Thursday, 25 May 2023

माणसाचा स्वभावाचा आणि आजारांचा संबंध काय आहे ?

 माणसाचा स्वभावाचा आणि आजारांचा संबंध काय आहे ?


तुमची गोष्ट बुद्धी मान्य करत नाही इथूनच सर्व आजारांना सुरुवात होते सात जन्माचे गाठोडे तुम्ही सोबत घेऊन आलेले असत योग प्राणायाम ध्यान साधना यांनी जीवनातील सर्व आजार दोष तुम्ही घालू शकता पण आपण आज मान्यच करत नाही

हा आपल्या मधील सर्वात मोठा दोष आहे

सर्व गोष्टी तुमच्या मनावर आहेत मनाने ठरवलं कुठली गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही

  तर आता आपण जाणून घेऊ की मनाचा,भावनेचा,विचारांचा, स्वभावाचा कसा व कोठे परिणाम होतो......


*१).अहंकारामुळे हाडामध्ये ताठरता निर्माण होते.*


*२).स्वत:चा हट्ट पुर्ण करण्याच्या सवयीमुळे पोटाचे विकार होतात.*


*३)अती क्रोध व चिडचिडेपणामुळे यकृताला व पित्ताशयाला हानी पोहचते.*


*४)अती ताण व चिंतेमुळे स्वादुपिंड खराब होतो.*


*५) भितीमुळे किडन्या व मुत्राशयाला हानी पोहचते.*


*६) कपटी वृत्तीमुळे गळ्याचे व फुप्फुसाचे रोग होतात.*


*७) आपलं तेच खरं/ मी म्हणेन तीच पुर्व दिशा,अशा अट्टाहसामुळे बध्दकोष्ठता होते.*


*८) दु:ख दाबुन ठेवल्याने फुप्फुस व मोठ्या आतड्यांची कार्यक्षमता कमी होते.*


*९)अधिरता,अतिआवेश,घाई-गडबड अशा सवयींमुळे ह्रदयाला व छोट्या आतड्याला हानी होते.*


*१०) स्वार्थी लोकांना सगळ्यात जास्त आजार होतात कारण त्यांना द्यायची इच्छा नसते त्यामुळ् शरीराला नको असलेली धातक द्रव्ये पण नीट बाहेर टाकली जात नाहीत व रोग निर्माण होतो.*


*११) प्रेम/प्रेमळपणा शांती व समाधान देऊन मनाला व शरीराला ताकद देतं.*


*१२) स्मित हास्य स्वतःलाच नाही तर समोरच्याला पण आनंदी बनवते.*


*१३) हसत खेळत राहिल्यास ताणतणाव कमी होतो.*

तर मग आता आपल्या रागावर, विचारांवर, भावनेवर, अहंकारावर, स्वार्थीपणावर, नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा. हसत, खेळत, आनंदी, समाधानी, सुखी, संतुष्ट रहा म्हणजे निरोगी व तंदुरूस्त बनाल

सर्वोच्च न्यायालयाने काल ऑल इंडिया टॅक्स पेअर्स ऑर्गनायझेशन स्थापन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला, जी जगातील सर्वात मोठी संस्था असेल.

 सर्वोच्च न्यायालयाने काल ऑल इंडिया टॅक्स पेअर्स ऑर्गनायझेशन स्थापन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला, जी जगातील सर्वात मोठी संस्था असेल.


  कोणतेही सरकार या संस्थेच्या मान्यतेशिवाय मोफत वीज, मोफत पाणी, मोफत वितरण किंवा कर्जमाफीची घोषणा करू शकत नाही, मग सरकार कोणतेही असो.

  पैसे आमच्या करदात्यांच्या मालकीचे असल्याने, करदात्यांना त्याच्या वापरावर लक्ष ठेवण्याचा अधिकार असला पाहिजे.

  राजकीय पक्ष मतांसाठी फुकटचे आमिष दाखवून जनतेला भुरळ घालत आहेत. जे काही प्रकल्प जाहीर केले जातात, ते आधी सरकारने त्यांची ब्लू प्रिंट सादर करून या संस्थेची मंजुरी घ्यावी. हे खासदार आणि आमदारांच्या पगारावर आणि त्यांना मिळालेल्या इतर गैर-विवेकात्मक लाभांवरही लागू व्हायला हवे.

