सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 19 January 2023
प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी शासन प्रयत्न करणार
प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी शासन प्रयत्न करणार
- उद्योग मंत्री उदय सामंत
दावोसमधून राज्यात १ लाख ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूकया गुंतवणूकीतून एक लाख रोजगाराची निर्मिती
मुंबई, दि. १८ :- दावोस येथील परिषदेत महाराष्ट्र शासनाने जगभरातील विविध कंपन्यांसोबत सुमारे १ लाख ४० हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहे. या माध्यमातून राज्यात एक लाख रोजगार निर्माण होतील. नव उद्योगांना ३० दिवसांत विविध परवानग्या मिळण्यासाठी तातडीने नवीन कायद्याअंतर्गत धोरण तयार करण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
दावोस (स्वित्झर्लंड) येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेतून दूरदृश्य प्रणालीमार्फत उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे उपस्थित होते.
मंत्री श्री. सामंत यांनी म्हणाले, राज्यात सुरू होणाऱ्या नवीन प्रकल्पात ८० टक्के स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यासाठी विशेष सनियंत्रण पथक कार्यान्वित करण्यात येईल. नव उद्योगांना ३० दिवसांत परवानगी मिळावी म्हणून मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत नवीन धोरण आणण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यातील ज्या जिल्ह्यांत उद्योग नाहीत तिथे उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजकांना सवलती देत प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक विकासाच्या दृष्टीने शासन प्रयत्न करेल. थेट परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून शासनाने राज्य आणि युवा पिढीच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतले असून, बेरोजगारी दूर करणे आणि औद्योगिक दृष्ट्या जगात विकसित राज्य होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन स्टील प्रकल्पाचे उद्योजक लक्ष्मी मित्तल यांची भेट घेतली. याशिवाय बंदर विकासाचे प्रकल्प सुरू करण्याबाबत यावेळी निर्णय घेण्यात आला. स्टील उद्योगासह कोकणात मरिन पार्क आणि मँगो पार्क उभारणीसाठी प्रयत्न केले जातील. कोकणवासीयांना विश्वासात घेऊनच हे प्रकल्प सुरू करण्यात येतील, असे मंत्री श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.
दावोसमध्ये भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत जर्मनीने त्यांच्या कंपन्यांसोबत ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने दोन दिवसांत सुमारे १ लाख ४० हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. यातून राज्यात एक लाख रोजगार निर्माण होणार आहेत. या कराराअंतर्गत बर्कशायर हाथवे ही अमेरिकन कंपनी १६ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. बोकोरो इंडिया प्रा. लि. कंपनी पाच हजार कोटी रुपयांचे चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. ग्रीनको सोलार आणि हायड्रो प्रकल्पात १२ हजार कोटी गुंतवणार आहे. आयसीडी मेडिकल टेक्निकल कॅपिटल पार्टनर्स १६ हजार कोटी रुपये, तर महिंद्रा इलेक्ट्रिकल्स इलेक्ट्रीकल व्हेहिकल क्षेत्रांमध्ये दहा हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पाचा विस्तार नाशिकमध्ये होणार असून त्यासाठी सहा हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. न्यू एरा क्लीनटेक सोल्युशन या कोल गॅसिफिकेशन प्रकल्पासाठी विदर्भातील चंद्रपूरमध्ये २० हजार कोटी रुपये, निप्पॉन कंपनी २० हजार कोटी रुपये, लक्सेमबर्ग डेटा सेंटरमध्ये १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी लक्झमबर्गच्या पंतप्रधानांसह सिंगापूर, सौदी अरेबियाच्या मंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी विविध शिष्टमंडळाबरोबर बैठकही घेतली. त्यांनी विविध क्षेत्रात गुंतवणुकीची तयारी दर्शवली. या बैठकीदरम्यान मेडिकल डिव्हाईस पार्क उभारण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. बार्कलिन विद्यापीठासोबत कौशल्ये विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मंत्री श्री. सामंत यांनी दिली.
