Sunday, 21 January 2024

आशियातील स्वच्छ गावाची न ऐकलेली

 आशियातील स्वच्छ गावाची न ऐकलेली


कहाणी !

(मेघालय डायरी)

आशिया खंडातील स्वच्छ गाव कसं असेल?... मेघालयाला जाताना याबाबत बरीच उत्सुकता होती. चेरापुंजीमधून ‘मॉलिनाँग’ या गावात गेलो आणि हे गाव पाहिले तेव्हाच ही उत्सुकता शमली. हे गाव अगदी बांगलादेशच्या सीमेपासून काही अंतरावर. चेरापुंजीपासून मस्त दाट झाडी असलेल्या जंगलातून वळणा-वळणाचा घाट रस्ता या गावात जातो. या रस्त्याने आपण बरेच खाली उतरतो. मॉलिनाँग गावापासून आणखी खाली गेले की बांगलादेशच्या पातळीवर म्हणजे ब्रह्मपुत्रेच्या मैदानावर पोहोचतो.

पोहोचायला रात्र झाल्याने सकाळी उठून गावात फेरफटका मारला. रस्त्यावर कचरा सोडाच, साधा कपटासुद्धा नाही. जागोजागी कचरापेट्या. त्यासुद्धा बांबूने विणलेल्या. इतक्या आकर्षक की त्यात कचरा टाकायचं मन होत नाही. गावातील प्रत्येकाला स्वच्छतेची इतकी सवय झालीए की लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण स्वच्छतेची काळजी घेतो. घरे सजवलेली. झाडांवर विविधरंगी फुले येणारे ऑर्किड बांधलेले. गटारे तुंबलेली दिसत नाहीत, लोकही हसरे. रस्त्यावर पडलेलं पानसुद्साधा उचलून कचरापेटीत टाकतात. ‘मी कचरा केला नाही, तो मी उचलणार नाही...’ असा बाणा नाही. शाळकरी मुलं असोत वा मोठे, सर्वांचीच ही वर्तणूक... असे हे गाव. त्याला स्वच्छ किताब मिळाला नाही तरच नवल!

या छोट्याशा गावाने हे कसे साध्य केले, याची कहाणी अतिशय प्रेरणादायी आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक आणि पूर्वीचे शिक्षक Lamphrang Khongthohrem यांनी ती सांगितली. ते आता सत्तरीत आहेत. त्यांची पिढी तारुण्यात असताना याची सुरुवात झाली. त्यामुळे ही गोष्ट त्यांच्या तोंडून ऐकणे हा आनंद होता. या कहाणीचा सार असा की, तिथे गावागावात जनावरे पाळली जातात. त्यात डुकरांचे प्रमाण सर्वाधिक. हे प्राणी आणि वस्ती एकाच ठिकाणी असेल तर त्यांचे खाद्य, विष्ठा, परिसरात वावरणे यामुळे दुर्गंधीला आमंत्रण. हे समजून गावाने महत्त्वाचे काम केले, ते म्हणजे- जनावरे पाळण्याचे ठिकाण गावापासून दूर हलवले. सर्वांची जनावरे गावापासून दूर एकाच ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे गाव स्वच्छ व्हायला मदत झाली. आपोआपच संसर्ग, आजार, रोगराई यांचे प्रमाण कमी झाले.

याशिवाय स्वच्छतेबाबत शाळांमधून मुलामुलांमध्ये जागरुकता केली. त्यासाठी गावकऱ्यांनाही तयार केले. हळूहळू त्याचे चांगले परिणाम दिसायला लागले. लोकांना हुरूप आला. एका नियतकालिकाने गावाच्या प्रयोगाची दखल घेतली. हे माहीत झाल्यावर माध्यमांनी गावाला उचलून धरले. पर्यटक यायला लागले. हळूहळू मॉलिनाँग हे गाव प्रसिद्धीच्या झोतात आले आणि आशियातील स्वच्छ गाव म्हणून नावाजले गेले. त्याने पर्यटकांना आणखी आकर्षित केले. आता तर स्वच्छता ही बाब लोकांमध्ये भिनली आहे. गावात फिरताना त्याचा प्रत्यय येतो.

पण या स्वच्छतेला दुसरी बाजूसुद्धा आहे. Lamphrang Khongthohrem यांनी ती सांगितली. ते म्हणतात, ‘या स्वच्छ गावाच्या किताबामुळे आमचे प्राधान्यक्रमच बदलले आहेत. आता आम्हाला बाकी सारी कामे सोडून गावाची स्वच्छता टिकवून ठेवावी लागते. पर्यटकांना वेळ द्यावा लागतो. त्यामुळे आमची शेतीची कामे, काही रिती, प्रथा, परंपरागत कामे हे सारे मागे पडले आणि गावाचे नाव टिकवण्यासाठी हे करावे लागते.’

