Wednesday, 28 February 2024

मराठी भाषेच्या जतन, संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील

 मराठी भाषेच्या जतन, संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            मुंबई दि. 27 :- संवादाचीविचारांचीसाहित्याची आणि आपुलकीची भाषा म्हणजे आपली मराठी. मराठी भाषेचा प्रचारप्रसार करण्याबरोबरच तिचे जतन आणि संवर्धनासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत असून यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाच्या विद्यमाने विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात "कुसुमाग्रज साहित्य जागर" कार्यक्रमाचा शुभारंभ  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  प्रमुख उपस्थितीत झाला. या  कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेउच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलशालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकरविधान परिषदेचे  विरोधी पक्षनेते अंबादास दानवेमराठी भाषा समितीचे प्रमुख आमदार चेतन तुपेविधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे व विलास आठवले यांच्यासह विधिमंडळ सदस्य उपस्थित होते.

            मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणालेकुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला आपल्या प्रतिभेचे अलंकार चढवून अनेक साहित्यकृतींची निर्मिती केली  आहे. संतसाहित्यिकविचारवंतकवीगीतकारलेखक ते अगदी पत्रकारांपर्यंत अनेकांनी भाषा जिवंत ठेवण्यातवृद्धींगत करण्यात मोलाचे योगदान दिले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केले जात असून यासाठी ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी शासनामार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. परदेशातही मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तेथील मंडळांना शासनामार्फत मदत केली जात आहे.

            मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलननाट्य संमेलनविश्व मराठी संमेलनालाही निधी उपलब्ध करून दिला जातो. दक्षिण मुंबईत मराठी भाषा भवन व ऐरोलीतील उपकेंद्रही उभे राहत मराठी भाषा विभागामार्फत मराठी भाषेच्या संवर्धनासाठीही विविध उपक्रम राबविले जात असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

            प्रत्येक राज्याची संस्कृती व भाषा जपण्याची जबाबदारी संविधानाने शासनास दिली आहे. शासनाबरोबरच प्रत्येक नागरिकांनी आपली संस्कृती व भाषा पुढे नेण्याचे काम करणे गरजेचे असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेभाषा जिवंत ठेवण्यासाठी ती ज्ञानभाषाव्यवहार भाषा व अर्थाजनाची भाषा म्हणून तिचा उपयोग होणे आवश्यक आहे. मराठी भाषा ही अभिजात भाषा आहेच असे सांगून श्री. फडणवीस म्हणाले मराठीचा जास्तीत जास्त अभ्यास व्हावा ती अधिक समृद्ध व्हावी यासाठी प्रत्येकाने मराठीत व्यवहार केले पाहिजेत. नवीन शैक्षणिक धोरणामुळे प्रत्येकाला मातृभाषेत शिक्षण घेण्याचे दालन मिळाले आहे.

            कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. कुसुमाग्रज हे मानवतेचे कवी होते. कुसुमाग्रजांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने साहित्याच्या सर्व अंगाना स्पर्श करून साहित्य निर्मिती केली आहे. मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी त्यांनी सर्व मराठी माणसावर टाकली असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी ‘तुमची आमची माय मराठी’ ही स्वरचित कविता सादर करुन मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

            उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार म्हणाले मे आणि २७ फेब्रुवारी या दोन दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. १ मे रोजी मराठी राज्यभाषा दिन आणि २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यासह अन्य संतांनी आपले अलौकिक विचार मराठी भाषेतूनच मांडले. भाषा समृद्ध करण्यासाठी संत व साहित्यिकांचे योगदान मोलाचे आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे ते म्हणाले.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. मंत्री पाटील म्हणालेनवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी आणि पदविका  मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांतून शिकण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये परीक्षा दिली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सुद्धा मातृभाषेतून शिक्षणाला अधिक महत्त्व दिले आहे. इंजिनियरमेडिकल सारखे शिक्षण सुद्धा आता मातृभाषेतून घेण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मराठी भाषेचा प्रसारासाठी सार्वजनिक ग्रंथालयाना अनुदान वाढवून देण्यात आल्याचे ते म्हणाले.

            शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणालेसाहित्याला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका असून विश्व मराठी संमेलनमराठी नाट्य संमेलनअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांना शासनामार्फत निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मराठी भाषा दिन राज्याच्या प्रत्येक भागात साजरा करण्यासाठी भरीव निधी दिला जात आहे. मराठी भाषेचा प्रचार प्रसार व संवर्धनासाठी मराठी युवक मंडळ हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचेही श्री. केसरकर  यावेळी म्हणाले.

            मराठी भाषा ही अभिजात भाषेच्या निकषात बसत असून यासाठी शासन स्तरावरून आणखीन पाठपुरावा होणे गरजेचे  असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले.

            विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रस्ताविकात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घेण्यात येत असलेल्या "कुसुमाग्रज साहित्य जागर" कार्यक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी त्या म्हणाल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता विधानसभेमध्ये साधारण ७० वेळेला आणि विधान परिषदेमध्ये १०० वेळेला विविध आमदारांनी गेल्या काही वर्षांमध्ये ठरावप्रश्नलक्षवेधीविशेष उल्लेखअल्पसूचना प्रश्न विचारले आहेत. मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अनेकांनी कार्य केले आहे. यामध्ये  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचेही नाव आग्रहाने घ्यावे लागेल, असेही त्या म्हणाल्या.

            विधानपरिषदेच्या शतकोत्तर महोत्सवी वर्षानिमित्त पत्रकारांच्या सहकार्याने विधानपरिषदेच्या गेल्या शंभर वर्षातील कामकाजावर आधारित ५ ते ७ पुस्तके लवकरच प्रकाशित करण्यात येणार असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

            मराठी भाषा समितीचे प्रमुख आमदार चेतन तुपे यांनीही मनोगत व्यक्त केले.

००००

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान

 यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान

 

            मुंबईदि. 27 : राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांच्या उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी विविध प्रकारांमध्ये 35 लेखकांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुखमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेमहाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

            यावेळी विविध वाङ्मय पुरस्कार  प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रकार- प्रौढ वाङ्मय : (पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख)

1) काव्य:  श्रीकांत ढेरंगे यांना कवी केशवसुत पुरस्कार2) नाटक/ एकांकिका: डॉ. रावसाहेब मुरलीधर काळे यांना राम गणेश गडकरी पुरस्कार3) कादंबरी: सुचिता खल्लाळ यांना हरी नारायण आपटे पुरस्कार4) लघुकथा: कीर्ती मुळीक यांना दिवाकर कृष्ण पुरस्कार,  5) ललितगद्य (ललित विज्ञानासह) : अरुण खोपकर यांना अनंत काणेकर पुरस्कार,  6) विनोद: नीलिमा क्षत्रिय यांना श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार 7) चरित्र : डॉ. राजेंद्र मगर यांना न.चिं.केळकर पुरस्कार 8) आत्मचरित्र : संजीव सबनीस यांना लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार 9) समीक्षा/ वाङ्मयीन संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन: सत्यशील देशपांडे यांना श्री. के. क्षीरसागर पुरस्कार 10) राज्यशास्त्र/ समाजशास्त्र: नीलांबरी जोशी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 11) इतिहास: पराग चोळकर यांना शाहू महाराज पुरस्कार 12) भाषाशास्त्र/ व्याकरण: डॉ. शैलजा बापट यांना नरहर कुरूंदकर पुरस्कार 13) विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) :  मिलिंद किर्ती यांना महात्मा जोतीराव फुले पुरस्कार 14) शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखन: मंदार मुंडले यांना वसंतराव नाईक पुरस्कार 15) उपेक्षितांचे साहित्य (वंचितशोषितपिडीतआदिवासीकष्टकरीअनुसूचित जाती व नव बौद्ध इत्यादी) : हिरामण तुकाराम झिरवाळ यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 16) अर्थशास्त्र व अर्थशास्त्र-विषयक लेखन: डॉ. गिरीश वालावलकर यांना सी.डी. देशमुख पुरस्कार 17) तत्त्वज्ञान व मानसशास्त्र: डॉ. अलका देव यांना ना.गो.नांदापूरकर पुरस्कार 18) शिक्षणशास्त्र: डॉ.गणपती कमळकर यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार 19) पर्यावरण : अतुल देऊळगावकर यांना डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार 20) संपादित/ आधारित: संपादक डॉ.मंदा खांडगेडॉ.स्वाती कर्वेडॉ.विद्या देवधरडॉ.कल्याणी दिवेकर यांना रा.ना.चव्हाण पुरस्कार 21) अनुवादित: अनुवादक अलका गरुड यांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार तर 22) संकीर्ण (क्रीडासह) : जॉन गोन्सालविस यांना भाई माधवराव बागल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बालवाङ्मय पुरस्कार प्रकार : (पुरस्काराचे स्वरुप 50 हजार रुपये रोख)

