Saturday, 28 September 2024

आनंदी आनंद गडे

 🌹⚜🌹🎼🌅🎼🌹⚜🌹


     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻


           ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

        *'भारतरत्न' लतादीदींच्या*

                 *जन्मदिनाची*

           ⚜️⚜️⚜️⚜️⚜️


   *दैवी चमत्काराला वंदन करणारी*


🌸🌿🔆🌺🎶🌺🔆🌿🌸


        *चमत्कार. अर्थात जे अद्भुत.. विस्मयकारी आनंदमय असते असे. चमत्कार नेहमी घडत नाहीत. पण आजच्या पिढीने हा चमत्कार अनुभवलाय. असे भारतरत्न बघितले ज्यांचा जन्म शतकानुशतकात क्वचितच होतो. हे पण अनुभवलेय की या प्रतिभावंत भारतरत्नाने सचिन सारख्या दुसऱ्या भारतरत्नाच्या प्रतिभेला दाद देत पुत्र मानले.. पुत्र प्रेम दिले.* 

        *भौतिक जगातील जीवन संघर्षात मानवी जीवन सुंदर, आनंदी व्हावे म्हणून ईश्वरी योजनेप्रमाणे पृथ्वीवर लता दिदींचा जन्म झाला. त्यांचा जीवनप्रवास.. संघर्ष.. परिश्रम.. कुटुंबावरचे.. समाजावरचे प्रेम सारेच आदर्श ठरलेय.*

        *पु. ल. म्हणायचे, प्रत्येक सेकंदाला जगातील कुठल्यातरी भागात ज्यांचे सूर ऐकू येतातच. अशा या दिदींना बघणारे भाग्यवानच.*

        *आपल्या दैवी स्वरांनी लोकजीवन सुसंपन्न.. प्रफुल्लीत.. आनंदी करणाऱ्या दिनानाथ मंगेशकर घराण्यातील लतादीदी या संपूर्ण कुटुंबाच्या कळसस्थानी विराजमान आहेत.*

        *बालवयातच लतादिदींचा गानविश्वात प्रवेश झाला. दिदींनी लाभलेल्या दैवी देणगीला संपूर्ण न्याय दिला. गाणे ही कर्मसाधना मानली. मग त्यासाठीचे कष्टही त्यांना आनंदच देवू लागले.*

          *श्रोत्यांना दिदींच्या गाण्यातील गोडवा हा ज्ञानेश्वरीतील ओवींचा गोडवा आहे असे वाटते. दिदींच्या व्यक्तिमत्वावर भारतीय संस्कृतीचा.. संतसाहित्याचा मोठा प्रभाव आहे. माऊली असो वा तुकोबा वा रामदास स्वामी. त्यांना दिदींचीच  प्रतिक्षा असावी. मग दिदींनी मनामनात मोगरा फुलविला.. कधी आनंदाच्या डोहातील आनंद तरंग मनामनात प्रकटवले, तर कधी दिदी श्रोत्यांना आनंदवन भूवनी घेऊन गेल्या. गाण्यातील अंतरंग भाव 'ये हृदयीचे ते हृदयी' नेण्याचे सामर्थ्य दिदींच्या स्वरसाधनेत आहे.*

        *नामवंतांनी दिदींच्या गाण्याबद्दल सहस्त्रावधी पाने खर्चूनही त्या स्वर मोहिनीचे रहस्य उलगडत नाही. एकच उत्तर सापडते ते म्हणजे दैवी चमत्कार.* 

        *दिदींनी करोडो लोकांच्या जीवनाला अर्थ दिला. जीवनातील सुखदुःखात दिदींचे गाणे हे नेहमीच संजीवक.. उभारी.. उर्जा देणारे ठरलेय.. ठरणार आहे. त्यांनी जात.. धर्म.. भाषा.. प्रांत.. देश.. खंड यापलीकडे नेत आपल्या जादुई स्वरांनी सर्वाना एका धाग्यात जोडलेय. दिदी म्हणजे भारतीय संस्कृतीचे.. शालीनतेचे चालते बोलते प्रतिक होत्या.*