गावात आम्हाला जाणवलेला बदल म्हणजे, जो तो पर्यटकांना राहण्यासाठी कॉटेजेस बांधू लागला आहे. पूर्वी विरळ असलेली वस्ती आता दाट बनते आहे. स्थानिक लोकांशी बोललो तर त्यांनीही तेच बोलून दाखवले. पर्यटकांची संख्या वाढते आहे. त्यांना होम-स्टे उपलब्ध करून देण्यासाठी कॉटेजेस्, विविध बांधकामे बनत आहेत. हे सारे एकाच गावात होत असल्याने गर्दी एकवटत आहे. त्यात गावाची पूर्वीची ओळख आणि गावपण टिकणार का? हे आव्हान उभे राहिले आहे. ते गावाला पेलणार का आणि त्याला गाव कसे सामोरे जाणार? १०-१५ वर्षांनंतर गावाचे स्वरूप कसे असेल? असे अनेक प्रश्न मला पडले. गावातील काही रहिवाशांनीही ती बोलून दाखवली... आशियातील स्वच्छ गावाची कहाणी आणि त्याची माहीत नसलेली दुसरी बाजू समजून घेताना हा प्रदेश उलगडत जातो.

नेहमीच्या गोष्टींपलीकडचा मेघालय समजून घेण्यासाठी,

चलो मेघालय...

(Exclusive Meghalaya - Kaziranga)
26 Feb - 4 Mar 2024

9545350862 / bhavatal@gmail.com

(मोजक्याच जागा शिल्लक)

- अभिजित घोरपडे

................

भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

Saturday, 20 January 2024

हिंदूना माहीत नसलेली नमाज चां अर्थ

 


वर्तमान काळ आखीव असल्यास भविष्य काळ रेखिव बनतो


 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर

 

            मुंबई दि. 19 : भाऊसाहेब फुंडकर  फळबाग लागवड योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 40 लाख रुपये निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे.

              महात्मा गांधी  राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरीता पात्र ठरु शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केली आहे.

            सन 2023-24 या आर्थिक वर्षात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या अंमलबजावणीकरिता अनुसूचित जाती प्रवगासाठी रु.40.00 लाख (रुपये चाळीस लाख फक्त) निधी आयुक्त (कृषी)कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्यपुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध  करून देण्यात आला आहे .

अंतिम मतदार यादी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार

 अंतिम मतदार यादी  २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार


            मुंबईदि‌२० : भारत निवडणूक आयोगाने दि. १ जानेवारी२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्याचा दिनांक २२ जानेवारी२०२४ (सोमवार) असा होता. तथापिराज्य शासनाने १९ जानेवारी२०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार सोमवार २२ जानेवारी२०२४ रोजी श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या १९ जानेवारी२०२४ रोजीच्या पत्रान्वये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या २३ जानेवारी२०२४ (मंगळवार) रोजी करण्याचे निर्देश दिले आहेतअसे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत कळविण्यात आले आहे.

 


मुंबई शहर जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी २३ जानेवारीरोजी प्रसिद्ध होणार

 मुंबई शहर जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी २३ जानेवारीरोजी प्रसिद्ध होणार


 जिल्हाधिकारी  राजेंद्र क्षीरसागर



            मुंबईदि. २०  मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांची अंतिम मतदार यादी २२ जानेवारी २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार होती. राज्य शासनाने सोमवार २२ जानेवारी२०२४ रोजी   श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे २३ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

 

            भारत निवडणूक आयोगाच्या २९ मे २०२३ रोजीच्या पत्रान्वये १ जानेवारी२०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या २६ डिसेंबर २०२३ पत्रान्वये सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. या सुधारित कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्याचा २२ जानेवारी२०२४  होता. परंतु राज्य शासनाने सोमवार २२ जानेवारी२०२४ रोजी श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असल्याने मुंबई शहर जिल्हयातील १० विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी २३ जानेवारी२०२४ रोजी  प्रसिध्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

            त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांची अंतिम मतदार यादी २२ जानेवारी ऐवजी २३ जानेवारी २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे, असे  मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, श्री. क्षीरसागर  यांनी कळविले  आहे.

 

मै अटल हू' हा चित्रपट तरुण पिढीला प्रेरणा देणारा

 मै अटल हूहा चित्रपट तरुण पिढीला प्रेरणा देणारा

- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

 

            मुंबईदि. 19 : देशाचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी संवेदनशील मनाचे कवी होते. त्यांच्या जीवनावर आधारित 'मै अटल हूहा चित्रपट तरुण पिढीला प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारा ठरेलअसा विश्वास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज व्यक्त केला.

            माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवन कार्यावर आधारित 'मै अटल हूया चित्रपटाचा विशेष विशेष खेळ आज सायंकाळी विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांच्या पुढाकाराने विधीमंडळातील दोन्ही सभागृहातील सदस्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. या खेळाच्या समारोपानंतर अध्यक्ष ॲड. नार्वेकर माध्यमांशी बोलत होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळचित्रपटाचे निर्माते विनोद भानुशालीदिग्दर्शक रवी जाधव आदी उपस्थित होते.

            विधानसभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी सांगितले की, 'मै अटल हूया चित्रपटाच्या माध्यमातून समाजात चांगला संदेश जाईल. आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व होय. त्यांनी आयुष्यात समाजकारणराजकारणलोकसेवा आणि राष्ट्रसेवेचे ध्येय ठेवले होते. दिग्दर्शक श्री. जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी उत्कृष्ट भूमिका बजावली आहे.

            मंत्री श्री. भुजबळ यांनी माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरची आठवण सांगितली.  ते म्हणाले कीअटलबिहारी वाजपेयी कवी मनाचे लेखक होते. ते उत्कृष्ट वक्ता होते. त्यांची भाषणे नेहमीच ऐकत होतो. यावेळी विधिमंडळाचे सदस्यअधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००


 

Featured post

Lakshvedhi