Monday, 13 November 2023

राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन

 राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने

कलाकृती पाठविण्याचे आवाहन

 

        मुंबईदि. 13 : राज्य कला प्रदर्शनाचे यंदाचे 63 वे वर्ष आहे. येत्या 20 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरी येथे होणाऱ्या प्रदर्शनासाठी राज्यातील कलाकारांकडून ऑनलाईन पद्धतीने कलाकृती मागविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी दिली आहे.

            रेखारंगकलाशिल्पकलाउपयोजित कलामुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी राज्याचे रहिवाशी असलेल्या कलावंतांकडून ऑनलाईन स्वरूपात कलाकृती मागविण्यात येत आहे.  कला संचालनालयाच्या www.doa.maharashtra या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात कलाकृती सादर करण्याचे आवाहन प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी केले आहे. प्रदर्शनातील पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी 50 हजार याप्रमाणे एकूण 15 पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 22620231/32 या क्रमांकावर संपर्क साधावा.

शेतकरी हिताच्या बांधिलकीचा प्रत्यय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पीएम कुसुम योजनेत महाराष्ट्र अग्रेसर मुंबई, दि. १३ : -

 शेतकरी हिताच्या बांधिलकीचा प्रत्ययपएम कुसुम योजनेत महाराष्ट्र अग्रेसर

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

            मुंबईदि. १३ : - पीएम कुसुम योजनेत देशात पहिले स्थान पटकावून महाराष्ट्राने शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीतील आपली बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला आहे. हे राज्य बळीराजाचे असून त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोतअशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त करून राज्याच्या ऊर्जा विभागाचे कौतुक केले आहे. महाराष्ट्राने सुमारे ७१ हजार ९५८ सौर पंप स्थापित केले आहे.

            उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या योजनेला यापुर्वीच गती देण्यात आली होती. त्यांच्या पुढाकाराने ऊर्जा विभागाने शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना प्रभावीपणे राबविली आहे. या अव्वल स्थानासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे पुढाकारासाठी आणि महाऊर्जाशी संबंधित अधिकारी-कर्मचारी यांचेही अभिनंदन केले आहे.

            मुख्यमंत्री यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे कीराज्यात नवीन व नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्राचाही आपण आपल्या शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याच्या कृषी पंपांसाठीही प्रभावीपणे वापर करून घेत  आहोत. यामुळे बळीराजाला सिंचनासाठी खात्रीलायक असा ‘ऊर्जा’ पर्याय उपलब्ध होईल. हा पर्याय कमी खर्चाचा आणि विश्वासाचा देखील आहे. ऊर्जा विभागाने केंद्राच्या यंत्रणांशी समन्वय साधून साध्य केलेले उद्दीष्ट हे केवळ एक टप्पा आहे. या योजनेतून अधिकाधिक शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळावेत असे शासनाचे प्रयत्न आहेत. यासाठी महाऊर्जाने आपल्या या कार्यप्रणालीत सातत्य राखावेतसेच शेतकऱ्यांमध्ये या ऊर्जा स्त्रोताविषयी आणखी जागरुकता निर्माण करावी. महाराष्ट्राचे स्थान कायमच अव्वल राहावे यासाठी प्रयत्न करावेतअशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

            केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाभियान’ ‘कुसुम’ योजनेत राज्यांना ९ लक्ष ४६ हजार ४७१ सौरपंप बसविण्यासाठी मान्यता दिली आहे. देशात यापैकी एकूण २ लक्ष ७२ हजार ९१६ सौर पंप स्थापित झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त सौर कृषिपंप राज्यात महाऊर्जामार्फत बसविण्यात आले आहेत.

            पीएम कुसुम योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाऊर्जामार्फत स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात आले आहे. महावितरणकडे कृषिपंप जोडणीसाठी अर्ज केलेल्या मात्र अनामत रक्कम न भरलेल्या शेतकऱ्यांना आता सौर कृषिपंप देण्याच्या योजनेवरही भर देण्यात येत आहे. महाराष्ट्राने अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण २०२० तयार करून या क्षेत्रात महत्वाचे पाऊल यापुर्वीच टाकले आहे. राज्याने पुढील पाच वर्षांसाठी पाच लाख कृषिपंपाना मान्यता दिली आहे.

