Wednesday, 26 July 2023

मुंबईतील अनधिकृत ठरविलेल्या शाळांना अटी शर्तींच्या अधीन राहून मान्यता देण्याबाबत शासन सकारात्मक

 मुंबईतील अनधिकृत ठरविलेल्या शाळांना

अटी शर्तींच्या अधीन राहून मान्यता देण्याबाबत शासन सकारात्मक


- मंत्री उदय सामंत


            मुंबई, दि. 25 : बृहन्मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रातील प्रामुख्याने झोपडपट्टीतील 269 खाजगी शाळा शासनाची अथवा महानगरपालिकेची मान्यता नसल्याने अनधिकृत ठरविण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या शाळांवरील कारवाई रद्द करून स्वयं अर्थसहाय्यित कायद्यांतर्गत अटी व शर्तींच्या अधीन राहून शाळांना मान्यता देण्याबाबत शालेय शिक्षण मंत्र्यांनी बैठक घेऊन शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याची माहिती, मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. याबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.


            सदस्य कपिल पाटील यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री.सामंत म्हणाले, मुंबईतील शिक्षण संस्थांना महानगरपालिकेमार्फत जल जोडणी देण्यात आली आहे. त्यासाठी नियमानुसार पाणीपट्टी कर आकारण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना 27 वस्तु महानगरपालिकेच्या निधीतून देण्यात येतात. झोपडपट्टी क्षेत्रातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक अनुदानित शाळांनी ऐच्छिक मागणी केल्यास त्यांना या वस्तू देण्याबाबत विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


            या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, विलास पोतनीस, सत्यजित तांबे, सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला.


0

वसंतराव नाईक तांडा - वस्ती सुधार योजनेतीललोकसंख्येचा निकष बदलण्यासंदर्भात लवकरच बैठक

 वसंतराव नाईक तांडा - वस्ती सुधार योजनेतीललोकसंख्येचा निकष बदलण्यासंदर्भात लवकरच बैठक


- मंत्री अतुल सावे


            मुंबई, दि. 25 : वसंतराव नाईक तांडा - वस्ती सुधार योजनेतील लोकसंख्येचा निकष बदलण्याची मागणी होत आहे. त्या अनुषंगाने या अधिवेशनाच्या कालावधीत बैठक घेण्यात येईल, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली.


            सदस्य योगेश कदम यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. सावे यांनी उत्तर दिले.


            ते म्हणाले की, राज्यातील ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांच्या तांडे/ वाडी/ वस्त्यांना प्राथमिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी दलित वस्ती सुधार योजनेच्या धर्तीवर सन २००३-०४ या वित्तीय वर्षांपासून "वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजना सुरु करण्यात आली आहे.


            या योजनेंतर्गत पंचवार्षिक आराखड्यात समाविष्ट असलेल्या कामांचा प्राधान्यक्रम व निकड विचारात घेऊन विकास कामांची निवड केली जाते. तांडा/ वस्त्यांच्या विकासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. या योजनेंतर्गत तांडा / वस्तीमध्ये विद्युतीकरण (हायमेक्स, पथदिवे, एलईडी बसविणे), पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, गटारे, शौचालये तसेच समाज मंदिर/वाचनालये व शक्य असेल तेथे मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे, सभागृह / समाजमंदिर या पायाभूत सुविधांची कामे करण्यात येतात. मात्र, या कामामध्ये लोकसंख्येचा निकष ही अडचण असेल, तर ती बदलण्याच्या अनुषंगाने बैठक घेऊन प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात येईल, अशी माहिती, मंत्री श्री. सावे यांनी यावेळी दिली.


            सदस्य नितेश राणे, रोहित पवार यांनी यावेळी चर्चेत भाग घेतला.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गअपघात कमी करण्यासाठी सुविधांची संख्या वाढविणार

 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गअपघात कमी करण्यासाठी सुविधांची संख्या वाढविणार


- मंत्री दादाजी भुसे


            मुंबई, दि. २५ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय येणाऱ्या काळात महामार्गावरील सुविधांची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत दिली.


