Saturday, 15 July 2023

अधिवेशन काळातील आश्वासनांच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यवाही करा

 अधिवेशन काळातील आश्वासनांच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यवाही करा


                                                           : सुधीर मुनगंटीवार


            मुंबई, दि .१५: राज्यातील जनतेच्या प्रश्नांविषयी मुद्देसूद चर्चा करुन त्यांना न्याय देण्यासाठी तसेच धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने विधिमंडळ अधिवेशन महत्वाचे असून मागील अधिवेशनात सभागृहात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करुन सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.


            राज्याचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै पासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर वने, सांस्कृतिक कार्ये आणि मत्स्यव्यवसाय या तीनही विभागातील कामांसंदर्भात आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती, सर्व तारांकित प्रश्न, लक्षवेधी, पुढील संकल्प यासंदर्भात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे अधिकाऱ्यांसह सविस्तर बैठक घेतली. तीनही विभागांचे सचिव व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी तीनही विभागाचे सादरीकरण बघून विषयनिहाय मुद्देसुद चर्चा केली. सांस्कृतिक कार्य विभागाने वर्षभरात राबविलेल्या कार्यक्रमांची माहीती घेऊन विभागाने यासंदर्भात माहिती पुस्तिका प्रकाशित करण्याची सूचना त्यांनी केली. प्रधान सचिव श्री विकास खारगे यांनी सादरीकरण केले.


            वन विभागाच्या विविध योजना, नुकसान भरपाई, वन्यजीव संवर्धन आणि सामाजिक वनीकरण याबाबत प्रधान सचिव श्री. वेणुगोपाल रेड्डी यांनी सादरीकरण केले. 


मत्स्य व्यवसाय विभागाच्या बैठकीत प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी सविस्तर सादरीकरण केले. मच्छीमार बांधवांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या योजना, जाहीर करण्यात आलेले अनुदान, डिझेल परतावा, गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन, केंद्रातील योजनांची अंमलबजावणी, ससून डॉक विकास इत्यादी विषयांवर बैठकीत चर्चा करुन आवश्यक सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केल्या

.


0000


प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात उत्पन्न मर्यादेत वाढ केल्याबद्दल

 प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात उत्पन्न मर्यादेत वाढ केल्याबद्दल


मुख्यमंत्र्यांकडून प्रधानमंत्र्यांचे आभार


            मुंबई, दि. 15 : मुंबई महानगर क्षेत्र –एमएमआरमध्ये आर्थिक दुर्बल घटकांकरीता (EWS) प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. उत्पन्नाची मर्यादा आता तीन लाखांवरुन सहा लाख रुपये करण्यात आली असून या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्री हरदिप सिंह पुरी यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे म्हाडा, सिडकोच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा मिळाला असून सर्वसामान्यांचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे.


            प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी उत्पन्नाचे निकष तीन लाखांवरून सहा लाख रुपये करण्याची विनंती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्राकडे 21 जून 2023 रोजी पत्राद्वारे केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा पाठपुरावा केला. या विनंतीला केंद्राने सकारात्मक प्रतिसाद देऊन उत्पन्नाच्या निकषात वाढ केली असल्याचे राज्य शासनाला कळविले आहे.



0000


वंचित, उपेक्षितांना एकाच छताखाली मिळाला योजनांचा लाभ;राज्यात 75 लाख लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

 वंचित, उपेक्षितांना एकाच छताखाली मिळाला योजनांचा लाभ;राज्यात 75 लाख लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य


                                                                       : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


उत्तर महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करू


                                                                                              : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


जिल्ह्यातील प्रकल्पांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार


                                                                                               : उपमुख्यमंत्री अजित पवार


नाशिक, दि. 15 जुलै, (जिमाका वृत्तसेवा) :


            विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची कास धरण्यासाठी टॅब, जिल्ह्यात प्रथमच तृतीय पंथीयांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वयंरोजगार योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच बचतगटांच्या महिलांना उद्योगांसाठी अनुदान, बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचे किट, आदिवासी बचतगटांना विटभट्टीसाठी अनुदान, महिला सक्षमीकरण, शेतकरी लाभाच्या विविध योजना, होतकरू तरुणांना रोजगार, घरकुल आवास योजना अशा सर्वसमावेशक विकास योजनांचा लाभ आज नाशिक जिल्हावासियांना एकाच छताखाली मिळाला. निमित्त होते ‘शासन आपल्या दारी’ जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे.....