        *लतादिदींचा स्वर्गीय स्वर लाभला म्हणजे गाण्याचे सोने झाले हे समीकरणच होते. गरीबातला गरीब पण वर्षानुवर्षे हे सोने मनसोक्त लुटत आहे. दिदींनी पण कर्णाच्या उदारतेने हा आनंद वाटला. त्यांची दानशूरता वेळोवेळी सिद्ध झालीय.*

        *दिदींच्या सुरेल स्वरांनी सदैव "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे" ही अनुभूती प्राप्त होते. प्रत्येकाचे भावविश्व संपन्नतेची श्रीमंती अनुभवते.*

        *जगात जो पर्यंत कान आहेत तोपर्यंत लता दिदींचे स्वर मनात रुंजी घालणारच. हे जीवन आनंदी करणाऱ्या दिदींना 'आनंदी पहाट' च्या सहस्त्रावधी रसिकांतर्फे विनम्र अभिवादन.*


🎊🌸🎊💐💐🎊🌸🎊


  *आनंदी आनंद गडे,*

  *इकडे तिकडे चोहीकडे*


  *वरती खाली मोद भरे,*

  *वायूसंगे मोद फिरे*

  *नभांत भरला,*

  *दिशांत फिरला,*

  *जगात उरला*

  *मोद विहरतो चोहीकडे*


  *सूर्यकिरण सोनेरी हे,*

  *कौमुदी ही हसते आहे*

  *खुलली संध्या प्रेमाने,*

  *आनंदे गाते गाणे*

  *मेघ रंगले, चित्त दंगले,* 

  *गान स्फुरले*

  *इकडे, तिकडे, चोहीकडे,*

  *आनंदी आनंद गडे*


  *वाहती निर्झर मंदगती,* 

  *डोलती लतिका वृक्षतती*

  *पक्षी मनोहर कुजित रे,*

  *कोणाला गातात बरे*

  *कमल विकसले,*

  *भ्रमर गुंगले,*

  *डोलत वदले*

  *इकडे, तिकडे, चोहीकडे,*

  *आनंदी आनंद गडे*


🌺🌿🌺🎶🎉🎶🌺🌿🌺


  *गीत : बालकवी*  ✍

  *संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर*

  *स्वर : लता मंगेशकर*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

              *-२८.०९.२०२४-*


🌻💐🌸🎶💐🎶🌸💐🌻

जो शहीद हुवे हैं उनकी जरा याद करो कुर्बनी


 

केळीच्या पानावर जेवण का करावे ?* ☘

 ☘ *केळीच्या पानावर जेवण का करावे ?* ☘


🙏🏻🙏🏻🙏🏻☘️☘️☘️☘️☘️🙏🏻🙏🏻🙏🏻


नैवेद्य दाखवायचा असो , सवाष्ण बोलवायची असो व नातेवाईकांना जेवायला बोलावले असो. याप्रसंगी भोजन केळीच्या पानवर वाढण्याची प्रथा आपल्याकडे आहे. या प्रथेमागे धार्मिक अधिष्ठान तर आहेच शिवाय वैद्यकीय कारणेही आहेत. जाणून घेऊया त्याविषयी .... 


🌴  हिंदू धर्मग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. काही विशेष पूजन कार्यामध्ये या झाडाच्या फांद्यांचा मंडपही तयार केला जातो. केळीचे झाड हे भगवान विष्णूला प्रिय आहे. यामुळे ज्या लोकांचे लग्न जमण्यास उशीर होतो आहे त्यांना या झाडाची पूजा करण्यास सांगितली जाते. वास्तूनुसारही केळीचे झाड घराच्या समोर अथवा बागेत लावणे शुभ मानले जाते. 


☘ भारतातील बऱ्याच भागांमध्ये या झाडाच्या पवित्रतेमुळे याचा उपयोग जेवण करण्यासाठी केला जातो. यामागे धार्मिक तसेच वैद्यकीय कारणही आहे. केळीच्या पानावर जेवण केल्याचे अनेक फायदे आहेत. 