जे करार झाले आहेत, ते प्रत्यक्षात येतील. सेमी कंडक्टरचे इतर प्रकल्प महाराष्ट्रात येतील. त्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करण्याचे शासनाचे उद्दीष्ट असल्याचेही उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
०००
महाराष्ट्रीयन स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी काळी साडी का नेसतात? कधी केला का याचा विचार कोणी?
महाराष्ट्रीयन स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी काळी साडी का नेसतात? कधी केला का याचा विचार कोणी?
मित्रांनो आजपासून 259वर्षे आधी आजच्याच दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी पानिपत येथील युद्धात महाराष्ट्रातील एक पिढीच्या पिढी गारद झाली होती. त्या युद्धाचे वर्णन असे करतात की,"लाख बांगडी फुटली,दोन मोहरे गळाले, सत्तावीस मोहरा कामी आल्या,चिल्लर खुर्दा किती उडाला,याची गणनाच नाही".
महाराष्ट्राच्या इतिहासातील हा अतिशय दुःखद दिन होता.एकही घर महाराष्ट्रातील असे नव्हते की ज्याघरीचा एकही माणूस या युद्धात कामी आला नाही.पण दुर्दैवाने महाराष्ट्रातील फार कमी लोकांना या दिवसाचा हा इतिहास माहिती आहे.इंग्रजी शिक्षणाने आणि स्वातंत्र्या नंतरच्या सेक्युलर शिक्षणाने आमचे जीवन हे कटी पतंग सारखे करून टाकले.त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे आम्हाला आमचा हा पराक्रमाचा,बलिदानाचा इतिहास माहितीही करून घ्यायचा नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रीयन स्त्रिया तर पांढरे कपाळ,हॉट पॅन्ट,आणि स्लिप्स घालुन फिरणाऱ्या संस्कृतीच्या ब्रँड एंबेसेडर झाल्या आहेत.
सदाशिवराव भाऊ पेशवे, विश्वासराव पेशवे,अभिमन्यू सारखा पराक्रम करणारे जनकोजी शिंदे,"बचेंगे तो और भी लढेंगे" असे म्हणणारे दत्ताजी शिंदे,बळवंतराव मेहंदळे, पार्वतीबाई(सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नी) यांना पाठीवर घेऊन दीडशे मैल धावत जाणारा जानू भिंताड्या यांच्या पराक्रम आणि बलिदानाच्या कथा आणि नावे विस्मरणात गेली आहेत.
आजचा संक्रांतीचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी शोकदिन होता,म्हणून संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रातील स्त्री ही हळदीकुंकवासारख्या सौभाग्याची कामना करणाऱ्या आपल्या उत्सवाच्या दिवशी सुद्धा काळी साडी परिधान करते.आजच्या या संक्रमण पर्वावर महाराष्ट्रीयन महिला आजच्या दिवशीचा हा इतिहास लक्षात ठेवून व आपल्या मुलांना आणि मुलींना हा इतिहास सांगतील तसेच अतिशय अभिमानाने आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचे केवळ स्मरण करून नव्हे अभिमान बाळगून काळी साडीच परिधान करतील(काळी सलवार कमीज नव्हे बरे) अशी अपेक्षा व्यक्त करतो.
संतोष माहुरकर.
Wednesday, 18 January 2023
विनम्रता जब उभरती है, अहम लुप्त होता है....
विनम्रता जब उभरती है, अहम लुप्त होता है....
तो महान व्यक्तित्व उभरता है!!
.....जयतु जय भारतीय संस्कृति.....
2 दिन पूर्व ट्विटर पर इंफोसिस के मालिक नारायण मूर्ति की पत्नी सुधा मूर्ति की सब्जियां बेचते हुए फोटो वायरल हो गई। बाद में पड़ताल हुई तो पता चला कि वास्तव में फोटो सुधा मूर्ति की ही है, जो 2480 करोड रुपए की मालकिन है।
"किंतु वे सब्जीयां क्यों बेच रही हैं?"
तो उसका उत्तर मिला "वह राघवेंद्र मठ (मंदिर) में प्रति वर्ष 3 दिन के लिए आती हैं,चुपचाप। वहां पर फल सब्जी काटना, व्यवस्थित करना, रसोई के काम में लगना, यह सब काम करती हैं, स्वयं अपने हाथ से।
जब उनसे पूछा गया "यह क्या है, आप क्यों ऐसा करती हैं?" तो उन्होंने कहा *"यह अपने अहम को मारने की एक विधि है, जो मैंने पंजाब में गुरुद्वारे में होने वाली कार सेवा को देखकर सीखी है।* पैसों का दान देना भी अच्छी बात है,किंतु स्वयं शारीरिक श्रम करना व सामान्य लोगों के साथ,सामान्य लोगों की तरह, तीन-चार दिन रहना, यह मेरे अहंकार की वृद्धि नहीं होने देता। वर्ष भर मैं इसके कारण से सेवा भाव में रहती हूं।"
वह कितना व कहां कहाँ दान करती हैं, कैसे करती हैं, वह नहीं बताना चाहती। (यह निश्चित है कि वह करोड़ों में है)
स्वयं नारायण मूर्ति को जो 68 वर्ष के हो गए हैं,को एक कार्यक्रम में 78 वर्षीय रतन टाटा के पैर छूते हुए, दो वर्ष पूर्व, सब ने देखा है। *विनम्रता जब उभरती है, तो ऐसी घटनाएं सामान्य होती हैं।*
जब मैंने सारा देखा, पढ़ा, तो मैं भी सोच में पड़ गया कि क्या इतने उच्च स्तर पर पहुंचने के बाद ऐसा करना संभव है?
कितना कठिन है कि जिनके नौकरों के पास भी SUV कारें हों, आलीशान बंगले हैं, वह महिला सामान्य कारसेवक महिलाओं के साथ उसी तरह काम करे व 15-16 साल से किसी को पता भी न चले।
धन्य धन्य!
*चित्र में सुधा मूर्ति राघवेंद्र मठ में सब्जियों के साथ!!*
*और अरबपति नारायण मूर्ति ,रतन टाटा के पैर छूते हुए।*
🙏👇👇👇
दावोस जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार
दावोस जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात गुंतवणुकीचे१ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार
गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरच सुरु होतील
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
मुंबई दि. १८ : दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र गुंतवणूकदारांचे पसंतीचे राज्य असल्याचे ठळकपणे अधोरेखित झाले आहे, असे सांगून या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून उत्तम पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे. त्यामुळे उद्योजकांना मॅग्नेटिक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची संधी असून दावोसमध्ये महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी पसंती दर्शवली आहे. त्यासाठी त्यांचे आभार मानत त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
हायटेक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात ५४ हजार २७६ कोटी
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाची आणि महाराष्ट्राची छाप या आर्थिक परिषदेत दिसून आली. महाराष्ट्राच्या विविध औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक झाली असून त्यामध्ये हायटेक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात सहा कंपन्यांसोबत ५४ हजार २७६ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले आहे. त्याद्वारे ४३०० रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
ऊर्जा आणि इलेक्ट्रीकल व्हेईकल क्षेत्रात ४६ हजार ८०० कोटी
ऊर्जा क्षेत्रातील नविनीकरणीय ऊर्जा आणि इलेक्ट्रीकल व्हेईकल क्षेत्रात ४६ हजार ८०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामाध्यमातून ४५ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
आयटी, फिनटेक, डेटा सेंटर या क्षेत्रामध्ये ३२ हजार ४१४ कोटी
माहिती तंत्रज्ञान (आयटी), फिनटेक, डेटा सेंटर या क्षेत्रामध्ये ३२ हजार ४१४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असून ८७०० जणांना रोजगार मिळणार आहे. लोह उत्पादन क्षेत्रात २२०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून ३००० जणांना रोजगार मिळणार आहे. कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रामध्ये १९०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले असून त्यामुळे सुमारे ६०० जणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
उद्योग वाढीला चालना देण्यासाठी नवीन धोरण
राज्य शासनामार्फत जनतेच्या हिताच्या निर्णयासोबतच उद्योग वाढीला चालना मिळावी, यासाठी नवीन उद्योग धोरण आखण्यात आले असून नवीन धोरणामध्ये एक खिडकी योजना, भांडवली अनुदान, जीएसटी कर अनुदान त्याच बरोबर नवीन तंत्रज्ञान आणि मोठ्या उद्योगांना विशेष पॅकेज देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.
सामंजस्य करारांची एकत्रित माहिती
पुणे - रुखी फूड्स - ग्रीन फिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प - 250 कोटी गुंतवणूक
पुणे - निप्रो कार्पोरेशन (जपान) - ग्लास ट्युबिंग प्रकल्प - 1,650 कोटी गुंतवणूक - (2000 रोजगार)
पुणे-पिंपरी - एलाईट प्लास्ट अँटो सिस्टीम्स (पोर्तुगाल) - प्लास्टिक ऑटोमोटिव्ह प्रकल्प - 400 कोटी गुंतवणूक - (2000 रोजगार)
मुंबई - इंड्स कॅपिटल पार्टनर्स - आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण सेवा - 16000 कोटी गुंतवणूक
औरंगाबाद - ग्रीनको - नवीनीकरण ऊर्जा (रिन्युएबल एनर्जी) प्रकल्प - 12,000 कोटी गुंतवणूक - (6,300 रोजगार)
चंद्रपूर- भद्रावती - न्यू एरा क्लीनटेक सोल्युशन (अमेरिका) - कोल गॅसिफिकेशन प्रकल्प - 20,000 कोटी गुंतवणूक - (15,000 रोजगार)
चंद्रपूर -मूल - राजुरी स्टील अँड अलाईज (इस्राईल) - स्टील प्रकल्प - 600 कोटी गुंतवणूक - (1000 रोजगार निर्मिती)
गडचिरोली - चार्मिशी - वरद फेरो अलाईज - स्टील प्रकल्प - 1,520 कोटी गुंतवणूक - (2000 रोजगार निर्मिती)
महाराष्ट्र - गोगोरो इंजिनीअरिंग & बडवे इंजिनीअरिंग - ऑटो प्रकल्प - 20,000 कोटी गुंतवणूक - (30,000 रोजगार)
महाराष्ट्र - बर्कशायर-हाथवे - नागरी पायाभूत सुविधा - 16,000 कोटी गुंतवणूक
महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल, 10,000 कोटी गुंतवणूक - (3000 रोजगार)
लक्झम्बर्ग इन्व्हेस्टमेंट कंपनी - 12000 कोटी गुंतवणूक - (1,200 रोजगार)
हंस इन्फ्रोसोल्युशन प्रा. लि. वूडवीन -4000 कोटी गुंतवणूक - (800 रोजगार)
नुंबई, पुणे, ठाणे, नागपूर येथे – जपानच्या निप्पॉन टेलेग्राफ एंड टेलिफोन – डेटा सेंटर्स- 20,414 कोटी गुंतवणूक – (1525 रोजगार )
नॉलेज पार्टनरशिपसाठी करार
दावोस येथे महाराष्ट्रात नॉलेज पार्टनरशिपसाठी देखील खालील सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये
मुंबई महानगर- कॅलिफॉर्निया विद्यापीठ (बर्कले)समवेत स्मार्ट सिटी सामंजस्य करार
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसमवेत नागरी परिवर्तनासाठी सामंजस्य करार
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसमवेत न्यू इकॉनॉमी एंड सोसायटीसाठी सामंजस्य करार
स्विस इंडिया चेंबर ऑफ कॉमर्ससमवेत गुंतवणूक आणि व्यापारविषयक सहकार्यासाठी सामंजस्य करार
००००
ब्लॅक cat कमांडो,
ब्लॅक कॅट कमांडो एक सल्युट
: हा फोटो आहे ब्लॅक कॅट कमांडो चा...
हे आहेत आधुनिक भारताचे रक्षक एन.एस.जी. चे ब्लॅक कॅट कमांडो.
यांच्या हेल्मेटवर आहे Tata Advanced Systems Limited (TASL) हेल्मेट माउंटेड नाईट व्हिजन मोनोक्युलर कॅमेरा.
गेल्या काही वर्षात काय बदल झाला आहे तर तो हा आहे. आपल्या रक्षकांना मिळत आहेत आत्मनिर्भर भारताने स्वबळावर बनवलेली आयुधे आणि शस्त्रास्त्रे.
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्य :- टेलिग्राम, गुगल
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...

