Monday, 20 March 2023

जय हो

 चिरनेर गाव चे सुपुत्र अंकुश कातकरी (सध्या राहणारी विंधने) यांची मुलगी अंकिता कातकरी ही M.P.S.C परीक्षा पास झाली आहे तिला चांगल्या पगाराची तिला चांगल्या नोकरीची ऑफर सुध्दा आली आहे परंतु तिला I.A.S अधिकारी व्हायची आहे त्या साठी ती U.P.S.C परीक्षा दिल्ली येथे देत आहे पहिल्या दोन परीक्षा ती चांगल्या गुणाने पास झाली आहे आता शेवट ची परीक्षा काही दिवसातच आहे त्यात ती पास झाली तर महाराष्ट्र ची रायगड तसेच उरण चिरनेर येथील पहिली I.A.S. आदिवासी महिला (मुलगी) होण्याचा मान तिला मिळेल व कातकरी समाजाची मान उंचावेल तसेच तिला आदिवासी समाजा कडून पास होण्यासाठी साठी लाख लाख शुभेच्छा 

आदिवासी बांधव चिरनेर

*ह्या ग्रुपमध्ये आपण सर्वजण सुशिक्षित आहोत, प्रत्येकांनी आपल्या फॅमिली ग्रुपवर हा मेसेज पाठवा, आपल्या कुटुंबातील मुलांना वाचायला द्या, अशी मि विनंती करते, जेणेकरुन ते काहीतरी बोध घेतील* 🌺🙏🌺

आवळा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे

 *रोजच्या आहारात आवळ्याचा समावेश केला तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते !!* 


आवळा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. आवळ्यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आवळा अनेक औषधांमध्ये वापरला जातो. आवळ्यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आहेत.


त्यात व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर असतात. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्नसारखे मिनरल्स असतात, जे अनेक रोगांवर फायदेशीर असतात. जर तुम्ही रोजच्या आहारात आवळ्याचा समावेश केला तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. पचन, रोगप्रतिकारशक्ती आणि इंफेक्शनसारख्या समस्यांमध्ये आवळा फायदेशीर ठरतो.


*आवळा खाण्याचे फायदे :-* 


*पचन समस्या :* 

आवळ्याचा आहारात समावेश केल्यास पचनाच्या समस्या दूर होतात. पचन, बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅसची समस्या आवळ्याच्या सेवनाने दूर होते. जर तुम्हाला अन्न पचनास त्रास होत असेल, आतड्याची हालचाल नीट होत नसेल तर आवळ्यानं बनवलेल्या गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश करा.


*प्रतिकारशक्ती वाढवणे :* 

आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी आहे. आवळ्यापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. आजारांच्या हंगामात आवळ्याचा आहारात समावेश केल्यास सर्दी सारखे संसर्ग होत नाहीत.


*हाडे मजबूत होतात :* 

आवळा हाडांसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. आवळ्यामध्ये कॅल्शियम भरपूर असते ज्याचा उपयोग हाडे मजबूत करण्यासाठी होतो. आवळा खाल्ल्यानं ऑस्टिओपोरोसिस, संधिवात आणि सांधेदुखी यांसारख्या हाडांशी संबंधित समस्यांमध्ये त्रास कमी होतो. हाडांचे दुखणे दूर करण्यासाठी आवळ्याचा ज्युस हा रोज सकाळी घ्या.


*हृदयासाठी फायदेशीर :* 

आवळा हृदयाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे पोषक तत्व हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आवळ्यातील क्रोमियम बीटा हृदयाच्या मज्जातंतूंना ब्लॉकेजपासून वाचवते, ज्यामुळे हृदय चांगले कार्य करते आणि निरोगी राहते.


*डोळ्यासाठी फायदेशीर :* 

आवळा डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आपली नजर चांगली करण्यास मदत करते. आवळ्यापासून बनवलेला मुरंबा, चटणी यासारख्या गोष्टी खाल्ल्यानं चवीसोबतच दृष्टीही वाढते.


*मधुमेह :* 

आवळ्यामध्ये असलेले पोषक तत्व मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.


*संसर्ग होण्यापासून होतो बचाव :* 

आवळ्यामध्ये असलेले पोषक घटक संसर्ग दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहेत. आवळा बॅक्टेरियाशी लढण्याचे काम करतो. हे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. याच्या सेवनाने सर्दी आणि पोटाच्या संसर्गापासून मुक्ती मिळते.


_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/K4DuEzqiAazB1CS5PY0O75

मनाची श्रीमंती

 मनाची श्रीमंती 


       रात्री अचानक गलका ऐकू आला म्हणून मी खिडकीतून खाली बघितले. सुरक्षा रक्षकाला कोणी तरी विनवणी करत होतं बंगल्यात प्रवेश देण्याबद्दल.

