Sunday, 11 June 2023

श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनासाठी जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची लेफ्टनंट गव्हर्नर यांना विनंती

 श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनासाठी जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची लेफ्टनंट गव्हर्नर यांना विनंती


            मुंबई, दिनांक 11 : श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू आणि काश्मीरचे गव्हर्नर मनोज सिन्हा यांना प्रत्यक्ष भेटून केली. सध्या मुख्यमंत्री कश्मीर दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी मनोज सिन्हा यांची भेट घेतली. 


            यावेळी त्यांना दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढविणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे यासाठी महाराष्ट्र भवनाला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल. श्रीनगर मधील हे महाराष्ट्र भवन केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे राहणार नाही तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृध्द कला, खाद्य आणि संस्कृतीची झलक देखील पाहता येऊ शकेल.


            जम्मू आणि कश्मीर समवेत नाते अधिक दृढ करण्यासाठी या महाराष्ट्र भवनाचा उपयोग विद्यार्थी, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी यांना एक प्रमुख केंद्र म्हणून करता येईल. 


            महाराष्ट्र भवनसाठी योग्य ती जागा मिळाल्यास कश्मीरची संस्कृती, पर्यावरण लक्षात घेऊन एक चांगले भवन या ठिकाणी राज्य सरकार तर्फे बांधण्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी या पत्रात केली आहे.



00000


नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याचे शासनाचे आवाहन

 नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याचे शासनाचे आवाहन


            मुंबई, दि.11 : केंद्र सरकारने अंमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग मुक्त भारत’ हा संकल्प निश्चित केला आहे. त्याचे पालन करण्यासाठी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने 12 ते 26 जून 2023 या कालावधीत "नशा मुक्त भारत पंधरवडा" जाहीर केला आहे. अंमली पदार्थांच्या (ड्रग्स) दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.


            ‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याबाबत सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे उपस्थित होते.


            सचिव श्री.भांगे म्हणाले, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. 26 जून या जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनाचे औचित्य साधून जनजागृती करण्यासाठी रॅली, परिसंवाद, कार्यशाळा, ई-प्रतिज्ञा मोहिमा इत्यादीद्वारे विविध कार्यक्रम घेण्यात यावेत. कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य घेण्यात यावे.


            "नशा मुक्त भारत" चे स्वप्न साकार करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात यावा, असेही सचिव श्री.भांगे यांनी सांगितले.


००००

भेट sadheetchya


 

Zindgi imtihaan लेती है





 

आरोग्य चांगले साठी सर्वसामान्य नियम

 नमस्कार 🙏🏻 आरोग्य चांगले साठी सर्वसामान्य नियम


1)तहान लागेल तेव्हाच पाणी प्या.


2)शाबुदाणा,शेंगदाणे,वरी,दही हे सगळे पित्त वाढवणारे पदार्थ खाऊन उपवास करू नयेत... खरा उपवास म्हणजे लंघन..पोटाला विश्रांती देणे..


3)जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात..दुपारी १२ पर्यंत आणि रात्री ८ पर्यंत जेवण करावे.


4)दोन्ही जेवणानंतर शत पावली( Actual १०० steps च अपेक्षित आहेत .व्यायाम नव्हे )घालावी. म्हणजे अन्न पुढे सरकण्यास आणि पचनाला मदत होते.


5)लोणचे,पापड,अति तिखट,तेलकट, खारट अन्न पदार्थ खाऊ नयेत.


6)रात्री च्या वेळी दही खाऊ नये.


7)रोज ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा.


8)मधल्या भुकेच्या वेळेत त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणारे फळ,राजगिरा लाडू,साळीच्या लाह्या,खजूर हे खावे...फरसाण,बिस्कीट,शेव हे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ आहेत.


9)आपण जिथे राहतो तिथे ज्या स्थानिक भाज्या पिकतात,फळे मिळतात ते खावे..फळे नुसतीच खावीत, दुधात घालून,दह्यात मिक्स करून खाऊ नयेत...फळांची मूळ चव आणि गुणधर्म बदलतात अशाने..


10)जेवणात २ चमचे तुपाचा समावेश जरूर असावा.तुपाने कोलेस्टेरॉल वाढत नाही..तूप हे दुधावर अनेक संस्कार केल्यानंतर तयार होते त्यामुळे पचनासाठी चांगले असते..


11)संडास,लघवी ,उलटी ,शिंक या वेगांचे धारण कधीही करू नये..लागल्यास लगेच जावे.


12)पाळीच्या दिवसात स्त्रियांनी लोणचे खाल्ले तर रक्त स्त्राव वाढण्याची शक्यता असते कारण लोणच्यात तेल,मीठ,तिखट यांचा जास्त वापर असतो आणि त्यामुळे स्त्री शरीरातील पित्त वाढते पर्यायाने रक्त सुध्दा वाढते..म्हणून लोणचे खाऊ नये.


13)दूध आणि फळं एकत्र करून खाऊ नये..विरुद्ध आहार आहे..त्याचे पचन होत नाही.आणि अनेक आजारांची निर्मिती त्यातून होते.


14)कधीही पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ नये..वायू च्या संचरणासाठी पोटात जागा ठेवावी.


15) शिळे अन्न, processed food, preservatives असलेले पदार्थ शक्यतो टाळावेत..जितका आहार ताजा खाल्ला जाईल तितके शरीराचे पोषण चांगले होईल...आपल्या शरीराचा संपूर्ण डोलारा हा आपण खात असलेल्या आहारावर च अवलंबून असतो...


16)व्यक्ती तितक्या प्रकृती त्यामुळे सगळ्यांना सरसकट एक च औषध लागू पडत नाही..वय,वजन,प्रकृती,रुग्णाची नाडी परीक्षा ,पूर्वी होऊन गेलेले आजार अशा अनेक गोष्टींवर treatment अवलंबून असते..


Health is Wealth

वैद्य स्वप्ना कुलकर्णी



_*(

सामान्य आजारापासून दूर राहण्यासाठी औषधीचा खजिना आहे

 आपल्या घरात सर्व सामान्य आजारापासून दूर राहण्यासाठी औषधीचा खजिना आहे. फक्त जरूर आहे ते ओळखुन त्याचा वापर करायचा.

1)3 ग्राम मेथीचे चूर्ण दह्या बरोबर तीन दिवस घेतल्यावर पोटात चुक येत असेल तर त्यात फायदा होतो.

2)खजूरीचे शरबत पिल्याने पोटातील आग दूर होते.

3)दर रोज रात्री कोमात पाण्यात थोडेसे सिंद्धव मीठ टाकून प्यायल्याने डोळ्यातून निघणारे पाणी बंद होते.

4)जांभळाची पाने चावल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होते.

5)अडुळश्याची पाने खूप चावून त्याचा रस गळ्यात गेला तर तोंड आलेले असेल तर खूप त्रास कमी होईल.

6)हिरड्या दुखत असतील तर alum म्हणजे फिटकरी चा पावडर घासल्याने दुखणे कमी होईल.

7)सतत उचक्या येत असतील तर बंद करण्यासाठी एक ग्लास कॉमत पाण्यात अर्धा चमचा बडीशोप टाकून ते पाणी प्या.

8)रात्री बरोबर झोप येत नसेल तर तळ पायांना आणि हाताला चांगले तूप घासून घ्यावे. छान झोप येईल.

9)किडनी स्टोन असल्यास मुळच्या रस आणि त्याची पाने चावून खालल्यास 20 दिवसात समस्या दूर होईल.



प्रमोद पाठक.




Featured post

Lakshvedhi