Monday, 20 November 2023

गंध फुलांचा गेला सांगून

 माझ्या भगिनी सौ स्नेहा भागवत, चिपळूण यांनी लिहिलेला उत्कृष्ट लेख, गंध आठवणीतले!

(चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या "स्नेहबंध" या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख)

माझे गंध - विश्व

सुवासाच आणि माणसाचं एक अतूट नातं आहे.. जशा आपल्या जाणीवा काळाच्या ओघात विकसित होत जातात तसा त्या त्या वेळच्या सुगंधातले भावार्थ आपल्या मनात दरवळून निघतात. आठवणी गणिक कधीही मनसोक्त हुंगावेत...

रंग,चव ,स्पर्श,नाद  आणि गंध. रंग  हे दीर्घकाळ फोटोत कैद राहतात.चवही काही काळ मनात रेंगाळते.स्पर्श काहीसे  पुसट होत जातात ,नाद मनात काही काळ गुंजन करतात ...पण गंध मनाच्या खोल कप्प्यात दडून बसतात..आपले श्र्वसनेंद्रिय सुमारे  ५०००० प्रकारचे गंध /वास लक्षात ठेवू शकत,हे विज्ञानाने शोधून काढलय. ह्या वाक्याचा मागोवा घेताना  माझं मन अर्थातच भूतकाळात रमलं... तिथे ठाण मांडून  बसले आहेत काही ठळक गंध ..अगदी लहानपणापासून नकळत्या वयात भावलेला वास म्हणजे ओल्या गवताचा वास. बालपणी अनुभवलेला ओलसर रानवट  वास रानगंध अजूनही मनात भरून राहिला आहे.माझी प्राथमिक शाळा आमच्या घरापासून दूर होती..चालत जावं लागे.मैत्रिणीचा चिमुकला हात हातात घेऊन रमत गमत शाळेत जाताना नकळत पणे आमचं निसर्ग वाचन सुरू असायचं.जून महिन्याच्या सुरवातीला कुठेतरी दूर पडलेला पाऊस आम्हाला कळे तो खरपुस मृद्गंध दरवळल्यावरच...पहिल्या पावसाच्या त्या अनुपम गंधाची सर कुठल्याच 

गंधाला नाही.तरीही या विश्र्वातील प्रत्येक गंध मला खुणावतो..आमच्या शाळेच्या गेट वर प्राजक्ताच झाड होत..सकाळची शाळा, तो हवेतला मिश्र नैसर्गिक पानाफुलांचा वास आणि त्यात मिसळलेला तो प्राजक्त फुलांचा स्वर्गीय वास..आजच्या घडीला पुन्हा ते सुख आपण घेऊ शकत नाही...कारण काळ खूप पुढे गेला..आयुष्यात असच होत काहीसं..काही गंध तसेच हवेत विरून जातात... छोट्या च असतात गोष्टी कधीकधी .अगदीच नगण्य.पण विसाव्याच्या क्षणी नेमक्या आठवतात..आम्ही मैत्रिणी १२ वी ते bsc  ला असताना हॉस्टेल ला राहायचो. तेव्हा दुपारी दोन वाजता प्रॅक्टिकल सुटायच फॉर्मलिन, असिटोन, सल्फरडाय ओक्साईड असे भयंकर वास घेऊनच . रूम वर येऊन आम्ही त्या बंद खोलीचा वास घालवायचो ते पानडी नावाची उदबत्ती लावून.त्याच ब्रँड ची उडबत्ती हवी असा आमचा आग्रह असायचा. मग गरम गरम मॅगी करायचो. तीव्र भुकेच्या वेळी सुद्धा त्याचा तो मिश्र गंध आजही मनात दरवळतो.. आता तर त्या मैत्रिणींची भेट्सुद्धा होत नाही..गंध मनात ठेवून चिमण्या चार दिशांना आपापल्या घरट्यात उडून गेल्या. 

आई रव्याचे- बेसनाचे लाडू करून द्यायची.पण बस मधून येताना त्याला एक वेगळाच  वास लागायचा.आम्ही त्या वासाला *प्रवासी वास* अस नाव ठेवलं होत.

गणेश चतुर्थीच्यादरम्याने भात पिकाला  फूलं येत असत..खूप दिवस मला ते फुल कधी दिसलच नाही..कारण ते आकाराने  खूप लहान असत..मग त्या वासाचा शोध घेता घेता त्या नाजूक फुलाचा शोध मला लागला.दिवाळीतील  पदार्थांचा खमंग गोडसर तळणीचा वास त्याची चव चाखण्यापूर्वीच नाकात शिरलेला असायचा .उटण्याचा, सुगंधी तेलाचा, मोती साबणाचा तो मोहक गंध दिवाळीची रंगत वाढवायचा..फटाके फोडल्यावरचा तो जळका वासही मनात ठाण मांडून बसला आहे..