🌱  केळीच्या पानावर गरम भोजन वाढल्याने त्या पानांमधली असलेली पोषकतत्वे अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असते. केळीच्या पानवर जेवण केल्यास डाग- खाज , पुरळ , फोडं अशा समस्या दूर होतात. केळीच्या पानांमध्ये अधिक प्रमाणात "एपिगालोकेटचीन गलेट" आणि इजीसीजीसारखे "पॉलिफिनोल्स अँटिअॉक्सीडेंट " आढळतात. याच पानांमार्फत अँटिऑक्सीडेंट आपणास मिळतात. यामुळे त्वचा दिर्घकाळा पर्यंत तरुण राहण्यास मदत मिळते. मेंदूला होणारा रक्तप्रवाह सुरळीत चालू रहातो. केळीच्या पानावर जेवल्यास अन्न पचायला सोप्पे जाते. 


🍃 केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचा आजार ठीक होतो. 


☘ केळीचे पान पूर्ण सुकल्यावर त्या पानांचा चुरा जर थोड्या प्रमाणात चहात टाकला तर फुफ्फुसे व स्वरयंत्राचे आजार बरे होतात. 


    *केळीच्या पानावर जेवायचे महत्व*


अ. पाटावर बसून केळीच्या पानावर जेवणे, हे आरोग्यदायी असते.


आ. केळीचे पान हे पवित्र, चैतन्ययुक्त आणि दैवी असते.


इ. केळीच्या पानात जेवणार्‍या व्यक्तीला होणारे लाभ 


१. केळीचे पान सात्त्विक असल्याने जेवणार्‍या व्यक्तीचे शरीर आणि मन यांची सात्त्विकता २ टक्के वाढू शकते.


२. केळीच्या पानातील चैतन्यामुळे शरीराची शुद्धी होते.


३. केळीच्या पानावर जेवल्यामुळे व्यक्तीला ‘चांगले वाटणे’ हा अनुभव येतो. तसेच पोटाचे विकार होत नाहीत.


४. व्यक्तीचे मन शुद्ध होते आणि ते शांत रहाते

          

        धार्मिक कार्यक्रमात केळीचे खुंट अतिशय उपयुक्त असते. केळीच्या पानामधील आहार हा पवित्र, प्रसन्न व पर्यावरण समृद्ध मानला जातो. ही पाने जेवणानंतर जनावरांना खाद्य म्हणून देशातील विविध भागामध्ये दिली जातात. केळीचे फुल, कच्चे कमळ व कच्ची केळी याच्या दक्षिण भारतामध्ये भाज्या केल्या जातात. यामध्ये लोह, पालाश, विटामिन 'ए' हे अन्नघटक जास्त असतात. केळी ही विकसनशील राष्ट्रामध्ये प्रामुख्याने अन्न म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो. विविध राष्ट्रामध्ये उपवासामध्ये चालणारे फळ म्हणून याचा उपयोग होतो.


केळीची पाने, खोड हे घडाची काढणी केल्यानंतर दुभत्या व कामाच्या जनावरांना खाद्य म्हणून मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. वाळलेली पाने ही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गरिबांना स्वस्त जळण म्हणून वापरता येते. वाळलेली केळीची खोडे आणि वाळलेल्या पानाचे सोपट (sheaths) हे ग्रामीण भागामध्ये जळण म्हणून प्रचलित आहे.


