Sunday, 15 October 2023

आठवडी बाजाराच्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ

 आठवडी बाजाराच्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ

                                                                    :मंत्री मंगलप्रभात लोढा

            मुंबईदि.१५: महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी 'आठवडे बाजारमहत्वाची भूमिका बजावतीलमुंबई महापालिकेने अत्यंत चांगला उपक्रम सुरू केला आहे. असे मत कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

            जोगेश्वरी (पूर्व) येथे महिला बचत गटांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंच्या विक्री साठी 'आठवडे बाजाराचेकार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उद्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते.

            मंत्री श्री.लोढा म्हणाले कीमहिला बचत खूप चांगल्या प्रकारे कार्यरत असून त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात जिथे जागा उपलब्ध होईल, त्या ठिकाणी असे उपक्रम राबविण्यात येतील. राज्य व केंद्र शासनाच्या योजनांचाही लाभ या बचतगटांना मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे,  असेही मंत्री श्री.लोढा यावेळी म्हणाले.  

            अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले कीगोरेगाव येथेही बचत गटांसाठी आठवडी बाजार लवकरच सुरू करणार आहोत. या बचतगटांना महापालिकेतर्फे वीस हजार रूपये अनुदान देण्यात आले असून बचत गटांना ब्रॅण्डींग करण्यासाठी महापालिकेतर्फे पूर्णपणे सहकार्य केले जाईल. गोरेगाव मध्ये नोकरी करणा-या महिलांसाठी वॅर्किंग वुमन हॉस्टेलही लवकरच सुरू होणार आहे. तसेच ज्या महिला घरकाम करतात अशा महिलांसाठी प्रायोगिक तत्वावर बालसंगोपन केंद्रही सूरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिलांना शासनस्तरावर  सहकार्य करण्यात येणार असून स्व:ताचा उद्योगव्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान अथवा कर्ज दिले जाईल. तसेच ज्या महिला घरी बसून शिलाई मशिन अथवा कांढप यंत्र चालविणे असे काम करू इच्छितात अशा पात्रता धारक महिलांसाठी १०२ कोटी रूपयांची तरतूदीतून त्यांना साहित्य वितरण करण्यात येईल, असेही डॉ.शिंदे म्हणाले.

            या कार्यक्रमाला नगरसेवक पंकज यादवअभिजित सामंतअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदेसंचालक (नियोजन) डॉ.प्राची जांभेकरएशिया पॅसिफिक लीड पब्लिक सेक्टर इनोवेशनच्या (यूएनडीपी) श्रीमती आफ्रिन सिद्दीकीपब्लिक डिप्लोमसी ऑफिसर (वाणिज्य दूत कार्यालयअमेरिका ) श्रीमती सीटा रैटा उपस्थित होते.

****

माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

                                         -मंत्री दीपक केसरकर

माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबईदि.15:  माजी राष्ट्रपती दिवंगात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालय येथे डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी वाचन संस्कृती रुजण्यासाठी आणि वाढविण्यासाठी राज्यात लवकरच वाचन चळवळ’ उभी करणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी केले.

 यावेळी शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव हर्षवर्धन जाधवअवर सचिव अजय भोसलेकक्ष अधिकारी ऐश्वर्या गोवेकरसहायक कक्षधिकरी राजेंद्र बच्छावविजय शिंदे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, वाचनाची चळवळ ही संपुर्ण देशात उभी रहावी यासाठी देशात रीड इंडिया ही चळवळ राबविली जात आहे. याच धर्तीवर राज्यात ही चळवळ उभी राहवी यासाठी लवकरच वाचन चळवळ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावर्षी उपक्रमाची सुरूवात मुंबई शहरातून करण्यात आली असून राज्यात तळागाळापर्यंत वाचनसंस्कृती पोहचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून 2 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील विद्यार्थी आणि तरूण पीढीपर्यंत राज्यातील  मराठी साहित्य, थोर महापुरूष तसेच शुर, सरदारांचा  इतिहास आणि जेष्ठ शास्त्रज्ञ यांचे कार्य समजावे यासाठी प्रत्येक शाळेत पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी सर्वाधिक वाचन केले जाते त्या ठिकाणी जास्त शास्त्रज्ञ घडतात. यासाठी मराठी भाषा भवनाचे काम लवकरच पुर्ण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विश्व मराठी साहित्य संमेलनातून मराठी भाषेची महती जगभर पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्‍यात येत असल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे उत्तम लेखक, शास्त्रज्ञ तर होतेच याचबरोबर ते उत्तम वाचकही होते.  वैज्ञानिक आणि राष्ट्रपती म्हणून ते जनसामान्यांशी जोडले गेले होते. त्यामुळे त्यांचे हे कार्य भावी पीढीसाठी दिशा देणारे ठरले. माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती आज राज्यात सर्वत्र 'वाचन प्रेरणा दिनम्हणून साजरी केली जात आहे. या दिनानिमित्त संपूर्ण राज्यात शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.           