0000


हळवा कोपरा : "प्रवास"

 *🌀 हळवा कोपरा : "प्रवास" 🌀*


बस सुटणार, एवढ्यात एक तरूण घाईघाईने बसमध्ये शिरला. बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. हातात गरजेपेक्षा अधिकच्या पिशव्यांनी त्याची तारांबळ उडाली होती. ती थोपविताना त्याने बाजूच्या सीटवर पिशव्यांसकट स्वतःला झोकून दिले. त्याच सीटवर अगोदरच बसलेल्या वृध्दाला अडचण होतेय का? याचा जराही विचार न करता, स्वतःच्या बाजूला आणि त्या वृध्दाच्या अंगावर जाईल इतपत सीटवरच पिशव्या कोंबल्या. तो वृध्द अधिकच अंग चोरून निमूटपणे बसून राहिला. इकडे बाजूच्या सीटवर बसून मीही तो सगळा प्रकार आतल्या आत चरफडत पहात होते.


साधारण तासभराच्या प्रवासानंतर तो तरूण सामानासह एका थांब्यावर उतरून गेला.

 

तो वृध्द आता थोडा सैल होऊन बसला. झालेल्या त्रासाचा लवलेशही त्या सुरकुतलेल्या चेह-यावर दिसत नव्हता.


न राहवून मी त्या वृध्दाशेजारी जाऊन बसले. आणि म्हणाले,


आजोबा, तो माणूस त्रास होईल असा वागला. स्वतःचे सामान अक्षरशः तुमच्या अंगावर रचले आणि जाताना साधे आभार मानण्याचेही सौजन्य दाखवले नाही. तुम्ही हे एवढे का सहन केले..?


चालत्या बसमधून खिडकीबाहेर पहात त्या आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभराने माझ्याकडे पाहिले. चेह-यावर समाधानाचे स्मित आणि नजरेत तृप्तीचे भाव बोलत होते. हलकेच माझ्याकडे बघत ते बोलू लागले,

 

*आपला प्रवास किती घडीचा असतो.?*

 

*निर्धारित थांबा आला, की तो किंवा मी उतरून जाणारच होतो.आता तो अगोदर उतरून गेला. मग एवढ्या अल्प घडीच्या प्रवासात वाद कशाला.?* 

*जमेल तेवढा सहप्रवास सुखाने, सामंजस्याने करायचा. त्याचा दोघांनाही त्रास होत नाही.!"*


आजोबा बोलत राहिले. मी स्तब्ध होऊन शब्द न् शब्द मनात साठवित राहिले.


 *बाळ, जीवनाचा प्रवास देखील असाच करता आला पाहिजे*


 *जीवन असतेच दो घडीचे!*


जन्माच्या वेळी वाटल्या जाणा-या मिठाईपासून या प्रवासाची सुरूवात होते आणि श्राध्दाच्या वेळी केलेल्या खिरीवर हा मिठाईचा प्रवास संपतो. बस, हाच जीवनाचा गोडवा..!

त्याचं विशेष कधीच लक्षात घेत नाही आपण..!


बाळ, या दोन्ही वेळी आपण त्या मिठाईचा स्वाद चाखू शकत नाहीत.

मग मधल्या काळात येणारे कडू-गोड क्षण. त्याचा सारखाच आनंद घेत जगता आले पाहिजे.!

अनेक माणसं भेटतात या प्रवासात.. 

त्या प्रत्येकाचे विचार, स्वभाव, आवडीनिवडी अगदी भिन्न असतात. त्यातली काही अपरिहार्य म्हणून जोडली जातात. त्यात गणगोत, नातलग आले. काही कसलीही नाती नसताना सहज भेटली तरी ती मनात घर करणारी असतात. आणि कधी जवळचे म्हणणारे साथ सोडतात. त्यासाठी कारणच हवं, असं काही नसतं. साथ देणारी माणसं निराळी, त्यांचा पिंड निराळाच असतो.