  लोकशाही फक्त मतदानापुरती मर्यादित आहे का? त्यानंतर करदाते म्हणून आम्हाला कोणते अधिकार आहेत?

  संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल खासदार, आमदारांना जबाबदार धरण्याचा आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार करदात्यांना असला पाहिजे. ते सर्व "सेवक" नंतर करदात्यांनी दिले आहेत.

  अशा कोणत्याही ‘फ्रीबीज’ मागे घेण्याचा अधिकारही लवकरच लागू झाला पाहिजे.

  आपण सहमत असल्यास, कृपया शक्य तितक्या लोकांशी संपर्क साधा. हे करण्यासाठी, पोस्ट शेअर करा.

  तुमच्या किमान 10 मित्रांना हे पाठवा.

  कृपया व्हायरल होण्यासाठी हा संदेश शेअर करा. 🙏


  https://www.nationalheraldindia.com/india/sc-forming-panel-to-examine-issue-of-freebies-by-political-parties-is-burial-by-committee-experts

 *एक अतिशय आनंदाची बातमी ज्याची खूप प्रतीक्षा होती.*

 👏👏👏👏👏

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अधिनियमात सुधारणा

 महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अधिनियमात सुधारणा


        मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अधिनियम, 1997 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. कलम 24 अ नुसार राज्य शासन आदेशाद्वारे विनाअनुदानित खाजगी तंत्रनिकेतन किंवा मंडळाशी संलग्न संस्था यांद्वारे चालविण्यात येणाऱ्या प्रत्येक पदविकास्तरीय तंत्र शिक्षण देण्याचा प्रत्यक्ष खर्च ठरविण्यासाठी एक फी निश्चिती समिती गठीत करील. शासन या आदेशामध्ये फी निश्चिती समितीचा अध्यक्ष व सदस्य यांच्या वित्तलब्धी व इतर देय भत्ते, पदावधी व सेवेच्या शर्ती असणार आहे.


            दीर्घ शीर्षाची सुधारणा, उद्देशिका, कलम 2, 5, 6, 20, 22, 23, 24 अ, 25, 26, 27, 32, 33, 34, 34 अ, 37, 46, 47 यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तसेच कलम 4 अ व कलम 35 अ समाविष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कलम 35, 38 व कलम 38 मध्ये अनुसूची बदली दाखल केले आहे.


            सुधारणांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कलम 4 अ नुसार अध्यापन, संशोधन, विस्तार व सेवा यांद्वारे ज्ञान व सामंजस्य यांचा प्रसार, निर्मिती व जपणूक करणे, ही मंडळाची सर्वसाधारण उदि्दष्टे असतील. कलम 35 अ नुसार संस्थेच्या व्यवस्थापनाच्या बदलाकरीता किंवा हस्तांतरणाकरीता शासनाची परवानगी मागणारे व्यवस्थापन, मंडळाने किंवा यथास्थिती नियामक प्राधिकरणाने घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार मंडळाच्या सचिवाला, मंडळाद्वारे किंवा यथास्थिती, नियामक प्राधिकरणाद्वारे विहित करण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे अर्ज करतील. या सर्व कलमांमधील सुधारणा, नवीन कलम समाविष्ट करणे व बदली कलम दाखल करणेबाबत शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे.  

उन्हाळ्यात रोज न चुकता खा चमचाभर गुलकंद; शरीराला थंडावा देणारा पदार्थ, ५

 *उन्हाळ्यात रोज न चुकता खा चमचाभर गुलकंद; शरीराला थंडावा देणारा पदार्थ, ५

उन्हाळा हळूहळू वाढायला लागला की आपल्याला उष्णतेचे त्रास भेडसावू लागतात. यामध्ये तोंड येणे, पुरळ येणे, जळजळ होणे, लघवीच्या समस्या अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील थंडावा कायम ठेवण्यासाठी आपण आहारात बदल करतो.


उन्हाळा सुरू झाला की पाणी जास्त पिणे, पाणीदार फळं खाणे, सरबत, दही, ताक यांचा आहारात समावेश करणे असे उपाय केले जातात. यामध्ये आवर्जून खाल्ला जाणारा एक पदार्थ म्हणजे गुलकंद. आयुर्वेदातही गुलकंदाला बरेच महत्त्व आहे. गुलाबाच्या पाकळ्यांपासून केला जाणारा हा गुलकंद अतिशय चविष्ट असतो. त्यामुळे लहान मुलेही तो आवडीने खातात. गुलकंद नुसता खाल्ला तरी चालतो. पण तो दूधातून घेतलेला अधिक चांगला. याशिवाय गुलकंदाचा शिरा, लाडू, फालुदा असे गुलकंदाचे काही पदार्थही करता येतात. पाहूयात उन्हाळ्यात गुलकंद खाण्याचे फायदे...


*१. उष्णता कमी करण्यास फायदेशीर :* 


अनेकदा उन्हाळ्यात लघवीला जळजळ होणे,ॲसिडीटी, डोकेदुखी, मळमळ अशा समस्या उद्भवतात.तोंड आलं असल्यास, तोंडात चट्टे, फोडं आली असल्यास गुलकंद खाणं उपयुक्त ठरतं. तसेच गुलकंदामध्ये व्हिटॅमिन बीचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे व्हिटॅमिन बी ची कमतरता असणाऱ्यांनी गुलकंद नियमित खावा.


*२. बद्धकोष्ठता :* 


ज्यांना नेहमी बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी आवर्जून गुलकंद खायला हवा. जेवल्यानंतर एक ते दोन चमचे गुलकंदाचं सेवन करावं, यामुळे पचन चांगल होतं आणि बद्धकोष्ठाची समस्याही दूर होते. गुलकंद आपल्या आतड्यांतील उपयुक्त ठरणारा गट बॅक्टेरिया वाढवण्यात मदत करते. ज्यामुळे आपल्याला जेवण पचवणं सोपं होतं. गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार करण्यात आलेल्या गुलकंदामधील मॅग्नेशियम बद्धकोष्ठतेपासून मुक्ती देण्यास मदत करते.


*३. स्मरणशक्तीसाठी फायदेशीर :* 


आपल्या मुलांची स्मरणशक्ती चांगली राहावी असे प्रत्येक पालकाला वाटत असते. त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोगही करत असतो. मुलांना नियमित गुलकंद दिल्यास, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी फायदा होतो. वास्तविक गुलकंदामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुण हे स्मरणशक्तीची क्षमता वाढविण्यास उपयुक्त असतात.


*४. त्वचा सतेज राहण्यास मदत :* 


गुलकंदामध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस त्वचा एक्सफॉलिएट करण्यासाठी उपयुक्त ठरतात. दररोज गुलकंद खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि त्वचा उजळते. तसेच गुलकंद खाल्ल्याने ब्लॅकहेड्स, पिंपल्स यांसारख्या त्वचेच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते.


*५. हृदयासाठी फायदेशीर :* 


उत्तम आरोग्यासाठी हृदय निरोगी असणे अत्यंत गरजेचे आहे. गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार करण्यात आलेल्या गुलकंदामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते. मॅग्नेशियम रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत ठेण्यासाठी नियमित गुलकंद खाण्याचा उपयोग होतो.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_*(

ऑयली त्वचा (Oily Skin) साठी उपाय

 👉ऑयली त्वचा (Oily Skin) साठी उपाय.


1) बेसन, तांदळाचे पीठ, दही आणि हळद मिक्स करून लेप बनवून लावल्यामुळे स्कीन चे ऑईली पण समाप्त होते आणि चेहऱ्यावर चमक येते. हा उपाय face वरून काळे दाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी देखील फायदेशीर होतो.


2) मध, पुदिना रस आणि लिंबू रस यांचा देखील oily skin पासून सुटका मिळवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.


3) हळद, मुलतानी माती आणि चंदन यांचा लेप चेहऱ्यातील मॉश्चराइज ओढून घेतो आणि स्कीन ऑईल फ्री होते. या घरगुती उपाया मुळे स्कीन टाईट होते. यामुळे तुम्ही नेहमी फ्रेश दिसाल. हा लेप लावल्यावर 30 मिनिटांनी चेहरा धुवावा.


4) चेहऱ्यावर कच्चा बटाटा किंवा काकडी चोळल्यामुळे देखील फायदा होतो.


