Wednesday, 21 August 2024

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद महिला सक्षम तर देश सक्षम, महिलांचा विकास तर देशाचा विकास

 मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद

 

महिला सक्षम तर देश सक्षममहिलांचा विकास तर देशाचा विकास

                                                       - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

रत्नागिरीदि. २१ महिला सक्षम तर देश सक्षम महिलांचा विकास तरदेशाचा विकासदेशाला आर्थिक महासत्ता बनवायचे आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना कायमस्वरुपी सुरु राहील. भगिनींना लखपती झालेले पहायचे आहेअसे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

               येथील चंपक मैदानावर झालेल्या मुख्यमंत्री -महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण कार्यक्रमाला महिला भगिनींकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे,  पालकमंत्री उदय सामंतआमदार शेखर निकमकोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडेजिल्हाधिकारी एम देवेंदर सिंहमुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारपोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

               मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीरक्षाबंधनाचा सण एक दिवसाचा असला तरीभावा-बहिणींमधील ऋणानुबंध कायमचे असतात. तुमचा हा भाऊ आयुष्यभर बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. ज्यांना योजनेचा अजून लाभ मिळाला नाहीत्यांच्याही खात्यात पैसे लवकरच जमा होतील. कुटुंब चालवताना बहिणींना कसरत करावी लागते. त्यांना  मोठे कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठीच मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. तुमचा भाऊ माहेरचा आहेर वाढवत जाणार आहेअसे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीअनेक योजनांच्या माध्यमातून माझ्या बहिणींना लखपती होताना बघायच आहे. या योजनेत सगळीच यंत्रणा कार्यरत आहे. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तुमच्या सावत्र भाऊंना जळजळमळमळ होऊ लागली आहे.

              

बदलापूर येथील घटना अतिशय दुर्दैवी आहे. आरोपींना फाशी झालीच पाहिजे. या महाराष्ट्रात मुलींच्या भावनेशी खेळणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. जलदगती न्यायालयात ही केस चालणार आहे. संस्था चालकांवरही कारवाई करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. चार वर्षाच्या मुलीच्या जीवाशी खेळू नका. हे शासन त्या आरोपींना फाशी झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. या चिमुरडीच्या जिवावर राजकारण करू नका. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

     मुख्यमंत्री -लाडकी बहीण योजनेत सगळ्या जातीधर्माच्या बहिणींचा समावेश आहे. ही एक दिवसाची ओवाळणी नाही तरकायमस्वरूपी माहेरचा आहेर आहे. यामध्ये वाढच होणार आहेअसेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

              मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीसर्व भगिनींना रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला ओवाळणी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या या योजनेला मोठा प्रतिसाद लाभला आहे. महिलांना आर्थिक सक्षम करण्यास सुरुवात झाली आहे.  लाडकी बहीण सर्वत्र पोहचली आणि सर्वांना भावली. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनीही मेहनत घेऊन घराघरात जाऊन या योजनेचे अर्ज भरले. या योजनेचा त्यांनादेखील लाभ मिळाला आहे. याशिवाय अर्ज भरल्यानंतर ५० रुपयांचा लाभही मिळाला आहे. सिंधुरत्न योजनेमधून टुरिस्ट बस महिलांना देण्यात आल्या. ती चालविण्याची जबाबदारीही त्यांना दिली आहे. हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारा राज्यातला पहिला जिल्हा आहे. पंधराशे रुपयांचा सन्मान निधी तुमच्या सक्षमीकरणासाठी आहेअसेही मंत्री तटकरे म्हणाल्या.

               पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले कीमहिला भगिनींच्या खात्यात आम्ही पैसे जमा करु शकलोहा आनंद आम्हा सर्वांना आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांना सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निधी आपल्या आरोग्यासाठी वापरला पाहिजे. महिला भगिनींना त्रास देणाऱ्या बँकांवर कडक कारवाई केली जाईलअसा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.

               यावेळी रिमोटद्वारे सर्व जिल्हास्तरीय योजनांचे अनावरण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. मुख्यमंत्र्यांचे आभार मानणारे पत्र जिल्ह्यातील भगिनींच्यावतीने पालकमंत्री श्री सामंत आणि मंत्री कु. तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महिला भगिनिंशी संवाद साधला. यावेळी अनेक महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली.

लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय प्रेरणा आणि ऊर्जा देणारे स्मारक

 वृत्त क्र. 1342

लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय

प्रेरणा आणि ऊर्जा देणारे स्मारक

    - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरीदि. २१ : लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे युवकांना प्रेरणा देणारे चालते-बोलते स्मारक ठरेलअसा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

          आज रत्नागिरी येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उद्घाटन आणि लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय नामकरण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमा पालकमंत्री उदय सामंतआमदार शेखर निकमरविंद्र फाटकजिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंहजिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णीमुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदी उपस्थित होते. 

          मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीविद्यार्थ्यांना ज्ञानासोबत स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे राहण्यासाठी शासन बळ देत आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांन भारत हा देश २०४७ साली पर्यत महासत्ता बनवाण्याचा संकल्पकेला आहे.  त्यासाठी आवश्यक ज्ञानकौशल्य संपादित करण्याची आवश्यकता आहे.  त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी तरुणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी.  महाराष्ट्रात उद्योगासाठी चांगले वातावरण आहे.  त्यासाठी लागणारी कौशल्य मनुष्यबळ देखील राज्यात उभे राहत आहे.  मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.  त्याच्याप्रमाणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेलाही प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.  पदवीधर असेल तर दहा हजार रुपये महिन्याला दिले जातात.  हे सरकार सर्व घटकांसाठी विविध योजना राबवित आहे.  जर्मन सरकारशी राज्याने करार करुन चार लाख रोजगाराच्या संधी विविध वीस प्रकारच्या विभागात उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे अनेक तरुणांना काम मिळेल. ड्रोन तंत्रज्ञानात काम करण्यासाठीही योजना निर्माण केली आहे.  परिसस्पर्श योजनेतंर्गत दोन हजार महाविद्यालयात ही योजना राबविली जाणार आहे. विविध क्षेत्रात रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत आहे.

            पालकमंत्री श्री. सामंत म्हणालेदोन वर्षापूर्वी रत्नागिरी हे शैक्षणिक हब व्हावे हे मी पाहिलेलं स्वप्न आज केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे साकार होत आहे याचा मला विशेष आनंद आहे.  दोन वर्षापूर्वी या इमारतीचे भूमिपूजन केले आणि आता इमारत पूर्ण झाली आहे. गतीमान सरकार म्हणून जिल्ह्यात विविध कामे उभी राहत आहेत.  ५०० कोटी रुपये वैद्यकीय महाविद्यालयासाठी आणि २५० कोटी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी मुख्यमंत्री यांनी तत्काळ मंजूर केल्याने शैक्षणिक हब हे पूर्ण झाले आहे.  आयआयटीच्या धर्तीवर देखणी इमारत उभी राहिली आहे.  पुढील वर्षापासून शासकीय विधी महाविद्यालय देखील सुरु होणार आहे.  मुख्यमंत्री छात्र प्रशिक्षण योजनेतंर्गत जिल्ह्यात ३१९ मुलांना रोजगार प्राप्त झाला याचा विशेष आनंद आहे.           

            दावोस येथे झालेल्या परिषदेत पहिल्या वर्षी १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणकीचे करार झाले तर दुसऱ्या वर्षी ३ लाख ५० कोटी रुपयांचे करार झाले.  त्यातून ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आपल्या राज्यात झाली आहे.  उद्योगासाठी पोषक वातावरण आणि आवश्यक त्या सोयी-सवलती एक खिडकी योजनेत उपलब्ध करुन दिल जात असल्याने राज्यात उद्योग मोठ्या प्रमाणावर येत आहेत.  त्यासाठी लागणारे रोजगार कौशल्य देखील येथील तरुण घेत आहेत.  संरक्षण साहित्य निर्मिती करणारा १० हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा प्रकल्प  रत्नागिरी जिल्ह्यात उभा राहतो आहे.   काही महिन्यांपूर्वी कोकाकोला कंपनीच्या प्लांटचे भूमिपूजन झाले. औद्योगिकरणाला अधिक गती देण्यासाठी चांगले वातावरण निर्माण केले आहेआमदार श्री. निकम यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

          कार्यक्रमात विकास पेजे आणि सहकारी यांनी मुख्यमंत्री यांचा विशेष सत्कार केला.  कुणबी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री यांचा विशेष प्रातिनिधीक सत्कार संजय झिमण यांच्या हस्ते करण्यात आला.         

          मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते निर्माण ग्रुपच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.  तंत्रशिक्षण सहसंचालक प्रमोद नाईक यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. सुनिल पाटील यांनी आभार मानले.  या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थीयुवक उपस्थित होते. 


राज्यपालांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिन संपन्न स्वदेशीचा पुरस्कार केल्यामुळे विकास शाश्वत होईल

 राज्यपालांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिन संपन्न

स्वदेशीचा पुरस्कार केल्यामुळे विकास शाश्वत होईल

- राज्यपाल सी पी राधाकृष्णन

            मुंबईदि. २१ : गेल्या दहा वर्षात भारत जगातील पाचव्या क्रमांकाची महासत्ता झाला असून २०३० पर्यंत तिसरी मोठी महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी स्वदेशीचा स्वीकार केला जात असून स्वदेशीचा पुरस्कार केल्यामुळे विकास शाश्वत व सर्वसमावेशक होईलअसे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.  

            आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. २१) मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे 'उद्योजकता प्रोत्साहनसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी ते बोलत होते.

            संमेलनाचे आयोजन आंतरराष्ट्रीय वैश्य महासंमेलनमुंबई व स्वदेशी जागरण मंचकोकण यांच्या वतीने करण्यात आले.

            स्वदेशी संकल्पनेचा पुरस्कार लोकमान्य टिळकमहात्मा गांधी या नेत्यांनी केल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशीला चळवळीचे रूप आले. आज उत्पादन व सेवा क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. उत्पादनासह देश तंत्रज्ञानात देखील आत्मनिर्भर होत आहे. मात्रस्पर्धेत टिकून राहण्यासाठी अत्युच्च गुणवत्ता व स्पर्धात्मक मूल्य ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

एकेकाळी अन्नधान्य आयात करणारा भारत आज अनेक क्षेत्रात निर्यातदार झाला आहे असे सांगून सर्वांनी सशक्त भारत निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपालांनी केले.     

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते युवा उद्योजक डॉ. दिव्या राठोड व निकुंज मालपाणी यांचा सत्कार करण्यात आला.

            राज्यपालांच्या हस्ते '३७ कोटी स्टार्ट अप्सचा देशआणि 'मंदिर अर्थशास्त्रया दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

            कार्यक्रमाला स्वदेशी जागरण मंचचे अखिल भारतीय सह-संयोजक अजय पत्कीरा.स्व. संघाचे मुंबई विभाग संघचालक रवींद्र संघवीआंतरराष्ट्रीय वैश फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप माहेश्वरी आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते.

0000

Swadeshi will make economic development sustainable

- C P Radhakrishnan

 

            Mumbai dated 21 : Maharashtra Governor C P Radhakrishnan today said that India is aspiring to become a developed nation by 2047. Stating that the Government is providing strong impetus to Make in India, he said Swadeshi will make economic development of the nation sustainable.

 

            The Governor was speaking at the 'Entrepreneurship Promotion Programme' on the occasion of World Entrepreneur Day at World Trade Centre in Mumbai on Wed (21 Aug).

 

            The programme was jointly organised by the International Vaish Federation and Swadeshi Jagran Manch, Mumbai.

 

            The Governor felicitated young entrepreneurs Dr Divya Rathod  and Nikunj Malpani on the occasion.

 

            The Governor also released two books '37 Crore Start Ups Ka Desh' and 'Temple Economics' on the occasion.

 

            Ajay Patki, All India Co-Convenor of Swadeshi Jagran Manch (SJM), Konkan, Ravindra Sanghvi, Vibhag Sanghachalak (RSS) Mumbai, Dilip Maheshwari, President, International Vaish Federation and Vijay Kalantri, President, World Trade Centre Mumbai were present.

0000

.

इंडिया greatest love story' Tata cancer hospital

 


Must see for above 50 yrs of age

 Must see for above 50 yrs of age


मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी युवकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा :

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी

युवकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा :

- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

          मुंबई,दि.२१: सर्वाधिक रोजगार देणारे शहर मुंबई असून योग्य प्रशिक्षित मनुष्यबळ  उपलब्ध झाल्यास जास्तीत-जास्त रोजगार निर्माण होतील. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र महाविद्यालयात सुरू करण्यासाठी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व  महाविद्यालयांनी मागणी नोंदवावी. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी जास्तीत-जास्त रोजगाराची मागणी नोंदवावी,  असे आवाहन कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

       आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलबजावणी संदर्भात मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील ग्रीन टेक्नॉलॉजी सभागृहात आयोजित बैठकीच्या उद्घाटन  प्रसंगी कौशल्य विकास मंत्री  लोढा बोलत होते.  मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, मुंबई उपनगरचे जिल्हा कौशल्य विकास अधिकारी रवींद्र सुरवसे, मुंबई शहरचे जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संदीप गायकवाड यावेळी उपस्थित होते.

