Thursday, 20 July 2023

Ramayan पुन prakshepan घरोघरी, पाहायला मिळणार

 रामानंद सागर की पुत्रवधू "निशा बेन सागर" को नियमानुसार कॉपीराइट का दूरदर्शन ने प्रति एपिसोड ₹25000 भुगतान करने का प्रस्ताव देकर रामायण के पुनः प्रसारण की अनुमति मांगी। निशा बेन सागर ने दूरदर्शन को पत्र लिखा कि मुझे खुशी होगी कि आज के बच्चे राम रामायण के बारे में जानेंगे और आप प्रसारण करिए मुझे एक पैसे भी कॉपीराइट के नहीं चाहिए और इस तरह निशा बेन सागर ने रामायण के प्रसारण के लिए प्रति एपिसोड 25000 लेने से इनकार कर दिया। आप सोचिए 25000 प्रति एपिसोड यानी कितनी बड़ी रकम उन्होंने ठुकरा दी

इसीलिए नरेंद्र मोदी जी ने "निशा बेन सागर" को फोन किया और उन्हें बहुत-बहुत धन्यवाद कहा सनातन धर्म हमे त्याग और शुद्ध आचरण सिखाती है जिसका एक उदाहरण ये है...


जय सनातन धर्म, जय श्रीराम.!.🙏❤️🚩

रामायण प्रक्षपण 

पाऊस आला पूर आला

 Hamrapur johe tabdshet side la





*🌵मूळव्याध

 *🌵मूळव्याध*



*पिव्वर घरगुती तूपात अर्धा चमचा हळद घालून लावल्यास मुळव्याधीत आराम मिळतो.*


 इप्सम सॉल्ट आणि ग्लीसरीन दोन दोन चमचे एकत्रित करून दिवसात चार पाच वेळेस कापसाने कोंबाला लावत जा कोंब सुकायला लागतील मुळव्याधीत आराम मिळेल.


*मोहरीचे तेल सकाळी आणि संध्याकाळी कोंबावर लावा. कोंब 4-5 दिवसात कोरडे होऊन सुकतील 10 दिवसातच आराम मिळेल.


* सोसेल एवढे गरमपाणी घेऊन त्यात मुठभर मीठ घालून रोज तो भाग शेकला जाईल या हिशोबाने त्या पाण्यात बसा मुळव्याधीचे कोंब सुकायला लागतील.


*रात्री झोपताना कुमकुमादी तैलात एक कापसाचा बोळा बुडवून तो गुदद्वाराच्या जागेवर ठेवा दहा पंधरा दिवसांत कोंब सुकायला लागतील.


* पांढरे तीळ चमचाभर आणि तूप चमचाभर एकत्रितपणे रोज सकाळी व रात्री खात जा मुळव्याधीच एक दोन महीन्यात समुळ उच्चाटन


होईल.


* चमचाभर मुळ्याचा रस त्यात चमचाभर मोहरीच तेल एकत्र करून रोज खात जा मुळव्याध आठ ते दहा दिवसात ठीक होईल. * दालचीनीच तेल व मोहरीच तेल एकत्रित करून कोरफडीचा गर आणि हळद आणि चिमुटभर सैंधव मीठ एकत्रित करून क्रीम तयार करा हे क्रीम कापसाला लावून मुळव्याधीच्या कोंबावर ठेवा मुळव्याधीचे कोंब सुकायला लागतील



वीज ग्राहकांनी वीज बिलाबाबत घ्यावयाची काळजी उपायुक्त महिती

 


महाराष्ट्र वस्तू, सेवाकर (सुधारणा) विधेयक 2023 मंजूर

 महाराष्ट्र वस्तू, सेवाकर (सुधारणा) विधेयक 2023 मंजूर


'एक देश, एक करप्रणाली' सूत्रानुसार

जीएसटी कायद्यात दुरुस्ती


- उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार


            मुंबई, दि. 20 :- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करणारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (सुधारणा) विधेयक 2023 आज विधानसभेत मंजूर करण्यात आले.


            उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी हे विधेयक मांडताना सभागृहास सांगितले की, 'एक देश एक करप्रणाली' सूत्रानुसार हे विधेयक मांडण्यात आले आहे. केंद्र सरकारने कायद्यात सुधारणा केल्यानंतर सर्व राज्यांद्वारे संबंधित कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणा करणे अनिवार्य असते. त्यानुसार विधेयक मांडण्यात आले आहे. या विधेयकामध्ये महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मधील 22 कलमे व 1 अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये प्रामुख्याने न्यायाधीकरण, डेटा अर्कायव्हल पॉलिसी, गुन्ह्यांच्या तरतुदीचे सुलभीकरण (decriminalization व गुन्ह्यांच्या कंपाउंडिंगचे सुलभीकरण), इनपुट टॅक्स क्रेडीट, नोंदणी व परतावा आदी विषयांच्या कलमांमध्ये सुधारणा प्रस्तावित आहे. सुचविण्यात आलेल्या सुधारणा ह्या कार्यपद्धतीचे सुलभीकरण व करदात्यांचे हीत या बाबी लक्षात घेऊन प्रस्तावित केल्या असल्याचेही वित्तमंत्री श्री. पवार यांनी स्पष्ट केले.


            केंद्रीय वस्तू व सेवाकर परिषदेच्या शिफारशींनुसार, 30 मार्च 2023 रोजी मंजूर केलेल्या वित्तीय कायदा 2023 अन्वये केंद्र सरकारने केंद्रीय वस्तू व सेवाकर अधिनियम 2017 यामध्ये सुधारणा केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय वस्तू व सेवाकर अधिनियम 2017 व महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, 2017 यातील तरतुदींमध्ये एकसूत्रता राखण्यासाठी, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करणे आवश्यक होते. त्यानुसार विधानसभेत विधेयक मंजुरीची ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.


