Sunday, 29 December 2024

राज्यातील हवाई दळणवळण वाढविण्यासाठी विमानतळ प्रकल्पांच्या कामांना गती द्या

 राज्यातील हवाई दळणवळण वाढविण्यासाठी

विमानतळ प्रकल्पांच्या कामांना गती द्या

                                            - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 28 :- राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रस्तेजलहवाई मार्गांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. राज्याचा प्रत्येक भाग विमानाने जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांचे विस्तारीकरण करण्याच्या कामाला गती देण्यात यावी. या कामांना केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनाकडून भरीव स्वरुपाचे सहकार्य केले जाईलअशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

 

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पार पडली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीराज्यात हवाई वाहतुकीच्या वाढीला मोठा वाव आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या उडाण योजनेसह राज्याच्या निधीतून विमानतळांचा विकासत्यांचे विस्तारीकणनाईट लँडिंगची सुविधाधावपट्टीची लांबी वाढविणेविमानतळांवर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे यासारख्या बाबींवर लक्ष केंद्रित करावे. रिलायंसच्या ताब्यात असणारी विमानतळे राज्याच्या ताब्यात घेण्यासाठी महाराष्ट्र उद्योग विकास मंडळाने तातडीने कार्यवाही करावी. मोठ्या शहरांतील विमानतळांवरील भार कमी करण्यासाठी राज्याच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने युद्धपातळीवर कार्यवाही करावीअसे निर्देशही त्यांनी दिले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरीशिर्डीअमरावती (बेलोरा)पुरंदरकराडचंद्रपूर (मोरवा)सोलापूरधुळेफलटणअकोलागडचिरोली या विमानतळांच्या कामांच्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा देखील घेतला. मिहान क्षेत्रांतर्गत येणाऱ्या जीएमआर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी देण्यात येणाऱ्या 786.56 हेक्टर क्षेत्रासंदर्भात करावयाच्या कराराचा आढावा घेतला. यासंदर्भातील करार लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

बैठकीस वाहतूक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठीवित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्तानगरविकासचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगलमहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडेउद्योग विभागाचे सचिव अन्बलगनएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासूनागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर आदी उपस्थित होते.

000000

देशातील अग्रेसर राज्याचा लौकिक कायम ठेवण्यासाठी ‘मित्रा’ संस्थेने विविध प्राधान्य क्षेत्रांत दिशादर्शक काम करा

 देशातील अग्रेसर राज्याचा लौकिक कायम ठेवण्यासाठी

मित्रा’ संस्थेने विविध प्राधान्य क्षेत्रांत दिशादर्शक काम करावे

                                                         - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 

        मुंबई दि. 28 :- देशातील अग्रेसर राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक कायम ठेवण्यासाठी वित्तीय सुधारणाखनिकर्मगटशेतीसौरऊर्जा प्रकल्पजैव इंधनआंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराच्या संधी यासारख्या प्राधान्य क्षेत्रांच्या विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) या संस्थेने दिशादर्शक काम करावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनची (मित्रा) बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पार पडली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीगटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सामूहिक विकासाला चालना देण्यात येत आहे. राज्यात साधारण 400 गट कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश गटांनी चांगली कामगिरी केली आहे. कृषीजलसंधारणफलोत्पादनपणन आदी विभागांच्या योजनांचा एकत्रित लाभ देऊन गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक-सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध योजनांच्या अभिसरणाचे एक मॉडेल तयार करण्यात यावेअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

   

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी राजकोषीय तूट कमी करणेभांडवली गुंतवणुकीवर भर देणेमालमत्तांचे सनियंत्रण करणेयोजनांचे अभिसरणजलसंधारणाचे अपूर्ण प्रकल्प गतीने पूर्ण करणेराज्याची डेटा पॉलिसीखनिकर्म पॉलिसी जाहीर करणे यासारख्या बाबींना प्राधान्य द्यावेअशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी जायकवाडी प्रकल्पातील सौर ऊर्जा प्रकल्पशेतीमधील टाकाऊ बाबींपासून बायोगॅस निर्मितीगोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय आदी विषयांचाही सविस्तर आढावा घेतला.

 

बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिकवित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्तामित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीवन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डीमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशीवित्त विभागाच्या सचिव शैला ए.कृषी व पर्यटन सचिव जयश्री भोज यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारीमित्रा संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पर्यटकांचे आकर्षण केंद्र म्हणून नाशिकचा विकास करावा

 पर्यटकांचे आकर्षण केंद्र म्हणून नाशिकचा विकास करावा

पर्यटकांचे आकर्षण केंद्र म्हणून नाशिक जिल्ह्याला विकासित करावे. श्रीरामाचा जन्म जरी अयोध्येत झाला असला तरी श्रीरामाचा बराचसा काळ नाशिकमध्ये गेल्याचा इतिहास आहे. केंद्रीय विशेष सहाय्य योजनेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला 'राम-काळ-पथयोजनेसाठी निधी मंजूर झाला असून त्यामाध्यमातून रामाचा इतिहास सांगणारे थीम पार्क तयार करण्यात यावेअशा सूचना मंत्री श्री.देसाई यांनी दिल्या.  पर्यटन धोरणांची अंमलबजावणीपर्यटन विषयक योजना, पदांचा सविस्तर आढावा देखील त्यांनी यावेळी घेतला.

