Friday, 15 December 2023

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या

नाविन्यपूर्ण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

मुंबईदि.१५ : सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाने नाविन्यपूर्ण योजना सुरु केल्या आहेत. यात एन.एस.एफ.डी.सी.योजनाथेट कर्ज योजनाबीज भांडवल योजनाशिष्यवृत्ती योजनाथेट कर्ज योजना आदी नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. या योजनांसाठी पात्र व्यक्तींनी पुढे येऊन लाभ घ्यावा. तसेच महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी इच्छूकांनी प्रस्ताव सादर करावेतअसे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे मुंबई शहर व उपनगर जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

या महामंडळाच्या भागभांडवलात वाढ होऊन महामंडळाचे भागभांडवल एक हजार कोटी झाले आहे. महामंडळामार्फत सुरु करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजना अशा आहेत.

एन.एस.एफ.डी.सी.योजना :- (राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती विकास महामंडळ नवी दिल्ली)- या मंडळामार्फत मुदत कर्ज प्रकल्प मर्यादा 5 लाख रुपयेमहिला समृध्दी योजना प्रकल्प रक्कम 4 लाख 40 हजार रुपयेलघुऋण योजना प्रकल्प रक्कम 1 लाख 40 हजार रुपये या तीन योजनेसाठी 3 हजार 500 लाभार्थीकरिता 100 कोटी रुपये निधी मागणीचे प्रस्ताव एन.एस.एफ.डी.सी. महामंडळास मान्यतेसाठी सादर केलेले आहे.

मातंग समाजाच्या युवक,युवतीसाठी देशांतर्गत शिक्षणासाठी रु.30 लाख व परदेशांतर्गत शिक्षणासाठी रु.40 लाख  कर्ज देण्याकरीताचे प्रस्ताव या महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून मागविलेले असून पात्र असलेल्या प्रस्तावास एन.एस.एफ.डी.सी. च्या निधीमधूनच मंजुरी देवून विद्यार्थ्यास शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

थेट कर्ज योजना :- प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये या योजनेंतर्गत सन 2022- 23 या आर्थिक वर्षात 1 हजार 207 लाभार्थ्यांना 12 कोटीचे कर्ज मंजूर केले असून नोव्हेंबर अखेर 800 लाभार्थ्यांना 8 कोटी रुपयाचे वाटप केले आहे. तसेच 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये भौतिक 1650 व आर्थिक 16 कोटी 50 लक्ष ची तरतूद केलेली असून कर्ज मंजूरीची कार्यवाही चालू आहे.

बीजभांडवल योजना :- या योजनेची प्रकल्प मर्यादा 7 लाख रुपये असून यामध्ये महामंडळामार्फत 10 हजार रुपये अनुदानासह 20 टक्के रक्कम हिस्सा महामंडळामार्फत दिला जात होता परंतु, लहुजी साळवे आयोग अभ्यास गटाच्या 19 मंजुर शिफारशी पैकी क्र.1 च्या शिफारशीच्या अनुषंगाने या योजनेमध्ये महामंडळाचा हिस्सा 20 टक्के वरुन 45 टक्के करण्यात आला आहे. ही रक्कम 4 टक्के व्याजाने दिली जातेलाभार्थीचा सहभाग 5 टक्के असुन उर्वरीत 50 टक्के बँकेचे कर्ज असते. महामंडळाच्या हिशाची रक्कम 20 टक्के वरुन वाढवुन 45 टक्के केल्यामुळे बँकाकडून कर्ज मंजुरी करीता वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बहुसंख्य अर्जदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात येत आहे.

शिष्यवृत्ती योजना : मातंग समाजातील विद्यार्थ्यांकरीता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. त्यामध्ये प्रतिवर्षी इयत्ता 10 वी12 वीव पदवीमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 वी साठी 1 हजार12 वी साठी 1 हजार 500 रुपये देण्यात येत होते. तथापि संचालक मंडळाच्या मान्यतेने चालू आर्थिक वर्षापासून यामध्ये भरघोस वाढ करण्यात आली असून इयत्ता 10 वी साठी 5 हजार12 वी साठी 7 हजार 500 व पदवी व पदविकासाठी 10 हजार तर पदव्युत्तरसाठी 12 हजार 500 रुपये इतकी भरघोस वाढ करण्यात आली आहे.