👉चेहरा गोरा आणि सुंदर कसे बनवायचे :


1) एलो वीरा ज्यूस, एप्पल साइडर विनिगर आणि हळद, या तीन वस्तू मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा सावळे पण दूर होतो.


2) गोरा रंग मिळवण्यासाठी हळद आणि लिंबूरस वापरणे उत्तम आहे. हा उपाय तेलकट त्वचेच्या लोकांसाठी उत्तम आहे.


3) दुधा ची मलाई, बेसन आणि हळद मिक्स करून एक लेप बनवा. हा लेप चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. ऑईल स्कीन वाल्यांनी हा उपाय करू नये. ड्राय स्कीन वाले करू शकतात.


4) मध, गुलाबाच्या पाकळ्या आणि दुध यांचा लेप रंग उजळण्या साठी आणि चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी वापरा.


5)बाहेरून आल्यावर त्वरित चेहरा स्वच्छ धुवावा कारण त्वचेच्या रोम छिद्रात मळ जमा होऊ शकतो.


6) पपई चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी फायदेशीर आहे. कच्ची पपई dead skin cells दूर करण्यासाठी उपयोगी आहे.


 👉तुळशीची पाने बारीक वाटून याचा लेप चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा टवटवीत होतो.


👉अननस आणि पिकलेले टोमाटो चेहऱ्यावर face pack बनवून लावल्याने हळूहळू गोरे पण येईल.


👉वाफ घेतल्याने छिद्रात साठलेले तेल, माती आणि डेड स्कीन सेल्स सहज निघून जातात. हा skin care चा सर्वात उत्तम आणि सोप्पा उपाय आहे.


👉दही, आवळा पावडर, हळद आणि बेसन मिक्स करून एलोवीरा ज्यूस आणि थोडा लिंबूरस मिक्स करून फेशियल पैक तयार करा. यास चेहऱ्यावर लावा. या उपायाने काळे दाग दूर होतील आणि skin moisturize होईल.


☝️शरीराची बाहेरील सुंदरता वाढवण्यासाठी आवश्यक आहे कि तुम्ही शरीराच्या आतून देखील निरोगी असले पाहिजे. वर सांगितलेले ब्युटी चे घरगुती उपाय करण्या सोबतच आवश्यक आहे तुम्ही हे उपाय देखील केले पाहिजेत.


👉पौष्टिक भोजन खावे ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतील आणि त्वचा निरोगी राहील. यासाठी तळलेले, मसालेदार, फास्ट फूड खाण्याच्या एवजी विटामिन आणि मिनरल्स असलेले पदार्थ आहारात घ्यावेत.


👉पोटाच्या आजारा पासून स्वताला वाचवा. सकाळी पोट सोफ्ट करण्यासाठी गरम पाण्यात थोडासा लिंबूरस, मध आणि अद्रक रस मिक्स करून प्यावे.


👉रोज 3 ते 4 लीटर पाणी प्यावे ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जातील.


👉वेळेवर भोजन करावे.


👉रोज व्यायाम करावा.

तणाव मुक्त राहावे आणि चांगली झोप घ्यावी.


👉खाण्यापिण्याच्या वाईट सवयी पासून वाचावे.


👉जर तुम्ही पिंपल्स ने हैराण आहे तर कांदा आणि लसून यांची पेस्ट बनवून यामध्ये कडूलिंबाची पाने मिक्स करून पेस्ट बनवा. आता हे मिश्रण थोडी हळद मिक्स करून फेस वर लावा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही वाफ घेऊ शकता ज्यामुळे pimples दूर होतील.




आरोग्य धनसंपदा


*कपालभाती प्राणायाम*

 

कपाल = कपाळ; भाती= ओजस्वी; प्राणायाम = श्र्वोच्छ्वासाचे तंत्र,


ही अशी प्रक्रिया आहे ज्याने वजनच कमी होते असं नाही तर पूर्ण (शारीरिक व मानसिक) प्रणाली सुद॒धा संतुलित ठेवते. कपालभातीचं महत्व समजावून सांगताना डॉ. सेजल शहा (ज्या श्री श्री योग प्रशिक्षकही आहेत) म्हणतात : आपल्या शरीरातील ८०% विषांत द्रव्ये ही श्र्वासावाटे बाहेर टाकली जातात. कपालभातीचा सराव करते वेळी शरीरातील सर्व संस्थांची सफाई / प्रक्षालन / शोधन होते. आणि ओजस्वी कपाळ हे उत्तम आरोग्याचं प्रतिकच म्हणता येईल. कपालभातीचा शब्दशः अर्थ ओजस्वी कपाळ असा होतो आणि या प्राणायामच्या नियमित सरावाने नेमके हेच होते. ही चमक बाह्यच नसून बुद्धीला तल्लख व शुद्ध करणारी आहे.


