Saturday, 9 December 2023

दुष्काळ, अवकाळी, गारपीट, 'मीचांग'मुळे राज्यातील शेतकरी उद्धवस्थ विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी संकटात होरपळला

 

दुष्काळ, अवकाळी, गारपीट, 'मीचांग'मुळे राज्यातील शेतकरी उद्धवस्थ


विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी संकटात होरपळला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार 


शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची श्री. वडेट्टीवार यांची मागणी 


मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त होते;मंत्री नुकसानीची पाहणी करायला बांधावर गेले नाहीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला फटकारले 


मुंबई, दि. 7: राज्यातील दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, 'मीचांग'मुळे शेतकरी उद्धवस्थ झाला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. शेतकरी संकटात असताना देखील मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकत नाहीत, मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त असतात, अशा शब्दात श्री. वडेट्टीवार सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले. विधानभेत आज स्थगन प्रस्ताव श्री. वडेट्टीवार यांनी मांडला, त्यावेळी ते बोलत होते. श्री. वडेट्टीवार म्हणाले, विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी संकटात होरपळला आहे. कापूस, धान, संत्रा, द्राक्ष, कांदा , सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आहे. मंत्री बांधावर पाहणी करायला गेले नाहीत. मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त होते. सरकारने या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या पण पंचनामे होत नाहीत. सरकारने दुष्काळ जाहीर करताना दिरंगाई केली होती. फक्त 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. याच तालुक्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. त्यानंतर आमच्या सरसकट दुष्काळाच्या मागणीनंतर सरकारने 1 हजार 21 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला. पण दुष्काळ सदृश्य परिस्थिती असा सरकार शब्दप्रयोग करतंय. या 1 हजार 21 महसूल मंडळांना आर्थिक मदत मिळणार नाही. हे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, अशी मागणी श्री. वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

Our Ancient 🇮🇳 Bharatiya Sages were actually the scientists

 *Our Ancient 🇮🇳 Bharatiya Sages were actually the scientists.* They've given certain Crucial HEALTH TIPS in Sanskrit translated into English for common understanding.


*Highly relevant even today !*


*1. अजीर्णे भोजनं विषम्।* 

If previously taken Lunch is not digested..taking Dinner will be equivalent to taking Poison. Hunger is one signal that the previous food is digested 


*2. अर्धरोगहरी निद्रा।*

Proper sleep cures half of the diseases..


*3 मुद्गदाली गदव्याली।*

Of all the Pulses, Green grams are the best. It boosts Immunity. Other Pulses all have one or the other side effects. 


*4. भग्नास्थि-संधानकरो लशुनः।*

Garlic even joins broken Bones.. 


*5. अति सर्वत्र वर्जयेत्।*

Anything consumed in Excess, just because it tastes good, is not good for Health. Be moderate. 


*6. नास्ति मूलमनौषधम्।*

There is No Vegetable that has no medicinal benefit to the body.. 


*7.  न वैद्यः प्रभुरायुषः।*

No Doctor is capable of giving Longevity. (Doctors have limitations.) 


*8. चिंता व्याधि प्रकाशाय।*

Worry aggravates ill-health.. 


*9. व्यायामश्च शनैः शनैः।*

Do any Exercise slowly.

(Speedy exercise is not good.) 


*10. अजवत् चर्वणं  कुर्यात्।*

Chew your Food like a Goat.

(Never Swallow food in a hurry. 

Saliva aids first in digestion.) 


*11.  स्नानं नाम मनःप्रसाधनकरंदुः स्वप्न-विध्वंसनम्।*

 Bath removes Depression.

 It drives away Bad Dreams.. 


*12. न स्नानमाचरेद्  भुक्त्वा।*

Never take Bath immediately after taking Food.  (Digestion is affected). 


*13. नास्ति मेघसमं तोयम्।*

No water matches Rainwater in purity.. 


*14.  अजीर्णे भेषजं वारि।*

When there is  indigestion taking plain water serves like medicine.