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर 30 लाख प्रकल्प मर्यादा असलेल्या व व्याज परतावा योजना या महामंडळास लागू करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहे.

थेट कर्ज योजना :- सध्या महामंडळामार्फत 1 लाख रुपये प्रकल्प मर्यादा असलेली थेट कर्ज योजना राबविण्यात येते परंतु या रक्कमेमध्ये मोठे व्यवसाय करणे शक्य होत नसल्यामुळे योजनेची प्रकल्प मर्यादा 5 लाख पर्यंत करण्याकरीता मागणी होत होती. त्याअनुषंगाने या योजनेची प्रकल्प मर्यादा 5 लाख पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव शासनास सादर केलेला असून राज्यशासनाकडुन याबाबतची मान्यता लवकरच मिळणार आहे.

लहुजी साळवे मातंग समाज आयोगाच्या शासनाने मंजूर केलेल्या 68 शिफारशी पैकी 19 शिफारशी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या संबंधित आहे. या 19 शिफारशीमध्ये दोन टप्पे करुन पहिल्या टप्यातील नऊ शिफारशीकरीता 234 कोटी व उर्वरीत 10 शिफारशीकरीता 221 कोटी असे एकूण 455 कोटी इतका निधी मिळणे करीताचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे.

अंधेरी मुंबई तसेच उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर येथील जागे बाबत- मुंबई अंधेरी येथे  महामंडळाच्या मालकीची 384 चौ.मी. जागा असुन या जागेवर अण्ण्णाभाऊ साठे भवन व बहुउद्देशीय प्रशासकीय इमारत उभारण्याकरीता 50 कोटी रुपये तसेच  जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी मातंग समाजाच्या युवकयुवतीसाठी विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याकरीता तुळजापूर नगरपालिका यांच्या मालकीची 1 एकर जागा या महामंडळास उपलब्ध करुन दिली आहे. या जागेवर सुसज्य प्रशिक्षण केंद्र उभारणीकरीता 50 कोटी रुपये निधी मिळणे करीताचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे.

००००

सरस फूड फेस्टिव्हल: दिल्लीकरांनी दिली महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना पसंती




 सरस फूड फेस्टिव्हल: दिल्लीकरांनी दिली महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना पसंती

 

नवी दिल्ली, 15: राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या सरस फूड फेस्टीवलमध्ये महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांना खवय्यांनी पसंती दिली आहे. दिल्लीकर खवय्ये सावजी मटणचिकनमांडाझुणका-भाकरभरीत भाकरीमहाराष्ट्रीयन थाळी, वडापावमिसळपाव आणि पुरण पोळीचा मनसोक्त आस्वाद घेत आहे.

कॅनॉट प्लेस येथील बाबा खडक सिंह मार्गावर एक डिसेंबर 2023 पासून सरस फूड फेस्टिव्हल भरविण्यात आले आहे. केंद्र सरकारचे ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

केंद्रीय ग्रामीण मंत्रालयाच्या च्या 'राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानया प्रमुख कार्यक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला उद्योजक आणि महिला बचत गट महोत्सवात सहभागी झाले आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी एमओआरडीचा उपक्रम आहे. या फेस्टिव्हलमध्ये 21 राज्यांतील 150 महिला उद्योजिका आणि महिला स्वयं-सहायता व बचत गट सहभागी झाले असून एकूण 30 स्टॉल आहेत. या महिलांनी आपापल्या राज्यातील विविध प्रकारचे पारंपारिक खाद्यपदार्थ बनवून खवय्यौंचे लक्ष वेधून घेतले आहे.

या फूड फेस्टिव्हल मध्ये महाराष्ट्रातील तीन स्टॉल्स आहेत. या मध्ये नाशिकजळगाव व बीड जिल्ह्यातील महिला बचत गटांचा समावेश आहे. 

