Saturday, 18 February 2023

महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 'सोनचिरैया सुपर मार्केट' महत्वाची भूमिका बजाविणार

 महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी

'सोनचिरैया सुपर मार्केट' महत्वाची भूमिका बजाविणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            रत्नागिरी दि. 17 : महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोनचिरैया सुपर मार्केटची भूमिका अत्यंत महत्वाची आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 


            केंद्र शासन पुरस्कृत ‘दीनदयाळ अंत्योदय योजना’ राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत व रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह इमारतीमध्ये तयार करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या ‘सोनचिरैया सुपर मार्केट’चे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. 


               मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सोनचिरैया सुपर मार्केटची पाहणी करुन या मार्केटमधील उत्पादनांची माहिती घेतली. या सुपर मार्केटमधील सर्व उत्पादने ही महिला बचतगटांनी तयार केलेली आहेत. त्यामुळे या उत्पादनांचा दर्जा निश्चितच उत्तम असेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला. 


            रत्नागिरीमध्ये सुरु करण्यात आलेल्या सुपर मार्केटप्रमाणे राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये बचतगटांसाठी सुपर मार्केट तयार करण्यासाठी शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


               उद्योगमंत्री श्री. उदय सामंत म्हणाले, जिल्ह्यातील 160 बचतगटांनी एकत्र येवून हे मार्केट उभारले आहे. महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरीता सोनचिरैया सुपर मार्केट उभारण्यात आले असून राज्यातील पहिले बचतगटांचे सुपरमार्केट रत्नागिरी जिल्ह्यात सुरु करण्यात आल्याबद्दल पालकमंत्र्यांनी अभिमान व्यक्त केला. रत्नागिरीमध्ये उभारण्यात आलेल्या या सुपर मार्केटप्रमाणेच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्येही बचत गटांसाठी विक्री केंद्र उभारण्यात येणार असून त्याकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून साडेसात कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिली.


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते परिवहन महामंडळाच्या बसचे लोकार्पण


            महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी विभागातंर्गत नवीन बसचे लोकार्पण आज स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. 


            रत्नागिरी जिल्ह्याकरीता 50 नवीन बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री नवीन बसमधून स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह ते शासकीय विश्रामगृह या मार्गाने प्रवासही केला.


            यावेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय किरण कुलकर्णी, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी, रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते. 


०००००



Take care

 👆वरील हॉस्पिटमध्ये उपचारासाठी जावू नये... सरकारने गुन्हा दाखल करण्यात आला... ICU तील ९० टक्के पेशंट जिवंत रहात नाही... 🙏🙏🙏🙏पेशंट मरण पावला तरी कृत्रिम अॉ क्सिजन वर बिलासाठी ठेवले जाते


Om Nam शिवाय

 वे नंदिनी के वंदनीय

नंदिनी के स्वरूप है

वो तीन लोक के पिता

स्वरुप एक रूप है

कृपालु ऐसे है के चित्त

जप रहा शिव शिवम

तरल अनल गगन पवन

धरा धरा शिव शिवम...

            🚩 

   ॐ नमः शिवाय

      🌸☘️🌸

महाशिवरात्री निमित्त

  हार्दिक शुभेच्छा


!

✨ 🌸☘️🌸✨

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार

 जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            रत्नागिरी, दि. 17 : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीबाबत एक राज्यस्तरीय समिती स्थापन करून सकारात्मक पद्धतीने योग्य निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            येथील चंपक मैदानावर आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.


            यावेळी महसूल, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार योगेश कदम, शिक्षक महासंघाचे नेते संभाजीराव थोरात, राज्याध्यक्ष अंबादास वाजे उपस्थित होते. 


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, जुन्या पेन्शनच्या या मागणीसाठी अर्थमंत्री, शिक्षणमंत्री, संबंधित विभागाचे मंत्री आणि शिक्षक संघाचे प्रतिनिधी घेऊन राज्यस्तरीय समिती गठित करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करणे शासनाची जबाबदारी आहे, त्या निश्चित पूर्ण केल्या जातील.


            शिक्षकांवर बंधने नकोत. जिथे कोणीही पोहोचत नाही तिथे शिक्षक पोहोचतो. आई-वडिलांनंतर शिक्षकांचेच आदरस्थान आहे, या शब्दात शिक्षकांचे कौतुक करुन, मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, आज शिक्षकांना फक्त ज्ञानार्जनाचे काम देणे आवश्यक आहे. मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, ही शासनाची जबाबदारी आहे. पटसंख्या वाढण्यासाठी शिक्षकांनी आवर्जून प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या मागण्यांसाठी संपूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.


