Friday, 5 May 2023

मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचाआढावा घेऊन धोरण निश्चित करणार

 मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचाआढावा घेऊन धोरण निश्चित करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


दादर परिसरातील पुनर्विकास रखडलेल्या 56 प्रकल्पांसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश


            मुंबई, दि.5 :- मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचा सर्वंकष आढावा घेऊन धोरण निश्चित करण्यात येईल,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विशेषतः दादर परिसरातील विकासकांमुळे रखडलेल्या ५६ प्रकल्पांबाबत नोडल अधिकारी तसेच आर्किटेक्ट नियुक्त करण्यात यावा. या प्रकल्पांचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटसह, विविध पर्याय तपासण्यात यावे. प्रकल्प रखडवणाऱ्या आणि विस्थापित झालेल्या कुटुंबांना भाडे न देणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.


            आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखालील दादर परिसरातील पुनर्विकास रखडलेल्या इमारतींच्या रहिवाश्यांच्या शिष्टमंडळासमवेत आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. बैठकीस गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, म्हाडाच्या मुंबई इमारत व पुनर्रचना मंडळाचे मुख्याधिकारी अरूण डोंगरे आदी उपस्थित होते.


            बैठकीत आमदार श्री. सरवणकर यांनी दादर परिसरातील उपकर प्राप्त इमारतीच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांची माहिती दिली. या परिसरातील अशा रखडलेल्या ५६ इमारतींमधील सुमारे साडेतीन हजार कुटुंबांची परिस्थिती बिकट झाल्याचे त्यांनी सांगितले.


            त्यावर निर्देश देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या प्रकरणाचे गांभीर्य आमदार श्री. सरवणकर यांनी संवेदनशीलपणे अनेकदा दाखवून दिले आहे. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांबाबत धोरण निश्चित करण्याची गरज आहे. यासाठी आम्ही काम देखील सुरु केले आहे. विशेषतः दादर परिसरातील या ५६ इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकासाची सर्वंकष माहिती घेण्यासाठी, प्रत्येक इमारतीचे प्रश्न वेगळे असतील, तर त्याबाबत अभ्यास कऱण्यासाठी एक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येईल. तसेच एक आर्किटेक्टही नियुक्त कऱण्यात येईल. जेणेकरून या क्लस्टर डेव्हलपमेंटसह अन्य कोणते पर्याय आहेत, ते अभ्यासले जाईल.


            या दरम्यान म्हाडाने विहीत नियमानुसार पुनर्विकास रखडवणाऱ्या विकासकांवर कारवाई करावी. त्यांना नोटीस देणे, प्रकल्प अधिग्रहीत करण्याच्या कार्यवाहीला गती द्यावी. काही विकासक पुनर्विकसित इमारतीतील जागा देण्याबाबत या कुटुंबांना टाळाटाळ करत असतील, तर त्यांनाही समज देण्यात यावी. गेली कित्येक वर्षे पुनर्विकास रखडल्याने मुंबईतील या मूळ घर मालकांना मुंबईच्या बाहेर जावे लागले आहे. यामध्ये शासन म्हणून लक्ष घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. रखडलेले हे पुनर्विकासाचे म्हाडाप्रमाणेच अन्य यंत्रणांच्या माध्यमातून कसे पूर्ण करता येतील यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.


            यावेळी उपस्थित रहिवाश्यांनीही आपले म्हणणे मांडले. या सर्वांचे म्हणणे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी आस्थेवाईकपणे ऐकून घेतले. या नागरिकांच्या तक्रारी-म्हणण्याची म्हाडाने नोंद घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

योग्य आहार व जीवनशैली देईल थायरॉईडपासून सुटका*

 * 

 *योग्य आहार व जीवनशैली देईल थायरॉईडपासून सुटका* 

 

आज आपण थॉयराईड झाल्यावर काय काय आहार घ्यावा ते पाहूया.


आजकाल वजन वाढायला लागले की, डाॅक्टर थायरॉईडची तपासणी करण्याचा सल्ला देतात. हो. कारण अचानक वाढणाऱ्या वजनाच्या मुळाशी थायरॉईड असू शकते. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. पण घाबरु नका योग्य आहार तुमचे या आजारापासून रक्षण करु शकतो.


