फारच छान...You may like to save this and, if found interesting & informative, forward it to all your like-mind
ed contacts 🙏
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
फारच छान...You may like to save this and, if found interesting & informative, forward it to all your like-mind
शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे.....?*
*
बऱ्याच माता-भगिनींना, लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिन ची मात्रा रक्तात कमी होते. अशावेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते.
*माता-भगिनींना मासिकपाळीच्या समस्यांमध्ये रक्त खुप कमी होते अशावेळी...*
*मोड आलेले कडधान्य धान्य खाणे उत्तम.
*आहारात सिझनल फळांचा समावेश करा.
*गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे,
*राजगिऱ्याचे लाह्या, लाडू, राजगिऱ्याची गुळाची खीर खाणे.
*सफरचंद व बीट खावे, डाळिंब खाणे, हळद-रक्त वाढीसाठी गुणकारी आहे
*सुकामेवा शेंगदाणे खावे,
अंजीर भिजवून खाणे, मक्याचे कणीस खाणे, दूध आणि खजूर, सोयाबीन खावे, पालक अंबाडी चुका तसेच इतर पालेभाज्या बदलून बदलून फळभाज्याचा समावेश आपल्या आहारामध्ये ठेवावा.
*सुनील इनामदार.*
🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺
*
कांदिवली पूर्व स्थानकाच्या सरकता जिन्याचे भूमीपूजन उत्साहात
आमदार अतुल भातखळकर यांचा पाठपुरावा
मुंबई : कांदिवली पूर्व रेल्वे स्थानकाचा सरकता जिना आता सुरु होणार आहे. मागील तीन वर्षांपासून हा जिना सुरु करण्यात यावा, यासाठी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उपोषण, मोर्चा अशी विविध आंदोलने केली. पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्याला अखेर यश मिळाले असून गुरुवारी आमदार भातखळकर यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले.
यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले की, आज या सरकता जिना कामाचे भूमिपूजन झाले आहे. येणाऱ्या अडीच, तीन महिन्याच्या कालावधीत हे काम पूर्ण होणार आहे. कांदिवली पूर्व स्थानकाचा उपयोग करणारे अशोकनगर, चाणक्य नगर, पोईसर, ठाकूर कॉम्प्लेक्स अशा सर्व ठिकाणच्या नागरिकांना या कामामुळे दिलासा मिळणार आहे. याशिवाय गोशाळेजवळील बंद असलेला सरकत जिनाही येणाऱ्या काळात सुरु करण्यात येईल. मागील तीन वर्षापासून हा सरकता जिना बंद असणे हा २५ वर्ष मुंबई महापालिकेवर राज्य करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या 'कारभाराचा' हा उत्तम नमुना म्हणावा लागेल. मुंबई पालिकेचा कारभार अत्यंत संथ गतीने आणि नियमांच्या जंजाळयात अडकवण्याचे काम आतापर्यंत केले, अशी टीकाही आमदार भातखळकर यांनी केली.
स्वागत प्रास्ताविक मंडळ अध्यक्ष आप्पा बेलवलकर यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक ठाकूर सागरसिग यांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विधानसभेतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले के बारे में आपत्तिजनक लिखान करनेवाली 'इंडिक टेल्स' वेबसाइट पर कार्रवाई करने का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का निर्देश
· आपत्तिजनक सामग्री की जांच कर उस पर कार्रवाई करने के लिए मुख्य सचिव को निर्देश
· महापुरुषों के बारे में आपत्तिजनक लिखने वालों को बख्शा नहीं जाएगा - मुख्यमंत्री की चेतावनी
मुंबई, दि. 31: क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले के बारे में आपत्तिजनक लिखान करनेवाली वेबसाइट 'इंडिक टेल्स' पर कार्रवाई करने के निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने मुख्य सचिव को दिए हैं।
वेबसाइट 'इंडिक टेल्स' ने अपने प्रकाशित लेख में क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले के बारे में कई आपत्तिजनक बातें लिखी हैं, कई राजनीतिक संगठनों और सामाजिक संगठनों ने सरकार के पास आपत्ति जताई है। इन आपत्तियों को संज्ञान में लेते हुए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इस वेबसाइट की सामग्री की जांच करने और इसके खिलाफ कार्रवाई करने का निर्देश दिया है।
महापुरुषों के बारे में लिखते समय अत्यंत अध्ययनशील होना चाहिए, साथ ही लेखकों व प्रकाशकों को यह ध्यान रखना जरूरी है कि उससे उनका अपमान न हो। महापुरुषों के बारे में आपत्तिजनक लिखने वालों को सरकार नहीं बख्शेगी। यह चेतावनी देते हुए मुख्यमंत्री शिंदे ने स्पष्ट निर्देश दिए हैं कि 'इंडिक टेल्स' के लेख में आपत्तिजनक बातें होने पर उसके खिलाफ सख्त कार्रवाई की जाए।
0000
*इसबगोल:-*
इसबगोल आता भारतामध्ये गुजरात, पंजाब, हरियाना, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशात इंदोर इ. ठिकाणी याची लागवड होते. इसबगोल साधारण तीन फूट उंच वाढते. या वनस्पतीला गव्हासारख्या ओंब्या येतात. त्यामध्ये इसबगोलाच्या बिया असतात. इसबगोलामध्ये सफेद, तांबडे व काळे असे तीन प्रकार असतात. त्यातील औषधांमध्ये सफेद श्रेष्ठ असते तर काळे रंगाचे औषधांत वापरत नाही.
इसबगोलात फायबरचे प्रमाण भरपूर असते
इसबगोलामध्ये मधुर, शीत, कफ, पित्त, रक्तातिसार, रक्तपित्त, ज्वरातिसार, प्रमेह, दाह, वीर्यक्षय, ग्राही, वीर्यस्तंभक इ. गुणधर्म असतात.
*औषधी उपयोग:-*
◼️वीर्यक्षय, दाह, प्रमेह यांवर इसबगोल रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी त्यात खडीसाखर घालून द्यावे.
◼️डोकेदुखीवर इसबगोल निलगिरीच्या पानांत वाटून मस्तकास लेप करावा.
◼️दमारोगात दोन ते तीन ग्रॅम इसबगोल कोमट पाण्यातून सकाळ- संध्या. द्यावे.
◼️रक्त-संग्रहणीवर इसबगोल आणि खडीसाखर चावून खाण्यास द्यावी.
◼️जीर्ण आमातिसार व रक्तातिसार यांवर इसबगोल दोन चमचे दह्यातून दोन वेळेस द्यावे.
◼️पोटात आग पडते, आतड्यांना सूज येते अशा वेळी दहा ग्रॅम इसबगोल थंड पाण्यात भिजत घालून ते फुलल्यावर खाण्यास द्यावे.
◼️कब्जरोगात इसबगोल एक चमचा रात्री झोपताना दुधातून द्यावे.
◼️अर्सेनिक (एक विषारी पदार्थ) मुळे विषार झाल्यास इसबगोल भिजवून त्यात बेदाणा, दही व गुलाबपाणी एकत्र करून द्यावे; म्हणजे विषार कमी होतो.
◼️ज्वरातिसारामध्ये इसबगोलाचा काढा करून द्यावा.
◼️धात-पुष्टतेस इसबगोल दोन भाग, वेलची एक भाग व खडीसाखर तीन भाग रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी प्यावे.
◼️स्वप्नदोषावर इसबगोल आणि खडीसाखर समप्रमाणात एकत्र करुन त्यातून एक चमचा मिश्रण अर्धा ग्लास दुधातून झोपण्याच्या एक तास अगोदर द्यावे. झोपण्याच्या अगोदर लघवीला जाऊन झोपावे.
◼️लघवीला आग होणे, जळजळ होणे अशावेळी एक ग्लास पाण्यात चार चमचे इसबगोल भिजवून स्वादानुसार खडीसाखर मिसळवून पिण्यास द्यावे.
◼️वजन कमी करण्यासाठी जेवणानंतर एक चमचा इसबगोल पाण्यातून द्यावे. यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने पोट भरल्याची जाणीव राहते व पुन्हा-पुन्हा खाण्याची इच्छा कमी होते.
◼️मधूमेहात याच्या सेवनाने शुगर लेव्हल नियंत्रीत राहण्यास मदत होते परंतू इसबगोलाच्या अतिसेवनाने रक्तातील शुगरचे प्रमाण कमी होऊ शकते.
◼️गर्भिणी स्रीने इसबगोल खाणे टाळावे.
*संकलन-*
*निसर्ग उपचार तज्ञ*
*डॉ. प्रमोद ढेरे,
_*(
बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांची माहिती
मुंबई दि. 31 : बारामती, जि.पुणे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासनाच्या वतीने त्यांच्या कर्तृत्वाच्या गौरव म्हणून आज या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती, मंत्री श्री. महाजन यांनी दिली.
सन २०१३ च्या शासन निर्णयान्वये बारामती येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ५०० रूग्ण खाटांचे रूग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सन २०१९ च्या शासन निर्णयान्वये प्रथम वर्षाकरिता १०० विद्यार्थी प्रवेशास परवानगी देण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात अनेक समाजोपयोगी, लोकहिताची कामे केली असून शिस्तप्रिय, कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अनेक लढाया जिंकल्या होत्या अशा राजमातेच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण करण्यात येत असल्याची माहिती, मंत्री श्री. महाजन यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
0000
पैठण तालुक्यातील पुनर्वसित गावांमधील प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठीनिधी उपलब्ध करुन देणार
- मंत्री संदिपान भुमरे
मुंबई, दि. ३१ : “औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पाच्या पुनर्वसित गावातील नागरी सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावेत. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
मंत्री श्री. भुमरे यांच्या रत्नसिंधु या शासकीय निवासस्थानी पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्प टप्पा - १ बुडित क्षेत्रातील प्रकल्पबाधितांच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रशांत बंब, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता उपस्थित होते. औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्प टप्पा क्रमांक - १ बुडित क्षेत्रातील प्रकल्पबाधित गावांतील प्रलंबित कामांसह विविध समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभागाकडून निधी मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.
पैठण तालुक्यातील १० गावांमधील प्रकल्पबाधितांच्या २६ नागरी सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य द्यावे. कुतुबखेडा, तांदूळवाडी, तुळजापूर, अमरापूर, पिंपळवाडी पि., तारुपिंपळवाडी, आगरनांदूर, घेवरी, लाखेफळ, इसारवाडी आदी पुनर्वसित गावांच्या समस्या सोडवाव्यात. प्रकल्पबाधित गावांमध्ये न झालेल्या कामांची चौकशीसाठी समिती नेमली असून समितीने तातडीने अहवाल सादर करावा, जेणेकरून संबंधित कामे तातडीने करण्यात येतील, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.
0000000