Sunday, 21 May 2023

ज्वारिचि.. भाकरी.. 👇

 *ज्वारिचि.. भाकरी.. 👇*


... आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर गहू व इतर धान्यापेक्षा ज्वारी हि पचायला हलकि व अतिशय गुणकारी आहे. आठवड्यातून दोन दिवस तरि आहारात ज्वारिच्या भाकरिचा समावेश करावा. रजोनिवृत्ती घ्या काळात शरिरातील हार्मोन्स असंतुलित होतात. अशा वेळी स्त्रियांनी आहारात ज्वारिच्या भाकरिचा समावेश करावा. नियमितपणे भाकर खाल्ल्यास ब्रेस्ट कॅन्सर होत नाही.असे संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार सिद्ध झाले आहे.आपण भाकर खाण्याचे फायदे बघू या..


...(१)..ज्वारिमध्ये मुबलक प्रमाणात तंतूमय पदार्थ असतात. त्यामुळे पोट साफ होते, एसिडिटि होत नाही. आणि मुळव्याध, बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही..


      (२).. किडनी स्टोन चा त्रास असलेल्या व्यक्तिने आहारात ज्वारिच्या भाकरिचा समावेश केल्यास पोषक घटक असल्याने . स्टोन विरघळून बाहेर पडतात.ज्वारिमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे एनिमियाचा त्रास असलेल्या व्यक्तिने आहारात ज्वारिच्या भाकरिचा समावेश करावा.


...(३).. वजन नियंत्रणात राहते. आजकाल फास्ट फूड, जंक फूड, मुळे लठ्ठपणाचं प्रमाण वाढले आहे. आणि मग दुष्ट चक्र चालू होते. उच्च रक्तदाब, मधुमेह, थायराइड, ह्रुदयविकार,.एसिडिटि.. इत्यादी. तेव्हा नियमितपणे आहारात ज्वारिच्या भाकरिचा समावेश केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते.वजन कमी होते.


   (४).. ज्वारी मूळे शरिरातील इंस्युलिनचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनि कायम ज्वारिचि भाकरी .खावि.. ज्वारीची भाकरी पचनास सुलभ असल्याने आजारी व्यक्तीला दूध.व भाकरी असा आहार द्यावा.

.रक्तातिल कोलेस्टेरॉल चि पातळी कमी करण्यासाठी ज्वारी अत्यंत उपयुक्त आहे.


.....(५)..काविळिच्या आजारात पचायला हलक्या अन्नाचि आवश्यकता असते. तेव्हा.. ज्वारीची भाकरी खायला द्यावि....ज्वारिच्या भाकरित पोटॅशियम, व मॅग्नेशियम, चे प्रमाण जास्त असते त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.ग्लुटेनचे प्रमाण नसल्याने ही गव्हाच्या पोळिपेक्षा चांगली आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवण्यासाठी ज्वारी ला थोडा जास्त वेळ लागतो, पण त्यामुळे अचानक शुगर वाढण्याचा त्रास होत नाही.


   (६).. ज्वारी मध्ये असलेल्या काॅपर व आर्यन हे दोन मिनरल असल्याने रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी मदत होते. लोह भरपूर प्रमाणात असते त्यामुळे लाल रक्तपेशी वाढतात.


       (७).. ज्वारी वर एक थर असतो, जो कॅन्सर चार प्रतिकार करू शकतो. शिवाय ज्वारी मध्ये असलेल्या काही घटकांमुळे अकाली वृद्धत्व येत नाही.ज्वारिच्या एक कप मध्ये..२२ ग्राम प्रोटीन असतं. हे शरिराला उर्जा देतात.म्हणूनच शहरात राहणाऱ्या लोकांपेक्षा. ग्रामीण भागातील जनता अधिक तंदूरुस्त असतात.


... तेव्हा वरील सर्व प्रकारचे फायदे बघता. आपण किमान दोन दिवस ज्वारीची भाकरी आहारात असू द्यावि..


 सुनिता सहस्रबुद्धे..


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



पिंजऱ्यातील बाप"*🌹

 🌹"पिंजऱ्यातील बाप"*🌹🌿

✍️ प्रत्येक बापाची थोड्याफार फरकाने घरात साधारण हीच परिस्थिती असते. 

वाढलेल वय,मानसिक ताण सहन होत नसतानाही त्या आरोपांसाठी सामोरं जावं.

तुंम्ही आमच्यासाठी काय करुन ठेवले?