1) कविता:दासू वैद्य यांना बालकवी पुरस्कार 2) नाटक व एकांकिका: सुरेश शेलार यांना भा.रा. भागवत पुरस्कार  3) कादंबरी: सुभाषचंद्र वैष्णव यांना साने गुरूजी पुरस्कार 4) कथा (छोट्या गोष्टीपरिकथालोककथांसह) : नीलिमा करमरकर यांना राजा मंगळवेढेकर पुरस्कार 5) सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे): मालविका देखणे यांना यदुनाथ थत्ते पुरस्कार तर 6) संकीर्ण :  डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांना ना.धो. ताम्हणकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वाङ्मय पुरस्कार प्रकार- प्रथम प्रकाशन : (पुरस्काराचे स्वरुप 50 हजार रुपये रोख)

1) काव्य : पुनीत मातकर यांना बहिणाबाई चौधरी पुरस्कार 2) नाटक/ एकांकिका : शार्दूल सराफ यांना विजय तेंडूलकर पुरस्कार 3) कादंबरी: माणिक पुरी यांना श्री.ना.पेंडसे पुरस्कार 4) लघुकथा: विवेक वसंत कुडू यांना ग.ल.ठोकळ पुरस्कार 5) ललितगद्य : आशालता दिनेश पडवेकर यांना ताराबाई शिंदे पुरस्कार तर 6) समीक्षा सौंदर्यशास्त्र: भरतसिंग पाटील यांना रा. भा. पाटणकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            वाङ्मय पुरस्कार प्रकार : (पुरस्काराचे स्वरुप एक लाख रुपये रोख) सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार:  विठ्ठल गावस यांना सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार प्रदान करण्यात आला.

0000

पंतप्रधान 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर ·

 पंतप्रधान 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

·       पंतप्रधान गगनयानच्या प्रगतीचाही घेणार आढावा

·       पंतप्रधान महाराष्ट्रात 4900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वेरस्ते आणि सिंचनाशी संबंधित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे करणार उद्घाटन आणि लोकार्पण

·       पंतप्रधान पीएम -किसान अंतर्गत सुमारे 21,000 कोटी रुपयांचा 16 वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी’ अंतर्गत सुमारे 3800 कोटी रुपयांचा दुसरा आणि तिसरा हप्ता करणार जारी

·       पंतप्रधान महाराष्ट्रातील 5.5 लाख महिला बचत गटांना 825 कोटी रुपयांचा फिरता निधी वितरित करणार

·       संपूर्ण महाराष्ट्रात एक कोटी आयुष्मान कार्ड वितरणाचा पंतप्रधान करणार प्रारंभ

·       मोदी आवास घरकुल योजनेचा पंतप्रधान करणार प्रारंभ

           

            नवी दिल्‍लीदि. 27 : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.

            28 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:30 वाजतापंतप्रधान महाराष्ट्रात यवतमाळ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील आणि यवतमाळ येथे 4900 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील. कार्यक्रमादरम्यान ते पीएम किसान आणि इतर योजनांतर्गत दिले  जाणारे लाभ  जारी करतील.