*आपण नेहमी लक्षात ठेवावं, अशी साथ देणारी माणसं कारणं सांगत नाहीत आणि कारणं सांगणारी कधी साथ देत नाहीत..!* 


जीवन असं विविध अंगांनी समृद्ध होत असतं ते जेवढं वाट्याला येईल, तेवढं आनंदानं जगून घ्यावं; म्हणजे कोणी सामानाचे असो, की विचारांचे. ओझे लादले तरी त्याचा त्रास होत नाही!


*आयुष्याच्या या प्रवासात निखळ प्रेम करणारी नाती जोडणं ही एक कला आहे. पण ती नाती टिकवून ठेवणं म्हणजे एक साधनाच असते.!"*


रस्ता मागे पडत होता. आजोबा कधी माझ्याकडे बघत, तर कधी खिडकीतून मागे पळणा-या झाडांकडे, खिडकीतून दिसेल तेवढे आभाळ नजरेच्या कवेत घेत होते.


थोडा वेळ स्तब्धतेत गेला. ते कसल्यातरी विचारात गढून गेले असावेत. काय बोलावे, म्हणून मीही शब्दाला शब्द जोडण्याची धडपड करत होते.

त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली,


"बघ ना, लहानपणी प्रवासात झाडे पळत असल्याचा भास व्हायचा. पुढे वय वाढत गेलं, की सुखाच्या बाबतीतही तेच होतं, वास्तविक दोन्ही तिथंच असतात. फक्त आपण धावत असतो.!


धावण्याची शर्यत जणू. त्यात कधी कधी धरून ठेवावे, असे हात निसटून जातात. लक्षात येतं, तेव्हा उशीर झालेला असतो..

पण एक मात्र खरं..

 

व पु एके ठिकाणी लिहितात,

*" जीवनात नात्यांची गरज एकट्याला असून चालत नाही. ती दोघांनाही असावी लागते.*

 

*कारण "भाळणं" संपल्यावर उरतं ते "सांभाळणं.."*


*हे सांभाळणं ज्याला जमलं, त्यालाच "जीवन जगणं " कळलं..!"*


असं बोलणं किती वेळ सुरू राहिलं असतं, काय माहित.

बसचा शेवटचा थांबा आला. दोघेही खाली उतरलो. दोन पावले चालत पुढे आलो आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं.

अचानक झालेल्या प्रकाराने ते क्षणभर गोंधळून गेले.., सावरले. दाटल्या स्वरांत म्हणाले,


*"पोरी अशी नाती आता दुर्मिळ झाली आहेत गं..!"* 


मीही उत्तरादाखल पुटपुटले,


*"आजोबा, ज्यांच्या पायावर डोकं टेकवावं, असे पाय देखील दुर्लभ झालेत हो..!"*


 दोघांच्या वाटा वेगळ्या दिशेने जाणा-या.

आपापली वाट चालता चालता आकृत्या धूसर होईपर्यंत दोघेही पुनः पुन्हा मागे वळून परस्परांना निरोपित राहिलो.

*" दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव..."*

 -----🙏🙏सुप्रभात🙏🙏

Sunday, 12 November 2023

2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर

 2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर

सांस्कृतिक कार्य विभागाच्या  प्रतिष्ठेच्या  विविध पुरस्कारांची घोषणा

पुरस्काराच्या क्षेत्रात विस्तार  आणि रकमेतही मोठी वाढ करीत असल्याचे समाधान

- सुधीर मुनगंटीवार

 

मुंबईदि. 10:  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून सन 2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज ही घोषणा केली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारनटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारसंगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कारभारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कारराज्य सांस्कृतिक पुरस्कार इत्यादी पुरस्कार सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत दरवर्षी देण्यात येतात. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली असून राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे तसेच पुरस्कारांच्या क्षेत्रांमध्येही विस्तार करण्यात आल्याचे समाधान असल्याचे  मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झालेला आहे. संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारास हा पुरस्कार देण्यात येतो.