गंध कोऱ्या पुस्तकाचा,पुस्तकात ठेवलेल्या बकुळीच्या गजऱ्याचा. अगदी उकळत असणाऱ्या चहाचा हवाहवासा गंध,कधी उदास सायंकाळी कॉफीचा दरवळ जीव मोहरतो नुसता... ..हा गंधवेडा जीव कुठे कुठे अडकतो.!! 

ब्रुट नावाचं एक अत्तर आहे .ते लेडीज की जेंट्स या फंदात न पडता मी आवडलं म्हणून  बिनधास्त वापरलेलं आहे.आता समजत की अत्तर सुद्धा वेगवेगळ असत..पण अजून कधी तो ब्रुट चा वास आला तर मन अलगद मागे रमून जात. 

नव्या कोऱ्या साडीचा वास असो.की कॉस्मेटिक्स चा वास!! मनभावन गंध आहेत

श्रावण महिन्यातील धूप, कापूर उदबत्तीचे सात्विक वास,हळदीच्या पानातील उकडीच्या  सुबक मोदकांचा दरवळ,

मार्गशीर्ष महिन्यात पडलेल्या दवाचा गंध. बागेतील फुलझाडावरची देवासाठी खुडून आणलेली फुल माझ्या हातावर वास ठेवून खुशाल देवाच्या चरणी रूजू व्हायची..

 होळीच्या दरम्याने पेटलेल्या होमांचे वास,

चैत्र गौरी हळदी - कुंकू समारंभाच्या वेळचा जाई जुई मोगरा  यांचा सुवास मनात अजूनही दरवळतो.

आंब्याच्या बागेतला -मोहोराचा वास,त्याच ऋतूत जंगलात कुठेतरी फुललेला सुवासिक करा (जंगली झाड)..किती दुरून  मोकळ्या माळराना वरूनसुंगध

यायचा तो!!वाऱ्याच्या मंद झुळूकीना सुगंधाचं कोंदण!..समुद्राचा खारा वास.ताज्या मासळीचा वास, पेट्रोलचा वास ..हे सुद्धा आठवणीत रुतून बसलेत.. सगळ्या सुगंधी फुलांप्रमाणे निशिगंधाची आणि सोनचाफ्याची फुल मला खूपच आवडतात..

पुढे मी ठरवलं होत की माझ्या लग्नात निशिगंधाच्या फुलांचा हार असावा..त्या गंधाच्या साक्षीने जीवनातील महत्वाचा संस्कार पूर्ण करावा..पण प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशीची ती आई- वडील नातेवाईकांची लगीन घाई,सगळ्यांचे मोलाचे सल्ले,नवीन नवीन चेहरे, सासरच्या माणसांचे औत्सुक्य, आनंदाचे संवाद. आणि भटजींनी केलेली घाई. होमाचा डोळ्यात शिरणारा धूर, यात मी तो गंध नाकभरून घ्यायचं विसरूनच गेले.

नंतर पुढे काही काळ नव्या संसाराच्या नव्या जबाबदाऱ्या सांभाळताना गंध हे प्रकरणच विसरून गेले.बाळाच्या चाहुलींमधे तर काही वासांचा अक्षरशः त्रास होऊ लागला. नंतर मात्र धूप ,धुरीचा , बेबी पावडरचा, वेखंड पावडर चा असे काही नवेच गंध मला मोहवू लागले..

कधी इतरांच्या लग्नसमारंभात माळलेला मोगऱ्याचा गजरा हवाहवासा वाटू लागला.. स्री चं संपूर्ण आयुष्य हे गंधाने व्याप्त आहे .खाली गोव्याकडे , दक्षिण भारतात गेलो तर सगळ्या स्त्रियांच्या डोक्यात फुल माळलेली दिसणारच..खर तर सुगंध हे वाण आहे त्याची लूट करण म्हणजेच आनंदाची अनुभूती घेणं..आता मुलाबाळांच्या पुष्कळशा जबाबदाऱ्या कमी झाल्याने पुन्हा नव्याने मी माझं हे गंधवेड जोपासायच ठरवलं आहे..तर लेख लिहिण्याच कारण अस की परवा घटस्थापनेच्या दिवशी सकाळीच विंध्यवासिनीच्या मंदिरात गेले होते.मला एकदम

सोनचाफ्याची फुल घ्यावी अस वाटल.पण सोनचाफ्याची फुल अशी कुठे मिळणार अचानक ?

