महाराष्ट्रीयन स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी काळी साडी का नेसतात? कधी केला का याचा विचार कोणी?
मित्रांनो आजपासून 259वर्षे आधी आजच्याच दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी पानिपत येथील युद्धात महाराष्ट्रातील एक पिढीच्या पिढी गारद झाली होती. त्या युद्धाचे वर्णन असे करतात की,"लाख बांगडी फुटली,दोन मोहरे गळाले, सत्तावीस मोहरा कामी आल्या,चिल्लर खुर्दा किती उडाला,याची गणनाच नाही".
महाराष्ट्राच्या इतिहासातील हा अतिशय दुःखद दिन होता.एकही घर महाराष्ट्रातील असे नव्हते की ज्याघरीचा एकही माणूस या युद्धात कामी आला नाही.पण दुर्दैवाने महाराष्ट्रातील फार कमी लोकांना या दिवसाचा हा इतिहास माहिती आहे.इंग्रजी शिक्षणाने आणि स्वातंत्र्या नंतरच्या सेक्युलर शिक्षणाने आमचे जीवन हे कटी पतंग सारखे करून टाकले.त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे आम्हाला आमचा हा पराक्रमाचा,बलिदानाचा इतिहास माहितीही करून घ्यायचा नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रीयन स्त्रिया तर पांढरे कपाळ,हॉट पॅन्ट,आणि स्लिप्स घालुन फिरणाऱ्या संस्कृतीच्या ब्रँड एंबेसेडर झाल्या आहेत.
सदाशिवराव भाऊ पेशवे, विश्वासराव पेशवे,अभिमन्यू सारखा पराक्रम करणारे जनकोजी शिंदे,"बचेंगे तो और भी लढेंगे" असे म्हणणारे दत्ताजी शिंदे,बळवंतराव मेहंदळे, पार्वतीबाई(सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नी) यांना पाठीवर घेऊन दीडशे मैल धावत जाणारा जानू भिंताड्या यांच्या पराक्रम आणि बलिदानाच्या कथा आणि नावे विस्मरणात गेली आहेत.
आजचा संक्रांतीचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी शोकदिन होता,म्हणून संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रातील स्त्री ही हळदीकुंकवासारख्या सौभाग्याची कामना करणाऱ्या आपल्या उत्सवाच्या दिवशी सुद्धा काळी साडी परिधान करते.आजच्या या संक्रमण पर्वावर महाराष्ट्रीयन महिला आजच्या दिवशीचा हा इतिहास लक्षात ठेवून व आपल्या मुलांना आणि मुलींना हा इतिहास सांगतील तसेच अतिशय अभिमानाने आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचे केवळ स्मरण करून नव्हे अभिमान बाळगून काळी साडीच परिधान करतील(काळी सलवार कमीज नव्हे बरे) अशी अपेक्षा व्यक्त करतो.
संतोष माहुरकर.
No comments:
Post a Comment