 

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार 2022 पुरस्कारासाठी पं. उल्हास कशाळकर यांचे नाव घोषित झाले असुन, 2023 च्या पुरस्कारासाठी पं. शशिकांत (नाना)श्रीधर मुळ्ये यांची घोषणा करण्यात आली आहे. शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पण केले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केलीत्या कलाकारांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

 

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्काराच्या 2022 साठी सुहासिनी देशपांडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे तर 2023 साठी अशोक समेळ यांना पुरस्कार घोषित झाला आहे. मराठी रंगभूमीवर ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहेअशा कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.

 

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव 2022 चा पुरस्कार नयना आपटे यांना जाहीर झाला असून, 2023 च्या पुरस्कारासाठी पं. मकरंद कुंडले यांची निवड झाली आहे. ज्या कलाकारांनी संगीत रंगभूमीसाठी विशेष योगदान दिले आहे त्या कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

 

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2022 व 2023 ची ही घोषणा केली आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी असूनयामधील प्रत्येक वर्गवारी मध्ये दोन वर्षाचे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. नाटक या विभागासाठी 2022 चा पुरस्कार वंदना गुप्ते यांना तर 2023 चा पुरस्कार ज्योती सुभाष यांना जाहीर झाला आहे. उपशास्त्रीय संगीत वर्गवारीमध्ये 2022 चा पुरस्कार मोरेश्वर निस्ताने यांना जाहीर झालेला असून2023 चा पुरस्कार ऋषिकेश बोडस यांना जाहीर झाला आहे. कंठ संगीत प्रकारातील 2022 चा पुरस्कार अपर्णा मयेकर यांना घोषित झाला असून, 2023 चा पुरस्कार रघुनंदन पणशीकर यांना मिळाला आहे. लोककला क्षेत्रातील 2022 चा पुरस्कार हिरालाल रामचंद्र सहारे यांना जाहीर झाला असून, 2023 चा पुरस्कार कीर्तनकार भाऊराव थुटे महाराज यांना जाहीर झाला आहे. शाहीरी क्षेत्रातील 2022 चा पुरस्कार जयंत अभंगा रणदिवे यांना तर, 2023 चा पुरस्कार राजू राऊत यांना घोषित झाला आहे. नृत्य वर्गवारीतील 2022 चा पुरस्कार लता सुरेंद्र यांना जाहीर झाला असून, 2023 साठी सदानंद राणे यांची निवड झाली आहे. चित्रपट क्षेत्रासाठी 2022 चा पुरस्कार चेतन दळवी यांना तर, 2023 चा पुरस्कार निशिगंधा वाड यांना घोषित झाला आहे. कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील 2022 चा पुरस्कार संत साहित्यिक व लेखिका प्राची गडकरी यांना जाहीर झाला असून, 2023 चा पुरस्कार अमृत महाराज जोशी यांना घोषित झाला आहे. वाद्य संगीत क्षेत्रातील 2022 चा पुरस्कार पं. अनंत केमकर यांना मिळाला असून, 2023 साठी शशिकांत सुरेश भोसले यांची घोषणा झाली आहे. कलादान या प्रकारासाठी 2022 साठी संगीता राजेंद्र टेकाडे यांचे नाव घोषित झाले आहे तर, 2023 साठी यशवंत रघुनाथ तेंडोलकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तमाशा वर्गवारीतील राज्य सांस्कृतिक पुरस्कार बुढ्ढणभाई बेपारी (वेल्हेकर) यांना तर, 2023 चा पुरस्कार उमा खुडे यांना घोषित झाला आहे. आदिवासी गिरीजन वर्गवारी मध्ये 2022 साठी भिकल्या धाकल्या धिंडा तर, 2023 साठी सुरेश नाना रणसिंग यांची निवड करण्यात आली आहे.

