Wednesday, 26 July 2023

काळजी स्त्रियांच्या आरोग्याची*

 *काळजी स्त्रियांच्या आरोग्याची*


प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तरच संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील. हल्लीच्या काळातील नोकरदार महिला व कुटुंबाचा डोलारा सांभाळणाऱ्या महिलांसाठी खास हा लेख.



जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी’ अशी एका म्हण पूर्वापार काळापासून आहे. प्रत्येक कुटुंबातील स्त्री स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेते; पण स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करते. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. म्हणूनच प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तरच संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील. हल्लीच्या काळातील नोकरदार महिला व कुटुंबाचा डोलारा सांभाळणाऱ्या महिलांसाठी खास हा लेख.

प्रत्येक स्त्रीला स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य यांमध्ये समतोल राखता आले पाहिजे. मुलगी जन्माला आल्यापासून तिचे आरोग्य, चांगले शिक्षण, आहार व व्यायाम याकडे स्त्रीने लक्ष दिले पाहिजे. मुलगी सुदृढ झाल्यावरच तिचे लग्न झाले पाहिजे. लहान वयात तिचे लग्न करू नये, याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. लग्न झाल्यावर पहिल्या अपत्यासाठी घाई करू नका. नवीन वातावरणात मुलीला रुळू द्या.

वीस ते तीस वर्षे हे वय हा पहिल्या अपत्यासाठी योग्य काळ आहे. गरोदर राहिल्यावर कोणताही त्रास जाणवत नसला तरीही गरोदर महिलेने प्रत्येक महिन्यात स्त्री रोग तज्ज्ञाकडे जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे. गरोदर स्त्रीने सकस आहार घेतला पाहिजे. प्रसूती शक्यतो हॅास्पिटलमध्येच जाऊन करावी. ग्रामीण भागात हॅस्पिटल नसल्याने प्रशिक्षित दाईकडूनच करून घ्यावी. माता व बाळाच्या आरोग्यासाठी स्तनपान अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ते बाळासाठी अमृतासमान आहे. त्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते. त्याशिवाय बाळाचे आईशी भावनिक नातेही जुळते.

दोन अपत्यांमध्ये अंतर ठेवण्यासाठी कुटुंब नियोजन करणे आवश्यक आहे. प्रत्येक महिलेने वयाच्या पस्तीशीनंतर स्वतःची काळजी घ्यावी. या वयात प्रत्येक स्त्रीने पॅप स्मिअर चाचणी करणे आवश्यक आहे. कोणताही त्रास नसला तरी ही चाचणी करणे आवश्यक आहे. सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये ही चाचणी मोफत होते. या चाचणीमुळे पिशवीचा व योनीमार्गाचा कॅन्सर झाला असेल किंवा पुढील पाच वर्षात होणार असेल तर आधीच समजतो. त्यासाठी ही चाचणी आवश्यक आहे.


चाळीशीत आल्यावर तिला पाळीचे विकार येतात. रक्तस्त्राव जास्त होत असेल किंवा महिन्यातून दोनदा पाळी येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मासिक पाळी बंद झाल्यावर स्त्रियांमध्ये वजन वाढण्याची व हार्ट अॅटॅकची समस्या वाढते. अशावेळी वार्षिक आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.


डॅा. रेखा डावर, स्त्री रोग विभागप्रमुख (जे.जे. हॅास्पिटल)

पोस्ट केवळ माहीती साठी



*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*



प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनीपर्यावरणपूरक सण साजरे करावेत

 प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनीपर्यावरणपूरक सण साजरे करावेत


- मंत्री दीपक केसरकर


            मुंबई, दि. २५ : नागरिकांनी पर्यावरणपूरक सण साजरे करून, प्रदूषण टाळण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीचे जलस्रोतांमध्ये विसर्जन करू नये याबाबत महानगरपालिकांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.


            यासंदर्भात सदस्य जयंत पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते.


             मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, सार्वजनिक सणांच्या वेळी होणारे प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. पर्यावरणविषयक विविध कायदे व त्या कायद्यांची अंमलबजावणी व्यापक जनहितार्थ असून त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असणे आवश्यक आहे.


            महानगरपालिकांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक प्रभागात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारांसाठी प्राधान्य तत्वावर जागा उपलब्ध करून द्यावी व त्याचबरोबर त्यांना काही प्रमाणात शाडूची माती उपलब्ध करून देता येईल का याची तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत, असेही मंत्री श्री.केसरकर यांनी सांगितले.