बरं हे थायरॉईड प्रकरण नेमकं काय आहे. थायरॉईड ही एक लहान ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात स्थित असते. तिचं मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे असते. 


थायरॉईड आहे हे कसे ओळखावे. साधारणपणे थायरॉईडची लक्षणे पुढीलप्रमाणे दिसतात. 

बद्धकोष्ठता (संडासला साफ होत नाही.), शरीराचं वजन अचानक कमी जास्त होत राहते, हात पाय थंड पडतात, त्वचा कोरडी पांढरी पडते, ताण तणाव वाटतो, आळशीपणा येतो, शारीरिक आणि मानसिक विकासात अडथळे,  केस गळणे. 

थायरॉइडचे विकार होण्याची कारणे गुंतागुंतीची असू शकतात. परंतु, काही पथ्य पाळल्यास होऊ घातलेले थायरॉइड विकार टाळता येतात. त्यासाठी आहार, व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा आहे. हर्बल ट्रीटमेंटने थायरॉईडची समस्या निश्चितपणे दूर होते.


चौरस आहार हा थायरॉईडला दूर ठेवण्यास महत्त्वाचा ठरतो.  आयोडिन, लोह, अ जीवनसत्त्व यांचा समावेश असलेल्या पदार्थांचे सेवन हॉर्मोन्सच्या उत्पादनाला चालना देते.

साखर आणि पिष्टमय पदार्थांचे मर्यादित सेवन करावे. या दोन्ही पदार्थांमुळे वजन वाढते. ज्यामुळे थायरॉइडच्या उत्पादनावर आणि अभिसरणावर परिणाम होतो.

तेल-तूप-चरबी वाढविणाऱ्या पदार्थांपासून दूर राहिल्याने हृदयविकार, डायबेटिससह हॉर्मोन्सच्या विकारांवर नियंत्रण मिळवता येतो.

दररोज ३० ते ६० मिनिटे व्यायाम केल्याने रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे रक्तातील थायरॉइड शरीराच्या सर्व पेशींपर्यंत पोहोचते.


अर्थातच तुम्ही विचाराल हा आजार टाळण्यासाठी काय खावे. तर

◼️सफरचंद खाणं हायपोथायराॅयडिज्म समस्येत फायदेशीर मानलं जातं. कारण सफरचंदात फायबर आणि क जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असतं. 

◼️बेरी गटातील फळं खावीत. स्ट्राॅबेरी खाण्याचा सल्ला दिला जातो. बेरी आणि स्ट्राॅबेरी फळांमध्ये ॲण्टिऑक्सिड्ण्टसचं प्रमाण भरपूर असतं त्याचा फायदा थायराॅइड ग्रंथीला होतो. 

◼️संत्री खाव्यात. संत्र्यामध्ये क जीवनसत्व असतं. हायपोथायराॅयडिज्म समस्येत वजन कमी करण्यासाठी संत्री उपयुक्त ठरतात.

◼️अननसात क जीवनसत्व असते.  त्यामुळे अननस अवश्य खा. 


आहाराची पथ्यं पाळल्यास थायरॉईड मध्ये वजन नियंत्रित ठेवणे शक्य होते.  

थायरॉईड ची समस्या असेल तर सोयाबीन, कोबी, ब्रोकोली, पनीर, बटर, जंक फूड, काॅफी यांचे आहारातील प्रमाण कमी करा. नियमित तपासणी करून वैद्यच्या सल्ल्याने आहार, औषधे घ्यावीत.

एक नक्की जर आहार व जीवनशैली व्यवस्थित केली तर थायरॉईडपासून नक्की सुटका होऊ शकते. 


*संकलन-* 


*डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


https://chat.whatsapp.com/EiFGDjj0bY0B1VwZpV3ebm


_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर  Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/EiFGDjj0bY0B1VwZpV3ebm

आज आपण थॉयराईड झाल्यावर काय काय आहार घ्यावा ते पाहूया.


आजकाल वजन वाढायला लागले की, डाॅक्टर थायरॉईडची तपासणी करण्याचा सल्ला देतात. हो. कारण अचानक वाढणाऱ्या वजनाच्या मुळाशी थायरॉईड असू शकते. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. पण घाबरु नका योग्य आहार तुमचे या आजारापासून रक्षण करु शकतो.


बरं हे थायरॉईड प्रकरण नेमकं काय आहे. थायरॉईड ही एक लहान ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात स्थित असते. तिचं मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे असते. 


थायरॉईड आहे हे कसे ओळखावे. साधारणपणे थायरॉईडची लक्षणे पुढीलप्रमाणे दिसतात. 

बद्धकोष्ठता (संडासला साफ होत नाही.), शरीराचं वजन अचानक कमी जास्त होत राहते, हात पाय थंड पडतात, त्वचा कोरडी पांढरी पडते, ताण तणाव वाटतो, आळशीपणा येतो, शारीरिक आणि मानसिक विकासात अडथळे, केस गळणे. 

थायरॉइडचे विकार होण्याची कारणे गुंतागुंतीची असू शकतात. परंतु, काही पथ्य पाळल्यास होऊ घातलेले थायरॉइड विकार टाळता येतात. त्यासाठी आहार, व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा आहे. हर्बल ट्रीटमेंटने थायरॉईडची समस्या निश्चितपणे दूर होते.


चौरस आहार हा थायरॉईडला दूर ठेवण्यास महत्त्वाचा ठरतो. आयोडिन, लोह, अ जीवनसत्त्व यांचा समावेश असलेल्या पदार्थांचे सेवन हॉर्मोन्सच्या उत्पादनाला चालना देते.

साखर आणि पिष्टमय पदार्थांचे मर्यादित सेवन करावे. या दोन्ही पदार्थांमुळे वजन वाढते. ज्यामुळे थायरॉइडच्या उत्पादनावर आणि अभिसरणावर परिणाम होतो.

तेल-तूप-चरबी वाढविणाऱ्या पदार्थांपासून दूर राहिल्याने हृदयविकार, डायबेटिससह हॉर्मोन्सच्या विकारांवर नियंत्रण मिळवता येतो.

दररोज ३० ते ६० मिनिटे व्यायाम केल्याने रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे रक्तातील थायरॉइड शरीराच्या सर्व पेशींपर्यंत पोहोचते.


अर्थातच तुम्ही विचाराल हा आजार टाळण्यासाठी काय खावे. तर

◼️सफरचंद खाणं हायपोथायराॅयडिज्म समस्येत फायदेशीर मानलं जातं. कारण सफरचंदात फायबर आणि क जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असतं. 

◼️बेरी गटातील फळं खावीत. स्ट्राॅबेरी खाण्याचा सल्ला दिला जातो. बेरी आणि स्ट्राॅबेरी फळांमध्ये ॲण्टिऑक्सिड्ण्टसचं प्रमाण भरपूर असतं त्याचा फायदा थायराॅइड ग्रंथीला होतो. 

◼️संत्री खाव्यात. संत्र्यामध्ये क जीवनसत्व असतं. हायपोथायराॅयडिज्म समस्येत वजन कमी करण्यासाठी संत्री उपयुक्त ठरतात.

◼️अननसात क जीवनसत्व असते. त्यामुळे अननस अवश्य खा. 


आहाराची पथ्यं पाळल्यास थायरॉईड मध्ये वजन नियंत्रित ठेवणे शक्य होते.  

थायरॉईड ची समस्या असेल तर सोयाबीन, कोबी, ब्रोकोली, पनीर, बटर, जंक फूड, काॅफी यांचे आहारातील प्रमाण कमी करा. नियमित तपासणी करून वैद्यच्या सल्ल्याने आहार, औषधे घ्यावीत.

एक नक्की जर आहार व जीवनशैली व्यवस्थित केली तर थायरॉईडपासून नक्की सुटका होऊ शकते. 


*संकलन-* 


*डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



हृदयाची काळजी घ्या, कोलेस्टेरॉल कमी करा*

 *हृदयाची काळजी घ्या, कोलेस्टेरॉल कमी करा*


अनेक प्रकारचे आजार आहेत जे झाले तरी लवकर लक्षात येत नाही. काही वेळा विशेष त्रास न होता हे आजार बरे होतात. आजार कोणताही असू दे शरीराची हानी ही करतोच. हृदयाचेही तसेच आहे. हृदयावर ताण आल्यास त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हा परिणाम लगेच दिसून येत नाही पण तो परिणाम जास्त त्रासदायक ठरू नये यासाठी हृदयाची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी किरकोळ स्वरुपाचा त्रास झाला तरी वैद्यकीय तपासणी करुन घेणे डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक उपचार करुन घेणे हिताचे आहे.


