Sunday, 14 January 2024

उपवन तलावाचे सौंदर्य आणखी उजळले..!' ठाण्यात संगीतमय कारंजे आणि घाटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले लोकार्पण

 'उपवन तलावाचे सौंदर्य आणखी उजळले..!'

ठाण्यात संगीतमय कारंजे आणि घाटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले लोकार्पण

 

    ठाणेदि.13 : ऐतिहासिक ओळख असलेल्या निसर्गरम्य अशा उपवन तलावाचे सौंदर्य संगीतमय कारंजे आणि बनारसच्या धर्तीवरील घाटामुळे आणखी उजळले आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

    आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारने दिलेल्या निधीतूनठाणे महापालिकेने उपवन तलाव येथे संगीतमय कारंजे आणि घाट यांची उभारणी केली आहे. संगीतमय कारंजे हे 'वॉटर स्क्रीन'सह आहेत. त्यावरदाखविण्यासाठी मराठीहिंदी आणि इंग्रजी भाषेतील तीन शो तयार करण्यात आले आहेत. त्यांचे दिग्दर्शन विजू माने यांचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजठाणे शहराचा इतिहास आणि राम मंदिरअसे या शोंचे विषय आहेत. हे कारंजे आणि घाट यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संस्कृती कला उत्सवाच्या तरंग या पाण्यावरील रंगमंचावर करण्यात आले. 

     याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदेआमदार प्रताप सरनाईकज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवालमाजी आमदार रवींद्र फाटकमाजी नगरसेविका परिषा सरनाईकआशा डोंगरेजयश्री डेव्हिडमाजी नगरसेवक पूर्वेश सरनाईकमहापालिका आयुक्त अभिजीत बांगर आदी उपस्थित होते.

       ठाणे शहर आता बदलू लागले आहे. स्वच्छ होत आहेरस्ते अधिक चांगले होत आहेत. महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम उत्तम सुरू आहे. आपल्याला ठाणे शहर स्वच्छसुंदर आणि निरोगी करायचे आहेअसे मुख्यमंत्री यांनी सांगितले. उपवन तलाव परिसरात ठाणेकर आतापर्यंत फक्त चालायलाफिरायला यायचे आता त्यांना या संगीतमय कारंजाचाही आनंद घेता येईल. नागपूरला फुटाळा तलावातील कारंजे पाहिल्यावर आमदार प्रताप सरनाईक यांना असे कारंजे ठाण्यात करण्यासंदर्भात सांगितले होते. त्यांनी पुढाकार घेऊन वर्षभरात कारंजे सुरू करूनही दाखवलेअसेही मुख्यमंत्री यांनी नमूद केले. तसेचयेथील शो विनामूल्य ठेवावेतअसे निर्देशही त्यांनी दिले.

      मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी माझ्या मतदारसंघालाठाण्याला भरभरुन दिले आहे. त्यामुळे वेगवेगळे प्रकल्प साकारणे शक्य झाले आहे. अशी आणखी दोन संगीतमय कारंजी लवकरच सुरू होतीलअशी माहिती आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी याप्रसंगी दिली. याच कार्यक्रमातचित्रकार किरण कुंभार यांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते शिवगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. किरण कुंभार यांचे एक चित्र अयोध्येतील राम मंदिरात लावण्यासाठी निवडण्यात आले आहे. त्याची प्रतिकृती कुंभार यांनी मुख्यमंत्री यांना भेट दिली. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा तसेचसंदीप वेंगुर्लेकर यांचाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     उद्घाटन समारंभापूर्वी गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम झाला.

जगाला हेवा वाटावा असा विकसित महाराष्ट्र घडविणार

 जगाला हेवा वाटावा असा विकसित महाराष्ट्र घडविणार 

      - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

·       जागतिक मराठी संमेलन

 

            पालघर, दि. 13 : सर्व समाजघटकांना न्याय देऊन राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे.   जगाला हेवा वाटावा  असा विकसित महाराष्ट्र  घडवणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            विरार येथील वि.वा. ठाकूर महाविद्यालयात, 19 व्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

            यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकमखासदार राजेंद्र गावित,सर्वश्री आमदार हितेंद्र ठाकूरक्षितिज ठाकूर श्रीनिवास वनगा, राजेश पाटीलजिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवेवसई - विरार महापालिकेचे आयुक्त अनिल पवार, संमेलनाचे अध्यक्ष,जपान मधील मराठी भाषिक आमदार योगेंद्र पुराणिक जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त जगामध्ये कुठेही मराठी माणूस स्थायिक झाला असेल, तरी त्यांची नाळ ही मराठी भाषा व महाराष्ट्राशी जोडलेली असते  याचे उत्तम उदाहरण म्हणजे जपान मधील मराठी भाषिक आमदार योगेंद्र पुराणिक हे आहेत. काळाबरोबर अनेक शब्दांचा संचय मराठी भाषेमध्ये समाविष्ट झाला शेकडो वर्षापासून मराठी भाषेची मूळे सामान्य जनतेच्या मनामध्ये घट्ट रुजलेली आहेत, हे सर्वांसाठी अभिमानाचे असल्याचेही मुख्यमंत्री श्री.  शिंदे यांनी सांगितले.