नाशिक येथील निफाड तालुक्यातील सर्वज्ञ’ महिला बचत गटाच्या मांडाखांडाधिरडाझुणका भाकरभरीत-भाकरतर जळगाव येथील गंगासागर महिला बचत गट यांनी मिसळ पाववडापावपुरण पोळीथालीपीठभजीमहाराष्ट्रीयन थाळीभरडधान्यांची भाकरी सह पिठलंशेव भाजीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रुक्मिणी महिला बचत गट यांच्या स्टॉलवर सावजी मटणचिकनपुरण पोळीज्वारीबाजरी व तांदळाच्या भाकरीसह मांसाहारी पदार्थ खाणा-या खवय्यांची गर्दी दिसत आहे.

            राजधानीत प्रथमच स्टॉल्स लावण्याची संधी मिळाल्याने नाशिकच्या वंदना मांडरे-पद्मावती व छाया झंवझाळ खूपच आनंदी आहेत. खवय्यांनी पारंपारिक पदार्थांना चांगला प्रतिसाद दिल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

जळगावच्या वैशाली बारी यांनी घरी जे पदार्थ सहज बनविले जातात तेच पदार्थ देशाच्या राजधानीतील खवय्यांसमोर तयार करून त्यांना खाऊ घालूनत्यांच्याकडून मिळालेली दादमनाला सुखवून जाते अशी प्रतिक्रिया दिली.

परळी मधील विमल जाधव यांनीया फेस्टिवलमुळे आम्हाला पाककौशल्य दाखवण्याची आणि राज्याची खाद्य संस्कृतीची देशातील लोकांना ओळख करून देण्याची संधी मिळाली आहे.

0000000000

गोदी कामगार वेतन कराराची सेमी फायनल मुंबईमध्ये होणार*



 *गोदी कामगार वेतन कराराची सेमी फायनल मुंबईमध्ये होणार* 

-----------------------------------------------------


 भारतातील बंदर व गोदी  कामगारांना १ जानेवारी २०२२  पासून नवीन वेतन करार लागू होणार असून, या वेतन कराराला उशीर झाला आहे. मुंबईला १८  डिसेंबरला द्विपक्षीय वेतन समितीचे मिटिंग होणार असून,  ही सेमी फायनल असणार आहे. असे स्पष्ट उदगार इंडियन पोर्ट  असोसिएशन व मुंबई पोर्ट प्राधिकरणचे चेअरमन राजीव जलोटा यांनी काढले.

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने"  पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांक २०२३" चे  प्रकाशन १३ डिसेंबर  २०२३ रोजी बॅलार्ड पिअर येथील पोर्ट ट्रस्टच्या विजयदीप कॉन्फरन्स हॉलमध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस.के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे  फिटनेस तळवलकर जीमचे मालक मधुकर तळवलकर आणि मुंबई पोर्ट  प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा यांच्या हस्ते झाले. दीप प्रज्वलनाने सभेची सुरुवात झाली.

  याप्रसंगी राजीव  जलोटा यांनी आपल्या भाषणात सांगितले की,  गेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात कार्गो हँडलिगमध्ये आपण सर्वोच्च उच्चांक गाठला आहे.पोर्टची परिस्थिती आता थोडीशी व्यवस्थित आहे.  जेएनपीटीमध्ये दोन खाजगी टर्मिनल आली आहेत. त्यामुळे कार्गो मुंबई पोर्टकडे कसा येईल  हेआपणास पहावे लागेल. क्रूड ऑइल स्थिर आहे. क्रुझ व्यवसाय सुरू झाला आहे. एक महिन्यात स्टील भरपूर येणार आहे.  मुंबईत जागतिक बंदर शिखर परिषद झाल्यापासून परदेशी बंदराचे अनेक प्रतिनिधी आपल्या पोर्टला भेटी देतात. 

