Thursday, 27 April 2023

शांत झोप

 शांत झोप 

रात्री झोप न येणे ही आज मोठी समस्या झालेय.शांत झोप न लागल्याने अनेक आजार आणि समस्या उद्भवतात. पण झोप न येण्या मागे जशी बाह्य कारणे आहेत तशीच. अंतर्गत कारण ही आहेत त्यांच्या मुळाशी पाठपुरावा केला तर ही समस्या सोडवता येते.झोप चांगली येण्यासाठी शरीरात झिंक, आणि मँग्नेशियमची गरज असते तशीच इतर छोट्या घटकांची गरज असतेत्यांच संतुलन साधल गेलं की झोप ही येतेच.कारण हे घटक सेरिटोनीक हार्मोनचा स्तर वाढवून गाढ झोप आणतात. अनेक जण हे घटक न विचारात घेता अनेक उपाययोजना सांगत बसतात .

घरगुती उपाययोजना


१)सुर्यफुलाच बीज,खसखस,५० ग्रँम प्रत्येकी आणि आक्रोड शंभर ग्रँम एकत्र करून चुर्ण कराव ते दूधात एक चमचा दूध व किंचीत जायफळ उगाळून मिक्स करुन प्या झोप येते.

२)ब्राम्हीचुर्ण व अश्वगंधा चुर्ण एकत्र करून ही झोप येते.

३)झोपण्यापूर्वी केळ, जायफळ,दूध एकत्र करून घ्या झोप येईल.

४)डोके,तळवे,यांच माँलीश करा.

५)गाईच्या तुपाचे थेंब नाकात टाका शांतपणे झोप येईल.


*माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद 🙏🏻*


_*(

तुळस... एक महौषधि....🌿..👇*

 *🌿तुळस... एक महौषधि....🌿..👇*



.https://chat.whatsapp.com/F59rIS69C1LJUWbtWQF07I



## भारतिय समाजांत,, तुळशिला मानाचे, पूजनिय, धार्मिक स्थान आहे. समुद्रमंथनातून जेव्हा अम्रुत निघाले, तेव्हा त्याचे काहि थेंब जमिनिवर पडले. त्यापासून * तुळस* या वनस्पतिचा जन्म झाला असे म्हणतात.

... प्रत्येकाच्या अंगणात, गँलरित, अगदि..,, डालडा,, च्या डब्यात काअसेना, पण तुळस हि विराजमान असतेच.

🌿.. नित्यनेमाने तीचि पूजा केलि जाते. सांजवेळि तिच्यापुढे दिवा लावल्या जातो....,, नैव्येद्द्यावर तुळस ठेवल्याशिवाय तो परिपूर्ण समजल्या जात नाही.

........ म्हणूनच मग म्हटल्या जाते..,, हलवाईच्या घरावर तुळशिपत्र,,.. पंढरपुरच्या विठोबाच्या गळ्यात तुळशिचि माळ घातल्या जाते पूजेच्या वेळेस.. तुळस ही लक्ष्मिचे रूप मानले जाते...


..

## तेव्हा अश्या या बहुगुणि वनस्पतिचे औषधि गुण म्हणून देखिल, आयुर्वेदात मोलाचे महत्व आहे.🌿 

.... तुळस हि कफनाशक, पाचक,आहे. सर्दि, पडसे, कफ, खोकला, दमा, यावर तुळशिचा काढा अत्यंत गुणकारि आहे., तुळशिचि पाने व आले व गूळ पाण्यात उकळून हा काढा घेतल्या जातो..## तुळशीचि पाने जेवल्यानंतर खाल्यास पचन चांगले होते.

🌿.... तुळशिचा काढा, रस, कायम प्राशन केल्यास..,, मूत्रपिंडाचि क्षमता वाढते. रक्तातिल कोलेस्ट्रोल कमि होते.. कोलायटिस, अंग दुखणे, मेदव्रूद्धि, डोकेदुखि यांवर.. * तुळस* गुणकारि आहे... उचकि लागल्यास तुळस खावि.... स्मरणशक्ति वाढते. तुळशीच्या मंजि- या म्हणजे तुळशिचि फूले, त्यात पाणि, दूध, व साखर घालून पिल्यास युरिन स्वच्छ होते..

  .. 🌿.. तुळशीचे पाच प्रकार आहेत..१) क्रूष्ण तुळस २) दहिद्र तुळस, ३) राम तुळस, ४) बाबि तुळस, ५) तुकाशा मीय तुळस....# अर्धांगवायू, व संधिवातात तुळशिच्या पानांच्या काढ्याचा वाफारा घेतला जातो...

..... निद्रानाशावर काळ्या तुळशिच्या पानांचा काढा घेतात.

...## तुळशिच्या पानात कर्करोग, ह्रदयरोग, किडनिचे विकार आणि त्वचारोग बरे करण्याचि अपूर्व शक्ति आहे.

...।🌿.. उष्णतेच्या विकारांत तुळशिचे बी पाण्यात भिजत घालून त्याचि खिर घेतात. तुळशिचि पाने दह्यात घालून खाल्यास शरिरातिल अतिरिक्त मेद, चरबि, झडते.

...## पांढरे कोड, गजकर्ण, दाद, खरूज, नायटा, घामोळ्या, इसब, या सर्व त्वचाविकारांवर तुळस गुणकारि आहे.... तुळशिच्या झाडासमोर दिर्घश्वसन केल्यास फुफूत्साचे आजार बरे होतात....

..🌿... परदेशात देखिल ,, बेसिल,, म्हणून तुळस वेगवेगळ्या पदार्थांत वापरल्या जाते... तीव्र ताप असेल तर याचा काढा घ्यावा... चंदन, व तुळस एकत्रित करून तो लेप मस्तकावर द्यावा... डोकेदुखि थांबते.... तुळशिच्या पानांचि पावडर करून मोहरिच्या तेलात मिसळवून त्याने दात घासल्यास,, सर्व प्रकारचे दंतरोग बरे होतात..

..## हिरड्या मजबूत होतात... मध व तुळशिचि पाने चावून खावित.... सुगंधामुळे मनप्रसन्न राहते.

..## तुळस सौंदर्यवर्धक आहे. पिंपल , मुरूमे , पुरळ बरे होतात.. तिच्या पानांचा वाटुन लेप लावावा.... डागदेखिल राहत नाही.. त्वचा टवटवित राहते. व चमकदार होते..

...... तुळशित असलेले,, ,, इगेनाँल द्रव्य,, मधूमेहावर

 नियंत्रण ठेवते... तुळशिच्या पानांचा रस १० ते २५ मि. लि. घ्यावा..



🌿 शरिरातिल रोग प्रतिकारशक्ति वाढवण्यासाठी मदत होते.. थकवा दूर करते... लहान बाळांच्या आंघोळिच्या पाण्यात तुळस टाकावि... कारण ती जंतूनाशक आहे. विविध संक्रमणापासून वाचवते... ,, अँटि बँक्टेरिअल,, आहे.. म्हणूनच चंद्र व सूर्य ग्रहणाच्या वेळि, आजहि अनेक घरांत, अन्नात, व पाण्यात तुळस घालून ठेवतात.

... ## तुळस घरांत असल्यास हवा शुद्ध होते.

... मौखिक स्वास्थ..* दातांच्या वेदना, मुख दुर्गंधि, चव नसणे, तोंड येणे, अल्सर, सूज हे सर्व त्रास दूर होतात तुळशिच्या सेवनाने..

.. ##.. तुळशितिल कँम्फेन, किनोल, युग्नोल, कार्वकोल, व मिथाईल, चार्वाकोल या औषधिय घटकांमूळे डोकेदुखी जाते...

.... 🌿 डोळ्यांकरताः। डोळ्यांत संक्रमण झाल्यास, तुळशिच्या पानाने डोळे धुवावेत... डोळ्यांचि सूज, डोळे जळजळणे, यांवर तुळशिच्या तेलाचे २,३ , थेंब डोळ्यात घालावे... जठरांत दुखणे, डांग्या खोकला, काँलरा, हात- पाय, दुखणे यांवर वेदना शामक आहे..

....... ## पचनसंस्थेचे कफ दोष वाढल्याने पोट जड होते. सुस्ति वाढते. तोंडाला चव नसते. अश्या वेळि तुळशिचि पाने, व आले यांचा चवीपूर्ति साखर घालून केलेला चहा घोट घोट घ्यावा..

...🌿 तुळशिचि कार्ये चरकसंहितेत सांगितलि आहेय..

 ##.. हिक्का कास विषश्वास- पाश्र्वशूल।। निनाशनः।।

         पित्ताक्रुतकफवातहघ्नः सुरसः पूतिगंधहा।।🌿..

##.. उचकि लागणे, खोकला, विषदोष, दमा, बरगड्यांमध्ये दुखणे. यांवर ती उत्तम काम करते..

......। तुळशिच्या लाकडापासून जपमाळ करतात. ती गळ्यात घातल्यास , कंठाचे आजार, गालगुंड, थायराँईड हे आजार नियंत्रित राहतात..

.. 🌿 अशि ही.. ,, धार्मिक व औषधियुक्त वनस्पति प्रत्येकाच्या अंगणात पाहिजेच....🌿..


आयुर्वेदअभ्यासक.....सुनितासहस्रबुद्धे....



सफेद पदार्थ -वजन कमी करण्यासाठी 'या' तीन पांढऱ्या पदार्थांपासून दूर रहा.*

 *वजन कमी करण्यासाठी 'या' तीन पांढऱ्या पदार्थांपासून दूर रहा.* 


आपल्यापैकी अनेकांना वजन कमी करण फार कठीण काम वाटतं. कारण वजन कमी करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतील याची अनेकांना कल्पनाही करावीशी वाटत नाही.


अनेकजण तर या भीतीनेच वजन कमी करत नाहीत. वजन कमी करण्यासाठी बहुतेकदा जंक फूड बंद करायला सांगतात. वजन वाढू नये म्हणून, लोक प्रथम कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करतात. तर अनेक लोक लहान चुकांमुळे वजन वाढवतात आणि नंतर ते कमी करू शकत नाहीत.


जर तुम्हाला वजनाची काळजी वाटत असेल, तर पांढऱ्या पदार्थांपासून तुम्ही अंतर ठेवलं पाहिजे. कारण या पांढऱ्या गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. सर्वच पांढऱ्या खाद्यपदार्थांवर प्रक्रिया केली जात नाही. पण, काही पदार्थ आहेत की जे टाळल्याने तुमचं वजन झपाट्याने कमी होईल.


*1. व्हाईट ब्रेड* :


वजन कमी करण्यासाठी, तुम्ही सर्वात आधी व्हाईट ब्रेड सोडणं आवश्यक आहे. कारण हा ब्रेड वजन वाढवण्याचे काम करतो. तुम्ही अनेकदा चहाबरोबर ब्रेड खाता. नाश्त्यात ब्रेडबरोबर जाम खा. यामुळे तुमचे पोट भरू शकते, पण वजनही वेगाने वाढू शकते. संशोधनात असं दिसून आलंय की व्हाईट ब्रेडचे जास्त सेवन केल्याने वजन वाढू शकते.


*2. व्हाईट साखर :* 


प्रक्रिया केलेली व्हाईट साखर टाळल्याने तुमचे वजनही नियंत्रणात राहू शकते. व्हाईट साखर वजन वाढवण्याचे काम करते हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. जेव्हा लोक वजन कमी करण्याचा विचार करतात तेव्हा सर्वात आधी गोड पदार्थ बंद करण्याचा सल्ला देतात. विशेषत: साखरेशी संबंधित पदार्थ. व्हाईट साखरेचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढण्याचा धोका असतो. खराब कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोकाही वाढतो. जर तुम्हाला साखर खायची असेल तर तुम्ही ब्राऊन शुगर खाऊ शकता. पांढऱ्या प्रक्रिया केलेल्या साखरेऐवजी तुम्ही साखर कँडी वापरू शकता.


*3. व्हाईट राईस :


व्हाईट ब्रेड आणि साखरेप्रमाणेच व्हाईट राईसदेखील खाद्यपदार्थांच्या श्रेणीत येतो. बरेच लोक व्हाईट राईस खातात. व्हाईट राईस हा वाईट आहार नसला तरी कॅलरी आणि कर्बोदकांशिवाय त्यात विशेष पोषण नसते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



सत्संगती सदा घडो

 *गाय कचरा खाऊन सुध्दा दूध देते, तर साप दूध पिऊन देखील विषच देतो.ll*

*तसंच काही लोकांचं असतं.ll*

*तुम्ही ज्यांना मदत केलेली असते त्यातील जे कृतज्ञ असतात ते जाण ठेवतात,*

 *व जे कृतघ्न नसतात ते तुमच्या विरोधात कारवाया करतात,*

*हा त्यांच्यावरील संस्काराचा,सोबतीचा व त्यांच्या प्रवृत्तीचाच भाग असतो.।।*

*आपण आपले कर्तव्य करत जावे.।।*


*🌹🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🌹*

हे माँ तेरे सुरत से अलग

 


वार्षिक उद्योग पाहणी अहवालासाठी उद्योगांनी सहकार्य करावे

 वार्षिक उद्योग पाहणी अहवालासाठी उद्योगांनी सहकार्य करावे


- विजय आहेर


            नागपूर, दि. 26 : वार्षिक उद्योग पाहणी अहवालाची माहिती देण्यासाठी सर्व उद्योगांनी सहकार्य करावे. कामाचे योग्य नियोजन करून शासनासाठी व उद्योग क्षेत्रासाठी महत्वाची असलेली माहिती या पाहणीच्या माध्यमातून वेळेत व अचूक उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर यांनी केले.


            सन 2021-22 या वर्षासाठी संचालनालयाकडून नागपूर येथे नुकतेच तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील प्रादेशिक सांख्यिकी कार्यालयांचे जिल्हा कार्यालयांतर्गत उपक्षेत्र काम करणारे कर्मचारी असे एकूण 164 अधिकारी व कर्मचारी या कार्यशाळेत सहभागी झाले. या कार्यशाळेत उपस्थितांना संबोधित करताना संचालक श्री. आहेर बोलत होते.


            संचालक श्री. आहेर पुढे म्हणाले की, वार्षिक उद्योग पाहणी (Annual Survey of Industries) हा उद्योगविषयक (संघटित क्षेत्र) आकडेवारीचा महत्त्वपूर्ण प्रमुख स्त्रोत आहे. वार्षिक उद्योग पाहणीतील आकडेवारीचा वापर राष्ट्रीय उत्पन्न अंदाज (GDP) तयार करण्यासाठी, औद्योगिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी तसेच उद्योगविषयक धोरण निश्चितीसाठी होतो. राष्ट्रीय स्तरावर सांख्यिकी कार्यालयाकडून देशातील सर्व राज्यांमधील प्रमुख उद्योगांच्या वार्षिक उद्योग पाहणीचे काम करण्यात येते. तर राज्यातील माहितीचे समन्वयन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून करण्यात येते.


            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपसंचालक दिपाली धावरे यांनी वार्षिक उद्योग पाहणीबाबत सर्व उपस्थितांना माहिती दिली. महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांनी राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर होण्यासाठी पाहणीचे काम अतिशय महत्वाचे असल्याचे सांगून यासाठी उद्योग विभागाकडून सर्व सहकार्य देण्याची ग्वाही दिली.


            राष्ट्रीय सांख्यिकी उपमहासंचालक सौम्या चक्रवर्ती यांनी बहुतांश देशांमध्ये वार्षिक उद्योग पाहणी घेण्यात येत असल्याचे सांगून आपल्या देशातील वार्षिक उद्योग पाहणीमध्ये सर्वाधिक उद्योगांची पाहणी केली जात असल्याची अभिमानास्पद बाब नमूद केली व माहिती विहित वेळेत संकलित करून उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.


            यशदाचे महासंचालक श्री. चोकलिंगम यांनी देशातील सर्वेक्षणाचा, माहितीचे महत्त्व, त्याचा वापर आणि त्यामुळे होणारे अपेक्षित - अनपेक्षित परिणाम याबाबत उपस्थितांना माहिती दिली. माहिती तंत्राज्ञानात होत असलेल्या, नवनवीन प्रगतीद्वारे उपलब्ध होत असलेले आर्टिफिशीअल इंटीलिजन्स व मशिन लर्निंग यांसारख्या तंत्रज्ञानाचा विचार करून माहिती संकलनाच्या पद्धतीमध्ये देखील सुधारणा होण्याच्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.


            यावेळी सहसंचालक नवेन्दु फिरके, उपसंचालक रणबीर डे, बाप्पा करमरकर उपस्थित होते.


             दुसऱ्या दिवशी अर्थतज्ज्ञ व प्राध्यापक डॉ. प्रदिप आपटे, अपर संचालक डॉ. जितेंद्र चौधरी, पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे उपसंचालक श्रीनिवास शिर्के आणि महेश चोरघडे, अपर संचालक, अर्थ व सांख्यिकी पुष्कर भगुरकर, यशदाचे उपमहासंचालक डॉ.मल्लीनाथ कलरोही यांनी मार्गदर्शन केले.

प्रत्येक मुलाच्या लसीकरणासाठी युनिसेफने राज्याला सहकार्य करावे

 प्रत्येक मुलाच्या लसीकरणासाठी युनिसेफने राज्याला सहकार्य करावे


- राज्यपाल रमेश बैस


            मुंबई, दि. 26 : सन २०१९ - २०२१ या करोना काळात जगभरातील जवळ-जवळ साडे सहा कोटी लहान मुलांचे पूर्णतः किंवा अंशतः लसीकरण होऊ शकले नसल्याचे युनिसेफ अहवालाने नमूद केले आहे. अत्यावश्यक लसीकरणाअभावी अनेक मुलांना गंभीर आजार होण्याचा धोका संभवतो. भारताची लसीकरणातील कामगिरी सर्वोत्तम आहे. तरी देखील राज्यातील शेवटच्या मुलापर्यंत पोहोचून त्याचे लसीकरण करण्यासाठी युनिसेफ महाराष्ट्राने राज्य शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. 


            'युनिसेफ' संघटनेतर्फे तयार करण्यात आलेल्या 'जगातील लहान मुलांची सद्यस्थिती – २०२३: लसीकरण, प्रत्येक मुलाकरिता' या अहवालाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. २५) राजभवन मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. यंदाच्या अहवालाचा मुख्य विषय 'लसीकरण' हा आहे.


            अहवाल प्रकाशन कार्यक्रमाला युनिसेफ महाराष्ट्राच्या मुख्य क्षेत्रीय अधिकारी राजश्री चंद्रशेखर, राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना, आरोग्य अधिकारी, पालघर व नाशिक येथील 'आशा' सेविका, लाभार्थी मुलांच्या माता तसेच युनिसेफच्या संवाद तज्ज्ञ डॉ स्वाती महापात्रा उपस्थित होते. 


            जगात नैसर्गिक आपत्ती वा मनुष्यनिर्मित आपत्ती असो, युद्ध अथवा गृहयुद्ध असो, त्यामध्ये महिला व मुले सर्वाधिक बाधित होतात. गरिबीमुळे देखील अनेक मुले लसीकरणापासून वंचित राहतात. त्यामुळे युनिसेफने लसीकरणाच्या दृष्टीने उपेक्षित घटकातील मुलांकडे विशेष लक्ष द्यावे, असे राज्यपालांनी सांगितले. 


            क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानात’ भारताने स्पृहणीय कामगिरी केली असून लसीकरणासाठी सर्व मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी देखील राज्याकडे सुसज्ज यंत्रणा आहे, असे सांगून लसीकरणाच्या बाबतीत भारताने जगासमोर आदर्श ठेवला आहे, असे राज्यपालांनी सांगितले. 


राज्यात दररोज ४ हजार ८०० बालकांचा जन्म


            राज्यात वर्षाला १७.४७ लाख मुले व दिवसाला ४ हजार ८०० मुले जन्माला येतात. या सर्व नवजात शिशूंचे पूर्णपणे लसीकरण करण्याची व्यवस्था शासनाकडे असल्याचे आरोग्य सचिव नवीन सोना यांनी सांगितले. पुढील पाच वर्षात १०० टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून शासन युनिसेफच्या मदतीने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.


            लसीकरणावर केवळ १ डॉलर इतका खर्च केला, तर त्याचा परतावा २६ डॉलर इतका होतो, असे सांगून युनिसेफ क्षमता निर्माण, प्रभावी शीत साखळी व्यवस्थापन, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी सामाजिक एकत्रीकरण व संबंधित धोरणासह सरकारला सहकार्य करीत असल्याचे युनिसेफच्या राजश्री चंद्रशेखर यांनी सांगितले.


            यावेळी आशा सेविका माया विकास पिंपळे व वैशाली पाटील तसेच लसीकरणाच्या झालेल्या लाभार्थ्यांची माता उर्मिला ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


**


Governor Ramesh Bais releases 'UNICEF State of World's Children Report for 2023


 


            Maharashtra Governor Ramesh Bais released the UNICEF State of the World's Children Report - 2023 - For Every Child, Vaccination at Raj Bhavan Mumbai on Tuesday (25 April). The focus of this year's report is Immunization. 


            Chief Project Officer of UNICEF Maharashtra Rajashree Chandrashekhar, Secretary of Public Health Department Nawin Sona, ASHA workers and invitees were present.


**

Featured post

Lakshvedhi