Wednesday, 24 May 2023

प्रेमाचं प्रतिक असलेल्या गुलाबाचा असाही वापर; वाढवा त्वचेचं सौंदर्य, असा तयार करा 'रोझ

 *प्रेमाचं प्रतिक असलेल्या गुलाबाचा असाही वापर; वाढवा त्वचेचं सौंदर्य, असा तयार करा 'रोझ फेसपॅक'.....*


काल अनेक कपल्स व्हॅलेंटाईन डे (Valentines Day) साजरा केला. प्रेमीयुगुल हे एकमेकांना वेगवेगळे गिफ्ट देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. या दिवशी बरेच लोक आपल्या पार्टनरला गुलाब भेट म्हणून देतात. प्रेमाचं प्रतिक असणाऱ्या गुलाबाचा वापर विविध फेसपॅक तयार करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. गुलाबाचा वापर करुन फेसपॅक (Beauty Tips) कसा तयार करायचा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घ्या रोज फेस पॅक तयार करायची सोपीपद्धत...


*गुलाब पेस्ट तयार करण्याची सोपी पद्धत...*

गुलाबाचे विविध फेसपॅक तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुलाबाची पेस्ट तयार करावी लागेल. ताज्या गुलाबाच्या पाकळ्या घ्या आणि त्या पाण्यानं स्वच्छ करा. या पाकळ्या मिक्समध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करुन घ्यावी. या पेस्टचा वापर तुम्ही विविध फेसपॅक तयार करण्यासाठी करु शकता. 


*गुलाब हनी फेस पॅक(Honey And Rose Facepack)...*

तयार केलेल्या गुलाबाच्या पेस्टचा वापर करुन तुम्ही गुलाब हनी फेस पॅक तयार करु शकता. यासाठी गुलाबपेस्टमध्ये गुलाब पाणी आणि मध मिक्स करा. हा पॅक चेहऱ्याला 20 मिनिटे लावा. त्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवा. या पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा हायड्रेट राहिल. तसेच चेहऱ्यावरील डाग देखील या फॅसपॅकमुळे कमी होतील.


*गुलाब चंदन फेसपॅक(Sandalwood And Rose Facepack)...*

गुलाबा पेस्टमध्ये चंदन पावडर मिक्स करा. त्यानंतर या मिश्रणात थोडे एक किंवा दोन चमचे दूध टाका. हा पॅक चेहऱ्यावर लावताना मसाज करा. हा पॅक जवळपास दहा मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा. या फेसपॅकमुळे चेहऱ्याचे स्क्रबिंग होते. त्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते. 


*कोरफड जेल आणि गुलाबाचा पॅक (Aloe Vera And Rose Facepack)...*

गुलाबाच्या पेस्टमध्ये कोरफड जेल मिक्स करून चेहऱ्याला लावा. वीस मिनिटांनी चेहरा धुवा. या पॅकमुळे स्किन टायनिंग होते. तसेच चेहऱ्यावरील डाग देखील जातात. 


*कुमार चोप्रा,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



Tuesday, 23 May 2023

बहूगुणी स्टार फ्रुट ,करमाळ्याच फळ*

 *बहूगुणी स्टार फ्रुट ,करमाळ्याच फळ*



कोलेस्टेरॉल, मोटापा,शुगर,रक्ताचीकमी,कंबरदुखी, अंगदुखी, बीपी,हार्ट अँटँक हे फळ येऊन देत नाही. मुंबईत सर्वत्र दिसते,कापल्यावर हे फळ स्टार टाईप दिसते यास हिंदीत कमरख सुध्दा म्हणतात  

औषधी उपाय. १)कब्ज,पोटदुखी वर,अंगदुखी, गँस,छातीत कळ यात असलेल्या फायबर मुळे यावर आराम मिळतो दोन वेळ दोन मोठे तुकडे खा.

२)सुटलेल पोट,वाढलेल वजन,अनावश्यक चरबी

अँन्टी व्हिवेन नामक एन्झाईम मुळे शरीर प्रोटीन पचण्यास मदत होते.यात ग्लिसायनीक इंडेक्स ची मात्रा कमी असल्याने शरीरातग्लुकोज ची मात्रा कमी राहण्यास मदत होऊन वजन नियंत्रित रहाते.रोज दोन फळ खा.

