Monday, 26 June 2023

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन

 तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन


- संचालक डॉ.विनोद मोहितकर


महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक


डॉ. मोहितकर यांची 'दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत


            मुंबई, दि. 26: तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे राज्यातील युवकांना चांगले करिअर आणि व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा, असे आवाहन राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.


            तंत्रशिक्षणातील विद्यार्थ्यांना जागतिकस्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संचालनालय सातत्याने कार्यरत आहे. यासाठी राज्य तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत विविध योजना आणि उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षाची अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज कशा प्रकारे करावेत, ही प्रवेश प्रक्रिया काय आहे, अभ्यासाचे स्वरूप कसे आहे तसेच अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर रोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध होणार आहेत. यासह विविध विषयांवर संचालक डॉ. मोहितकर यांनी 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून माहिती दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार, दि. 27 आणि बुधवार दि. 28 जून 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.


            ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार, दि. 27 जून 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल. निवेदक रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.


                        महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक पुढीलप्रमाणे


ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


000

सामाजिक न्याय दिनानिमित्त मागासवर्गीय मुलींच्याशासकीय वसतिगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 सामाजिक न्याय दिनानिमित्त मागासवर्गीय मुलींच्याशासकीय वसतिगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.


वसतिगृहाला माता रमाई यांचे नाव देणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            मुंबई, दि. २६ : राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणातून सामाजिक उन्नतीकडे जाण्यावर भर दिला होता. आजच्या लोकार्पण सोहळ्यातून आपण त्याच दिशेने प्रयत्न करीत आहोत. मुंबई शहरामध्ये आपण २५० विद्यार्थिनी क्षमतेच्या वसतिगृहाचे लोकार्पण करीत आहोत. या वसतिगृहाला माता रमाई यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.


            सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. या कार्यक्रमास पर्यटन आणि कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बाल विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते चेंबूर येथील १ हजार मुला-मुलींची विभागीय स्तरावरील वसतिगृहापैकी २५० मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मंगरुळपीर, जि. वाशिम व बार्टी अंतर्गत येरवडा संकुल, पुणे येथील संघ लोकसेवा आयोगाच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. तसेच समान संधी केंद्र उपक्रमाच्या मोबाईल ॲपचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज यांचा जयंती दिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. शाहू महाराजांसमोर मोठी आव्हाने असताना त्यांनी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. खेडोपाडी शाळा सुरू करीत वसतिगृह संकल्पना आणली. त्यामुळे वसतिगृह संकल्पनेचे जनक म्हणूनही त्यांना संबोधले जाते.


            राज्यातील विविध समाज घटकातील सनदी अधिकारी व्हावेत यासाठी ‘बार्टी’, ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’ या संस्थांच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षण दिले जाते. या संस्थांमधून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारमार्फत होत आहे. राज्य शासन अनुसूचित जाती, जमाती व बहुजन वर्गाच्या कल्याणासाठी विविध योजना राबवीत आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविली आहे. सामाजिक न्याय, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, इतर मागास विभाग, शालेय शिक्षण विभाग, कौशल्य विकास आदी विभागांमार्फत विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले जात आहेत, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मुंबईतील ‘एसआरए’ सह अन्य प्रलंबित प्रकल्प सरकारच्या माध्यमातून संबंधित संस्थांना सोबत घेऊन पूर्ण करण्यात येतील. चेंबूर परिसरातील प्रलंबित असलेले असे सर्व प्रकल्प मार्गी लावले जातील.


            खासदार श्री. शेवाळे म्हणाले की, मुंबई शहरात मुलींच्या वसतिगृहाची गरज आहे. शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना सुरक्षित वास्तू या वसतिगृहामुळे मिळाली आहे.


            सचिव श्री. भांगे यांनी प्रास्ताविकात सांगितले, समाजकल्याण विभागाची 1932 मध्ये स्थापना झाली असून राज्याच्या या विभागास सर्वसाधारणपणे आता 90-91 वर्षाचा कालखंड झालेला आहे. अशा या ऐतिहासिक विभागामार्फत राज्य शासन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक संवर्धनासाठी काम करते. परदेशातील उच्च शिक्षणासाठी राज्य शासन अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करते. दरवर्षी विभागाच्या ४४१ वसतिगृह २,३३८ अनुदानित वसतिगृह व ९० निवासी शाळामार्फत १.५ लक्ष विद्यार्थ्यांना शिक्षण, भोजन व निवासाची सोय करण्यात येते. समाजकल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांनी आभार मानले.