मी फोनवरून सुरक्षा रक्षकाशी संपर्क साधून विचारणा केली असता त्याने त्या व्यक्तीचे नांव सांगताच माझ्या छातीत धस्स झाले. 

      मीच घाईघाईने खाली गेलो. तिथल्या प्रकाशात मी त्याला ओळखू शकलो नाही. माझा उडालेला गोंधळ बघून ती व्यक्ती मला म्हणाली

"अरे केशवा, ओळखले नाहीस मला ? मी तुझा शाळा सोबती वामन्या. वामन जोशी."

      "वामन्या तू ? अरे पण काय ही अवस्था करून घेतली आहेस तू" मी त्याचा हात धरत सावकाश चालत त्याला खालच्या दिवाणखान्यात आणून बसवलं. आमच्या आवाजाने घरातील माणसे आपापल्या खोल्यातून बाहेर येत आम्हा दोघांना आश्चर्याने थक्क होऊन पाहत राहिली.

      वामन एव्हाना बऱ्यापैकी शांत झाला होता. मी घरच्या मंडळींना वामनची ओळख करून दिली.

     "केशवा, अरे माझ्यापाशी वेळ नाही जास्त. एकदा तुझं काम झालं की मी निघेन लगेच" असं म्हणून वामन्याने त्याच्या जवळच्या पिशवीतून एक वर्तमानपत्रात बांधून आणलेली वस्तू माझ्या हाती सोपवली आणि म्हणाला, "केशवा, आता माझा जीव खऱ्या अर्थाने शांत झाला. आता कधीही वरून बोलावणं आलं तरी मी जायला मोकळा झालो. तुझं ऋण डोक्यावर घेऊन जगत आलो आजवर. पण आज त्यातूनही मुक्त झालो."

      वामन्याचं बोलणं बुचकळ्यात टाकणारे होते. मी त्याला कागदात गुंडाळून काय आणलं आहे ते विचारले. 

     "तुच उघडून बघ केशवा." वामन हात जोडून म्हणाला.

      मी कागदाचा दोरा सोडला आणि त्याक्षणी त्यातून पैशाची बंडलं खाली पडली. मोठी रक्कम होती ती.

      वामन्याने पुढे होऊन माझे हात पकडले. "केशवा, २० वर्षांपूर्वी माझ्या पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी योग्य वेळी तु केलेल्या आर्थिक मदतीची मी व्याजासह आज परतफेड केली आहे. माझी पत्नी आता हयात नाही. पण तिच्या अखेरच्या दिवसात मी तिला ह्या परतफेडीचे वचन दिले होते. त्या वचनांतून मी आज उशिराने का होईना पण मुक्त झालो आहे."

      मी नि:शब्द झालो ते ऐकून. आजकाल पैशासाठी इमान विकणाऱ्या, नाती तोडणाऱ्या आणि माणूसकीला काळीमा फासणाऱ्या कलियुगात वामन्या सारखी माणसं हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी तरी उरली आहेत हे बघून मन सुखावले आणि थेट कोकणातल्या माझ्या शाळेच्या दिवसांत गेले. 

       माझे वडील भिक्षुकी करायचे त्यामुळे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. वामन्याच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते. बालपणी केलेल्या सगळ्या मजा वामन्याने खर्च केलेल्या पैशांतून होत्या. आमच्यासाठी तो आनंदाने पैसे खर्च करायचा. 

      पुढे शिक्षणासाठी मी मुंबईला मामांकडे आलो आणि तल्लख बुद्धीच्या जोरावर शहरातील एक निष्णात वकील म्हणून नाव कमावले. आज सगळी सुखं आणि लक्ष्मी माझ्या घरी भरभरून आहेत. पण वामन्याची आजची परिस्थिती बघून वाईट वाटले. 

       बोलता बोलता वामन्या बोलून गेला की त्याचे अण्णा गेल्यावर हळूहळू किराणा व्यवसायाला उतरती कळा लागली. गावात मारवाड्यांनी तशीच दुकाने सुरू केली आणि गिऱ्हाईक आपोआप तुटत गेले. 

      मी एव्हाना भानावर आलो. "तु आधी जेवून घे, मग आपण बोलू निवांत." पण वामन्याने त्याला नकार दिला.

      "अरे पण एवढी रक्कम तु उभी कशी केलीस?"

       वामन्याचे उत्तर ऐकून मघाशी मी जमिनीवरून उचललेली पैशाची बंडलं पुन्हा एकदा माझ्या हातून निसटून खाली पडली. वामन्या शांतपणे म्हणाला, "मी माझी एक किडनी दान केली. त्यातूनच मिळालेले हे पैसे आहेत. अरे गेले काही वर्षे मी बैचेन होतो. पत्नीला दिलेलं वचन मला झोपू देत नव्हते. एक दिवस मुंबईतील रुग्णालयात एका रूग्णाला किडनीची आवश्यकता असल्याची जाहिरात वर्तमानपत्रात छापून आली होती. ती वाचून तडक इथे आलो. परमेश्वराच्या कृपेने पुढचं सर्व सुरळीत झाले. मी निघतो आता. मिळेल ती एसटी पकडून घरी जातो परत."

       मी खुप गयावया करून देखील वामन्या थांबला नाही. मी बळेबळेच त्याला जेवायला लावले. वामन्याच्या मनांची श्रीमंती आमच्या सगळ्यांचेच डोळे दिपवून आणि पाणावून गेली.

ड्रायव्हरला गाडी काढायला सांगून मी त्याला मुंबई सेंट्रल डेपोमध्ये कोकणातील बसमध्ये बसवून दिले.

      बस सुटायच्या आधी वामन्याला घट्ट मिठी मारत मी म्हणालो, "वामन्या, मी आजवर मिळवलेली अफाट श्रीमंती तुझ्या मनाच्या श्रीमंती समोर खुजी ठरली आहे."

       उसनं अवसान आणून वामन्या माझ्या खांद्यावर थोपटत म्हणाला, "केशवा, जोपर्यंत मैत्री आणि माणूसकी जपणारी आणि तुझ्यासारखी वेळेला धावून येणारी माणसं ह्या जगात आहेत तोपर्यंत परतफेडीची दिवाळी साजरी करण्याचे भाग्य प्रत्येक याचकाला मिळत रहाणार. 

       नुसतं विश्रांतीसाठी माझ्या घरी येण्याचे वचन मात्र मी वामन्याकडून घेतले आणि नंतरच्या काही क्षणांतच वामन्याची एसटी सुटली.


©सतीश बर्वे👌👌🙏🏽

झाकली मूठ🤛 सव्वालाखाची....*

 Interesting 

एकदा एका मंदिरात पूजेला एक राजा येणार आहे असे त्या पुजार्‍याला कळले... त्याने सहा हजार रुपयांचे कर्ज काढले आणि देऊळ चांगले सजवले रंगवले

राजा पूजेला आला आणि त्याने दक्षिणा म्हणून चार आणे ठेवले. पुजार्‍याला तिथेच घाम फुटला. आपण सहा हजार कर्ज काढून मंदीर रंगवले आणि राजाने फक्त चार आणे दक्षिणा ठेवली... आता या चवण्णीछाप राजाला अद्दल घडवायचीच.

पुजारी हुशार होता... राजा गेल्यावर पुजार्‍याने ते चार आणे मुठीत घेतले आणि सगळ्यांना सांगू लागला...

"राजाने मंदिरात दान केलेली एक वस्तू आहे. ती मला झेपणार नाही. म्हणून मी तिचा लिलाव करतोय. आपापली बोली लावा."

आता राजाने वस्तू ठेवलीय म्हणल्यावर साधी ठेवली असेल का... ? पहिलीच बोली दहा हजार पासून... सुरु झाली. पुजारी डोके हालवूनच 'नाही परवडत' असे म्हणत होता. लिलावातील बोली वाढत वाढत पन्नास हजारावर पोचली.

तिकडे राजाला पहारेकरी म्हणाला, "महाराज, पुजाऱ्याने आपण मंदीरात दान केलेल्या वस्तूचा लिलाव सुरु केला आहे आणि ती वस्तू तो दाखवतही नाही आणि सांगतही नाही, मुठीत ठेवलीय..."

राजाला घाम फुटला. तो पळत पळत आला आणि पुजाऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला, "हे माझ्या बाप्पा, सव्वालाख देतो पण कुणाला ती वस्तू दाखवू नको...."

तेव्हा पासून ही म्हण रुजू झाली....


