Sunday, 23 April 2023

आरोग्य संदेश. - बकुळ महत्त्व

 *बकुळ......(Mimasops. Elengi)..*


     दातांच्या रोगांवर बकुळ फार उत्तम औषध आहे. दात हालत असल्यास बकुळीच्या सालिचे चूर्ण लावून दात घासले असता दात घट्ट होतात. बकुळीच्या सालिचे काढ्याने गुळण्या केल्यास म्हणजे वारंवार चुळा भरुन टाकल्यास हिरड्या मजबूत होतात..

.....##धावरे..( सूज) बकुळीची साल गंधासारखी पाण्यात उगाळून त्याचा लेप तिथे दिला असता सूज उतरते. बकुळ थंड आहे. कडकि.... चांगली पिकुन पिवळि झालेली बकुळीची गोड लागणारी फळे नित्यनेमाने १०,१२, खाल्यास थोड्याच दिवसात कडकि, उष्णता कमी होते...


       


      ##बकुळिचे ##सरबत.... युरिन साफ होण्यासाठी, युरिनरी ट्रॅकचे सर्व प्राॅब्लेम दूर करण्यासाठी

..या फळाचे सरबत करून पितात.. क्रुति... चांगलि पिकलेलि बकुळीची फळे २५-३० घेऊन २ कप

  पाण्यात कुस्करून व त्यात ,५० ग्रॅम साखर मिसळून ते गाळून घ्यावे. सरबत प्यायल्यावर तास दोन तासातच युरिन साफ होते.. मूतखड्यात युरिनचि जळजळ होणं थोडि थोडि युरिन होते . अशा वेळी

    हे सरबत फार लागू होते. आणि असे सातत्याने करत राहावे.. मूतखडा विरघळून पडतोच

            बकुळीच्या फुलांचे चूर्ण करून ते तपकिरी सारखं नाकात ओढल्यास डोकेदुखी थांबते..

......

............. आयुर्वेद अभ्यासक....... सुनिता सहस्रबुद्धे...

       

  


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन lakshvedhimm. blogspot.com




स्त्रीला काय हव असतं??

 "स्त्रीला काय हव असतं?? " 💞💞💞💞


  एका विद्वान माणसाला फाशीची सजा सुनावण्यात आली होती.

राजानं त्याला विचारलं, " तुला मी सोडून देईन जर तू माझ्या एका प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंस तर!"


               प्रश्न असा होता, की ....

   स्त्रीला नेमकं काय हवं असतं?


विद्वान म्हणाला, "राजन, मला या प्रश्नाचे उत्तर द्यायला थोडी मुदत हवी आहे."


  राजानं त्याला एक वर्षाची मुदत दिली.


        विद्वान बराच फिरला, 

         अनेक लोकांची त्यांनं भेट घेतली,

                पण कुणाकडूनही त्याला समाधानकारक उत्तर मिळालं नाही.

   


      शेवटी कुणीतरी त्याला सुचवलं. म्हणालं, 

    "दूर जंगलात एक हडळ राहाते 

        ती नक्की सांगू शकेल ...

          या प्रश्नाचं उत्तर."


   विद्वान तिच्यापाशी जाऊन पोहोचला, 

     आणि त्यानं आपला प्रश्न तिला विचारला. 

          हडळ म्हणाली ...

      "मी सांगेन या प्रश्नाचे उत्तर,

    पण त्यासाठी तुला माझ्याशी विवाह करावा लागेल."


 विद्वानांनं विचार केला, बरोबर उत्तर मिळालं नाही 

  तर जीव ... राजाच्या हातून जाणारच आहे, 

    म्हणून मग त्यानं विवाहासाठी तिला रुकार दिला. 


   लग्न झाल्यानंतर हडळ म्हणाली,

    "तुम्ही माझं म्हणणं मान्य केलं आहे,

    म्हणून मी तुम्हाला खुश करण्याकरता 

         निर्णय घेतला आहे की ...

       १२ तास ... मी हडळ आणि 

 १२ तास सुंदर परी होऊन राहीन.


        आता तुम्ही मला सांगा ...

    दिवसा हडळ होऊन राहू की रात्री ?


           विद्वानांनं विचार केला ... 

      जर ही दिवसा हडळ झाली,

           तर दिवस सरणार नाही, आणि

      रात्री झाली तर रात्र सरणार नाही .


शेवटी तो विद्वान मनुष्य बोलला, 

       "जेव्हा तुला वाटेल तेव्हा

              परी हो, 

  जेव्हा तुला वाटेल तेव्हा हडळ हो.


       त्याचं हे उत्तर ऐकताच हडळ 

  प्रसन्न होऊन म्हणाली, "तुम्ही मला माझ्या मर्जीनं राहाण्याची सूट दिलेली आहे, 

             त्यामुळे मी नेहमीसाठीच 

        परी बनून राहण्याचा निर्णय घेतला आहे.


 आणि हेच ~ तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे."


       🙆🏻‍♀️ स्त्रीला नेहमी ....

    आपल्या मर्जीप्रमाणे वागायचं असतं.


  जर स्त्रीला ....

   तिच्या मर्जीनं वागू देण्याचं स्वातंत्र्य दिलंत, तर ती

👉🏽 परी होऊन राहिल, नाहीतर हडळ. 👈🏽


             


     ◆ निर्णय तुमचा आहे ◆ 

       ◆ खुशीही तुमचीच आहे ◆


   सगळ्या विवाहित पुरुषांना समर्पित...🤐😷


        आता प्रामाणिकपणे सांगा बरं,

            कुणाच्या घरी परी आहे ?

                 💃 😉😂😁

उष्माघाताची ‘ही’ लक्षणे वेळीच ओळखा; प्रथमोपचारासाठी काय खबरदारी घ्यावी जाणून घ्या.....*

 *उष्माघाताची ‘ही’ लक्षणे वेळीच ओळखा; प्रथमोपचारासाठी काय खबरदारी घ्यावी जाणून घ्या.....*


मागील काही दिवसांपासून उष्माघात हा शब्द अनेकवेळा तुमच्या ऐकन्यात आला असेल. त्याचं कारण म्हणजे ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारकडून नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. खारघरमध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, हा कार्यक्रम भर दुपारी झाल्यामुळे पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित लोकांपैकी १२ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हापासून उष्माघात या शब्दाची चर्चा सुरु आहे.


*उष्माघात नक्की आहे तरी काय? आणि त्याचा त्रास कशामुळे उद्भवतो...* 

उष्माघाताचा त्रास जाणवायला लागल्याची लक्षण काय आणि त्यापासून स्वत:च रक्षण कसं करायचं याबाबतची माहिती अनेकांना नसते. तीच महत्वपुर्ण माहीती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही उष्माघातापासून स्वत:चा बचाव करु शकता. तर उन्हामुळे वाढलेल्या अनेक समस्यांवर डॉ. प्रदीप आवटे यांनी महत्वपुर्ण माहिती दिली आहे. ज्यामध्ये उष्माघाताच्या समस्येचाही समावेश आहे.


*उष्माघात ( हिट स्ट्रोक) लक्षणे...*

उष्माघाताची समस्या उद्भवताच शरीराचे तापमान १०६ डिग्री सेल्सियसपर्यंत जाते. तसेच त्वचा गरम आणि कोरडी पडते. नाडीचे ठोके वेगाने आणि जोरात पडतात. घाम न येणे आणि अर्धवट शुध्दीत असणे, ही उष्माघाताची लक्षण आहेत.


*प्रथमोपचार...*

जर एखाद्याला उष्माघाताचा त्रास जाणवायला लागला तर त्या रुग्णाला तात्काळ दवाखान्यात भरती करणे आवश्यक आहे. तसेच त्याला थंड जागी / ए सी मध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. तसेच या रुग्णाला थंड पाण्याने आंघोळ किंवा स्पॉन्जिग करणं आवश्यक आहे. मात्र यावेळी त्याच्या तोंडाने पाणी देऊ नये.


*उष्माघाताने मृत्यू का होतो...?*

उष्माघात ही अत्यंत गंभीर बाब आहे. शरीराचे तापमान जेव्हा १०६ डिग्री सेल्सियस एवढ्या तापमानास १५ मिनिटाकरता राहते तेव्हा त्याचे अत्यंत विपरित परिणाम शरीरावर होतात. शरीराचे सामान्य तापमान नियंत्रण यंत्रणा काम करत नाही. प्रथिने उष्णतेमुळे खराब होतात. विविध प्रकारचे लायपोप्रोटिन्स आणि फॉस्पोलिपिडस अस्थिर होतात. शरीरातील पातळ पडद्यामध्ये असणारे मेद पदार्थ वितळतात. यामुळे रक्ताभिसरण संस्था अकार्यक्षम होते आणि विविध अवयवांचे कामकाज ठप्प होऊ लागते. या रुग्णाला वेळेवर तातडीची वैद्यकीय सेवा न मिळाल्यास त्याचा मृत्यू ओढवतो.