*15. सर्वत्र नूतनं  शस्तं, सेवकान्ने पुरातने।*

Always prefer things that are Fresh.. 

Whereas Rice and Servant are good only when they are old.


*16. नित्यं सर्वा रसा भक्ष्या:।*

Take the food that has all six tastes.

(viz: Salt, Sweet, Bitter, Sour, Astringent and Pungent). 


*17. जठरं पूरायेदर्धम् अन्नैर्, भागं जलेन च।*

*वायोः संचरणार्थाय चतर्थमवशेषयेत्।*

Fill your Stomach half with Solids, 

(a quarter with Water and rest leave it empty.)


*18. भुक्त्वा शतपथं गच्छेद् यदिच्छेत् चिरजीवितम्।*

Never sit idle after taking Food.

Walk for at least half an hour. 


*19. क्षुत्साधुतां जनयति।*

Hunger increases the taste of food..

In other words, eat only when hungry.. 


*20. चिंता जरा नाम मनुष्याणाम्* 

Worrying speeds up ageing.. 


*21. शतं विहाय भोक्तव्यं, सहस्रं स्नानमाचरेत्।*

When it is time for food, keep even 100 jobs aside. 


*22. सर्वधर्मेषु मध्यमाम्।*

Choose always the middle path. Avoid going for extremes in anything


*Golden words of wisdom in Sanskrit by our sages.*


*Please share with your loved ones.*

जल जीवन मिशनची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावी

 जल जीवन मिशनची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावी

               उपमुख्यमंत्री अजित पवार

            नागपूरदि. 8 :- केंद्र सरकारच्या ‘हर घर नल से जल’ या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरात नळाने पिण्याचे पाणी पुरविण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत सुरू असलेली कामे युध्दपातळीवर पूर्ण करावीत. यासंदर्भातील सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्तावातील त्रुटी दूर करून सादर कराव्यातअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी विधानभवनातील दालनात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील जल जीवन मिशनमधील योजनांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसंदर्भातील आढावा घेतला. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलआमदार सर्वश्री किरण लहामटेदेवेंद्र भुयारराजू कारेमोरेइंद्रनील नाईकमनोहर चंद्रिकापुरेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीरनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेपाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे,  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णामुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीघरगुती नळ जोडणी करून प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे. या योजनेचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना त्रुटी राहिल्या असतीलतर त्या दुरुस्त करून प्रस्ताव सादर करावेत. वित्तनियोजन आणि पाणीपुरवठा विभागाने संयुक्तपणे आढावा घ्यावाअशाही सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

            पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले कीराज्यात सन 2022-23 पर्यंत 34 हजार 745 योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या 33 हजार 816तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 929 योजनांचा समावेश आहे. या योजनांची अंदाजित किंमत 54 हजार 188 कोटी रुपये आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरात नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी या योजना वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे यासाठी आवश्यक वाढीव निधी देण्यात यावाअशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. 

00000


Friday, 8 December 2023

संशयास्पद हालचाली होत असलेल्या बंद कारखान्यांची तपासणी

 संशयास्पद हालचाली होत असलेल्या बंद कारखान्यांची तपासणी

                                                            - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            नागपूरदि. 8 : राज्यातील काही भागात बंद असलेल्या कंपन्यांमध्ये ड्रग्ज तयार करण्यात आले असल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे संशयास्पद हालचाली होत असलेल्या बंद कारखान्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            सदस्य अनिकेत तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात ड्रग्जचा मोठा साठा पोलिसांनी पकडला याविषयी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. याविषयी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीड्रग्जविषयी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. इतर राज्यातील यंत्रणेसोबत राज्यातील पोलीस समन्वयाने कार्यवाही करीत आहेत. राज्यात ड्रग्ज विरोधात कडक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संशयित ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. सदस्यांनी केलेल्या सूचनांचाही सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