जग वेगाने प्रगती करत आहे, या प्रगतीसोबतच नवनव्या आजारांचा जन्म होत आहे. काही जुने आजार तीव्र स्वरुपात माणसाला त्रास देऊ लागले आहेत. यातच समावेश होतो कोलेस्टेरटल या आजाराचा. हा आजार अतिशय आरामात शरीरात प्रवेश करतो. एरवी फिट दिसणारे तरुण तरुणीही या आजाराला बळी पडू शकतात. नियमित वैद्यकीय तपासणी करणाऱ्यांना या आजाराचे संकेत लवकर मिळू शकतात. पण इतरांना हा आजार झाल्याचे कळायला वेळ लागतो. 


कोलेस्टेरॉलचा आजार जेवढा गंभीर आहे तेवढाच तो दूर करणेही सोपे आहे. पण त्यासाठी चिकाटी हवी, संयम हवा आणि सातत्य हवे. काही सोपे उपाय नियमित केले तर कोलेस्टेरॉलच्या आजारावर मात करणे शक्य आहे.


कोलेस्टेरॉल म्हणजे काय?


सोप्या भाषेत सांगायचे तर कोलेस्टेरॉल (cholesterol) हा रक्तात असलेला घटक आहे. शरीरात रक्ताभिसरण सुरळीत सुरू राहावे वेगवेगळ्या अवयवांना ऊर्जा मिळावी यासाठी रक्तातील कोलेस्टेरॉलचा वापर होतो. नैसर्गिकरित्या शरीर कोलेस्टेरॉल तयार करते तसेच फास्ट फूड, जंक फूड, भरपूर तेलाचा वापर करुन केलेले पदार्थ यांच्या सेवनामुळे शरीरात कृत्रिम कोलेस्टेरॉल प्रवेश करते. शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले की ते रक्तवाहिन्यांजवळ चिकटून नव्या भिंती, नवे अडथळे निर्माण करते. यामुळे शरारीत सतत सुरू असलेल्या रक्ताभिसरण प्रक्रियेवर परिणाम होतो. रक्ताभिसरणावर परिणाम झाल्यास तब्येत बिघडण्यास सुरुवात होते. शरीरात अतिरिक्त कोलेस्टेरॉलची निर्मिती होणे या आजाराला हायपर कोलेस्ट्रोलेमिया म्हणतात.


शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल आढळते. कमी घनता असलेले लिपोप्रोटीन LDL आणि जास्त घनतेचे लिपोप्रोटीन HDL कोलेस्टेरॉल शरीरात आढळते. कोलेस्टेरॉलचे शरीरातील प्रमाण वाढण्याची अनेक कारणं आहेत. यातील २ प्रमुख कारणं


आहाराच्या तुलनेत शरीराच्या हालचाली कमी असणे फास्ट फूड, जंक फूड, भरपूर तेलाचा वापर करुन केलेले पदार्थ यांचे मोठ्या प्रमाणावर सेवन

जर वजन जास्त असेल तर दोन पैकी किमान एक आणि काही वेळा दोन्ही कारणांमुळे शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. रक्ताची कोलेस्टेरॉल तपासणी करुन घ्या. यात शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण समजेल. रक्तात 200 mg/dl कोलेस्टेरॉल असेल तर चिंतेची गरज नाही. पण रक्तात 200-239 mg/dl कोलेस्टेरॉल असेल तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे हे लक्षात घ्या. जर रक्तात 240 mg/dl कोलेस्टेरॉल असेल तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण चिंताजनक आहे. कारण हे हाय कोलेस्टेरॉल आहे. ज्यांच्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते अशांना हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असतो. 


कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्याचे सोपे उपाय


-दररोज जास्तीत उकळलेले पाणी प्या.  


-दररोज सकाळी तुळशीची २-४ स्वच्छ धुऊन घेतलेली पाने चावून खा.


 -सकाळी एक ग्लास पाण्यात लेमनग्रास तेलाचे ५ थेंब टाकून ते पाणी प्या. 


-लिंबू पाण्याने धुवून घ्या नंतर दोन ग्लास पाणी भांड्यात उकळवत ठेवा. त्यात लिंबू पिळा आणि लिंबाच्या साली पाण्यात टाका. भांड्यातील २ ग्लास पाण्याचे एक ग्लास पाणी झाले की ते गरम पाणी प्या. लिंबाच्या साली टाकून द्या.  


-दररोज सकाळी ब्रश करण्याआधी लसणाच्या (Garlic) २-४ पाकळ्या चावून खा. 


-रोजच्या आहारात मर्यादीत प्रमाणात लसणाचा वापर करा. नारळाच्या तेलापासून (Coconut oil) तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करा. 


-माशापासून तयार केलेल्या तेलाचा (Cod liver oil) खाण्याच्या पदार्थांमध्ये वापर करा आणि त्या पदार्थांचे सेवन करा. 


-ज्या पदार्थांमधून ब३, क आणि ई जीवनसत्व (vitamine B3, C, E) मिळतात अशा पदार्थांचे सेवन करा.


 -दररोज दुपारच्या जेवणात एक वाटी दह्याचे सेवन करा. दही पदार्थांच्या पचनासाठी मदत करते. 


-फास्ट फूड, जंक फूड, तेलकट पदार्थ यांचे सेवन टाळा. 

-साखर आणि मैदा यांचा वापर करुन केलेल्या पदार्थांचे सेवन टाळा.



-बेकरी प्रॉडक्ट, चिप्स आणि वेफर्स खाणे टाळा. जेवणात --साखरेऐवजी गुळाचा वापर करा. 


-दररोज किमान एक तास वेगाने चाला. चालण्याचा व्यायाम लाभदायी आहे.

 ---------------------------------------------- 

 


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



जीवनसत्व -व्हिटॅमिन डी. गरज

 व्हिटॅमिन डी. 

नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ,

आज आपण व्हिटँमीन डी या विषयावर चर्चा करुन याचं महत्त्व, कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या,या विषयी जाणून घेणार आहोत.जगभरातील५०टक्के जनता याच्या कमतरतेमुळे त्रासलेले आहे. मग चला तर मंडळी पाहूया हा विषय नक्की काय आहे ते.

व्हिटॅमिन डीच्या मदतीने शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढते. व्हिटॅमिन डी ची शरीरात कमतरता असेल तर वेगवेगळ्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि पोषण मिळवण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असणं गरजेचं असतं. पण सद्याच्या लाइफस्टाइलमध्ये अनेकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे व्यक्तीला नेहमी थकवा जाणवतो.

   

*आता आपण तांत्रिकदृष्ट्या या जीवनसत्वाचे महत्त्व समजून घेऊया.*

जीवनसत्त्व ‘ड’ हे कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांच्या शोषणाला मदत करते. हाडे तयार करणे आणि त्यांच्या ठिसूळपणापासून प्रतिबंध करणे. पेशींच्या निर्मितीत भाग घेणे आणि बाधित अथवा विकृत पेशींचा नाश करणे. प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करणे.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


https://chat.whatsapp.com/EiFGDjj0bY0B1VwZpV3ebm



*व्हिटँमीन डी ची कमी असल्यास काय समस्या तयार होतात ते पाहू.*

१)हायपरटेंशन किंवा उच्च रक्तदाब जाणवतो.

२)स्नायू आणि शरीरावर तणाव शरीरात अचानक वेदना.

३)निराशा आवश्यकतेपेक्षा अधिक वाढते,मानसिक त्रास होतो.

४)शरीर लहान-सहान रोगांना पेलू शकत नाही

५)घाम फुटतो,चिडचिडही होते.

६)मूड स्विंग होतो.

७)थकवा आणि आळस.

८)स्मरणशक्ती कमी होतेआणि भ्रम निर्माण होतात.

९) लहान मुलांमध्ये आणि प्रौढ अवस्थेत मुडदूस (रिकेट्‌स) हा आजार.

१०)वजन वाढते.

११)एखादी जखम झाल्यास लवकर भरत नाही.

१२)पचन विकृती तयार होते.

१३)केसांची गळती.

१४)प्रतिकारशक्ती कमी होऊन शरीर कायम बँक्टेरीयल व व्हायरल इनफेक्शन ची शिकार होतं.

१५)हाडात ठिसूळ ता आल्याने सारखं सारखं फँक्चर होण्याचा धोका, आँस्टीओपाँरोसीस ही होऊ शकतो.