नवीन निरिक्षणामध्ये केळीच्या अंगभुत गारव्याच्या गुणधर्मामुळे खोडांचे छोटे तुकडे करून फळबागांच्या भोवती आच्छादन अथवा मुख्य खड्ड्यामध्ये कंपोस्ट म्हणून केले तर कंपोस्ट खत तर होतेच शिवाय एकूण गांडूळांची संख्या नैसर्गिकरित्या वाढते. केळीचे औषधी गुणधर्म हे तर अतिशय उपयुक्त आहेत. जसे अशक्तपणा, उच्च रक्तदाब, स्मृतीभ्रंष, मानसिक नैराश्य छातीतील जळजळ, सकाळचा आळस, मानसिक दुर्बल्य अवस्था, अकल्पीत शरीराची वाढ (Obesity), अल्सर (आतड्याचे व्रण) या विविध रोगामध्ये केळी अतिशय उपयोगी आहे. केळ्यामधील उच्च पालाशच्या प्रमाणामुळे ज्यांचे शरीरातील पालाशचे प्रमाण कमी आहे. यांना केळी खाण्याची शिफारस केली जाते. तसेच केळामध्ये अ, ब, क जीवनसत्वे आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि जास्त या सुक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण अधिक असते. या गुणधर्ममुळे केळी हे कुपोषित लहान मुलांची प्रकृती सुधारण्यामध्ये एक आदर्श फळ म्हणून गणले गेलेले आहे. केळीचे खोड शिजून उकडल्यानंतर त्यातील घटकद्रव्ये जीवनसत्त्वे. मुलद्रव्यांचे प्रमाण किंचीत वाढते. तथापि त्यातील प्रथिने व धाग्याचे प्रमाण (Fiber) हे केळफळाएवढेच असते.


केळीचे खोड व पाने गार (थंड) असल्यामुळे ज्याप्रमाणे औदुंबराच्या झाडाचे पाणी ग्राईप वॉटरमध्ये वापरून लहान मुलांचे दातदुखी व पोटदुखी थांबविण्यासाठी उपयोग होतो. त्याचप्रमाणे केळीच्या खोडाचे व पानांचे पाणी मुत्रपिंडाचे विकार यावर सारक म्हणून हमखास उपयोगी ठरते. त्याचप्रमाणे केळीच्या खोडातील पाण्यामुळे गोवर, कांजण्या, कडकी यासारखे उष्णतेचे विकार बरे होतात. या खोडाचे पाणी मुतखडा झाल्यावर सारक म्हणून वापरल्यास लघवीद्वारे विष बाहेर काढण्याचे कार्य करते.


पापड तयार करताना पीठ भिजविण्यासाठी केळीचे पाणी वापरतात, तसेच ते अनके विकारांवर गुणकारी आहे.


केळीचे विविध उपयोग जसे अन्न, धागा, जळण आणि औषधी अशा उपयोगामुळे केळी हे फळ प्रचलित होत आहे. त्यामुळे केळी हे 'कल्पतरू' म्हणून संबोधले जाते. 


🙏🏻🙏🏻🙏🏻☘️☘️☘️☘️☘️🙏🏻🙏🏻🙏🏻


*जमिनीवर बसून जेवणाचे 10 फायदे*


*१- पचन सुधारते*


जमिनीवर मांडी घालून बसल्याने, अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते या सतत होणार्‍या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते.


*२-वजन घटवण्यास मदत होते* 


जमिनीवर बसून जेवल्याने, वजन कमी होण्यासही मदत होते. वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे. जमिनीवर बसून जेवताना ‘वेगस नर्व्ह’ (पोटाकडून मेंदूला संकेत देणारी) भूक व जेवणाचे प्रमाण योग्यप्रकारे राखू शकते. टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने, जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते. परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूत राहते.


*३-लवचिकता वाढवत*े 


पद्मासनात बसल्याने, पाठीचे, कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते. परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.


*४-मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते*


जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता कमी झाल्याने, जेवणातून मिळणारी पोषणतत्त्वे शरीर अधिक उत्तमप्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते. 


*५-कुटुंबातील सदस्यांशी जवळीक वाढते*


दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटूंबासोबत जरूर आनंद घ्यावा.दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका होतो. तसेच एकमेकांशी बोलल्याने, काही समस्यांतून मार्ग शोधण्यास मदत होते व नकळत कुटूंबातील सदस्यांशी जवळीक वाढते.


*६-शरीराची स्थिती (पॉश्चर) सुधारते* 


शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे.शरीरातील काही स्नायू व सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यासदेखील मदत होते. जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व पोट, खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते.


