Wednesday, 10 July 2024

पुणे रिंग रोड व विरार - अलिबाग मार्गिकेसाठी भूसंपादनासह निविदा प्रक्रिया राबविण्यास विशेष प्रकल्प म्हणून परवानगी

 पुणे रिंग रोड व विरार - अलिबाग 

मार्गिकेसाठी भूसंपादनासह

 निविदा प्रक्रिया राबविण्यास 

विशेष प्रकल्प म्हणून परवानगी

- मंत्री दादाजी भुसे

मुंबईदि. १० : पुणे रिंग रोड व विरार - अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसाठी भूसंपादन करण्यात येत आहे. हे दोन्ही प्रकल्प राज्याच्या पायाभूत सोयीसुविधांमध्ये भर घालणारे आहेत. या प्रकल्पांच्या भूसंपादन सोबतच निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी विशेष प्रकल्प म्हणून परवानगी घेण्यात आली आहेअसे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका ९८.५०० किलोमीटर लांबीची असून यासाठी ११३० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे ही मार्गिका पालघरठाणेरायगड या तीन जिल्ह्यांतील सात तालुक्यांमधून जाते. तसेच वसईभिवंडीकल्याणउरणपनवेल व तळोजा औद्योगिक क्षेत्रातील प्रकल्पांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देणारी आहे.  या दोन्ही प्रकल्पांसाठी ९० टक्के भूसंपादन झाल्याशिवाय कार्यादेश देण्यात येणार नाहीतअसेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

मंत्री श्री. भुसे म्हणाले की, दि.२९ ऑगस्ट २०१६ रोजीच्या परिपत्रकातील सूचनेनुसार प्रकल्पासाठी आवश्यक जमीन १०० टक्के क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात नसताना निविदा प्रक्रिया करण्यासाठी शासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असल्यानेमहामंडळाकडील २५ सप्टेंबर २०२३ रोजीच्या पत्रान्वये पूर्व परवानगी मागण्यात आलेली होती. त्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास निविदा मागविण्यासाठी विशेष बाब परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या निविदा उघडण्यात आल्या असून त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही सुरू आहे. विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आणि पुणे रिंग रोड कामाचे 70 टक्के भूसंपादन झाल्याशिवाय कंत्राटदारास स्वीकृती पत्र तसेच 90 टक्के भूसंपादन झाल्याशिवाय संबंधित कंत्राटारास कार्यारंभ आदेश देण्यात येणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले

सातपूर व अंबड वसाहतीमधील भूखंड विभाजनाची उच्चस्तरीय चौकशी

 सातपूर व अंबड वसाहतीमधील 

भूखंड विभाजनाची उच्चस्तरीय चौकशी

- उद्योग मंत्री उदय सामंत

            मुंबईदि. 10 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नाशिक शहर परिसरात सातपूर व अंबड औद्योगिक क्षेत्र आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये 10 ते 15 वर्षे भूखंड उपयोगाविना पडून असल्यास ते भूखंड परत घेण्याचा शासनाचा नियम आहे. सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीमधील भूखंडांचे विभाजन (सबडिव्हिजन) करण्यात आल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

                याबाबत सदस्य सीमा हिरेसुहास कांदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत विरोधी पक्ष नेता विजय वड्डेटीवार यांनी भाग घेतला.

            मंत्री श्री. सामंत म्हणाले कीसातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये भूखंडाचे विभाजन करणाऱ्या विकासकांची व संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात येईल. महामंडळामध्ये क्षेत्रीय अधिकारी महसूल विभागाकडून येतात. संबंधित अधिकारी महसूल विभागाचे असल्यामुळे या विभागाला चौकशी करण्याचे कळविण्यात येईल. चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

दिव्यांग उपक्रमांच्या अनुदानबाबतचे धोरण मंजूर

 दिव्यांग उपक्रमांच्या अनुदानबाबतचे धोरण मंजूर

- मंत्री गुलाबराव पाटील

            मुंबईदि. 10 : मा. उच्च न्यायालयाच्या आदेशास अनुसरून राज्यातील कायमस्वरूपी विनाअनुदानितविनाअनुदानित दिव्यांगांच्या विशेष शाळासंलग्न वसतिगृहेकार्यशाळा व अनाथ, मतिमंदांची बालगृहे यांना अनुदान मंजुरीबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी प्राप्त झाली आहेअशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.

            याबाबत सदस्य ॲड. आशिष जयस्वाल यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य बच्चू कडू यांनी भाग घेतला.

                मंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्यात स्वयंसेवी संस्थांमार्फत दिव्यांगांचे विविध उपक्रम चालविले जातात. सद्य:स्थितीत राज्यात 932 अनुदानित उपक्रम सुरू असून त्यामध्ये 46 हजार 466 विद्यार्थी लाभ घेत आहेत. विविध शासन निर्णयांनुसार या उपक्रमांमध्ये 2464 पदे मंजूर करण्यात आली आहेत. मागील काळात शासनाने विशेष बाब म्हणून 17 दिव्यांगांच्या शाळांना पदमान्यता देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मात्र 17 पैकी 4 शाळांना पदमान्यता देण्यात आली. उर्वरित 13 शाळांना पदमान्यता देण्यात आली नाही. याबाबत चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल. या शाळांमध्ये 10 दिवसांच्या आत पदमान्यता मंजुरी देण्याची कार्यवाही करण्यात येईल.

                दिव्यांगांच्या विविध उपक्रमांबाबत अनुदानाबाबत शासनाने धोरण ठरविले आहे. दिव्यांगासंबंधित काही उपक्रमांना धोरण लागू पडत नसल्यास अशा उपक्रमांबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात येईलअसेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.


बुड्डीलेन सोशल ग्रुप द्वारा रक्तदान का सफल आयोजन

 बुड्डीलेन सोशल ग्रुप द्वारा रक्तदान का सफल आयोजन


  बुड्डीलेन सोशल ग्रुप ने इनाम हॉल जामा मस्जिद में एक सफल मेगा रक्तदान शिविर का आयोजन किया, जिसमें 605 युवाओं ने अपना रक्तदान करके मानवता की बेहतरीन मिसाल कायम की और हर तीन महीने में रक्तदान करने का संकल्प लिया। 13 साल बाद बुड्डीलेन सोशल ग्रुप ने सफल रक्तदान शिविर का आयोजन किया. युवाओं की सक्रिय भागीदारी से इस शिविर को सफल बनाया गया। शिविर सुबह 10 बजे से रात 8 बजे तक चला। इस शिविर में शहर के युवाओं ने धर्म और जाती से ऊपर उठकर अपना बहुमूल्य रक्तदान किया. इस संबंध में आयोजकों ने कहा कि घाटी एवं कैंसर अस्पताल में इलाज के लिए पूरे मराठवाडा से आने वाले गरीब मरीजों को देखते हुए युवा समूह ने रक्त दान शिविर लगाने का निर्णय लिया है। यह पहली बार है कि रक्त दान शिविर लगाया गया है जामा मस्जिद में आयोजित शांति और भाईचारे को बढ़ावा देने के लिए एक छोटा सा प्रयास किया गया है। मानव सेवा समय की सबसे बड़ी जरूरत है और हर इंसान को अपनी हैसियत के अनुसार सेवा करनी चाहिए और अपने खून से दूसरों की जान बचाना एक महत्वपूर्ण सेवा है। और सच्ची मानवता। लोगों को चाहिये के मानव सेवा मे बढ़ चढ़कर भाग लेना चाहिए. बुड्डीलेन सोशल ग्रुप उन युवाओं के उत्साह को सलाम करता है जिन्होंने इस शिविर को सफल बनाने के लिए महत्वपूर्ण योगदान किया हैं । लोगो ने अपने अपने मोहल्ले मे इस तरह के रक्तदान शिवीर का आयोजन  करना चाहिए ताकि शहर में खून कही भी कमी महसूस न हूँ । शिविर में शहर प्रसिद्ध हस्तियों ने भाग लिया और अपना रक्तदान किया । ब्लड बँक के अधिकारियो का कहना हैं इस शिविर के आयोजन से शहर मे कम से कम दो महीने ब्लड की कमी महसूस नहीं होंगी अस्पताल और मरीज़ों को दो महीने ब्लड की परेशनी नहीं होंगी और बुड्डीलेन सोशल ग्रुप को बधाई दी और युवाओं को प्रार्थनाओं के साथ आशीर्वाद दिया। इस शिविर में लगभग 39 महिलाओं ने भी अपना रक्तदान किया और कुल 605 रक्त बैग एकत्र किए गए। इस शिविर में पुलिस आयुक्त प्रवीण पवार साहेब, डीसीपी नितिन भगाटे साहेब, शासकीय निम् शासकीय अधिकारी, डॉक्टर्स, अलग अलग राजनीतिक दल के अधिकारी पदाधिकारी समाज सेवको ने भाग लिया और युवाओं को 

*'मासिक पाळी'चे पुरुष बळी.