फिटनेस तळवलकर जिमचे मालक  प्रमुख पाव्हणे मधुकर  तळवलकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,पोर्ट ट्रस्ट  कामगार विशेषांकाचे प्रकाशन झाले असून, पोर्ट ट्रस्ट कामगार अंक सुंदर झाला आहे. अनेक  लेख वाचनीय आहेत.  आपल्या शरीराची सेवा करा. प्रकृती उत्तम ठेवा. मानवाची सेवा करा.  प्रत्येक माणूस सुंदर आहे,  व्यायाम करून दीर्घायुषी व्हा, आयुष्य कसं जगायचं हे आपल्या हातात आहे. दुसऱ्याची  सेवा केली पाहिजे. शरीराची सेवा करा. आयुष्य पाहिजे असेल तर व्यसनापासून दूर राहा. चांगल्या सवयी लावा. 

 ज्येष्ठ कामगार नेते ॲड.एस. के. शेट्ये यांनी अध्यक्षीय भाषण  करताना आरोग्य मंत्र दिला की, भुखेपेक्षा कमी खा. जास्त चाला. भुख नसेल तर खाऊ नका. दिलेले काम मनापासून करा. यामधून आनंद मिळेल. आम्हाला  निष्ठावंत कार्यकर्ते मिळाले म्हणून युनियनने १०३  वर्ष पूर्ण केली आहेत. मला अनेक पुरस्कार मिळाले, परंतु पुरस्कारापेक्षा कामगारांचे प्रेम महत्त्वाचे आहे. युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाराष्ट्रात ३५० ते ४०० दिवाळी अंक निघतात. परंतु  कोणाचाही असा प्रकाशन सोहळा होत नाही. १ जानेवारी २०२२  पासून लागू  होणाऱ्या वेतनकरारा बाबत काही मागण्या मान्य झाल्या असून,  फिटमेंट, महागाई भत्ता, वार्षिक पगारवाढ या मागण्या मान्य झाल्या तर लवकरच वेतन करार होईल.  युनियनचे कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल यांनी हृदयरोग, बीपी, डायबेटीज यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक भाषण कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय युनियनचे सेक्रेटरी व बोर्ड मेंबर दत्ता खेसे यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे यांनी केले तर आभार सेक्रेटरी विजय रणदिवे यांनी मानले. प्रकाशन सोहळ्यास मुंबई पोर्ट प्राधिकरणच्या बोर्ड मेंबर कल्पना देसाई,  मुंबई टांकसाळ मजदुर सभेचे संजय सावंत, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनगुटकर, गणित तज्ञ व राष्ट्रपती पुरस्कार विजेते नारायण गव्हाणे, सौराष्ट्र कर्मचारी संघटनेचे शिवाजी सावंत, नुसीचे मकसूद खान, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, बंधुत्व फाउंडेशनचे अध्यक्ष समीर राणे, मराठा विकास प्रतिष्ठानचे सेक्रेटरी किरण नलावडे,  ज्ञानेश्वर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. शीला भगत, योगिनी  दुराफे,  सतीश घाडी,जतिन कदम यांनी समूहगीत म्हंटले. प्रकाशन सोहळ्याला युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोर्ट ट्रस्टचे कामगार, सेवानिवृत्त कामगार, खाजगी कामगार, लेखक व कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपला

 मारुती विश्वासराव

प्रसिद्धीप्रमुख 

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

सांबरकुंड वन जमीन हस्तांतरणांसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार

 सांबरकुंड वन जमीन हस्तांतरणांसाठी


केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            नागपूर, दि. १४ : कोकणातील सांबरकुंड वन जमीन हस्तांतरणांसाठी केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी प्रतिक्षेत असुन पाठपुरावा सुरू आहे. त्यास अंतिम मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पाचे बांधकाम हाती घेण्यात येईल,असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.


            रायगड जिल्ह्यातील अनेक नद्यांवर पाणी योजना राबवण्याबाबत सदस्य जयंत पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केले होते, त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.


            श्री फडणवीस म्हणाले, बाळगंगा प्रकल्पाच्या धरणाचे काम भौतिकदृष्ट्या ८० टक्के झाले आहे. सदर प्रकल्पाद्वारे सिडको नवी मुंबई क्षेत्रास पाणीपुरवठा करणे प्रस्तावित आहे. प्रकल्पाच्या वाढीव खर्चास सुधारीत प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. सिडकोने प्रकल्पाचा उर्वरीत खर्च शासनामार्फत करणेविषयी सूचित केले आहे. तरी सदर प्रकल्पाच्या प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मंजूरी देण्याची कार्यवाही शासन स्तरावर प्रगतीपथावर असून मंजूरीनंतर निधी उपलब्धतेनुसार प्रकल्पाची कामे पुढील पूर्ण करणेचे नियोजन आहे.