३)विविध आजारात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते ती यातील व्हिटॅमिन सी व अँन्टीआँक्सीडंन्ट गुळामुळे ती वाढते.रोज एक फळ खावे.थकवा जाऊन उर्जा मिळते.

४)ऐनिमीयात लाभदायक

फळातील व्हिटँमीन सी शरीरातील आयरन ला शोषून घेत असल्याने ते या आजारात फायदा होतो रोज दोन फोडी मोठ्या दोनवेळा खा.

५)कोलेस्टेरॉल 

ची मात्रा विक,अथवा अनियमीत असल्यास नियंत्रित करुन बँड कोलेस्टेरॉल ची वाढ रोखतो,व गुड कोलेस्टेरॉल वाढवतो.रोज एक फळ खावे.

६)हदयरोग

यातील फायबर, व पोट्याशियम मुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवतो.रोज एक फळ खावं.

७) खोकला, बाँडी डिटाँक्सीफिकेशन,रक्तगाठी होणे, साठीच्या आजारात लगेचच फरक दिसतो.


*

राज्याच्या विकासात आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधादर्जेदार उपलब्धता महत्त्वाची

 राज्याच्या विकासात आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधादर्जेदार उपलब्धता महत्त्वाची


- राज्यपाल रमेश बैस


            सातारा, दि. 23 : राज्याच्या सर्वांगीण विकासात आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांची दर्जेदार उपलब्धता महत्त्वाची ठरते. त्यादृष्टीने शासकीय यंत्रणांनी विकासकामे करण्याच्या सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केल्या.


                  राजभवन महाबळेश्वर येथे जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांसोबत राज्यपालांची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल महोदयांचे प्रधान सचिव संतोषकुमार, विशेष कार्य अधिकारी महेश गोलाणी, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी तथा राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.


                   पाणी जीवनासाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगून राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, फार पूर्वीपासून मानवी वसाहती या पाण्याच्या काठी वसल्या आहेत. आजही पाण्याच्या काठीच शहरे विकसित होत आहेत. अलीकडे वातावरण बदलामुळे पाण्याच्या उपलब्धतेची परिस्थिती बदलत आहे. याचा विचार करून जल संधारणाची कामे करावीत. महाबळेश्वरच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पावसाचे पाणी छोट्या छोट्या तलावांमध्ये साठवावे. प्रत्येक गावात लहान लहान तलाव बांधावेत. या तलावांमध्ये साठवलेले पाणी जमिनीत मुरून भूजल पातळी उंचावण्यास मदत होते. तसेच या पाण्याचा वापर ग्रामस्थांच्या दैनंदिन वापरासाठी ही होतो. डोंगर उतारावर पाणी अडवण्यासाठी छोटे छोटे बंधारे बांधावेत, या बाबत नेहमीच्या पठडीतील काम न करता थोडा वेगळा विचार करून काम केल्यास लोकांना चांगल्या सुविधा देता येतील, असेही राज्यपाल श्री बैस यांनी सांगितले.


                  प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आढावा घेऊन राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, या आरोग्य योजनेमध्ये खासगी रुग्णालयांकडून करण्यात येणाऱ्या बिलांची पडताळणी करावी. कृषी विभागाने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ द्यावा. कृषी प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. या प्रक्रिया उद्योगांमुळे शेतकऱ्यांना कृषी मालाला जास्तीचा भाव मिळण्यास मदत होणार आहे. तसेच एखाद्या वेळी बाजारात कमी भाव असल्यास कृषी मालाची साठवणूक करून भाव चांगला मिळाल्यावर तो बाजारात विकता येईल, अशा प्रकारच्या सुविधा उभारव्यात. चाकोरी बाहेर जाऊन चांगले काम करून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.


               यावेळी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी जिल्ह्यातील विविध विभागांकडील योजनांचा सादरीकरणाद्वारे सविस्तर आढावा सादर केला. तसेच जलयुक्त शिवार योजनेचाही आढावा राज्यपाल श्री. बैस यांनी घेतला.

सौरप्रकल्प राबविण्यासाठी ‘महाप्रीत’ आणि ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अॅण्ड प्लॅनेट (GEAPP) यांच्यात करार

 सौरप्रकल्प राबविण्यासाठी ‘महाप्रीत’ आणि ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अॅण्ड प्लॅनेट (GEAPP) यांच्यात करार


 


            मुंबई, दि. 23 : राज्यात एक हजार मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी ‘महाप्रीत’ (महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित) आणि ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल ॲण्ड प्लॅनेट (GEAPP) मध्ये हेतू करार (Memorandum of Intent) करण्यात आला.