पंतप्रधानांचा महाराष्ट्र दौरा

            यवतमाळ येथील जाहीर कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजने अंतर्गत, 16 व्या हप्त्याची रु. 21,000 कोटींहून अधिक रक्कम थेट लाभ हस्तांतरणा द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल यातून शेतकऱ्यांच्या कल्याणाप्रती पंतप्रधानांची वचनबद्धता प्रतीत होत आहे.  याबरोबरच 3 लाख कोटींहून अधिक रक्कम, 11 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना हस्तांतरित करण्याचा टप्पा पार होईल.

            पंतप्रधान नमो शेतकरी महासन्मान निधी’ चा सुमारे 3800 कोटी रुपयांचा 2रा आणि 3रा हप्ता देखील वितरित करतीलज्याचा लाभ महाराष्ट्रातील सुमारे 88 लाख पात्र शेतकऱ्यांना मिळेल. ही योजना महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिवर्षी 6000 रुपये अतिरिक्त रक्कम प्रदान करते.

            पंतप्रधान महाराष्ट्रातील 5.5 लाख महिला बचत गटांना (SHGs) रु. 825 कोटी इतका  फिरता निधी वितरित करतील. ही रक्कम भारत सरकारने राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियाना (NRLM) अंतर्गत प्रदान केलेल्या रकमे व्यतिरिक्त आहे.हा निधी बचत गटा अंतर्गत फिरत्या तत्त्वावर कर्ज द्यायला प्रोत्साहन देण्यासाठी दिले जातेजेणे करून ग्रामीण पातळीवर महिलांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन मिळेलआणि गरीब कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न वाढेल.

            पंतप्रधान महाराष्ट्रातील एक कोटी आयुष्मान कार्ड वितरणाचा शुभारंभ करतील. सरकारच्या कल्याणकारी योजना कानाकोपऱ्यातील जनतेपर्यंत पोहोचवून, 100 टक्के पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ देण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक पाउल आहे.

            पंतप्रधान महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ करतील. आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान एकूण 10 लाख घरे बांधण्याची या योजनेची संकल्पना आहे. पंतप्रधानया योजनेच्या 2.5 लाख लाभार्थ्यांना 375 कोटी रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित करतील.

            पंतप्रधान महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ परिसराला लाभ देणाऱ्या अनेक सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण करतील. हे प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) आणि बळीराजा जल संजीवनी योजने (BJSY) अंतर्गत 2750 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून पूर्ण करण्यात आले आहेत.

            पंतप्रधान महाराष्ट्रातील  1300 कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटनही करतील. यामध्ये वर्धा-कळंब ब्रॉडगेज रेल्वे मार्ग (वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन ब्रॉडगेज मार्ग  प्रकल्पाचा भाग) आणि नवीन आष्टी - अमळनेर ब्रॉडगेज रेल्वे मार्ग (अहमदनगर-बीड-परळी नवीन ब्रॉडगेज मार्ग प्रकल्पाचा भाग)या प्रकल्पांचा समावेश आहे. नवीन ब्रॉडगेज मार्गांमुळे विदर्भ आणि मराठवाडा या विभागांचे दळणवळण सुधारेल आणि इथल्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान दोन रेल्वे सेवांना दूरदृश्य प्रणाली द्वारे हिरवा झेंडा दाखवतील. यामध्ये कळंब आणि वर्धा यांना जोडणारी रेल्वे सेवा आणि अमळनेर आणि नवीन आष्टीला जोडणाऱ्या रेल्वे सेवेचा समावेश आहे. या नवीन रेल्वे सेवांमुळे या भागातील रेल्वेचे दळणवळण सुधारेल आणि विद्यार्थीव्यापारी आणि दैनंदिन प्रवाशांना त्याचा लाभ मिळेल. 

            पंतप्रधान महाराष्ट्रातील रस्ते क्षेत्राला बळकटी देणाऱ्या अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करतील. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग -930 च्या वरोरा-वणी विभागाचे चौपदरीकरणआणि साकोली-भंडारा आणि सालईखुर्द-तिरोडा यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या श्रेणी सुधारणा प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे दळणवळण सुधारेलप्रवासाचा वेळ कमी होईल आणि या प्रदेशातील सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल. पंतप्रधान यवतमाळ शहरातील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरणही करतील.

