Sunday, 9 April 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तर प्रदेशात जल्लोषात स्वागत

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तर प्रदेशात जल्लोषात स्वागत


 


            नवी दिल्ली, 8 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील विमानतळावर आगमन झाले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे आज पासून उत्तर प्रदेश च्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उत्तर प्रदेशचे जलसंपदा मंत्री स्वतंत्र देवसिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री शिंदे यांचे स्वागत केले. तसेच उत्तर प्रदेश वासियांनी श्री. शिंदे यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी येथील जनतेचे धन्यवाद मानले.


            या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन, दादाजी भुसे, संदिपान भुमरे, गुलाबराव पाटील आणि अन्य मंत्री तसेच आमदार सहभागी आहेत.


            मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असणारे मंत्री तसेच आमदार आज लखनऊ येथे थांबणार असून उद्या अयोध्या येथे 'प्रभू श्री रामचंद्र' यांचे दर्शन घेतील.


     


 



0000


 


प्रेमाची लाड लीं आणि बुडाला शेकली

 


Saturday, 8 April 2023

कौशल्य विकास विभागामार्फत महारोजगार मेळाव्यात

 कौशल्य विकास विभागामार्फत महारोजगार मेळाव्यात 5 हजार 583 पदांकरीताविविध कंपन्या, उद्योगांनी घेतल्या मुलाखती


कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन.

               मुंबई, दि. 8 : कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ग्रॅंटरोड येथे आज झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध उद्योग, कंपन्या आणि कॉर्पोरेट संस्थांनी त्यांच्याकडील 5 हजार 583 पदांसाठी नोकरीइच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मेळाव्यात नोकरीइच्छूक उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मेळाव्यात 26 उद्योग तथा कंपन्यांनी सहभाग घेतला. आज सकाळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला.


               गावदेवी, ग्रॅंटरोड (पश्चिम) येथील शारदा मंदिर हायस्कूल येथे झालेल्या या कार्यक्रमास मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.


 


5 लाख रोजगार देण्याचे उद्दीष्ट - मंत्री मंगलप्रभात लोढा


 


               मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने 75 हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात 5 लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे घेण्यात येणार आहेत, असे ही त्यांनी सांगितले.


               मेळाव्यात विविध 26 कंपन्यांनी सहभाग घेत त्यांच्याकडील विविध रिक्त पदांसाठी नोकरीइच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. पहिल्या फेरीत साधारण 222 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. त्याचबरोबर मेळाव्यात विविध शासकीय मंडळेही सहभागी झाली. त्यांनी स्वयंरोजगारासाठी असलेल्या त्यांच्याकडील विविध कर्ज योजनांची माहिती यावेळी उमेदवारांना दिली.


0000

सांगू कसे तुला

 


Sree स्वामी समर्थ

 


चष्मा सोडवा.

 *चष्मा सोडवा.*


आयुर्वेदाच्या मतानुसार शरीरात कफ बळावला कि दृष्टी दोष बळावतात डोळे हे कफाचे मुख्य केंद्र आहेत. खालील उपाययोजना केल्या असता.डोळ्याचे आजार चष्म्याचे नंबर कमी होऊन चष्मा जातो.

१)रोज नियमितपणे एक चमचा त्रिफळा चुर्ण व चमचाभर तूप गरमपाण्यात घ्या.

२)वस्त्रगाळ केलेल्या त्रिफळा चुर्ण भिजवलेल्या पाण्यात नियमितपणे डोळेधुवा.

३)नियमितपणे त्रिफळा चुर्णा ने जीभ,पडजीभ व टाळू स्वच्छ केली असता ही दृष्टी सुधारते.

४)सकाळी उठल्या उठल्या तोंडातील लाळ डोळ्यात काजळा सारखी लावा सात आठ दिवसात डोळे सुधारत असल्याची जाणीव होते.पाच सहामहीन्यात चष्मा जातो.

५)तळहात व पायाचे नियमितपणे माँलीश केले असता ही दृष्टी सुधारते नंबर कमी होतो.

६)नियमितपणे गाजर रस घेतल्यास चष्मा सुटण्यासाठी मदत होते नजर सुधारते.

७)दोन्ही हात हातावर जोरात जोरात घासून रोज पाच मिनिटे डोळ्यावर चेहऱ्यावर फिरवा चष्मा नंबर कमी होईल माँलीश डोळे नांक यांचे हलकेपणे केल्यास लवकर फरक पडतो.

८)पायाला ,हाताला डोळ्यांच्या वर मोहरीच्या तेलाने माँलीश केल्यास कफ सरुन दृष्टी स्वच्छ होऊन नंबर हटतो.

९)त्रिफला जल बनवून जलनेति तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास दृष्टी दोष जाऊन चष्मा सुटतो.

१०)रोज सकाळी तोंडात पाणी भरून तोंडाचा चंबू करा व डोळ्यावर हलकेच थंडपाणी मारा चष्मा सुटण्यासाठी मदत होईल.

११)सूर्यकिरण चिकित्सा नुसार हिरव्या बाटलीत ठेवलेले पाणी दिवसभर सुर्यप्रकाश लागेल असे ठेवावे रात्री ते पाणी एका बशीत घालून त्या पाण्यांत डोळे उघडझाप करावे चष्मा जातो.सोबत डोळ्याचे व्यायाम करावे.

१२)चार बदाम खडीसाखर, काळीमिरी, व चमचाभर मध यांचे नियमितपणे चाटण केले असता दृष्टी अमुलाग्र सुधारते नंबर हटतो.

