Monday, 21 August 2023

गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या अर्जांची छाननी तीन महिन्यांत पूर्ण करावी

 गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या अर्जांची छाननी तीन महिन्यांत पूर्ण करावी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


            मुंबई, दि. 21 : गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी. मुंबईत घरे देता यावी याकरिता घरांचा साठा वाढवावा, तसेच ठाणे व राजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश देतानाच गिरणी कामगारांच्या घरांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.


            सह्याद्री अतिथीगृह येथे गिरणी कामगारांच्या प्रश्नांसदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार धैर्यशील माने, राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, अतुल भातखळकर, सुनील राणे, प्रकाश आबिटकर, मंगेश कुडाळकर, प्रकाश आवाडे, माजी आमदार नरसय्या आडम, मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, गोविंदराज, एमएमआरडीएचे मुख्य नियोजनकार मोहन सोनार यांच्यासह गिरणी कामगारांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, गिरणी कामगारांना, त्यांच्या वारसांना हक्काची घरे मिळाली पाहिजे ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. त्यासाठी कार्यवाहिला गती देण्यात आली असून गेल्या काही महिन्यांत दोन टप्प्यांत गिरणी कामगारांना सदनिकेच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले आहे. गिरणीकामगार, त्यांच्या वारसांनी आता पर्यंत सुमारे १ लाख ७४ हजार अर्ज म्हाडाकडे केले आहेत. त्यांची छाननीप्रक्रिया अधिक गतिमान करण्याचे निर्देश दिले असून ही छाननीप्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पात्र- अपात्र संख्या निश्चित होऊ शकेल.


            कोन-पनवेल येथील घरांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी, तसेच ठाणे राजगोळी येथील सदनिकांची दुरुस्ती एमएमआरडीएने तातडीने हाती घ्यावी, जेणेकरून त्याठिकाणच्या पाच हजार घरांची लॉटरी काढण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोन - पनवेल येथील घरांची सोडतप्रक्रिया पूर्ण करुन कामगारांना दसऱ्यापर्यंत सदनिकांची चावी देण्यात यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.


            मुंबईत ‘टेक्स्टाईल मिल’ म्युझियमचे काम तातडीने सुरू करावे, अशा सूचना मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या. याठिकाणी गिरणी कामगारांच्या मुला-मुलींना काम देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


            मुंबई महानगर क्षेत्रात गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी कल्याण तालुक्यात सुमारे २१ हेक्टर जागा उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.


            प्रधानमंत्री आवास योजनेतून गिरणी कामगारांना घरे देण्याच्या विकल्पाबाबत यावेळी सादरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, सातारा येथील मूळ रहिवासी असलेल्या गिरणी कामगारांच्या घरांबाबत त्यांच्या इच्छेनुसार मुंबईबाहेर घरे देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.


            गेल्या काही महिन्यांत गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी ज्या गतिमानपणे कार्यवाही सुरू आहे, त्याबद्दल उपस्थित लोकप्रतिनिधी आणि गिरणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.


दिवाळी अंकासोबतची अनोखी भेट !(भवताल दिवाळी अंकाच्या

 



दिवाळी अंकासोबतची अनोखी भेट !(भवताल दिवाळी अंकाच्या
गोष्टी- २)

‘भवताल’ ने भेट म्हणून दिलेला दगड, पाणी, बिया आम्ही जपून ठेवल्या आहेत...’ मध्यंतरी एक वाचक भेटले. त्यांनी हे आवर्जून सांगितले. हे एकच वाचक नव्हेत, तर अनेक जणांनी ही भेट जपून ठेवली आहे. काय आहेत या भेटी, त्याच्यामागचे धोरण / कारण आणि त्या प्रत्यक्षात कशा अस्तित्त्वात आल्या? त्याचीच ही गोष्ट.


