Sunday, 5 March 2023

इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही.

 इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही.

राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण.

            मुंबई, दि. ३ - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.


            या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे ही सकाळी १०.३० नंतर प्रसिद्ध झाली आहेत. मंडळ सूचनेनुसार सकाळ सत्रात १०.३० वाजेपर्यंत व दुपार सत्रात दु. २.३० वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थींनी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले आहे. त्या वेळेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा दालनात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे गणित विषयाचा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.


            संबंधित घटनेबाबत सिंदखेड राजा पोलिस ठाण्यात फिर्याद क्र. ००३७ अन्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत. त्यामुळे गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याची विद्यार्थी, शिक्षक, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे श्रीमती ओक यांनी स्पष्ट केले आहे.


0000

वसंतोत्सवासाठी सज्ज !

 वसंतोत्सवासाठी सज्ज !


- भवताल, बायोस्फीयर्स सोबत सृष्टीची उधळण अनुभवणारl

‘ऋतुंचा राजा’ असं वसंत ऋतुला का म्हटलं जातं? हे अनुभवण्यासाठी ‘भवताल’ तसेच ‘बायोस्फीयर्स’ टीम आणि सोबत येणारे निसर्गप्रेमी सज्ज झाले आहेत. हे सर्व जण उद्या, रविवारी (५ मार्च २०२३) मुळशी-ताम्हिणी खोऱ्यात जाणार आहेत आणि सृष्टीतील वसंतोत्सव अनुभवणार आहेत.


वनस्पतींची नवी पालवी, वातावरणात सुगंध पसरवणारा फुलांचा विविधरंगी बहर, त्यावरील कीटक-पक्ष्यांचा गुंजारव, या जीवांचा एकमेकांशी असलेला संबंध, पुढची पिढी प्रसवण्यासाठी त्यांचं सुरू असलेलं नियोजन, या दिवसांतील पठारांची पिवळी-तांबूस झाक... अशी सृष्टीची अनेक रूपं पाहणं, ती समजून घेणं आणि जोडीला गर्द देवराईचा अनुभव या सर्व गोष्टींनी ‘भवताल’चा उद्याचा ‘वसंतोत्सव’ रंगणार आहे. सोबत जैवविविधतेचे प्रसिद्ध तज्ञ व ‘बायोस्फीयर्स’चे डॉ. सचिन पुणेकर आहेत.


लोकांना महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा अनुभव देणं आणि असा हा आगळावेगळा महाराष्ट्र जगापुढे नेणं हे ‘भवताल’चं एक उद्दिष्ट आहे. त्यासाठीच हटके ‘थीम’ असलेल्या इको-टूर्स आयोजित केल्या जातात. त्यातूनच ‘वसंतोत्सव’ या टूरचा जन्म झाला. हा अनुभव घेण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, हा पहिलाच ‘वसंतोत्सव’ असल्याने छोटी टीम घेऊन जात आहोत. इतरांनाही पुढे संधी मिळेल हे निश्चित... या उत्सवाचा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवूच, जोडलेले राहा!

#भवताल #बायोस्फायर्स #वसंतोत्सव.

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचे गांभी

 शहरांमध्ये ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक, लहन मुले यांचे हाल होत आहेत. मात्र यासंदर्भात शासनाचे सुस्पष्ट धोरण नाही. या संदर्भात राज्य स्तरावर समिती गठीत करून भटक्या कुत्र्यांसाठी केंद्र उभी करून यातून सामान्य भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून सामान्य नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मांडली. याला मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सकारात्मक उत्तर देत महिन्याभरात या संदर्भातील समिती गठीत करून यामध्ये अधिकाऱ्यांसह या क्षेत्रात काम करणारे, एनजीओ यांचाही अंतर्भाव करणार असल्याची माहिती दिली.


सभागृहात लक्षवेधी मांडत असताना आ. भातखळकर म्हणाले, भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचे गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारने तत्काळ राज्यस्तरीय समिती गठीत करावी. शहरामध्ये ठिकठिकाणी विशेषत: रहिवासी सोसायट्यांमध्ये, पदपथ, रस्त्यांवर अशा भटक्या कुत्र्यांचा त्रास ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना होतो. अनेकदा कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ले केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीर आतापर्यंत किती कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले, याची निश्चित संख्या सरकारकडे आहे का, यासाठी एक विशेष मोहीम सरकार सुरू करणार आहे का, आणि सरकारने म्हटल्याप्रमाणे समिती कधीपर्यंत गठीत करणार, या समितीमध्ये या विषयात काम करणाऱ्यांचे सल्ले घेणार का, खासगी एनजीओची मदत घेऊ न भटक्या कुत्र्यांसाठी केंद्र उभी करता येतील अशा प्रकारची सूचना स्वीकारण्याची मानसिकता राज्य सरकारची आहे का, असे प्रश्न आ. भातखळकर यांनी उपस्थित केले.


यावर उत्तर देताना मंत्री विखे-पाटील म्हणाले, भटक्या कुत्र्यांचा विशेषत: शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊ न येणाऱ्या महिन्याभरात समिती गठीत करणार आहे. यामध्ये या क्षेत्रात काम करणारे, एनजीओ यांचाही अंतर्भाव करणार आहे. त्यांच्या सूचना स्वीकारण्यास राज्य सरकार सकारात्मक आहे. याशिवाय श्वान दत्तक योजना सुरू करता येईल का, याबाबतही सकारात्क विचार करून लवकरच समिती गठीत करू.

