Wednesday, 21 August 2024

राज्यपालांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिन संपन्न स्वदेशीचा पुरस्कार केल्यामुळे विकास शाश्वत होईल

 राज्यपालांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिन संपन्न

स्वदेशीचा पुरस्कार केल्यामुळे विकास शाश्वत होईल

- राज्यपाल सी पी राधाकृष्णन

            मुंबईदि. २१ : गेल्या दहा वर्षात भारत जगातील पाचव्या क्रमांकाची महासत्ता झाला असून २०३० पर्यंत तिसरी मोठी महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी स्वदेशीचा स्वीकार केला जात असून स्वदेशीचा पुरस्कार केल्यामुळे विकास शाश्वत व सर्वसमावेशक होईलअसे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.  

            आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. २१) मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे 'उद्योजकता प्रोत्साहनसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी ते बोलत होते.

            संमेलनाचे आयोजन आंतरराष्ट्रीय वैश्य महासंमेलनमुंबई व स्वदेशी जागरण मंचकोकण यांच्या वतीने करण्यात आले.

            स्वदेशी संकल्पनेचा पुरस्कार लोकमान्य टिळकमहात्मा गांधी या नेत्यांनी केल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशीला चळवळीचे रूप आले. आज उत्पादन व सेवा क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. उत्पादनासह देश तंत्रज्ञानात देखील आत्मनिर्भर होत आहे. मात्रस्पर्धेत टिकून राहण्यासाठी अत्युच्च गुणवत्ता व स्पर्धात्मक मूल्य ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

एकेकाळी अन्नधान्य आयात करणारा भारत आज अनेक क्षेत्रात निर्यातदार झाला आहे असे सांगून सर्वांनी सशक्त भारत निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपालांनी केले.     

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते युवा उद्योजक डॉ. दिव्या राठोड व निकुंज मालपाणी यांचा सत्कार करण्यात आला.

            राज्यपालांच्या हस्ते '३७ कोटी स्टार्ट अप्सचा देशआणि 'मंदिर अर्थशास्त्रया दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

            कार्यक्रमाला स्वदेशी जागरण मंचचे अखिल भारतीय सह-संयोजक अजय पत्कीरा.स्व. संघाचे मुंबई विभाग संघचालक रवींद्र संघवीआंतरराष्ट्रीय वैश फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप माहेश्वरी आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते.

0000

Swadeshi will make economic development sustainable

- C P Radhakrishnan

 

            Mumbai dated 21 : Maharashtra Governor C P Radhakrishnan today said that India is aspiring to become a developed nation by 2047. Stating that the Government is providing strong impetus to Make in India, he said Swadeshi will make economic development of the nation sustainable.

 

            The Governor was speaking at the 'Entrepreneurship Promotion Programme' on the occasion of World Entrepreneur Day at World Trade Centre in Mumbai on Wed (21 Aug).

 

            The programme was jointly organised by the International Vaish Federation and Swadeshi Jagran Manch, Mumbai.

 

            The Governor felicitated young entrepreneurs Dr Divya Rathod  and Nikunj Malpani on the occasion.

 

            The Governor also released two books '37 Crore Start Ups Ka Desh' and 'Temple Economics' on the occasion.

 

            Ajay Patki, All India Co-Convenor of Swadeshi Jagran Manch (SJM), Konkan, Ravindra Sanghvi, Vibhag Sanghachalak (RSS) Mumbai, Dilip Maheshwari, President, International Vaish Federation and Vijay Kalantri, President, World Trade Centre Mumbai were present.

0000

.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi