Saturday, 24 February 2024

आरोग्य क्षेत्रातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने संशोधनावर भर द्यावा

 आरोग्य क्षेत्रातील आव्हानांचा सामना करण्यासाठी

आरोग्य विज्ञान विद्यापीठाने संशोधनावर भर द्यावा

                                                               - राज्यपाल रमेश बैस

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 23 वा दीक्षांत समारंभ

 

            मुंबई, दि.23 : देशात कर्करोगरक्तवाहिन्यांसंबंधीचे आजारमधुमेह अशाप्रकारच्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका महत्वपूर्ण आहे. आरोग्य क्षेत्रातील विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी विज्ञान विद्यापीठाने संशोधनावर अधिक भर देणे आवश्यक आहेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

            महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 23 व्या दीक्षांत समारंभ प्रसंगी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. दिनेश वाघमारेबेळगांवचे के.एल.ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन ॲण्ड रिसर्चचे कुलगुरु डॉ. नितीन गंगनेमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त)विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगालपरीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडूडी लिट पदवी प्राप्त डॉ. ख्रिस्तोफर डिसुझा यांच्यासह विशेष अतिथीविद्यापीठाच्या विविध शाखांचे अधिष्ठाताप्रशासकीय परिषद सदस्यप्राध्यापकमहाविद्यालयाचे प्राचार्यसुवर्णपदक विजेतेपदव्युत्तर आणि पदवीधर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            राज्यपाल श्री. बैस म्हणालेजुन्या आजारांपासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आहे. भारताने जगाला योगविद्या बहाल केली असून रोगांपासून बचाव करण्यासाठी योगशक्ती वापरण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या काळात रोगनिदान व आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टीफिशल इंटेलिजन्स) आरोग्य सेवेमध्ये परिवर्तनाची भूमिका बजावणार असल्याने यामुळे रोगांचे निदान करणे सोपे होणार आहे. त्यामुळे आर्टीफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून होणारी उपचार पद्धती लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. यासाठी सार्वजनिक रुग्णालये आणि आरोग्य केंद्रे आधुनिक आरोग्य सुविधांनी मजबूत करणे गरजेचे आहे. तसेच लाखो गरीब आणि गरजूंची सेवा करण्यासाठी तत्पर डॉक्टरांची देखील आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व गोष्टींचे महत्व लक्षात घेवून वैद्यकीय शिक्षणाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. याअनुषंगाने गेल्या 10 वर्षांत देशातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 145 वरून 260 झाली आहे. भारतात डॉक्टर-रुग्णांच्या सरासरी प्रमाणातील तफावत कमी करून डॉक्टरांची संख्या वाढावी या उद्देशाने प्रधानमंत्री यांनी हिंदीमराठी आणि इतर प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचेही आवाहन केले आहे. याचधर्तीवर महाराष्ट्रातही लवकरच एमबीबीएसचा अभ्यासक्रम मराठीत होईल. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण घेता येणार असून त्यांच्यासाठी संधींची अनेक दारे खुली होणार आहेतअसा विश्वासही राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी व्यक्त केला.

            आयुर्वेद आणि युनानीसिद्ध आणि होमिओपॅथी यासारख्या आयुषच्या इतर शाखांमध्ये आमचे वेगळे फायदे आहेत. भारतातील आयुर्वेद आणि इतर आयुष विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर कार्यक्रम घेण्यासाठी परदेशी विद्यार्थ्यांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात यावा. त्याचप्रमाणे आरोग्य विज्ञान विद्यापीठाने देशात डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या वाढवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच देशातील ज्येष्ठ नागरिकांची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून विशेष वृद्धापकाळ काळजी सुविधा विकसित करणे आवश्यक आहे. औषधशस्त्रक्रियाआयुर्वेदहोमिओपॅथीयुनानी आणि सिद्ध या क्षेत्रातील शिक्षक आणि संशोधक या नात्यानेया विद्यापीठाकडे दर्जेदार डॉक्टर तयार करण्याची गुरुकिल्ली आहे. पदवी प्राप्त करणारे तरुण हे सत्यशुद्धतानिःस्वार्थी आणि अतिशय जबाबदार आणि सामाजिक बांधिलकी जपत डॉक्टर म्हणून आरोग्य सेवा देतीलअशी अपेक्षा व्यक्त करत राज्यपाल रमेश बैस यांनी सर्व पदवीधरांना रुग्णांशी विनम्रपणे संवाद साधण्याचे आवाहन देखील यावेळी केले.