 *'मासिक पाळी'चे पुरुष बळी..*


*लेख -*

 ✒️ 

*सुरेंद्र नेमळेकर.*

शीर्षक वाचून तुम्ही हादरला असाल, पण हे सत्य आहे. संपूर्ण भारतात दरवर्षाला 5000 सफाई कामगार जे हंगामी काम करणारे कामगार असतात, एकाद्या कंत्राटदाराचकडे पाचशे रुपये हजेरी वरती दिवसभर काम करणारे कामगार आणि कुठल्यातरी झोपडपट्टीत राहणारे असतात. अशा कामगारांना हाताशी धरून हाउसिंग सोसायटीमध्ये एखाद्या गटाराचा चेंबर किंवा नाल्याचा चेंबर  चॉक झाला असेल, तर तो ते साफ करण्याचे काम असे कामगार करत असतात. एखादा दारू चा पेग पोटात घालून हे अश्या मेन हॉल मध्ये खाली उतरतात. कधी कधी अशा चेंबरमध्ये मिथेन गॅस तयार झालेला असतो तेथे गुदमरून अशा कामगारांचा मृत्यू होतो. पनवेल मध्ये तर एका वेळेला तीन कामगार6 अशाच उतरले आणि बराच वेळ आले नाही म्हणून त्यांचा कंत्राटदार जो स्वतः इंजिनीयर होता तो सिडकोचा कंत्राटदार मस्कर भाऊ म्हणून फेमस होता. तो सुद्धा आत मध्ये गुदमरून मेला. नाका कामगारांना ड्रेनेज चोकअप होण्याची कारणे विचारली असता त्यांची उत्तरं ठरलेली असतात. मासिक पाळीच्या वेळी महिला ज्या सॅनेटरी पॅड वापरतात ते बहुतेक वेळा संडासा मध्ये टाकून फ्लश चालू करतात. फ्लश मुळे साधारण कोरडे असलेले सॅनेटरी नॅपकिन पेड पाईप मधून खाली उतरते. जोपर्यंत त्यामध्ये असलेला कापूस मोठ्या आकाराचा होत नाही तोपर्यंत तो पुढे पुढे प्रवास करत जात असतो. मात्र त्याचा प्रवास सुरू असताना वाटेमध्ये चेंबरच्या पाईप मध्ये त्याचा आकार पाणी झिरपून मोठा होतो, व तो काढण्यासाठी चेंबर मध्ये मेन हॉल मध्ये कंत्राटी कामगार उतरतात. कधी कधी तर चेंबर आठ फूट उंच असतो व तोंडो तोंड शिगोशीग भरलेला असतो. अशा वेळेला कामगार खाली उतरून नाक दाबून चेंबर साफ करणाऱ्यांचे फोटो व्हायरल झालेले आहेत. मघाशी सांगितल्याप्रमाणे कधीकधी त्या कापसा भोवती येऊन इतर प्लास्टिकचे तुकडे कंडोम गुटख्याची पाकिटे जमा होऊन चेंबर जाम झालेले असतात. हे प्रमाण 99 टक्के असते. एक टक्का उंदीर किंवा घुशी ने माती काढल्यामुळे चेंबर जाम होतात. आपणास कल्पना नसेल दरवर्षी भारतात किमान साडेचार ते पाच हजार कामगार चेंबर साफ करताना मेन हॉल मध्ये गुदमरून मेले आहेत. आणखी एक उदाहरण देतो भारतात सर्वात स्वच्छ पेट्रोल पंप म्हणून ओळखला जाणारा पेट्रोल पंप संगमेश्वर धामणी येथे असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला तो आहे. इतका स्वच्छ पेट्रोल पंप पाहून बरेच लोक आपली गाडी त्या पंपावरची घेऊन जातात त्या पंपावर असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची मी एकदा मुलाखत घेतली, मुलाखतीमध्ये त्याला प्रश्न विचारला तुम्ही एवढा पेट्रोल पंपपरिसर प्रसाधनगृह स्वच्छ करता तर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास जास्त होतो तर त्यांनी मला सांगितले सर्व साफ करताना कोणताच त्रास होत नाही मात्र प्रवाशी महिला सॅनेटरी नॅपकिन पेड टॉयलेट मध्ये टाकून जेव्हा फ्लश चालू करतात, तेव्हा तो पॅड ड्रेनेज मध्ये जाऊन अडकतो ड्रेनेज चोकअप होतो. तो साफ करताना खूपच त्रास होतो. 