         याप्रसंगी ‘महाप्रीत’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, GEAPP चे अध्यक्ष रवी व्यंकटेशन, उपाध्यक्ष सौरभकुमार, ‘महाप्रीत’ कंपनीचे संचालक (संचलन) विजयकुमार काळम-पाटील, संचालक (तांत्रिक) रवींद्र चव्हाण व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            प्रारंभी ‘महाप्रीत’चे मुख्य महाव्यवस्थापक दीपक कोकाटे यांनी या प्रकल्पाबाबतची माहिती सादर केली. राज्य शासनाने राज्यात दोन लाख सौर कृषीपंप बसविण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. या हेतू कराराअंतर्गत GEAPP आणि महाप्रीत कंपनी लघु आणि मध्यम उद्योगांसाठी ५०० मेगावॅट क्षमतेचे रुफटॉप सोलर प्रकल्प आणि कुसुम (KUSUM) योजनेअंतर्गत ५०० मेगावॅट क्षमतेचे ग्राऊंड-माऊंटेड विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी मदत करतील. तसेच लघु आणि मध्यम उद्योग क्लस्टर्ससाठी सौर ऊर्जाप्रकल्पाची क्षमता २.५ गिगावॅटपर्यंत वाढविण्याचा मानस आहे. या प्रकल्पांचे व्यवस्थापन, रचना, विकास आणि गुंतवणूक करण्यासाठी ‘महाप्रीत’ला या हेतू कराराद्वारे GEAPP सहकार्य करेल.


         यावेळी श्री. श्रीमाळी म्हणाले, “राज्यभरात एक हजार मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी GEAPP ‘महाप्रीत’ला सहाय्य करत असल्यामुळे राज्यातील संबंधित घटकांना याचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाद्वारे महाराष्ट्र राज्यात हरित गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल तसेच मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्वांगिण शाश्वत व निरंतर विकासासाठी मदत होईल”.


             या उपक्रमाबाबत GEAPP चे अध्यक्ष श्री. व्यंकटेशन म्हणाले की, ‘GEAPP’ अक्षय ऊर्जेच्या दिशेने परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि कार्बन फुट प्रिंट कमी करण्यासाठी कार्यरत आहे. हा हेतू करार म्हणजे त्या दिशेने जाणारे एक पहिले पाऊल आहे. महाराष्ट्रातील लोकांपर्यंत स्वच्छ आणि परवडणारी ऊर्जा उपलब्ध करून देणे हे या प्रकल्पाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. यामुळे राज्यात २२ गिगावॅट अक्षय ऊर्जा निर्माण करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या उद्दिष्टाला चालना मिळेल. ‘महाप्रीत’ आणि GEAPP या दोन्हींच्या एकत्रित कौशल्यामुळे आम्ही एक हजार मेगावॅटचे सौर प्रकल्प यशस्वीपणे राबवू आणि शाश्वत भविष्यासाठी योगदान देऊ. या सहकार्यामुळे सर्व भागधारकांसाठी एक शाश्वत व्यवसाय मॉडेल तयार करण्यात मदत होईल आणि प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ‘महाप्रीत’ला संस्थात्मक सहाय्य मिळेल’’.


            याप्रसंगी GEAPP चे उपाध्यक्ष सौरभकुमार म्हणाले की, “‘महाप्रीत’ कंपनीसोबत आमची भागीदारी महाराष्ट्रात शाश्वत ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अक्षय ऊर्जेद्वारे कार्बन फुट प्रिंट कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल. या सहयोगाद्वारे आम्ही SMEs आणि ग्रामीण समुदायांना स्वच्छ आणि परवडणारी ऊर्जा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे”.

महाप्रीत’चा कर्करोगाच्या उपचारासाठीसमीर’ संस्थेसोबत सामंजस्य करार

 महाप्रीत’चा कर्करोगाच्या उपचारासाठीसमीर’ संस्थेसोबत सामंजस्य करार


 


            मुंबई, दि. २३ : भारतीय प्रौद्योगिकी संस्था, मुंबई येथे आयोजिलेल्या रेडिओलॉजी व रेडिओथेरपी प्रगती-२०२३ या परिषदेत ‘महाप्रीत’ (महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित व ‘समीर’ (Society for Applied Microwave Electronics Engineering and Research) यांच्यासोबत रेडिओलॉजी आणि रेडिओ थेरपी तंत्रज्ञानावर आधारित कर्करोगावर उपचार करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.