विद्यार्थी हे भविष्यातील प्रगतीचा केंद्रबिंदू : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

            विविध क्षेत्रात प्रगती करतांना विद्यार्थी हे केंद्रबिंदू असल्याने वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत स्किल लॅब व डिजिटल लायब्ररी सुरू करण्यात आली आहे. तसेच आंतरवासिता व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरघोस वाढ करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील आहेअसे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा आरोग्य विद्यापीठाचे प्रति-कुलपति हसन मुश्रीफ यांनी केले.

            प्रधानमंत्री यांना अभिप्रेत असलेल्या विकसित भारताच्या प्रत्येक नागरिकास उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक असलेले उच्चशिक्षित व कुशल मनुष्यबळ व वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानयुक्त यंत्रसामग्री व साधनसामग्री उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग कटिबद्ध आहे. याकरिता राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय विभागामार्फत आवश्यक प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी सामान्य व गरजू नागरिकांना दर्जेदार रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी या वर्षामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयअतिविशेषोपचार रुग्णालयशासकीय आयुर्वेद महाविद्यालयशासकीय दंत महाविद्यालयांच्या बळकटीकरणाच्या अनुषंगाने पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अध्यापक व टीसीएस द्वारे पात्र तांत्रिक व अतांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्तीची प्रक्रिया राबवून बहुतांश पदावर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहेअसेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणालेराज्यातील कार्यरत शासकीय महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन करून नव्याने प्रस्तावित शासकीय महाविद्यालय उभारण्यासाठी आशियाई विकास बँक संस्थेकडून साधारण चार हजार कोटी रुपयांचे कर्ज शासनास मंजूर झाले आहे. या निधीच्या माध्यमातून वैद्यकीय संस्थांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून त्यांचे श्रेणीवर्धन करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. या संस्थांबरोबर आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका देखील महत्त्वाची असल्याने विद्यापीठाला शासनाकडून निधीची कमतरता भासणार नाहीअशी ग्वाही देखील त्‍यांनी दिली. विद्यापीठाचा विद्यार्थी हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांची जोडला जावात्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शन मिळावेविद्यापीठाचा संशोधनाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तराचा व्हावा यासाठी उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय संस्थाशी सामंजस्य करार करण्यात येत आहेतज्यामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन बाबींची तसेच प्रगत वातावरणामधील तंत्रज्ञान व आरोग्य शास्त्र विषयक अद्ययावत प्रशिक्षण मिळण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            दीक्षांत कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठाच्या परंपरेप्रमाणे मानदंड मिरवणूक करून त्याद्वारे सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. बैस यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचे ई-प्रबोधिनीचा शुभारंभ आणि बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी पुस्तिकेची ब्ल्यु प्रिंट पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ ख्रिस्तोफर डिसुझा यांना डी लिट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आरोग्य विज्ञान विद्यापीठाने 25 वर्षात केलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासोबतच आगामी वर्षभरात विद्यापीठामार्फत करण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेतअसे कुलगुरू डॉ. कानिटकर यांनी यावेळी सांगितले.

सेंटर ऑफ एक्सेलन्सच्या कोनशीलेचे अनावरण

            दीक्षांत समारंभ कार्यक्रमापूर्वी महाराष्ट्र राज्य आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचे सेंटर ऑफ एक्सेलन्स उपक्रमाचे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या प्रास्ताविकात विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. कानिटकर यांनी सेंटर ऑफ एक्सेलन्स बाबत माहिती दिली.

दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना पीएच.डीपदवी प्रदान....

            दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविकापदवीपदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 12 हजार 486 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या 111 विद्यार्थ्यांना 139 सुवर्णपदकएका विद्यार्थ्यास रोख रक्कम पारितोषिक व संशोधन पूर्ण केलेल्या 26 विद्यार्थ्यांना पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली.

            दीक्षांत समारंभात आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 551दंत विद्याशाखा पदवीचे 2195आयुर्वेद विद्याशाखेचे 871युनानी विद्याशाखेचे 99होमिओपॅथी विद्याशाखेचे 1217बेसिक बी.एस्सी. नर्सिंग 2464पीबी बी.एस्सी. नर्सिंग 366बी.पी.टी.एच. 254पॅरामेडिकल विद्याशाखेचे 637पदवी ऑप्टोमेट्री 52ऑक्युपेशनल थेरपी पदवी अभ्यासक्रमाचे 17बी.पी.ओ.विद्याशाखेचे 04 तसेच पदव्युत्तर विद्याशाखेमध्ये पी.जी. मेडिकल 2 हजार 864पी. जी. दंत 497पी.जी. आयुर्वेद 63पी.जी. होमिओपॅथी 18पी.जी. एम.ए.एस.एल.पी. 02डिप्लोमा मेडिकल विद्याशाखेचे 02 , पी.जी. एम.पी.ओ. 02पी.जी नर्सिंग 92पी.जी. ऑक्युपेशनल थेरपीचे 29पी.जी. फिजिओथेरपी 15पी.जी. डि.एम.एल.टी. 87डिप्लोमा पॅरामेडिकल विद्याशाखेचे 88 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविकापदवीपदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

00000000



 

पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांचा अंदाज

 पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता

हवामान तज्ज्ञांचा अंदाज

 

          मुंबईदि.२३ : पूर्व-विदर्भ क्षेत्रात २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

          रविवार२५ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोलीचंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार दि. २६ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षित आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारानागपूरवर्धायवतमाळनांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावीअसे आवाहनही करण्यात आले आहे.

आरोग्य क्षेत्रातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने संशोधनावर भर द्यावा

 आरोग्य क्षेत्रातील आव्हानांचा सामना करण्यासाठी

आरोग्य विज्ञान विद्यापीठाने संशोधनावर भर द्यावा

                                                               - राज्यपाल रमेश बैस

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 23 वा दीक्षांत समारंभ

 

            मुंबई, दि.23 : देशात कर्करोगरक्तवाहिन्यांसंबंधीचे आजारमधुमेह अशाप्रकारच्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका महत्वपूर्ण आहे. आरोग्य क्षेत्रातील विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी विज्ञान विद्यापीठाने संशोधनावर अधिक भर देणे आवश्यक आहेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

            महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 23 व्या दीक्षांत समारंभ प्रसंगी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. दिनेश वाघमारेबेळगांवचे के.एल.ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन ॲण्ड रिसर्चचे कुलगुरु डॉ. नितीन गंगनेमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त)विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगालपरीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडूडी लिट पदवी प्राप्त डॉ. ख्रिस्तोफर डिसुझा यांच्यासह विशेष अतिथीविद्यापीठाच्या विविध शाखांचे अधिष्ठाताप्रशासकीय परिषद सदस्यप्राध्यापकमहाविद्यालयाचे प्राचार्यसुवर्णपदक विजेतेपदव्युत्तर आणि पदवीधर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            राज्यपाल श्री. बैस म्हणालेजुन्या आजारांपासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आहे. भारताने जगाला योगविद्या बहाल केली असून रोगांपासून बचाव करण्यासाठी योगशक्ती वापरण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या काळात रोगनिदान व आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टीफिशल इंटेलिजन्स) आरोग्य सेवेमध्ये परिवर्तनाची भूमिका बजावणार असल्याने यामुळे रोगांचे निदान करणे सोपे होणार आहे. त्यामुळे आर्टीफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून होणारी उपचार पद्धती लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. यासाठी सार्वजनिक रुग्णालये आणि आरोग्य केंद्रे आधुनिक आरोग्य सुविधांनी मजबूत करणे गरजेचे आहे. तसेच लाखो गरीब आणि गरजूंची सेवा करण्यासाठी तत्पर डॉक्टरांची देखील आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व गोष्टींचे महत्व लक्षात घेवून वैद्यकीय शिक्षणाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. याअनुषंगाने गेल्या 10 वर्षांत देशातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 145 वरून 260 झाली आहे. भारतात डॉक्टर-रुग्णांच्या सरासरी प्रमाणातील तफावत कमी करून डॉक्टरांची संख्या वाढावी या उद्देशाने प्रधानमंत्री यांनी हिंदीमराठी आणि इतर प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचेही आवाहन केले आहे. याचधर्तीवर महाराष्ट्रातही लवकरच एमबीबीएसचा अभ्यासक्रम मराठीत होईल. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण घेता येणार असून त्यांच्यासाठी संधींची अनेक दारे खुली होणार आहेतअसा विश्वासही राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी व्यक्त केला.

            आयुर्वेद आणि युनानीसिद्ध आणि होमिओपॅथी यासारख्या आयुषच्या इतर शाखांमध्ये आमचे वेगळे फायदे आहेत. भारतातील आयुर्वेद आणि इतर आयुष विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर कार्यक्रम घेण्यासाठी परदेशी विद्यार्थ्यांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात यावा. त्याचप्रमाणे आरोग्य विज्ञान विद्यापीठाने देशात डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या वाढवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच देशातील ज्येष्ठ नागरिकांची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून विशेष वृद्धापकाळ काळजी सुविधा विकसित करणे आवश्यक आहे. औषधशस्त्रक्रियाआयुर्वेदहोमिओपॅथीयुनानी आणि सिद्ध या क्षेत्रातील शिक्षक आणि संशोधक या नात्यानेया विद्यापीठाकडे दर्जेदार डॉक्टर तयार करण्याची गुरुकिल्ली आहे. पदवी प्राप्त करणारे तरुण हे सत्यशुद्धतानिःस्वार्थी आणि अतिशय जबाबदार आणि सामाजिक बांधिलकी जपत डॉक्टर म्हणून आरोग्य सेवा देतीलअशी अपेक्षा व्यक्त करत राज्यपाल रमेश बैस यांनी सर्व पदवीधरांना रुग्णांशी विनम्रपणे संवाद साधण्याचे आवाहन देखील यावेळी केले.

विद्यार्थी हे भविष्यातील प्रगतीचा केंद्रबिंदू : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

            विविध क्षेत्रात प्रगती करतांना विद्यार्थी हे केंद्रबिंदू असल्याने वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत स्किल लॅब व डिजिटल लायब्ररी सुरू करण्यात आली आहे. तसेच आंतरवासिता व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरघोस वाढ करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील आहेअसे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा आरोग्य विद्यापीठाचे प्रति-कुलपति हसन मुश्रीफ यांनी केले.

            प्रधानमंत्री यांना अभिप्रेत असलेल्या विकसित भारताच्या प्रत्येक नागरिकास उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक असलेले उच्चशिक्षित व कुशल मनुष्यबळ व वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानयुक्त यंत्रसामग्री व साधनसामग्री उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग कटिबद्ध आहे. याकरिता राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय विभागामार्फत आवश्यक प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी सामान्य व गरजू नागरिकांना दर्जेदार रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी या वर्षामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयअतिविशेषोपचार रुग्णालयशासकीय आयुर्वेद महाविद्यालयशासकीय दंत महाविद्यालयांच्या बळकटीकरणाच्या अनुषंगाने पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अध्यापक व टीसीएस द्वारे पात्र तांत्रिक व अतांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्तीची प्रक्रिया राबवून बहुतांश पदावर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहेअसेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणालेराज्यातील कार्यरत शासकीय महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन करून नव्याने प्रस्तावित शासकीय महाविद्यालय उभारण्यासाठी आशियाई विकास बँक संस्थेकडून साधारण चार हजार कोटी रुपयांचे कर्ज शासनास मंजूर झाले आहे. या निधीच्या माध्यमातून वैद्यकीय संस्थांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून त्यांचे श्रेणीवर्धन करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. या संस्थांबरोबर आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका देखील महत्त्वाची असल्याने विद्यापीठाला शासनाकडून निधीची कमतरता भासणार नाहीअशी ग्वाही देखील त्‍यांनी दिली. विद्यापीठाचा विद्यार्थी हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांची जोडला जावात्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शन मिळावेविद्यापीठाचा संशोधनाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तराचा व्हावा यासाठी उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय संस्थाशी सामंजस्य करार करण्यात येत आहेतज्यामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन बाबींची तसेच प्रगत वातावरणामधील तंत्रज्ञान व आरोग्य शास्त्र विषयक अद्ययावत प्रशिक्षण मिळण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            दीक्षांत कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठाच्या परंपरेप्रमाणे मानदंड मिरवणूक करून त्याद्वारे सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. बैस यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचे ई-प्रबोधिनीचा शुभारंभ आणि बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी पुस्तिकेची ब्ल्यु प्रिंट पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ ख्रिस्तोफर डिसुझा यांना डी लिट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आरोग्य विज्ञान विद्यापीठाने 25 वर्षात केलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासोबतच आगामी वर्षभरात विद्यापीठामार्फत करण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेतअसे कुलगुरू डॉ. कानिटकर यांनी यावेळी सांगितले.

सेंटर ऑफ एक्सेलन्सच्या कोनशीलेचे अनावरण

            दीक्षांत समारंभ कार्यक्रमापूर्वी महाराष्ट्र राज्य आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचे सेंटर ऑफ एक्सेलन्स उपक्रमाचे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या प्रास्ताविकात विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. कानिटकर यांनी सेंटर ऑफ एक्सेलन्स बाबत माहिती दिली.

दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना पीएच.डीपदवी प्रदान....

            दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविकापदवीपदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 12 हजार 486 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या 111 विद्यार्थ्यांना 139 सुवर्णपदकएका विद्यार्थ्यास रोख रक्कम पारितोषिक व संशोधन पूर्ण केलेल्या 26 विद्यार्थ्यांना पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली.

            दीक्षांत समारंभात आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 551दंत विद्याशाखा पदवीचे 2195आयुर्वेद विद्याशाखेचे 871युनानी विद्याशाखेचे 99होमिओपॅथी विद्याशाखेचे 1217बेसिक बी.एस्सी. नर्सिंग 2464पीबी बी.एस्सी. नर्सिंग 366बी.पी.टी.एच. 254पॅरामेडिकल विद्याशाखेचे 637पदवी ऑप्टोमेट्री 52ऑक्युपेशनल थेरपी पदवी अभ्यासक्रमाचे 17बी.पी.ओ.विद्याशाखेचे 04 तसेच पदव्युत्तर विद्याशाखेमध्ये पी.जी. मेडिकल 2 हजार 864पी. जी. दंत 497पी.जी. आयुर्वेद 63पी.जी. होमिओपॅथी 18पी.जी. एम.ए.एस.एल.पी. 02डिप्लोमा मेडिकल विद्याशाखेचे 02 , पी.जी. एम.पी.ओ. 02पी.जी नर्सिंग 92पी.जी. ऑक्युपेशनल थेरपीचे 29पी.जी. फिजिओथेरपी 15पी.जी. डि.एम.एल.टी. 87डिप्लोमा पॅरामेडिकल विद्याशाखेचे 88 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविकापदवीपदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

