Sunday, 23 April 2023

सक्षम-2023 चे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 24 एप्रिल रोजी होणार उद्घाटन.

 सक्षम-2023 चे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 24 एप्रिल रोजी होणार उद्घाटन.

            मुंबई, दि.22 : नैसर्गिक इंधनाची बचत आणि काटकसरीने वापर करावा यासाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA),पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम-2023) आयोजित केला जातो. या कार्यक्रमाचे उद्घाटन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवार दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणार आहे.


            या कार्यक्रमात इंधन बचतीवर जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. दिनांक 24 एप्रिल ते 8 मे 2023 या कालावधीत ऊर्जा संरक्षण नेट झीरोकडे च्या दिशेने या टॅग लाईन सह संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम-2023 ) चे आयोजन केले आहे. सक्षम-2023 अंतर्गत महाराष्ट्र राज्यात पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA) यांच्यामार्फत विविध 1000 पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. इंधन आणि तेल संवर्धनासाठी शिक्षक आणि शालेय विद्यार्थी यांचा उत्कृष्ट योगदानाबद्दल सत्कार देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन तेल उद्योगाचे समन्वयक संतोष निवेंदकर यांनी केले आहे.

मुलांमध्ये विज्ञान शिक्षणाची गोडी वाढविण्यासाठी विज्ञान कथा, कादंबरी उपयुक्त"


"मुलांमध्ये विज्ञान शिक्षणाची गोडी वाढविण्यासाठी विज्ञान कथा, कादंबरी उपयुक्त"


- राज्यपाल रमेश बैस


            मुंबई, दि.22: विज्ञानकथा व विज्ञान कादंबरी वर्तमानातील चिंता - व्यथा विसरायला लावून त्या वाचकाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात. मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढविण्यासाठी विज्ञान कथा व विज्ञान कादंबरी उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.      


            स्तंभलेखिका, ब्लॉगर व आयकर विभागाच्या महासंचालक डॉ. साधना शंकर यांनी लिहिलेल्या 'असेन्डन्स' या विज्ञान कादंबरीच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.


            अन्न सुरक्षा, आरोग्य, लोकसंख्या नियंत्रण, पाण्याचे दुर्भिक्ष यांसारख्या मूलभूत समस्यांवर केवळ विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाययोजना करता येते. त्यामुळे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात बुद्धिमान व मेधावी विद्यार्थी आले पाहिजे, असे सांगताना विज्ञान शिकविण्यासाठी व त्यात मुलांना गोडी लागण्यासाठी ध्येयवादी व बांधिलकी असणाऱ्या शिक्षकांची गरज आहे, असे राज्यपालांनी सांगितले.


            विज्ञान कथा - कादंबरी लेखक हे काल्पनिक सृष्टी निर्माण करणारे 'विश्वकर्मा'च असतात, असे नमूद करून राज्यपालांनी लेखिका डॉ साधना शंकर यांच्या कल्पनाशक्तीचे कौतुक केले. 'असेन्डन्स' ही कादंबरी हिंदी भाषेत अनुवादित झाली असून तिची मराठी व तेलगू आवृत्ती लवकरच प्रकाशित होत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.  


            पुरुष व स्त्री यांना अनेक शतके प्रजा निर्मितीसाठी परस्परांची गरज नसल्यास त्यांच्यातील नातेसंबंध कसे असतील या मुख्य संकल्पनेवर ही वैज्ञानिक कादंबरी आधारलेली असल्याचे लेखिका डॉ साधना शंकर यांनी सांगितले. आगामी काळात या कादंबरीवर आधारित टीव्ही मालिका काढण्याबद्दल विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.    


            कार्यक्रमाला परराष्ट्र सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी व मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. शेषाद्री चारी, गोवानी ट्रस्टच्या विश्वस्त निदर्शना गोवानी, ज्येष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


0000

Maharashtra Governor releases Sci-Fi 'Ascendance'


Maharashtra Governor Ramesh Bais released the new edition of science fiction 'Ascendance' by columnist, blogger and Income Tax Director General Dr Sadhna Shanker at Raj Bhavan Mumbai on Sat (22 April).