            शासन आपल्या दारी अभियान हा शासकीय कार्यक्रम राहिला नसून लोकचळवळ बनली आहे. या अभियानामुळे लोकांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला आहे. राज्यातील 75 लाख लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर या अभियानाच्या माध्यमातून हास्य फुलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कष्टकरी बांधकाम कामगार, बचतगटाच्या महिला, तृतीयपंथीय, विद्यार्थी, सरपंच अशा समाजातील सर्व घटकांच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करून व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली. हे या कार्यक्रमाचे आगळं-वेगळं वैशिष्ट्ये होते.


            डोंगरे वसतिगृह मैदान येथे 'शासन आपल्या दारी' या अभियानाचा नाशिक जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,‌ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. निलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री‌ छगन भुजबळ, ग्रामविकास, पंचायत राज आणि पर्यटनमंत्री गिरीष महाजन,‌‌ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार हेमंत गोडसे, आमदार किशोर दराडे, ॲड माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, डॉ.राहूल आहेर, सिमा हिरे, देवयानी फरांदे, दिलीप बोरसे, नितीन पवार, मौलाना मुफ्ती मोहम्मद, राहूल ढिकले, हिरामण खोसकर, सुहास कांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक महानगरपालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानाईत यांच्यासह जिल्ह्यातील लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       'शासन आपल्या दारी' अभियानात नाशिक जिल्ह्यात 10 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना लाभ दिल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली योजनांचा लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाने एका वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. सर्व निर्णय सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनी, विद्यार्थी तरूणांच्या हिताचे आहेत. 35 सिंचन प्रकल्पांना शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. यामुळे लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मुंबई मेट्रो, समृध्दी महामार्ग व जलयुक्त शिवार यासारख्या प्रकल्पांना चालना देण्याचे काम शासन करत आहे.


            महिला सक्षमीकरणासाठी बचतगटांना अधिक भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी शासन विविध लोकाभिमुख योजना राबवित आहे. एकाच वेळेस 75 हजार पदांची भरती केली जाणार आहे. मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रमाच्या माध्यमातून तरूणांना सक्षम करण्याचे काम शासन करत आहे. शासकीय योजनांपासून कोणीही वंचित राहणार नाही, सर्वांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात यावेत, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.


उत्तर महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            उत्तर महाराष्ट्र पर्यायाने नाशिक जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी गोदावरी व तापी खोऱ्यातून वाहून जाणारे पश्च‍िमेचे पाणी अडविण्यासाठी नार-पार प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात येईल. त्‍यासाठी आवश्यक प्रमाणात ननिधी उपलब्ध करून देऊन खान्देशसह नाशिक, अहमदनगर ही जिल्हे कायमची दुष्काळमुक्त करण्यात येतील. पुढील तीन वर्षात नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दिवसाला 12 तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.


            शासनाने मागील वर्षभरात राबविलेल्या जनकल्याणकारी योजनांमुळे महाराष्ट्र गुंतवणूकीत भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक बॅंक राज्यातील 10 हजार गावांमध्ये ॲग्री सोसायटी स्थापन करण्यास शासनाला मदत करणार आहे. निओ मेट्रोच्या कामाला ही लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल. शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. नाशिक येथे आयोजित शासन आपल्या दारी योजनेत शासकीय योजनांच्या लाभाचा कुंभमेळा भरला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


जिल्ह्यातील प्रकल्पांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार


                                                        : उपमुख्यमंत्री अजित पवार


            जिल्ह्यातील नार - पार प्रकल्प, गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करणे, जिल्हा झोपडपट्टी मुक्त करणे, मुंबई - नाशिक समृध्दी मार्गाचे काम, ओझर विमानतळाचे काम, नाशिक - पुणे हाय स्पीड रेल्वे अशा विविध जिल्हा विकासाच्या पायाभूत प्रकल्पांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. त्याच प्रमाणे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेस अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.


            महाराष्ट्राचा विकास हे शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. मिनी महाराष्ट्र म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. तसेच शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही नैसर्ग‍िक संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी नागरिकांना आश्वस्त केले.


 


शासन आपल्या दारी कौतुकास्पद कार्यक्रम : केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार


            केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभा शासन आपल्या दारी या उपक्रमातून गावोगावी पोहच‍व‍िण्यात येत आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या योजनांचा लाभ त्यांना या उपक्रमातून मिळत असल्याने नागरिकांचा शासनावरील विश्वास दृढ होत आहे. सेवा, सुशासन व गरीब कल्याण संकल्पनेतून शासन कौतुकास्पद काम करत आहे. असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.  