00000000

राजू धोत्रे/विसंअ

मुनावळे जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी

 मुनावळे जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी

        -उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

 

          मुंबईदि. 23 : सातारा जिल्ह्यात पर्यटनाच्या अनेक संधी आहेत. येथील पर्यटन स्थळांचा विकास करून पर्यटकांना जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे आकर्षिक करता येईल. जावळी तालुक्यातील मुनावळे येथील कोयना जलाशयाच्या तीरावर जलपर्यटन प्रकल्प विकसित करण्यासाठी तातडीने कार्यवाही पूर्ण करावीअसे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

            मंत्रालयीन दालनात आज आयोजित बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक जयश्री भोजजलसंपदा विभागाचे अधिकारी  उपस्थित होते. तर दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीकृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

            जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ व कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळामध्ये सामंजस्य करार करण्यात यावा. या कराराचा मसुदा तयार करावा.  बोटींगस्कूबा डायव्हींगहाऊस बोटबोट क्लबजेटस्की आदी अत्याधुनिक सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात याव्यात. यासाठी कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ, जिल्हाधिकारी सातारापर्यटन विकास महामंडळ यांनी समन्वयाने कार्यवाही करावीअसे निर्देश मंत्री श्री. देसाई यांनी दिले. बैठकीला विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शालेय अभ्यासक्रमातील कृषी संबंधित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी

 शालेय अभ्यासक्रमातील कृषी संबंधित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी

-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 

            मुंबईदि. 23 - कृषी घटकाचे महत्त्व लक्षात घेता शालेय अभ्यासक्रमामध्ये कार्यानुभव विषयांतर्गत कृषी घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. या विषयातील उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी व शाळांना दिले आहेत.

            भारत हा कृषीप्रधान देश असून शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात कृषी विषयाचे ज्ञान मिळाल्यास त्यांच्या मनावर शेती विषयाचे महत्त्व ठसवले जाऊन शेती विषयाची जाण असणारी उद्याची उज्वल व जागृत पिढी निर्माण होईल व ग्रामीण समाजाशी त्यांची नाळ जोडली जाईल. पर्यायाने यातूनच राष्ट्रप्रेम निर्माण होऊन शेती व शेतीवर आधारित व्यवसाय व उद्योगधंदे अधिक कुशलतेने केले जातील. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व जीवनमान उंचावण्यास मदत होईल या उद्देशाने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कृषी विषय हा पाठ्यक्रमात लक्षणीय स्वरुपात समावेश करण्याचा निर्णय घेतला.

            शालेय स्तरावर कृषी असा स्वतंत्र विषय नसला तरी कार्यानुभव विषयांतर्गत कृषी घटकांचे ज्ञान पूर्वीपासूनच शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे. परसातील बागकामकुडीतील लागवडफळ प्रक्रियापशुपालनमत्स्य व्यवसायसुलभ शेतीखाद्यपदार्थ निर्मिती इत्यादी क्षेत्रांतर्गत इयत्तानिहाय उपक्रम राबविले जात आहेत. तसेच समाजोपयोगी उत्पादक कार्यवृक्षारोपण व निगाकाही शाळांमध्ये शेती व फळबागा इत्यादी उपक्रम सुरू आहेत.

            सर्व प्राथमिकउच्च प्राथमिक (इयत्ता पहिली ते आठवी) शाळांमध्ये कार्यानुभव विषयाचे अध्ययन अध्यापन केले जात असून कार्यानुभव विषयांतर्गत विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार उपक्रम राबवले जात आहेत. तसेच इयत्ता नववी ते बारावीसाठी नॅशनल स्कील्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्यूएफ) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार कृषी विषय असलेल्या शाळांमध्ये तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये कृषी संदर्भातील आशयाचे अध्ययन अध्यापन केले जात असून अनुषंगिक उपक्रम राबविले जात आहेत. त्याचप्रमाणे इयत्ता 11वी व 12वी स्तरावर विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेमध्ये कृषीच्या अनुषंगाने कृषीविज्ञान व तंत्रज्ञानपशुविज्ञान व दुग्धव्यवसायपीक शास्त्रमत्स्यपालन तंत्रज्ञानगोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायउद्यानविद्या शास्त्र आदी स्वतंत्र वैकल्पिक विषय निवडण्याची संधी उपलब्ध असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार यांनी दिली आहे.

00000

महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा उमेदवारांची निवड

 महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा उमेदवारांची निवड

 

            मुंबई, दि. २३ : राज्यातील सहा उमेदवारांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड झाली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मेधा कुलकर्णीअजित गोपछडेअशोकराव चव्हाण (माजी मुख्यमंत्री) आणि शिवसेनेचे मिलिंद देवराराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रफुल्ल पटेलभारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवड झाली.

            राज्यसभेच्या १५ राज्यातील ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक होणार होती. राज्यात उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याची तारीख २० फेब्रुवारी होती. राज्यसभेवर महाराष्ट्राच्या सहा जागांसाठी सहा अर्ज प्राप्त झाल्यानेया सहा जणांची निवड करण्यात आली आहे. २ एप्रिल २०२४ मध्ये राज्यसभा सदस्यांची मुदत संपल्यानंतर या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे राज्य विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

नमो महारोजगार मेळाव्यातून 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार देण्याचे

 नमो महारोजगार मेळाव्यातून 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

•      लातूर येथे विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन

 

            लातूरदि. 23 : नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावाहे आपले उद्दिष्ट आहे. लातूर येथे आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळाव्याप्रमाणेच राज्यातील इतर विभागातही अशा मेळाव्यांचे आयोजन होणार असल्याने सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी एक टीम म्हणून हे मेळावे यशस्वी करण्याचे प्रयत्न करावेतअशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

            लातूर येथे आयोजित छत्रपती संभाजीनगर विभागीय नमो महारोजगार मेळाव्याचे आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा या कार्यक्रमाला दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडेखासदार सुधाकर शृंगारेआमदार रमेश कराडआमदार संभाजी पाटील निलंगेकरआमदार अभिमन्यू पवारजिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागरप्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश दाखविण्यात आला.

            तरूणांसाठी रोजगार हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून त्यात त्याच्या कुटुंबाचे समाधान आणि समृद्धता दडलेली आहेअसे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीशासकीय योजनांचे लाभ घेण्यासाठी पूर्वी लोकांना हेलपाटे मारावे लागत आणि केवळ त्यामुळे सर्वसामान्य नागरिक योजनांचे लाभ घेत नव्हते. अशा सर्व योजनांचे लाभ शासन आपल्या दारी उपक्रमांतून एका छताखाली देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. आतापर्यंत जवळपास 2 कोटी 60 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना या उपक्रमातून लाभ देण्यात आले. याच भावनेतून एकाच छताखाली रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

            नागपूरचा नमो रोजगार महामेळावा यशस्वी झाला. जवळपास 350 हून अधिक कंपन्यांनी यात सहभाग नोंदवला. त्याचे यश पाहूनच आपण दरवर्षी विभागस्तरावर महारोजगार मेळावा घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष मुख्य समन्वयक म्हणून काम करत आहे. बेरोजगार युवक- युवतींना रोजगार मिळेलयासाठी सरकार प्रयत्न करत आहे. या मेळाव्यात सहभागी तरूण-तरूणींची कुशलअकशुलनिमकुशल अशी वर्गवारी करून कंपन्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे काम केले जाईलअसे मुख्यमंत्री म्हणाले.