            भारत तरुणाईचा देश आहे आणि या तरुणाईला घडविण्याचे काम शिक्षक करीत आहे. मी स्वतः जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी होतो. तंत्रज्ञान कितीही अद्ययावत झाले तरी शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील नाते कधीही बदलू शकणार नाही, शिक्षकांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या "परीक्षा पे चर्चा" या कार्यक्रमाचा आवर्जून उल्लेख करीत शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे ग्रोथ इंजिनच आहे. त्यामुळे शिक्षक सर्वश्रेष्ठच आहे, असे सांगून राज्य शासनाने घेतलेले सर्व निर्णय सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून घेतले, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.


            महसूल मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले की, प्राथमिक शिक्षणाचा पाया अतिशय समर्पित भावनेने शिक्षक करीत आहेत. खूप चांगले शिक्षण देऊन चांगल्या पदांवर आज मुले काम करीत आहेत. शिक्षकांचे प्रश्न एकत्र बसून सोडविण्याची भूमिका उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.


            पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवेदनशील असून ते अतिशय प्रामाणिकपणे काम करीत आहेत. जुन्या पेन्शनची मागणी सर्वत्र होत आहे.


            शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, विद्यार्थी हा शिक्षणाचा आत्मा आहे. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी शिक्षणविषयक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. माध्यमिक शिक्षकांसह प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविले. शिक्षक सुद्धा शिक्षण खात्यात मोठे अधिकारी व्हावेत, अशी राज्य शासनाची इच्छा आहे. मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न आहेत. केंद्र प्रमुखांच्या जागा 100 टक्के भरल्या जातील तसेच राज्य शासन पुढील दोन महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती करणार आहे, असे ते म्हणाले.


            कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. सुरुवातीला स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


            कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. वाजे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सरुडकर आणि स्वाती शिंदे- पवार यांनी केले.

डॉ. लक्ष्मण आसबे यांचे रविवारी व्याख्यान

 जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत

डॉ. लक्ष्मण आसबे यांचे रविवारी व्याख्यान


            मुंबई, दि. 17: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र्र’ या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान रविवार, दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.


यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


फेसबुक- https://www.facebook.com/MahaDGIPR


ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR


            शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले. रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. आपले आचरण, विचारांमधून समाजासमोर आदर्श निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुण पिढीने अंगीकार करून प्रत्यक्ष आचरणात आणल्यास हीच खरी त्यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना ठरेल, असा संदेश डॉ. आसबे यांनी आपल्या व्याख्यानातून दिला आहे.


००००l

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत


डॉ. लक्ष्मण आसबे यांचे उद्या व्याख्यान.

            मुंबई, दि. 17: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर शनिवार दि. 18 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.


            शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले. रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली. त्यांनी आपले आचरण, विचारांमधून समाजासमोर आदर्श निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुण पिढीने अंगीकार करून प्रत्यक्ष आचरणात आणल्यास हीच खरी त्यांच्या जयंतीनिमित्त मानवंदना ठरेल, असा संदेश डॉ. आसबे यांनी आपल्या व्याख्यानातून दिला आहे.


0



कधी काळी सायकल चालविण्यासाठी सुध्दा परवाना बिल्ले किंवा टोकन असायचे.. 🙏


 कधी काळी सायकल चालविण्यासाठी सुध्दा परवाना बिल्ले किंवा टोकन असायचे.. 🙏 


हो , एक काळ होता ज्या वेळेस सायकलीना खूप महत्त्व होते.सायकलची संख्या जास्त असल्यामुळे सायकलसाठी लायसेन्स म्हणजे परवाना (कर) ही संकल्पना पुढे आली.


नगरपरिषद , महानगरपालिका यांच्या मार्फत हा पितळी , अल्युमिनियम किंवा लोखंडी धातुत हे बिल्ले म्हणजेच परवाना दिले जात ज्यावर त्यावर नगरपरिषद किंवा नगरपालिकेचे नाव, सायकल टोकन क्र. व सण कोरलेला असत.


सायकलीच्या हँडल च्या पुढील बाजूस हा "बिल्ला"( परवाना) लावला जात, परंतु या बिल्ल्याची चोरी होत असल्याकारणाने अनेक जण सायकलच्या पुढील चाकाच्या स्पोकमध्ये किंवा सीटच्या खालील बाजूस आत मध्ये हा बिल्ला लावत.


सायकलीला दिवा नसणे, ट्रिपल सीट सायकल चालवणे या कारणावरून पोलीस हा परवाना तपासून पाहत.जर हा परवाना( बिल्ला) नसल्यास २ ते ५ पैशांचा दंड आकारला जात असे.


कालांतराने सायकली कमी झाल्या. आणि हे परवाने मागे पडले. 


छायाचित्रात पुणे, दिल्ली, जळगाव , छिंदवाडा (मध्य प्रदेश), तोशाम (पंजाब) या प्रदेशातील बिल्ले म्हणजेच परवाने दिसत आहेत..🙏

चोरी आली अंगाशी

 


Featured post

Lakshvedhi