Saturday, 8 April 2023

चष्मा सोडवा.

 *चष्मा सोडवा.*


आयुर्वेदाच्या मतानुसार शरीरात कफ बळावला कि दृष्टी दोष बळावतात डोळे हे कफाचे मुख्य केंद्र आहेत. खालील उपाययोजना केल्या असता.डोळ्याचे आजार चष्म्याचे नंबर कमी होऊन चष्मा जातो.

१)रोज नियमितपणे एक चमचा त्रिफळा चुर्ण व चमचाभर तूप गरमपाण्यात घ्या.

२)वस्त्रगाळ केलेल्या त्रिफळा चुर्ण भिजवलेल्या पाण्यात नियमितपणे डोळेधुवा.

३)नियमितपणे त्रिफळा चुर्णा ने जीभ,पडजीभ व टाळू स्वच्छ केली असता ही दृष्टी सुधारते.

४)सकाळी उठल्या उठल्या तोंडातील लाळ डोळ्यात काजळा सारखी लावा सात आठ दिवसात डोळे सुधारत असल्याची जाणीव होते.पाच सहामहीन्यात चष्मा जातो.

५)तळहात व पायाचे नियमितपणे माँलीश केले असता ही दृष्टी सुधारते नंबर कमी होतो.

६)नियमितपणे गाजर रस घेतल्यास चष्मा सुटण्यासाठी मदत होते नजर सुधारते.

७)दोन्ही हात हातावर जोरात जोरात घासून रोज पाच मिनिटे डोळ्यावर चेहऱ्यावर फिरवा चष्मा नंबर कमी होईल माँलीश डोळे नांक यांचे हलकेपणे केल्यास लवकर फरक पडतो.

८)पायाला ,हाताला डोळ्यांच्या वर मोहरीच्या तेलाने माँलीश केल्यास कफ सरुन दृष्टी स्वच्छ होऊन नंबर हटतो.

९)त्रिफला जल बनवून जलनेति तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास दृष्टी दोष जाऊन चष्मा सुटतो.

१०)रोज सकाळी तोंडात पाणी भरून तोंडाचा चंबू करा व डोळ्यावर हलकेच थंडपाणी मारा चष्मा सुटण्यासाठी मदत होईल.

११)सूर्यकिरण चिकित्सा नुसार हिरव्या बाटलीत ठेवलेले पाणी दिवसभर सुर्यप्रकाश लागेल असे ठेवावे रात्री ते पाणी एका बशीत घालून त्या पाण्यांत डोळे उघडझाप करावे चष्मा जातो.सोबत डोळ्याचे व्यायाम करावे.

१२)चार बदाम खडीसाखर, काळीमिरी, व चमचाभर मध यांचे नियमितपणे चाटण केले असता दृष्टी अमुलाग्र सुधारते नंबर हटतो.

१३)आँपरेशन अथवा दृष्टीदोष नसलेल्या मंडळींनी पांढऱ्या कांद्याचा रस दहा ग्रँम,मध तेवढेच,भीमसेन कापूर दोन तीन ग्रँम एकत्र करून हा ड्राँप डोळ्यात टाकल्यास दृष्टी सुधारते,प्रारंभीक आवस्थेतील मोतीबिंदू विरघळून जातो नियमितपणे प्रयोग केल्यास सर्व दृष्टीदोष जातात.

१४)गाईचे गोमूत्र तीन चार थेंब डोळ्यात टाकल्यास ही दृष्टी सुधारून चष्मा हटण्यास मदत होते.

 १५)डोळ्यात दोन थेंब गाईचे तूप घेऊन ते लावणे दिवसात दोन वेळा.

१६)घरच्या घरी तुंपांजन करून लावणे.

गाईच्या तुपावरील दिव्यावर चांदीची अथवा तांब्याची पळी घेऊन तिच्या बुडाला गाईचे तुप लावायचे व निरांजनावर धरायचे खाली जो कार्बन तयार होईल ते शुध्द तुपांजन असेल ते आपल्या तसेच तीन वर्षा पुढील मुलांना व स्वतः लावू शकतो.

१७)डोळ्यात नियमितपणे त्रिफलांजन कूल ड्राँप घालून चष्मा सोडवू शकतो.

१८)आँपरेशन वगैरे न झालेले असल्यास पातांजलीचा दृष्टी हा आयड्राँप टाकू शकतो 

१९)शतावरी कल्प एक चमचा दुधात.डोळ्यात शक्ती येते.चष्म्याचे नंबर कमी होतात.

२०)हिरडा चुर्ण एक चमचा पाव चमचा मध व अर्धा चमचा तूप डोळे निरोगी राहतात नंबर कमी होतो.

२१)बाळंतशेपा चुर्ण चमचा भर व अर्धा चमचा पिठीसाखर दोन वेळा डोळ्यांचे तेज वाढते नंबर कमी होतो.

२२)चिफळा चुर्ण एक चमचा व ते भिजेल एवढं मध व अर्धा चमचा तूप नेहमीच रोज रात्री घेतल्यास चष्म्याचा नंबर वाढत नाही, चष्मा सुटतो,दृष्टी कधीच जात नाही अगर कमी होत नाही.

२३) आहारात गाजर रस, काकडी, लिंबू व्हिटॅमिन अ वाले पदार्थ, लसूण, शेवग्याची भाजी,कोबी रस,बेलाच्या पानांचा चमचा भर रोज रस,गव्हाच्या रोपांचा रस,यांचा समावेश करावा.वरील उपाय व वरचेवर कफ सर्दी न होऊ दिल्यास नंबर न वाढता एक दिवस चष्मा जाईल.

 

वैद्य.गजानन


पोस्ट आवडल्यास जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करा.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


https://chat.whatsapp.com/DKjPsM3QNzeIGlts4Dttzv


_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/DKjPsM3QNzeIGlts4Dttzv

हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे*

 *हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


जास्तीत जास्त लोक सकाळी उठताच गरम पाणी आणि लिंबू सेवन करतात. यामुळे त्यांचे पोट साफ राहते आणि पोटातील मळ बाहेर पडतो. लिंबू टाकून गरम पाणी पिण्याचे फायदे तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत. परंतु जर याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर याचे गुण अजूनच वाढतील. चला तर मग आज आपण जाणुन घेऊया हे पाणी सकाळी सेवन केल्याने कोणते फायदे होतात आणि पाणी कसे तयार करावे.

साहित्य

अर्धा लिंबू, अर्धा टि स्पून हळद, गरम पाणी, थोडेसे मध (वैकल्पिक)

 

कृती


एक ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्यामध्ये हळद आणि गरम पाणी मिसळा.यानंतर त्यामध्ये चवीनुसार मध मिसळा. हे मिश्रण तुम्ही हलवत राहा. यामुळे हळद खाली बसणार नाही.


घ्या हळदीचे पाणी पिण्याचे 8 आरोग्य फायदे... हे फायदे वाचल्यावर तुम्ही नियमित हळदीचे पाणी पिणे सुरु कराल...


*शरीराची सूज कमी करते* - शरीरावर कितीही सूज आलेली असेल तर हळदीचे पाणी घेतल्यावर सूज कमी होऊन जाईल. यामध्ये करक्यूमिन नामक एक रसायन असते. जे औषधाच्या रुपात काम करते.


*मेंदूला सुरक्षित ठेवते* - नियमित हळदीचे पाणी पिऊन विसरण्याचा आजार जसे की, डिमेंशिया आणि अल्जाइमरला दूर केले जाऊ शकते. हळद मेंदूसाठी खुप चांगली असते.


*अँटी कँसर गुण*- करक्यूमिन असल्यामुळे हळद एक खुप चांगले अँटीऑक्सींडेंट असते. हे कँसर निर्माण करणा-या कोशिकांसोबत लढते.