१३)आँपरेशन अथवा दृष्टीदोष नसलेल्या मंडळींनी पांढऱ्या कांद्याचा रस दहा ग्रँम,मध तेवढेच,भीमसेन कापूर दोन तीन ग्रँम एकत्र करून हा ड्राँप डोळ्यात टाकल्यास दृष्टी सुधारते,प्रारंभीक आवस्थेतील मोतीबिंदू विरघळून जातो नियमितपणे प्रयोग केल्यास सर्व दृष्टीदोष जातात.

१४)गाईचे गोमूत्र तीन चार थेंब डोळ्यात टाकल्यास ही दृष्टी सुधारून चष्मा हटण्यास मदत होते.

 १५)डोळ्यात दोन थेंब गाईचे तूप घेऊन ते लावणे दिवसात दोन वेळा.

१६)घरच्या घरी तुंपांजन करून लावणे.

गाईच्या तुपावरील दिव्यावर चांदीची अथवा तांब्याची पळी घेऊन तिच्या बुडाला गाईचे तुप लावायचे व निरांजनावर धरायचे खाली जो कार्बन तयार होईल ते शुध्द तुपांजन असेल ते आपल्या तसेच तीन वर्षा पुढील मुलांना व स्वतः लावू शकतो.

१७)डोळ्यात नियमितपणे त्रिफलांजन कूल ड्राँप घालून चष्मा सोडवू शकतो.

१८)आँपरेशन वगैरे न झालेले असल्यास पातांजलीचा दृष्टी हा आयड्राँप टाकू शकतो 

१९)शतावरी कल्प एक चमचा दुधात.डोळ्यात शक्ती येते.चष्म्याचे नंबर कमी होतात.

२०)हिरडा चुर्ण एक चमचा पाव चमचा मध व अर्धा चमचा तूप डोळे निरोगी राहतात नंबर कमी होतो.

२१)बाळंतशेपा चुर्ण चमचा भर व अर्धा चमचा पिठीसाखर दोन वेळा डोळ्यांचे तेज वाढते नंबर कमी होतो.

२२)चिफळा चुर्ण एक चमचा व ते भिजेल एवढं मध व अर्धा चमचा तूप नेहमीच रोज रात्री घेतल्यास चष्म्याचा नंबर वाढत नाही, चष्मा सुटतो,दृष्टी कधीच जात नाही अगर कमी होत नाही.

२३) आहारात गाजर रस, काकडी, लिंबू व्हिटॅमिन अ वाले पदार्थ, लसूण, शेवग्याची भाजी,कोबी रस,बेलाच्या पानांचा चमचा भर रोज रस,गव्हाच्या रोपांचा रस,यांचा समावेश करावा.वरील उपाय व वरचेवर कफ सर्दी न होऊ दिल्यास नंबर न वाढता एक दिवस चष्मा जाईल.

 

वैद्य.गजानन


पोस्ट आवडल्यास जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करा.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


https://chat.whatsapp.com/DKjPsM3QNzeIGlts4Dttzv


_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/DKjPsM3QNzeIGlts4Dttzv

हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे*

 *हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


जास्तीत जास्त लोक सकाळी उठताच गरम पाणी आणि लिंबू सेवन करतात. यामुळे त्यांचे पोट साफ राहते आणि पोटातील मळ बाहेर पडतो. लिंबू टाकून गरम पाणी पिण्याचे फायदे तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत. परंतु जर याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर याचे गुण अजूनच वाढतील. चला तर मग आज आपण जाणुन घेऊया हे पाणी सकाळी सेवन केल्याने कोणते फायदे होतात आणि पाणी कसे तयार करावे.

साहित्य

अर्धा लिंबू, अर्धा टि स्पून हळद, गरम पाणी, थोडेसे मध (वैकल्पिक)

 

कृती


एक ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्यामध्ये हळद आणि गरम पाणी मिसळा.यानंतर त्यामध्ये चवीनुसार मध मिसळा. हे मिश्रण तुम्ही हलवत राहा. यामुळे हळद खाली बसणार नाही.


घ्या हळदीचे पाणी पिण्याचे 8 आरोग्य फायदे... हे फायदे वाचल्यावर तुम्ही नियमित हळदीचे पाणी पिणे सुरु कराल...


*शरीराची सूज कमी करते* - शरीरावर कितीही सूज आलेली असेल तर हळदीचे पाणी घेतल्यावर सूज कमी होऊन जाईल. यामध्ये करक्यूमिन नामक एक रसायन असते. जे औषधाच्या रुपात काम करते.


*मेंदूला सुरक्षित ठेवते* - नियमित हळदीचे पाणी पिऊन विसरण्याचा आजार जसे की, डिमेंशिया आणि अल्जाइमरला दूर केले जाऊ शकते. हळद मेंदूसाठी खुप चांगली असते.


*अँटी कँसर गुण*- करक्यूमिन असल्यामुळे हळद एक खुप चांगले अँटीऑक्सींडेंट असते. हे कँसर निर्माण करणा-या कोशिकांसोबत लढते.

पोटाच्या समस्या- एका संशोधनाप्रमाणे नियमित हळदी खाल्ल्याने पित्त जास्त बनते. यामुळे जेवण सहज पचन होते.


*हृदय सुरक्षित ठेवते*- हळदीचे पाणी पिल्याने रक्त जमा होत नाही. यासोबतच धमन्यांमध्ये रक्त साचत नाही.


*अर्थराइट्सचे लक्षण दूर*- यामध्ये करक्यूमिन असल्यामुळे हे जॉइंट पेन आणि सूज दूर करण्यासाठी फायदेशीर असते. हे या रोगावर एका औषधी प्रमाणे काम करते

*वय कमी करते*- नियमित हळदीचे पाणी पिल्याने फ्री रॅडिकल्ससोबत लढण्यात मदत मिळते. ज्यामुळे शरीरावर होणारा वयाचा परिणाम धिम्या गतिने होतो.


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



Featured post

Lakshvedhi