            या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला.


****



उरण परिसरात वायू प्रदूषण प्रतिबंधासाठी उपाययोजना करणार

 उरण परिसरात वायू प्रदूषण प्रतिबंधासाठी उपाययोजना करणार


- मंत्री दीपक केसरकर


            मुंबई, दि. २५ : उरण परिसरात रासायनिक कंपन्यामधून वायू प्रदूषण होत आहे. याबाबत संबधित कंपन्यांची बैठक आयोजित करुन त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.


              उरण परिसरात रासायनिक कंपन्यामधून २४ तास वायू प्रदूषण होत आहे. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत शासन कोणती कार्यवाही करणार, अशी लक्षवेधी सदस्य रमेश पाटील यांनी मांडली होती.


            शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, उरण परिसरात रासायनिक कंपन्यांमधून होणारे वायू प्रदूषण टाळण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात येईल. प्राप्त तक्रारी तपासून याबाबतीत योग्य ती कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सां

गितले.


सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील धोकेदायक वृक्षतोडण्यासाठी प्रभागनिहाय पथके तयार करणार

 सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील धोकेदायक वृक्षतोडण्यासाठी प्रभागनिहाय पथके तयार करणार


- मंत्री उदय सामंत


            मुंबई, दि. २५ : पावसाळ्यात वादळवाऱ्याने वृक्ष पडणे, फांद्या तुटल्याने स्थानिक रहिवाशी आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभागनिहाय पथके तयार करून सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील धोकेदायक वृक्ष तोडण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.


            मुंबईत १ ते २९ जून, २०२३ या कालावधीत ४३५ झाडे, फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. त्यात आठ जणांचा मृत्यू आणि ४ जण जखमी झाले आहेत. यामध्ये मुंबई शहरात झाडे आणि फांद्या तुटण्याच्या ११२ घटनांमध्ये एकाचा मृत्यू आणि १ जण जखमी झाला आहे. मुंबई पश्चिम उपनगरात झाडे आणि फांद्या पडण्याच्या सर्वाधिक २१४ घटना घडल्या असून त्यात सात जणांचा मृत्यू व १ जण जखमी झाला आहे, शासनाने याबाबत तातडीने करावयाची ठोस कार्यवाही, उपाययोजना आणि शासनाची प्रतिक्रिया याबाबत विधानपरिषद सदस्य सुनील शिंदे यांनी लक्षवेधी मांडली. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.


            मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मुंबईत १ जून ते १९ जुलै, २०२३ या कालावधीत ४८१ झाडे व ६३६ झाडांच्या फांद्या पडल्याची नोंद आहे. त्यापैकी पश्चिम उपनगरामध्ये १८८ झाडे व २५८ झाडांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटना या प्रामुख्याने वादळी वारे व जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे घडल्या असून, अशा विविध दुर्घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असून, १० जण जखमी झाले असल्याची नोंद आहे. धोकेदायक झाडे तसेच फांद्यांची छाटणी पावसाळ्यापूर्वी करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांना जाहिरातीच्या माध्यमातून आवाहन केले जाते. झाडे अथवा फांद्या पडण्याच्या घटना घडू नयेत याकरिता सन २०२३ च्या मान्सूनपूर्व कामांतर्गत सर्वेक्षण केलेल्या सुमारे १,५०,८३२ धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली असून, मृत, धोकेदायक व पोकळ असलेली झाडे काढण्यात आली आहेत. सन २०२२-२३ या वर्षात ४०६३ झाडांना काँक्रिटीकरणापासून मुक्त करण्यात आले आहे. तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील धोकादायक झाडे तोडण्यासाठी प्रभागनिहाय पथके तयार करण्यात येतील. अशी झाडे तोडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क सहकारी गृहनिर्माण संस्थांकडून आकारण्यात येणार नाही, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.


            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई गिरकर, विलास पोतनीस, अनिकेत तटकरे, सचिन अहीर, मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.


***

जय महाराष्ट्र' कार्यक्रमात वाहतूक विभागाचेअपर पोलिस महासंचालक डॉ. रविंद्र सिंगल यांची मुलाखत

 जय महाराष्ट्र' कार्यक्रमात वाहतूक विभागाचेअपर पोलिस महासंचालक डॉ. रविंद्र सिंगल यांची मुलाखत


               मुंबई दि. २६ :- रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी शासन सर्वप्रकारच्या उपाययोजना करीत आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करत वाहन चालवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून जनतेने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून राज्याच्या वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक डॉ. रविंद्र सिंगल यांनी केले आहे.