            प्रधानमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण  झालेला शिवडी - नाव्हा शेवा ट्रान्स हार्बर लिंक हा पर्यावरणपूरक प्रकल्प असून तो वरळीकोस्टल हायवेमुंबई - पुणे एक्सप्रेस वेमुंबई -गोवा हायवेतसेच वसई - विरार- अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर या मार्गाला जोडण्यात येणार आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन मुंबई -पुणे मिस्सिंग लिंक  हा जगातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा तयार होत आहे. या बोगद्यामुळे पुण्याचे अंतर हे 30 मिनिटांनी कमी होणार आहे. वर्सोवा सी ब्रिजची जोडणी पालघर जिल्ह्यातील विरारपर्यंत वाढविण्यात  आली असल्याचे मुख्यमंत्री  श्री.शिंदे यांनी सांगितले.

            महाराष्ट्र ही संतसाहित्यिक ,कवि व कलाकारांची भूमी असून या सर्व महान व्यक्तींनी मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी आपले अमूल्य योगदान दिले आहे. यामुळेच आपली मराठी भाषा भक्कम पायावर उभी असून  जगभर मराठी भाषेचा प्रसार होतांना आपल्याला दिसत आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने पहिले विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते या संमेलनाला   जगभरातील मराठी बंधू-भगिनीचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावर्षी देखील विश्व मराठी साहित्य संमेलनवाशी येथे आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनामुळे मराठी भाषेचा प्रसार जगभर होण्यास मदत होणार आहे . गिरगाव चौपाटी येथे मराठी भाषा भवन उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले

Saturday, 13 January 2024

राम भक्तों के लिए जरूरी सूचना* *अयोध्या के कुछ महत्वपूर्ण नम्बर एवं ठहरने के स्थान*

 Zeya >> OPT

For your information 👇🏽

*राम भक्तों के लिए जरूरी सूचना*

*अयोध्या के कुछ महत्वपूर्ण नम्बर एवं ठहरने के स्थान*


*पुलिस         100*

*अग्निशमन   101*

*एंबुलेंस         102*

*रेल पूछताछ 139*


*श्री राम अस्पताल* +91-5278-232149


*अयोध्या आँख का अस्पताल* +91-5278-232828"


⏩ *"कहाँ ठहरें*


🍀*राही टूरिस्ट बंगला*

 (उत्तर प्रदेश राज्य पर्यटन विकास निगम)

निकट रेलवे स्टेशन, अयोध्या

(+91-5278-232435),

ई-मेल:rahisaket@up-tourism.com"


☘️ *राही यात्री निवास* (उत्तर प्रदेश राज्य पर्यटन विकास निगम)

सरयू तट, निकट रामकथा पार्क, जनपद अयोध्या,

ई-मेल: yatriniwasayodhya@up-tourism.com"


☘️ *होटल रामप्रस्थ*


निकट रामकथा संग्रहालय, अयोध्या

(+91 5278-232110, 9721691096") 


☘️ *श्रीराम होटल*

निकट दंत धवन कुंड, अयोध्या

(+91 5278-232512)"


☘️ *राम धाम गेस्ट हाउस*


रेलवे स्टेशन रोड, अयोध्या"


☘️ *राम अनुग्रह विश्राम सदन*


छोटी छावनी मार्ग, अयोध्या

कनक भवन धर्मशाला

अयोध्या

(91-5278-232024, 232901)"


☘️ *बिड़ला धर्मशाला*


निकट पुराना बस स्टेशन, अयोध्या

(+91-5278-232252)


 ☘️ *गुजरात भवन धर्मशाला*


निकट दंत धवन कुंड , अयोध्या

(+91-5278-232075)"


☘️ *जैन धर्मशाला*


राय गंज, अयोध्या

(+91-5278-232308)"


☘️ *जानकी महल ट्रस्ट धर्मशाला*


नया घाट, अयोध्या

(+91-5278-232032)


☘️ *पंडित बंशीधर धर्मशाला*


नया घाट, अयोध्या"


☘️ *रामचरितमानस ट्रस्ट धर्मशाला*


अयोध्या

(+91-5278-233040)"


☘️ *दामोदर धर्मशाला*


सुभाष नगर, फैज़ाबाद

(+91-5278-223561)