          या सामंजस्य कराराच्या वेळी ‘महाप्रीत’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी व समीर संस्थेच्या सुनीता वर्मा तसेच ‘महाप्रीत’ कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.


         यावेळी श्री. श्रीमाळी म्हणाले की, “रेडिओथेरपी व रेडिओलॉजीच्या तंत्रज्ञानामुळे कर्करोगावर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल. हे तंत्रज्ञान सर्वसामान्य जनतेला कमी खर्चात उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच महाराष्ट्रामध्ये या तंत्रज्ञानावर आधारित मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण होऊन उद्योग निर्मितीला चालना मिळेल व त्याद्वारे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यात रोजगारनिर्मिती होईल.``


          श्रीमती वर्मा म्हणाल्या की, “या करारामुळे समीर (SAMEER) संस्थेमार्फत रेडिओलॉजी व रेडिओथेरपी संशोधन व तंत्रज्ञानाची कर्करोगावर उपचार घेण्यासाठी मदत होईल. ‘महाप्रीत’तर्फे हे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरण्यात येईल. या संशोधनामुळे महाराष्ट्रामध्ये अद्ययावत उपचार सुविधा निर्माण होतील.


            याप्रसंगी समीर संस्थेचे अधिकारी, महाप्रीत तसेच भारतीय प्रौद्योगिकी संस्था, मुंबईचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


                                                      

योगासने करताना घ्यावयाची काळजी व २४ नियम:*

 🧘🏻‍♀ 🧘🏻‍♂🧘🏻‍♀🧘🏻‍♂🧘🏻‍♀🧘🏻‍♂🧘🏻‍♀🧘🏻‍♂🧘🏻‍♀🧘🏻‍


💁🏻 *योगासने करताना घ्यावयाची काळजी व २४ नियम:*


०१. यम व नियम यांच्या तत्त्वामुळे शीलसंवर्धनाचा मजबूत पाया घातला जातो. आसनक्रियेला यम व नियमांचा पाठिंबा नसेल तर तिला कसरतीचे स्वरूप येते.


०२. आसनांचा 🧘🏻‍♀ अभ्यास नियमितपणे करण्याची इच्छा असेल, तर शिस्त, चिकाटी, श्रद्धा हे गुण असणे आवश्यक आहेत.


०३. आसनांचा प्रारंभ करण्यापूर्वी, मूत्राशय आणि आतडी रिकामी असायला हवीत. शौचास जाऊन आल्यावर हा व्यायाम 🏋🏻‍♀ करावा. बद्धकोष्ठतेचा विकार असेल तर प्रारंभी शीर्षासन व सर्वांगासन करावे. इतर आसने शरीरशुद्धीनंतरच करावी.


०४. स्नानानंतर आसने करणे सोपे जाते. आसनांच्या व्यायामाने घाम येत असल्याने हा व्यायाम झाल्यावर १५-२० मिनिटांनी ⏰ पुन्हा स्नान करणे चांगले असते. आसनापूर्वी व आसनानंतर स्नान केल्याने शरीर व मनास ताजेपणा प्राप्त हातो. 


०५. योगासने करण्याची उत्तम वेळ म्हणजे पहाट. सकाळच्या 🌞 वेळा अंग ताठर बनलेले असते; तर पहाटेच्या वेळी मनाला ❤ ताजेपणा असतो; तल्लखपणा, निश्चयीपणा असतो. संध्याकाळच्या 🌆 वेळी सकाळपेक्षा शरीराच्या हालचाली अधिक मोकळेपणाने होतात. त्यामुळे आसने चांगली जमू शकतात व दिवसभराच्या कामाचा ताण व थकवा नाहीसा होतो.


०६. योगासने हवेशीर आणि स्वच्छ जागेत करावीत. चांगल्या सपाट जमिनीवर सतरंजी टाकून करावीत. डास, ढेकूण आदींचा त्रास 😣 अशा जागी नसावा.


०७. आसने शक्यतो पोट रिकामे असतानाच करावीत. आसने करण्यापूर्वी कपभर पेये, चहा ☕, कॉफी, दूध 🥛 ही घेतली तरी चालतात. नेहमीचे जेवण झाले असल्यास, भोजनानंतर ४-५ तास ⏱ तरी आसने करू नयेत.