देवळात गेले..एक काकू विंध्यावासिनीच स्तवन गात होत्या .. सकाळी लवकर गेल्यामुळे अजिबात गर्दी नव्हती.मी डोळे मिटून स्तवन  ऐकत होते..एवढ्यात मागून कुणीतरी आल..त्यांना गडबड असावी बहुतेक ..त्यांनी त्यांच्या हातातली भेट पुजाऱ्याकडे दिली ..देताना त्यातली दोन फुल माझ्या ओटीच्या ताटात पडली..ती चक्क 

सोनचाफ्याची ताजी  टपोरी सुवासिक फुल होती..मी देवीकडे भारावलेल्या डोळ्यांनी बघितल फक्त..

आणि पुन्हा एकदा नतमस्तक झाले..

©स्नेहा भागवत

कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख दस्ताऐवज २४ नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन

 कुणबीमराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख दस्ताऐवज

२४ नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन

 

            मुंबई दि. २० : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांकडे कुणबीमराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले उपलब्ध दस्ताऐवज/ पुरावे आहेत त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष मोहिमेदरम्यान २१ ते २४ नाव्हेंबर या कालावधीत सादर करण्याचे आवाहन मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) कल्याण पांढरे यांनी केले आहे.

            मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीद्वारे प्राप्त निर्देशानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांकडे १९४८ पूर्वीचे तसेच १९४८ ते १३ ऑक्टोबर १९६७ या कालावधीतील कुणबीमराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख असलेले पुरावेवंशावळशैक्षणिक व महसुली पुरावेजुन्या सनदाराष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुने अभिलेखे उपलब्ध असल्यास अशा नागरिकांकडून याबाबतचे उपलब्ध अभिलेख मुंबई जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील तळ मजल्यावरील नियोजन भवन येथे २१ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत विशेष कक्षात स्वीकारले जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी श्री. पांढरे यांनी दिली आहे. 

            अधिक माहितीसाठी ०२२-२२६६४२३८ किंवा gadmumbaicity@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधवा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

बाल स्नेही” पुरस्कारांचे २२ नोव्हेंबर रोजी होणार वितरण - राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन

 बाल स्नेही पुरस्कारांचे २२ नोव्हेंबर रोजी होणार वितरण

- राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा

 

            मुंबईदि.२० : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगमहिला व बाल विकास विभागयुनिसेफकम्युटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT), होप फोर चिल्ड्रन इंडियापुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी 'बाल स्नेही" पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

            हा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहनरिमन पॉइंटमुंबई येथे सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या कालावधीत होणार आहे. या कार्यक्रमास माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हे उपस्थित राहणार आहेत.

             राज्य बाल हक्क संरक्षण आयोग हा राज्यस्तरीय बाल हक्क संरक्षण अधिनियमान्वये स्थापित आयोग आहे. बाल हक्काच्या संरक्षणाची जपणूकप्रचार व प्रसार हा आयोगाचा उद्देश आहे. राज्यात बालकांचा सर्वांगीण विकासबाल हक्क संरक्षणत्यांची सुरक्षाआरोग्य इ. अनेक महत्त्वपूर्ण विषयावर जिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हापरिषदजिल्हा महिला व बाल विकास अधिकारीबाल संरक्षण कक्षविशेष बाल पोलीस पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारीबालगृहबाल कल्याण समिती इ. प्रशासकीय यंत्रणा व संस्था या सकारात्मक पद्धतीने मोलाचे कार्य पार पाडत आहेतअशा व्यक्ती व संस्थांना "बाल स्नेही" पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

             राज्यात अशाप्रकारे बालकांसाठी काम करणाऱ्या सर्व यंत्रणांकरिता बालस्नेही पुरस्कार सोहळ्याचे प्रथमच आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये राज्यातील विविध बालगृहांमध्ये वास्तव्य करून शिक्षण घेतलेले व सद्य:स्थितीत विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असलेल्या एकूण ७५ तरुण - तरुणींचा सत्कार करण्यात येणार आहे.

            या पत्रकार परिषदेला राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सायली पालखेडकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी (ठाणे) महेंद्र गायकवाड, मुंबई शहरचे बी. एच. नागरगोजे उपस्थित होते.

००००

बालकांचे हक्क, सुरक्षेवर भर देणारे 'बालधोरण' आखणार

 बालकांचे हक्क, सुरक्षेवर भर देणारे 'बालधोरण' आखणार

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

            मुंबईदि. २० : चौथ्या महिला धोरणाची लवकरच राज्यात अंमलबजावणी करणार तसेच बालकांच्या हक्क आणि सुरक्षेवर भर देणारे 'बाल धोरणही राज्यात तयार करण्यात येत असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

            कुलाबा येथील बेस्ट भवन येथे 'अर्पण'  स्वयंसेवी संस्था आणि बेस्टच्या  माध्यमातून १८ ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत 'बालकांचे हक्क व सुरक्षितता अभियानराबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टचे महाव्यवस्थापक विजय सिंगलअर्पणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापरीया उपस्थित होते.

            मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, आपल्या रोजच्या प्रवासादरम्यान बालकांना येणारे वाईट अनुभव कसे टाळता येवू शकतात यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था हा जनजागृतीपर चांगला उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमातून लहान मुलांना चांगले आणि वाईट स्पर्श याची माहिती द्यावी. बेस्ट बरोबर परिवहन विभाग, शिक्षण विभागामार्फत बालकांचे हक्क आणि सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबवावे. बालकांना लहानपणापासूनच लैंगिक शिक्षणासंदर्भात माहिती झालीत्यांच्यावर चांगले संस्कार झाले तर उद्याची चांगली पिढी निर्माण होऊ शकेल. आम्ही नागरिकांसाठी मुंबईची सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहोत. हा उपक्रम म्हणजे आमच्या मुलांचे सुरक्षित भविष्य संरक्षित करण्याच्या आमच्या सामूहिक बांधिलकीची साक्ष आहे असेही मंत्री कु.तटकरे यांनी सांगितले.

             महाव्यवस्थापक विजय सिंगल म्हणाले की, बेस्ट बसमधील प्रवास सर्वांसाठीविशेषतः आमच्या सर्वात छोट्या प्रवाश्यांसाठी सुरक्षित अनुभव देण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत. अर्पण सोबतआम्ही जागरूकता वाढवण्यासाठीकर्मचाऱ्यांना शिक्षित करण्यासाठी आणि शहरातील मुलांच्या कल्याणासाठी योगदान देण्यासाठी  काम करत राहू अशी ग्वाही श्री. सिंगल यांनी दिली."

            अर्पणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापरीया यांनी बेस्टच्या  माध्यमातून 18 ते 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत बालकांचे हक्क व सुरक्षितता अभियानात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.

            यावेळी बेस्टच्या बसेसमधून लहान मुलांच्या सुरक्षा आणि अत्याचार जनजागृतीपर पोस्टरचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

००००

गोपाष्टमी सोमवार 20 नवम्बर 2023 ? गौ माता धरती की सबसे बड़ी वैद्यराज है।

 ।।श्रीगणेशाय नमः।।


गोपाष्टमी सोमवार 20 नवम्बर 2023 ?


गौ माता धरती की सबसे बड़ी वैद्यराज है।

भारतीय संस्कृति में गौमाता की सेवा सबसे उत्तम सेवा मानी गयी है, श्रीकृष्ण गौ सेवा को सर्व प्रिय मानते हैं।


शुद्ध भारतीय नस्ल की गाय की रीढ़ में सूर्यकेतु नाम की एक विशेष नाड़ी होती है जब इस नाड़ी पर सूर्य की किरणे पड़ती हैं तो स्वर्ण के सूक्ष्म कणों का निर्माण करती हैं, इसीलिए गाय के दूध, मक्खन और घी में पीलापन रहता है, यही पीलापन अमृत कहलाता है और मानव शरीर में उपस्थित विष को नष्ट करता है।


गाय को सहलाने वालों के कई असाध्य रोग मिट जाते हैं क्योंकि गाय के रोमकोपों से सतत एक विशेष ऊर्जा निकलती है।


गाय की पूछ के झाड़ने से बच्चों का ऊपरी हवा एवं नजर से बचाव होता है।


गौमूत्र एवं गोझरण के फायदे तो अनंत हैं, इसके सेवन से केंसर व मधुमेह के कीटाणु नष्ट होते हैं।


गाय के गोबर से लीपा पोता हुआ घर जहाँ सात्विक होता है वहीं इससे बनी गौ-चन्दन जलाने से वातावरण पवित्र होता है इसीलिए गाय को पृथ्वी पर सबसे बड़ा वैद्यराज माना गया है, सत्पुरुषों का कहना है कि गाय की सेवा करने से गाय का नहीं बल्कि सेवा करनेवालों का भला अधिक होता है।

कही उजला तो कही अंधेरा

 


पाहुणा बंगल्यात आलाय ग, बघून जीव घाबरला ग

 बिबट्या वाघाला बेडरूम मधुन पकडले पहा नाशिक मधे डॉक्टर अहिरे यांच्या घरात -- स्वःता जॉगिंगला गेले होते आणि दरवाजा उघडा राहीला आणि एक पाहूणा थेट बेड रूम मधे वॉर्डरोब वरती


Featured post

Lakshvedhi