*....झाकली मूठ🤛 सव्वालाखाची....*😃

सूप्रभा त


 

Sunday, 19 March 2023

फक्त शेणाचा उपयोग करून उत्तमोत्तम वस्तूच बनवलेल्या नाहीयेत

 ग्रेट जॉब। या व्यक्तीने फक्त शेणाचा उपयोग करून उत्तमोत्तम वस्तूच बनवलेल्या नाहीयेत तर त्याचे विचार सुद्धा उच्च आहेत। ज्या गायीच्या धडकेने त्याच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या गायीची त्याने देखभाल, सेवा तर केलीच पण अशा अनेक भाकड गायींची सेवा तो निरपेक्षपणे करत आला आहे। यातून खरंच आपण सर्वांनी बोध घ्यायला हवा। थँक्स अ लॉट फॉर शेअरिंग धिस व्हिडीओ।


गोधनाला म्हणजेच गाईच्या शेण, गोमूत्र, दूध आणि गायीच्या दुधापासून बनणारे सगळे पदार्थ यांना किती महत्त्व आहे ते व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल. आपण आजवर त्याचे महत्वच जाणून घेतले नाही. गाईच्या शेणापासून तयार केलेल्या आकर्षक वस्तू पाहून थक्क होतं. यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. तो पाहू या। 


तुम्हाला यातल्या कोणत्याही वस्तू हव्या असतील तर व्हिडिओ मध्ये फोन नंबर दिला आहे त्यावर फोन करा। या वस्तू तुम्हाला कुरियरने मिळतील। 


सोर्स व्हाट्स


अप्प।

शिवलिंग किरणोत्सर्गी आहेत का?

 शिवलिंग किरणोत्सर्गी आहेत का?


 हो १००% खरे आहे!!


 भारताचा रेडिओ क्रियाकलाप नकाशा उचला, तुम्हाला आश्चर्य वाटेल! भारत सरकारच्या अणुभट्टीशिवाय सर्व ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी सर्वाधिक किरणोत्सर्ग आढळतो.


 शिवलिंग हे दुसरे काही नसून अणुभट्ट्या आहेत, म्हणूनच त्यांना जल अर्पण केले जाते, जेणेकरून ते शांत राहतील.


 महादेवाचे सर्व आवडते पदार्थ जसे की बिल्वपत्र, आकमाड, धतुरा, गुळधाळ इत्यादी सर्व अणुऊर्जा भिजवणारे आहेत.


 कारण शिवलिंगावरील पाणीही रिअॅक्टिव्ह होते, त्यामुळे ड्रेनेज ट्यूब ओलांडली जात नाही.


 भाभा अणुभट्टीची रचनाही शिवलिंगासारखी आहे.


 नदीच्या वाहत्या पाण्यासोबत शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी औषधाचे रूप घेते.


 म्हणूनच आमचे पूर्वज आम्हाला म्हणायचे की महादेव शिवशंकर रागावले तर प्रलय येईल.


 आपल्या परंपरांच्या मागे किती खोल विज्ञान दडलेले आहे ते पहा.


 ज्या संस्कृतीच्या पोटातून आपण जन्म घेतला, ती शाश्वत आहे.


 विज्ञानाला परंपरेचा गाभा म्हणून परिधान केले आहे जेणेकरून ते एक प्रवृत्ती बनले पाहिजे आणि आपण भारतीयांनी नेहमीच वैज्ञानिक जीवन जगले पाहिजे.


 तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात अशी महत्त्वाची शिव मंदिरे आहेत जी केदारनाथ ते रामेश्वरमपर्यंत एकाच सरळ रेषेत बांधलेली आहेत. आश्चर्य वाटते की आपल्या पूर्वजांकडे असे कोणते विज्ञान आणि तंत्रज्ञान होते जे आजपर्यंत आपल्याला समजले नाही? उत्तराखंडचे केदारनाथ, तेलंगणाचे कलेश्वरम, आंध्र प्रदेशचे कलहस्ती, तामिळनाडूचे एकंबरेश्वर, चिदंबरम आणि शेवटी रामेश्वरम मंदिरे 79°E 41'54′′ रेखांशाच्या भौगोलिक सरळ रेषेत बांधलेली आहेत.


 ही सर्व मंदिरे निसर्गाच्या 5 घटकांमध्ये लिंग अभिव्यक्ती दर्शवतात, ज्याला आपण सामान्य भाषेत पंचभूत म्हणतो. पंचभूत म्हणजे पृथ्वी, जल, अग्नि, वायू आणि अवकाश. या पाच तत्वांवर आधारित या पाच शिवलिंगांची स्थापना करण्यात आली आहे.


 तिरुवनाइकवाल मंदिरात पाण्याचे प्रतिनिधित्व केले जाते,

 तिरुवन्नमलाईमध्ये आगीचे प्रतिनिधित्व केले जाते,

 कलहस्तीमध्ये वारा दर्शविला जातो,

 कांचीपुरम आणि शेवटी पृथ्वीचे प्रतिनिधित्व केले जाते

 चिदंबरम मंदिरात अवकाश की आकाशाचं प्रतिनिधित्व!


 ही पाच मंदिरे वास्तू-विज्ञान-वेदांचा अद्भुत मेळा दर्शवितात.


 ही मंदिरे भौगोलिकदृष्ट्याही विशेष आहेत. ही पाच मंदिरे योग शास्त्रानुसार बांधली गेली आहेत आणि एकमेकांशी एका विशिष्ट भौगोलिक संरेखनात ठेवली आहेत. यामागे काही तरी शास्त्र असावे ज्याचा परिणाम मानवी शरीरावर होईल.


 ही मंदिरे सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी बांधण्यात आली, जेव्हा त्या ठिकाणांचे अक्षांश-रेखांश मोजण्यासाठी उपग्रह तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. मग इतक्या अचूकपणे पाच मंदिरे कशी बसवली गेली? याचे उत्तर फक्त देवालाच माहीत आहे.


 केदारनाथ आणि रामेश्वरममधील अंतर 2383 किमी आहे. पण ही सर्व मंदिरे जवळपास एकाच समांतर रेषेत आहेत. अखेर, हजारो वर्षांपूर्वी कोणत्या तंत्राचा वापर करून ही मंदिरे समांतर रेषेत बांधली गेली, हे अजूनही गूढच आहे.


 श्रीकालहस्ती मंदिरातील लुकलुकणारा दिवा हा हवेतील घटक असल्याचे दर्शवतो. थिरुवनिक्का मंदिराच्या आतील पठारावरील पाण्याचे झरे हे पाण्याचे घटक असल्याचे दर्शवतात. अन्नामलाई टेकडीवरील मोठा दिवा तो अग्नि तत्व असल्याचे दर्शवितो. कांचीपुरमच्या वाळूचे स्व-तत्व हे पृथ्वी तत्व असल्याचे दर्शवते आणि चिदंबरमची निराकार अवस्था ईश्वराचे निराकार म्हणजेच आकाश तत्व दर्शवते.


 आता हे आश्चर्यकारक नाही की विश्वाच्या पाच घटकांचे प्रतिनिधित्व करणारे पाच लिंग एकाच ओळीत शतकांपूर्वी स्थापित केले गेले आहेत.


 आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाचा आणि बुद्धिमत्तेचा आपल्याला अभिमान असायला हवा की त्यांच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान होते जे आधुनिक विज्ञान देखील ओळखू शकत नाही.


 असे मानले जाते की केवळ ही पाच मंदिरेच नाही तर या रेषेत अनेक मंदिरे असतील जी केदारनाथ ते रामेश्वरमपर्यंत एका सरळ रेषेत येतात. या ओळीला 'शिवशक्ती अक्षरेखा' म्हणूनही ओळखले जाते, कदाचित ही सर्व मंदिरे 81.3119° E मध्ये येणार्‍या कैलासला लक्षात घेऊन बांधली गेली आहेत!?


 याचे उत्तर फक्त

भगवान शिवालाच माहीत आहे.


 आश्चर्यकारक गोष्ट 'महाकाल' उज्जैनमधील उर्वरित ज्योतिर्लिंगांमधील संबंध (अंतर) पहा.


 उज्जैन ते सोमनाथ- 777 किमी


 उज्जैन ते ओंकारेश्वर - 111 किमी


 उज्जैनपासून भीमाशंकर- 666 किमी


 उज्जैन ते काशी विश्वनाथ- 999 किमी


 उज्जैन ते मल्लिकार्जुन - 999 किमी


 उज्जैन ते केदारनाथ - 888 किमी


 उज्जैन ते त्र्यंबकेश्वर- 555 किमी


 उज्जैन ते बैजनाथ- 999 किमी


 उज्जैन ते रामेश्वरम - 1999 किमी


 उज्जैन ते घृष्णेश्वर - 555 किमी


 ऋषीमुनी - भारतात विनाकारण काहीही केले जात नाही.


 सुमारे २०५० वर्षांपूर्वी उज्जैनमध्ये सूर्य आणि ज्योतिषाची गणना करण्यासाठी मानवनिर्मित उपकरणे तयार करण्यात आली आहेत.


 आणि जेव्हा 

100 वर्षांपूर्वी इंग्रज शास्त्रज्ञाने पृथ्वीवरील काल्पनिक रेषा (कर्क) तयार केली तेव्हा त्यातील मधला भाग उज्जैनचा निघाला. आजही सूर्य आणि अवकाशाविषयी माहिती घेण्यासाठी वैज्ञानिक उज्जैनमध्ये येतात.



*ज्ञानवर्धक वाचा*

नव्या पिढीला ही सांगा

🙏🏻 *राम कृष्ण हरी*🙏

Featured post

Lakshvedhi