हा एक सर्वसाधारण आरोप असतोच, आणि तो सगळ्याच बापांच्या विरुध्द केला जातो. काय केलं याची यादी जर एखादा बाप चुकूनमाकून द्यायला लागलाच तर, ”त्यात वेगळं काय केलंत तुंम्ही, ते तर सगळेच बाप करतात” असं टोकलं जातं आणि सगळी सफाई देण्यापूर्वीच संपवलेली असते.

तुंम्ही आंम्हाला प्रोत्साहनच दिलं नाही! असा आणखी एक आरोप असतो. प्रोत्साहन द्यायचं म्हणजे काय करायचं? मुलाने जसा परफॉरमन्स दाखवला असेल त्यानुसार त्याने आपलं करीयर निवडलेलं असतं.

अगदी इंजिनियर जरी झाला तरी मुलगा असा आरोप करतो. त्यावेळी विचारच करत नाही की बापाने इंजिनियरिंगची फी भरताना किती ओढाताण करुन घेतली होती.

तुंम्हाला दूरदृष्टीच नाही!

ज्यावेळी घरं स्वस्त होती, तेंव्हा चार खोल्या आणि कार पार्कींग असलेला ब्लॉक घ्यायला काय हरकत होती, अशा प्रकारचा आणखी एक आरोप असतो. तीन खोल्या घेताना अधिकचे पैसे भरण्यासाठी बापाने काढलेलं कर्ज फेडण्यासाठी आणखी एक पार्टटाईम नोकरी केलेली असते हे मुलगाही विसरतो आणि त्याची आई पण. 

माझा एक मित्र आहे. वकिली करतो. वकिली ठीक सुरु आहे. त्याने लग्न केलं त्यावेळी त्याची बायको बी,कॉमच्या शेवटच्या वर्षाला नापास झाली होती. आपल्याला कुठे बायकोला नोकरीला लावायचंय? असं म्हणत त्याने ती पसंत केली. दिसायला चारचौघींसारखीच होती. त्याने लग्नानंतर तिची इच्छा नसतानाही, तिला "बी.कॉम". करायला प्रोत्साहन दिलं. 

पुढे ती "एम कॉम" ही झाल्यावर एका कॉलेजात प्राध्यापिका. म्हणून रुजू झाली. तुंम्हाला माहितच आहे प्राध्यापकांना पगार किती आहे तो? तिला भरपूर पगार मिळायला लागला. लग्नानंतर, वीस वर्षांनी तिला जाणवायला लागलं की आपण एक वकील पसंत केला, खरं तर ही चूकच झाली. याच्यापेक्षा चांगलं स्थळ शोधायला हवं होतं. याचं कारण आता तिचं क्षितीज रुंदावलं होतं, हाती भरपूर पगार येत होता. समाजात एक वेगळा स्टेटस् , दर्जा निर्माण झाला होता, राहणीमान उंचावले होते, काॅलेजात व बाहेर मॅडम म्हणून संबोधले जाऊ लागले.

आता ती हा विचार मात्र करत नाही की, तिला शिकायला नवर्‍यानेच प्रवृत्त केलं, मदत केली, नोकरी मिळण्यासाठी ओळखीचा वापर केला. आज तिलाच आपला नवरा आपल्याला मॅच होत नाही, शोभत नाही, असं वाटायला लागलं. अजूनही दोघे एकत्रच आहेत आणि संसारही सुरु आहे. पण तिने कुठे तरी कुणाकडे तरी चुकून बोललेलं याच्या कानावर आल्यामुळे मात्र हा आतल्या आत खचून मात्र गेला आहे.

मुलगा ज्यावेळी बापावर आरोपपत्र ठेवतो, त्यावेळी अनेक वेळा मुलाची आई आणि बापाची सहचारिणी, बापाविरोधात साक्षिदार बनलेली पाहायला मिळते. ”तो काय चुकीचं बोलतो आहे ?” हे एक वाक्य बापाच्या आयुष्यावर ’नापास’ किंवा ’पराभूत’ असा शिक्का मारायला पुरेसं असतं. 

तुंम्ही हे करायला हवं होतं, ते करायला नको होतं अशा अनेक गोष्टींचे अध्याय रोजच वाचले जातात. 

विशेषत: बाप निवृत्त झाल्यावर आणि मुलगा कमवायला लागल्यावर अशा आरोपांची संख्या आणि फ्रिक्वेन्सी वाढतीच असते. अनेकांना समजत नाही की, आपण. सेवेत असताना, एक हुशार गुणवंत कर्मचारी, प्रामाणिक, कष्टाळू माणूस अशा उपाध्या मिळवलेले, निवॄत्ती नंतर खरंच आपण इतके कसे मूर्ख बनलो.

जे आपलं कर्तव्य आहे असं समजत होतो आणि जे करण्यासाठी आपण आपल्यावरच अन्याय करत होतो, ते आपले गुन्हे कसे बनले. याचं सगळ्यात महत्वाचं आणि एकमेव कारण म्हणजे आता बापावरचं अवलंबित्व संपलेलं असतं, मुलांचं आणि बायकोचंही. आता तिला, तिचा मुलगा आधार द्यायला सिध्द झालेला असतो. बापाकडे जरी निवृत्ती वेतन असले, थोडीफार शिल्लक असली तरी जर त्यावाचून कुणाचं अडणार नसेल तर बापाची ही अवस्था ठरलेलीच आहे.

आता बापांनी काय करायच तर.... आपण चुकीच्या लोकांसाठी, चुकीच्या कारणांसाठी आपलं आयुष्य वापरलं आहे असा पश्चात्ताप करायचा नाही. हाल सोसताना, कष्ट करताना, त्याग करताना आपल्याला "कर्तव्यपूर्तीचा आनंद" मिळत होता ना, तो आठवायचा. 

जग राहाटी अशीच असणार आहे. प्रत्येक 'बापाला आरोपीच्या पिंजर्‍यात, उभं रहायला लागणारच आहे. आता असे आरोप झाले तर लगेच कबुली जबाब द्यायचा, आणि पुढचा वाद टाळायचा. 

मित्रांनो, ज्यांच्यासाठी त्याग केला, कष्ट सोसले त्यांच्याशी वाद घालायचे प्रसंग टाळणे तर आपल्या हाती आहे ना.

एका त्रयस्थ भूमिकेतून या आरोपांकडे पाहायचं आणि बोध घेत पुढचं आयुष्य आपल्याच धुंदीत, मस्तीत व्यतीत करायचं.

सकाळ संध्याकाळ मित्रांसमवेत व्यतीत करायचे, त्यांचेशी समक्ष तर कधी फोनवर गप्पा गोष्टी करायच्या, छोट्या मोठ्या सहलीचा आनंद लुटण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पुस्तके वाचायची, टीव्ही मोबाईल वर वेळ घालवायचा, आपले छंद जोपासायचे, नातेवाईकांच्या सुख दुःखात सहभागी व्हायचा प्रयत्न करायचा, नोकरीत असताना हे राहून गेले होते. हाच शहाणपणा आहे. 

 मित्रांनो !!😊

शेवटी आपल्या नजरे समोर एक वाक्य दिसेल असे लिहून ठेवायचे आहे , "चलो,ये भी दिन जायेंगे", "ये तो होना ही था"

माझ्या सर्व मित्रांनो, आपल्याला हे पिंजऱ्यातील जीवन तितकेच आनंदात जगायचं आहे. जमेल मित्रांनो,पहा प्रयत्न करुन !!!

🌹*सामान्य बाप.*🌹🌿🌾🌾

गुलकंदाचे हे ६ फायदे, आरोग्य आणि सौंदर्यही!*

 *||श्री स्वामी समर्थ||*

*गुलकंदाचे हे ६ फायदे, आरोग्य आणि सौंदर्यही!* 


                   उन्हाळा आला की ‘अन्न, वस्त्र, निवारा’ यांच्या बरोबरीने आणखी एक मूलभूत गरज होऊन जाते, ती म्हणजे थंडावा! थंड गोष्टी हव्याहव्याशा वाटतात. थोडक्यात काय, तर थंडावा मिळवण्यासाठी जे जे काही उपाय करता येतील ते सगळे करायचे प्रयत्न सुरु असतात. या सगळ्या पदार्थांच्या यादीत आणखी एक पदार्थ अनेकदा पाहायला मिळतो आणि तो म्हणजे गुलकंद!

                  गुलाब हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. त्या प्रेमात जसा गोडवा असतो, तसाच गोडवा गुलाब पाकळ्यांपासून बनलेल्या गुलकंदातही असतो.


 *१. थंडावा मिळण्यासाठी उत्तम पर्याय* 

                     शरीर थंड ठेवण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी गुलकंदात असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात गुलकंद खाणं कधीही चांगलंच ठरतं. कमी करण्याची क्षमता असणारे गुलकंद, थकवा, अंगदुखी, खाज अशा उन्हाळ्यातील त्रासांवर गुणकारी ठरते. याशिवाय अतिउष्णतेमुळे स्ट्रोकचा धोका संभवतो. अशावेळी गुलकंद सुद्धा कांद्याइतकंच गुणकारी ठरतं. चवीला उत्तम असल्याने, कांद्याचा पर्याय म्हणून गुलकंदाचे सेवन करणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते.


 *२. बद्धकोष्ठतेवर गुणकारी* 

                      हालचाल कमी झालेल्या हल्लीच्या जीवनात बद्धकोष्ठ हा सामान्य आजार होऊ लागला आहे. त्यातच वर्क फ्रॉम होमच्या संकल्पनेमुळे, ऑफिसच्या निमित्ताने घराबाहेर पडणे सुद्धा बंद झालंय. अशावेळी, गुलकंद खाणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पोटातून बाहेर पडत असलेलं मल, फार घट्ट राहू नये यासाठी गुलकंद उपयोगी आहे. मल योग्य प्रमाणात नरम होण्यास आणि मलविसर्जन चांगल्यारितीने होण्यास गुलकंदाचे सेवन उपयोगी ठरते.


 *३. अल्सरवर गुणकारी* 

                    शरीरातील अति उष्णतेचा परिणाम म्हणून तोंडाचा अल्सर होणं, हा त्रास सुद्धा अनेकांना होतो. उष्णतेवर रामबाण उपाय ठरणारा गुलकंद तोंडाच्या असल्सवर सुद्धा गुणकारी ठरतो. तसेच गुलकंद आम्लपित्त नियंत्रणासाठी सुद्धा उपयुक्त आहे. दोन जेवणांच्या मधल्या वेळात अर्धा चमचा गुलकंदाचे सेवन आम्ल्पित्ताचे नियंत्रण करते असा उल्लेख आयुर्वेदातही केला आढळतो.


 *४. मासिक पाळीदरम्यानचा त्रास कमी करते* 

                   मासिक पाळीदरम्यानचा रक्तस्राव कमी करण्यासाठी गुलकंद खाणे फायदेशीर आहे. स्त्रियांच्या जननेंद्रियाच्या स्नायूंवरीला तणाव कमी करण्यास गुलकंद मदत करते, हे वैद्यकीय शास्त्रानुसार सिद्ध करण्यात आले आहे.


 *५ . जळजळ कमी होणे* 

                   अति उष्णतेमुळे होणारी त्वचेची जळजळ नियंत्रणात आणण्यासाठी गुलकंदाचे सेवन मदत करते. म्हणजेच त्वचा तजेलदार आणि टवटवीत ठेवण्यासाठी गुलकंद खाणे उत्तम!


 *६. शांत झोप लागण्यासाठी* 

                    चांगली झोप लागायला हवी असेल, तर रात्रीच्या वेळी गुलकंद घातलेलं दूध पिणं कधीही चांगलं. दूध आणि गुलकंद हे दोन्ही पदार्थ उष्णतेवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळेच दिवसभराचा थकवा, ताणतणाव दूर ठेवण्यासाठी हे पेय उपयोगी आहे. मनाला आणि शरीराला मिळालेल्या या शांततेमुळे, रात्री उत्तम झोप लागणं शक्य होतं.

मुळापासून घालवा मूळव्याध

 मुळव्याध


गुदद्वाराच्या आतील बाजूस अगर काठावर असणाऱ्या शिरा फुगतात. त्यास मोडा सारखा आकार येतो.यालाच मुळव्याध म्हणतात. व मोडातून क्वचित प्रसंगी रक्त स्त्राव होऊन प्रचंड वेदना होतात. मोडामध्ये दाह व ठणका येतो.अनेक वेळा शौचास साफ न झाल्याने कुथावे लागते.व ही शिर अथवा चुंबळच बाहेर येऊन लोंबकळत

 उपाय-

१)नारळाच्या शेंडीची राख व्हँसलिन मध्ये कालवून आतील भागास बोटाने लावणे.

२)नारळाच्या शेंडीची राख एक चमचा व साखर दिवसातून ३वेळा रक्त थांबते.

३)लिंबा वर खायचा सोडा व सेंधव टाकून पुर्ण लिंबू चोखणे रक्त पुर्णपणे थांबतेच.