उष्माघाताच्या समस्येपासून आपला आणि इतरांचा बचाव करायचा असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे उष्णतेपासून बचाव करणे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत, त्यामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे, काय करु नये या संदर्भातील माहिती असणे आवश्यक आहे.


*उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे, काय करु नये...*


*हे करा...*

पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा.

हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्रीचा वापर करा.

उन्हात जाताना टोपी/ हॅट खाली ओलसर कपडा ठेवा.

कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ४ नंतर करा.

ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.


*हे करु नका...*

शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणं टाळा.

कष्टाची कामे उन्हात करु नका.

पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.

गडद रंगाचे, तंग कपडे वापरु नका.

दुपारच्या वेळी स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक घर हवेशीर ठेवा.

चहा, कॉफी सारखी ड्रिंक्स टाळा.

खूप प्रथिन युक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नका.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*

दमा होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार*

 *दमा होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार*

आरोग्य समस्या -arogy

*दमा म्हणजे काय ?*


दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास

घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छवासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय

असा आवाज योतो.


*अस्थमाची लक्षणे -*


◼️खोकला येतो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटे खोकला अधिक प्रमाणात येणे.

खोकल्याची उबळ अधिकतेने येत असते मात्र छातीत कफ इतका चिकटलेला असतो की खोकून-खोकून व्यक्ती बेजार होते पण कफ सुटत नाही. श्वास घुटमळल्यासारखे होते, बराच वेळ

खोकल्यावर थोडा जरी कफ पडला तरी काही काळापुरते बरे वाटते. पण पुन्हा खोकला येतोच.


◼️दम लागतो, बैचेनी होते, वारंवार छाती चोंदणे, बोलण्यास त्रास होतो ही लक्षणे अस्थमामध्ये असू शकतात.


*दम्याचा झटका येणे किंवा अस्थमाचा* *अटॅक येणे म्हणजे काय..?* 


दम्याच्या रुग्णांना वरचेवर दम्याचा झटका येत असतो त्याला अस्थमा अटॅक (Asthma attack) असेही म्हणतात अनेकदा दमा रुग्णास 

धुळ, धुर, परागकण, केसाळ पाळीव प्राणी, दमट हवामान, प्रखर सुर्यकिरण, कचरा, हवेतील

प्रदूषित कण व मानसिक ताणामुळेही अस्थमाचा अटॅक येऊ शकतो. अस्थमाचा अटॅक काही मिनिटांपासून ते काही तासापर्यंत राहू शकतो 


*दमा होण्याची कारणे -*


शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीमधील विकृती ही दमा रोगास प्रमुख कारण असते. खालील कारणे ही दमा रुग्णांमध्ये दमा अटॅक 

निर्माण होण्यास सहाय्यक ठरतात.


◼️ढगाळ वातावरण, हिवाळा व पावसाळा ह्या सारख्या आर्द्र वातावरणामुळे अस्थमा अटॅक

येतो.


◼️धुळ, धुर, धुके, माती, कचरा, बारीक तंतू, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस, पेंट्स, उग्र

वास असणाऱ्या पदार्थांच्या संपर्कात

आल्यामुळे अस्थमा अटॅक येतो,

सिगरेट किंवा इतर प्रकारचा धूरामुळे,

शारीरीक अतिश्रमामुळे, अतिव्यायामामुळे, हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे.


◼️वायु प्रदुषणामुळे ताप, फ्लू, घसा सुजणे, ब्राँकायटिस, खोकला यासारखे रोग उत्पन्न झाल्याने,


◼️मानसिक ताणतणावामुळे अस्थमा रुग्णांना अस्थमाचा अटॅक येण्याचा धोका अधिक असतो.


*दम्याचा त्रास होऊ नये यासाठी घ्यावची काळजी :* 


◼️अस्थमाचा अटॅक येऊ नये यासाठी

करावयाचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत.

योग्य आहार, विहार आणि योग्य औषधोपचाराद्वारे दम्याच्या अटॅकपासून दूर राहता येते,

◼️दम्याचा पहिला दौरा आल्यानंतर भविष्यात अशी स्थिती उद्भवू नये म्हणून सतर्क रहावे, धुम्रपान करु नये,

◼️मानसिक ताणतनाव रहित रहावे,

धुळ, धूर, हवेच्या प्रदुषणापासून दूर रहावे,

◼️दमा रुग्णांनी घरात पाळीव प्राणी पाळू नयेत,

◼️पावसाळा आणि हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी.

◼️प्रखर उन्हामध्ये जाणे टाळावे,

◼️ थंड पदार्थ खाऊ नये, थंड पाणी घेऊ नये, मोकळ्या हवेत फिरावयास जावे, विटामिन A आणि D युक्त आहार घ्यावा, बदाम, हिरव्या पालेभाज्या आहारात असाव्यात.

◼️डॉक्टरांनी दिलेले उपचार घ्यावेत.



आरोग्य समस्या -भूक मंदावणे / भूक न लागणे*

 *भूक मंदावणे / भूक न लागणे* 


✅️खरा श्रीमंत कोण तर ज्याला व्यवस्थित भूक लागते व ज्याचे पोट नीट साफ होते तो आयुर्वेदानुसार सर्व प्रकारच्या आजारांची सुरूवात ही 'भूक कमी होणे' यामुळे होते. वरकरणी ही गोष्ट छोटी जरी वाटत असली तरी अनेक गंभीर आजारांना जन्म देत असते.


✅ बऱ्याचदा आपली भूक व्यवस्थित आहे की नाही हे कळायला मार्ग नसतो ! वेळ झाली म्हणून जेवायला बसतो. भूक लागलेली नसताना जेवण करतो. त्यातून पुढे अपचन होतं आणि रोजचं हे दुष्टचक्र असच सुरु राहतं.


✅️सामान्यात: माणसाला दोन वेळचं जेवण पुरेसे असते. सकाळ जेव्हा भूक लागेल तेव्हा पोटभर जेवण करणे व सायंकाळी सूर्य मावळायच्या आत जेवण! ही खरी आदर्श जेवणाची पद्धत म्हणता येईल. या व्यतिरिक्त मध्ये मध्ये सारखं काहीतरी खाण्याची लागेलेली 'चुकीची सवय' ही भूक कमी करायला कारणीभूत ठरत असते.


 _

उन्हाळ्यात रोज न चुकता खा चमचाभर गुलकंद; शरीराला थंडावा देणारा पदार्थ, ५ फायदे !*

 *उन्हाळ्यात रोज न चुकता खा चमचाभर गुलकंद; शरीराला थंडावा देणारा पदार्थ, ५ फायदे !* 


उन्हाळा हळूहळू वाढायला लागला की आपल्याला उष्णतेचे त्रास भेडसावू लागतात. यामध्ये तोंड येणे, पुरळ येणे, जळजळ होणे, लघवीच्या समस्या अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील थंडावा कायम ठेवण्यासाठी आपण आहारात बदल करतो.


उन्हाळा सुरू झाला की पाणी जास्त पिणे, पाणीदार फळं खाणे, सरबत, दही, ताक यांचा आहारात समावेश करणे असे उपाय केले जातात. यामध्ये आवर्जून खाल्ला जाणारा एक पदार्थ म्हणजे गुलकंद. आयुर्वेदातही गुलकंदाला बरेच महत्त्व आहे. गुलाबाच्या पाकळ्यांपासून केला जाणारा हा गुलकंद अतिशय चविष्ट असतो. त्यामुळे लहान मुलेही तो आवडीने खातात. गुलकंद नुसता खाल्ला तरी चालतो. पण तो दूधातून घेतलेला अधिक चांगला. याशिवाय गुलकंदाचा शिरा, लाडू, फालुदा असे गुलकंदाचे काही पदार्थही करता येतात. पाहूयात उन्हाळ्यात गुलकंद खाण्याचे फायदे...