०८. उन्हात बराच वेळ फिरल्यावर आसने करू नयेत.


०९. आसने करताना वाटल्यास आरसा जमिनीशी काटकोन करूनच ठेवावा.


१०. स्त्रियांनी 👭 मासिक पाळीच्या काळात आसने करू नयेत. आवश्यकतेप्रमाणे उपविष्ट कोणासन, बद्ध कोणासन, वीरासन, उत्तानासन ही आसने करणे हितकारक ठरते. आवश्यकतेप्रमाणे मार्गदर्शन घेऊन आसने करावीत. 


११. गरोदरपणाच्या 🤰🏻पहिल्या तीन महिन्यांमध्ये स्त्रियांनी सगळी आसने करण्यास हरकत नाही. 


१२. स्त्रियांनी प्रसूतीनंतरच्या 🤰🏻 पहिल्या महिन्यात आसने अजिबात करू नये. ❎


१३. वीर्यदोष असलेले लोक आसनांच्या अभ्यासाने पूर्ण निदोर्षी होऊ शकतात. त्यासाठी विवाहितांनी ऋतुरात्री ब्रह्मचर्याचे परिपालन करावे.


१४. आसनाचा व्यायाम अतिअल्प प्रमाणात करून, हळूहळू याच प्रमाण वाढवावे. शक्तीबाहेर अधिक व्यायाम करू नये. 


१५. आसने करण्यापूर्वी करतेवेळी, चांगल्या गोष्टींचे चांगल्या विचारांचे चिंतन विशेष रीतीने करणे चांगले होय.


१६. आपल्या प्रकृतीला मानवेल तसे थंड वा ऊन पाण्याने स्नान करावे.


१७. आसनांच्या अभ्यासाबरोबर सूर्यभेदन व्यायाम 🏋🏻‍♀ चालू ठेवायचा असल्यास, सूर्यभेदन व्यायाम करून नंतर आसनांचा अभ्यास करावा.


१८. आसनांचा अभ्यास करताना शक्यतो कोणतेही औषध 💊 घेऊ नये. अत्यावश्यक असल्यासच घ्यावे.


१९. रात्रीचे 🌠 जागरण व दूरवरचे वारंवार प्रवास यांतून शारीरिक

त्रास होणारे प्रसंग टाळावेत. 


२०. खाद्यपेये सात्त्विक असावीत. आंबट, तिखट, खमंग तळलेले पदार्थ फारसे खाऊ नयेत.


२१. दररोज ४ ते ५ आसने करावीत. आसने योग्य अशी निवडूनच घ्यावीत.


२२. आसने व इतर कोणताही मैदानी वा मर्दानी व्यायाम 🏋🚴 यात अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ ⏱ गेला असला पाहिजे.


 २३. आवश्यक आसनांचा अभ्यास दीर्घकाळ केल्यासच लाभ दिसू लागतो. तसेच एकेका आसनावर बसण्याचा काळ वाढविल्यासच त्याचा फायदा दिसून येतो.

 

२४. आपणास आवश्यक असणारे एखादे आसन जमत नसेल, तर ते आसन रोज आसने करण्यापूर्वी करून पाहावे व स्थिती साधावी.


( *संकलन:* आर्या देव) 


💁🏻‍♀ *रोगांचे खात्रीशीर निदान व उपचार यांसाठी वैद्य तुषार साखरे (आयुर्वेदाचार्य) यांना जरूर संपर्क करा.*


💁🏻‍♀ *माहिती आवडल्यास इतरांशी जरूर शेअर करा. 🤗*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातूनगरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य

 मुख्यमंत्री  सहायता निधी कक्षातूनगरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य


- विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे


 


            मुंबई, दि. 22 : राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या कक्षाच्या कार्यपद्धती बाबतची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली आहे.


            राज्य शासनामार्फत जनतेला चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील गरजू रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध व्हावी यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना कशा प्रकारे लाभ दिला जातो, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठीची अर्ज प्रक्रिया, तसेच कोणत्या आजारासाठी कशा स्वरूपात आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते, याबाबत या कक्षाचे विशेष कार्य अधिकारी श्री. चिवटे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, मंगळवार दि. 23, बुधवार दि. 24 आणि गुरूवार दि. 25 मे, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक राजेंद्र हुंजे यांनी घेतली आहे.

Featured post

Lakshvedhi