०००

 

           


 

                                                            


भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती राजधानीत साजरी








 भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती राजधानीत साजरी

 

नवी दिल्ली दि. 15 :  माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्पअर्पण करून आदरांजली वाहिली.

0000


भवानी शक्तीपीठ हे संस्कारांचे उर्जा केंद्र - आमदार अतुल भातखळकर यांचे प्रतिपादन

 भवानी शक्तीपीठ हे संस्कारांचे उर्जा केंद्र

- आमदार अतुल भातखळकर यांचे प्रतिपादन

- भवानी आखाड्याचे उत्साहात उद्घाटन




मुंबई : भारतीय संस्कृतीचा विचार हा मानवतेचा आहे तसाच तो चांगल्या संस्काराचाही आहे.   अशा संस्काराचे एक उर्जा केंद्र म्हणजे भवानी शक्तीपीठ आहे. जगात भेकडाच्या अहिंसेला कोणी किंमत देत नाही. जो आखाड्यात उतरून बलोपासना करतो त्याच्याच अहिंसेला आणि नैतिकतेला जगामध्ये किंमत असतेअसे प्रतिपादन भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केले. मालाड पूर्वला दफ्तरी रोड परिसरातील भवानी आखाड्याचे उद्घाटन आमदार भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शक्तीपीठाचे प्रमुख राहुल जाधवगुरुजी उपस्थित होते.

आमदार भातखळकर म्हणालेबलाची उपसना करायला भारतीय संस्कृती सांगते म्हणजे भारतीय संस्कृती चूक असे आपल्याला शिकवले गेले. पण त्यांना भारतीय संस्कृती कळली नाही आणि भारतीय विचारही कधी कळला नाही. बलशक्ती ही चांगल्या कामासाठी वापरली जाते.  हाच शक्तीचा खरा अर्थ आहे. याच विचाराचे पुनरुज्जीवन भवानी आखाड्याच्या माध्यमातून होत आहे. बलाची उपासनासंस्कारनैतिकता हाच भारतीय संस्कृतीचा मूळ विचार आहे. लक्ष्मी आणि सरस्वतीच्या दारात जेव्हा दुर्गा उभी असते तेव्हाच लक्ष्मी आणि सरस्वती सुरक्षित असतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही हाच विचार दिला असल्याचे ते म्हणाले.

यावेळी आमदार भातखळकर यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या या आखाड्यात खेळाडूंनी मल्लखांबकुस्तीची प्रात्यक्षिके करून दाखवली. खेळाडू तसेच त्यांच्या प्रशिक्षकांचा सत्कार आमदार भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


म्हणून बिया सकट फळ 😂खाऊ नये

 म्हणून बिया सकट फळ 😂खाऊ नये


समृद्धी महामार्गावर वैजापूरजवळील अपघाताबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

 पालकमंत्रीगृहनिर्माणमंत्र्यांची घटनास्थळी आणि रुग्णालयास भेटजखमींची विचारपूस

 

            मुंबईदि. 15 :- छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपानराव भुमरे आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली त्यानंतर या अपघाताचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला.

            या अपघातातील जखमींवर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात आणि वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून   या रुग्णालयांत मंत्री श्री. भुमरे आणि श्री. सावे यांनी भेट दिली आणि जखमींची विचारपूस केली. तातडीचे आणि योग्य ते उपचार करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

0000


 

वृत्त क्र. 3423

समृद्धी महामार्गावर वैजापूरजवळील अपघाताबद्दल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त

नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना

-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

 

            मुंबईदि. 15 :- नागपूर समृध्दी महामार्गावर वैजापूर तालुक्यात जांबरगाव टोलनाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकचा झालेला अपघात अत्यंत भीषण होता. या अपघातात निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेहे वृत्त अत्यंत दुःखदवेदनादायी आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तर या अपघातातील जखमींवर तातडीनेसर्वतोपरी उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्याबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. 

            उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतातनागपूर समृध्दी महामार्गावर  वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला तर पंधरा जण जखमी झाले आहेत. हे सर्व प्रवाशी नाशिक परिसरातील असून देवदर्शन करुन ते नाशिककडे परतत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या भीषण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

0000

काव काव काव, काहीच नाहीच ठेवलात राव, आता उरलं सुरल खाव


 

Featured post

Lakshvedhi