Tuesday, 19 December 2023

कोरी वही !"*

 🌹

*"कोरी वही !"*


नविन सुनेचा गृहप्रवेश झाला, सून म्हणाली सासूला

"काय हाक मारु आजपासुन मी तुम्हाला"

सासू संभ्रमात , का हिला असा प्रश्न पडला

वाटलं पटकन म्हणावं , " अगं आईच म्हण मला"

पण हे नातं आहे, कुठला कागद नाही चिकटायला

वेळ द्यावा लागेल नातं आकार घ्यायला 

सावरुन स्वतःला म्हणाली सुनेला 

"मनापासुन जे वाटेल ती साद घाल मला

जे नातं जोडशील ते  निभावून न्यायचंय तुला आणि मला".


नव्यानवलाईचे दिवस सुरु झाले

मुलगा सून संसारात रमले

रोज नविन बेत आखले गेले

कधी नाटक कधी सिनेमे बघितले

रोज नवनवीन पदार्थ होऊ लागले

कधी सासुने कधी सुनेने केले

वर्षाचे सण मजेत साजरे झाले

पण सासुच्या एक लक्षात आले

सुनेने तिला प्रेमाने साद घालायचे टाळले 

मन खट्टू झाले पण वेळीच स्वतःला सावरले

ओठात एक नी पोटात एक, सून नाही अशी आपली 

साद घालेल ती कायमची ही सासुची खात्री पटली


दिवस सरले नवीन पाहुण्याची चाहुल लागली

गोड बातमी सर्वत्र पसरली

सासरी माहेरी कौतुकाला उधाण आले 

सुनेचे मोठ्या प्रेमाने लाडकोड सुरु झाले 

प्रसंगी मुलाला दटावले सुनेला पाठीशी घातले

सासूची लगबग सून डोळे भरुन पाहू लागली

सुनेचं दिवसागणिक बदलतं रूप सासू डोळ्यात साठवू लागली


दिवस काही सरले आणि सुनेने प्रेमाने साद घातली

" साई"

सासू गोंधळली सुनेकडे पाहून विचारती झाली

"मला हाक मारली?"

सून प्रेमाने हसली आणि म्हणाली,

"सासू तुम्ही आहात पण आई माझी झालात

दोन नात्यांची सांगड घालून "साई" म्हणायला केली सुरुवात"

सासू आनंदली सून तिला बिलगली

दोघींच्या मनातली किल्मिषं दूर झाली

मग सासू म्हणाली सुनेला ,"मानलं आहेस मला आई

तर आईसारखं कधी रागवले तर चालेल ना तुला बाई ?"

सून म्हणाली," मानलं आहे तुम्हाला आई

मुली सारखी रुसले तर सावराल ना हो साई ?"

एक नातं आकार घ्यायला लागलं 

सासू-सुनेचं चांगलच सूत जमलं !


दोघींनी मिळून मग निर्णय घेतला काही

घरातल्या पुरूषांना वादात कधी गुंतवायचं नाही

पुरुष याबाबत असतात अलिप्त

मोडू नये त्यांची ही शिस्त

दोघींनी करायची एक एक वही

लिहायचं त्यात सर्व काही

हेवेदावे,रुसवेफुगवे सगळं काही

कैद करायला वापरायची ती वही

आठवड्यातून एकदा करायची वहीची अदलाबदल 

वाचून करायचा त्यानूसार स्वभावात थोडा बदल


वहीत लिहायला सुरुवात केली 

मनातली अढि कमी होत गेली

एकमेकींच्या चुकांची दोघींना गम्मत वाटू लागली

क्षमाशील मनाची नव्याने ओळख पटली


मुलांच्या संसारवेलीवर फुले उमलली

मुलगा सून आता कर्तिसवर्ती झाली

नात्यांची विण आता अधिक घट्ट झाली

तशी दोघींची वही आता कोरीच राहू लागली

वही आता कोरीच राहू लागली !


नविन नात्याच्या उंबरठ्यावर उभी एक आई

येईल ना तिला पण होता कुणाची तरी "साई" ?


साभार

दूध भेसळ रोखण्यासाठी कायद्याच्या मान्यतेसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार

 दूध भेसळ रोखण्यासाठी कायद्याच्या मान्यतेसाठी

केंद्राकडे पाठपुरावा करणार

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            नागपूरदि. 18 - दूध उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन त्यांच्या पाठिशी आहे. त्याचप्रमाणे दूध भेसळ रोखण्यासाठी अशा व्यक्तींविरूद्ध फाशीची तरतूद करण्याचा कायदा तत्कालिन राज्य शासनाने करून केंद्र सरकारकडे पाठविला होता. तथापि त्यास अद्याप राष्ट्रपतींची मान्यता मिळालेली नसल्याचे सांगून याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

            सदस्य हरिभाऊ बागडे यांनी दूध उत्पादकांना मदत करण्यासंदर्भातील उपाययोजना करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य बाळासाहेब थोरातजयंत पाटीलॲड.राहुल कुलराजेश टोपे आदींनी याअनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले कीदूध अथवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन प्रामुख्याने लहान मुले करतात. अशा पदार्थांमध्ये भेसळ करणे योग्य नाही. 

महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वपक्षीय महिला आमदारांची समिती

 महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी

सर्वपक्षीय महिला आमदारांची समिती

        - मंत्री उदय सामंत

            नागपूरदि. १८ : महानगर पालिकामुंबई बेस्ट परिवहन उपक्रम तसेच अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी काम करतात. अशा महिलांच्या समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठीत्यांना दर्जेदार सोयी - सुविधा उभारण्यासाठी सर्वपक्षीय पाच महिला आमदारांची समिती स्थापन करण्यात येईल. या समितीचा अहवाल ३० दिवसात  बोलाविण्यात येईल. त्यावर शासन आवश्यक ती कार्यवाही करेलअशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या  उत्तरात दिली. 

            मुंबईतील बेस्ट उपक्रमात महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सदस्य प्रा. वर्षा गायकवाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य डॉ. भारती लव्हेकरयामिनी जाधवदेवयानी फरांदेयशोमती ठाकूरमनीषा चौधरीराम कदमअजय चौधरी यांनी भाग घेतला. 

            मंत्री श्री. सामंत म्हणालेबेस्ट उपक्रमात ५ हजार ६४३ चालक असून १८९५ वाहक आहेत. यामध्ये १४३ महिला कर्मचारी आहेत. बेस्ट उपक्रमात २७ आगार व ५७ बस स्थानके आहेत.  पुरुषांसाठी ५७ ठिकाणी स्वतंत्र शौचालय असून ३० ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र शौचालय आहे. या सर्व शौचालयस्वच्छता गृहामध्ये दर्जेदार सर्व सोयी - सुविधा महिला कर्मचाऱ्यांसाठी उभारण्याबाबत बेस्ट प्रशासनाला निर्देश देण्यात येतील. या सर्व कंत्राटी महिला कर्मऱ्यांना किमान वेतन अधिनियमानुसार वेतन देण्यात येते. याबाबत काही तक्रारी आल्यास आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. बेस्ट उपक्रमाला महानगरपालिकेने ६ हजार १२३ कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत दिला आहे. 

             मंत्री श्री. सामंत म्हणालेमहिला व बालविकास विभागाचे अर्थसंकल्पीय निधीची तरतूदझालेला खर्च याबाबत नियमित आढावा घेण्याच्या सूचना देण्यात येतील खर्चाचा अहवाल दरवर्षी घेण्यात येईल. महिलांसाठी स्वतंत्र कक्षस्वच्छता गृहाची व्यवस्था मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावर करण्यात येईल. 

             यावेळी विधानसभा तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी शासनाला महिला आमदारांसाठी नागपूर व मुंबई विधान भवन येथे स्वतंत्र महिला कक्षस्वच्छतागृह व  आवश्यक त्या सुविधा उपलब्ध पुरविण्याच्या सूचना दिल्या.


महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक समृद्धी महामार्गालगत 13 कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचे काम सुरू

 महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक

समृद्धी महामार्गालगत 13 कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचे काम सुरू

-         मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            नागपूर दि. 18 :- राज्यात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन केली आहे. आजच या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे यासाठी मदत करत आहेत. न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरॅडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत समृद्धी महामार्गालगत 13 कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचं काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आज सांगितले.

            तत्पूर्वी राज्यातील अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक, कांदा प्रक्रिया व साठवणुकीबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात बैठक झाली, या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वन मंत्री सुधीर मुनगंटीवारराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            साठवण क्षमतेच्या अभावामुळे कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अणु ऊर्जा आधारित कांदा महाबँक, कांदा प्रक्रिया व साठवणुकीमुळे पिकाची नासाडी होणार नाही. हा प्रकल्प राज्यासाठी महत्वाचा आहे. या प्रकल्पामुळे कांदा पिकाचे उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांच्या पिकास चांगला भाव मिळेल. शेतकऱ्यांचा दृष्टीने हा प्रकल्पही महत्वाचा आहे.
            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. संकटाच्या काळात त्याला मदत करण्यासाठी राज्य शासन  नेहमीच त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहते. अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक, कांदा प्रक्रिया व साठवणूकसाठी सहकार्य करून पुढाकार घेतला याबद्दल त्यांचे व त्यांच्या सहकार्यांचे शासनाच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आभार मानले.

            प्रारंभी सादरीकरणातून या प्रकल्पाची  माहिती देण्यात आली.


००००

अमरावती, जालना येथील घटनेप्रकरणी संबंधितांना अटक

 अमरावतीजालना येथील घटनेप्रकरणी संबंधितांना अटक

                                      - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            नागपूरदि. 18: अमरावती येथे मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा सापडल्याप्रकरणी आणि जालना येथे घडलेल्या गोळीबार घटनेप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केले.

            विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी अधिवेशनामध्ये उपस्थित केलेल्या मुद्दाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितले कीअमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला. याप्रकरणी दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 75 हजार 500 रुपये किंमतीचा शस्त्र साठा जप्त केला आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीच्या घराच्या झडती दरम्यानही शस्त्र साठा सापडल्याने आर्म ॲक्टसह विविध गुन्हे संबंधितांवर दाखल करण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

            जालन्यात गजानन तौर या व्यक्तीवर झालेल्या झालेला गोळीबार प्रकरणीही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी निवेदन केले. याप्रकरणातील संबंधित आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

00000

सोलार इंडस्ट्रीज इंडिया मधील स्फोट प्रकरणी फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय

 सोलार इंडस्ट्रीज इंडिया मधील स्फोट प्रकरणी

फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय

 - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            नागपूरदि. १८: काटोल तालुक्यातील चाकडोहबाजारगांव येथील सोलार इंडस्ट्रीज इंडिया कंपनीत झालेल्या स्फोट प्रकरणी कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी फॉरेन्सिक विभागाचा अहवाल आल्यानंतर याप्रकरणी अंतिम निर्णय घेतला जाईलअसे निवेदन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितले कीसोलार इंडस्ट्रीज इंडिया या कारखान्यात दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी स्फोटाची घटना घडली होती. या कारखान्यात संरक्षण विभागाकरिता लागणाऱ्या विस्फोटकांचे उत्पादन केले जाते. कारखान्यातील कामगारांची संख्या सुमारे ३४०० असुन कारखान्यातील कामगारांना किमान वेतनाबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. कारखान्यातील कास्टींग प्रोसेस हाऊस नंबर २ या इमारतीत टी. एन.टी. आणि आर. डी.एक्स. या कच्च्या मालाचा वापर करुन हॅन्ड ग्रेनेड बनविण्यासाठी लागणाऱ्या पेलेटसची निर्मिती केली जाते. दिनांक १७ रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान कारखान्यातील कास्टींग प्रोसेस हाऊस नंबर २ मध्ये नेहमी प्रमाणे काम सुरु करण्यात आले होते. या  ठिकाणी टी.एन.टी. फ्लेक्स चाळणीमध्ये चाळत (Sieving) असतांना सकाळी  ९ वाजता ही स्फोटाची घटना घडली. त्यामुळे कास्टींग प्रोसेस हाऊस नंबर २ ही इमारत कोसळून त्या ठिकाणी काम करणाऱ्या एकूण ९ कामगारांचा घटनास्थळी मृत्यू झाला.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की,  मृतांमध्ये ६ महिला कामगारांचा व ३ पुरुष कामगारांचा समावेश  आहे.  घटना घडल्यानंतर याठिकाणी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली असून पुढील चौकशी करण्यात येत आहे.  त्याचप्रमाणे घटनास्थळी राज्य आपत्ती निवारण दल ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह काढण्याचे काम करत आहे.

            मृत कामगारांपैकी ८ कामगार हे कामगार राज्य विमा योजनेत नोंदणीकृत असल्याने त्यांना कामगार राज्य विमा योजना कार्यालयाकडून नियमानुसार पेन्शन मिळणार आहे. तसेच उर्वरित १ मृत कामगाराच्या वारसाना नुकसान भरपाई कायदा,१९२३ अन्वये नुकसान भरपाई मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            कंपनीच्या व्यवस्थापनाने मृत कामगारांच्या वारसास प्रत्येकी रुपये २० लाख सानुग्रह अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी रु.५ लाख देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले असल्याची माहितीही या निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

0000

शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी भरघोस निधी

 शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी भरघोस निधी

                                                        - मंत्री दीपक केसरकर

 

            नागपूर दि. 18 : शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने मागणीपेक्षा चारपट निधीची तरतूद केली असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            मूल्यांकन उशिरा झाल्यामुळे बहुतांश शाळा अनुदानापासून  वंचित राहिल्यासंदर्भात सदस्य किरण सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका असून शासन निर्णयाच्या अंमलबजावणीत येणाऱ्या त्रुटींचे निराकरण करण्यास शासन प्रयत्नशील आहे. तसेच आलेल्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

            अनुदानास पात्र होणार नाही, अशा शाळांना स्वयंअर्थ सहाय्यित तत्वावर शाळा चालवाव्या लागणार आहेत. शालेय शिक्षणाला शिस्त लावू, विद्यार्थी केंद्रीत शिक्षण प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. राज्यातील शिक्षण देशात गुणवत्तापूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. शिक्षण विभाग आता विद्यार्थ्यांना सोयीसुविधा निर्माण करून गुणवत्तेकडे विशेष लक्ष देत आहे. राज्याला देशात प्रथम क्रमांक आणण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सदस्य सर्वश्री विक्रम काळे, सत्यजित तांबे यांनी चर्चेत सहभाग घेतला.


Featured post

Lakshvedhi