* * *


माध्यमातून अलीकडच्या काळातील मुंबईतील सर्वात मोठे पुनर्वसन प्रत्येक प्रकल्पबाधिताला हक्काचे घराचा अधिकार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध

  माध्यमातून अलीकडच्या काळातील

मुंबईतील सर्वात मोठे पुनर्वसन

प्रत्येक प्रकल्पबाधिताला हक्काचे घराचा अधिकार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संदेशनगर आणि क्रांतीनगर येथील ९६१ निवासी सदनिकांचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप

            मुंबई दि. २७ - प्रत्येक प्रकल्पबाधिताला हक्काचे घराचा अधिकार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

            कुर्ला प्रिमियर कंपाऊंड येथे विमानतळ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत ९६१ प्रकल्प बाधितांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सदनिकांचे वितरणपत्र व चावी वाटप  करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीहे जनतेचे सरकार आहे. या भूमिकेतून शासन सर्वसामान्य नागरिकांचे रोटीकपडामकानआरोग्य या गरजा प्राधान्याने पूर्ण करत आहे. याच प्रयत्नातून आज संदेशनगर आणि क्रांतीनगर मधील नागरिकांना हक्काच्या घराचा अधिकार मिळाला आहे. सुमारे १२०० हून अधिक प्रकल्पबाधित जनतेला घरे देण्यात आली आहेतअसे त्यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले,मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेत आहोत. येत्या काळात सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करणार असल्यामुळे शहर खड्डेमुक्त होणार आहोत. शहर सुशोभित करून आणि सर्व रखडलेले प्रकल्प हे एमएमआरडीए सारख्या यंत्रणांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येत आहेत. आज मेट्रोची सर्व कामे फास्टट्रॅकवर आहेत. त्यासोबतच कोस्टल रोडअटल सेतू यांसारख्या प्रकल्पांमुळे शहर वाहतूक कोंडीमुक्त होत आहे.

            एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले कीमुंबई महानगर प्रदेशातील प्रकल्प उभारताना त्याचा प्रकल्पबाधितांना विहित मुदतीत त्यांच्या हक्काची घर वेळेत देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. संदेशनगर आणि क्रांतीनगर येथील विमानतळ प्रकल्पबधितांचे पुनर्वसन करण्याची आमच्यावर सोपवलेली जबाबदारी आम्ही प्राधान्याने पार पाडत आहोत. या प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करताना अलीकडच्या काळातील मोठे पुनर्वसन करण्याचा आम्हाला आनंद होत आहे.

            मुंबई शहरातील अलीकडच्या काळातील होणारे सर्वात मोठे पुनर्वसन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. कुर्ला प्रिमियर कंपाऊंड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विमानतळ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत ९६१ प्रकल्प बाधितांना सदनिकांचे वितरणपत्र व चावी वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला. आहे. ज्यामध्ये कुर्ला प्रीमियर येथील इमारत क्रमांक २ मध्ये क्रांतीनगर मधील ४०६ प्रकल्प बाधितांना सदनिका मिळणार आहे. तर इमारत क्रमांक ३ मध्ये क्रांतीनगर मधील १६१ आणि संदेशनगर मधील ३९४ प्रकल्प बाधितांना घर मिळणार आहेत.

            विमानतळ प्राधिकरणाच्या मुंबई येथील जागेवरील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसनाबाबतमहाराष्ट्र शासनाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयक संस्था म्हणून नेमणूक केली आहे. त्यानुसार या सर्व प्रकल्पबाधितांचे कुर्ला प्रिमीयर येथील ३० इमारतींमधील १८ हजार ०८४ निवासी आणि अनिवासी सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे. यापूर्वी काढलेल्या सोडतीमध्ये क्रांतीनगर आणि संदेशनगर येथील १२७ प्रकल्प बाधितांना सदनिका वाटप करण्यात आले आहे. पुनर्वसन करण्यात येणाऱ्या बाधितांची संख्या पाहता हे मुंबई शहरातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठे पुनर्वसन ठरणार असल्याची माहिती एमएमआरडीए यांच्याकडून देण्यात आली.