 

खनिकर्म विभागाचा आढावा घेत असताना मंत्री श्री. देसाई म्हणाले कीखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे नियंत्रण सुलभ होण्यासाठी एकात्मिक खाणपट्टा व्यवस्थापन संगणकीय प्रणाली राबविण्यात यावीजेणेकरुन अवैध खनिज वाहतुकीला आळा बसून महसूल वाढीस चालना मिळेल.

 

राज्यातील वीर पत्नीवीर माता-पितामाजी सैनिकमाजी सैनिक विधवा पत्नी व त्यांच्यावर  अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांचे कल्याण व पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील. तसेच सैनिक कल्याण विभागात कंत्राटी मनुष्यबळ भरताना आजी व माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात यावेअशा सूचना मंत्री श्री.देसाई यांनी दिल्या. तसेच महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळांतर्गत (मेस्को) माजी सैनिकांना रोजगार उपलब्ध करुन देताना सुरक्षा रक्षकांबरोबरच लिपिकतांत्रिक पदासाठी भरती प्रक्रिया राबवावीअसेही त्यांनी यावेळी सूचविले. तसेच त्यांनी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थाछत्रपती संभाजीनगर व मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थानाशिक यांच्याही कामकाजाचा आढावा घेतला.

 

राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यामध्ये गुणवत्ता राखण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच

त्यामध्ये गुणवत्ता राखण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 

        मुंबई दि. २८ :- महाराष्ट्राला कृषीवीज निर्मितीउद्योग आणि सेवा क्षेत्रात आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी सौर ऊर्जेवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यामध्ये गुणवत्ता राखण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

            महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पार पडली.

 

            मुख्यमंत्री म्हणाले कीमहाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवायचे आहे. त्यासाठी विजेशी संबंधित सर्व कंपन्या सुस्थितीत आणाव्या लागतील. भविष्यात त्यात जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांचे लिस्टिंग करण्याबाबत विचार करावा लागेल. ऊर्जा विभागांतर्गत कार्यरत कंपन्यांबाबत येणाऱ्या तक्रारी कालमर्यादेत सोडविण्यासाठी जिल्हाविभाग स्तरावरील यंत्रणा सक्षम करण्यात यावीअसे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

बैठकीस ऊर्जा राज्यमंत्री तथा मंडळाच्या उपाध्यक्ष मेघना बोर्डीकरमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशीकंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आभा शुक्लासंचालक लोकेश चंद्राराधाकृष्णन बी.अनुदीप दिघेस्वतंत्र संचालक विश्वास पाठकनीता केळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000000

रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे

  रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे



अध्यक्ष जयद्रथ भगत, कार्याध्यक्ष सुभाष घासे, सरचिटणीस मारुती आडकर, सरचिटणीस हिरामण भोईर, हरिश्चंद्र शिंदे, दत्ता पाटील यांनी खासदार श्री सुनिल तटकरे, धैर्यशिलदादा पाटील, आमदार श्री.रविशेट पाटील यांची या हंगामात होणाऱ्या कुस्ती स्पर्धा विषयी सदिच्छा भेट घेतली

Saturday, 28 December 2024

विषय जरी "दारु" असला तरी, कविता सुंदर आहे. न घेणाऱ्यालाही हसवेल II*

 *।। विषय जरी "दारु" असला तरी, कविता सुंदर आहे. न घेणाऱ्यालाही हसवेल II*


।। पिऊन थोडी चढणार असेल

।। तरच पिण्याला अर्थ आहे

।। एवढी ढोसून चढणार नसेल

।। तर आख्खा खंबा व्यर्थ आहे


।। मी तसा श्रध्दावान

।। श्रावण नेहमी पाळतो

।। श्रावणात फक्त दारू पितो

।। नॉनव्हेज मात्र टाळतो


।। ज्याची जागा त्याला द्यावी

।। भलती चूक करू नये

।। पिताना फक्त पीत रहावं

।। चकण्यानं पोट भरू नये


।। वेळच्या वेळी आपण ओळखावी

।। आपली आपली आणिबाणी

।। लाज सगळी सोडुन देऊन

।। ग्लासात घ्यावं लिंबुपाणी


।। पिऊन तर्र झाल्यानंतर

।। काय खातोय ते कळत नाही

।। खाल्ल्यानंतर बिलामधली

।। टोटल कधी जुळत नाही


।। अशीही वेळ असते जेंव्हा

।। कोणीच आपला नसतो

।। म्हणून आपण प्यायला जातो

।। तर नेमका ड्राय डे असतो


।। आपला पेग आपण भरावा

।। दुसर्‍यावर विश्वास ठेवू नये

।। आपला ग्लास, आपली बाटली

।। दुसर्‍याच्या हातात देऊ नये


।। असं उगीच लोकांना वाटतं

।। की दुःख दारूत बुडून जातं

।। दुःख असतं हलकं हलकं

।। अल्कोहोलसोबत उडून जातं!