वसतिगृह व मोबाईल ॲप विषयी माहिती


            मुंबई शहरामध्ये 250 क्षमतेच्या वसतिगृहाचे सुरू करण्यात आले. नजीकच्या काळात आणखी 750 विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह सहा महिन्यांत सूरू करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई उपनगर जिल्ह्यात 1300 मुले व 350 मुलींसाठी वसतिगृहाची उपलब्धता होणार आहे. चेंबूर येथे उभारण्यात येत असलेले हे वसतिगृह 1000 क्षमतेचे असून त्याचे बांधकाम बीओटी तत्वावर झालेले आहे. या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना भोजन, शैक्षणिक सुविधा, सुरक्षित निवास याबरोबरच शैक्षणिक/इंटरनेट, संगणक सुविधा, ग्रंथालय सुविधा, करमणुकीच्या सुविधा उपलब्ध आहेत.


              वाशीम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहामुळे 100 मुलींच्या निवासाची व शिक्षणाची व्यवस्था ग्रामीण भागामध्ये उपलब्ध होणार आहे. समान संधी केंद्र उपक्रमाच्या मोबाईल ॲप च्या माध्यमातून राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये अनुसुचित जाती जमाती, विजाभज, इमाव या सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना असलेल्या शैक्षणिक सवलतींची माहिती मिळणार आहे. तसेच रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता, व्यवसायिकता कौशल्य प्रशिक्षण या सर्व बाबींचे सर्वसमावेशक मार्गदर्शनही मिळणार आहे. 


0000

घाटकोपर इमारत दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश

                                             घाटकोपर इमारत दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश

- पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

 


मुंबई, दि.२६ :  पहिल्या पावसामुळे घाटकोपर पूर्व येथील राजावाडी कॉलनीमध्ये नुकतीच एक जुनी तीन मजली इमारत कोसळून दुर्घटनाग्रस्त झाली. या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची व जखमींची मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भेट घेतली आणि दुर्घटनास्थळाची पाहणी केली. शासनातर्फे  सुरू असलेल्या बचावकार्याची पाहणी करून या  अपघाताची सखोल चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी  दिले. 

            "झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून पीडित कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. याबाबतची सर्व तपासणी सुरु आहे. यासाठी अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी स्वतःची सर्वतोपरी काळजी घ्यावी आणि सरकारी यंत्रणांना सहकार्य करावे" असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी केले.

        २५ जून रोजी झालेल्या या अपघातानंतर अग्निशमन दल, पोलीस, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारीराष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची तुकडी घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य करते वेळी देखील पालकमंत्री  श्री. लोढा घटनास्थळी उपस्थित होते. अपघातानंतर सुमारे १२ तासापेक्षा जास्त काळ बचाव कार्य सुरु होते.

  

000

तुम्ही खरंच हेल्दी आहात? कसं ओळखाल.....?*टिप्स

 *तुम्ही खरंच हेल्दी आहात? कसं ओळखाल.....?*


काही लोक सतत आजारी पडतात. यासाठी अनेकदा ते डॉक्टरांकडेही जातात पण त्याचा कधीही फायदा होत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. आपण काही कारणे जाणून घेऊया.


*या कारणांमुळे तुम्ही हेल्दी आहात का? हे जाणून घेण्यास सोपी जाणार...*


*१) तुमचा आहार योग्य आहे का...?*


आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार. आपण काय खातो, किती खातो, कधी खातो ह्या सगळ्याला फार महत्व असते.


*२) आपल्याला व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता आहे का...?*


आपल्या सतत आजारी पडण्यामागे अजून एक कारण असू शकते ते म्हणजे व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता असणे.


*३) तुम्ही पुरेसे पाणी पिताय ना...?*


आपल्या शरीरात ६० टक्के पाणी असते त्यामुळे शरीराच्या सगळ्याच क्रिया पूर्ण होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.