नागरिकांना निसर्ग, पर्यावरणाच्या घटकांशी जोडणे, त्याद्वारे त्याबाबतची सजगता निर्माण करणे आणि त्या अनुषंगाने काही तरी कृती करण्यासाठी प्रवृत्त करणे हा ‘भवताल’ च्या विविध उपक्रमांमागचा प्रमुख उद्देश. हे करण्यासाठी लोकांना आपल्या उपक्रमांकडे आकर्षित करावे लागते. मग दिवाळी अंकाच्या दृष्टीने असे काय करता येईल, जेणेकरून लोक अंकाकडे आणि त्याच्या विषयांकडे आकर्षित होतील?... याबाबत सतत विचार सुरू असतो. त्यातून काही भन्नाट कल्पना प्रत्यक्षात आल्या आहेत. त्याची सुरुवात झाली, २०१६ च्या ‘दगडांच्या देशा’ या खडक विशेषांकापासून.


खडक या विषयावर संपूर्ण अंक काढणे ही कल्पनाच लोकांना आश्चर्याची वाटली होती. त्याच्यासोबतची भेट हा तर मोठा चर्चेचा विषय बनला आणि ‘भवताल’ बद्दल अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. आपला खडक समजून घेताना त्याची छोटीशी झलक पाहता आली, हाताळला आली तर किती मजा येईल? असा विचार माझ्या मनात आला. लहानपणी कधीतरी पुस्तकांच्या प्रदर्शनात एका पुस्तकमध्ये असाच एक खडा पाहिला होता. कदाचित, तेसुद्धा मनावर कुठेतरी कोरले गेले असेल. दगडांच्या अंकावर काम करत असताना हा विचार उफाळून आला.


काय देऊया - कसं देऊया? याचे नियोजन सुरू झाले. अंकासोबत काय द्यायचे? याची स्पष्ट कल्पना होती. आपल्याकडे आढळणाऱ्या काळ्या खडकात अनेक पोकळ्या असतात. त्यामध्ये अतिशय सुंदर दिसणारे, विविधरंगी स्फटिक सापडतात. प्रत्येक स्फटिक दुसऱ्यापेक्षा वेगळा. असे हजारो-लाखो, नव्हे अगणित स्फटिक खडकात दडलेले आहेत. तेच अंकासोबत द्यायचे, हे पक्के केले.


पण हे आणायचे कुठून? त्या वेळी एकच नाव डोळ्यापुढे आले- श्री. महंमद मक्की. ते आपल्याकडील खनिजांचे, स्फटिकांचे संग्राहक. महाराष्ट्रातील खनिजांबरोबरच जगभरातील विविध खनिजे, जीवाश्म व अशा कितीतरी धमाल गोष्टींचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आपल्याकडील खनिजे ते जगभरच्या प्रदर्शनांमध्ये पोहोचवतात. काही खनिजे एक्पोर्टही करतात. विशेष म्हणजे हे सारं लोकांनी पाहावं, हाताळावं, त्याचा अनुभव घ्यावा यासाठी ते प्रयत्नशील असतात. प्रदर्शने भरवतात, असे संच शाळांना भेट देतात. त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडे फारच उत्कृष्ट स्फटिक असतात. त्यातून निघालेले, उरलेले छोटे तुकडे आमच्यासाठी पुरेसे होते. त्यांनाही ही कल्पना आवडली आणि त्यांच्याकडील असे उरलेले मटेरियल देऊ केले.


काय द्यायचे ते मिळवले खरे, पण अंकासोबत द्यायचे कसे? त्यावर बराच काथ्याकूट करावा लागला. तरीही मार्ग निघत नव्हता. श्री. मक्की यांनी सुचवल्यानुसार एकांकडून सव्वा इंच बाय सव्वा इंच या आकाराच्या जाड कागदाच्या दर्जेदार डब्या विकत घेतल्या. दुसरीकडे खड्यांपैकी आकर्षक, पण आकाराने लहान (डबीत बसतील असे) स्फटिक निवडले. ते डब्यांमध्ये चिकटवले. अर्थातच, ही प्रक्रिया वेळखाऊ होती आणि खर्चिकसुद्धा! पण त्यातूनही मार्ग निघाला. पुढचा प्रश्न होता. या डब्या स्फटिकांसकट अंकासोबत द्यायच्या कशा?


त्यासाठी अंकाच्या पॅकिंगवर काम करावे लागणार होते. स्फटिक असलेली डबी अंकातच खाच करून बसवावी, असा विचार आला. प्रत्यक्षात अंकाची जाडी आणि डबीची जाडी यांचा मेळ बसत नव्हता. डबी जवळपास दुप्पट जाडीची होती. अंकाची छपाई, बाइंडिंग, पॅकेजिंग अशा गोष्टींची जबाबदारी असणारा श्री. सतीश पड्ये विविध कल्पना लढवित होता, पण प्रश्न काही सुटत नव्हता. अंक छापून घेणे, त्याच्याच बरोबरीने यातून मार्ग काढणे अशी दुहेरी जबाबदारी त्याच्यावर होती. शेवटी त्यानेच मार्ग काढला. पुठ्ठा व फोम वापरून एक पॅड तयार केले. त्यात अंक बसवला. त्याच्या वरच्या बाजूला पुठ्ठ्यामध्ये खाच करून डबी बसेल अशी रचना केली. फोम व अंक यांची एकूण जाडी स्फटिकाच्या डबीइतकी भरत होती. हे सारं एकत्र राहण्यासाठी वरून कव्हरची आवश्यकता होती. शिवाय अंकाचे कव्हर आणि त्याच्यासोबतचा स्फटिकही दिसायला हवा... त्यामुळे नाइलाजाने कव्हर म्हणून प्लास्टिकची पिशवी वापरावी लागली.


मार्ग निघाला. अंक, स्फटिक, सारं व्यवस्थित बसलं. अंकाच्या या पॅकची जाडी दुप्पट झाली. पण त्याला इलाज नव्हता. हे सारं वाचकांच्या पसंतीला उतरलं. अनेक जण ‘भवताल’ च्या दिवाळी अंकाशी जोडले गेले. त्याच वेळी काहींनी प्लास्टिक वापरल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. आम्हीही ती नम्रपणे स्वीकारली.


पुढच्या वर्षी देवराई विशेषांक होता. त्याच्यासोबत आपल्याकडील वनस्पतींच्या (वेली, वृक्ष, झुडपे) यांच्या बिया देण्याचे ठरले. एका छोट्या डबीत अशा पाच प्रकारच्या बिया दिल्या. त्यातल्या गुंजेच्या बियांमुळे सर्वच बियांमध्ये रंग भरला गेला.


त्या पाठोपाठच्या अंकाचा विषय होता, परंपरागत जलव्यवस्था! या निमित्ताने सिंहगडावरील सुमारे सातशे-आठशे वर्षे जुन्या देव टाक्याचे पाणी देण्याचे ठरले. त्यानुसार काचेच्या कुप्यांमध्ये पाणी भरून ते प्रत्येक अंकासोबत भेट म्हणून दिले.


अंकातील दर्जेदार मजकूर, त्याची मांडणी उत्कृष्ट, छपाईसुद्धा कुठेही तडजोड नाही हे केल्यावरही अशी भेट देण्याचा विचार... म्हणजे, वाचकांना अधिकाधिक देण्याची इच्छा! त्यातून त्यांना आनंद मिळत असेलच, पण ‘भवताल’ टीमला त्यापेक्षा कितीतरी जास्त आनंद मिळतो, हे निश्चित!


- अभिजित घोरपडे


संस्थापक - संपादक, भवताल


 


(‘भवताल’ ची जडणघडण आणि प्रवासाबाबत वाचकांना माहिती देण्यासाठी हा उपक्रम...)


( क्रमश: )



--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and 

sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

नाग पंचमी पर वर्ष में सिर्फ एक बार खुलता है नागचन्द्रेश्वर मंदिर, यहां है नाग देवता की दुर्लभ प्रतिमा

 *🙏🛎️🔱🌿नागचन्द्रेश्वर महादेव 🌿🛎️🙏


नाग पंचमी पर वर्ष में सिर्फ एक बार खुलता है नागचन्द्रेश्वर मंदिर, यहां है नाग देवता की दुर्लभ प्रतिमा*


21 अगस्त 2023 को नाग पंचमी का त्योहार मनाया जाएगा, जानते हैं नाग देवता के उस मंदिर के बारे में जो बर्ष में सिर्फ एक बार खुलता है श्रावण माह के शुक्ल पक्ष की पंचमी तिथि यानी 21 अगस्त 2023 को नाग पंचमी का त्योहार मनाया जाएगा, सनातन धर्म में इस दिन भगवान शिव जी के साथ सर्पों की पूजा का विधान है, हिंदू धर्म में नाग पूजनीय माने गए हैं, जहां भगवान शिव के गले में विराजते हैं तो शेषनाग पर भगवान विष्णु शयन करते हैं, आइए जानते हैं नाग देवता के उस मंदिर के बारे में जो वर्ष में सिर्फ एक बार खुलता है....

*नागचंद्रेश्वर मंदिर की रोचक जानकारी*

*विश्व प्रसिद्ध ज्योतिर्लिंग में से एक है महाकालेश्वर मंदिर, उज्जैन में स्थित महाकाल मंदिर में की तीसरी मंजिल पर मौजूद है नागचंद्रेश्वर मंदिर ये मंदिर भक्तों के लिए बर्ष में सिर्फ नागपंचमी के दिन 24 घंटे के लिए ही खुलता है।*

*नागचंद्रेश्वर मंदिर 11*वीं शताब्दी में बनाया गया था, यहां फन फैलाए नाग की एक अद्भुत प्रतिमा है जिस पर शिवजी और मां पार्वती बैठे हैं,*


जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना

 जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना

पायाभूत सुविधा प्रकल्प, गुंतवणुकीला चालना


 


        मुंबई, दि. 21 : जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 दिवसांच्या जपान दौऱ्यावर रवाना झाले, असून या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत.


Show quoted text

जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना पायाभूत सुविधा प्रकल्प, गुंतवणुकीला चालना

 जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस 5 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना

पायाभूत सुविधा प्रकल्प, गुंतवणुकीला चालना


        मुंबई, 20 ऑगस्ट -जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 दिवसांच्या जपान दौऱ्यावर रवाना झाले, असून या दौऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपानमधील अनेक वरिष्ठ मंत्र्यांना भेटणार आहेत.


            जायका, जेट्रो, जेरा यासारख्या अनेक गुंतवणूकदारांच्या ते या दौऱ्यात भेटी घेणार असून, जपान-इंडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनाही ते भेटतील. जायकाने राज्यातील अनेक प्रकल्पांना अर्थसहाय्य केले आहे हे राज्यातील गुंतवणुकीसंदर्भात काही कंपन्यांसोबत त्यांच्या बैठकासुद्धा होणार आहेत. जपानमधील बुलेट ट्रेन आणि टोकियो मेट्रो ऑपरेशन्सला या दौऱ्यात ते भेटी देणार आहेत. 20 ते 25 ऑगस्ट या कालावधीत आयोजित या दौऱ्यात वाकायामा या शहरालाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत.


यापूर्वी केला होता 2015 मध्ये दौरा


            यापूर्वी सप्टेंबर 2015 मध्ये श्री. फडणवीस यांनी जपानचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात ओसाका प्रांताला भेट दिली होती. जायकासोबत चर्चा केली होती. याकोहामा पोर्टला भेट दिली होती तसेच तेथील अनेक मंत्र्यांशी बैठका झाल्या होत्या.


            जायकासोबत विविध प्रकल्पांसाठी झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांना जायकाने वित्तपुरवठा केला. यात मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, बुलेट ट्रेन, मेट्रो-3, नागपूर नागनदी शुद्धीकरण अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. याच भेटीनंतर 2017 मध्ये जायकासोबत एमटीएचएलसाठी करार झाला होता.


00000

Sunday, 20 August 2023

केळिच्या सालिचे फायदे..🍌*

 ❄️❄️- *केळिच्या सालिचे फायदे..🍌*


  १) केळ्याच्या सालिचा आतिल भाग चेहरा व मानेवर रगडा व अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवा. नियमित केल्याने त्वचेवरिल सुरकुत्या कमि होतात.


२) पिकलेल्या केळिचि साल दातांना लावलि तर दातांचा पिवळेपणा जाऊन मोत्यासारखे चमकतात.


३) केळ्याचि साल हळूवार चेहर्यावर चोळल्यास चेहर्यावरिल मुरूमे, पुटकूळ्या नाहिश्या होण्यास मदत 

 होते. सालित अँटि आँक्सिडंटस् असल्याने

  त्वचेवरचे पिगमेटेशन, वांग, डाग, दूर होतात , जर केळिचि साल नियमितपणे घासलि तर चेहर्यावर..


४) केळिच्या सालितले सफेद धागे काढून त्यात अँलोव्हेरा जेल मिसळून डोळ्याखालि लावल्यास

 काळे वर्तुळ नाहिसे होतात.


५) एखाद्या मधमाशिने डंख, दंश, केला तर त्याठिकाणी केळिचि साल बारिक करून लावल्यास आराम पडतो.


६) शरिरात एखाद्या ठिकाणि वेदना होत असेल तर. त्याठिकाणि ३० मिनिटांपर्यंत केळिचि साल लावावि, आराम पडतो.


७) चेहर्यावरिल सुरकुत्यांमूळे त्रस्त असाल तर, केळिचि साल मिसळून चेहर्यावर लावल्यास सुरकुत्या नष्ट होतात. हि पेस्ट ५ मिनिटे चेहर्यावर लावून ठेवावि. व नंतर धूवा.


८) त्वचेवर कुठेहि मस किंवा चामखिळ असल्यास केळिचि साल तिथे चोळावि. काहि दिवसातच मस, किंवा चामखिळ निघून जाते.


९) प्रदूषणामुळे किंवा संगणकावर जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांवर ताण येतो. अश्यावेळि केळिची साल डोळ्यावर ठेवावि, थंडावा मिळतो. व त्यात असलेले

 विटामिनस् , डोळ्यांना मिळतात, डोळे रिलँक्स होतात.

 

१०). एका संशोधनातून सिद्ध झाले कि, केळ्याच्या सालिचा antidepressant म्हणून वापर करता येतो.

  तुम्हि केळिचि साल पाण्यात उकळवून ते पाणि प्यालात तर त्याचा प्रभाव एखाद्या antidepressant. असतो..

 ❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️

चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग दूर करण्यासाठी खास सोयाबीन मास्क!*

 🏵️ *चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग दूर करण्यासाठी खास सोयाबीन मास्क!*


✅ सोयाबीनला प्रोटीनचं स्त्रोत मानलं जातं. त्यामुळे आहारात याचा समावेश केल्याने अनेक फायदे होतात. पण काय तुम्हाला माहीत आहे की, सोयाबीन तुमचं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठीही मदत करतं. सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए सोबतच अनेक मिनरल्स असतात. जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. 


✅ *कसा बनवाल सोयाबीन मास्क?*

सोयाबीन मास्क तयार करण्यासाठी अर्धी वाटी सोयाबीन रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी सोयाबीन पाण्यातून वेगळे काढा. हे सोयाबीन बारीक करा आणि एका वाटीमध्ये काढा या सोयाबीन पेस्टमध्ये थोडी मलाई आणि अर्धा चमचा हळद घाला. आता यात एक चमचा मध घाला. सर्व गोष्टी चांगल्या एकत्र करा.


✅ *कसा कराल वापर?*

सर्वातआधी चेहरा केवळ पाण्याने किंवा माईल्ड फेसवॉशने स्वच्छ करा. आता चेहऱ्यावर आणि मानेवर सोयाबीन मास्क लावा. हा मास्क चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे राहू द्या आणि त्यानंतर हलक्या हाताने स्क्रब करा. नंतर पाण्याने चेहरा धुवा. तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आलेला दिसेल. 


✅ *सोयाबीन फेस मास्कचे फायदे*

सोयाबीन फेस मास्क चेहरा आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. कारण यातील तत्व त्वचेतील पीएच लेव्हल ठिक करतात. याने चेहऱ्याची मालिश केल्यास चेहऱ्यावरील डेड स्कीनही दूर होते. याचा सतत वापर केल्यास रंग उजळतो आणि त्वचा चमकदार होते. 


✅ *सोयाबीनमध्ये असतं व्हिटॅमिन इ*

सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन इ भरपूर प्रमाणात आढळतं. याने डेड स्कीन दूर होऊन नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. तसेच त्वचा उजळते आणि ग्लो येतो.....

🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️

Featured post

Lakshvedhi