Wednesday, 8 February 2023

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मिळणार हक्काची घरे

 चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मिळणार हक्काची घरे

- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केल्या मान्य

            मुंबई, दि. 7 : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना "सर्वांसाठी घरे" योजनेत घरे, तसेच वैमानिक प्रशिक्षण यासह महत्वाचे निर्णय आज घेण्यात आले आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या सूचनांवर आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी हे निर्णय घेतले आहेत.


            दूरदृश्यप्रणालीद्वारे नागपूर महसूली विभागाची जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम प्रारुप आराखडा २०२३-२४ संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यासंदर्भात पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी चार महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या होत्या. आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी या सर्व सूचना तत्काळ स्वीकारल्या.


            या निर्णयांनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील कोलम समाजातील आदिवासी बांधवांना "सर्वांसाठी घरे" या योजनेतंर्गत घरकुले उपलब्ध करुन देण्यात येतील. या समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकताही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मांडली होती. देण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

प्रा. जी. एस. माजगांवकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

 प्रा. जी. एस. माजगांवकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान


पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथेही कला प्रदर्शन भरविणार


— सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार


            मुंबई, दि. 7 : राज्यातील कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळावी, हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून आगामी काळात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथेही कला प्रदर्शन भरविले जाणार असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.


            बॉम्बे आर्ट सोसायटीच्या 131 व्या अखिल भारतीय वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन आज सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी द बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, नरेंद्र विचारे, विक्रांत मांजरेकर जीवनगौरव पुरस्कार विजेते प्रा. जी. एस. माजगांवकर, रामदास फुटाणे, चंद्रजित यादव आदी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, एखाद्या कलाकाराला आपली कला जहांगीर आर्ट गॅलरी येथे सादर करण्याची संधी मिळावी, असे नेहमीच वाटते, मात्र, या आर्ट गॅलरीमध्ये कला सादर करताना काही वर्षे थांबावे लागते, अशा वेळी कलाकाराचे मनोबल वाढण्यासाठी आणि व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेईल. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे कलाप्रदर्शन भरल्यानंतर त्याची चाचणी जहांगीर आर्ट गॅलरी येथे करण्यात येईल.


            महाराष्ट्रातील अनेक कलाकार कला, साहित्य, चित्रकला, संस्कृती यामध्ये आपला ठसा उमटवत आहेत. या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ सांस्कृतिक कार्य विभाग उपलब्ध करुन देईल जेणेकरुन आपले कलाकार आपली कला सादर करताना, सादरीकरण करताना कुठेही कमी पडणार नाही.


सहजता, कल्पकता आणि सूचकता या गोष्टी कलाकारांनी अवगत करणे महत्त्वाचे


            सत्कार स्वीकारल्यानंतर श्री. माजगावकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले चित्र स्वीकारले गेले नाही म्हणून खचून न जाता पुढे जात राहावे. आकार, सौंदर्य, प्रावीण्य, कलात्मक दृष्टिकोन यामुळेच आपलं कलेमधलं कलामूल्य वाढत असतं. सहजता, कल्पकता आणि सूचकता या तीन गोष्टी कलाकारांनी अवगत करणे महत्त्वाचे आहे.


            या कार्यक्रमादरम्यान एकूण ४८ पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. आजपासून जहांगीर आर्ट गॅलरी येथे 131 वे अखिल भारतीय कला प्रदर्शन भरविण्यात आले आहे. जहांगीर आर्ट गॅलरीच्या चारही दालनांमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून भारतभरातून आलेल्या चित्राकृती, शिल्पाकृती, मुद्रा चित्रे, छायाचित्रे अशा विविध कलाप्रकारांमधील कलाकृती असणार आहेत.


            महाराष्ट्रात 134 वर्षे जुनी बॉम्बे आर्ट सोसायटी असून ही सोसायटी सातत्याने कलाविषयक उपक्रम राबवते. विशेष म्हणजे राज्य शासनाने वांद्रे येथे दिलेल्या जमिनीवर बॉम्बे आर्ट सोसायटीने तयार केलेल्या संकुलाचे उद्घाटन प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सन 2016 मध्ये केले होते.

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडीच्या तिसऱ्या, चौथ्या टप्प्याच्या विकास आराखड्यास मान्यता

 श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडीच्या तिसऱ्या,

चौथ्या टप्प्याच्या विकास आराखड्यास मान्यता


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली


राज्यस्तरीय शिखर समितीची २१४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी.

            मुंबई, दि. 7 : नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानमध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून विकास कामे सुरु आहेत, यापूर्वीच दोन टप्प्यांना शासनाने मान्यता दिली असून या आराखड्यातील २१४ कोटी रुपयांच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.


            श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय शिखर समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल, टेकचंद सावरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी उपस्थित होते.


            श्री महालक्ष्मी जगदंबा माता संस्थान कोराडीच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्याच्या प्रस्तावाला जिल्हास्तरीय समितीने यापूर्वीच मान्यता दिली आहे. तिसरा टप्पा १४०.७६ कोटी रुपये, तर चौथा टप्पा ७४.१७ कोटी असा एकूण २१४.९४ कोटी रुपयांचा असून या आराखड्याला आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिली आहे. या आराखड्यात वाहनतळ, प्रवेशद्वारे, प्रशासकीय इमारत, तिकीट काऊंटर, फाऊन्टेन, देवीच्या ९ शक्तीपीठांची आणि ९ रुपांची प्रतिकृती, म्युझियम, सभागृह, उद्यान आदी बाबींचा समावेश आहे. या दोन्ही टप्प्यांमधील कामे तीन वर्षात पूर्ण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.


            कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा माता संस्थान हे पौराणिक मंदिर असून नगरविकास विभागाच्या वतीने टप्पानिहाय विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यापूर्वीच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे २२० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली असून कामे देखील पूर्णत्वास जात आहेत. या दोन टप्प्यातील कामे वेळेत पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विभागांचे कौतुक केले आहे.


            आज मंजुरी मिळालेल्या श्री महालक्ष्मी जगदंबा माता संस्थान कोराडीच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यासाठी दरवर्षी प्रत्येकी ५० कोटी रुपये निधी आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन देण्यात येणार असून ही कामे दर्जेदार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.


            नागपूर सुधार प्रन्यासच्या वतीने यावेळी कोराडी येथील पर्यटन स्थळाच्या विकासाबाबत सादरीकरण करण्यात आले. त्यातून आराखड्यातील प्रस्तावित कामांची माहिती उपस्थितांना दिली.

परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदणीसाठी वेब पोर्टल विकसित

 परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदणीसाठी वेब पोर्टल विकसित

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या हस्ते वेब पोर्टलचे उद्घाटन


            मुंबई, दि. 7 : महाराष्ट्रातील विद्यापिठांतर्गत नामांकित संस्थांमधून राबविण्यात येणाऱ्या नावीण्यपूर्ण अभ्यासक्रमांची माहिती परदेशातील विद्यार्थ्यांना व्हावी, आणि त्यांची प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी, म्हणून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत www.mahacet.org हे वेब पोर्टल विकसीत करण्यात आले आहे.


            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज या वेबपोर्टलचे उद्घाटन सिंहगड शासकीय निवासस्थान मुंबई येथे करण्यात आले.


            राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षा आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाअंतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार पसंती देतात. त्यांची प्रवेश प्रक्रिया सुलभ आणि सोपी व्हावी, यासाठी हे वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे परदेशी उमेदवारांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीचा मार्ग अधिक सुलभ होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.


             यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त महेन्द्र ब. वारभुवन, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.


            वेब पोर्टल हे प्रामुख्याने एनआरआय, एफएनएस, ओसीआय/पीआयओ व सीआयड्बल्यूजीसी या प्रवर्गातील उमेदवारांसाठी तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवर विविध विद्यापीठांच्या संबंधित अभ्यासक्रमांची माहिती व आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्राच्या लिंक उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.


००००

Tuesday, 7 February 2023

Gathering prize winner

 

Rayan school 

आदर्श गाव, आदर्श घ्यवाच.

 


कसं आहे ना?



खूपच सुंदर अर्थपूर्ण आणि भावपूर्ण कविता 👌


*कसं आहे ना?* 


एक कागदाचं

पान असतं...!!


 *'श्री'* लिहलं, की 

पूजलं जातं ...


 *प्रेमाचे* चार शब्द 

लिहले, की

जपलं जातं...


काही *चुकीचं* 

आढळलं, की 

फाडलं जातं...


एक कागदाचं 

पान असतं...!!


कधी त्याला 

 *विमान* बनवून 

भिरकावलं जातं...


कधी *होडी* बनवून 

पाण्यात सोडलं जातं...


कधी *भिरभिरं* बनवून 

वाऱ्यावर फिरवलं जातं...


आणि कधी तर 

 *निरुपयोगी* म्हणून 

चुरगाळलंही जातं...


एक कागदाचं

पान असतं....!!


जे लेखकाच्या 

 *लेखणीला* हात देतं...


जे चित्रकाराच्या 

 *चित्राला* साथ देतं...


जे व्यापाऱ्याच्या 

 *हिशोबाला* ज्ञात ठेवतं...


आणि हो, 

वकीलासोबत *कोर्टात* गेलं, 

की *साक्षही* देतं...


एक कागदाचं

पान असतं.....!!


 *पेपरवेट* ठेवलं, की 

एकदम गप्प बसतं...


काढून घेतलं, की 

 *स्वच्छंदी* फिरतं आणि 

कशांत अडकलं, तर

 *फडफडायला* लागतं...


एक कागदाचं

पान असतं.....!!


ज्यावर बातम्या छापल्या, 

की *वर्तमानपत्र* बनतं...


प्रश्न छापले, की 

 *प्रश्नपत्रिका* बनतं...


विवाहाचं निमंत्रण छापलं, 

की *लग्नपत्रिका* बनतं...


तर कधी आदेश~संदेश

लिहले, की तेच *टपालही* 

बनतं...


एक कागदाचं

पान असतं....!!


 *माणसाच्या* जीवनांत

आणि *त्यांत* खूप

 *साम्य* असतं...!!


एक कागदाचं

पान असतं...!!

जन्मला आला तर birth certificate असतं

निधन झाला तर Death certificate असतं

एक कागदाचं

पान असतं 


🙏🏻

Featured post

Lakshvedhi