Monday, 1 May 2023

गर्जा महाराष्ट्र माझा

 


गुटखा त च जा

 शाहरुख खान,सलमान खान, अजय देवगन, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आदि इन सभी को पान मसाले का विज्ञापन करते आपने देखा होगा अब जरा इस वीडियो को गौर से सुनिये ।🫣


बहुगुणी आरोग्यदायी, सौंदर्य दायी जास्वंद.....*

 *बहुगुणी आरोग्यदायी जास्वंद.....*


काही जणांना केसांना तेल लावायला आवडत नाही त्यांनी जास्वंदाची १० ते १५ फुलं लोखंडाच्या कढईत थोड्या पाण्यात भिजवावीत. रात्री ते पाणी चांगला अर्क निघेपर्यंत उकळून घ्यावं. सकाळी उठल्यावर तो अर्क केसांना लावा.


एका तासाने फक्त पाण्याने केस धुऊन टाकावेत. यामुळे केसांना चांगली चमक येते.


हेड मसाजसाठी जे तेल वापरत असाल त्यात, उदाहणार्थ तिळाच्या अथवा खोबरेल तेलात पाच ते सहा जास्वंदाची फुलं टाकावी. हे तेल कोमट करून कापूस किंवा बोटांऐवजी जास्वंदीच्या फुलांनी केसांच्या मुळांना चोळलं तर केसांची मुळं मजबूत होतात.


भरपूर जास्वंदाची फुलं, दोन आवळे, थोडी शिकेकाई आणि दोन रिठे पाण्यात टाकून ते मिश्रण व्यवस्थित उकळवून ठेवा.


केसांसाठी हेअरवॉश म्हणून वापरता येईल. हा हेअरवॉश रोज वापरला तरी चालेल.


मोड आलेली मेथी, कोरफड चिक, जास्वंदाची फुलं एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटावी. हा पॅक केसांना लावावा. याने केसांना नैसगिर्क चमक येते.


जास्वंदीची फुलं, कोरफडीची पानं, ५० मिलि राईचं तेल आणि ५० मिलि तिळाचं तेल एकत्र गरम करून ठेवावं. शक्यतो काचेच्या बाटलीत हे तेल भरून ठेवून वापरावं. आठवड्यातून दोनदा तरी हे तेल केसांना लावावं. बाजारात मिळणारं जास्वंद तेलही खूप गुणकारी असतं. फक्त पाणी घालून ते थोडं पातळ करून लावा.


जास्वंद जेलचा अरोमा थेरपीच्या तेलांमध्येही खूप उपयोग होतो. पण तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ते वापरू नये.


ब्राह्मी, माका, नागरमोथा,जांभळं आणि जास्वंदीची फुलं एकत्र उकळवून त्याचं पाणी काचेच्या बाटलीत भरून ठेवावं आणि हेअर वॉटर म्हणून वापरावं.


मेंदी कालवताना ताक, जास्वंद तेल आणि मंडूर पावडर एकत्र भिजवावी. हे मिश्रण लावल्यामुळे केसांना नैसगिर्क रंग येतो.


जास्वंद जेलमध्ये शिकेकाई, रिठा, कचूर सुगंधी, संत्र्याचीसाल आणि मुलतानी माती एकत्र करून त्याचा लेप केसांना लावावा.


*डॉ. सुनील इनामदार,*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


Sunday, 30 April 2023

पूर्णब्रह्म -भाजलेल्या वांग्याचे फायदे.....*

 *भाजलेल्या वांग्याचे फायदे.....*


वांग्याचे भरीत तुम्ही अगदी चवीने खात असाल परंतु यामधील औषधी गुणांची तुम्हाला माहिती आहे का? वांग्यामध्ये खोकला, संक्रमित आजारांना दूर ठेवण्याची क्षमता आहे. भारतातील जवळपास सर्व भागांमध्ये वांग्याची शेती केली जाते. आदिवासी भागांमध्ये विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वांगे वापरले जाते. वांग्याच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता, अपचन, डायबिटीज इत्यादी समस्या दूर होतात. येथे जाणून घ्या, वांग्याचे काही खास उपाय आणि फायदे…


*खोकल्यावर गुणकारी...* 

पाताळकोट येथील आदिवासी वांगे चुलीवर भाजून त्यावर चवीनुसार मीठ टाकतात. यांच्या माहितीनुसार अशा पद्धतीने वांगे खाल्ल्यास खोकला बरा होण्यास मदत होते आणि कफ बाहेर पडतो.


*भूकेला शांत करते...* 

वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात डाएटरी फायबर्स आढळून येतात, जे वजन कमी करू इच्छित असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरतात. वांग्याचे सेवन केल्याने शरीरातील फायबर्सचे प्रमाण वाढते आणि यामुळे कॅलरीज कमी होऊ शकतात. फायबर्सचे पोटातील प्रमाण वाढल्यामुळे भूक शांत होते.


*उच्च रक्तदाबाची समस्या ठीक होते...*

आदिवासी लोकांच्या माहितीनुसार वांग्याचे सेवन उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार ठीक करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. आधुनिक विज्ञानानुसार शरीरातील आयर्नचे जास्त प्रमाण नुकसानदायक ठरू शकते. वांग्यातील नासुनीन नावाचे रसायन शरीरातलं अतिरिक्त आयर्न नियंत्रित करते. या कारणामुळे हृदय संचालन सामान्य राहते आणि उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो.


*शांत झोप लागते...*

भाजलेल्या वांग्यावर चवीनुसार मध टाकून रात्री खाल्ल्यास शांत झोप लागते. आदिवासी लोकांच्या माहितीनुसार वांग्याच्या सेवनाने अनिद्रेची समस्या दूर होते. रक्ताची कमतरता दूर होते.


*अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते...* 

वांग्याचे सूप तयार करून त्यामध्ये हिंग आणि चवीनुसार लसुन टाकून सेवन केल्यास पोट फुगणे, गॅस होणे, बद्धकोष्ठता, अपचन इ. समस्या दूर होण्यास मदत होते.


*डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर...*

वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते आणि यामधी कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे विरघळत नाहीत. यामुळे टाइप 2 डायबिटीज ग्रस्त रुग्णांनी नियमित वांग्याचे सेवन केल्यास साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळेल.


नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

   

*नितीन जाधव,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत


 


            मुंबई, दि.३० :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रियेतील महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.


            महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल, २०२३ रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ आयोजित करण्यात आली. या परीक्षेकरिता एकूण ४,६७,०८५ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. त्यांच्या बैठक व्यवस्थेकरिता राज्यातील ३७ जिल्हा केंद्रावरील एकूण १,४७५ परीक्षा उपकेंद्रे निश्चित करण्यात आली होती. या पूर्व परीक्षेकरिता साधारणपणे ८०% उपस्थिती असल्याचे दिसून आले असून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यात आली आहे.


            महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ परीक्षेमधून राज्य शासनाच्या विविध विभागातील एकूण ८,१६९ पदे भरली जाणार आहेत. आयोगामार्फत आतापर्यंतची ही सर्वात मोठी भरती असून अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची संख्या देखील आयोगाच्या इतिहासातील सर्वोच्च संख्या आहे.



000000


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिवादन

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिवादन


 


            मुंबई, दि.30: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अभिवादन केले.


 


            यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

लाल तांदूळ....👇 आरोग्यदायी


 *लाल तांदूळ....👇*रात्या तांदुळ (लाल तांदुळ) विकणे आहे..!
100/- रूपये प्रति किलो.
डायबिटीस, कॅन्सर इ. आजारांवर उपयुक्त..!
ईच्छुक ग्राहकांनी संर्पक साधावा :- 8975932044


   तांदूळ जगभरातील बरेच लोक खातात, आपल्या देशाच्या विशालतेत पांढरा पाॅलिश केलेला तांदूळ विशेषत: लोकप्रिय आहे,पण लाल तांदूळ हा दर्शनार्थि

 अप्रिय असला तरी, त्यांचे गुणधर्म अफाट आहे. लाल तांदळात ग्रुप बी चे अनेक जीवनसत्वे असतात. त्यामुळे नखे, केस, आणि त्वचा निरोगी राहते. तसेच हे धान्य मौल्यवान खनिजे सम्रुद्ध आहे. आयोडिन, फाॅस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

.........यात असलेले मॅग्नेशियम मायग्रेन व दमा विरूद्ध लढायला तयार करते. व मज्जासंस्था मजबूत होते. ह्रुदयविकार, हार्टअटक येत नाही, कॅल्शियम सह हा पदार्थ हाडांना मजबूत करतो.आॅस्टिओपोरोसिस व आर्थस्ट्रिसिसच्या विकासाला प्रतिबंध करतो.

             लाल तांदळाच्या कवचात असलेलं पोटॅशियम सांध्यातील मीठ काढून टाकण्यास मदत करते. आणि त्यांच्यातील वेदना, जळजळ कमी होते.. हे धान्य एक शक्तिशाली अॅंटिआॅक्सिडंट आहे. आपण नियमितपणे याचा वापर केल्यास शरीरात कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात, विशेषतः कोलन व स्तनाचा कर्करोग,) पॅरासिनाईडस्, या प्रकारचे तांदूळ एक वैशिष्ट्यपूर्ण लाल रंग देतात. सुरकुत्या कमी होतात.

       लाल तांदुळ अतिशय पौष्टिक आहे, खुप सहज पचते, व शरिरावर भार टाकत नाही.हा तांदूळ मधुमेह रुग्णांना खूपच फायदेशीर आहे. रक्तातील साखर नियंत्रणात राहते. कोलायटिस असलेल्या व्यक्तीला फायदेशीर आहे. कारण हा पचायला हलका आहार आहे..


               


  लाल तांदळात कोलेस्टेरॉल कमी करण्याचि क्षमता आहे,. तसेच फायबर अधिक प्रमाणात असते त्यामुळे स्थूलता कमी होते, वजन नियंत्रणात राहते, व भात खाल्ल्याचे समाधान मिळतं., पोटातली जळजळ कमी होते, अॅसिडिटि समूळ नष्ट होते. यात असलेल्या.. cardiovascular diseasesचा धोका कमी होतो...serotonin आणि लाल रक्त पेशिंच्या वाढिसाठि आवश्यक असलेले व्हिटॅमिन बी६ यात असतं. Dnaच्या निर्मितीसाठी मदत होते..

       हार्मोन्स असंतुलन दूर होतं, उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो, बाळंतिणीला दूध येतं याच्या सेवनाने.

मुत्रपिंडाचा विकार असणाऱ्यांनी लाल तांदळाचा भात नियमित पणे घेतल्यास आराम मिळतो.वर नमूद केल्याप्रमाणे हे धान्य खरोखरच बी व्हिटामिन चे स्टोअरहाउस आहे. तेव्हा हा तांदूळ जरी दिसायला फारसा चांगला नसला तरी गुणधर्म बघता, तुम्ही रोज तुमच्या आहारात समावेश करावा. व निरोगी राहावे...


 सुनिता सहस्रबुदे.

Featured post

Lakshvedhi