*७-दीर्घायुषी बनवते* 


ही अतिशयोक्ती नाही. जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य वाढते. ‘European Journal of Preventive Cardiology’च्या अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे, असे समजावे. कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता अधिक असणे गरजेचे आहे. आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या 6 वर्षात होण्याची शक्यता 6.5 पटीने अधिक असते.


*८-गुडघे व कमरेतील सांधे मजबूत होतात*


Yoga for Healing या पुस्तकाचे लेखक पी.एस. वेंकटेशवरा यांच्यामते, पद्मासनामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रास होत नाही. गुडघा, घोटा व कंबरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते. जमिनीवर बसल्याने स्नायूंबरोबर सांध्यांची लवचिकतादेखील वाढते.


*९-चंचलता कमी होत*े 


मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो. म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मन, मेंदू व परिणामी शरीरातील त्रास कमी होतात.


*१०-हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुधारतो* 


काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम आल्याचे आठवते का ? हो हे शक्य आहे. कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला उर्जेची अधिक गरज असते. खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच पचनही सुधारते.


🙏🏻🙏🏻🙏🏻☘️☘️☘️


☘️🙏🏻🙏🏻🙏🏻

Friday, 27 September 2024

आंबिया बहारमधील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार

 आंबिया बहारमधील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या

बँक खात्यात लवकरच जमा होणार

 

मुंबई दि.२७ : आंबिया बहार २०२३-२४ हंगामासाठी आत्तापर्यंत निर्धारित झालेली ८१४  कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनीमार्फत लवकरच जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी आयुक्त यांनी कळविले आहे.

फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास  शेतकऱ्यांचे  आर्थिक स्थैर्य  अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईलया हेतूने राज्यात हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबविण्यात येते.

कमी जास्त पाऊसकमी / जास्त तापमानआर्द्रतावेगाचे वारेअवकाळी पाऊसगारपीट अशा विविध हवामान धोक्यांमुळे फळ पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.  या बाबींचा विचार करून राज्यात आंबिया बहारमध्ये संत्रामोसंबी, काजू, डाळिंबआंबाकेळीद्राक्षस्ट्रॉबेरी, पपई या ९ फळपिकांसाठी  महसूल मंडल स्तरावर ही योजना राबविण्यात येते.

हवामान केंद्राच्या नोंदीनुसार नुकसान भरपाईची रक्कम निर्धारित केली जाते. यात ३५ टक्के पर्यंत एकूण विमा हप्ता असल्यास  शेतकरी विमा संरक्षित रकमेच्या साधारण ५  टक्के व उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य सरकार अनुदान म्हणून भरत असते.  ३५ टक्के पुढील विमा हप्ता असेल तर वाढीव विमा हप्त्यात शेतकऱ्यांचा   वाढीव वाटा ५० टक्के असतो. आंबिया बहार २०२३-२४  मधील राज्य शासनाची एकूण विमा हप्ता रु. ३९० कोटी होता त्या पैकी प्रलंबित विमा हप्ता अनुदान रुपये ३४४  कोटी हे शासनाने मंजूर केले असून ते विमा कंपनीला दिल्यानंतर केंद्र शासनाचे दुसरा अनुदान विमा कंपन्यांना प्राप्त होईल व या  आंबिया २०२३-२४ हंगामासाठी आत्तापर्यंत निर्धारित झालेले नुकसान भरपाई रु. ८१४  कोटी ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा कंपनी मार्फत जमा करण्यात येईल.

भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखेची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 भारतीय लोक प्रशासन संस्थामहाराष्ट्र प्रादेशिक शाखेची

६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

 

मुंबईदि.२७ : भारतीय लोक प्रशासन संस्थामहाराष्ट्र प्रादेशिक शाखेची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंत्रालयातील परिषद सभागृहात माजी मुख्य सचिव तथा मानद अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी सचिव डॉ. विजय सतबीर सिंगखजिनदार विकास वि. देवधरकार्यकारी सह सचिव जयराज चौधरी हे उपस्थित होते.