पोटाच्या समस्या- एका संशोधनाप्रमाणे नियमित हळदी खाल्ल्याने पित्त जास्त बनते. यामुळे जेवण सहज पचन होते.


*हृदय सुरक्षित ठेवते*- हळदीचे पाणी पिल्याने रक्त जमा होत नाही. यासोबतच धमन्यांमध्ये रक्त साचत नाही.


*अर्थराइट्सचे लक्षण दूर*- यामध्ये करक्यूमिन असल्यामुळे हे जॉइंट पेन आणि सूज दूर करण्यासाठी फायदेशीर असते. हे या रोगावर एका औषधी प्रमाणे काम करते

*वय कमी करते*- नियमित हळदीचे पाणी पिल्याने फ्री रॅडिकल्ससोबत लढण्यात मदत मिळते. ज्यामुळे शरीरावर होणारा वयाचा परिणाम धिम्या गतिने होतो.


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



महाराष्ट्राच्ष्ट् औद्योगिक - व्यापार विकासातील महाराष्ट्र चेंबरचे योगदान गौरवास्पद :

 महाराष्ट्राच्या औद्योगिक - व्यापार विकासातील महाराष्ट्र चेंबरचे योगदान गौरवास्पद : उपराष्ट्रपती जगदीश धनकड

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिल्ली येथे घेतली उपराष्ट्रपतींची भेट


नवी दिल्ली : उपराष्ट्रपती महामहीम जगदीशजी धनकड यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अँण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी नवी दिल्ली येथे संसदेतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.

महाराष्ट्राच्या औद्योगिक व्यापार विकासातील महाराष्ट्र चेंबरचे योगदान गौरवास्पद असल्याचे गौरवोद्गार उपराष्ट्रपदी जगदीश धनकड यांनी काढले. त्यासह महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालय- नाशिकच्या सुवर्णमहोत्सव सांगता समारंभासाठी त्यांना दिलेले आमंत्रण त्यांनी स्वीकारले. या वेळी हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, महाराष्ट्र चेंबरचे युवा उद्योजक समितीचे चेअरमन संदीप भंडारी उपस्थित होते.

चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी महाराष्ट्र चेंबरतर्फे राबविल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, चेंबरचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांचे भारतीय उद्योग जगतातील अफाट योगदान आहे. देशाच्या जडणघडणीत उद्योजकांचा मोठा वाटा आहे. उद्योजक, व्यापारी आणि सरकारमधील महत्वाचा दुवा म्हणून महाराष्ट्र चेंबर कार्यरत आहे. महाराष्ट्राच्या उद्योग, व्यापाराच्या जडणघडणीत चेंबरचा मोठा वाटा आहे. उद्योजक, व्यापारी यांचे हक्कांचे व्यासपीठ चेंबर असून त्या माध्यमातून राज्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.

अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात उत्तर महाराष्ट्र शाखेच्या नवीन कार्यालयाची उभारणी केली जाणार आहे. उत्तर महाराष्ट्र शाखा माइलस्टोन आहे. उत्तर महाराष्ट्रातील व्यापार उद्योगाच्या विकासासाठी उत्तर महाराष्ट्र शाखेने महत्त्वाचे कार्य केलेले असून व्यापार उद्योगाच्या विकासासाठी व्यापारी उद्योजकांच्या विविध संघटना स्थापन केल्या आहेत. दरम्यान अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र चेंबरच्या सुवर्णमहोत्सव सांगता समारंभास उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण दिले. त्यांनी महाराष्ट्र चेंबरचे आमंत्रण स्विकारुन उपस्थित राहण्याची ग्वाही अध्यक्ष गांधी यांना दिली.

००

सैनिक हो तुमच्यासाठी,


 

जीवन गाणे

 







Friday, 7 April 2023

साहेब , ह्या वयात कोणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये म्हणून*.......

 *साहेब , ह्या वयात कोणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये म्हणून*.......

---------------------------------------------------

*सायंकाळचे ५.३० वाजले होते. नेहमीप्रमाणे ऑफिसचे काम आटोपून घरी जायला निघालो. येताना एकदम लक्षात आले की "ड्रायक्लिंनींगला टाकलेले कपडे घ्यायचेत" . मग सागरला गाडी प्रोफेसर चौकाकडे घ्यायला लावली. चौकात आलो तर तिथे जैन बांधवांची महावीर जयंतीच्या मिरवणूकीची तयारी सुरू होती. त्यामुळे तेथील वाहतूक ठप्प झाली होती. "गजराज" च्या दुकानात जाणे देखील अवघड झाले होते. सागरने गाडी तशीच पुढे घेतली आणि श्री क्षीरसागर महाराज दत्त मंदिरापाशी गाडी लावून तो चालत चालत गजराज मधून कपडे आणायला गेला. गर्दी जास्त असल्यामुळे त्याला वेळ लागत होता. मी गाडीत बसून कधी थोडा मोबाईल पाहत होतो तर कधी आजूबाजूचे निरिक्षण करत होतो. तेवढ्यात समोरच मला "सायकलीवर भाजलेले शेंगदाणे विकणारे" एक बाबा दिसले. मला शेंगदाणे खायची इच्छा झाली. मी गाडीतून खाली उतरलो आणि बाबाच्या जवळ गेलो*. 


*आणि म्हटलं, "बाबा एक शेंगदाण्याची पुडी द्या, किती पैसे ?*


 *ते म्हणाले, "वीस रुपये".*

 *मी वीस रुपये दिले आणि शेंगदाणे चावायला सुरुवात केली. सागर येईपर्यंत त्यांच्याशी तिथेच गप्पा मारत उभा राहिलो.*


 *मी म्हटलं," बाबा तुमचं वय काय ?".बाबा म्हणाले,"८० वर्षे ".*


*बाबांचा रापलेला चेहरा त्यांनी आयुष्यभर केलेल्या कष्टाच्या खुणा दर्शवीत होता*.


*मी त्यांच्या जवळ गेलो तेव्हा ते खिशातील दहावीस रुपयांच्या नोटा व्यवस्थित लावत होते. त्यातलीच एक नोट खाली पडली होती. मी ती नोट उचलून त्यांना दिली.*


*बाबा म्हणाले,"गिरहाईक आलं की नोटांचा गोंधळ होतो. म्हणून वेळ मिळाला की मी नोटा अशा लावुन ठेवतो, साहेब.*


 *मग माझा पुढचा प्रश्न*


.*"किती पैसे मिळतात रोज?"* 


*ते म्हणाले, "पैसे किती मिळतात हे महत्त्वाचं नाही साहेब .पण माझा चार पाच तासाचा वेळ चांगला जातो आणि पाच-पन्नास रुपयांची रोजची कमाई देखील होते. त्यामुळे घरी जाताना माझ्या किरकोळ खर्चाची सोय माझ्या हाताने मी करतो. कधी नातवंडांसाठी खाऊ तर कधी म्हातारीसाठी काही बाही घेऊन जातो. त्यासाठी कुणासमोर हात पसरायची वेळ येत नाही. बोलता बोलता ते सांगू लागले, "साहेब, परवाचच उदाहरण. पलीकडच्या गल्लीत शेंगदाणे विकण्यासाठी मी उभा होता. एक आजी आपल्या नातवाला घेऊन आली आणि "शेंगदाणे द्या म्हणाली". तीने मला देण्यासाठी पैसे काढले. तेवढ्यात घरातून बाहेर आलेलं तिचं पोरगं तिच्यावर वसकलं ." कशाला फालतू पैसे घालवतेस. घरात शेंगदाणे नाहीत काय? "*


.*ती बाई नाराज झाली आणि तिने शेंगदाणे घेतले नाहीत.मात्र तिच्या चेहऱ्यावर "नातवाला शेंगदाणे देऊ दिले नाही, याच दु:ख दिसत होतं. काही वेळाने मुलगा गेला. आजीने स्वतःच्या हातात ठेवलेले पैसे मला दिले आणि नातवासाठी शेंगदाणे घेतले.*


*साहेब ,या वयात स्वाभिमानाने जगण्यासाठी फार पैसे लागत नाहीत.पण थोडे का होईना आपले हक्काचे असावे लागतात*. 


 *आता माझंच बघा. दोन मुल आहेत, सुना आहेत, माझी बायको आहे घरी. मी दररोज साडेचार पाच वाजता शेंगदाणे विकायला बाहेर पडतो. आणि रात्री साडेआठला घरी जातो. घरी गेलो की जेवण करतो आणि लगेच शांत झोपतो. सकाळी मात्र निवांत उठतो. मला शुगर नाही, बीपी नाही. कुठलाच त्रास नाही. काही दिवसांपूर्वी पोरांनी गुडघ्याचे ऑपरेशन करून दिलं. तेवढ्या गुडघ्याच्या गोळ्या चालू आहेत. पूर्वी सायकल चालवत शेंगदाणे विकत असे. आता गुडघ्याच्या ऑपरेशन मुळे सायकल चालवता येत नाही. म्हणून सायकल हातात धरतो आणि पायी चालत शेंगदाणे विकतो.*


*बाबा माझ्याशी भरभरून बोलत होते. बहुधा अनेक दिवसांनी कुणीतरी त्यांच्याशी अशा व्यक्तिगत गप्पा मारत होते* 


 *बाबा सांगत होते, "साहेब, रोज पाच सहा किलोमीटर मी चालतो. आणि त्यामुळेच माझी तब्येत ठणठणीत राहते. मला किती नफा मिळतो, याच्यापेक्षा या वयात कुणासमोर हात पसरायची वेळ येत नाही आणि स्वाभिमानाने जगता येतं, याच्यातच मला खरा आनंद आहे.*


 *प्रसंग छोटासाच*......

 *मात्र या छोट्या प्रसंगाने विचाराला चालना दिली. परत परत एकच वाक्य आठवत होते*,


*"या वयात कुणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये, साहेब "*

मदत वेळेवरच द्या टायटॅनिक होवू देवू नका.

 ✒️टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला गेला .

९ किमी वरील एका जहाजाने ते पाहीले पण ते जहाज समुद्री जिवांचे तस्करी करणारे होते.

त्यांनी विचार केला आपण गेलो तर आपले भांडे फुटेल व आपला वेळ जाऊंन नुकसान पण होईल,ते गेले नाहीत.

 १८ किमी वर कॅलीफोर्नीया नावाचे जहाज होते,त्यांनी सुद्धा मदतीचा प्रकाश पाहीला, पण रात्रीची वेळ आहे वाटेत आईस बर्ग आहेत ,सकाळी जाऊ असा विचार केला व ते सकाळी गेले तोवर जहाज पूर्ण बुडुन चार तास झाले होते.

  ६८ किमी वर कैथरीन नावाचे जहाज होते, त्यांनीही हा प्रकाश पाहीला व ते त्वरीत मदतीसाठी वळले पोहचले तोवर खूप उशीर झाला होता तरी सुद्धा त्यांनी चारशे पाचशे लोकांना वाचवले.


थोडक्यात तुम्हाला आयुष्यात तीन प्रकारची लोकं भेटतात.

एक - त्यांच्या स्वार्थानुसार अजिबात तुमचा विचार न करणारे

दोन - त्यांच्या वेळेनुसार ,सवडी प्रमाणे मदत करणारे

तीन - कुठलाही विचार न करता, तुमच्या मदतीसाठी बेधडक हात देनारे.

💞

Featured post

Lakshvedhi