।। एकदा प्यायला बसल्यानंतर

।। तुझं-माझं करू नये

।। तुझी काय, माझी काय

।। नशा कधी सरू नये


।। तुला जायचंच असेल तर निघून जा ,

।। जाण्यासाठी भांडू नकोस

।। प्यायची नसेल तर पिऊ नको ,

।। पण दारू अशी सांडू नकोस


।। स्कॉच प्यावी कोरी, कच्ची

।। बर्फ नको, सोडा नको

।। उंच आभाळी उडण्यासाठी

।।पंख हवे... घोडा नको !


।। फॉरीन लिकर कितीही प्यावी

।। काही केल्या चढत नाही

।। देशी आपली थोडीशीच प्यावी

।। दोन दोन दिवस उतरत नाही


।। पिणं असतं आगळा उत्सव

।। त्याचा उरूस होऊ नये

।। प्यायला नंतर आपला कधी

।। वकार युनूस होऊ नये


।। घरी बसून दारू प्यायचे

।। खूप सारे फायदे असतात

।। हॉटेलमधे, बिल भरायचे

।। काटेकोर कायदे असतात


।। आम्ही कधीच दारूमधे

।। दुःख आमचं बुडवत नाही

।। दारू नेहमी शुध्दच ठेवतो

।। भेसळ आम्हाला आवडत नाही


।। हवा तसा मी चालतो आहे

।। कोण म्हणतंय ' जातोय तोल ? 

।। माझ्या मित्रा, माझ्या इतकी

।। पचवून दाखव, नंतर बोल!


।। प्रत्येक पार्टीत आपण बोलवावे

।। काही ' न ' पिणारे मित्र

।। पार्टीनंतर आपल्याला 

।। आपल्या घरी नेणारे मित्र


।। पिणाऱ्यांनी समाजाचा

।। कुठलाच कायदा पाळू नये

।। जेंव्हा, जिथे, जशी वाटेल

।। प्यायचा मोह टाळू नये


।। ग्लासी लागेल ते ढोसत असतो

।। पानी लागेल ते चरत असतो

।। जेंव्हा माझं बिल कोणी

।। दुसराच माणूस भरत असतो


।। काय होतंय, कुठे होतंय

।। काही केल्या कळत नाही

।। एकदातरी वेळ अशी

।। पिणाऱ्यांना टळत नाही


।। प्रत्येकानंच आपला आपला

।। जसा घ्यायचा असतो श्वास

।। तसा प्रत्येकानं  आपला

।। सांभाळायचा असतो ग्लास....


।। समस्त दारू पिणा-यांना सादर अर्पण 

   🍺🥃


*लवकर तारीख कळवा; थोड्याच तारखा शिल्लक आहेत... 😜*

Friday, 27 December 2024

28/12/2024 व 29/12/2024 या दिवशी वाहतूक बंदीपोयनाड, पेझारी, अलिबाग, चोंढी, नागाव, रेवदंडा

 पुढील काही दिवसांसाठी महत्वाची माहिती.


पोयनाड, पेझारी, अलिबाग, चोंढी, नागाव, रेवदंडा येथे वाहतूक कोंडी होवु नये, व अवजड वाहनांमुळे अपघात होवु नये याकरिता धरमतर ब्रिज ते अलिबाग, अलिबाग ते मांडवा जेट्टी, अलिबाग-रेवस-मुरुड या मार्गावर अवजड वाहनांना दि. 28/12/2024 व 29/12/2024 या दिवशी वाहतूक बंदी करण्याचे आदेश मा. जिल्हाधिकारी साहेबांनी काढलेले आहेत.



*31 st करिता रायगड जिल्ह्यात वाहतुकीचे नियोजन.*


माणगाव येथे वाहतूक कोंडी होवु नये याकरिता लांब पल्ल्याच्या बसेससाठी माणगाव शहराबाहेर एच.पी.पेट्रोल पंपाजवळ असलेल्या ग्राउंडवर तात्पुरता दि. 28/12/2024 ते 02/01/2025 पर्यंत एस.टी. थांबा हलविण्यात आला आहे.

Featured post

Lakshvedhi