अध्यक्ष स्वाधिन क्षत्रिय यांनी संस्थेने सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात केलेल्या ठळक कामांची माहिती दिली. यामध्ये ग्रंथालयातील पुस्तकांची संगणकीय यादी अद्ययावत करण्यात आली आहे. संस्थेचे नवीन सदस्य नोंदणी सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर्षी सार्वजनिक प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी एस एस गडकरी पुरस्कार नागपूर विभागीय आयुक्त  विजयालक्ष्मी बिदरी यांना जाहीर करण्यात आला. शालप्रमाणपत्र आणि १० हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांच्या नुकसांनीचा इ-पंचनामा महाराष्ट्र सुदूर संवेदन केंद्राच्या सहाय्याने तयार करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. या उपक्रमाकरिता त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

संस्थेच्या वतीने यावर्षी देखील G-२० India Techade व ‘शासन आपल्या दारी’ या विषयांवर बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेचा धनादेश आणि प्रमाणापत्र देवून गौरविण्यात आले.

यामध्ये  श्रेया संजय देसाईमुंबई प्रथम क्रमांक,  पल्लवी पाटीलकोल्हापूर द्वितीय क्रमांक नीरज पासवाननागपूर तृतीय क्रमांक,  प्रिया हितेश कल्याणीनागपूर,  झेबुनिसा अश्फाक धारवाडकरसोलापूर,  प्रीती पटेलनागपूर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या सभेमध्ये भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यामहाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या संन २०२४-२०२६ या कालावधीसाठीच्या कार्यकारी समितीच्या सभासदांची निवड निवडणूकी द्वारे करण्यात आली.

मंकीपॉक्स विषाणूच्या प्रादूर्भावाविषयी केंद्र सरकारकडून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना जनजागृतीसाठी सूचना

 मंकीपॉक्स विषाणूच्या  प्रादूर्भावाविषयी

केंद्र सरकारकडून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना जनजागृतीसाठी सूचना

 

नवी दिल्ली 27 : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्स विषाणूच्या संदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत. भारतात मंकीपॉक्स क्लेड 1बी चा नवीन रुग्ण आढळल्यानेभारत हा आफ्रिकेबाहेरील तिसरा देश ठरला आहेज्यात या प्रकारचा रुग्ण आढळला आहे.

26 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या  निर्देशानुसारकेंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने मंकीपॉक्स संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी रोग प्रतिबंधक उपाययोजना कडकपणे राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. चाचणीसाठी ठरवलेल्या प्रयोगशाळांची यादी देखील दिली आहे. जारी केलेल्या निर्देशामध्ये रुग्णालयीन व्यवस्थापनरोग प्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृतीसाठी विशेष धोरणांचा समावेश केला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या मते, 14 ऑगस्ट रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्स विषाणूच्या प्रादूर्भावाला आंतरराष्ट्रीय आरोग्य आणिबाणी म्हणून घोषित केले आहे. 2005च्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांनुसार भारत या घोषणेचा भाग आहे.

राज्य सरकारांना आरोग्य सुविधांमध्ये तयारीची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असूनवरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्य व जिल्हा स्तरावर ही आढावा बैठक घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.

मंकीपॉक्स क्लेड 1 चे लक्षणे क्लेड 2 सारखीच असली तरीक्लेड 1 मध्ये जटिलतांचा धोका अधिक असल्याचे आरोग्य मंत्रालयाने नमूद केले आहे

राज्य सेवा (मुख्य) परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

 राज्य सेवा (मुख्य) परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

 

मुंबईदि. २७ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या गेलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली ही यादी तात्पुरत्या स्वरूपाची आहे.

 

वैद्यकीय अहवाल विचारात घेऊनच उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम ऑनलाइन स्वरूपात सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याच्या सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिल्या आहेत.तसेच अधिक माहिती, आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आली असल्याचे कळविले आहे.


Featured post

Lakshvedhi