०००००

इरशाळवाडी दुर्घटना : शोध आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू

 इरशाळवाडी दुर्घटना : शोध आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू  


मुख्यमंत्री घटनास्थळावर,


मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत


          मुंबई, दि. २० : रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ इरशाळवाडी येथील वस्तीवर काल रात्री दरड कोसळल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मदत व बचावकार्याचा आढावा घेत मदतकार्याला गती देण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या. यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादा भुसे, आमदार महेश थोरवे, आमदार महेश बालदी, विभागीय आयुक्त महेश कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे उपस्थित होते.


            प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचावकार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि स्थानिक प्रशासनासह बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील एमआयडीसीमधील कामगार एनडीआरएफच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.


मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरशाळवाडी येथे मदत व बचावकार्याचा आढावा घेतल्यानंतर ग्रामस्थांना भेटून आस्थेने विचारपूस केली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपये तर जखमींवरील उपचाराचा सर्व खर्च शासनातर्फे केला जाईल, असे जाहीर केले. तसेच, शासनाकडून सर्व मदत करण्याचे आश्वासित केले आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून चौकशी, मदतीची ग्वाही


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दूरध्वनीवरून माहिती घेतली. त्यांनी बचाव कार्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढणे आणि जखमींवर तातडीने उपचार करणे, हे प्राधान्य असल्याचे केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी सांगितले.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली


            “इरशाळगड दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत”, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.


            “घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता मदतकार्य गतीने होत आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत व बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत”, असे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी म्हटले आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून घेतली माहिती


            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात पोहचून दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचे संनियंत्रण केले.


जखमींची मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून


रुग्णालयात विचारपूस


 


            महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील जखमींची संख्या वाढल्यास प्रशासनाने सज्ज असावे, अशा सूचना संबंधित रूग्णालयाला दिल्यात. यावेळी एमजीएमचे डॉ. सागर, पनवेल महापालिकेचे डॉ. गोसावी नायब तहसीलदार पनवेल श्री. लाचके उपस्थित होते.


 


शिवभोजन थाळी पॅकेटचे मोफत वितरण,


अत्यावश्यक अन्नधान्यही देणार


 


            शिवभोजन थाळीच्या पॅकेटचे मोफत वितरण दुर्घटनाग्रस्तांना करण्यात येणार आहे. शिवाय पाच लिटर रॉकेल, १० किलो तांदूळ, १० किलो गहू किंवा त्याचे पीठ, इतर शिधा देखील देण्यात येणार आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत पुरवठा सुरूच राहणार आहे.


संपर्कासाठी हेल्पलाईन क्रमांक


            चौक दूरक्षेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे. पोलिस निरिक्षक काळसेकर यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचा मोबाईल क्रमांक 8108195554 असा आहे.


नागरिकांना आवाहन


            भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. इरशाळवाडी येथे नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. अति मुसळधार पावासाची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आवश्यक आणि अतिमहत्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे,

 असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.    


0000


रोज चमचाभर तीळ आणि मुठभर शेंगदाणे खाण्याचे आहेत भरपूर फायदे

 रोज चमचाभर तीळ आणि मुठभर शेंगदाणे खाण्याचे आहेत भरपूर फायदे.

रोगप्रतिकारशक्ती वाढते,हाडे मजबूत होतात,सांधेदुखी कमी होते,आमवाताचा त्रास कमी होतो,पोटसाफ होते,शरीरात कुठेही गाठ तयार होत नाही,सेक्सच्यूअल पाँवर वाढते,त्वचेचा रंग सुधारतो,दात मजबूत होतात,युरीन ला साफ होते. व शरीरात ताकद जोश येतो,थकवा राहत नाही, महिलांना पाळीच्या समस्या कमी होतात,नियमितपणे खालल्यास पित्ताशयात खडे होत नाहीत, वजन वाढत नाही,यात मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि निरोगी तेले असतात, जे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत करतात. शेंगदाण्यामध्ये असलेले पोषक तत्व कोलेस्ट्रॉल नियंत्रित करून हृदयविकाराचा धोका कमी करतात,दररोज शेंगदाणे खाल्ल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका 7 ते 21% कमी होतो.

जे लोक दररोज शेंगदाणे खातात त्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका 13% कमी होतो. हृदयविकाराच्या झटक्यासारख्या समस्या टाळता येतात. कोलेस्ट्रॉल आणि धमनीच्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी देखील प्रभावी आहेत. रोज एकवेळेस किंवा आपल्या प्रकृती जर पित्तकारक उष्ण नसेल तर दोन वेळेस ही हे खाऊ शकता, काहींना रोज किमान आठवडाभर हे खालल्यास काही त्रास ही जाणवू शकतात.

वैद्य.७७15९९40६०

   याचे फायदे जसे भरपूर आहेत तसेच काहीच्या साठी हे त्रासदायक देखील ठरू शकते पित्ताचा आणि अँलर्जी चा,उष्णतेचा,पोटाचा उलटीचा,मळमळण्याचा त्रास जाणवल्यास त्यांनी या वाट्याला न जाणेच बरे.तरीही तुम्ही आठदिवस हा प्रयोग करून पहायला हरकत नाही.काही त्रास जाणवले नाहीत तर ही गोष्ट तुम्हाला फायदेशीर च ठरली असे समजायला मग हरकत नाही.



Featured post

Lakshvedhi