 

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व पुरस्कार  प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केलेले आहे. या पुरस्कार प्राप्त कलाकारांकडून अजून मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक क्षेत्राची सेवा होईल अशी अपेक्षा मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

 

पुरस्कारांच्या रकमेत मोठी वाढ:

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विविध पुरस्कारांच्या रकमेत मोठी वाढ करत असल्याची घोषणा केली आहे. गानसम्राज्ञी  लता मंगेशकर पुरस्कारसंगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारनटवर्य प्रभाकर पंणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारभारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार या पुरस्कारांची रक्कम पाच लक्ष रुपये होतीती यापुढे दहा लक्ष रुपये होईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच राज्य सांस्कृतिक पुरस्काराची जी एक लाखाची रक्कम होती ती रक्कम तीन लाखाची करण्यात येत आहे अशीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

 

राज्य सांस्कृतिक पुरस्काराच्या क्षेत्रामधील व पुरस्कारांमधील वाढ:

सध्या 50 वर्षे वयावरील पुरुष कलाकारांना व 40 वर्षावरील महीला कलाकारांना राज्य सांस्कृतिक पुरस्कारा अंतर्गत 12 विविध क्षेत्रातील पुरस्कार दिले जातात. यापुढे पन्नास वर्षावरील पुरुष आणि महिला कलाकारांना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराच्या सध्याच्या क्षेत्रामध्ये वाढ करण्यात येत असूनही क्षेत्रे 24 करण्यात आलेली आहेत. वाढ करण्यात आलेल्या क्षेत्रांमध्ये प्रामुख्यानेप्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकारलोकनृत्यलावणी /संगीतबारीभारुड/गवळण /विधेनाट्यवाद्यनिर्मिती करणारे कलाकारझाडीपट्टी/खडीगंमत /दंडारदशावतार /नमन खेळे / वही गायनदुर्मिळ प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणाऱ्या व त्यांचे जतन वहन संवर्धन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थाप्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्थाध्वनी तंत्रज्ञ /संकलकसंगीत संयोजकवाईस ओवर आर्टिस्ट / निवेदक अशा विविध बारा क्षेत्राची वाढ राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये करण्यात आली आहे. या पुरस्काराची रक्कमही तीन लक्ष रुपये असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

युवा पुरस्कार:

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत युवक कलाकारांसाठी विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात यावी अशी अनेक संघटनांची फार पूर्वीपासूनची मागणी होती. या मागणीचा विचार करून राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील संग्रहालय वगळता इतर सर्व 23 क्षेत्रांमध्ये युवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित करण्यात येणार आहेत. युवा राज्य सांस्कृतिक पुरस्कारासाठी वयाची मर्यादा 25 ते 50 एवढी राहणार असूनया पुरस्कारांची रक्कम एक लक्ष एवढी असेल.

 

राज्यातील कलाकारांना विविध माध्यमातून प्रोत्साहन मिळण्याबाबतसांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच प्रयत्नशील राहत असूनभविष्यात कलाकारांसाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली आहे.

 

निवड प्रक्रियेसाठी समिती

            उपरोक्त सर्व प्रकारच्या पुरस्कारासाठी निवड समितीची निवड समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या निवड समितीचे अध्यक्ष सांस्कृतिक कार्यमंत्री ना. श्री. सुधीर मुंनगंटीवार हे असून त्यामध्ये प्रधान सचिव विकास खारगे व इतर नामवंत अशासकीय सदस्यांचा समावेश आहे. या समितीचे सचिव संचालक सांस्कृतिक कार्य हे आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाकडे आलेल्या शिफारसी व सदस्यांनी सुचवलेल्या शिफारसी यामधून पुरस्कारर्थीची निवड करण्यात आली आहे.

00000

 

                                                               

 