☘️ *श्याम सुंदर धर्मशाला*


रीड गंज, फैज़ाबाद

(+91-5278-240704)"

----------------------         

⏩  उपरोक्त में से दो की जानकारी इस प्रकार है।


1) अयोध्या रेलवे स्टेशन के पास *गुजराती धर्मशाला* में आप 100 रुपए से लेकर 1000 रुपए तक की कीमत के साथ रूम ले सकते हैं। साथ में खाना भी यहां फ्री में मिलता है। कम बजट के लोगों के लिए यहां एक बड़ा हॉल भी है, जिसमें कई सिंगल बैड के साथ पंखे भी लगे हुए हैं, जिनकी कीमत 100 रुपए प्रति व्यक्ति है। साथ में आप लोगों को अनलिमिटेड खाना भी दिया जाएगा, वो भी फ्री। वहीं अगर आप प्राइवेट रूम लेकर रहना चाहते हैं, 2, 3 और 5 बैडरूम के कमरे भी यहां मिल जाएंगे।

यह रेलवे स्टेशन से दो मिनट पैदल की दूरी पर है।


 2) अयोध्या में सबसे सस्ती और अच्छी जगह *बिरला धर्मशाला* भी है, जहां आपको 200 से 500 रुपए में थ्री स्टार जैसी सुविधाएं मिल जाएंगी। खास बात ये है यहां खाना फ्री में मिलता है, जिसका अलग से कोई भी चार्ज नहीं लगता। आप अपने कितने भी बड़े ग्रुप के साथ आएं यहां आपको रूम आसानी से मिल सकते हैं।

पता न्यू कॉलोनी पुराना बस स्टैंड के पास।

 🌷 *बस हां ध्यान रहे आप कोई भी होटल या धर्मशाला बुक करें एक बार वहां की सुविधाओं से लेकर कीमत तक की सारी जानकारी जरूर हासिल कर लें।*

*साभार आचार्य हृषि केश पाठक*।।

*जेवणानंतर बडीशेप का दिली जाते? जाणून घ्या.....!*

 *आरोग्य मंत्र*...


*जेवणानंतर बडीशेप का दिली जाते? जाणून घ्या.....!*


तुम्ही कधी विचार केला आहे का की जेवणानंतर बडीशेप का दिली जाते? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जेवणानंतर बडीशेप चघळण्याची का गरज आहे.


तुम्ही कधी विचार केला आहे का की जेवणानंतर बडीशेप का दिली जाते? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जेवणानंतर बडीशेप चघळण्याची का गरज आहे.


* बडीशेपमध्ये भरपूर पोषक आणि फायबर असतात आणि कॅलरी कमी असतात, जे तुमच्या निरोगी चयापचय आणि आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे.


* बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असल्याने शरीरातील जळजळ कमी होते.


* बडीशेपमध्ये त्यात आढळणारे नायट्रेट लाळेसोबतच शरीराला फायदेशीर ठरते. नायट्रेट्स हृदयाच्या रक्ताभिसरणात पसरतात आणि तणाव कमी करतात.


* बडीशेप रक्ताभिसरण सुधारते आधीपासून अस्तित्वात असलेल्या रक्तवाहिन्यांमधून नवीन रक्तवाहिन्या तयार होण्यास मदत करते.


* फायबर रक्तातील कोलेस्टेरॉलच्या पातळीची काळजी घेते, ज्यामुळे प्लेक्स आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. 


* बडीशेपच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते. ते पचन मंद करतात आणि साखरेची वाढ टाळण्यास मदत करतात.


* बडीशेप खाल्ल्याने खूप वेळा भूक लागत नाही. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत बडीशेप पाणी देखील समाविष्ट करू शकता.


* बडीशेपमधील विरघळणारे फायबर रक्तातील साखरेच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत करू शकते.


विचारा आरोग्य विषयक समस्या अन मिळवा त्यावर समाधानकारक निवारण.