            यावेळी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाची माहिती डॉ.अमोल शिंदे यांनी दिली. 25 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा संकुलाचे ई- भूमिपूजन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यात अनुकंपा भरतीतून 490 अनुकंपा धारकांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शासनाच्या विविध योजनांच्या 17 लाभार्थी व 6 सरपंचांना व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली. स्मार्ट ग्राम कार्यकारी सरपंच गोरख जाधव, सचिन दरेकर, सुनिता पगारे, अश्विनी पवार, भाऊराव गवळी व शितल पवार या 6 सरपंचांचा समावेश होता. या सर्व लाभार्थ्यांचा व सरपंचांना लाभाचे प्रमाणपत्र व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.


       यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी आणि कामगार विभागाच्या लाभार्थीना कामगार किट, ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात एका छताखाली 40 शासकीय विभागाच्या विविध योजनावरील माहितीचे स्टॉल उभारण्यात आले. तसेच रोजगार मेळााव्यात 50 आस्थापनाचा 4500 रि

क्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या.


००००


 


महाराष्ट्र ट्रेडर्स वेल्फेअर बोर्डची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्र चेंबरची मागणी

 महाराष्ट्र ट्रेडर्स वेल्फेअर बोर्डची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्र चेंबरची मागणी


लवकरच निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे ललित गांधी यांना आश्वासन

नाशिक : राज्यातील व्यापारी उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र ट्रेडर्स वेल्फेअर बोर्डची स्थापना करण्याची मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणी प्रकरणी लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना दिले.


            शिष्टमंडळात वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा, उत्तर महाराष्ट्र शाखा चेअरमन संजय सोनवणे व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. या वेळी ललित गांधी म्हणाले, केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेऊन नुकतीच नॅशनल ट्रेडर्स बोर्डची स्थापना केली आहे. या रचनेमध्ये राज्यांनी राज्यस्तरावर अशा बोर्डची स्थापना करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात सध्या एक कोटीहून अधिक संख्येने असलेल्या व्यापाऱ्यांच्या विकासासाठी महाराष्ट्र ट्रेडर्स वेल्फेअर बोर्डची स्थापना करणे अत्यावश्यक आहे.


            राज्यातील व्यापार उद्योग क्षेत्राचे प्रश्न, नवीन उद्योगांना सवलती, वीज दरवाढ, व्यापार क्षेत्राचे प्रश्न, फूड सेफ्टी ऍक्ट, बाजार समिती कायदा, महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील दुकान गाळ्याच्या भाड्याचे प्रश्न अशा विविध विषयावर संबंधित प्रश्न मार्गी लावणे गरजेचे असल्याचेही चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. या वेळी कार्यकारणी सदस्य राजाराम सांगळे, सचिन शहा, व्हिनस वाणी, दत्ता भालेराव, रणजितसिंग आनंद, अजय शहा, ओमप्रकाश गगराणी, नेहा खरे, भावेश मानेक, मनीष रावल, संजय राठी, रवींद्र झोपे, कैलास पाटील, रतन पडवळ आदी उपस्थि

त होते.


 


टोमॅटो शिवाय काही अडलंय का ?*

 *टोमॅटो शिवाय काही अडलंय का ?* वाढलेल्या टोमॅटोच्या दराने मला तर आनंद झाला. कारण प्रत्येक वेळी पेशंटला बहुतेक सर्व आजारांत टोमॅटो खाऊ नका असा सांगण्याचा त्रास वाचला.


*कोणत्या अजारांत टोमॅटो खाऊ नये ?*

* सर्दी खोकला

* सांधेदुखी

* सूज

* डोकेदुखी 

* अम्लपित्त (acidity )

* वाढलेलं uric acid

* वाढलेलं creatinine

* मूत्रपिंडाचे आजार ( kidney stones , CKD etc)

* Allergies

* त्वचाविकार


मग खायचाच कशाला रोज रोज टोमॅटो ? बिया काढून नको , साॕस नको , टाॕपिंग नको


*टोमॅटोला पर्याय आहे ?*

आहेच की. १५ - २० वर्षांपूर्वी टोमॅटोचा इतका वापर नव्हता. पंजाबी पदार्थांमुळे टोमॅटोची ग्रेव्ही हा प्रकार आला.नाहीतर कोकम, चिंच , लिंबू क्वचित् आमचूर यावर आमचे पदार्थ छान बनत होतेच की ! 


*या घटकांचे फायदे*

*चिंच*- 

यामध्ये vit C भरपूर आहे. 

पोट साफ ठेवते 

पचन सुधारते.