Former foreign service officer and Member of Human Rights Commission Dr Dnyaneshwar Mulay, film producer Smita Thackeray, columnist Dr Seshadri Chary, Trustee of Ankibai Ghamandiram Gowani Trust Nidarshana Gowani, senior police officer Vishwas Nangre Patil and invitees from various walks of life were present.


0000

मुंबई पुणे सह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्या


मुंबई पुणे सह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्या


आरोग्य मंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांच्या सूचना


पुनर्रचित कोविड टास्क फोर्सची बैठक

            पुणे, दि. 22: मुंबई, पुणे आणि ठाणेसह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत.


            कोविड 19 च्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी उपाय योजना बाबत आयोजित केलेल्या विशेष कार्य दलाच्या बैठकीत ते बोलत होते.


            डॉ. सावंत यांनी पुनर्रचित टास्क फोर्सच्या सदस्यांची व्हीसीव्दारे बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. पुणे येथील आरोग्य सेवा संचालनालय कार्यालयातून डॉ. सावंत यांनी सदस्यांशी संवाद साधला. यावेळी संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त संचालक तथा टास्क फोर्सचे सदस्य सचिव डॉ. रघुनाथ भोये उपस्थित होते.


            टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, सदस्य लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. हर्षद ठाकूर, आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक दूरदृष्य प्रणालीव्दारे सहभागी झाले होते.


डॉ. सावंत यांनी कोविड 19 चाचण्यांची संख्या वाढवावी, आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या मॉक ड्रीलमध्ये आढळलेल्या त्रुटींचे तत्काळ निराकरण करावे. मास्कच्या वापर करण्याबाबत जनतेला आवाहन करण्यात यावे. जत्रा, मॉल, थिएटर, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरण्याबाबत आवाहन करण्यात यावे, अशा सूचना दिल्या.


            यावेळी डॉ. गंगाखेडकर यांनी कोविड बाधितांना मेटाफॉर्मिन गोळीचा फायदा दिसून येतो. पण या गोळीचा प्रोटोकॉल मध्ये समावेश नाही, असे सांगितले. यावर या गोळीचा रुग्ण बरे होण्यासाठी मदत होत असल्यास त्याबाबतचे संशोधन फोर्सच्या सदस्यांना उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून त्याबाबत पुढील कार्यवाही करता येईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.


            कोविडच्या सध्याच्या व्हेरियंटची लागण झाल्यावर रुग्णांना ऑक्सिजन ची विशेष गरज भासत नाही. पण संसर्ग पाहता कोविड ची लागण झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना मास्क वापरणे बंधनकारक करावे, असे डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.


कोविडच्या चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत का याची खात्री करावी, नियमित पर्यवेक्षण करावे, प्रयोगशाळांची क्षमता वाढवावी, अशा सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या.


            कोविडच्या सध्याच्या व्हेरियंटची लागण जास्त जोखमीची नाही. लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत. हा संसर्ग 15 मे पासून कमी होऊ लागेल, असे सर्व सदस्यांनी बैठकीत सांगितले.


0000


 

 *श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग पुणे येथे अक्षय तृतीया निमित्त करण्यात आलेला मोगरा उत्सव 🙏🏻


सामजिक, सांस्कृतीक कार्यक्रम महाड येथे जय भवानी मंडळ चभार खिंड, महाड

 











Saturday, 22 April 2023

अक्षय तृतीया* (आखा तीज)_ का महत्व और आज के दिन की कुछ महत्वपूर्ण जानकारियाँ :

 _*अक्षय तृतीया* (आखा तीज)_ का 

महत्व और आज के दिन की कुछ महत्वपूर्ण जानकारियाँ :


🔅 ब्रह्माजी के पुत्र *अक्षय कुमार* का अवतरण।

🔅 *माँ अन्नपूर्णा* का जन्म।

🔅 *चिरंजीवी महर्षी परशुराम* का जन्म हुआ था इसीलिए आज *परशुराम जन्मोत्सव* भी है।

🔅 *कुबेर* को खजाना मिला था।

🔅 *माँ गंगा* का धरती अवतरण हुआ था।

🔅 सूर्य भगवान ने पांडवों को *अक्षय पात्र* दिया।

🕉 महाभारत का *युद्ध समाप्त* हुआ था।

🕉 वेदव्यास जी ने *महाकाव्य महाभारत की रचना* गणेश जी के माध्यम से *प्रारम्भ की थी।*

🕉 प्रथम तीर्थंकर *आदिनाथ ऋषभदेवजी भगवान* के 13 महीने का कठिन उपवास का *पारणा इक्षु (गन्ने) के रस से किया* था।

🕉 प्रसिद्ध धाम *श्री बद्री नारायण धाम* के कपाट खोले जाते है।

🕉 बृंदावन के बाँके बिहारी मंदिर में *श्री कृष्ण चरण के दर्शन* होते है।

🕉 *जगन्नाथ भगवान* के सभी *रथों को बनाना प्रारम्भ* किया जाता है।

🕉 आदि शंकराचार्य ने *कनकधारा स्तोत्र* की रचना की थी।


🕉 *अक्षय* का मतलब है जिसका कभी क्षय (नाश) न हो!!


🕉 *अक्षय तृतीया अपने आप में स्वयं सिद्ध मुहूर्त है कोई भी शुभ कार्य किया जा सकता है...!*


🙏आप की जय हो ।।

खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध

 खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध


-कृषि आयुक्त सुनील चव्हाण


 


            पुणे, दि. २१: येत्या खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी माती तपासणी अहवालाप्रमाणे खतांचा समतोल वापर करावा,असे आवाहन कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.


            सध्या राज्यात ५ लाख ३३ हजार मे.टन युरीया, २ लाख १५ हजार मे.टन डिएपी, २९ हजार मे.टन पोटॅश, ८ लाख ३९ हजार मे.टन संयुक्त खते आणि ५ लाख १५ हजार मे.टन सुपर फॉस्फेट असे एकुण २१ लाख ३१ हजार मे.टन खतांचा साठा उपलब्ध आहे.


            यावर्षी १ एप्रिल २०२३ रोजी हा खत साठा राज्याच्या खरीप हंगामातील गरजेच्या जवळपास ५० टक्के आहे. त्याच बरोबर खरीप हंगामात राज्याला ४३ लाख १३ हजार मे.टन आणखी खत उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी मृगाचा पाऊस पडल्यानंतरच वाढते. त्यामुळे खतांचे नियोजन एप्रिल पासून सुरु करण्यात आले असून राज्यात मुबलक प्रमाणात खत उपलब्ध राहील यासाठी कृषी विभाग दक्ष आहे.असेही कृषि आयुक्तांनी सांगितले आहे.


            शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला माती तपासणी अहवालाप्रमाणे खताची मात्रा देणे आवश्यक आहे. प्रमाणापेक्षा अधिक खत दिले तर आपला खर्च तर वाढतोच परंतु सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पिकांना भासून उत्पादन घटते तर आवश्यक ते खत न मिळाल्यासही उत्पादन आणि गुणवत्ता घसरते. रासायनिक खतांसोबत कुजलेले शेणखत, कंपोस्ट, जैविक खत (बायोफर्टिलायझर्स), नॅनो युरिया यांचाही आवश्यकतेप्रमाणे वापर करणे आवश्यक आहे.


शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषिक अँप


            कृषी विभागाने कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या मदतीने ‘कृषिक ॲप’ तयार केले आहे. या ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यासाठी माती तपासणी अहवालाच्या अनुसार प्रत्येक पिकासाठी वेगवेगळया खतांची मात्रा आणि त्यासाठी लागणारी किंमत समजण्यास मदत होते. या ॲप मधून आपल्या तालुक्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रात कोण-कोणती खते उपलब्ध आहेत याचीही माहिती मिळते. त्यामुळे खत खरेदी करणे सोपे होते. या कृषिक ॲपचा वापर शेतक-यांनी करणे आवश्यक आहे.


केंद्र सरकारने पीएम प्रणाम ही योजना सुरु केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी खतांचा वापर मृद तपासणी प्रमाणे केल्यामुळे एकूण खतांच्या अनुदानाच्या रकमेमध्ये बचत होणार आहे. हे वाचलेले अनुदान केंद्र सरकारकडून राज्याच्या कृषी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे, असेही कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी कळविले आहे.


00

Featured post

Lakshvedhi