Saturday, 14 October 2023

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातर्फेमुंबईत १७ ऑक्टोबरला सुनावणी

 राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातर्फेमुंबईत १७ ऑक्टोबरला सुनावणी

 

            मुंबईदि. १३ :- राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे महाराष्ट्रातील प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने मंगळवार, दि. १७ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता मुंबइतील सह्याद्री अतिथीगृह येथे सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. आयोगाकडे निवेदने सादर केलेल्या संघटनांच्या पाच ते सहा सदस्यांनी कागदपत्रे व पुराव्यांसह सुनावणीस उपस्थित रहावे, असे सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांनी कळविले आहे.

            राज्यातील लोधलोधालोधीबडगुजरवीरशैव लिंगायतसलमानीसैनकिराडभोयर पवारसूर्यवंशी गुर्जरबेलदारझाडेडांगरी व कलवार या जाती समूहांचा राष्ट्रीय मागासवर्ग यादीत समावेश करण्याबाबत आयोगाकडे निवेदन प्राप्त झाली आहेत. त्या अनुषंगाने या सुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.

००००

रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. नाक मात्र नक्की मोकळं होत..😂

 😊😇 रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. नाक मात्र नक्की मोकळं होत..😂  


ज्यांच्या आयुष्यात कायम चढ उतार येतात.. त्यांना ट्रेकिंगला जायची गरज नसते..😂


जिथे मारामारी करणं शक्य नाही.. तिथे टोमणे तरी मारूनच यायचं.. सोडायचं नाही अजिबात..😂 


गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना.. "तिकडे सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..? 😂 


आपल्या सोबत गाडीवर मागे बसलेली व्यक्ती फक्त Hmm Hmm करत असतो.. त्याला काहीच ऐकू येत नसतं..😂 .  


जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा..😂 


जेव्हा आपण Sad Mood मध्ये असतो.. तेव्हा गाणं गातो नंतर आपल्याला कळतं..की आपला आवाज तर आपल्या Condition पेक्षा पण खराब आहे.. 😂 😄 😅 😜


होमिओपॅथीची औषधं घेण्यातली मजा काही औरच...

औषधाच्या बाटलीतून ४ गोळ्या काढाव्या म्हटलं तर साबुदाण्याच्या ६ गोळ्या बाहेर पडतात. त्यातल्या पुन्हा २ गोळ्या परत टाकायला गेलो तर ४ गोळ्या बाटलीत परत जातात... 😂

या गदारोळात रोग्याचं लक्ष आजारावरून दूर होतं आणि तो लवकर बरा होतो...


😂खरं पाहिलं तर जगातला कुठलाच मनुष्य शाकाहारी नसतो ...

कारण , 

थोडं बहुत डोकं तर प्रत्येकच जण खात असतो.

😛😛😛😛😛😛


🌹 नोटा कागदापासून बनतात, कागद लाकडापासून बनतो आणि लाकूड झाडापासून मिळतं .......

याचा अर्थ असा की पैसे झाडाला लागतात. 😜😜👍👍


🌹 विवाहित माणसाला त्याच्या जीवनात किमान दोन खर्च तरी करावेच लागतात...

१. बायको गोरी असेल तर..

Sun Screen...

आणी

२. काळी असेल तर...

Fair & Lovely.....

😝😝😝😝😜


🌹 म्हणतात की, जो हसला, त्याचं घर बसलं !!

पण .........

ज्याचं घर वसलं, त्याला विचारा......

की तो मग केव्हा हसला??

😄😄😄😛😛😛


🌹 बायकोला समजून घेणं म्हणजे :~

32 GB चा 

Video Download करणं.

आणि ..........

31.5 GB Download

झाल्यावर Error मेसेज दिसणं !!!!

😝😝😝😝


🌹जगात केवळ तेच लोक साधेभोळे असतात, ज्याच्या मोबाइल मध्ये पासवर्ड नसतात.

😛😛😛😛😛😛


🌹 *कांही लोक whatsapp वर फक्त दोनच स्टेटस पोस्ट करतात....*

पहिलं:-- good morning....

दूसरं:-- good night .....