            सदस्य सुनील केदार यांनी, या महामार्गावर झालेल्या अपघातासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. भुसे यांनी उत्तर दिले.


            ते म्हणाले की, समृद्धी महामार्गाचे दोन टप्पे आता कार्यान्वित झाले आहेत. या मार्गावर दररोज किमान १७-१८ हजार वाहने प्रवास करतात. आतापर्यंत ३३ लाखांहून अधिक वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला आहे. अजून दोन टप्पे बाकी असून त्यातील एक टप्पा सप्टेंबर २०२३ पर्यंत आणि शेवटचा टप्पा मे -२०२४ पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.


            मंत्री श्री. भुसे म्हणाले की, या महामार्गावर जे अपघात झाले त्यामध्ये विहीत मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवणे, वाहन चालविताना दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हर टेकिंग करणे, लेन शिस्त न पाळणे, सुस्थितीत वाहने नसणे, वाहन अवैधरित्या पार्क करणे, वाहतूक सुरक्षततेविषयी काळजी न घेणे तसेच ड्रायव्हिंग करताना चालक सतर्क नसणे, वाहनामध्ये तांत्रिक बिघाड होणे, टायर फुटणे, वाहन चालकाचा डोळा लागणे, वाहनावरचे नियंत्रण सुटणे, व्यसन करून वाहन चालविणे, आग लागणे, मागून दुसऱ्या वाहनाने धक्का मारणे, वाहनाचा तोल जाऊन उलटणे ही अपघात होण्याची प्रमुख कारणे असल्याचे ते म्हणाले.


            मंत्री श्री. भुसे म्हणाले की, हा महामार्ग इंडियन रोड काँग्रेसच्या संबंधित मार्गदर्शक तत्वानुसारच संकल्पित केला असून वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, महामार्ग पोलिसांमार्फत व आर.टी.ओ. मार्फत अपघात होऊ नये यादृष्टीने वाहन चालकांना वेळोवेळी समुपदेशन केले जात आहे. वेग मर्यादा न पाळणाऱ्या वाहन चालकांवर दंड आकारणी करण्यात येत आहे. आवश्यक दिशादर्शक चिन्हे, सूचना फलके, माहिती फलके, वेगमर्यादा दर्शक फलके लावणे, लेन मार्किंग करणे, क्रॅटआईज व डेलिनेटर्स लावण्याच्या उपाययोजना केलेल्या आहेत. वन्य प्राण्यांची व मोकाट जनावरांची ये-जा होऊ नये म्हणून क्रॅश बॅरिअरच्या बाजूने चेन लिंक फेन्सिंग उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.


            समृध्दी महामार्गावर वाहनांचे टायर तपासणी करिता पथकर नाक्यांवर आर.टी.ओ विभागास जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या महामार्गावर रहदारी आणि घटना नियंत्रणासाठी इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्ट‍िम (ITS) स्थापित केली जाणार असल्याची माहितीही मंत्री श्री. भुसे यांनी दिली.


            सुरक्षिततेच्या अनुषंगाने आणि अपघातग्रस्तांना तातडीने सहाय्य करण्यासाठी अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहने, रुग्णवाहिका, गस्त वाहने, क्रेन, उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले.


            सदस्य संजय गायकवाड, ज्ञानराज चौगुले आदींनी यावेळी चर्चेत भा

केळी खाल्ल्याने सर्दी होते का ?* *➖

 *➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*

   *केळी खाल्ल्याने सर्दी होते का ?*

*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*


अजूनही केळे खाताना मला विचार पडतो सर्दी तर होणार नाही? लहानपणापासून आजी, मावशी, आई या सर्वांनी केळे खाऊ नको सर्दी होईल असे वारंवार सांगितल्याने ती भीती आज देखील वाटते. पण शास्त्रीय सत्य काय आहे?