            रस्ता सुरक्षा ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे. त्याअनुषंगाने शासनामार्फत सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. आपल्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर ई-चलान कारवाई झाली असेल तर ते जाणून घेण्यासाठी आणि ई-चलानचा दंड सुलभरित्या भरण्यासाठी किंवा ई-चलान संदर्भात काही तक्रार असल्यास नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी शासनस्तरावर कशी खबरदारी घेण्यात येत आहे, याबाबत ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून डॉ. सिंगल यांनी सविस्तर माहिती दिली आहे.


             ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरुवार, दि. 27 जुलै 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.


महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक


ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


००००

शिक्षणसंस्थांना मालमत्ता कर माफ करण्याबाबतन्यायालयाचा निर्णय तपासून कार्यवाही करणार

 शिक्षणसंस्थांना मालमत्ता कर माफ करण्याबाबतन्यायालयाचा निर्णय तपासून कार्यवाही करणार


- मंत्री उदय सामंत


            मुंबई दि. 26 : राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषद/नगरपंचायत हद्दीतील शिक्षण संस्थांना मालमत्ता कर माफ करण्याबाबत न्यायालयाचा निर्णय तपासून कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.


          याबाबतचा प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता.


          श्री. सामंत म्हणाले की, बुलढाणा नगरपालिका व औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील काही शिक्षण संस्थांनी मालमत्ता कर माफ करण्याची मागणी केली आहे, असे आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या अहवालात नमूद केले आहे. तत्कालीन मा. नगरविकास मंत्री यांची प्रशासक, औरंगाबाद महानगरपालिका यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झालेली आहे. तथापि, औरंगाबाद महानगरपालिका 2014 पासून महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांना निवासीदराने कराची आकारणी करत आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थांना अर्ज केल्यानंतर आयकर करमाफी प्रमाणपत्र तसेच गुणवत्तेनुसार मालमत्ता करात सूट देण्यात येत असते. तसेच इतर महानगरपालिका व नगरपरिषदांनी कायद्यात तरतूद आहे, त्याप्रमाणे करात सूट देण्याबाबत निर्णय घ्यावा, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.


          या चर्चेत सर्वश्री सदस्य अभिजीत वंजारी, निरंजन डावखरे आदींनी सहभाग घेतला.

दिव्यांग शाळांमधील बोगस नोकरभरती व ना-हरकतप्रमाणपत्रांबाबत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार

 दिव्यांग शाळांमधील बोगस नोकरभरती व ना-हरकतप्रमाणपत्रांबाबत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार


- मंत्री शंभूराज देसाई


 


            मुंबई दि. 26 : राज्यातील दिव्यांग शाळांमधील बोगस नोकरभरती व ना हरकत प्रमाणपत्राबाबत जे अधिकारी दोषी असतील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याबाबत कुठल्याही अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यात येणार नाही, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.


            राज्यातील दिव्यांग शाळांमधील बोगस नोकरभरती व ना हरकत प्रमाणपत्रांबाबतचा प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता.


           मंत्री श्री. देसाई म्हणाले की, आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांनी माहे जानेवारी 2019 ते मार्च, 2019 या कालावधीत ना-हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण व दिव्यांगांच्या शाळांना अनुदानाच्या शिफारशींच्या प्रकरणामध्ये झालेल्या वित्तीय व प्रशासकीय अनियमिततेबाबत दिनांक 9/04/2019 व दिनांक 29/04/2019 च्या पत्रान्वये संबंधितांविरूद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.


            या संपूर्ण प्रकरणाची एक महिन्यात नव्याने सुनावणी घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर चौकशीअंती कारवाई करण्यात येईल. तसेच दिव्यांगांना शासन आपल्या दारी या योजनेंतर्गत घरपोच दिव्यांग प्रमाणपत्र व त्याअनुषंगाने आवश्यक ते दाखले वाटप करण्यात येत असल्याची माहितीही श्री. देसाई यांनी यावेळी दिली.


            या चर्चेत सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते-पाटील आदींनी

 सहभाग घेतला.


Featured post

Lakshvedhi