मराठवाडा कायमच विकास प्रक्रियेत अग्रस्थानी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृकश्राव्य संदेश दाखवण्यात आला. यात उपमुख्यमंत्री म्हणाले कीमराठवाडा हा कायमच शासनाच्या विकास प्रक्रियेत अग्रस्थानी राहिला असून हिंगोली येथे भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आले आहे. एकीकडे मराठवाड्यात सिंचन सुविधापायाभूत  सुविधा वाढवल्या जात आहेत तर दुसरीकडे या भागात मोठे उद्योग यावेतत्यामाध्यमातून युवा पिढीला रोजगार मिळावा हाही प्रयत्न होत आहे. त्यासाठी आवश्यक कौशल्ये दिली जात आहेत.  या सर्व एकत्रित प्रयत्नातून उद्याच्या मराठवाड्याचे चित्र वेगळे असणार आहे.

            रोजगार संधी आणि करिअर मार्गदर्शन हा दुहेरी उद्देश डोळ्यासमोर ठेऊन नमो महारोजगार मेळावे आयोजित केले जात असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले कीनागपूर येथे आयोजित महारोजगार मेळाव्यात 10 हजार तरूणांना रोजगार मिळालाया रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेतूनच मंत्रिमंडळाच्या बैठकीत विभाग आणि जिल्हास्तरावर महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचा व प्रत्येक मेळाव्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लातूर येथे आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळाव्यात 16 हजाराहून अधिक युवक-युवतींनी नोंदणी केली असून 200 हून अधिक  कंपन्या सहभागी झाल्या असल्याची माहिती मिळाल्याचे ते म्हणाले.

कौशल्य आणि रोजगार संधीसाठी नेटाने प्रयत्न- मंगल प्रभात लोढा

            कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की,  रोजगार मेळावे आयोजित करण्याची मूळ संकल्पना ही तत्कालीन कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची होती. त्यांनी राज्यात रोजगार मेळावेस्टार्टअपची कल्पना रुजवली आणि आपण ती पुढे नेत आहोत. नागपूर येथील रोजगार मेळाव्यानंतर आता लातूर येथे विभागीय नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन होत आहे. राज्यभरातही ते आयोजित होतील. कौशल्य विकास आणि रोजगारासंबंधीच्या सर्व योजनांची माहिती येथे उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये मिळेल. युवक-युवतींच्या कौशल्य विकास आणि रोजगाराचे कामत्यांना रोजगार संधीची उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न नेटाने केले जातीलअशी ग्वाही श्री.  लोढा यांनी दिली.

लातूरच्या औद्योगिक विकासासाठी नमो महारोजगार मेळावा उपयुक्त - संजय बनसोडे

            लातूरची ओळख पूर्वी व्यापारी शहर अशी होतीत्यानंतर सहकार चळवळीने जिल्हा ओळखला जावू लागला. आता शिक्षणातील लातूर पॅटर्न सर्वपरिचित आहे. राज्य शासनामार्फत लातूर येथे होत असलेल्या नमो महारोजगार मेळाव्यामुळे लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगारस्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लातूरच्या औद्योगिक विकासासाठी हा मेळावा उपयुक्त ठरेलअसा विश्वास क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला. तसेच तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

            मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रममुद्रा योजना आणि उमेद अभियान अंतर्गत लाभार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते धनादेश वितरीत करण्यात आले. प्रास्ताविक कौशल्य विकासच्या सहायक आयुक्त रेणुका कंबालवार यांनी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

करिअर दिंडीने कार्यक्रमाला प्रारंभ

            विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराची सुरुवात करिअर दिंडीने झाली. या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी रोजगार आणि स्वयंरोजगाराविषयी घोषणा देत आणि फलकाद्वारे करिअरविषयी संदेश दिला. यामध्ये करिअर मार्गदर्शन विषयक ग्रंथांची पालखी घेवून विद्यार्थी सहभागी झाले होते. यानंतर कौशल्य ज्योत प्रज्वलित करून नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशीआमदार राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

००००

Featured post

Lakshvedhi