*असं वाटतं..... जणू whatsapp च्या दुकानाचं शटर उघडायची आणि बंद करायची जबाबदारी यांच्यावरच सोपवली असावी...... आणि मालाच्या खरेदी - विक्रीची जबाबदारी आपली.*

😜😜😜😒😒


🌹एक सर्व्हेनुसार, आजही आपल्या देशात......

*'तू प्यार है, किसी और का, तुझे चाहता कोई और है'*

हे गाणं वाजल्यावर १० पैकी ८ मुलं इमोशनल होऊन जातात ...

💔💔😂😂😝😝


🌹 भारतातले लोक इतके टॅलंटेड असतात की, गाड़ी हालवून सांगू शकतात ....

की गाडीत पेट्रोल किती आहे ?

😎😜😜😜😜


🌹 ट्रेनच्या आंतल्या गर्दीच्या 'चक्रव्यूहा' ला भेदण्याचं जे कौशल्य या "नमकीन अथवा शहाळी" विकणाऱ्यांपाशी असतं ते तर 'अभिमन्यु' पाशीही नव्हतं.

😊😛😖😆😉😄


🌹 माणूस सर्वात अधिक खुश तेव्हा होत असतो, जेव्हा रेल्वे फाटक बंद होत असतं त्याच्या आधीच तो आपली गाडी फाटका पलिकडे काढून घेतो.......

आई शप्पथ सांगतो की त्याला ओलंपिक रेस जिंकल्याचं समाधान मिळत असतं.

😂😂😂😂


🌹 अजून पर्यंत हे समजलं नाही की 

OK च्या ऐवजी K आणि GOOD MORNING च्या ऐवजी GM लिहिणारे, *आयुष्याचे २ सेकंद वाचवून काय करत असतील ?*

आणि .....ह्या hmmm ...वाल्यांनी तर फारच त्रास दिला आहे, असं वाटतं की आपण म्हशीशीच बोलतोय ! 

😜😜😃😛


🌹So confusing 😳

आई बाप आपल्या मुलीसाठी सुयोग्य स्थळ शोधताना दोन गोष्टींकडे लक्ष देतात...

पहिली म्हणजे मुलगा *खात्या पित्या घरातला असावा.....*

आणि दूसरी

तो *पिणारा - खाणारा नसावा ....*

हे कसं काय बुवा ....?? 

😳😄😂😂


*गळ्यात मंगळसूत्र पडलेलं असेल तर मुलीचं लग्न झालेलं आहे.....*

आणि

*चेहरा पडलेला असेल तर मुलाचं लग्न झालेलं असावं ,,,,*

😂😜😂😜😂😭😜


*🌹जीवन चांगलं जगायचं असेल तर हसणं आवश्यक आहे. ।।।🌹*

🙏🤗🙏🤗🙏🤗🙏

लातूर येथे दिव्यांगासाठी विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था

 लातूर येथे दिव्यांगासाठी विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था

- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा


            मुंबई, दि.१३ : राज्यातील दिव्यांगांसाठी स्वतंत्र विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था हरंगुळ (बु.) जि.लातूर येथे सुरू करण्यात आली असून, संवेदना या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत दिव्यांगांच्या दृष्टीने अडथळा विरहीत इमारत आहे. सुसज्ज दिव्यांग अद्यावत कार्यशाळा, यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. राज्यातील दिव्यांगांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊन व प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.


            मंत्री श्री.लोढा म्हणाले की, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या मान्यतेने राज्यातील दिव्यांगांसाठी स्वतंत्र विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था हरंगुळ (बु.) जि.लातूर येथे संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे केवळ देशातच नव्हे, तर जगभरात विविध स्वरुपाची तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. औद्योगिक उद्योगांना त्यांच्या मागणीप्रमाणे प्रशिक्षण व गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ पुरविणारी संस्था म्हणजे आयटीआय अशा संस्थांमध्ये प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगार संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. दिव्यांगांकरीता भारत सरकारने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ (आरपीडी अॅक्ट २०१६) निर्माण केला आहे. या प्रमाणे एकूण लोकसंख्येच्या ८ ते १० टक्के दिव्यांगांची संख्या आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यात दिव्यांगांकरीता स्वतंत्र आयटीआय सुरु करावयाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्ती आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा, दिव्यांग व्यक्तींच्या कुटुंबाचे पुनर्वसन व्हावे, समाजातील मुख्य प्रवाहामध्ये दिव्यांगांनी यावे याकरीता ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभी करण्यात आली आहे.


            संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हरंगुळ (बु.), जि.लातूर या संस्थेत राज्य तथा केंद्र शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली असून सन २०२३ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. व्यवसाय निहाय प्रवेशपात्र दिव्यांगाने प्रवेशासाठी संस्थेशी संपर्क साधावयाचा आहे. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, ड्रेस मेकींग, कम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा) हे व्यवसाय सुरु करण्यात आले आहे. संस्थास्तरावर प्रवेश घ्यावयाचा अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर, २०२३ आहे.


            प्रवेशासाठी टीसी, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, जातीचा दाखला, राष्ट्रीयत्वाचा दाखला, नॉनक्रिमीलेअर सर्टीफिकेट, उत्पन्नाचा दाखला, डोमिसीअल सर्टीफिकेट, पासपोर्ट साईझ फोटो, आधारकार्ड या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

कोळी समाजाचे प्रश्नसोडविण्यासाठी सहकार्य करणार

 कोळी समाजाचे प्रश्नसोडविण्यासाठी सहकार्य करणार

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

            मुंबई, दि. १३ : राज्यातील अनुसूचित जमातीतील महादेव कोळीटोकरे कोळीमल्हार कोळी या जमातीतील व्यक्तींना जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र मिळणेबाबत येणाऱ्या अडचणी आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

            राज्यातील अनुसूचित जमातीतील कोळी महादेवटोकरे कोळीमल्हार कोळी व इतर तत्सम जमातीतील व्यक्तींना जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र मिळणे या विषयाबाबत उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे बैठक झाली.

            या बैठकीस आमदार रमेश पाटीलआदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेआदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारूडमहसूल विभागाचे सहसचिव जमीर शेखसामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागूलकोकण विभागीय उपायुक्त अनिल साखरे आदी उपस्थित होते.

            उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्याआदिवासी विकास मंत्री यांच्याकडे राज्यातील महादेव कोळीटोकरे कोळीमल्हार कोळी या जमातीच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भातील शिष्टमंडळाने दिलेले निवेदन पाठविण्यात येईल. मंत्री आदिवासी विकास विभाग याबाबत बैठक घेतील. त्यांच्या बैठकीतील निर्णयाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविला जाईल. मुख्यमंत्री यांच्याकडे आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग व महसूल विभाग यांची याबाबत संयुक्त बैठक घेण्यात येईल. या समाजाला जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतचा निर्णय हा धोरणात्मक असेल.

००००

हरविलेल्या 19 हजारपेक्षा जास्त मुली, महिलांना परत मिळविण्यात पोलीसांच्या प्रयत्नांमुळे यश

 हरविलेल्या 19 हजारपेक्षा जास्त मुली, महिलांना

परत मिळविण्यात पोलीसांच्या प्रयत्नांमुळे यश

 

            मुंबईदि. 13  : राज्यात 05 महिन्यांत 29 हजार मुली व महिला बेपत्ता झाल्याचे वृत्त विविध माध्यमांतून  प्रसारीत झाले आहे. पणपोलीस विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार यात तथ्य नसल्याचे दिसून आले आहे. राज्यात यावर्षी मे2023 पर्यंत अपहरण झालेल्या मुलींपैकी 68.93 टक्के मुली परत मिळाल्या असून हरविलेल्या महिलांपैकी 63.10 टक्के महिला परत मिळाल्या आहेतअशी माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाच्या महिला व बाल अपराध प्रतिबंध शाखेने दिली आहे.

            राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये मुली व महिला हरविल्याच्या नोंदी घेण्यात येतात. मात्र पोलीस प्रशासनाने केलेल्या तपासाअंती जानेवारी ते ऑगस्ट 2023 दरम्यान हरविलेल्या 29 हजार 807 महिलांपैकी 19 हजार 89 महिला घरी परतल्या आहेत. त्याचप्रमाणे जानेवारी ते ऑगस्ट 2023 दरम्यान अपहरण झालेल्या 5 हजार 495 मुलींचा शोध घेण्यात आला आहे. मुली व महिला हरविल्याच्या तुलनेत त्यांचा शोध घेऊन घरी परतण्याचे प्रमाण अधिक आहे. महिलामुली हरविल्याची तक्रार नोंद झाल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी महिलेचा कसून शोध घेतात. तपासासाठी आवश्यक पर्यायांचा उपयोग करीत महिलेला शोधून घरापर्यंत आणण्यात येते.

            राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. राज्याचा गृह विभाग महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवित आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी गृह विभाग कटिबध्द आहे.

0000

छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सवाचे डिसेंबरमध्ये आयोजन

 छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सवाचे

 डिसेंबरमध्ये आयोजन

- मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

            मुंबईदि. 13 : देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे तसेच पारंपरिक क्रिडा प्रकार जपले जावेत यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात डिसेंबर 2023 मध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रिडा महोत्सवआयोजित केला जाणार आहे. महोत्सवाचे नियोजन देशी मैदानी क्रीडा संघटनांनी समन्वय साधून  काटेकोरपणे करावेअसे निर्देश कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

            देशी मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवीमालाडचे उपजिल्हाधिकारी धनाजी तोरस्करउपजिल्हाधिकारी संदीप निचीतक्रीडा भारतीचे श्रीकांत धर्माधिकारीडॉ. उत्तम केंद्रेसदस्य गणेश विचारे तसेच विविध देशी मैदानी  क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

            मंत्री श्री. लोढा म्हणालेआपले पारंपरिक क्रीडा प्रकार लुप्त होवू नयेत यासाठी अशा प्रकारचे क्रीडा महोत्सव केले जावेत, अशी मागणी वारंवार केली जाते. ही मागणी  पाहता डिसेंबर महिन्यात खो-खो,दंड बैठकमल्लखांबलंगडीविटी-दांडूलगोरीअखाडा कुस्तीमानवी मनोरा (पिरॅमिड)रस्सी खेचदोरी उडीसूर्यनमस्कारपावनखिंड दौडशरीरसौष्ठवतलवार बाजीढाल तलवार आदी मैदानी खेळांचा समावेश करुन पंधरा दिवसांच्या क्रीडा महोत्सवाचे नियेाजन करण्यात येणार आहे. क्रीडा महोत्सवास संपूर्ण सहकार्य केले जाईल. या महोत्सवा दरम्यान खेळाडूंना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात. नियोजन काटेकोरपणे करावे अशा सूचना पालकमंत्री श्री.लोढा यांनी यावेळी केल्या.

नवरात्रोत्सव काळात रात्री १२ पर्यंत मेट्रो सेवा सुरु राहणार

 नवरात्रोत्सव काळात रात्री १२ पर्यंत मेट्रो सेवा सुरु राहणार

 
आमदार भातखळकर यांच्या पाठपुराव्याला यश, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
 
मुंबई : हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा असलेला नवरात्रोत्सव हा सण रविवार दि. १५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो मार्गिका २ ए आणि मेट्रो मार्गिका क्रमांक ७ या दोन्ही मेट्रो सेवा उत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवाव्यात अशी मागणी भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून तसा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आजच प्रशासनाकडून नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२.२० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे लोकसेवेबाबत किती संवेदनशील आहे, याचा प्रत्यय पुन्हा यानिमित्ताने आला असून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देत असल्याचे आमदार भातखळकर म्हणाले.  
रविवार दि. १५ ते मंगळवार दि. २४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र तयारीला वेग आला आहे. या उत्सवात ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असतात. रात्री उशिरापर्यंत हे कार्यक्रम सुरु असतात. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मेट्रो मार्गिका २ ए म्हणजे अंधेरी पश्चिम ते दहिसर आणि मार्गिका क्रमांक ७ म्हणजे दहिसर पूर्व ते गुंदवली अशी सेवा उत्सव काळात रात्री १२ वाजेपर्यंत सुरु ठेवावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.

Featured post

Lakshvedhi