*डॉ. सुनील इनामदार*,


🌹🌺🌺🌺🙏🌺🌺🌺🌺🌹


*(कॉपी पेस्ट)*

*आरोग्य आणि समर्थ social foundation 

-------------------------

*ज्ञान ,मनोरंजन, माहिती, यासारख्या update 5EOqzNR54

मातीची भांडी

 आधुनिक जीवनशैलीमुळे मातीची भांडी हळूहळू हद्दपार झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा मेट्रो शहरांमध्ये पुन्हा एकदा दिसू लागली आहेत. जुनी जानती मंडळी आज देखील मातीच्या भांड्यात जेवण बनवणं पसंद करत आहेत. आयुर्वेदात असं म्हणमं आहे की, आगीवर हळूहळू जेवणं शिजणं शरीरासाठी हितकारक आहे. मात्र स्टील आणि एल्युमिनिअममधील अन्न हे शरीरासाठी हानिकारक आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे मातीची भांडी हळूहळू हद्दपार झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा मेट्रो शहरांमध्ये पुन्हा एकदा दिसू लागली आहेत. जुनी जानती मंडळी आज देखील मातीच्या भांड्यात जेवण बनवणं पसंद करत आहेत. आयुर्वेदात असं म्हणमं आहे की, आगीवर हळूहळू जेवणं शिजणं शरीरासाठी हितकारक आहे. मात्र स्टील आणि एल्युमिनिअममधील अन्न हे शरीरासाठी हानिकारक आहे. 


 *मातीचे भांडेच का?* 

असं म्हटलं जात की मातीच्या तव्यावर पोळी बनवल्याने त्यामधील एकही पोषकतत्व नष्ट होत नाही. अॅल्युमिनियमच्या भांड्यात पदार्थ बनवल्याने त्यातील ८७ टक्के पोषकतत्वे कमी हतोता. पितळेच्या भांड्यात पदार्थ बनवल्याने ७ टक्के पोषकतत्वे कमी होतात. केवळ मातीच्या भांड्यात बनवलेल्या पदार्थांमध्ये १०० टक्के पोषकतत्वे कायम राहतात.


 *मातीच्या भांड्यात जेवण करणे सोईचे* 

मातीच्या भांड्यात वरण 25 मिनिटाच्या आत हळू आचेवर शिजून जात. म्हणून वरणाला नेहमी मातीच्या भांड्यात शिजवायला ठेवून तुम्ही तुमचे बाकीचे काम करू शकता. एक वेळा मातीच्या भांड्यातील शिजलेले वरण जर तुम्ही खाल्ले तर ते एवढे स्वादिष्ट आणि पौष्टिक असत की तुम्ही त्याची चव विसरू शकत नाही. याच प्रमाणे मातीच्या तव्यावर बनलेली पोळी व माठाचे पाणी फक्त स्वादिष्टच नसत तर ते जन्मभर तुम्हाला निरोगी बनवत.


 *स्वादिष्ट आणि पौष्टिक* 

मातीच्या तव्यावर जेवण अधिक पौष्टिक आणि स्वादिष्ट होतं. मातीचे तत्व पोळ्यांमध्ये शोषले जाते यामुळे त्याची पौष्टिकता अधिक वाढते. 


 *बद्धकोष्ठतेपासून सुटका*

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या साधारण झालीये. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय त्यांनी मातीच्या तव्यावर बनवलेली पोळी खाल्ल्याने त्रास दूर होतो.



*Nutritionist & Dietician* 

 *Naturopathist* 

 *Dr. Amit Bhorkar*  

 -----------------------

*

वाढीव पदांवर समायोजन झालेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत

 वाढीव पदांवर समायोजन झालेल्या शिक्षकांनी


विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


 


            मुंबई, दि. १३ : वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या एकूण २८३ समायोजनास पात्र शिक्षकांपैकी मुंबई विभागातील २० शिक्षकांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते यासंदर्भातील आदेश प्रदान करण्यात आले. वाढीव पदावर समायोजन केलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबईत नुकताच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 


            मान्यताप्राप्त खासगी अनुदानित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थीसंख्या वाढल्यामुळे वाढलेल्या अतिरिक्त कार्यभारानुसार पायाभूत पदांपेक्षा अतिरिक्त शिक्षक पदे मंजूर करण्याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले होते. सन २००३-०४ पासून २०१८-१९ पर्यंत वाढीव कार्यभारानुसार अतिरिक्त वाढीव पदे मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन होता. या कालावधीतील वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या एकूण २८३ पात्र शिक्षकांचे समायोजन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. 


            मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी समायोजन झालेल्या शिक्षकांना यावेळी शुभेच्छा दिल्या. समायोजनाचे आदेश प्राप्त शिक्षकांनीही शासनाच्या या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त करून आभार मानले. यावेळी संबंधित सर्व शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.


 


00000


 

राज्य मागासवर्ग आयोगाचे मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भातील सूचना पाठविण्याचे आवाहन

 राज्य मागासवर्ग आयोगाचे मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भातील

सूचना पाठविण्याचे आवाहन

        मुंबईदि. १३ : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सुरू आहे. मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भात काही सूचना करावयाच्या असल्यास ५०० शब्दांच्या मर्यादेत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे दि. १९ जानेवारी २०२४ पर्यंत mscbcpune2@gmail.com या ई-मेलवर पाठविण्यात याव्यात,असे आवाहन आयोगामार्फत करण्यात आले आहे.


Featured post

Lakshvedhi