१६)हार्मोनल इनबँलन्स होतो.

१७)कोल्ँस्ट्राँल चे कार्य बिघडते.

१८)पित्ताचा त्रास वाढू शकतो.

[12/20, 6:38 PM] वैद्य गजानन:

         *रक्त तपासणी.*

याचे शरीरातील ‘हाफ लाइफ’ (ज्ञात उधळण्याचा कालावधी) फक्त आठ तासांचा असून व्हिटॅमिन ‘डी टोटल’चा हाच कालावधी सुमारे पंचवीस दिवसांचा असतो. यामुळे व्हिटॅमिन ‘डी टोटल’ हीच चाचणी सर्वात जास्त ग्राह्य मानण्यात येते. ‘डी ३’ लिहिलेले असले तरीही व्हिटॅमिन ‘डी टोटल’ हीच चाचणी औषधोपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना बहुतांश वेळा अपेक्षित असते. व्हिटॅमिन ‘डी टोटल’ ही चाचणी रक्तातून होते आणि त्याचा नमुना कधीही देता येतो. याच्या सामान्य पातळीचे प्रमाण ३० ते ७० असते.

या अनुशंगाने ज्या भागावर याचा प्रभाव पडतो त्या भागांच्या टेस्ट ही केल्या जातात.

*कसे तयार होते हे जीवनसत्त्व.* *शरीरात कुठल्या रुपात कार्यरत असते.*

व्हिटॅमिन ‘डी’ म्हणजेच व्हिटॅमिन ‘डी टोटल’ असून ते ‘डी २’ आणि ‘डी ३’ या प्रकारांनी बनलेले असते. ‘डी २’ हे वनस्पतीजन्य असून ‘डी ३’ हे सूर्यप्रकाशातून, तसेच प्राणिज पदार्थांमधून मिळते.  

 व्हिटॅमिन ‘डी २’ आणि ‘डी ३’ हे दोन्हीही प्रकार हे थेट परिणामकारक नसतात. त्यांच्यावर यकृत आणि मूत्रपिंड यांमध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचे रूपांतर कॅल्सीट्रॉल नावाच्या संयुगात होत आणि हा प्रकार व्हिटॅमिन ‘डी’चा उपयुक्त प्रकार असतो.

        [12/20, 7:19 PM] वैद्य गजानन:

           *व्हिटँमीन डी नँचरली कशातून मिळत असते शरीराला.*

१)सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन ‘डी ३’ त्वचेखाली तयार होते.आठवड्यात दोन वेळा अर्धा-अर्धा तास कोणतेही लोशन न लावता शरीराच्या मोठ्या 

भागावर सूर्यकिरण पडल्यास त्या मात्रेत हे व्हिटॅमिन तयार होते. उन्हातून फिरणे कमी झाल्यामुळे हल्ली बहुतांश लोकात याची कमतरता आढळते.

२)याचा मुख्य स्रोत प्राणिज पदार्थ असतात. मटण, लिव्हर, लिव्हर ऑइल,मासे,

३)अंड्याचा पिवळा बलक.

४)दूध आणि चीज. 


*कमतरता कोणाला जाणवते.*

१)उन्हातून फिरणे कमी झाल्यामुळे हल्ली बहुतांश लोकात याची कमतरता आढळते. २)यकृत, मूत्रपिंड यांच्या आजारात शोषणप्रक्रियेत आणि विघटनप्रक्रियेत अडथळा आल्याने कमतरता उद्भवते. ३)काळ्या व्यक्तींमध्ये त्वचेतून सूर्यकिरणे शोधण्याच्या प्रक्रियेला मेलॅनिन नावाचे द्रव्य प्रतिरोध करते अन्‌ त्यामुळे त्यांच्यात कमतरतेचे प्रमाण अधिक असते.

४) वृद्ध मंडळी आणि स्तन्यपान देणाऱ्या माता यांच्यामध्येही कमतरता जास्त प्रमाणात आढळते.

५)गँस्ट्रीक बायपास सर्जरी झालेले,आँस्टीओपाँरोसीस, टिबी, थायराँईड, लिम्फोमा चे कँन्सर ग्रस्त,इ .मंडळी ना ही याची कमतरता भासते.

