Monday, 19 June 2023

शरीरातील सर्वात नाजुक आणि महत्वाचा अवयव म्हणजे डोळा!*

 *शरीरातील सर्वात नाजुक आणि महत्वाचा अवयव म्हणजे डोळा!*


 डोळ्याची नजर अबाधित राहावी आणि सध्याच्या या धावपळीच्या काळात डोळ्यांना कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून आपण आपल्या परिने बरीच काळजी घेत असतो. पण तरिही सतत लॅपटॉप आणि संगणकासमोर बसून काम केल्याने आणि त्यानंतर मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे त्याचे परिणाम दृष्टीवर होतातच. एकदा दृष्टी कमजोर झाली की मग एकतर चष्मा सतत डोळ्यांवर ठेवून वावरावं लागतं आणि सोबतच डोळ्यांची तपासणी करण्यासाठी सतत डोळ्यांच्या दवाखान्यात फे-या घालाव्या लागतात. म्हणूनच चष्मा लागण्याआधी किंवा दृष्टीवर परिणाम होण्याआधीच वैयक्तिक स्तरावर काळजी घेण्यासोबतच आपण काही घरगुती उपाय देखील करुन डोळ्यांना स्वस्थ ठेवू शकतो. दररोज या काही फळांचा आहारात समावेश करुन तुम्ही डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवू शकता. तर जाणून घेऊया तुमच्या उपयोगी पडतील अशा काही साध्या-सोप्या टिप्स.

गुलाबजल’ या शब्दांतच किती थंडावा दडलाय. गुलाबजल खूप थंड असल्यामुळे सहाजिकच ते डोळ्यांसाठी खूपच प्रभावी मानले जाते. तसं तर गुलाबजल हे मुड फ्रेश करणे, कांती उजळणे, त्वचा मुलायम करणे अशा अनेक गोष्टींमध्ये लाभदायक ठरते. पण एका अभ्याअंती असे सिद्ध झाले आहे की गुलाबजलचा वापर केल्याने आपली दृष्टी वाढण्यासही मदत होते. डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी किंवा आराम देण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने आठवड्यातून दोन ते तीन वेळा डोळ्यांत गुलाबजलाचे दोन ते तीन थेंब टाकू शकता. डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळे किंवा काळे डाग कमी करण्यासाठी देखील तुम्ही गुलाबजलचा जरुर वापर करू शकता.मोहरीचे तेल खरोखरंच डोळ्यांची दृष्टी वाढवण्यास लाभदायक ठरते. चाचणी दरम्यान, दररोज या लोकांच्या पायाला १० मिनिटे मोहरीच्या तेलाने मसाज करण्यात आली आणि आश्चर्य वाटेल पण त्यांच्या दृष्टीमध्ये खरोखरच सकारात्मक बदल दिसून आले. म्हणूनच वैज्ञानिक निकषांच्या आधारे, दररोज न चुकता मोहरीच्या तेलाने १० मिनिटे मसाज केल्याने डोळ्यांची दृष्टी अधिकव्यायाम केल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. पण तुम्हाला माहित आहे का? डॉक्टरांच्या अभ्यासानुसार न चुकता नियमित व्यायाम करणा-या आणि वजन नियंत्रित ठेवणा-या लोकांची दृष्टी ही सामान्य लोकांपेक्षा अधिक चांगली असते. वजन वाढल्यामुळे डायबिटीज २ (मधुमेह) असलेल्या लोकांची दृष्टी कमजोर होत जाते. याच कारणामुळे नजर साफ असण्यासाठी सर्वात आधी तुमचं वजन नियंत्रित असणं फार गरजेचं असतं. त्यामुळे नियमित व्यायाम करा आणि आपली दृष्टीत अनेक सकारात्मक बदल घडवून आणा. 

बदामाने स्मरणशक्ती वाढते, कांती उजळते आणि यासोबतच अनेक लाभ होतात हे आपल्याला माहितच आहे. पण बदामाच्या सेवनाने डोळ्यांची नजर देखील वाढते.बदामा मध्ये व्हिटॅमिन ‘ए’ मोठ्या प्रमाणात आढळते. तुम्ही दररोज दुधात बदामाची पुड टाकून त्याचे सेवन करू शकता. असे केल्याने तुम्हाला दुध आणि बदाम असे दोन्हीतील व्हिटॅमिन ‘ए’ मिळतील आणि डोळ्यांची दृष्टी अधिक बळकट होण्यास मदत होईल. टाकलेल्याआवळ्यातील अॅंटिऑक्सिडंट डोळ्यांचा पडदा निरोगी ठेवण्याचे काम करतात. डोळ्यांतील पडदा निरोगी राहिल्याने आपली दृष्टीदेखील चांगली राहण्यास मदत होते दुधाचे सेवन करतातअसे कितीतरी पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनाने डोळ्यांना त्याचे फायदे होतात. या मध्ये प्रामुख्याने गाजर, अक्रोड, ब्रोकोली आणि पालक या भाज्यांचा आणि फळांचा समावेश असतो. म्हणूनच या पदार्थांना आपल्या आहारात समाविष्ट करुन तुम्ही डोळे निरोगी ठेऊ शकता.


दृष्टी आहे तर सृष्टी आहे. निरोगी आणि साफ दृष्टी असणं फार गरजेचं आहे कारण त्यामुळे आपण हे सुंदर जग पाहूच शकत नाही तर त्याचा आनंदही घेऊ शकतोय. आपण शरीरातील इतर अवयवांची जशी काळजी घेतो तसंच डोळा हा देखील एक महत्वाचा अवयव आहे आणि त्याची यथायोग्य काळजी घेणं आपल्या हातात असतं. म्हणूनच डोळ्यांची काळजी घ्या आणि दृष्टीला निरोगी बनवा.

प्रमोद पाठक.



भेंडी खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे.*

 *भेंडी खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे.*


भेंडीमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असल्यानं त्यामुळं शरीरातील रक्ताचं प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. याशिवाय अन्नपचनक्रियाही सुधारते. त्यामुळंच भेंडीला सुपरफूड मानलं जातं. त्याचबरोबर भेंडीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स (GI) देखील कमी असतो. त्यामुळं शरीराला आवश्यक पोषकघटक मिळतात. आणि मधुमेह, रक्तदाबाची समस्या कमी होते.


याशिवाय गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठीही भेंडी ही फायदेशीर मानली जाते. महिलांनी भेंडीचं सेवन केल्यास त्यांच्या शरीराला आवश्यक पोषकतत्व मिळतात. बाळंतपण झालेल्या महिलांनी भेंडीचं सेवन केल्यास त्यांना अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे मिळत असतातभारतातल्या लोकांना अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करायला आवडतं. भेंडी ही त्यातलीच एक चविष्ट आणि आरोग्यदायी भाजी मानली जाते. भेंडीत असलेल्या अनेक गुणधर्मांमुळं त्याचे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे असतात. भेंडीत असलेल्या फोलेट, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह असल्यानं त्याचं सेवन करणं हे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं

वजन कमी करण्यासाठी

भेंडीमध्ये कॅलरी कमी असतात, १०० ग्रॅम भेंडीमध्ये केवळ ३३ कॅलरी असतात. त्यामुळे ही भाजी वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. पण केवळ भेंडीची भाजी खाऊन वजन कमी होईल अजिबात नाही. पण याने वजन कमी होण्यास मदत नक्कीच होऊ शकते. 


हृदयरोगांपासून बचावासाठी


भेंडीमध्ये असलेल्या पेक्टिन विरघळणारं फायबर शरीरात कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. आणि याप्रकारे भेंडी हृदय रोग रोखण्यासाठी फायदेशीर ठरते. भेंडीमध्ये असलेल्या करसेटिन तत्व कोलेस्ट्रॉलचं ऑक्सिकरण रोखण्यास मदत करतं. ज्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होऊ शकतो. 


डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी


फायबर भरपूर प्रमाणात असलेली भेंडी पचन क्रियेसाठी आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच भेंडी अ‍ॅंटी डायबिटीक गुण एंजाइम मेटाबॉलिज्म कार्बोहायड्रेटला कमी करण्यासाठी आणि इंसुलिनचं उत्पादन वाढण्यासाठी मदत करते. 


इम्यूनिटी मजबूत करा


भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे आपली इम्यूनिटी मजबूत होते आणि वेगवेगळ्या रोगांशी आणि इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता वाढते. १०० ग्रॅम भेंडी आपली व्हिटॅमिन सी ची ३८ टक्के गरज भागवते. त्यामुळे भेंडीची भाजी खाणे फायदेशीर ठरते.


 प्रमोद पाठक.



Sunday, 18 June 2023

ज्ञानाच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आवश्यक

 ज्ञानाच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण आवश्यक


                                                            -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


         नागपूर, दि.18 : “विद्यापीठ हे ज्ञानाचे मंदिर आहे, या मंदिरात आपल्या सर्वांचे आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण होणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.


            छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्याच्या उभारणीचा भूमिपूजन समारंभ आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते झाल्यानंतर वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार अनिल देशमुख, आमदार अभिजीत वंजारी, आमदार मोहन मते, बबनराव तायवाडे, तांजावर येथील श्रीमंत शिवाजी राजे भोसले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, डॉ. श्रीमंत राजे मुधोजी भोसले, सचिव प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, मंगेश डुके आदी उपस्थित होते.


            “ज्ञानाच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा होत असल्याने येत्या काळात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या जीवनावरील साहित्य येथे उपलब्ध होईल. विद्यापीठ परिसरामध्ये ऑडिटोरियम सेंटर उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जीवनाचरित्र उपलब्ध होईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राष्ट्रसंताची ग्रामगीता, ज्ञानेश्वरी हे सर्व ग्रंथ डिजीटल करण्यात येईल. राष्ट्रसंतांच्या नावाप्रमाणेच विद्यापीठातील छत्रपती शिवरायांचा पुतळा प्रेणादायी ठरेल. ज्ञानाने परिपूर्ण असणारी पिढी निर्माण करायची असल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श त्यांच्या समोर ठेवणे गरजेचे आहे.” असेही श्री. गडकरी म्हाणाले.  


            राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे हे शताब्दी वर्ष असून त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती मार्फत हा पुतळा उभारला जाणार आहे. पुतळा उभारणीचे काम लोकसहभागातून केले जाणार आहे. नागपूर विद्यापीठाशी संबंधीत माजी विद्यार्थ्यांनी समाजातील दानशूर व्यक्तिंनी लोकसहभागाच्या या कार्यात मदत करण्याचे आवाहन, स्मारक समितीने केले आहे.


असा असेल पुतळा


            छत्रपती शिवरायांचा विद्यापीठ पसिरात उभा राहणारा पुतळा भव्य असेल अशी माहिती यावेळी स्मारक समितीने दिली आहे. पुतळ्याच्या चुबतऱ्यांची लांबी 20 फूट, रूंदी 15 फूट, उंची 9 फूट असेल तर या चबुतऱ्यांवर उभा राहणारा सिंहासनारूढ पुतळा 32 फूट उंचीचा असेल त्यावरील छत्र 7 फूट उंचीचे असेल. संपूण ब्राँझ धातूने बांधला जाणारा हा पुतळा 10 हजार किलोग्रॅम वजनाचा असेल. प्रसिध्द मूर्तिकार सोनल कोहाड हे शिल्प साकारणार आहे.


0000


 


 



 


 


पितृ देवो भव





 

पितृ देवो भव

 






पितृ देवो भव

 



स्त्री-पुरुषांमध्ये मैत्री असावी का ?-


स्त्री-पुरुषांमध्ये मैत्री असावी का ?-----

का? नसावी ----

स्त्री-पुरुषांची मैत्री म्हटली की अनेकांच्या पोटात गोळा येतो एका वेगळ्या नजरेने बघितले जाते

आम्ही 21व्या शतकात वावरत असताना सुद्धा आमचे विचार मनुवादी विचारसरणीचेच आहेत,

खरंतर हा विषय गहन च आहे

लिहिण्याच धाडस करत आहे

किती पर्यंत जमेल माहित नाही,

 आज ही समाजव्यवस्थेत स्त्री पुरुषाच्या मैत्रीला कुटुंबात व समाजात मोकळे असे स्थान नाही ,

स्त्री पुरुष मैत्री म्हणजे फक्त शारीरिक संबंधच, असे आम्ही गृहीतच धरले आहे,

हाच विचार रूढ केला आहे,

'राधा 'आणि कृष्णाची '' मैत्री आम्ही स्वीकारली, कान्हा वर प्रेम व भक्ती करणारी '' मिरा" ही आम्ही स्वीकारली,

परंतु स्त्री पुरुषाची मैत्री म्हटलं की भुवया उंचावतात, त्यातल्या त्यात ते जर, विवाहित असतील तर मग बघायलाच नको,

मानवी संस्कृतीच्या इतिहासात स्त्री एक स्वतंत्र व्यक्तीमत्व असलेली मानव आहे, या विचाराशी परीचित व्हायला गेल्या शेदिडशे वर्षात सुरूवात झाली आहे. स्त्रीला एक मानव म्हणून स्विकारणे, तीला एकसमान समजणे तरी अजूनही रूजलेले नाही. 


स्त्री पुरूष यांच्यातील सबंधाचा विचार केवळ नरमादी वा केवळ एकच नात्याच्या अनुषंगाने करणारे लोक, निव्वळ संकुचित वा बुरसटलेले नव्हे तर ते मानव या अर्थाने उत्क्रांतही झालेले नसतात. स्त्रीयांना स्वतंत्र बुद्धी असते ही बाबच अनेकांना मान्य नसते असे लोक कोणत्याही स्त्रीपुरूषांना एकाच नात्याने पाहत असतात. 


लिओ टॉलस्टॉय म्हणताच ' nothing is so necessary for man, as to the company of intellectual women'. टॉलस्टॉय ने स्त्रींयाबाबतच लिहीलं कारण त्यावेळी स्त्रीया बुद्धीमान नसतात ,असा समज होता. प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या वा स्त्रीच्या मागे पुरूष वा स्त्री असते. जरूरी नव्हे की ती स्त्री पत्नीच असेल वा तो पुरूष तीचा पतीच असेल! हा आधुनिक, स्त्रीपुरूष समतावादी, मुक्त, स्वतंत्रतावादी असू शकतात

मुळात मैत्रीचा पाया शारीरिक नसुन मानसिक भावनिक आणि वैचारिकतेचा आधारावर उभा असतो, हे आम्ही लक्षातच घेत नाही,

शारीरिक भुके पेक्षा ही बौद्धिक आणि मानसिक भुकेसाठी ते एकत्र येऊ शकत नाही का?

प्रत्येक नात्याला' एक मर्यादा असते 'हे तर आम्ही मान्य करतो,

पती -पत्नीशी जे बोलू शकत नाही' 

किंवा पत्नी - पतीशी जे बोलू शकत 'नाही परंतु आपल्या मित्रा शी नक्कीच बोलते हे हक्काचं विश्वासाचे नाते नाही का,?

मैत्री मध्ये समविचारांची देवाण-घेवाण विचार विनिमय संकटात एकमेकांना सहाय्य एकमेकावर आढळ विश्वास एकमेकांसाठी झोकुन देण्याची भावना अपार मायेची प्रेमाची श्रृंखला मी पनाचा व अहंकाराचा लवलेशही नसतो, एकमेकांचे हितचिंतक असतात.

ती त्याची मैत्रीण अगदी सहजतेने स्वीकारते तसेच त्यांने ही अगदी सहजतेने तिच्या मित्राला स्वीकारले पाहिजे. दोन्ही नात्यात सहजता असेल ना तर कुठेच प्रॉब्लेम येत नाही. परंतु तसे होत नाही,

 पती आपल्या पत्नीला म्हणत असतो की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो

परंतु प्रेम म्हणजे काय हे अनेक पतीला समजलेलच नसते, तिने जर सांगितलं की आज माझ्या मित्राचा फोन आला होता ,आम्ही भेटणार आहोत, तेव्हा त्याचा चेहरा बघा त्याच्या प्रतिक्रिया काय आहे, बायकोचा मित्र म्हटला की त्याची तळपायाची आग मस्तकाला जाते, तेंव्हा त्याचे प्रेम कुठे गेल, म्हणजेच काय त्याचं प्रेम किती स्वार्थी विचाराच आहे ,तो जर खरं प्रेम करत असता त्याने खुशीने विचारलं पाहिजे अरे वा माझ्यासोबत पण त्याची ओळख करून दे,, असे मात्र होत नाही हेच तिच्यासाठीही लागू होते 

परंतु सहजतेने दोघांनीही समजून घेतल्यास

 दोघांच्याही वैवाहिक जीवनाला यत्किंचितही धक्का लागणार नाही ,

आता तरी 

या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे खूप महत्त्वाचे आहे,


🌹 ( *भाग 2)* 

 *स्त्री-पुरुषाची मैत्री असावी का ? का असू नये* ?


2 दिवसा पुर्वी याच विषयावर पोस्ट लिहीली होती अनेकांनी खूप चांगल्या प्रतिक्रया आल्या अनेकांनी सूचना ही केल्या काहींनी आमच्या मनातील भावना तुम्ही व्यक्त केल्या आहेत असे सांगीतले, या विषयावर वर्ध्या वरुन ऐका मैत्रिणीने पोस्ट सेंड केली माझे काम सोपे केले,

मित्रानो!

आयुष्याच्या कोणत्याही स्टेज ला कोणीतरी आपलं असणं.. हक्काचं असणं... आपल्या पाठीशी असणं... समजून घेणारं असणं... खूप मॅटर करतं... मग ते एखद्या स्त्री ला असो वा पुरुषाला...

 

लग्न झाल्यावर... पहिली काही वर्षे खूप मस्त आनंदी जातात... दिवस ढळू नये अन रात्र सरु नये अशी अवस्था.... असते 

एकमेकांची खूप काळजी करणं... कौतुक करणं.. खूप प्रेम करणं... खूप छान दिवस असतात.... नाही का त्यात रुसवे फुगवे ही असतात.. मनवणं ही असतंच ... 

भांडणा नंतरचा समेट होणं अजुन गोड असतं....

यात २-३ वर्षे निघुन जातात... 

मग बाळाची चाहुल लागते.. 

त्या सर्व घडामोडी मधे १२-१५ वर्षे अशीच निघुन जातात... 

मुलांना मोठं करणं... त्यांच्या शाळा सुरु होतात... 

ही मधली १०-१५ वर्षे खूप धावपळीत निघुन जातात.. 

पहिल्या २-३ वर्षांची अनुभवलेली नवलाई संपलेली असते... अन ही मधली १५ वर्षे सुसाट निघुन गेलेली असतात..

स्त्री ३५-४० शीत आलेली असते.. मुलांच्या घराच्या जबाबदारीतुन थोडी बाहेर आलेली असते..... 

थोडी स्वतः कडे लक्ष देवु लागते... 

पती राजा ही थोडा घरच्या मुलांच्या अन बायकोच्या व्यापातुन बाहेर पडलेला असतो... त्याचे मित्र.. ऑफिसमधल्या किंवा ऑफिस बाहेरच्या मैत्रीणी.. पत्नी पेक्षा ही त्याला जवळच्या वाटू लागतात मग दोघांमध्ये प्रत्येक विषयावर एकमेकाचा शेअरिंग होत राहत वाढदिवसाचे एकमेकांना गिफ्ट एकमेकांचे शॉपिंग पार्ट्या... आउटींग मस्त सुरु असतं ...

हळु हळु बायकोकडे दुर्लक्ष झालेलंच असतं...

थोडं गृहीत धरणं ओघानेच आलेलं असतं.... 

बघेल तिचं ती काय ते.. बघेल मुलांचं... बघेल घरचं... आपण पैसा देतोय ना... मग झालं...

सुख म्हणजे अजुन काय हवं हिला.. 

घर.. मुलं ... नवरा... जॉब असेल तर जॉब... हे सर्व आपलं जग मानणारी स्री मात्र काहीतरी शोधत असते...

वयाच्या या स्टेज वर काहीतरी निसटुन गेलंय.. निसटुन चाललंय आपल्या हातातून याची जाणीव तिला क्षणोक्षणी होवु लागते... 

रितेपणा आलेला असतो... मित्र मैत्रीणी असल्या तर ठीक.. 

पण जिने नवरा... मुलं.. घर च सर्वस्व मानलंय तीच्या रीते पणाला मर्यादा च नसतात...

नवरा त्याच्या विश्वात दंग... मुलं त्यांच्या विश्वात ... दंग झालेले असतात 

मग हिने करायचं काय? 

नवऱ्याला आपलं काय चुकतंय हेच कळत नसतं... अन हिला सांगता येत नसतं... 

मनापासुन वाटत असतं कोणीतरी अशी व्यक्ती हवी.. जी आपल्याला व आपल्या भावनाना समजून घेइल.. आपल्या हक्काची असेल... माझे मुड्स त्याला कळतील ... माझं शांत रहाणं त्याला कळेल.. माझी चिडचिड तो सहन करेल... मला समजावेल.. 

या अपेक्षा खूप भयानक असतात...

नवरोबाला कधीही न कळणाऱ्या... 

त्याने तिला कधीच च गृहीत धरलेलं असतं... अन हिची मात्र घुसमट होत असते... 

आयुष्य असंच संपणार की काय अशी भिती मनात... वाटत असते ,

मग सुरु होतो खेळ चौकटीतला अन चौकटी बाहेर चा... 

आशा परिस्थितीमध्ये

एखाद्याला मित्र -मैत्रीण भेटते तिला समजून घेणारी.. पण तेंव्हा खरं युद्ध सुरु असतं तिच्या मनात, जिला मित्र मिळालाय ...

' हे योग्य आहे का ? आपण पाप करतोय का? समाज काय म्हणेल? कोणाला काही कळालं तर ?' वगैरे वगैरे.....

सगळीकडुन च घुसमट...


करायचं काय? 


समाजाने अधोरेखीत च केललं आहे .. की स्त्री अन पुरुषामधे कधीच चांगली.. निस्वार्थी.. निर्मळ मैत्री होवू च शकत नाही... 


मग भेटण्यात बोलण्यात चोरटेपणा येतो... 

कधी कधी या सगळ्यात ती वहावत जाते .. तर कधीतरी कोणी तरी स्वतः ला सावरुन घेते...


पण विषय हा आहे की तिने करायचं काय ? 


घरात जे हक्काचं आहे... ज्यांच्या साठी उभं आयुष्य खर्ची घातलंय ... स्वतः च्या इच्छा अपेक्षा ज्यांच्यासाठी मारल्यात... ज्यांच्या मुळे अन ज्यांच्या साठी स्वतः चं शरीर बेढब करुन घेतलंय ... त्या कोणालाच तीचं काही पडलं नसेल... तीला नक्की काय हवय हेच त्याना कळत नसेल तर तीने जावं कुठे? 


कोणाकडुन अपेक्षा कराव्यात? की करुच नयेत? 

तडफड तडफड अन नुसती तडफड....

 कोणीतरी कुटुंबातील व्यक्ती बोलते या बाबांच्या सत्संगला जाऊया का?

तिला बरे वाटते मग ती सत्संग ला जायला लागते बुवा, बाबा ,महाराज, अतिशय चतुर असतात स्त्रियांच्या मनातील द्विंधा

ते ओळखून असतात अध्यात्माच्या गोष्टी तिला ते बरोबर अडकवतात ,तू गेल्या जन्माची "राधा व मी गेल्या जन्माचा कृष्ण" आपली भेट,, देवानेच घडून आणली, आशा तिला थापा मारत असतो

मग आसाराम बापू सारखे बाबा समाजामध्ये कितीतरी आहेत मग अनेक स्त्रिया या बाबांना बळी पडतात, मुळात ती धार्मिक नव्हतीच,, चौकटीच्या बाहेर जाऊन मित्र जर जोडला तर समाज नाव ठेवेल बाबा बुवा सत्संग हा अस्थेचा भक्तीचा व सुरक्षित मार्ग वाटतो इकडे कोणी संशयाने आणि बघत नाही एरवी नवरोबा पत्नीस डॉक्टर कडे घेऊन गेल्यानंतर डॉक्टर चेक करत असताना हा बाहेर बसून कासावीस होतो इतका वेळ हा काय तपासतो आहे डॉक्टर

परंतु पत्नी सत्संग जात आहे तेव्हा मित्र मैत्रिणी सांगत असतो माझी पत्नी भक्ती मार्गाला लागली, सत्संग च्या नावाखाली तिकडे फक्त शोषणच असते 

 ... त्याला हिच्या मनात काय चाललंय याचं देणं घेणं नसतं...

नात्यामधे तोच तोच पणा आलेला असतो... फक्त एकमेकांच्या आयुष्यात असण्याची सवय झालेली असते ... 

ती हरलेली असते... मेंटली थकलेली असते.. 

Physical satisfaction पेक्षा स्त्री ला mental satisfaction खुप आवश्यक असतं हे नवरोबाला कळतच नसतं... किंबहुना बहुतांशी पुरुषांना कळलेलंच नसतं... 

खूप फरफट होते तिची यात.... मनात खूप मोठी उलथापालथ होत असते... अन ज्याने समजुन घ्यायला हवं तो आपल्या च विश्वात रममाण... त्याला या कसल्याचा गंधच नसतो...

अन मग सुरु होतो एकाकीपणाचा खेळ...

कितीतरी रात्रा तिने जागून काढलेल्या असतात त्याची वाट पाहत त्याच्या सोबत जेवणासाठी थांबलेली असते घड्याळाकडे पाहत, रात्री उशिरा नवराबा येतो मैत्रिणीबरोबर बाहेरच पार्टी करुन, ही जागी असल्याचे पाहून तो विचारतो' तू अजून झोपली नाहीस ' तिला हुंदका' येतो पण ती आतल्याआत तीआवंढा गिळते ,

तो तिला मिठीत घेऊन झोपण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्याच्या तोंडाचा वेगळाच दर्प व शरीराचा स्प्रे मारल्याचा वास ती घेत असते हा अनोळखी वास असतो तो केव्हाच झोपी गेलेला असतो, ही मात्र त्याच्या कुशीत जागीच असते प्रेमाला वंचित झालेली असते भूतकाळातल्या आठवणी जागवत,

शरीराने व मनाने ति केव्हाच दूर गेलेली असते, त्याच्यात उरले होते फक्त पती-पत्नीचं नाते, हे नात समाजाने दिले होते, या नात्यात 'ना भावना' होती, ना '' आकर्षण, प्रेम तर आटलच होतं,


अशा वेळी तिने काय करावे ,

तुम्हाला काय वाटते ??


नक्किच प्रतिक्रिया द्या

Featured post

Lakshvedhi