सर्दी होण्याची दोन मुख्य कारणे म्हणजे विषाणूंचा संसर्ग व अ‍ॅलर्जी किंवा वावडे. वातावरणात बदल झाला की बर्‍याच जणांना ही सर्दी होते. म्हणूनच इंग्रजीत याला 'कॉमन कोल्ड' असे म्हणतात. ही सर्दी ६४ प्रकारच्या विषाणूंमुळे होऊ शकत असल्याने अनेक वेळा सर्दी होते व शरीर या विषाणूंच्या विरुद्ध परिणामकारक अशी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करू शकत नाही. 


सर्दीवर उपाय नाही कारण विषाणूंना आपण मारू शकत नाही. गमतीने असे म्हणतात की, औषध नं घेतल्यास सर्दी बरी व्हायला सात दिवस लागतात पण उपचार घेतल्यावर ती एक आठवड्यात बरी होते. 


वाऱ्यामुळे होणारी सर्दी काही विशिष्ट काळातच होते. काही जणांना धूळ, पराग कण, एखादे विशिष्ट अत्तर इत्यादी संपर्कात आल्यावर सर्दी होते.


केळ्यामुळे विषाणू संसर्ग तर होत नाहीच पण काही जणांना वावडे असू शकेल. ज्यांना केळे खाल्ल्याने सर्दी होत असल्याचा अनुभव वारंवार आला असेल त्यांनी केळे न खाणे चांगले. पण केळी खाल्ल्याने सगळ्यांनाच सर्दी होईल हे मात्र चुकीचे आहे. 


अशा गैरसमजाने सर्वत्र उपलब्ध असलेले स्वस्त असे हे फळ लोक खाणार नाहीत व कार्बोदके प्राप्त करण्याचा हा सोपा मार्ग सोडून देतील. केळे खाल्ल्याने तुम्हाला सर्दी होते वा नाही हे तुम्हीच तपासू शकाल.


*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन* 


*संकलक - दिपक तरवडे*



*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


रायगड जिल्हा परिषद विविध विभाग कार्यालय बदल

 *रायगड जिल्हा परिषद ची ईमारत धोकादायक घोषित केल्या मुळे विविध विभाग आता स्थलांतरित झाले आहेत , अनेकांना आप आपल्या कामाकरिता जिल्हा परिषदेत जायला लागते अशा सर्व ग्रुप सदस्यांच्या माहिती करिता*


साखरझोपेवर आवर घालून सकाळी उठायचंय? १००% यशस्वी होणाऱ्या १२ टिप्स…!*

 साखरझोपेवर आवर घालून सकाळी उठायचंय? १००% यशस्वी होणाऱ्या १२ टिप्स…!*




सकाळी सकाळी साखरझोपेतून जागे होणे म्हणजे एक मुश्कील काम. पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी छान गाढ झोप लागलेली असताना उठून कामाला लागणं जीवावर येतं.


पण, लवकर नाही उठलं तर, पुढची सगळी कामं रेंगाळत राहतात आणि मग कामं पेंडिंग राहिली की ताण वाढतो.


लवकर उठण्याचे फायदेही खूप असतात. सकाळी लवकर उठण्याने ताण कमी होतो, उत्साह वाढतो, व्यायामासाठी वेळ देता येतो, ज्यामुळे आरोग्याला देखील फायदा होतो.


लहानपणापासून घरातील वडिलधाऱ्या मंडळींकडून आपण हे ऐकत आलोय की, सकाळी लवकर उठल्याने आयुष्यात सफलता मिळते. विद्यार्थांसाठी तर सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याची सवय फार फायद्याची ठरू शकते.


तुम्हालाही सकाळी लवकर उठण्याची सवय लाऊन घ्यायची आहे का? मग त्यासाठी वाचा या काही खास टिप्स ज्यामुळे लवकर उठणं तुम्हाला अजिबात त्रासदायक वाटणार नाही.


https://chat.whatsapp.com/I3OvJibJtIxKNxiaGd8Mxs




१. झटपट बदल करू नका




सकाळी लवकर उठण्याची सवय लावायची म्हणून उठण्याच्या सवयीत झटपट बदल करू नका.


तुम्हाला जर सकाळी ९ ला उठण्याची सवय असेल आणि एक दिवस अचानक तुम्ही ५ वाजता उठलात तर, हा अचानक झालेला हा बदल तुमचे शरीर पटकन स्वीकारणार नाही.


म्हणून बदल हळूहळू करा.


म्हणजे उद्या ९ ऐवजी ८.३० ला उठा. त्यानंतर हळूहळू ही वेळ रोज कमीकमी करत न्या.




२. निश्चित वेळापत्रक करा




सकाळी लवकर उठण्यासाठी एक निश्चित वेळापत्रक बनवा. वेळापत्रक नसेल तर, लवकर उठून आपण काय करणार, असे म्हणत आपण लवकर उठण्याचे टाळत राहतो.


सगळी कामे वेळेवर पूर्ण करण्याची सवय लावून घेतली तरच, लवकर उठण्याची सवय लागेल.




३. दिवसाची सुरुवात आनंदाने करा


https://chat.whatsapp.com/I3OvJibJtIxKNxiaGd8Mxs


सकाळी लवकर उठून काही चांगले, क्रिएटिव्ह काम केल्यास दिवसभर उत्साह टिकून राहील. सकाळी सकाळी उठल्यानंतर आपल्याला काहीआवडतं काम करायला मिळणार असेल तर, लवकर उठायचा कंटाळा येत नाही.


ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल तुमच्यातील उत्सुकता टिकून राहील आणि दिवसभर तुमची कार्यक्षमता टिकून राहील.




४. सुट्टीच्या दिवशीही लवकर उठा.




सुट्टीच्या दिवशीही उठण्याचे शेड्युल बदलू नका. दररोज आपले रुटीन ठरलेले असते, पण सुट्टीच्या दिवशी आपण दिवसभर काय करणार आहोत, ते ठरवलेलं नसतं.


आठवडाभर सकाळची धावपळ सुरु असते. पण, सुट्टीचा दिवस आपण निवांत घालवतो. असे न करता, त्या दिवशी सकाळच्या वेळेत एखादा छंद वर्ग लावा. मित्रांसोबत ट्रेकींगचे प्लॅन करा.


सुट्टीच्या दिवशी सकाळचा वेळ अशा गोष्टी करा ज्या तुम्ही इतर वेळ कधीच करत नाही.


जो वेळ निवांत, लोळण्यात घालवायचा त्या दिवशी कामाचे प्लॅनिंग करणे विचित्र वाटेल पण, आठवड्यातून एकही दिवस सकाळी लवकर उठण्याचे टाळू नका.




५. सकाळच्या वेळच्या तुमच्या कामाचे योग्य नियोजन करा.




सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय काय करणार आहात याचे नियोजन आदल्या रात्रीच करून ठेवा.


सकाळी उठल्यानंतर तुम्ही आधी ब्रश करणार की, दाढी? व्यायाम करण्यासाठी कोणती कपडे घालणार? चहा घेणार की, कॉफी?


तुमचे नियोजन यशस्वी झाले तर, लवकर उठण्यासोबतच तुमच्या सर्व गोष्टींना एक निश्चित शिस्त लागेल.


दररोजचे तुमचे रुटीन काय असणार आहे ते लिहून ठेवा. उद्या कोणती कपडे घालायची हे देखील आजच ठरवून ठेवा. यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि उठल्यानंतर सर्व गोष्टी तुमच्यासाठी तयार असतात, तेंव्हा सकाळी लवकर उठणे फारच छान वाटते.




६. चांगली झोप घ्या




शरीर तंदुरुस्त असेल तर, तुमच्या झोपण्याच्या सवयी आणि उर्जा यावर चांगला परिणाम होतो.




७. अलार्म स्नूज करू नका




सकाळी लवकर उठण्यासाठी तुम्ही अलार्म लावतच असाल. पण, अलार्म झाल्यावर जर तुम्ही तो स्नूज करून पुन्हा झोपत असाल तर, तुम्हाला लवकर उठण्याची सवय लागणार नाही. त्याऐवजी दोन अलार्म लावा. दोन अलार्म मध्ये दहा मिनिटांचे अंतर ठेवा.


एक अलार्म जो लवकर होईल तो तुमच्या जवळ ठेवा आणि दुसरा तुमच्या बेडपासून थोडा दूरवर ठेवा.


पहिला अलार्म बंद करून तुम्ही झोपी गेलात तरी, दुसरा अलार्म झाल्यावर तुम्हाला उठावेच लागेल.


परंतु, एकदा अलार्म बंद केला तर, तुमच्या मनाला अलार्मकडे दुर्लक्ष करण्याची सवय लागेल.




८. वेळ पाळा




झोपेची वेळ पाळायची त्याप्रमाणेच उठण्याची वेळ देखील पाळा. तुमच्या शरीराला झोपेच्या पॅटर्नची सवय झालेली असते. नेहमीच्या वेळी उठता तेंव्हा तुमच्या शरीराचे एक निश्चित वेळापत्रक तयार झालेले असते.


तुमचा अलार्म वाजण्याआधीच तुमचे शरीर उठण्यासाठी तयार झालेले असते. यामुळे काही दिवसांनी तुम्हाला लवकर उठण्यासाठी अलार्मची गरज देखील लागणार नाही.




९. सकाळी जाग आल्यानंतर जागे कसे राहाल?




सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घेणे आणि ती टिकवून ठेवणे अवघड असते. शरीराचे वेळापत्रक बदलणे सोपी गोष्ट नाही.


जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता तेव्हा नव्या वेळेशी जुळवून घेण्यास शरीर तयार नसते. म्हणून उठल्या उठल्या घरातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.


घरातून लवकर बाहेर पडून, फिरायला गेल्याचे थंड हवेचा स्पर्श अनुभवल्याने आळस निघून जाईल आणि तुम्हाला फ्रेश वाटू वाटेल.




१०. सकाळी लवकर का उठणार आहात?




“लवकर उठल्याने मूड फ्रेश राहतो आणि लवकर उठणारे लोक अधिकाधिक कार्यक्षम असतात,” म्हणून मलाही लवकर उठायचे आहे, हे काही फार चांगलं कारण आहे असे नाही.


लवकर उठण्याचा निश्चय केला असेल तर, लवकर उठून तुम्ही काय करणार आहात?


सकाळी उठण्याची सवय लावून घेणे फार अवघड गोष्ट आहे, त्यासाठी त्यामागचं काही ठोस कारण, तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे.


लवकर उठल्यानंतर तुम्हाला जो थोडा अधिकच वेळ मिळणार आहे, त्याच तुम्ही कसा उपयोग करणार आहात?


– हे जर तुम्ही ठरवल नसेल तर, लवकर उठून तुमचा काही फायदा होणार नाही.




११. एखादा पाळीव प्राणी बाळगा




दिलेली वेळ पाळण्याची चांगली सवय लावून घेणे आवश्यक आहे.


तुम्ही एखादं मांजर पाळले आणि तिला जर, सकाळी ६.०० वाजता खाऊ घालण्याची सवय लावली, तर सकाळी ५.५५ वाजता तुम्ही तिचा खाऊ बनवत असाल याची ती काळजी घेईलच.


तिला खाऊ घालण्याच्या काळजी पोटी तुम्हीही लवकर उठून कामाला लागाल.




१२. मानसिक तयारी ठेवा




लवकर उठण्याचे कोणते फायदे असतात हे सांगणारे व्हिडीओज ऐकत रहा. लवकर उठण्याची सवय असणाऱ्या व्यक्तींबद्दल वाचत राहा.


दिवसभराचा दिनक्रम लिहिण्याचा फायदा काय असतो, हे सतत स्वतःला सांगत रहा.


अलार्म वगैरे लावून तुम्ही लवकर उठाल देखील पण, मानसिक तयारी केली नसेल तर मात्र, सगळा दिवस आळसात आणि

 कंटाळवाणा जाऊ शकतो.


तर मंडळी, या गोष्टी लक्षात ठेवा – स्वतःच्या दिवसावर नियंत्रण मिळवा आणि – यशस्वी व्हा…!




*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*


ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याचा सर्वांगीण विकास करणार;

 ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याचा सर्वांगीण विकास करणार;


राज्याच्या विकासासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर देणार


- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती


            मुंबई, दि. 25 :- राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सरकारचे उद्दिष्ट असून त्यासाठी राज्याच्या उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत पुरवणी मागण्या बहुमताने मंजूर करण्यात आल्या.


            पावसाळी अधिवेशनात विधानसभेत मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चा पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. ते म्हणाले, या अधिवेशनात (जुलै, 2023) एकूण 41 हजार 243 कोटी 21 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळासमोर मांडण्यात आल्या. यापैकी 13 हजार 91 कोटी 21 लाख रुपयाच्या मागण्या या अनिवार्य, 25 हजार 611 कोटी 38 लाख रुपयांच्या मागण्या या कार्यक्रमांतर्गत आणि 2 हजार 540 कोटी 62 लाख रुपयांच्या मागण्या या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत. 41 हजार 243 कोटी 21 लाख रुपयांच्या स्थूल पुरवणी मागण्या दिसत असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा 35 हजार 883 कोटी 31 लाख एवढाच असल्याचे त्यांनी सांगितले.


पुरवणी मागणीतील महत्वाच्या तरतुदी


 जलजीवन मिशन-सर्वसाधारण घटक व गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण व सहाय्यिकृत बाबींकरिता राज्य हिस्सा म्हणून 5 हजार 856 कोटी रुपये,


 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थींना राज्याच्या ‘नमो शेतकरी’ महासन्मान निधी योजनेचा लाभ देण्यासाठी 4 हजार कोटी रुपये,


 अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची थकबाकी व चौथा अनुज्ञेय हप्ता देण्यासाठी 3 हजार 563 कोटी 16 लाख रुपये,


 मेट्रो रेल्वे प्रकल्प मुद्रांक शुल्क अधिभाराचे प्रदान करण्यासाठी 2 हजार 100 कोटी रुपये,


 लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी 1 हजार 500 कोटी रुपये,


 केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनच्या अनुसूचित जाती घटकातील लाभार्थ्यांकरिता राज्य हिस्सा 1 हजार 415 कोटी रुपये,


 पंधराव्या वित्त आयोगाचे अनुदान देण्यासाठी 1 हजार 398 कोटी 50 लाख रुपये,


 केंद्र सरकारकडून राज्य शासनाला भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेसाठी 1 हजार 200 कोटी रुपये,


 श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांकरिता 1 हजार 100 कोटी रुपये,


 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास सवलतमूल्य व अर्थसहाय्याकरिता 1 हजार कोटी रुपये,


 महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत व वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी 1 हजार कोटी रुपये,


 नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत प्रकल्प अंमलबजावणीसाठी बाह्य हिस्सा व राज्य हिस्सा 969 कोटी रुपये,


 अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी केंद्र हिस्सा, राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्सा 939 कोटी रुपये,


 केंद्र पुरस्कृत जल जीवन मिशन योजना (राज्य हिस्सा) 800 कोटी रुपये,


 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपदान, अंशराशीकरण आणि सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे हप्ते अदा करण्यासाठी 789 कोटी 41 लाख रुपये,


 केंद्र शासनाकडून भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी 798 कोटी 1 लाख रुपये,


 संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांकरिता 600 कोटी रुपये,


 लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या पात्र शेतकऱ्यांना अनुदान 550 कोटी रुपये,


 पात्र सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन उपलब्ध करुन देण्यासाठी 549 कोटी 54 लाख रुपये,


 केंद्रिय आधारभूत किंमत योजनेखालील तूट भरुन काढण्यासाठी 523 कोटी 23 लाख रुपये यांचा समावेश आहे.


००००



 



Featured post

Lakshvedhi