0000


Tuesday, 27 February 2024

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गास १० टक्के आरक्षण

 सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गास १० टक्के आरक्षण

 

            मुंबईदि. २७ : सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.१६ नुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण अधिनियम२०२४, २६ फेब्रुवारी २०२४ पासून अंमलात आला आहे.

            या अधिनियमान्वये  "सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग" असा नवीन वर्ग निर्माण करण्यात आला असूनमराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

            सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग प्रवर्गासाठी यापुढे होणाऱ्या नोकर भरतीप्रक्रियेत आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये २६ फेब्रुवारी २०२४ पासून १० टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे.

            यासाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सुधारीत बिंदुनामावली विहित करण्यात आली आहे. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण अधिनियम२०२४. संदर्भात राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट (Caveat) दाखल करण्यात आले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

0000

मागासवर्गीय वसतिगृहांमधील सोयी सुविधांमध्ये काळानुसार बदल आवश्यक

 मागासवर्गीय वसतिगृहांमधील सोयी सुविधांमध्ये काळानुसार

बदल आवश्यक

- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 

            मुंबई दि. 27 : सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना गरजेच्या असून 2011 च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये बदलत्या काळानुसार बदल करणे आवश्यक असल्यानेशासन निर्णयात वेळोवेळी सुधारणा सोडविण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या. वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे आज सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले बोलत होते. माजी राज्यमंत्री अविनाश महातेकरसामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरियासामाजिक न्याय विभागाचे अधिकारीविद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

            केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले कीराज्यात सामाजिक न्याय विभागाच्या ४४३ वसतिगृहात ४१ हजार विद्यार्थी आहेत.  त्यांना शिष्यवृत्तीनिर्वाह भत्ता २०११ च्या नियमानुसार देण्यात येतात. दर पाच वर्षांनी शासकीय निर्णयात सुधारणा करण्याचा शासन निर्णय असल्याने यामध्ये सुधारणा करूनआधुनिक काळानुसार विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देण्यात याव्यात. तसेचवसतिगृहांच्या इमारतींची डागडुजी करण्यात यावी. सुरक्षा आणि स्वच्छतेची काळजी  घेण्यात यावी. कर्मचारी पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. तसेच,  या समस्यांबाबत विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

            दरम्यानडॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत सफाई कर्मचारी यांच्यासाठीच्या मालकी हक्काच्या गृह योजनेचा आढावा यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी घेतला.

सौर ऊर्जा निर्मितीतून मोफत वीज देणार

            महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अंतर्गत महाप्रीतच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनसौर ऊर्जाप्रधानमंत्री सुर्योदय योजनाअपारंपरिक ऊर्जा स्त्रोत या माध्यमातून मागासवर्गीयांना रोजगार निर्मिती व सौर ऊर्जा कनेक्शन केंद्र शासन देत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून समाजातील सर्वस्तरातील नागरिकांना सोलार ऊर्जेद्वारे मोफत वीज देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मागासवर्गातील पात्र लाभार्थ्यांना अनुदान माध्यमातून इलेक्ट्रिक दुचाकी व तीन चाकी देण्यात येणार आहे. यामुळे रोजगार निर्मिती करण्यास आणि मोफत वीज निर्मिती करण्यास मदत होणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी सांगितले. ज्या खाजगी कंपन्या इलेक्ट्रिक वाहने तयार करतात. अशा कंपन्यांसोबत करार करून केंद्र सरकारच्या अनुदानाच्या माध्यमातून राज्यात योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

माटुंगा लेबर कॅम्प परिसरात पंचशील कमान उभारण्यास प्राधान्य द्यावे

 माटुंगा लेबर कॅम्प परिसरात पंचशील कमान उभारण्यास प्राधान्य द्यावे

- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती कार्यक्रम नियोजनाचा आढावा

            मुंबई, दि. 27 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल 2024 रोजी 133 वी जयंती असून चैत्यभूमीदादर आणि दीक्षाभूमीनागपूर येथील कार्यक्रम भव्यदिव्य होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. माटुंगा लेबर कॅम्प हा परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. यामुळे या परिसरात पंचशील कमान उभारण्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्राधान्य द्यावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा घेतला. बैठकीला माजी राज्यमंत्री अविनाश महातेकरसामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरियाअपर पोलीस आयुक्त अनिल बारसकरमनपाचे उपायुक्त प्रशांत सपकाळेडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळेसमितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, यांच्यासह प्रवीण मोरेरेल्वेजिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारीसमितीचे सदस्य उपस्थित होते.

            केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी सांगितले कीसामाजिक न्यायगृह विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेसमवेत सर्व विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यभर समन्वय करतात. चैत्यभूमी व दीक्षाभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देतात. समन्वय समितीनागरिकांकडून नव्याने आलेल्या सूचनांचाही सुविधांमध्ये समावेश करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमासाठी देशभरातून लाखो अनुयायी येतात. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाहीयाची दक्षता संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून घ्यावी. पाण्याचीशौचालयाची व्यवस्था चोख करावी. चैत्यभूमी व दीक्षाभूमी येथील स्तुपाची रंगरंगोटीसजावट आणि रोषणाईच्या चांगल्या सुविधा द्याव्यात. ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. स्मशानभूमीच्या चिमणीची स्तूपावरील काळवटपणा जाण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेला देण्यात आल्या.

अनुयायाच्या मागणीनुसार पाणीलाडूंची संख्या वाढवावी

            देशभरातील लाखो अनुयायी चैत्यभूमी व दीक्षाभूमी येथे येतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तसेच अनुयायींची मागणी असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने लाडूंची संख्याही वाढवावीअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण

            दरवर्षीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण दूरदर्शनफेसबुक याशिवाय विविध समाजमाध्यमाद्वारे होण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून घरी असणाऱ्या अनुयायींनासुद्धा डॉ. बाबासाहेबांचे दर्शन घेता येईल. शिवाय राज्यभरातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

विविध स्पर्धासांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या विचारांवर परिसंवादविविध स्पर्धासांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहनही श्री. आठवले यांनी केले. फिरते शौचालयसाफसफाईसुशोभीकरणावर भर द्यावाअशा सूचनाही त्यांनी केल्या.

पोलीस विभागाने वाहतूक व्यवस्थाकायदासुव्यवस्थेवर भर द्यावा

            लाखोंच्या संख्येने अनुयायी येत असल्याने गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेवून यासाठी रांगेची चोख व्यवस्था करावी. शिवाय वाहतूक व्यवस्थादिशादर्शक फलककायदा सुव्यवस्था चोख ठेवावीअशा सूचनाही त्यांनी दिल्या.

            माटुंगा येथे पंचशील कमान उभारण्यासाठी संबंधित विभागाकडे परवानगी मागितली असून प्रस्ताव सादर केल्याची माहिती नागसेन कांबळे यांनी दिली.

समन्वय समितीच्या सूचना

            वॉटरप्रुफ मंडपाची व्यवस्थादिवसभर प्रसिद्ध कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. इंदू मिल स्मारकाबाबत होर्डिंग्ज१५ मिनिटांचा लघुपट दाखविण्यात यावे. चेंबूरच्या उद्यानात अखंड भीमज्योत उभारण्यात यावी. जयंती काळात दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करावेचैत्यभूमी परिसरातील मद्य दुकानेबियरबार बंद ठेवावे. रेल्वेने मेगा ब्लॉक टाळावाशिवाय रात्री उशिरापर्यंत लोकल ट्रेन सुरू ठेवावी. समाजभूषण पुरस्कार द्यावेत. विधानभवनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

             बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे अशोक स्तंभभीमज्योतींची सजावटडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित लेजर शोदुर्मिळ फोटोंचे प्रदर्शनउद्यानाचे सुशोभिकरण24 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्थादोन स्पीड बोटीस्वच्छतेसाठी पाच पाळ्यात 290 कर्मचारीवैद्यकीय सुविधांची माहिती उपायुक्त श्री. सपकाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केलेल्या उपाययोजनाकामांची माहिती सादरीकरणातून दिली.

0000

Featured post

Lakshvedhi