Thursday, 25 July 2024

मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक महामार्ग सुरक्षित होण्यासाठी समन्वयाने काम करावे

 जनसंपर्क अधिकारी (मुख्यमंत्री सचिवालय)

मुंबई-गोवामुंबई-नाशिक महामार्ग

सुरक्षित होण्यासाठी समन्वयाने काम करावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महामार्गांच्या कामाची पाहणी करण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्री भेट देणार

 

          मुंबई दि. 25 : मुंबई- गोवा महामार्ग आणि मुंबई- नाशिक महामार्गावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळून नागरिकांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करावे. तसेच दोन्ही महामार्गावरील बायपाससर्व्हिस रोड यांचे मजबुतीकरण करुन गणेशोत्सवापूर्वी मुंबई- गोवा महामार्ग आणि मुंबई- नाशिक महामार्ग खड्डेमुक्त करावाअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 10 ऑगस्टनंतर दोन्ही महामार्गाच्या कामांची पाहणी करण्यासाठी भेट देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

          मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई- नाशिक महामार्गाच्या सद्य:स्थितीबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

          या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरबंदरेक्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडेआमदार किशोर दराडेभरत गोगावलेमाजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंतमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आय.एस.चहलसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता श्री. श्रीवास्तव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

          यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीगणेशोत्सवादरम्यान मुंबई- गोवा महामार्गावरुन लाखो चाकरमानी कोकणात जातात. या काळात त्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होणे आवश्यक आहे. यासाठी गणेशोत्सवापूर्वी या मार्गावरील जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी. मुंबई- गोवा महामार्गावरील शक्य तेवढ्या मार्गाचे रुंदीकरण करुन वाहतूक गतिमान होईलयाकडे लक्ष द्यावे. महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी रिफ्लेक्टर लावावेतदरडप्रवण असणाऱ्या परशुराम घाटात मुंबई- पुणे एक्सप्रेसच्या धर्तीवर सुरक्षा जाळ्या लावाव्यात. ज्या भागातील रस्त्याचे काम पूर्ण झाले असेल तेथील बांधकाम साहित्य हटवून रस्ता मोकळा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

          तसेच गणेशोत्सवादरम्यान माणगांवइंदापूर या शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी. गणेशभक्तांच्या सोईसाठी महामार्गावर दर 10 किमी अंतरावर वैद्यकीय मदत कक्ष आणि वाहन दुरुस्तीची व्यवस्था करावीअशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

          या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबई-नाशिक महामार्गाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की, या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खड्डे बुजवण्याबरोबर भिवंडी परिसरातील रस्त्यावर उभे असणाऱ्या अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्था करावी. मुंबई ते नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे ओळखून त्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण आणि कालबद्ध पद्धतीने करावेयासाठी महामार्ग प्राधिकरणाने ठाणे जिल्ह्यात वरीष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करावीअसेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

          यावेळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत देखील संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

0000


राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातर्फे मुंबईत 26 जुलै रोजी सुनावणी

 राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातर्फे

 मुंबईत 26 जुलै रोजी सुनावणी

 

             मुंबई‍‍दि. 25 : राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने उद्या शुक्रवारदि. 26 जुलै 2024 रोजी सहयाद्री अतिथीगृहमलबार हिलमुंबई येथे सकाळी 10 वाजता सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. आयोगाकडे निवेदने सादर केलेल्या संघटनांच्या पाच ते सहा सदस्यांनी कागदपत्रे व पुराव्यांसह सुनावणीस उपस्थित रहावेअसेमहाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सदस्य सचिव यांनी कळविले आहे.

             राज्यातील लोधलोधालोधीबडगुजरवीरशैव लिंगायतसलमानीसैनकिराड,भोयर पवारसूर्यवंशी गुजरबेलदारझाडेझाडे कुणबी,डांगरी,कलवारनिषाद मल्लाकुलवंतवाणीकराडीशेगरनेवेवाणीकानोडीकानडी या जाती समूहाचा राष्ट्रीय मागासवर्ग यादीत समावेश करण्याबाबत आयोगाकडे निवेदने प्राप्त झाली आहेत. त्या अनुषंगाने या सुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी या msbccpune@gmail.com ई मेल वर आणि  020 - 26053056 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेबरोबर सामंजस्य करार

 महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पासाठी

 केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेबरोबर सामंजस्य करार

 

            मुंबई दि. 25 : आशियाई विकास बॅंक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थानागपूर यांची सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून निवड करण्यात आलेली आहे. याबाबतचा सामंजस्य करार  23 जुलै 2024 रोजी नागपूर येथे करण्यात आला आहे.

       मॅग्नेट प्रकल्पाच्यावतीने प्रकल्प संचालक विनायक कोकरे आणि केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थानागपूच्यावतीने संचालक डॉ. दिलीप घोष यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मॅग्नेट प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादवनागपूर प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे विभागीय उपप्रकल्प संचालक  अजय कडू आणि केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थानागपूरचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. 