६)अँन्टीफंगल,एडस,कँन्सर,टिबी,कोलेस्टेरॉल च्या काही औषधा मुळे ही शरीरातील ह्या जीवनसत्वाची कमतरता भासते.

७)पाच वर्षापेक्षा कमी वयाची मुले.पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाचे वृध्द.


          [12/20, 7:51 PM] वैद्य गजानन:

*कशी भरून काढावी कमतरता.*

१)मासे हे जीवनसत्व मिळवण्याचे मोठे स्त्रोत असून यात काँड लिव्हर आँईलच्या गोळ्याचे सेवन आपण करू शकता.माशात पेडवा,रावस,व बांगडा ही कोकणात तसे *आमच्या गोव्यात* आढळणारी मच्छी आहारात जास्त असल्यास याची कमतरता भरून निघते.

२)मशरूम, सोयामिल्क,वेगवेगळी धान्य ही याचा नँचरल सोर्स आहेत.

३)चिकन,मटण यातील लिव्हर हे यासाठी बेस्ट आहे.

४)पनीर सह सारी डेरी प्राँडक्ट ही यासाठी बेस्ट आँफशन आहेत.

५)नेहमी अंडी खाणे ही या व्यक्तींना फायदेशीर आहे विशेषतः पिवळा बलक.

६)रोज नियमित संत्र्याचा ज्यूस प्यायल्यास ही याची कमतरता भरून येते.

    या पोस्ट च्या माध्यमातून आपल्याला या जीवनसत्त्वाचे महत्त्व ,कमतरतेमुळे होणारे त्रास,उणीव कशी भरून काढावी यासंबंधी विस्तृत माहिती देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आशा आहे आपणास ही पोस्ट ही इतर पोस्ट इतकीच आवडेल.


वैद्य. गजानन.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बुध्द पौर्णिमेच्या शुभेच्छा


तथागतांचा मार्ग चिरकाल अनुसरणीय


            मुंबई, दि.5 :- 'तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा मानव, प्राणिमात्रांच्या कल्याण आणि शांतीचा मार्ग त्रिकालाबाधित आणि चिरकाल अनुसरणीय राहील अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी तथागत बुद्धांच्या चरणी अभिवादन अर्पण केले आहेत. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विश्वशांतीचा, सर्व प्राणिमात्राच्या कल्याणाचा संदेश हा अनंतकाळ टिकणारा, त्रिकालाबाधित - चिरकाल असा आहे. त्यांनी दिलेल्या पंचशील तत्वांचा अंगीकार हा सगळ्यांच्याच उत्थानाचा मार्ग आहे. तथागतांचा आज जन्मोत्सव आणि ज्ञानप्राप्तीचा दिन. या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी प्रणाम. या बुध्द पौर्णिमेच्या पवित्र आणि मंगल अशा क्षणाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.

खारघर दुर्घटना, चौकशी

 


दाट केसांसाठी

 *दाट केसांसाठी*

1.बेसन आणि दही-बेसनात जरा दही मिसळा. डोक्यात खाज सुटत असेल तर चिमूटभर हळद मिसळा. आता हे मिश्रण केसांच्या मुळात लावा. आता डोक्यावर शॉवर कॅप घाला आणि अर्धा तास तसेच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.

2.बेसन आणि अंडी :- हे शैंपू आणि कंडिशनरप्रमाणे परिणाम देतं. दोन चमचे बेसनात एका अंड्याचा पांढरा भाग मिसळा. यात एक चमचा लिंबू आणि मध मिसळा. सर्व व्यवस्थित मिसळून घ्या. आता हा मास्क केसांच्या मुळात लावा. थोड्या वेळ वाळू द्या. नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.

3.तेल लावावं - केसांमध्ये दजवळपास १ तास तेल मुरलं पाहिजे, त्यामुळे केसांच्या मूळापर्यंत तेल जातं. डोक्यावर कोमट तेलानं मालिश करावी आणि गरम पाण्यातून काढलेल्या टॉवेलनं डोकं झाकून घ्यावं. त्यानं केसांना वाफ मिळते. कोणत्याही तेलानं केस वाढतात असं नाही, बदाम तेल केसांसाठी उपयुक्त आहे. त्यात व्हिटॅमिन इ मोठ्या प्रमाणात असतं.



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



Featured post

Lakshvedhi