कपालभाती प्राणायाम कसा करावा?

१. सुखासनात बसावे, पाठीचा कणा ताठ ठेवावा व हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला उघडून गुडघ्यांवर ठेवावेत. 


२. श्वास घ्यावा.


३. श्वास सोडता सोडता पोट आत घ्यावं. नाभीलाही पाठीच्या कण्याकडे ओढून घ्यावे. सहज शक्य होईल तेवढेच करावे. पोटाच्या स्नायूंची हालचाल जाणवावी म्हणून उजवा हात नाभीवर ठेवावा व नाभी आतल्या बाजूस ओढून घ्यावी.


४. जसं ओटीपोट आणि नाभीकडचा भाग सैल सोडाल, फुफुसात हवा आपणहून शिरेल.


५. अशा प्रकारे २० वेळा केल्याने एक चरण पूर्ण होते.


६. एक चरण पूर्ण झाल्यानंतर डोळे बंद ठेउन शरीरां मध्ये होणाऱ्या संवेदनांकडे लक्ष द्यावे.


७. अशाच प्रकारे अजून २ चरणं पूर्ण करावी.


श्वास बाहेर सोडण्यावर भर असावा. श्वास घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. पोटाचे स्नायू सैल सोडल्याबरोबर आपणहून श्वास आत घेतला जातो. श्वास बाहेर सोडण्यावरच लक्ष असू द्या.

कपालभाती शिकण्यासाठी एखाद्या अनुभवी श्री श्री योग प्रशिक्ष्काचे मार्गदर्शन घ्यावे.त्यानंतर घरीच ह्याचा सराव करू शकाल.


कपाल भातीने होणारे लाभ:

चयापचयाची (म्हणजेच खाल्लेल्या अन्नाचे उर्जेत रुपांतर करण्याची गती) वाढते ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

शरीरातील सूक्ष्म नाड्यांची शुद्धी होते.

पोटाचे स्नायू उत्तेजित होतात ज्याचा लाभ मधुमेहींना होतो.

रक्ताभिसरण वाढते आणि चेहऱ्याची कांती वाढते.

पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते, पोशाक तत्वांचं शरीरात परिपाक जलद गतीने होतो.

पोट सुडौल राहते.

मज्जासंस्था उर्जित होते व मेंदूच्या पेशींना चालना मिळते.

मन शांत हलके होते.

कपालभाती कोणी करू नये?

हृदयविकार असेल, पेस-मेकर बसवला असेल किंवा स्टेन्ट्स बसवले असतील, स्लिप-डिस्क मुळे पाठदुखीचा त्रास असेल, पोटाचे ऑपरेशन झालेले असेल, फेफरे येत असेल किंवा हर्नियाचा त्रास असेल तर अशा व्यक्तीने कपालभाती करू नये.

गरोदर महिलांनी किंवा मासिक पाळी चालू असल्यास काल्पालभाती करू नये कारण ह्या प्रकियेत ओटीपोटाचे स्नायू पिळवटून निघतात.

उच्च रक्तदाब आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तीने योग तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली हा प्राणायाम करावा.


योगाभ्यास केल्याने मानसिक आणि शारीरिक विकास होतो ज्यामुळे अनेक लाभ होतात. तरी पण त्याला औषधांना पर्याय म्हणून मानू नये. एखाद्या तज्ञ श्री श्री योगा प्रशिक्षकाच्या देखरेखीखालीच आसनांचा सराव करणे आवश्यक आहे. .


*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,* 

*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,* 

 *त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*


_


दात दुखी / दाढ दुखी वर काही उपाय,

 दात दुखी / दाढ दुखी वर काही उपाय, 


दातदुखीपासून लगेच आराम हवा असेल तर पेरूची पानं चावावीत अथवा पेरूची झाडाची पानं पाण्यात उकळून त्या पाण्याने चूळ भरावी. यामुळे तुमची दातदुखी तर बंद होतेच पण त्याचबरोबर हिरड्यांमधील सूज आणि त्रासदेखील बंद होतो

तुमच्या दातामध्ये दुखत असल्यास, त्या ठिकाणी कच्च्या कांद्याचा तुकडा ठेवावा. त्यामुळे पटकन दातदुखी बंद होते..##आंबटपदार्थखाल्ल्यानेहोणार्याकळाथांबतात..##दातदुखणेकमीहोते...

दातदुखीसाठी हिंगाचा वापर अतिशय फायदेशीर ठरतो. त्यासाठी तुम्ही एक ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये दोन चिमूटभर हिंग आणि एक चिमूटभर सैंधव घालून उकळून घ्या. पाणी कोमट झाल्यानंतर या पाण्याने तुम्ही चूळ भरा. त्यामुळे लगेच दातदुखी बंद होईल

दाताला कीड लागली असेल आणि त्यामुळे तुमचे दात दुखत असतील तर दोन चिमूट सैंधवमध्ये तिळाचं तेल घालून ही पेस्ट कीड लागलेल्या दाताला लावा. असं केल्यास, तुमच्या कीड लागलेल्या दातातील वेग थांबतील

दातदुखीसाठी लसूनदेखील एक चांगला उपाय आहे. लसणाची एक पाकळी दाताखाली दाबून ठेवावी. काही वेळातच दातामध्ये येणारे वेग कमी होतील

प्रत्येकाच्या घरात बटाटे तर असतातच. तुमच्या दातांमध्ये दुखत असल्यास आणि सूज आली असल्यास, बटाटा कापून त्याचे स्लाईस करून त्या भागावर साधारण 20 मिनिट्स ठेवा. लगेचच दुखणं बंद होईल 

दातदुखीपासून सुटका होण्यासाठी तुम्ही टी - बॅगचादेखील वापर करू शकता. गरम पाण्यात टी बॅग्ज ठेवा आणि तुमच्या दातदुखीच्या ठिकाणी शेका. यामुळे दुःख कमी होईल

दातामध्ये खूप जास्त दुखत असेल तर 20 ते 25 मिनिटांपर्यंत बर्फ त्याच दातावर शेकवा, जिथे दुखत आहे. असं केल्यामुळे तुम्हाला लवकर सुटका मिळेल

लिंबामध्ये जास्त प्रमाणात विटामिन सी असतं. दात दुखत असलेल्या ठिकाणी लिंबाचा थेंब लावल्याने लगेचच तुमचं दुखणं थांबेल

दात दुखत असल्यास, ब्रँडीचादेखील उपयोग केला जातो. तुमच्या घरी ब्रँडी असल्यास, कापसावर थोडी घेऊन दुखणाऱ्या दातावर लावा. तुमचं दुःख दूर होईल

तुमचा जो दात दुखत आहे, त्यावर कापूर लावा. कीड लागल्याने दात दुखत असल्यास, त्या ठिकाणी कापूराचा चुरा भरा. दुखण्याबरोबर त्या कीड्यापासूनदेखील सुटका मिळेल

दातदुखीासाठी आलंदेखील खूपच लाभदायी आहे. आल्याचे छोटे छोटे तुकडे करून त्यावर सैंधव घाला. ज्या दातामध्ये दुखत आहे, तिथे आल्याचा तुकडा दाबून धरा. या दरम्यान तोंडात जे पाणी येईल, ते न गिळता थुंकत राहा. त्यामुळे दातदुखी 5 ते 10 मिनिटांत बंद होईल

लवंग ठेचून त्यात लिंबाचा रस घाला आणि दिवसातून दोन ते तीन वेळा दुखत असलेल्या दाताला लावा

दातदुखीपासून सुटका मिळण्यासाठी फिटकरी पावडर दुखत असलेल्या ठिकाणी लावा. असं केल्यामुळे तुम्हाला दातदुखीपासून मुक्ती मिळेल

दातदुखीची समस्या असल्यास, कडिलिंबाची तीन- चार पानं धुऊन घ्या. हे कडू असतं पण तरीही दातदुखीसाठी ही पानं चावा. यामुळे तुमचा त्रास बंद होईल


_

Featured post

Lakshvedhi