            मॅग्नेट प्रकल्पात घटक-अंतर्गत विविध शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम व विस्तार विषयक कर्यक्रम राबविण्यात येतात. यामध्ये प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (Training of Trainers), शेतकरी उत्पादक संस्थांची संस्थात्मक बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम (BoD), उत्तम कृषी पद्धती (GAP), काढणीपश्चात  व्यवस्थापन(PHM) इ. प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश आहे. या सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी पायाभुत सुविधा उपलब्ध असतील, अशा संस्थाची Centre of Excellence (CoE) म्हणून निवड करण्यात येते. मॅग्नेट संस्थेचे अध्यक्ष तथा अपर मुख्य सचिव (सहकार व पणन)महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्यतेने मॅग्नेट प्रकल्पामध्ये Centre of Excellence (CoE) म्हणून IIM, नागपूरराष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्रसोलापूरमहात्मा फुले कृषी विद्यापीठराहुरीराष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थातळेगाव दाभाडे व राज्यातील प्रमुख कृषी विज्ञान केंद्रेयांसारख्या संस्थांची निवड करण्यात आली आहे. 

            केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थानागपूर ही लिंबूवर्गीय फळ पिकांसाठी कामकाज करणारी देशपातळीवरील एक महत्वाची संस्था आहे. या संस्थेमध्ये लिंबूवर्गीय फळांच्या नवीन वाणांचा विकासगुणवत्तापूर्ण उत्पादनविविध उत्पादन तंत्रज्ञान विकसित करणेविस्तार विषयक कार्यकाढणी पश्चात व्यवस्थापनमूल्यवर्धन इ. बाबत विविध उपक्रम राबविण्यात येतात. केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थानागपूर यांची सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून निवड झाल्यामुळे मॅग्नेट प्रकल्पामध्ये समाविष्ट असलेल्या संत्रामोसंबी आणि लिंबू या पिकांमध्ये कामकाज करणा-या शेतक-यांना व शेतकरी उत्पादक संस्थांना याचा विशेष लाभ होणार आहे. मॅग्नेट संस्थेचे अध्यक्ष तथा अपर मुख्य सचिव (सहकार व पणन)अनूप कुमार यांच्या विशेष प्रयत्नामुळे हा करार झाल्याचे प्रकल्प संचालक  श्री.कोकरे यांनी सांगितले. 

            केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थानागपूरचे संचालक डॉ. घोष यांनी आम्ही मॅग्नेट प्रकल्पासोबत कामकाज करण्यास उत्सुक असून भविष्यात मॅग्नेट संस्थेच्या सहकार्याने लिंबूवर्गीय शेतक-यांसाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे नमूद केले. 

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाअंतर्गत योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाअंतर्गत

योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

             मुंबई‍‍दि. 25 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचे शैक्षणिकआर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी सन 2024-25 या वर्षासाठी विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबविल्या जाणार आहेत. या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे मुंबई उपनगरचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र दगडखैर यांनी केले आहे.

             केंद्र व राज्य शासनाच्या महामंडळामार्फत 50 टक्के अनुदान योजना,बीज भांडवल योजना,मुदती कर्ज योजना,लघुऋण वित्त योजना,महिला समृध्दी योजना,महिला अधिकारीता योजना,शैक्षणिक कर्ज योजना,सुविधा ऋण,उत्कर्ष ऋण या योजना राबविल्या जाणार आहेत.

            या कर्ज योजनेसाठी अर्ज करताना अर्जदारांनी पुढील कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत. 1)जातीचा दाखलाउत्पन्नाचा दाखलारहिवासी दाखलारेशनकार्डआधार कार्डमतदान कार्ड२) शैक्षणिक दाखलातीन फोटो कॉपीजपॅन कार्डलाभार्थ्या उद्योग आधार प्रमाणपत्र३) ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या (जागेचा पुरावा जागेचे वीजबिलकर/भाडे पावती/भाडे करारनामा/जागा वापर संमती पत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा इ.)

            ४) कागदपत्र खरी असल्याबाबत लाभार्थ्यांचा विनंती अर्ज व ज्या जागी व्यवसाय चालू आहे त्याच जागेचे प्रमाणित केलेल छायाचित्र.५) ग्रामपंचायतनगरपालिका अथवा महानगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र.६) व्यवसायासबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला.७) आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवालसी ए च्या सही व शिक्यासह.८) खरेदी करावयाच्या मालमत्तेच्या साहित्याचे जी.एस.टी. क्रमांक असलेले दरपत्रक (कोटेशन)९) अर्जदाराचे वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र (रु.१००/- च्या स्टॅम्प पेपरवर) १०) अर्जदाराचे तसेच जामिनदारांचे विहीत नमुन्यातील शपथपत्र (रु.१००/- च्या स्टॅम्प पेपरवर)११) लाभार्थाचा आधारकार्ड क्रमांक तसेच आधार संलग्न (Link) बँक खाते क्रंमाक.

१२) दोन सक्षम जामिनदार (नोकरदार किंवा मालमत्ताधारक/शेतकरी)

१३) सक्षम दोन जामिनदार अ २ शासकीय जामिनदारांच्या कार्यालयाचे हमीपत्र अथवा ब २ शेतकरी / मालमत्ताधारक यांचे सात बारा/नमुना क्र. आठच्या उता-यावर सक्षम अधिका-याची सही व  शिक्क्यानुसारची उतारे सोबत सहायक दुय्यम निबंधक अथवा गर्व्हमेंट व्हल्यूवर यांचे सबंधिक मालमत्तेचे मूल्यांकन पत्र अथवा प्रमाणपत्र आवश्यक.१४) बॅकेचा सीबिल रिपोर्ट.

             या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार समाजातील (चांभारढोरहोलारमोची) असावा. तसेच अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभ घेऊ इच्छिणा-या अर्जदाराने आवश्यकतेनुसार कागदपत्रांची  पूर्तता करुन या योजनेचे तीन प्रतीत कार्यालयीन वेळेत जिल्हा कार्यालयमुंबई उपनगर गव्हर्नमेंट लेदर वर्किग स्कूल कंपाऊडखेरवाडीवांद्र (पूर्व) मुंबई- 400051 येथे स्वतः अर्जदाराने मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून कर्ज प्रस्ताव दाखल करावेअसे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

अतिवृष्टीमुळे सद्यस्थितीत डोंगर-दऱ्यांमध्ये पर्यटनाला घराबाहेर पडू नका, स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या..

 अतिवृष्टीमुळे सद्यस्थितीत डोंगर-दऱ्यांमध्ये पर्यटनाला

घराबाहेर पडू नकास्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या..

-उपमुख्यमंत्री अजित पवार

          मुंबईदि.25 : राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होत असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. नदीनालेओढे. धरणपूरस्थिती असलेल्या सखल भागात जाणे टाळावे. डोंगरटेकड्यादऱ्याधबधब्यांसारख्या ठिकाणी पुराचे पाणी अचानक वाढणेनिसरड्या वाटेवर पाय घसरुन अपघात होण्यासारख्या दुर्घटना टाळण्यासाठी सद्यंस्थितीत पर्यटनासाठी बाहेर पडू नये. दरडप्रवणपूरग्रस्तसखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा. प्रशासनाच्या संपर्कात रहावे आणि त्यांच्याकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनाआवाहनांचे पालन करावे. स्वत:सह कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावीअसे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले आहे. 

००००


 

सूचना

 Please send to all your family and friends.🙏🙏🙏


मुसळधार पावसात अवैध हातभट्टी केंद्रावर कार्यवाही; २०.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

 मुसळधार पावसात अवैध हातभट्टी केंद्रावर कार्यवाही;

२०.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

            मुंबईदि. २५:  हातभट्टी व्यावसायिकांनी पावसाचा फायदा घेत ठाणे जिल्ह्यातील देसाई गावशांतीनगरसरलाबेगोरपे गावकुंभार्ली गांवभिवंडी तसेच ईतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातभट्टी सुरू केल्या होत्या. मुसळधार पावसात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाच्या जवानांनी खाडीमधील हातभट्टी केंद्रांवर धाड़ी टाकून कार्यवाही केली.

           

            या कारवाईमध्ये एकूण २२ गुन्हे नोंद करण्यात आले असून  बेवारस  १३ गुन्हे नोदविले आहेत. या  कारवाईमध्ये एकूण १४२ लिटर हातभट्टी दारू व ५३००० लिटर रसायन व इतर साहित्य असा एकूण २० लाख ४५ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.

           

             राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली  हातभट्टी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी धाडसत्र मोहीम राबविण्यात येत आहे. या  धाडसत्र मोहिमेच्या अनुषंगाने विभागीय उप-आयुक्त प्रदीप पवार यांनी कोकण विभागभरारी पथक ठाणेडोंबिवली,  अंबरनाथभिवंडी निरीक्षक यांच्या समन्वयाने ही कारवाई केली.  या कारवाईमध्ये हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर धाड टाकून अंदाज़े २०० ड्रम्स रसायन उद्ध्वस्त करण्यात आले. या मोहिमेमध्ये बोटींमधून जाऊन  खाडीतील हातभट्टी निर्मिती ठिकाणे नष्ट केली.

     हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणे चालवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कलम ३२८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येत आहे. तसेच एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहेअसे उप आयुक्त श्री. पवार यांनी कळविले आहे.

Featured post

Lakshvedhi