*१. उष्णता कमी करण्यास फायदेशीर :* 


अनेकदा उन्हाळ्यात लघवीला जळजळ होणे,ॲसिडीटी, डोकेदुखी, मळमळ अशा समस्या उद्भवतात.तोंड आलं असल्यास, तोंडात चट्टे, फोडं आली असल्यास गुलकंद खाणं उपयुक्त ठरतं. तसेच गुलकंदामध्ये व्हिटॅमिन बीचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे व्हिटॅमिन बी ची कमतरता असणाऱ्यांनी गुलकंद नियमित खावा.


*२. बद्धकोष्ठता :* 


ज्यांना नेहमी बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी आवर्जून गुलकंद खायला हवा. जेवल्यानंतर एक ते दोन चमचे गुलकंदाचं सेवन करावं, यामुळे पचन चांगल होतं आणि बद्धकोष्ठाची समस्याही दूर होते. गुलकंद आपल्या आतड्यांतील उपयुक्त ठरणारा गट बॅक्टेरिया वाढवण्यात मदत करते. ज्यामुळे आपल्याला जेवण पचवणं सोपं होतं. गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार करण्यात आलेल्या गुलकंदामधील मॅग्नेशियम बद्धकोष्ठतेपासून मुक्ती देण्यास मदत करते.


*३. स्मरणशक्तीसाठी फायदेशीर :* 


आपल्या मुलांची स्मरणशक्ती चांगली राहावी असे प्रत्येक पालकाला वाटत असते. त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोगही करत असतो. मुलांना नियमित गुलकंद दिल्यास, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी फायदा होतो. वास्तविक गुलकंदामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुण हे स्मरणशक्तीची क्षमता वाढविण्यास उपयुक्त असतात.


*४. त्वचा सतेज राहण्यास मदत :* 


गुलकंदामध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस त्वचा एक्सफॉलिएट करण्यासाठी उपयुक्त ठरतात. दररोज गुलकंद खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि त्वचा उजळते. तसेच गुलकंद खाल्ल्याने ब्लॅकहेड्स, पिंपल्स यांसारख्या त्वचेच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते.


*५. हृदयासाठी फायदेशीर :* 


उत्तम आरोग्यासाठी हृदय निरोगी असणे अत्यंत गरजेचे आहे. गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार करण्यात आलेल्या गुलकंदामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते. मॅग्नेशियम रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत ठेण्यासाठी नियमित गुलकंद खाण्याचा उपयोग होतो.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



मीरा भाईंदर शहरातील विविध विकास कामांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 मीरा भाईंदर शहरातील विविध विकास कामांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मीरा भाईंदर मधील योजना वेगाने पूर्ण करू

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, दि. 22 : मुंबईच्या जवळ असणाऱ्या मीरा भाईंदर शहराचे स्थान हे वेगळे आहे. या शहराच्या विकासाला, प्रगतीला चालना देण्यासाठी व त्याला नियोजनबद्ध स्वरूप देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. राज्य सरकार मीरा भाईंदर शहराच्या मागे भक्कमपणे उभे राहील. या शहरातील योजना अत्यंत वेगाने पूर्ण करू. तसेच प्रलंबित प्रश्नांवर सर्व विभागाची बैठक घेऊन ते सोडविण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.


            आमदार गीता जैन यांच्या प्रयत्नाने भाईंदर पश्चिम येथील नागरी सुविधा क्षेत्र भूखंडावर मुलभूत सोई सुविधाचा विकास या योजनेतील निधीतून व विकास हक्क प्रमाणपत्राच्या मोबदल्यातील महावीर भवन इमारतीचे भूमीपूजन, मिरारोड पूर्व आरक्षण क्र.210/211 या जागेवरील हॉस्पीटल इमारतीचे भूमीपूजन, भाईंदर पश्चिम उड्डाणपूल खालील पशु-पक्षी उपचार केंद्राचे लोकार्पण, भाईंदर पश्चिम उड्डाणपूल खालील सी.सी.टी.व्ही. नियंत्रण कक्ष लोकार्पण, भारतरत्न उस्ताद बिस्मिला खाँ उर्दू शाळा, मिरागाव इमारत लोकार्पण, काशिमीरा उड्डाणपूला खालील संत रविदास महाराज उद्यानाचे लोकार्पण आदी विकास कामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता, राजन सिंग,माजी महापौर डिंपल मेहता, जोत्स्ना हंसनाळे, हसमुख गेहलोत, रवी व्यास, राजू भोईर, महापालिका आयुक्त दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, अनिकेत मनोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