         मंत्री श्री. लोढा म्हणाले की, शिक्षणासोबत योग्य कौशल्य प्रशिक्षण दिल्यास अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. उद्योग जगताला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शासन, उद्योजक व अशासकीय सर्व संस्था यांच्या मदतीने आपण कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.  

शासनाने रोजगार निर्मितीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य वाढीस लागावे यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकासकेंद्र देखील सुरू केलेले आहेत. राज्यात एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असून यामध्ये प्रत्येक महाविद्यालयात  एक कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या केंद्रांसाठी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मधून शंभर टक्के केंद्रांची मागणी नोंदवावी. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी जास्तीत-जास्त रोजगाराची मागणी नोंदवावी. उद्योजकांनी तसेच खाजगी आस्थापनांनी आपली रोजगाराची मागणी नोंदवावी असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

          जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर म्हणाले की, भारत हा सर्वाधिक युवांची संख्या अधिक असलेला देश आहे.भारताची लोकसंख्या हेच सध्या बलस्थान आहे. प्रत्येक युवक युवतीला काळानुरूप कौशल्य विकास करून जास्तीत-जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होतील, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. प्रत्येक महाविद्यालयाने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करून पदवी सोबतच काळानुरूप कौशल्य युवांना शिकवावेत. कौशल्य विकास विभागाच्या दोन्ही योजना पूरक असून या दोन्ही योजनेमध्ये प्रत्येक महाविद्यालयाने तसेच उद्योजकांनी, विविध आस्थापनांनी आपली मागणी नोंदवावी असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.

       महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे यांनी प्रास्ताविक केले.  महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी कौशल्य अभियान अधिकारी विनय काटोलकर यांनी सूत्रसंचालन केले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

रास्त भाव दुकानदारांना कमिशन मोबदला वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

 रास्त भाव दुकानदारांना कमिशन मोबदला वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

- अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

 

            मुंबईदि. 21 : राज्यात 2017 नंतर रास्त भाव दुकानदारांचा मोबदला वाढवला नाही. वाढती महागाई आणि वाढता खर्च याचा विचार करता या दुकानदारांचा मोबदला वाढवून देण्यास सरकार सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठपुरावा करून मंजूर करून घ्यावाअशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

             मंत्रालयातील परिषद सभागृहात या विषयावर मंत्री श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतखाली बैठक झाली. या बैठकीस वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारअन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्यासह रास्त भाव दुकानदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

              रास्त भाव दुकानदारांना फक्त कमिशनवर अवलंबून राहून दुकान चालवणे कठीण होत आहे हे लक्षात घेता काही दिवसांपूर्वी रास्त भाव दुकानात स्टेशनरी आणि भाजीपाला विकण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील ५६ हजार रास्त भाव दुकानदारांना यांचा फायदा होईल.

            तसेच सध्या केंद्रीय एन.आय.सी. संस्थेच्या सर्व्हर डाउन असल्यामुळे ई पॉस मशीनद्वारे अन्न धान्य वितरणामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑफलाईन वितरण करण्यास परवानगी दिली आहे. जोपर्यंत अडचण दूर होत नाही तोपर्यंत ऑफलाईन वितरण सुरू राहील. तसेच ई-पॉस मशीनची समस्या तातडीने दूर करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीरास्त भाव दुकानदारांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा यासाठी शासकीय जाहिराती या दुकानात लावाव्यात आणि त्याचे कमिशन द्यावे अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करून तो मंत्रिमंडळ बैठकीत ठेवावा. यामुळे राज्यात सध्या असलेली ५६ हजार रास्त भाव दुकानदारांना त्याचा फायदा होईल. तसेच किमान महिन्याला १ कोटी ६० लाख पेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहचता येणार आहे.

Featured post

Lakshvedhi