४)१/२चमचा जीरे,१/२ओवा पावडर रोज गरमपाण्यात

५)अक्रोडाच्या तेलात बारीक कापडाचा काकडा भिजवून गुदद्वाराच्या आत सरकवावा रोज ऐक महीने करा मोड गळून पडेल.

६)डिकेमली व पिंपळीची मुळी उगाळून रोज मोडास लावली असता मोड गळून पडतो.

७)सुरण सुकवून चुर्ण करावे व रोज गाईच्या दुधात घ्यावे.

८)गुदद्वाराच्या आत गाईचे जुनाट तुप लावावे.

९)रोज मुळा खावा दहादिवस रिलिफ मिळतो.

१०)अर्शकुठार १गोळी,गंधक रसायन एक गोळी ,आरोग्यवर्धिनी गोळी १गोळी रोज घेणे.

११)कण्हेरीचे मुळ मोडावर उगाळून लेप द्या.

१२)रोज सकाळ संध्याकाळ गरम पाणी घ्या.रात्री झोपताना त्रिफळा चुर्ण लावा.

१३)सकाळी उठल्यावर तोंडातील लाळ व गोमूत्र दुखर्या भागास लावावे त्रास बरा होईल.

वरील उपाय करून मुळव्याधीतून कायमस्वरूपी मुक्त व्हा.

गजानन.



*⭕️

Saturday, 20 May 2023

मंत्र शास्त्र -sudha मुर्ती यांचे सुंदर vleshan

 



तुरटीचे फायदे- एकदा करूनच बघा*

 *तुरटीचे फायदे- एकदा करूनच बघा* 

तुरटीचे काहीच फायदे आपल्याला माहीत असतात. पण आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी तुरटीचे अनेक फायदे होतात. पाहूया काय आहेत तुरटी चे फायदे


*⭕️*

निरोगी दात -

तुरटीचे दातासाठी खूपच फायदे आहेत. एका अभ्यासानुसार, जर तुरटीने दाताची स्वच्छता केली तर दाताची कॅव्हिटी आणि दात तुटण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. त्यासाठी तुम्ही तुरटीचा उपयोग माऊथवॉश म्हणूनही करू शकता. तुम्हाला दातांच्या काही समस्या असतील तर तुरटी हा त्यावर रामबाण उपचार आहे. तुम्हाला जास्त त्रास न होता तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. एका ग्लासात पाणी गरम करा आणि त्यात चिमूटभर मीठ आणि एक लहानसा चमचा तुरटी पावडर घालून मिक्स करा. थंड झाल्यावर तुम्ही या पाण्याचा वापर दातांसाठी करा.  

शरीराच्या दुर्गंधीपासून सुटका-

जर तुमच्या शरीराला घामामुळे खूपच दुर्गंधी येत असेल तर तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. तसंच तुमच्या पायाला सतत दुर्गंधी येत असेल तरीही तुरटीचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. ही दुर्गंधी हटविण्यासाठी तुम्ही आंघोळ करत असलेल्या पाण्यात तुरटीचा उपयोग करा अथवा दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही आफ्टर शेव्ह, डिओ अथवा बॉडी लोशन अशा प्रकारेही वापर करू शकता. याचा तुमच्या शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. तर शरीरावरील बॅक्टेरिया मरून दुर्गंधी कमी होते. 

माऊथवॉश म्हणून उपयोग - 

माऊथवॉश म्हणून तुरटी अत्यंत उपयोगी आहे. रोज जर तुम्ही तुरटीचा माऊथवॉश म्हणून उपयोग केला तर तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका तर मिळेलच. त्याशिवाय तुमच्या दातांचे आरोग्यही चांगले राहील. विशेषतः मुलांच्या ओरल हेल्थसाठी तुरटी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते. मुलांना लहानपणापासूनच तुरटीच्या वापराची सवय लावल्यास, दातांच्या समस्याही उद्भवत नाहीत.

मांसपेशींसाठी -

तुरटी चे फायदे इतकेच नाहीत. तर तुम्हाला मांसपेशी आखडण्याचा त्रास असेल तर त्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. पोटॅशियम अलम जर तुमच्या मांसपेशी आकुंचन पावल्या असतील तर त्या बऱ्या करण्यासाठी उपयोगी ठरते. त्यामुळे जर तुम्हाला असा त्रास असेल तर तुरटीचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता..