*एक दिवा लावावा

 *एक दिवा लावावा...*

*एक दिवा लावावा अंगणात*

*विद्रोहाचा...*

*त्यात असावा जळता कापूस*

*संघर्षाचा...*

*असावा घट्ट आवर त्याला*

*एकतेचा...*

*गोड धोड करावा*

*मुखात पक्वान शब्दांचा...*

*धमाका व्हावा, फटाक्यांचा नव्हे*

*इथल्या व्यवस्थेचा...*

*झगमग व्हावा लाइटिंगचा नव्हे*

*आदर्श विचारांचा...*

*सजले जावे अंगण जीवनाचे*

*इतिहासाच्या रांगोळीने...*

*मनावर चढले जावे*

*तोरण प्रत्येक त्यागाचे...*

*पुष्पहार असावे आणिक्*

*महापुरुषांच्या अमर कार्यांचे*

*तोडले जावे दरवाजे*

*गुलामीच्या दाराचे...*

*तेव्हाच होईल रक्षण लेका*

*तुझ्या माझ्या घराचे...*

*तू पेटव फुलबाजा हा*

*शोषण थांबेल पिसणाऱ्या देहाचा*

*म्हणून एक दिवा लावावा अंगणात*

*विद्रोहाचा...*      

 *दीपावली च्या हार्दिक     शुभेच्छा ...................*

 *लक्षवेधी मास मीडिया प्राय ली.

Saturday, 11 November 2023

कृषिमंत्र्यांच्या संवेदनशीलतेमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाचा भार झाला हलका..

 कृषिमंत्र्यांच्या संवेदनशीलतेमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या

दुःखाचा भार झाला हलका..

राज्यातील 2 हजार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना किटचे वाटप

 

मुंबई दि. 11 - राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाचा भार हलका झाला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना विविध शेती आणि संसार उपयोगी साहित्यांचे किट वाटप केले जात आहे.

 

धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार  कृषी मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने यामध्ये पुढाकार घेतला असून "शेतकरी कुटुंबास मदतीचा हात-संवेदन 2023" असे या उपक्रमाचे नामकरण करण्यात आले आहे.

 

या किटमध्ये परसबागेतील भाजीपाला बियाणेनॅनो युरियासूक्ष्म मूलद्रव्य तसेच विविध किटकनाशकांचा समावेश आहे. त्याचबरोबर दिवाळी फराळ साठी उपयुक्त साहित्य आणि महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे उत्पादित करण्यात येत असणाऱ्या विविध वस्तूंचा समावेश आहे.

 

राज्यातील विविध जिल्ह्यातील 2000 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना हे किट वाटप करण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यात किटचे  वितरण होणार आहे. ही किट पूर्णपणे लोकवर्गणीतून देण्यात आली आहे.

 

परळी येथे नुकतेच एका आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात कीट देण्यात आले.

00000


मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ने दी दीपावली की शुभकामनाएं

 मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ने दी दीपावली की शुभकामनाएं

महाराष्ट्र के समग्र विकास के स्वप्न को सब मिलकर साकार करें, दीपोत्सव का यह त्यौहार जीवन में सुख एवं समृद्धि लाए

 

मुंबईनवंबर ११:- हमारे महाराष्ट्र के सर्वांगीण विकास के स्वप्न को साकार करने के लिए तथा समूचे विश्व का ध्यान हमारे गौरवशाली प्रगति की ओर आकर्षित करने के लिए हम हर संभव प्रयास करने के प्रति कटिबद्ध है. यह दृढ़ संकल्प मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ने व्यक्त किया.

उन्होंने प्रार्थना की कि दीपोत्सव का यह पर्व सभी के जीवन को मंगलमय तथा समृद्ध बनाएं. सभी की आशाएं- आकांक्षाओं और संकल्पों को पूरा करें तथा उनकी मनोकामनाएं भी पूरी करें.

अपने शुभेच्छा संदेश में मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा हैहमारे महाराष्ट्र पर छत्रपति शिवाजी महाराज के आशीर्वाद की छत्रछाया है. उन्होंने राज्य का कार्यसामाजिक सुधार तथा आदर्श जन कल्याण कैसा हो इसकी सीख दी है. हमारी सरकार भी इसी पथ पर प्रगति कर रही है. उन्होंने कहा कि हमने ऐसे निर्णय लिए है जिसके कारण राज्य के विकास में तेजी आए तथा हमारे नागरिकों की जीवन शैली उन्नयित हो. उन्होंने कहा कि पाठशालाओं में जाने वाले छात्रों से लेकर वरिष्ट नागरिकों तकमां- बहनोंकिसानोंश्रमिक और मजदूरों के जीवन में इस विकास का प्रतिबिंब दिखाई पड़े इस दिशा में सरकार के प्रयास चल रहे हैं.