Saturday, 4 March 2023

आई आणि मुलीचा आ राम

 ♦️ *विचारपुष्प*♦️


*💞आई आणि मुलीचा आराम,💞👌* 


 *"आई मला जरा आराम हवा आहे.."*


शाळेत जाणारी मुलगी अभ्यास, शाळा, क्लास करून थकून आईला म्हणाली.


"अगं चांगला अभ्यास कर, नंतर आरामच करायचा आहे.."


मुलगी उठली, अभ्यासाला लागली आणि आराम करायचा राहून गेला.


"आई थोडा वेळ दे आरामाला, ऑफिस च्या कामातून थकून गेलीये मी पार.."


अगं लग्न करून सेटल हो एकदाची, मग आरामच करायचा आहे..


मुलगी लग्नासाठी तयार झाली आणि आराम करायचा राहून गेला.


"अहो इतकी काय घाई आहे, एखादा वर्ष थांबू ना जरा.."


"अगं मुलं होऊन गेली वेळेवर की टेन्शन नाही, नंतर आरामच करायचा आहे..."


मुलगी आई बनली आणि आराम करायचा राहून गेला..


"अगं तुलाच जागरण करावं लागेल, मला ऑफिस आहे उद्या..थोडे दिवस फक्त, मुलं मोठी झाली की आरामच करायचा आहे.."


ती बाळासाठी रात्रभर जागी राहिली आणि आराम करायचा राहून गेला.


"अहो मुलं आता शाळेत जायला लागली, जरा निवांत बसू द्या की मला.."


"मुलांकडे नीट लक्ष दे, त्यांचा अभ्यास घे, नंतर आरामच करायचा आहे..."


ती मुलांचा प्रोजेक्ट करायला बसली आणि आराम करायचा राहून गेला..


"आता मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली, आता जरा निवांत झाले मी.."


"आता यांच्या लग्नाचं पाहावं लागेल, ती एक जबाबदारी पार पाडली की मग आरामच करायचा आहे.."


तिने कंबर कसून सगळा कार्यक्रम आटोपला आणि आराम करायचा राहून गेला..


"मुलं संसाराला लागली, आता मी आराम करणार.."


"अगं आपली सुधा गर्भार आहे, माहेरी बाळंतपण करायचंय ना तिचं.."


मुलीचं बाळंतपण आवरलं आणि आराम करायचा राहून गेला..


"चला, ही पण जबाबदारी पार पडली, आता आराम."


"सासूबाई मला नोकरी परत जॉईन करायची आहे..आरव ला सांभाळाल का?"


नातवाच्या मागे दमली आणि आराम करायचा राहून गेला..


"चला नातू मोठा झाला, आता सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या.. आता मी आराम करणार.."


"अगं ऐकलं का, गुडघे दुखताय माझे, उठवलं जात नाही..Bp वाढलाय वाटतं, डायबिटीस पण आहे..डॉकटर ने वेळेवर पथ्यपाणी करायला सांगितलंय बरं का.."


नवऱ्याची सेवा करायला उरलं सुरलं आयुष्य गेलं..आणि आराम करायचा राहूनच गेला..


एक दिवशी देवच आला खाली, आराम करायचाय ना तुला? तिने हात जोडले आणि देव घेऊन गेला..अखेर तिला आराम मिळाला, अगदी दिर्घकाळाचा..!!!

सर्व स्त्रीयांना समर्पित


कोणी लिहिले ते माहिती..नाहि 

पण मनाला भावले म्हणून पाठवले... "स्त्री जीवनाचे मजेदार रहस्य" म्हणजेच आजची कथा! सर्वांना *हृदय स्पंदन...!!!*

🌹💞 🙏🙏🙏🙏💞🌹



*♦️वाचण्यात आलेला सुंदर लेख♦️*

तेजस्विनी पुiरस्कार

 


भरक ट लेले

 


आधारकार्ड धारकांसाठी “डॉक्युमेंट अपडेट” नवीन फिचर विकसित

 आधारकार्ड धारकांसाठी “डॉक्युमेंट अपडेट” नवीन फिचर विकसित नागरिकांनी आधारकार्ड अद्ययावत करुन घ्यावे


अलिबाग:- सन 2015 पासून देशामध्ये युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत देशातील नागरिकांना आधारकार्ड देण्यात येते. बायोमेट्रिक प्रमाणिकरणासह रहिवाशाची ओळख पटविण्यासाठी आधारकार्ड हा ओळखीचा सर्वात व्यापकपणे स्वीकारला जाणारा पुरावा आहे. नागरिकांकडून अनेक शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी आता आधारकार्डचा वापर केला जात आहे. यापुढे शासकीय/इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपले आधारकार्ड अद्ययावत करुन घेणे आवश्यक आहे.

       ज्या नागरिकांना आधारकार्ड मिळाले आहे,परंतु 10 वर्षांमध्ये एकदाही अद्ययावत केले नाही, अशा आधारकार्ड धारकांना 'डॉक्युमेंट अपडेट' हे नवीन फिचर विकसित करण्यात आले आहे. अशा नागरिकांनी ओळखीचा पुरावा (POI) आणि रहिवासी पुरावा (POA) कागदपत्रे अद्ययावत करून त्यांचा आधार अद्ययावत करणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांना 'डॉक्युमेंट अपडेट' करण्याचे आहे त्यांनी myAadhaar (ऑनलाईन) पोर्टलद्वारे किंवा कोणत्याही आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन आपले आधारकार्ड अद्ययावत करुन घ्यावे, असे आवाहन असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्री.सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi