच्या श्रद्धेविषयी बोलू. तुम्ही गंगा काठावर राहूनही गंगास्नान न करणाऱ्या संत रोहिदासांचे उदाहरण दिले आहे. भारतीय परंपरेत संत ही उपाधी ज्याची परमेश्वरावर अनन्यसाधारण भक्ती आणि श्रद्धा आहे, त्याला दिली जाते. त्यामुळे संत रोहिदासांची परमेश्वरावर अत्यंत श्रद्धा होती, हे ओघाने आलेच. रोहिदास हे गंगाकिनारी राहात होते (ह्रूषिकेश ते बिहार पर्यंत कुठेही) तरी या काठावर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत आणि गंगा किनारी राहात असल्याने ते गंगेत डुबकी मारीत नसले आणि घरीच बादलीतल्या पाण्याने अंघोळ करीत असले तरी ते गंगेचेच पाणी होते ना ? मग त्यांना आपो आपच गंगास्नानाचे पुण्य रोजच लाभत होते. गंगामातेवरील भारतीयांची श्रद्धा हजारो वर्षांपासून लवलेशाचाही फरक न होता आज २१व्या शतकातही अभेद्य राहिली आहे. अनेक सांस्कृतिक आक्रमणांनंतरही ती तसूभरही कमी झालेली नाही. आधुनिक विज्ञानाच्या आक्रमणाने ही ती नष्ट होण्याची सुतराम ही शक्यता नाही. उलट, परधर्मीय असणाऱ्या विज्ञानवादी विदेशी लोकांनाही आता गंगास्नानाचे महत्त्व पटते आहे. *आणि हीच तुमची पोटदुखी आहे*. 

दुसरे उदाहरण तुम्ही 'पुण्य ते उपकार,पाप ते परपीडा ' या तुकारामांच्या प्रसिद्ध उक्तीचे दिले आहे.आणि कुंभमेळ्यात हजेरी लावणाऱ्या बेछूट तथाकथित धार्मिकांना ही उक्ती माहीत नसावी, असे म्हटले आहे.

कोवीड महामारीच्या काळात जगातील बहुतेक गरीब राष्ट्रांना हजारो कोटी रुपयांची ( किंवा डॉलर्स) किंमतीची लस एक पैसाही न घेता मोदींनी (म्हणजेच धार्मिक भारतीयांनी) पुरविली. हा उपकार म्हणजे पुण्याची फार मोठी कमाई मोदींनी म्हणजेच भारतीयांनी केली, हे लक्षात ठेवूनच भारतीयांनी सलग तिसऱ्यांदा, असे पुण्य मिळवून देणाऱ्या मोदींना पंतप्रधान बनविले, हे तुम्ही विसरलेले दिसतात. आणि कुंभमेळाव्या सारख्या पवित्र ठिकाणी परपिडा करणे भाविकांच्या मनातही येणार नाही, हे जितके खरे तितकेच योगी - मोदींचे विरोधकही धजावणार नाही, इतकी चोख व्यवस्था योगींनी ठेवली आहे. 

जेंव्हा भारतीयांची लोकसंख्या आजच्या पेक्षा तुलनेने कमी होती त्या काळातही कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात बिगर भाजपा सरकारांच्या काळातही सरकारी अनास्था आणि अव्यवस्थेमुळे शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. कारण या सरकारांना कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व कळलेच नव्हते. पण योगींनी भारतीयांची कुंभमेळ्याप्रती भारतीयांची श्रद्धा लक्षात घेऊन त्याला एखाद्या उत्सवाचे नीटनेटके रुप दिले. त्यांनी धार्मिक भावनांना योग्य सामाजिक रुपही देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मतदान करणाऱ्या सुमारे ८० कोटी लोकांपैकी निम्मे लोकांनी जातीपातीची सर्व बंधने झुगारून एकदिलाने या उत्सवात भाग घेतला. एकीकडे राहुल गांधी जातीच्या मुद्यावर भारतीयांमध्ये फूट पाडण्याचा उद्योग करीत असताना, सर्व भारतीयांची एकजूट करण्याचा यशस्वी प्रयत्न  योगी-मोदींनी कुंभमेळ्यातून साधला आहे, *हे तुमच्या पोटदुखीचे दुसरे कारण आहे*. एक लाखाची राजकीय सभा किंवा मेळावा आयोजित करताना पुढाऱ्यांना किती पैसै वाटावे लागतात, हे उघडे गुपीत आहे, पण इथे तर स्वखर्चाने कोट्यवधी गरीब लोक शेकडो मैलांचा प्रवास करत आनंदाने या उत्सवात सहभागी कसे होतात? असा प्रश्न *हे तुमच्या पोटदुखीचे आणखी एक कारण आहे*.

तसेच, एका धार्मिक उत्सवासाठी सहा, सात हजार कोटी रुपये खर्चून सरकारी तिजोरी मध्ये जवळपास दोन लाख कोटी रुपयांची भर कशी टाकू शकतात, हा ही तुम्हाला भेडसावणारा प्रश्न आहे.

शेवटी, एक अद्वितीय आणि डोळ्यांचे पांग फेडणाऱ्या या उत्सवातील एकूणच सर्व व्यवस्था, स्वच्छता, टापटीप, नियोजन यांचे कौतुक न करता, एका दुर्दैवी घटनेच्या निमित्ताने योगींना एका क्षणात हिरोचा झिरो करून त्यांना व्हिलन बनविण्याचा प्रयत्न तुम्ही आजच्या अग्रलेखातून केला आहे तो कोट्यवधी हिंदूंना मान्य होणार नाही, हे लक्षात ठेवा.


सतीश कुलकर्णी, (9822 064 709).

भाजत शिजवताना काळजी घ्या पहा जीवावर कसे बेतते

 


Featured post

Lakshvedhi