*४) तुम्हाला पुरेशी झोप मिळते आहे का...?*


आपले शरीर हे कोणत्याही रोगविरुद्ध लढण्यासाठी सक्षम असते. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले शरीर रोग, सूज, जखम ह्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी काही प्रथिने सोडते.


*५) तुम्ही तोंडाची नीट स्वच्छता करता ना...?*


आपले तोंड हा अनेक बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाण्याचा प्रमुख मार्ग आहे. अनेक चांगले वाईट बॅक्टेरिया आपल्या तोंडात वाढतात आणि नंतर आपल्याला ते आजारी पाडतात.


*६) तुमच्या कुटुंबात कुणी सतत आजारी पडते का...?*


अनेकवेळा असे दिसून आले आहे की रक्तातील पांढऱ्या पेशी, ज्या कोणत्याही रोगाचा सामना करतात त्यांची संख्या जर कमी असेल तर तो माणूस सतत आजारी पडतो.


*७) तुम्हाला ताण आहे का...?* 


आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण-तणाव नसलेला माणूस मिळणे जवळपास अशक्य आहे. पण जर आपल्याला अतिरिक्त ताण असेल तर त्यामुळे आपल्या शरीराची खूप हानी होते. यापैकी जे काही कारण आपल्याला सापडेल ते दूर करून आपण निरोगी आयुष्य जगू शकतो


डॉ. प्रमोद ढेरे,


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*

हे काही नियम पाळलेत तरच निरोगी रहाल

 . हे काही नियम पाळलेत तरच निरोगी रहाल 

१)रोज ४०शी नंतर पाण्यात गव्हाच्या दाण्या एवढा चुना घ्या.

२)दिवसात कमीत कमी तीन लिटर पाणी घ्या.

३)भोजनाची वेळ पाळा.

४)चौरस आहार घ्या.जिभेचे चोचले टाळा,जाऊ तिथे खाऊ धोरण टाळा.

५)जेवणा पुर्वी अर्धातास व जेवणानंतर एक तासाने पाणी प्या.

६)रोज तुळस,बेल,कडुलिंबाची पाच पाच पाने कुटून गोळी गिळा.

७)जंकफूड, पाव,चहा ,बेकरी आयटम कमी खा.

८)रोज त्रिफळा सकाळी दुधा बरोबर पुरक व रात्री गरम पाण्या बरोबर रेचक म्हणून घ्या.

९)सकाळी उठल्या वर थोडे पाणी घेऊन तोडातली पहीली लाळ गुळण्या करुन प्या अँसिडीटी कमी होईल.

१०)सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना गरमपाणी घ्या.

११)महीन्यातून एकदा ऐरंडेल घ्या कोठा म ऊ होतो.

१२)जेवणात मेथीचा प्रयोग करा,सकाळी उठल्या उठल्या मेथीचे दाणे चाऊन खा.

१३)महीन्यातून एकदा तरी लंघन उपवास करा हलके अन्न खा.

१४)प्राणायाम, योगा,चालणे कमीत कमी ४५मिनिटे करा.

१५)मन एखाद्या ठिकाणी एकाग्र करा.

१६)संगीताचा शरीरावर पुर्ण पाँझिटिव्ह इफेक्ट होत असल्याने सकाळी इनस्ट्रुमेंन्टल धून ऐकत जा.

स्वतः ला तणाव विरहित ठेवा.

आणि आनंदी जगा.

   ..आणि हो मोबाईलच्या आहारी जाऊन जागरण करू नका.

 पहा पटतंय का मंडळी.

ता.क.दुपारी बिलकुल झोपू नका .डायबेटीस चा धोका वाढतो


वैद्य.गजानन


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





दापोली-हर्णे मार्गावर अपघात,

 दापोली-हर्णे मार्गावर अपघात, मुख्यमंत्र्यांकडून शोकमृताच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

            मुंबई दिनांक २६: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर आसूद येथे ट्रक आणि रिक्षा अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडूनही त्यांनी याविषयी माहिती घेतली व मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देशही दिले.


            या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला काही प्रवासी जखमी आहेत.जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आ

हेत.


युवा परिवर्तन


 

Featured post

Lakshvedhi