मुख्यमंत्री श्री शिंदे ने अपने संदेश में आगे कहाहमने महाराष्ट्र के सर्वांगीण विकास का सपना देखा है और इसका समग्र विकास ही हमारा लक्ष्य है. शिव छत्रपतिजिजाऊ मां साहब का यह महाराष्ट्र केवल देश के या अन्य राज्यों में नहींअपितु समूचे विश्व में इसका संज्ञान लिया जाए इस तरह की गौरवपूर्ण प्रगति करता रहेगा और सरकार इस दिशा में प्रयासरत है. इन प्रयासों में महाराष्ट्र कहीं भी पीछे नहीं रहेगा. इसके लिए भी प्रयास करने का वचन देता हूं.

उन्होंने आगे कहा हैराज्य की जनता के आयुष्य में खुशियां आएउनके सभी सपने साकार करने के साथ ही लोगों के कल्याण से संबंधित काम प्रमाणिक तरीके से किए जा रहे हैं और आगे भी सरकार यह काम करते रहेगी.

मुख्यमंत्री श्री शिंदे ने कहा कि दिवाली हमारे सभी के जीवन में आनंद और उत्साह ले आती है और हमें भी उतनी ही उत्साह के साथ इस त्यौहार को मनाना चाहिए. उन्होंने कहा कि हम प्रकृति के पुजारी है और हमारे सभी त्यौहार भी यही संदेश देते हैं. इसलिए साफ सफाई का ख्याल रखेंप्रदूषण टालने का यथासंभव प्रयास करें और त्योहारों का आनंद लेते समय पर्यावरण की ओर पूरी तरह ध्यान रखने की जिम्मेदारी हमारी ही है यह ना भूले. सभी को दीपोत्सव की शुभकामनाएं.

00000

 

 

Let us fulfill the dream of overall development of Maharashtra

Chief Minister Mr Eknath Shinde extends greetings on the occasion of Deepawali

 

“May the festival of light- Deepotsav bring happiness and prosperity in our lives”

Mumbai, November 11:- With the determination of working hard to fulfill the dreams of the overall development of Maharashtra and to make the world take notice of the glorious progress of our state, Chief Minister Mr Eknath Shinde has extended his greetings on the occasion of Diwali- The festival of lights.

He said that the Deepotsav may bring happiness and prosperity in our lives and may it help in fulfilling our expectations and aspirations.

In his greeting message Chief Minister Mr Shinde said, “We are having the umbrella of blessings of Chhatrapati Shivaji Maharaj in Maharashtra. He had provided us a ‘Model’ of ruling the state, about the social reformations and public welfare and we are marching ahead through the guidance and teachings of Chhatrapati Shivaji Maharaj. We have taken various decisions for accelerating the development of the state and uplifting the lives of the people of the state. We are making an all-out effort to see the reflection of the development in the lives of the common people- right from the school children to the senior citizens, women, farmers, laborers and peasants.”

The Chief Minister further said, “We have the dream of all- round development of Maharashtra. Its overall development is our motto. The Maharashtra of Shiv Chhatrapati, Jijau Maasaheb will be marching ahead not only among the states of the nation, but in the way that the entire world should take note of its glorious development. We are taking efforts in this direction. We will ensure with our hard work that Maharashtra will not remain back in any field. I pledge that this will be done.”

He exuded confidence that his government is working honestly for bringing happiness in the lives of the people of the state for fulfilling their dreams and for the interest of common people. He said that this hard work will gain more speed in the future. Mr Shinde said that the sparkling festival of Diwali always brings happiness and enthusiasm in our life, “Let us celebrate the festival of light with fervor and gaiety.”

Mr Eknath Shinde said that we are worshipers of nature and our festivals also convey the same message to the entire world. Let us all take due care of keeping our places clean and avoiding pollution while celebrating the festivals. He said that it is the responsibility of one and all to remember that we have to take care of the environment while celebrating the festivals. 

 

00000

 

 

 


Featured post

Lakshvedhi