            मीरा भाईंदर शहरवासियाना अक्षय तृतीया, ईद, महात्मा बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईचा विस्तार होताना ठाण्यासारखे महानगर शेजारी उभे राहिले. त्यातील मीरा भाईंदर सारख्या जुळ्या शहरावर सुद्धा लोकसंख्येचा ताण वाढला. मुंबईतील नागरिक चांगल्या निवासासाठी मीरा भाईंदर, वसई विरार मध्ये येऊ लागले. त्यामुळे वेगाने वाढणाऱ्या या शहरात त्या काळात आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत . मात्र 2014 नंतर आम्ही या शहराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षांपासून हे शहर झपाट्याने बदलत आहे. या शहराला आधुनिक स्वरूप देण्याचे काम प्रशासन व लोकप्रतिनिधी करत आहेत.


            आज अनेक प्रकल्प या शहरात सुरू आहेत. मीरा भाईंदर शहरात उभे राहणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी, रेडिएशन या सारखे उपचार व्हावेत. अतिशय परिपूर्ण हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक तो निधी राज्य शासन देईल. शहरात सीसीटीव्ही उभारणी व इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरसाठी सुद्धा निधी देऊ. सर्व्हेलन्स सेंटर मुळे रस्त्यावर घडणारे गुन्हे कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच वाहतुकीचे प्रश्न सुटण्यासही मदत होते. वाहतुकीला शिस्त लागते.


            मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाची इमारत यावर्षी होईल. त्या बरोबरच पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थान व इतर सुविधाही निर्माण करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 


 


या शहराच्या पुढील 25 ते 30 वर्षात वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून त्याला आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी प्रकल्प, योजना सुरू केल्या. सध्या या शहरासाठी पाण्याची अडचण आहे. मात्र सुर्या प्रकल्पामुळे पुढील 25 वर्षात वाढणाऱ्या लोकसंख्येला पुरेल एवढा पाणी पुरवठा होणार आहे. त्यावेळी 24 तास पाणी शहराला मिळू शकेल. या शहरातील मेट्रो च्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ही मेट्रो आता उत्तन पर्यंत पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला मेट्रोचा लाभ होईल. एमएमआर रिजनमध्ये वाहतूक सुविधा वाढविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देण्यात आला आहे. वाहतुकीची एकात्मिक व्यवस्था उभे करण्यात येत आहे. मीरा भाईंदर शहराला आणखी 50 इलेक्ट्रिक बस देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


            आमदार गीता जैन म्हणाल्या की, राज्य शासनाने अगदी थोडक्या काळात या शहराला भरपूर निधी दिला आहे. या शासनाने सुमारे 2500 कोटींचा निधी या शहरासाठी दिला आहे. हा निधी देण्यात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हातभार आहे. कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. कॅन्सर वर येथे आधुनिक उपचार व्हावेत यासाठी राज्य शासनाने सहकार्य करावे.


            सूर्या प्रकल्प पूर्ण होईपर्यंत शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी लक्ष घालावे. तसेच टोल मुक्त व कचरा मुक्त शहर करण्यासाठी उपमुख्यमंत्री महोदयांनी मदत करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            माजी आमदार श्री. मेहता यांनीही मनोगत व्यक्त केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित कामे या शासनाच्या काळात वेगाने पूर्ण होत आहेत. बाकीची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी व त्या कामांना चालना देण्यासाठी उपमुख्यमंत्री महोदयांनी बैठक घ्यावी, अशी मागणी श्री. मेहता यांनी यावेळी केली.


            प्रास्ताविकात आयुक्त श्री. ढोले यांनी महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकास कामाची माहिती दिली. मीरा भाईंदर शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सुर्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून काम वेगाने सुरू आहे. तसेच इलेक्ट्रिक बस व मेट्रो साठीही मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. शहरातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी 884 कोटी रुपये निधी मिळाला असून लवकरच येथील सर्व रस्ते खड्डेमुक्त होतील. शहरात लवकरच 11 आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू होणार असल्याचेही श्री. ढोले यांनी यावेळी सांगितले. 


            आमदार गीता जैन व आयुक्त श्री ढोले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. अतिरिक्त आयुक्त श्री. पानपट्टे यांनी आभार मानले.


0000

Featured post

Lakshvedhi