सबब आज आपण हा लेख सर्वत्र पाठवा व भाषांतरित करा. आणि आज निर्धार करा, यापुढे सॅनेटरी नॅपकिन पॅड कचऱ्याच्या डब्यात टाकणार. आणि मासिक पाळी पासून जीव गमावणाऱ्या गरीब नाका कामगारांच्या पत्नीला विधवा होण्यापासून वाचवणार. त्यांच्या मुलांना पोरक अनाथ होऊ देणार नाही. असा संकल्प करूया. जर काही चुकलं असेल तर माफ करा. ही विनंती. माझ्या नाका कामगारांसाठी जर मला मनातून शिव्या दिल्या, फोनवर जरी शिव्या दिल्या, तरी त्या घेण्याची तयारी माझी आहे.  हात जोडून विनंती यापुढे आपण चांगले वागू या, आणि *मासिक पाळीचे पुरुष बलिदान थांबवूया.*

लेख आवडला असेल तर सामाजिक जाणीव जागृत ठेवून नावासहित लेख पुढे पाठवा.


 📝आपला 

*सुरेंद्र नेमळेकर.*

 रायगड जिल्हा नाका कामगार संघटना. 

 अध्यक्ष ९४०४१३५६१९

@@@@@@@@@@@

अचलपूर आणि चांदूर बाजार नगरपरिषदेअंतर्गत घरकुल वाटपातील दिरंगाईबाबत मंत्रालयीनस्तरावर चौकशी

 अचलपूर आणि चांदूर बाजार नगरपरिषदेअंतर्गत

घरकुल वाटपातील दिरंगाईबाबत 

मंत्रालयीनस्तरावर चौकशी

- मंत्री उदय सामंत

            मुंबईदि. १० : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर आणि चांदूर बाजार नगरपरिषदेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल वाटपातील दिरंगाई झाल्याचे निदर्शनास आले आहे. या घरकुल वाटपातील दिरंगाईबाबत मंत्रालयीनस्तरावर चौकशी करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

             सदस्य ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य सुलभा खोडके यांनीही सहभाग घेतला.

             मंत्री श्री. सामंत म्हणाले की, अचलपूर नगरपरिषदेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुलासाठी ६,०६६ अर्जापैकी १,७३८ अर्ज मंजूर करण्यात आले असून ५०८ लाभार्थ्यांच्या प्रस्तावांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहेतर ७० प्रस्तावांबाबत तांत्रिक कारणांमुळे अहवाल तयार करण्यात आलेला नाही. ११२ लाभार्थ्यांनी मागणी केलेली घरकुलांची जागा नदी पात्रात असल्याने तसेच ६३८ लाभार्थ्यांनी अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे सादर केलेली नाहीत. चांदूर बाजार नगरपरिषदेतील प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुलासाठी एकूण ६०७ अर्जापैकी ४१५ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून १९२ घरकुलांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.

            अचलपूर येथील प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अतिक्रमण नियमानुकूल करण्याकरिता ९८६ लाभार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीस सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी ३६० लाभार्थ्यांचे प्रस्ताव  जिल्हास्तरीय समितीकडून तपासण्यात आले. तसेच ४०२ लाभार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे मंजुरीकरीता सादर केले असता शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे पुढील निर्णयापर्यंत नियमित करण्यात येऊ नये असे निर्देश दिले आहेत.

००००

पूरग्रस्त वसाहतीमधील बांधकामासाठी धोरण तयार करण्यासाठी समिती

 पूरग्रस्त वसाहतीमधील बांधकामासाठी

धोरण तयार करण्यासाठी समिती

 - मंत्री उदय सामंत

            मुंबईदि. १० : पूरग्रस्त वसाहतींमध्ये बांधकामासाठी धोरण नसल्याने हे धोरण तयार करण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात येईलअशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

            याबाबत सदस्य सिद्धार्थ शिरोळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

            मंत्री श्री. सामंत म्हणाले कीपुणे महानगरपालिका हद्दीमधील पेठ शिवाजीनगर भागातील गोखलेनगर परिसरामध्ये पानशेत व खडकवासला पूरग्रस्तांसाठी मिळकती दिलेल्या आहेत. याबाबत पुणे महानगरपालिकेमार्फत एसआय सर्व्हे करण्यात आला असून या सर्व्हेमध्ये पुणे गृहनिर्माण महामंडळामार्फत वितरित केलेल्या मूळ बांधकामापेक्षा वाढीव बांधकामे आढळून आलेली आहेत. या परिसरातील इमारतींना मिळकत करावर लावण्यात आलेला  कर धोरण ठरत नाही, तोपर्यंत निवासी बांधकामांना पूर्वीप्रमाणेच कर आकारण्यात येईलअसे मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले

००००

Featured post

Lakshvedhi