0000

अग्निप्रतिबंधक यंत्रांची सुस्थिती पाहणी करण्यासाठी भरारी पथक

 अग्निप्रतिबंधक यंत्रांची सुस्थिती पाहणी करण्यासाठी भरारी पथक

                                                            उद्योगमंत्री उदय सामंत

 

            नागपूरदि. 8 : मुंबईसह राज्यातील शहरांतील इमारतीच्या अग्निप्रतिबंधक यंत्रांच्या सुस्थितीची पाहणी करण्यासाठी भरारी पथक तयार करण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

            विधानपरिषदेत महाराष्ट्र अग्नि प्रतिबंधक जीव संरक्षण उपाययोजना अधिनियमानुसारइमारतींचे मालक भोगवटादार गृहनिर्माण संस्थांनी इमारतीचे फायर ऑडिट परवाना अग्निशामक यंत्रणेमार्फत करून घेण्यासंदर्भात सदस्य प्रसाद लाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.

            मुंबई अग्निशमन दलामार्फत उत्तुंग इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यापूर्वीया इमारतीस सशर्त देण्यात आलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रातील अग्निसुरक्षाविषयक बाबींची पूर्तता केल्याबाबत अग्निसुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केली जाते व त्यानुसार त्याबाबतचा अहवाल ऑनलाईन पध्दतीमध्ये जतन करुन त्याबाबतचे अभिप्राय संबंधितांना पाठविले जात असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

            आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी मुंबई अग्निशमन दलामार्फत एकूण 6 हजार 975 अग्निस्वयंसेवकांना तसेच  2 हजार 50 अग्निरक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आहार या संघटनेकरिता उपहारगृहातील 381 कर्मचाऱ्यांना प्राथमिक अग्निसुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 24 विभाग कार्यालयातील व 5 मुख्य रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना अग्निसुरक्षेबाबत प्रशिक्षण व प्रात्याक्षिके दाखविण्यात आलेली आहेत. मुंबईतील 69 मॉल्सची  तपासणी करण्यात आलेली आहेअशी माहिती यावेळी देण्यात आली.

मुंबईतील जनतेच्या जनजागृतीकरिता दिनांक 14 एप्रिल ते 20 एप्रिल असा अग्निसुरक्षा सप्ताह तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत वेगवेगळे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम राबविण्यात आला आहेत. मुंबईतील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना अग्निशमन केंद्राच्या भेटीदरम्यान अग्निसुरक्षेबाबतची माहिती दिली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी सदस्य सचिन अहीरजयंत पाटीलप्रवीण दरेकरअनिल परब यांनी चर्चेत सहभाग घेतला.

0000000


चिटफंड सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर; राज्य शासनाचे अपिलाचे अधिकार

 चिटफंड सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर;

राज्य शासनाचे अपिलाचे अधिकार

प्रशासकीय स्तरावर प्रदान अपिलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास दिल्याने

विलंब टाळला जाऊन अपिलकर्त्यांचा वेळ वाचणार

                                                            -उपमुख्यमंत्री अजित पवार

          नागपूरदि. 8 :- उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडलेले सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 49- चिट फंड (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक2023 मंजूर करण्यात आले. राज्य शासनाकडील अपिलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास प्रदान केल्यामुळे अपील निकाली काढण्यातील विलंब टाळला जाणार आहे. त्यामुळे अपीलकर्त्यांचा वेळ देखील वाचणार आहे.

          विधेयक मांडताना उपमुख्यमंत्री म्हणाले कीचिटफंड अधिनियम1982 च्या माध्यमातून शासनामार्फत सर्व चिटफंडांचे नियमन केले जाते. या अधिनियमात दुरुस्ती करण्यासाठी हे विधेयक मांडले आहे. सध्या वित्त मंत्र्यांकडे अपिलाचे अधिकार आहेत. वित्तमंत्र्यांकडील कामाच्या व्यापामुळे त्यांना अपिलांचे कामकाज चालविण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. या पार्श्वभूमीवर प्रक्रिया गतिमान होण्यासाठी अपिलाचे अधिकार राज्य कर उपायुक्त दर्जाचा अधिकारी असलेल्या सहनिबंधक या अधिकाऱ्यांकडे देण्यात येत आहेत.

          उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले कीचिटफंड चालवताना काही वेळा वाद निर्माण होतात. त्यावेळी चिटफंड चालवणाऱ्या कंपन्या कलम 69 नुसार राज्य कर विभागातील चिटस् सहनिबंधकांकडे दाद मागतात. सहनिबंधकांच्या निर्णयाने जर समाधान झाले नाही तर कलम 70 नुसार त्यांच्या निर्णयाविरुद्ध दोन महिन्यांच्या मुदतीत वित्त मंत्र्यांकडे अपील करण्याची तरतूद आहे. या सुधारणेमुळे हे अधिकार खालच्या स्तरावर म्हणजेच सहनिबंधकांकडे राहणार असून त्यामुळे अपील निकाली काढण्याची प्रक्रिया वेगाने पार पडण्यास मदत होणार आहे.

000

महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 अधिक सक्षम करणार

 महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण

अधिनियम 1999 अधिक सक्षम करणार

                                                            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

          नागपूरदि. 8: महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्था) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 हा कायदा आणखी सक्षम करण्यात येईल. कायद्यात करावयाच्या सुधारणांसाठी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी अभ्यास गट नियुक्त करण्यात येईलअसे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.  

  

          पिरकोन (ता. उरणजि. रायगड) येथे रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून नागरिकांची केलेल्या फसवणुकीबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. 

  

          उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेपिरकोन येथील प्रकरणात गुंतवणूकदारांचे 39 कोटी रुपये बुडाले आहेत. या प्रकरणात पोलीस कारवाई करण्यात आली आहे. मुख्य आरोपीला सत्र न्यायालयाने जामीन दिला. मात्र या जामीनाविरुद्ध अपील करून पुन्हा मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्था) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. आरोपीकडून 9 कोटी रुपये रोखबँक खात्यातील दहा कोटी रुपये आणि दीड कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तीन महिन्यात सक्षम प्राधिकारी नियुक्त करून मालमत्तेची विक्री करण्यात येईल आणि ठेवीदारांचे पैसे परत करण्याची कार्यवाही करण्यात येईल. यामध्ये रोख रक्कमबँकेतील रक्कम तर तातडीने देता येईल. 

   

          उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणालेआर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून नागरिकांना अशा फसव्या योजनांमध्ये गुंतवणूक न करण्याबाबत प्रभावी जाणीव जागृती करून नागरिकांना सजग करण्यात येईल. अशाप्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेअंतर्गत विशेष अधिकारी नियुक्त करण्याबाबत तपासून कार्यवाही करण्यात येईल. सक्षम प्राधिकरणाने मंजूर केलेल्या योजनेतच नागरिकांनी पैसे गुंतवावेअसे आवाहनही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी केले. 

  

          अशा प्रकारच्या मोठ्या जाहिरातींबाबत आर्थिक गुन्हे शाखेला सांगून नियंत्रकांकडून नियमांची तपासणी करून त्यावर कारवाई करण्यात येईल. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये ठेवीदारांचे पैसे देण्याची तरतूद कायद्यात आहे. राज्यात पैसे दुप्पट करून देतोअधिकचे व्याज देतो असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात येत आहे.  त्यामुळे राज्यात बरेच नागरिक अशा योजनांमध्ये पैसे गुंतवतात. मात्र काही कालावधीनंतर  योजनेत ठरल्यानुसार गुंतवणुकदारांना रक्कम देण्यात येत नसून आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येते. वाढत्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेची व्याप्ती वाढवून अशा गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यात येईल,असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. 

  

          यावेळी झालेल्या चर्चेमध्ये विधानसभा सदस्य अशोक चव्हाणबाळासाहेब थोरातप्रशांत ठाकूररवींद्र वायकरनाना पटोले यांनी सहभाग घेतला.

0000

Featured post

Lakshvedhi