ताप, खोकला आणि दमा-

शहरांमध्ये ताप, खोकला आणि दमा यासारख्या समस्या आता खूपच कॉमन झाल्या आहेत. यासाठी तुम्ही तुरटीचा उपयोग करा. तुरटीच्या वापराने अलर्जीने आलेला तापही निघून जाण्यास मदत होते. तसेच खोकल्यासाठीही तुम्ही याचा उपयोग करू शकता. तुरटीचे पाणी तुम्ही पिऊन खोकला आणि दम्यावर उपाय करू शकता. तुम्ही 10 ग्रॅम तुरटी आणि 10 ग्रॅम साखर एकत्र वाटून त्याचे चूर्ण करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम दुधातून हे चूर्ण घालून प्या. त्यामुळे ताप, खोकला आणि दमा निघून जाईल. 


युरिनरी इन्फेक्शन-

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनशी संबंधित समस्यांशी तुरटी दोन हात करू शकते. तुरटीमुळे मुत्राशयमुळे होणाऱ्या रक्तस्रावाला थांबवण्याचे काम करता येते. एखाद्या संक्रमणामुळे झालेला हा त्रास तुरटीमुळे बंद होऊ शकत. रक्तस्राव होणाऱ्या भागावर तुरटी प्रभावीपणे काम करते. 


केसांसाठी -

केसांसाठीही तुरटी अत्यंत उपयोगी आहे. केसांमध्ये ऊवा होणं ही शाळेत जाणाऱ्या विदार्थ्यांसाठी तर अगदी सामान्य समस्या आहे. ऊवा या लहान मुलांना जास्त प्रमाणात होतात. इतकंच नाही तर ऊवा एकाच्या केसातून दुसऱ्यांच्या केसांमध्ये पटकन जातात. यामुळे खाज आणि स्काल्प अशा समस्या उद्भवतात. पण यापासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीचा उपयोग करा. तुरटीची पेस्ट तुम्ही केसांना लावली आणि नंतर केस धुतले तर तुम्हाला केसातून ऊवा काढण्यासाठी मदत मिळते. तुरटीमुळे केसातील ऊवा मरून तुमचे केस पुन्हा पहिल्यासारखे ऊवामुक्त होऊ शकतात. त्यामुळे इतर कोणत्याही तेलांचा वापर करण्यापेक्षा तुरटीचा वापर करा. 


जखम भरण्यासाठी 

शरीरावर एखादा घाव अथवा जखम झाली तर तुम्ही त्यावर तुरटीचा उपयोग करून घेऊ शकता. यामध्ये अस्ट्रिन्जन्ट आणि हेमोस्टेटिक गुण असल्याने जखम लवकर बरी करण्यास मदत मिळते. शरीरावर कोणतेही घाव, कापले असेल अथवा तोंड आले असेल तर लवकर भरण्याचं काम तुरटी करते. एका ग्लासात गरम पाणी घेऊन त्यात एक चमचा तुरटी पावडर मिक्स करा आणि कोमट झाल्यावर हे पाणी घेऊन जखम धुवा. असं दिवसातून दोन ते तीन वेळा केल्यास घाव वा जखम लवकर भरेल. 


पिंपल्सना ठेवते दूर - 

तुम्हाला सतत पिंपल्स येत असतील आणि सर्व उपाय करूनही पिंपल्स जात नसतील तर तुमच्यासाठी तुरटी गुणकारी ठरू शकते. तुरटीमध्ये अस्ट्रिन्जन्ट गुण आढळतात. ज्यामुळे पिंपल्स बरे करण्यासाठी त्याचा फायदा होतो. तुरटीची पेस्ट करून तुम्ही पिंपल्स आलेल्या ठिकाणी लावा आणि काही वेळाने थंड पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्हाला याचा लवकरच योग्य परिणाम दिसून येईल.


सुरकुत्या आणि एजिंग -

तुरटीचा उपयोग बऱ्याच सौंदर्य प्रसाधनांमध्ये करण्यात येतो. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेमध्ये अधिक टाईटनेस आणण्याचे काम करतात. त्यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या आणि एजिंग पासून वाचण्यासाठी तुरटी प्रभावी आहे. तुम्ही याचा नियमित वापर केल्यास, हे एखाद्या अँटिएजिंगप्रमाणे काम करते. चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्यावर तुरटीचा तुकडा पूर्ण फिरवा.  