            रायगड जिल्ह्याच्या शाश्वत विकास घडवताना बाळगंगा हेटवणे, सांबरकुंड ,काळकुंभे,आंबोली हे प्रकल्प पुर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे श्री फडणवीस यांनी सांगितले.


            यावेळी सदस्य सर्वश्री अनिकेत तटकरे, आमश्या पाडवी यांनी चर्चेत स

हभाग घेतला.


उच्चशिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना

 उच्चशिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना

-  मंत्री अतुल सावे

मुंबईदि.१३ : इतर मागास वर्गविमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना थेट लाभ देणारी महत्वाकांक्षी अशी  'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना'  राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  त्यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ही महात्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून ६०० प्रमाणे २१ हजार ६०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. भोजन भत्तानिवास भत्ता व निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे.

             मुंबई शहरमुंबई उपनगरनवी मुंबईठाणेपुणेपिंपरी चिंचवडनागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ६० हजार रुपयेइतर महसुली विभागातील शहरे व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपयेजिल्ह्याच्या ठिकाणी ४३ हजार तर तालुक्याच्या ठिकाणी ३८ हजार रुपयांचा विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

             या योजनेसाठी प्रतिवर्षी १०० कोटींच्या खर्चास मान्यता दिली आहे. ओबीसीएसबीसीव्हीजेएनटी प्रवर्गातील गरीबहोतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल असा विश्वास या विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे.

0000

बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सोहळा 2023 राज्यपाल यांच्या उपस्थितीत संपन्न

 बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सोहळा 2023

राज्यपाल यांच्या उपस्थितीत संपन्न

 

मुंबई, दि.14 : पश्चिम नौसेना कमांड, मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेला बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सोहळा 2023 राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या सोहळ्यात प्रथम नौदलाच्या संगीत बँडचे प्रदर्शन, सुर्यास्त सोहळा, फ्लॅाय पास्ट, कन्टीन्यूटी ड्रील, सेलर्स हॉर्नपाईप नृत्य, लाईट टॅटू ड्रमर नृत्य आदींचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

००००

 


 

वृत्त क्र. 3986


Thursday, 14 December 2023

मागेल त्याला शेततळे' योजना अधिक व्यापक करणार

 मागेल त्याला शेततळेयोजना अधिक व्यापक करणार

                                      - मंत्री धनंजय मुंडे

 

            नागपूरदि. 14 : मागेल त्याला शेततळे’ ही कृषी विभागाची महत्त्वाकांक्षी योजना असूनअवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावायादृष्टीने विदर्भमराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली. 

            'मागेल त्याला शेततळेयोजनेतील प्रलंबित व रद्द झालेल्या अर्जाबाबत लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला होता. 

            शेततळे मंजूर करण्याची कार्यवाही जरी कृषी विभाग करत असलातरी ती राबविण्याची जबाबदारी रोजगार हमी विभाग पार पाडतोत्यामुळे दोन्ही विभागांचा समन्वय साधून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी दोन्ही विभागांच्या समन्वयातून अधिक व्यापक स्वरूप दिले जाईलअसेही धनंजय मुंडे याप्रसंगी म्हणाले. 

            कोकण क्षेत्रात जमिनी व भौगोलिक परिस्थिती थोड्या-थोड्या अंतरावर बदलतेत्यामुळे शेततळ्यांना मिळणारा दर व त्यातील दरफरक दूर करण्यासाठी दोन्ही विभाग मिळून मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन समावेशक निर्णय कालबद्ध पद्धतीने घेतला जाईलअसेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. 

            यावेळी सदस्य बाळासाहेब थोरातबबनराव लोणीकरप्रकाश सोळंकेनाना पटोलेॲड. आशिष शेलारबबनराव लोणीकर आदींनी या प्रश्नाबाबत चर्चेत सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi