Thursday, 10 August 2023

अमृत महोत्सव सांगतेनिमित्त राज्यपालांची पंचप्रण प्रतिज्ञा

 अमृत महोत्सव सांगतेनिमित्त राज्यपालांची पंचप्रण प्रतिज्ञा

 

            मुंबईदि. ९ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमाच्या सांगता सोहळ्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना  पंचप्रण’ प्रतिज्ञा दिली. 

            सन 2047 पर्यंत देशाला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याची व गुलामगिरीची मानसिकता दूर करण्याचीदेशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगण्याचीदेशाची एकता मजबूत राखण्याची तसेच नागरिक म्हणून आपले कर्तव्यपालन करण्याची प्रतिज्ञा राज्यपालांनी  यावेळी सर्व उपस्थितांना दिली.

0000

 

Maharashtra Governor gives Panch Pran Pledge to

Raj Bhavan staff, officers

 

 

            Mumbai, 9th Aug : Maharashtra Governor Ramesh Bais gave the 'Panch Pran' Pledge to the officers and staff of Raj Bhavan Mumbai as part of the nation wide “Meri Mati Mera Desh” Campaign today.

            The Governor gave the Panch Pran Pledge wherein all those present resolved to make India a developed nation by 2047, eliminate the mentality of slavery, take pride of India's rich heritage, uphold unity and solidarity, fulfil duties as citizens, and respect those who protect the nation. 

            The Campaign is the concluding event of the 'Azadi ka Amrit Mahotsav,' which began on 12th March , 2021.

0000

 


रायगड जिल्ह्यातील बस स्थानकांमधील विकासकामे सुरू करा

 रायगड जिल्ह्यातील बस स्थानकांमधील विकासकामे सुरू करा

महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे

 

            मुंबईदि. 9 रायगड जिल्ह्यातील तळेश्रीवर्धनरोहामांडगांवम्हसाळा आदी बस स्थानकांमध्ये रस्त्यांचीइमारतींची कामे करणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यामधील बस स्थानकांमधील रस्त्यांचे क्राँक्रीटीकरण व इमारतींच्या कामांसंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करावा. जेणेकरून  निधीची तरतूद करता येईल, असे महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी आज सांगितले.

              यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. बैठकीला राज्य परिवहन महामंडळाच्या नियोजन व पणन विभागाचे महाव्यवस्थापक श्री. बामणेमध्यवर्ती कार्यालयाचे विभाग नियंत्रक श्री. चवरेविभाग नियंत्रक दिपक गोडे आदी उपस्थित होते.

             मंत्री कु. तटकरे पुढे म्हणाल्या कीगोवा महामार्गावर पेणजवळ एसटी महामंडळाने प्रवाशांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी जागा दिलेल्या हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय होत नाही. त्यामुळे पेणजवळील अशा हॉटेल्सवर एसटी डेपोनिहाय गाड्यांचे नियोजन करावे. जेणकरून हॉटेल व्यावसायिकांना उत्पन्न मिळून महामंडळालासुद्धा उत्पन्न येईल. त्यानुसार एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित हॉटेल व्यावसायिकांसोबत बैठक घेऊन मार्ग काढावाअशाही सूचना त्यांनी दिल्या.  यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मत्स्य व्यवसायात चंद्रपूर जिल्हा आदर्श जिल्हा म्हणून विकसित करणार

 मत्स्य व्यवसायात चंद्रपूर जिल्हा आदर्श जिल्हा म्हणून विकसित करणार


- मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार


            मुंबई, दि. ९ : मत्स्यव्यवसाय हा रोजगार व संपन्नता देणारा उत्तम व्यवसाय आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायात चंद्रपूर जिल्हा आदर्श जिल्हा म्हणून विकसित करण्याकरता योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज आयोजित बैठकीत प्रशासनाला दिले.


            यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, उपसचिव कि.म. जकाते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एम.पी.काळे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मत्स्यव्यवसायासाठी मच्छिमारांचे चांगले प्रशिक्षण, उत्तम पायाभूत सुविधा, चांगला पतपुरवठा, उत्तम मार्केटिंग सहाय्य यांची जोड मिळाल्यास मत्स्यपालन व मत्स्यव्यवसाय हा एक उत्तम उद्योग म्हणून जिल्ह्यात विकसित होऊ शकतो. यासंदर्भातील सादरीकरण आजच्या बैठकीत मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्यासमोर करण्यात आले. या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेऊन जिल्हा मत्स्यव्यवसाय विकास आराखडा वेगाने तयार करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.


           याबरोबरच आदिवासी विकास योजना आणि शहर परिवहन सेवेचा मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला.


आदिवासी बांधवांना दुग्धव्यवसायासाठी म्हशी देणार


            आदिवासी बांधवांना दुग्धव्यवसाय करता यावा म्हणून जिल्ह्यातील आदिवासी बहुल क्षेत्रात म्हशी व गायी वाटप योजनेची अंमलबजावणी करणार असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.


            दुग्ध व्यवसायाबाबत तज्ज्ञांकडून आदिवासी बांधवांना प्रशिक्षण देण्याबाबतचे नियोजन प्रशासनाने करावे. त्याचबरोबर जिल्ह्यातील चारा उपलब्धता, दुधाळ जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता पशू चिकित्सा यंत्रणा अधिक सक्षम करणे, पशू चिकित्सा यंत्रणेतील पदे भरणे, शेण आणि गोमूत्रापासून सहउत्पादने घेणाऱ्या संस्था व कंपन्यांसोबत बोलणी करून आदिवासींना उत्पन्नाचे अधिकचे स्त्रोत उपलब्ध करुन देणे, पतपुरवठ्याकरता बँकासोबत बैठका घेणे, याबाबत वेळेवर कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या.


चंद्रपूरात लवकरच शहर परिवहन बससेवा


            चंद्रपूर येथे अत्याधुनिक विद्युत बसेसच्या माध्यमातून लवकरच शहर परिवहन बससेवा सुरू करणार येणार असल्याची माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली. या शहर बससेवेमुळे चंद्रपूर शहरातील सामान्य नागरिकांची मोठी सोय होणार आहे. शहरातील प्रदूषण आणि वाहतूक कोंडीवर सार्वजनिक वाहतूक हाच उत्तम तोडगा आहे. राज्यातील सर्वोत्तम शहर परिवहन बससेवा चंद्रपूरात निर्माण करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने कार्यवाही कररावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला ‍दिले.


             शहर बस सेवेसंदर्भातील सादरीकरण यावेळी त्यांच्यासमोर करण्यात आले.



सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाससलग दुसऱ्यांदा आयएसओ मानांकन

 सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाससलग दुसऱ्यांदा आयएसओ मानांकन

 

            मुंबईदि. 9 : नावीन्यपूर्ण संकल्पनाविविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणीभेटायला येणाऱ्या नागरिकांच्या अडचणींचे निरसन व्हावेयासाठीची सुयोग्य यंत्रणा आणि कार्यपद्धती यांस अनुसरून राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि त्यांचे कार्यालय काम करीत आहे. सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा होऊन काम करणारे अर्थात मंत्री कार्यालय सलग दुसऱ्यांदा आयएसओ प्रमाणपत्राचे मानकरी ठरले आहे. मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात माझी माती माझा देश’ अभियानाच्या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवारआयएसओचे अधिकारी व्ही. बालकृष्णन यांच्या हस्ते मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले.

            गेल्या पाच वर्षांत मंत्री म्हणून श्री. मुनगंटीवार यांच्या कार्यालयाला मिळालेला हा दुसरा बहुमान आहे. मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे निरसन व्हावेत्यांना विनाकारण ये-जा करावी लागू नयेयासाठी त्यांच्या तक्रारींचीनिवेदनाची दखल घेत त्यांच्या कामासंदर्भात पाठपुरावा करण्याची कार्यपद्धती या कार्यालयात अवलंबली जात आहे. मंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी ते अगदी लिपिकापर्यंत कामाची कार्यपद्धती ठरवून देण्यात आली असून त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत असल्याबाबत स्वत: मंत्री श्री. मुनगंटीवार सातत्याने आग्रही असतात आणि त्यासंदर्भात पाठपुरावाही करतात. त्यांच्या याच कार्यपद्धतीची दखल आयएसओ प्रमाणपत्राद्वारे सलग दुसऱ्यांदा घेण्यात आली आहे.

            या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री अतुल सावेमुख्य सचिव मनोज सौनिकमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

            आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करुन कौतुक केले.

००००

आदिवासी पारंपरिक नृत्य आणि वाद्यांच्या गजरात

 आदिवासी पारंपरिक नृत्य आणि वाद्यांच्या गजरात

विधानभवनात साजरा झाला जागतिक आदिवासी दिन

 

            मुंबई, दि. 9  : जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पारंपरिक नृत्य आणि वाद्यांच्या गजराने विधानभवनाचा परिसर दुमदुमून गेला. दिंडोरीपेठसुरगाणा या तालुक्यांतून आलेल्या आदिवासी बांधवांसमवेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पारंपरिक नृत्यांवर ठेका धरला आणि गायनात सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला.

            यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेमृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडमाजी आमदार राजू तोडसाम यांनी सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडाक्रांतिवीर राघोजी भांगरे आणि क्रांतिवीर देवाजी राऊत यांच्या प्रतिमेस सर्वांनी पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून वंदन केले.

            उपाध्यक्ष श्री. झिरवाळ यांनी सर्व मान्यवरांचे तसेच अधिकारी वर्गाचे पारंपरिक आदिवासी पध्दतीने तसेच क्रांतिवीरांच्या मूर्ती भेट देऊन स्वागत केले. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव-१ (कार्यभार) जितेंद्र भोळेसचिव-२ (कार्यभार) डॉ. विलास आठवले यांच्यासह महाराष्ट्र विधानमंडळातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००


 


Wednesday, 9 August 2023

आदिवासींनी उच्च शिक्षणासाठी योजनांचा लाभ घ्यावा

 आदिवासींनी उच्च शिक्षणासाठी योजनांचा लाभ घ्यावा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा पाड्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी


रस्त्यांचे जाळे तयार करणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


पालघर, दि. 9 : जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या सहाय्याने सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुरू केलेल्या शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना नमन करून जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवाना शुभेच्छा दिल्या.


            आज पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील राजीव गांधी मैदान येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागामार्फत राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.


            आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, श्रीमती कुमुद गावित, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खा. राजेंद्र गावित, आ.शांताराम मोरे, आ.श्रीनिवास वनगा, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप कुमार व्यास हे व्यासपीठावर उपस्थित होते. 


               मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, शासनाने २५० आदिवासी आश्रम शाळांचा कायापालट केला आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परिक्षेचे मार्गदर्शन करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. 100 विद्यार्थ्यांना पीचडीसाठी छात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गावात आदिवासींची लोकसंख्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे. तिथे १७ संवर्गातील भरती ही स्थानिकांमधूनच करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधा आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी रस्त्यांची उभारणी करण्यात येत आहे.


            समाजातील प्रत्येक घटकाला मान, सन्मान आणि विकासाची संधी देण्याचे काम प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या प्रेरणेने होत आहे. आज ऑगस्ट क्रांती दिन आहे. तसेच ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमांचा शुभारंभही झाला आहे. भारताच्या स्वतंत्र चळवळीत आदिवासी बांधवांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण असल्याचे सांगून त्यांनी शहीद आदिवासींना नमन केले.


देशाचा गौरव जपण्यात आदिवासींचे काम अविस्मरणीय - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


आदिवासींची प्राकृतिक परंपरा जपणारी जीवनशैली आहे. देशाचा गौरव जपण्यात आदिवासींचे काम अविस्मरणीय आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. त्यांनी आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मूल निवासींसाठीचा हा दिवस असल्याचे सांगितले. भगवान बिरसा मुंडा यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचाही गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.


देशाच्या अर्थसंकल्पात आदिवासींसाठी पाचपट आर्थिक तरतूद वाढविली आहे. आदिवासी विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या मदतीने प्रत्येक पाडा हा रस्त्याने जोडणार आहे. पालघर आणि गडचिरोली या आदिवासी बहुल भागात प्राधान्याने रस्त्याचे जाळे विकसीत केले जाणार आहे. शबरी योजनेची तरतूद तीन पटीने वाढविली आहे. प्रत्येक आदिवासी बांधवास पक्के घर मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सुमारे दोन लाख आदिवासींना वनहक्काचे पट्टे वाटप करण्यात आले आहेत. शासकीय रूग्णालय, उत्तम शाळा, पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून होत असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.


आदिवासींच्या विकासासाठी निधी तातडीने देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार


            आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक असलेला निधी तातडीने वितरीत केला जाईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 


            उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आदिवासी बांधव हे खऱ्या अर्थाने निसर्गाचे तसेच संस्कृतीचे संवर्धन करित आहेत. बहुसंख्य आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आठ तालुका असलेल्या पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. हा जिल्हा पर्यटन स्थळ म्हणून अनेकांच्या पसंतीस उतरत असल्याचे त्यांनी सांगितले. पालघरमधील पर्यटन, खाद्यपदार्थ आणि कलेच्या माध्यमातून आदिवासींच्या विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.


            पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, आदिवासी पाडे हे मुख्य रस्त्यांना जोडणे आवश्यक आहे. या कामाला प्राधान्य देणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम तथा पालघर जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. जिल्हात ५६१ विकास कामं सुरू असून ८० अमृत सरोवर तयार होत असल्याचेही मंत्री श्री चव्हाण यांनी सांगितले.


आदिवासींच्या पाड्यांना जोडणारे रस्ते,त्याच्यासाठी घरे, शिक्षणाच्या सुविधा, धान खरेदी, दाखले वितरण या सर्व योजना पारदर्शकपणे राबवून आदिवासींना जास्तीत जास्त लाभ देणार असल्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.


आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वेगळेपणा, मानवतेबद्दल असीम श्रध्दा, निसर्गावरील अतुलनीय प्रेम आणि अत्युच्च प्रामाणिकपणा व पारंपरिक निखळ गुणांचा गौरव म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर ०९ ऑगस्ट हा "जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस महाराष्ट्रातील समग्र आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस आहे.


या कार्यक्रमामध्ये विविध शासकीय योजनांचा मान्यवरांच्या हस्ते लाभ वाटप कार्यक्रम व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आदिवासी बांधवांचा गुण गौरव करण्यात आला. यावेळी चाळीस प्रकारचे पारंपरिक नृत्य प्रकार सादर करण्यात आले


कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी विकास आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जव्हार श्रीमती नेहा भोसले यांनी केले.


माजी आमदार रवींद्र फाटक, आदिवासी विकास आयुक्त श्रीमती नयना गुंडे, विवेक पंडीत, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, अपर आयुक्त आदिवासी विकास बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, डहाणू प्रकल्प अधिकारी संजीता महापात्रा, जव्हार प्रकल्प अधिकारी नेहा भोसले, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब फटांगरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थ‍ित होते. 


०००



 

वास्तव सत्य.* 💧💧💧💧💧

 *वास्तव सत्य.*

💧💧💧💧💧💧💧💧


*वटारलेले डोळे पाहून दबणारी बायकोच आता डोळे वटारून पाहू लागली की समजून घ्यावे कि, " पृथ्वीवरील आपले अवतारकार्य शेवटच्या टप्यात आहे. "*


       *कमावत्या मुलांच्या आवाजात कडकपणा आला असेल तर समजून घ्यावे कि, आपण आता कौटुंबिक जबाबदारीतून हळूहळू अंग काढून घ्यावे.*

  

   *बसल्या बसल्या ह्या शेंगातील दाणे काढा ,असे जेव्हा सुनबाईने म्हटले तर समजून घ्यावे की, बॉस नावाचे पद यांनी खारीज केले आहे.*


     *वय वर्ष 60 नंतर कुणी आपल्याशी चांगले वागेल ही अपेक्षा ठेवू नका. भाऊबंदकीचे नाते कुटूंबाचे फाळणीबरोबरच संपुष्टात आले , नातेवाईक पैसे देणे / घेणे वादातून संपले, पत्नीचा ओढा नकळत न टिकणाऱ्या मुलांच्या नात्याकडे वळू लागला , कार्यप्रसंगात नातेवाईक भेटतात, केवळ रामराम होतो ,फारशी चौकशी होत नाही, तुम्ही मात्र मनात उजळणी करत असता , ह्याला मी किती मदत केली होती.*

 

      *सगळे कटू अनुभव जमा झाले असतील , कुणी नाही कुणाचे हा अनुभव गर्द झाला असेल.*


         *नाती बिघडली, सबंध बिघडले , वाट्याला एकटेपण आले , आता कुणाचे फोन येत नाहीत , दुखावलेले मन कुणाला फोन कर असेही म्हणत नाही.*


    *तरीपण एक नात अजून टिकलेलं आहे , एक फोन चालु आहे , ते नातं मुलीचं, तितक्यात मुलीचा फोन येतो , ती विचारते--- पप्पा गेले होते का दवाखान्यात ? औषधं घेतलीत का ? काय म्हणाले डॉक्टर ? जेवण झाल काय ? नाना प्रश्न काळजीचे , आस्थेचं विचारणं, जिव्हाळ्याचे हेच एकमेव नात.* 


         *थोडा पश्चातापही होत असतो , मुलींसाठी काहीतरी करण्यात मी कमी पडलो, त्यांच्यासाठी काहीतरी करायचे राहून गेले, कसे होणार त्यांचे ?*


     *लोक मुलगा झाला कि, स्वतःला भाग्यवंत समजतात, मला असे वाटते ,ज्यांना मुली आहेत ते खरे भाग्यवंत होत. एरवी दोन तीन मुले जेव्हा वडिलांना कुणाकडे ठेवण्यावरुन भांडत असतात तेव्हा झालेली चूक सुधारण्या पलीकडे गेलेली असते. मुलगी म्हणते काळजी करू नका मी आहे.* 

           💐💐💐💐

  *रिटायर्ड सदस्यांना समर्पित*


*Join us on WhatsApp Humbaa 

Featured post

Lakshvedhi