मोठ्या आतड्यांचे आरोग्य सुधारते व त्यांची हालचाल ( peristalsis ) नियमित करते


*सांधेदुखी असणार्यांनी चिंचेची चटणी खाऊ नये. पण स्वयंपाकातील चिंच चालते*


*कोकम*

वजन व cholesterol कमी करते

हृदयाचे कार्य सुधारते

पचनक्रिया सुधारते

अम्लपित्तावर वरदान

अंगावर पित्त उठणे कमी होते

त्वचेची कांति सुधारते


*लिंबू*

Vit C चा पुरवठा

पाचक

वजन कमी करण्यात उपयोगी 

त्वचेचे आरोग्य सुधारते


*आमचूर*

कफ कमी करते

वारंवार होणाऱ्या मूत्रप्रवृत्तिला थांबवते

सांध्यांना मजबूती देते.


या चारांशिवाय ऋतुनुसार उपलब्ध कैरी व आवळ्याचा वापरही आपण स्वयंपाकात आवर्जून करा.


*कैरी*

पाचक

यकृताचे कार्य सुधारते


*आवळा*

Vit C चा उत्तम पुरवठा

पाचक

अम्मपित्त नाशक

शरीरातील नवीन पेशी ( cells ) बनवण्यात मदत करतो.



एवढा मुबलक आरोग्यपूर्ण साठा असताना टोमॅटोची गरज काय ? 

कधीतरी पावभाजी , छोले बनवाताना वापरा.पण रोज रोज नको रे बाबा ! 


वैद्या चंदाराणी बिराजदार 

MD आयुर्वेद


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

गटारी चा सण नसेना njoy

 


जर्मनीतील भारतीय दूतावासात काम करणाऱ्या एका महिलेने अशा पोस्टमध्ये मोदीजींबद्दल लिहिले!*

 *जर्मनीतील भारतीय दूतावासात काम करणाऱ्या एका महिलेने अशा पोस्टमध्ये मोदीजींबद्दल लिहिले!*


 तिने लिहिले .........


 माजी पंतप्रधान मनमोहन सिंग जेव्हा जर्मनीला आले तेव्हा त्यांनी जवळपास 40 लोकांना सोबत आणले होते जे त्यांचे नातेवाईक होते.


 त्यांच्या राहण्यासाठी एकूण पाच हॉटेल्स (सर्व पंचतारांकित) बुक करण्यात आली होती.


 सर्व नातेवाईकांनी दररोज महागड्या मॉलमध्ये खरेदी केली आणि लाखो-लाखो रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या.


 संपूर्ण राज्य विभागाच्या नावाने बिले वसूल करण्यात आली.


 मनमोहन सिंग यांच्या दौऱ्यातील चलनभर ही रोजचीच गोष्ट होती.


 स्टेट डिपार्टमेंटचे संपूर्ण भारतीय-कर्मचारी त्या सर्वांसमोर नाचत असे.


 मनमोहनजी एकदाही दूतावासात आले नाहीत किंवा आम्हाला भेटले सुद्धा नाहीत.


 आता मोदीजी दोनदा पंतप्रधान म्हणून जर्मनीला आले होते, तेव्हा संपूर्ण कर्मचारी पुन्हा त्याच प्रदर्शनाची अपेक्षा करत होते.


 पण ते एकटेच आले याचे आम्हाला आश्चर्य वाटतले!


 नातेवाईकांची फौज नाही.


 त्यामुळे हॉटेलचा फक्त एक मजला सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव पूर्णपणे बुक करण्यात आला होता.


 मॉल्समध्ये खरेदी नाही


 ते पूर्णवेळ कामात व्यस्त असतात.


 दूतावासातील कर्मचाऱ्यांना चमचगिरी करण्याची परवानगी नव्हती;


 तर, कर्मचारी त्यांच्या कार्यालयातील दैनंदिन कामे करीत राहिले.


 खरं तर, आम्ही सर्व डेटा गोळा करण्यात आणि फाईल फोल्डरमध्ये टाकण्यात इतके व्यस्त होतो की आम्हाला तीन दिवस घरी जाता आले नाही.


 व्यस्त वेळापत्रक असूनही मोदीजी थोडा वेळ काढून दूतावासात आले आणि भेट यशस्वी करण्याचे श्रेय सर्वांना दिले आणि सर्वांनी त्यांच्यासोबत चहा घेतला.


 एका महान व्यक्तीची ही ओळख!


 मित्रांनो, आपल्या देशाला खूप वर्षांनंतर एक प्रामाणिक पंतप्रधान मिळाले आहेत, त्यांचा आदर करा;


 प्रत्येक वेळी त्यांची बदनामी करणाऱ्या विरोधकांचा पराभव करून त्यांना धडा शिकवा आणि देशाला वाचवा.



 *फक्त प्रामाणिकपणा आवडणारे लोकच हा संदेश शेअर करतील.*

Featured post

Lakshvedhi