त्चचा उजळवण्यासाठी -

तुरटीमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे त्चचेमधून साचलेली घाण काढून टाकण्यास मदत मिळते. तसंच त्वचा टोन करण्यासाठीही याचा उपयोग होतो. म्हणून त्वचा उजळवण्यासाठी तुरटीचा उपयोग करण्यात येतो. चेहऱ्यावर पाणी मारून तुरटी नियमितपणे रोज चेहऱ्यावर फिरवावी. त्वचा उजळण्यास मदत मिळते. 


फाटलेल्या पायांसाठी -


पाय फाटण्याची समस्या बऱ्याच जणांना असते. पण त्यावर उपाय नक्की काय करायचा. तर त्यावर तुरटी हा सोपा उपाय आहे. तुम्ही नियमितपणे तुरटीचा तुकडा पाय ओले करून त्यावर घासला तर तुमची ही समस्या लवकरच बरी होईल. तसंच तुम्हाला त्रासही होणार नाही. 


तुरटीचा वापर कसा करावा 

तुरटीचा वापर कशासाठी करावा हे आम्ही तुम्हाला सांगितले. पण याचा वापर नक्की कसा करावा हेदेखील कळायला हवे. जाणून घेऊया तुरटीचा वापर कसा करावा 


जखम झाली असल्यास ती जखम तुरटीच्या पाण्याने दिवसातून दोन ते तीन वेळा धुतली तर त्याचा परिणाम लवकर होतो

पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटी त्यातून फिरवावी

त्वचेला दुर्गंधी येत असेल तर पाण्यातून तुरटी फिरवून त्या पाण्याने आंघोळ करावी अथवा गरम पाण्यात तुरटीची पावडर मिक्स करावी

दातांची समस्या असेल तर तुरटीच्या पाण्याने रोज चूळ भरावी 

चेहऱ्यावर मुरूमं असतील तर तुम्ही चेहरा ओला करून त्यावर रोज तुरटीचा तुकडा फिरवावा यामुळे मुरूमं जाण्यास मदत होते

खोकल्यासाठीही याचा उपयोग होतो पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे

ऊवा घालवण्यासाठी तुरटीच्या पावडरमध्ये थोडे पाणी मिक्स करून पेस्ट करून घ्या आणि ही पेस्ट केसांना स्काल्पपासून लावा. ऊवा मरतात

मांसपेशींचा त्रास असल्यास, हळद आणि तुरटी पावडर मिक्स करून आखडलेल्या ठिकाणी लावा. त्यामुळे मांसपेशींचा त्रास कमी होतो

शेव्ह केल्यानंतर तुरटीचा खडा फिरवा यामुळे घाव झाला तर त्यात पस होण्याची शक्यता कमी होते

चेहरा नेहमी उजळ दिसण्यासाठी तुरटीचा खडा चेहऱ्यावरून फिरवा



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



वजन कमी करताय शुगर फ्री वापरू नका.*

 *वजन कमी करताय शुगर फ्री वापरू नका.*



जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) वजन कमी करण्याबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामध्ये वजन कमी करण्यासाठी शुगर फ्री स्वीटनर्सचा (गोडवा निर्माण करणारे पदार्थ) वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, साखरेऐवजी नॉन-शुगर स्वीटनर्सच्या वापराचा प्रौढ किंवा मुलांच्या शरीराचे वजन कमी करण्यात दीर्घकाळ कोणताच फायदा होत नाही. तथापि, यामुळे वजन किरकोळ कमी होते, पण ते अधिक काळ कायम राहत नाही. इतकेच नाही तर यांच्या वापरामुळे टाइप-२ मधुमेह, हृदयविकाराचा धोका आणि प्रौढांमध्ये मृत्यू दर वाढू शकतो. सल्ल्यानुसार, लोकांनी इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे. जसे की, ज्यामध्ये नैसर्गिकदृष्ट्या गोडवा असतो अशा पदार्थांचे सेवन करणे. उदाहरणार्थ फळे किंवा गोड नसलेले अन्न आणि पेय पदार्थ. डब्ल्यूएचओचे संचालक (न्यूट्रिशन अँड फूड सेफ्टी) फ्रान्सिस्को ब्रान्का यांच्या मते, ज्यांना आधीपासून मधुमेह नाही त्या सर्वांसाठी हा सल्ला लागू आहे.

केवळ माहिती साठी #आयुर्वेदप्रचार




*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



Featured post

Lakshvedhi